04/11/2022
🔸️विषय- #विवाह_विलंब_वैवाहीक_जीवन
🔹️संदर्भ आधार- सप्तम स्थान.
🔸️लेखक- ज्यो. गजानन परब.
🚩️सनातन भारतीय संस्कृती मध्ये विवाह संस्काराला 'सोळा संस्कार मधील एक महत्वपूर्ण संस्कार मानला आहे.. तर योग्य वेळी विवाह न होणे हे मुलांसाठी समस्या बनतेच पण आईवडील आणि नातेवाईक यांना एक प्रकारे टेंशन चे काम बनते.
🔹️अगोदरच्या काळात आईवडील, नातेवाईक मुलींच्या विवाहा विषयी खूप चिंतित असायचे, पण आजकाल मुलांच्या विवाह कार्या साठी आईवडील चिंतित होताना आपण जास्त पहातो.सांगायचे झालं तर आज काही लोक विवाह न जमल्या मुळे आविवाहित अवस्थेत पण जगत आहेत.
♦️पूर्वीच्या काळी विवाह निच्छित कसा व्हायचा तर “हा मुलगा आहे, त्याच्या बरोबर तुला विवाह करायचा आहे” किंवा मुलाला पण, “ही मुली आहे तिच्याशी तुला विवाह करायचा आहे” अशा पद्धतीत विवाह ठरले जायचे, म्हणजे घरातील नातेवाईक किंवा प्रौढ व्यक्ति सुचवतील त्या प्रमाणे, त्यांच्या सल्ल्याने विवाह व्हायचे.
🔸️आज काल झाले काय तर मुला-मुलींची निवड पसंती (choice) हा विषय प्रामुख्याने पाहायला मिळतो.
आज मुलींच्या पसंतीला जास्त महत्व आले आहे, त्यामुळे मुलांच्या विवाह जमण्यास कुठेतरी जास्त अडचणी येत आहेत, त्याच बरोबर मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण पण वाढले आहे , मग त्या प्रमाणे अपेक्षा, त्यामुळे मुलींना योग्य आणि अनुरूप मुलं मिळत नाहीत, विलंब होतो, याचा अर्थ असा नाही की मुलींनी उच्च शिक्षण घेऊ नहे.
🔹️ त्यात ही अति अपेक्षित आणि अती चिकित्सक पणे पहाणे, मग मुलगा असाच हवा आहे, तसाच हवा, मग तो हेच करतो, तेच करतो. आजकाल मुलं-मुलीतर आपल शिक्षण आणि त्याच बरोबर करिअर ह्यासाठी विवाह टाळा-टाळ करतात, विवाह विलंब करतात, मग करिअर करू नये का? असही नाही आवश्यक हे, तर हे पण विवाह विलंब होण्याचे आज कारण बनत आहे. अति अपेक्षांच्या बातीत कुठेतरी समंजस पणा, तडजोड आवशक असते.
♦️मुलां साठी पण काहीवेळा विषय असाच होत असतो करिअर उशिरा सेटल झाल्याने विवाहाची योग्य वेळ निघून गेलेली असते, तर काही वेळा घरातील परिवारीक जबाबदार्या पण कारण बनत असते, त्यात मुलांची परिस्थिति नसेल, योग्य अपेक्षित जॉब नसणे, करिअर सेटल नसणे, स्वतंत्र व्यक्तीगत घर नसणे, अशा प्रकारचे सर्वच विषय मुलांसाठी विवाह अडथळे आणि विलंब बनत आहेत.
🔸️काही वेळा आपण कितीही सुंदर असोत, कितीही कमवत असो, आणि तुमच्या नजरेत तुम्ही पूर्ण पणे विवाहसाठी योग्य असाल तरीही विवाह योगाची वाट पहावी लागते. मुली असो वा मुलगा असो विलंब विवाह दोघांसाठी आणि आई-वडीला साठी समस्या बनून जातात, स्थळ शोधताना एकतर आपली जेवढी क्षमता असते त्याचा आसपास पण मुलगा मिळत नाही, मुली मिळत नाही, तर काही-वेळा फॅमिलीच्या पसंती ना पसंतीत पण विवाह जुळता-जुळता मोडला जातो, ही सर्व सामान्य वाटणारी पण आज कालची आसामन्य कारणे बनत आहेत.
