
19/08/2023
स्वराज्य निर्माण करणारे,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराज शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचं शौर्य, कार्य, कर्तृत्व पराक्रम, विचार आणि राजकीय चातुर्य आजही, ५०० वर्षांनी सुद्धा जनमानसात मनामनात आहे....
स्वराज्याचा विचार आणि मुहूर्तमेढ शहाजीराजे भोसले यांनीच केली, या बापमाणसाने कृतिशील विचार दिला, आणि तो घरामध्ये रुजवला. स्वराज्याची संकल्पना सुरू झाली.. आपल्या स्वराज्यामध्ये सुद्धा बाप माणसाचे म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचे अनन्य साधारण महत्व आहेच आणि ते अधोरेखित होते..
प्रत्येक क्षेत्रामध्ये, कुटुंबा मध्ये
प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप माणूस असतोच, प्रत्येक यश किंवा उत्तुंग भरारी ही त्यामागे असणाऱ्या बापमाणसामुळेच असते, त्या बापमाणसाला sophisticated असा मेंटोर (mentor ) हा शब्द वापरला जातो,
पण आमच्यासाठी वजनदार शब्द म्हणजे बाप माणूसच..
हाच बापमाणूस,
प्रसिद्ध व्याख्याते आमचे मित्र मा. गणेश शिंदे यांनी अतिशय भावनिक मार्मिक पौराणिक आणि इतिहासातील असंख्य दाखले देऊन.. नगरकरांच्या मनात बाप माणूस अधोरेखित केला.
नगर बदलतंय टीमचे
आणि प्रसिद्ध व्याख्याते माननीय गणेश शिंदे यांचे आभार.....
_Dr. Amit Pawar