🚩 विवाह कारक ग्रह-
✅ गुरु- सर्व गुण संपन्न, धन, धर्म, ज्ञान, सुख समृद्धी, विवाह, संतती, भाग्य देणारा ग्रह सर्व ग्रहात अत्यंत फलदायी, सर्वमंगळ कार्याचा काराक असा गुरु कुंडलीत कुयोगात, दूषित असेल, असमर्थ असेल तर खास करून स्त्रियांसाठी विवाह विलंब होण्यास महत्वाचे कारण ठरते, आणि गुरू मंगलकार्याचा कारक असल्याने विवाह योग खास करून गुरुच्याच गोचर भ्रमणात घडतात.
✅ शुक्र- आजच्या भौतिक जागात आणि वैवाहिक जीवनात शुक्राची जागा सर्वोच आहे, व्यक्तिला भोग,एश्वर्य आणि सुखी जीवनाच्या आधारासाठी शुक्र शुभ आणि बलवान असणे आवशक असते, शुक्र कुयोगात असेल तर जातक विवाहित होऊन पण वैवाहिक सुखात कमतरता भोगत असतो, खास करून शत्रू, नीच राशीत आणि काही अयोग्य नक्षत्रात असलेला शुक्र पीडित असतो, उदा. मूळ नक्षत्रातील शुक्र वैवाहिक दृष्टीने अशुभ योगकारक ठरतो.
🚩विवाह विलंब होण्याची दैविक कारण कोणती असू शकतात-
1) कुलाचार- आपल्या कुलदेवतेचा मानपान, भेटी, आपल्या परंपरागत रीतिरिवाज, आपली संस्कृती याकडे दुर्लक्ष करणे.
2) निर्वंशाची( निपुत्रिक ) आडकाठी म्हणजे आपला घरचा निर्वंशिक असणे आणि त्याची आतृप्तता. एखाद वेळी जमीन मालमत्ता आपण विकत घेतो, ती जर अविवाहित आतृप्त गेलेल्या व्यक्तीची असेल तरी ही अडचण निर्माण होऊ शकते.
3) नियमित श्राद्ध कर्मांकडे दुर्लक्ष करणे , पितृदोषतुन अतृप्तता म्हणजे घराण्यात अकाली, अपघाती मृत्यू झालेल्यांची वासना शिल्लक राहणे.
4) ब्रम्ह सबंदिक बाधा असणे.
अशा प्रकारच्या दैविक विषय विवाह विलंब होण्यास जास्त प्रभावित करतात.
पहाण्यात आले की पितृदोष निवारण करून एका वर्षा आत विवाह पण जुळले आहेत. मग यासाठी योगाची वाट पहावी लागली नाही.
🍂आता आपण जन्म पत्रिके नुसार पाहुयात कोण-कोणते योग विवाह विलंब होण्यास कारण बनतात.
🔸️स्त्री कुंडलीत सप्तम भाव कारक, विवाह कारक देवगुरू बृहस्पती यांची स्थिति. स्त्री कुंडलीत गुरु निर्बली असेल, कुयोगात असेल.
🔹️ पुरुषाच्या कुंडलीत भाव कारक, विवाह काराक म्हणून शुक्र कुयोगात, निर्बली असेल तर विवाह विलंब होण्याचे कारण बनते.
👉दोघांच्या ही पत्रिकेत गुरु, शुक्र स्थिति आवश्यक आहेच, दोन्ही कुंडलीत विवाह कारक, संतती कारक गुरु असतो , दोन्ही कुंडलीत दांपत्य कारक, प्रेम कारक शुक्र असतो.
♦️ सप्तम स्थानात पाप ग्रह स्थित असतील, जसे शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपचून शत्रू राशीचा रवी.
🔸️सप्तमात कोठूनही पाप ग्रहांची दृष्टी पडेल.
🔹️ सप्तम भाव पापकर्तरी योगात असेल. म्हणजे सप्तमाच्या मागच्या आणि पुढच्या भावात पाप ग्रह स्थित असतील. असेल तर विवाह योग न येण्याची समस्या उद्धभवते.
♦️ सप्तमेश कुयोगात, अशुभ दृष्टीत असेल.
🔸️सप्तमेश 6,8,12 या त्रिकस्थानात असेल, 6, 8 ,12 या भावांचे स्वामी खास करून पाप ग्रह असून सप्तमात असतील.
🔹️सप्तमाचे अष्टम म्हणून दूतीय स्थान आणि सप्तमाचे षष्ठ स्थान म्हणून द्वादश स्थान कुयोगात असतील.
♦️सप्तमात कुंभ राशी किंवा मकर राशी असल्यास सुद्धा विवाह उशिरा योग होण्याची श्क्यता असते.
🔸️काही वेळ तर असेही पाहण्यात आले की सप्तमेश शनीच्या राशीत असतील तरीही विवाह योगात उशिराच झाला.
🔹️सप्तमेश नीच राशीत असेल, अस्त असेल, डिग्रीवाईज अतिशय निर्बली असेल अश्या कुठच्याही योगात वैवाहिक सुखात कमतरता राहते.
🔸️ जन्म कुंडलीत सप्तमेष दूषित असेल परंतु नवमाशी सुस्थिति असेल तरी बर्या पैकी विवाह योग जमतात.
❓या व्यतिरिक्त विवाह योग योग्य वेळी घडणे यासाठी कोणते योग लाभदायी ठरतात.
🔹️ सप्तम भाव व सप्तम भावाचा स्वामी म्हणजे सप्तमेश बलीष्ठ होऊन त्रिकोण स्थानात स्थित असणे.
♦️परूषांच्या कुंडलीत शुभ व बलवान शुक्र असणे .
🔸️ स्त्रि कुंडलीत गुरू, व सप्तम स्थान, सप्तमेश , गुरू अशुभ आणि पाप ग्रंहाच्या प्रभावाने मुक्त असणे .
🔹️सप्तमेश आणि सप्तम स्थानावर जेवढ्या शुभ ग्रंहाचा प्रभाव असेल तेवढेच विवाह योग योग्य वेळात घडतात. .
♦️ शुक्र ,गुरू, बुध शुभ आणि शुभ बली चंद्र ने युक्त असेल कींव्हा द्रुष्टी असेल..तर योग्य वेळात विवाह योग घडतो.
🟢पाहुयात विवाह योग कालनिर्णय किंवा गोचरी नुसार विवाह योग केव्हा घडेल-
♦️सर्वात प्रथम हे सांगेन आपल्या घरचे रिरीतीवाज, परंपरा, श्राद्ध कर्मे, कुलदेवी दर्शन, मान पान यांचा विसर झालेला असेल, वास्तूत दोष असतील, कुंडलीत सप्तमावर आणि सप्तमेशावर अत्यंत प्रभावित करणारा कुयोग असेल अश्या स्थितीत ज्योतिष शास्त्र विवाह योग नियमानुसार जरी ज्योतिषाने विवाह योग काडून दिला तरी तो चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते, हा अनुभव आहे. त्या मुळे अशा प्रकारचे घटना कुंडली नुसार सखोल जाणून घेऊन योग्य उपाय योजना करणे आवशक ठरते. काही वेळा जातक शोशल मिडीयात सांगितलेले उपाय व जाहीरीती उपाय पण करतात पण त्यात यश येत नाही . कारण विवाह विलंब याबद्दल काय नेमक कारण असेल त्यानुसार उपाय योजना करणे आवश्यक असते.
🔸️विवाह योग गोचर❗
1) सर्वात प्रथम विवाह कारक ग्रह गुरु गोचर भ्रमणानुसार गुरूचा संबंध कुंडलीत प्रथम स्थानातून, तृतीय, पंचम, सप्तम, नवम आणि एकादश स्थनातून होईल अश्या छोट्या पण महत्वाच्या काळात विवाह योग घडून येतात. त्यात ही एकादश, प्रथम, तृतीय आणि सप्तम या स्थानातून गोचर प्रबळ योग ठरतात.
2) त्याच प्रमाणे गुरु चे गोचर भ्रमण सप्तमेशावरून होईल, सप्तमेशावर दृष्टियोग होईल, शुक्रावरून , चंद्रा वरुन गोचर होईल अश्या स्थितीत विवाह योग घडतात. पण ह्याच गोचर भ्रमणात गुरु पाप ग्रहसह फार अंशात्मक युतीतून भ्रमण करत असेल तर विवाह योगा साठी अनुकूल स्थिति बनत नसते.
3) त्याच प्रमाणे शुक्राचे भ्रमण सप्तमातून, सप्तमेशा वरुन, लग्नावरून वरुन होत असेल तरीही विवाह योग घडतात. शुक्राच्या महादशेत आणि सप्तमेशाच्या अंतर दशेत विवाह योग घडून येतात. चंद्र महादशेत पण सप्तमेश ची अंतरदशेत विवाहयोग्य घडतो.
4) सप्तमेशची महादशा असेल आणि त्यात शुक्र किंवा गुरु यांची अंतर्दशा येत असेल तर विवाह योग घडतात. पण हीच दशा वयाच्या 50 व्या वर्षी येत असेल तर मग ? तर अशा स्थितित हा नियम योग्य नाही मग सप्तम स्थानात स्थित ग्रह, सप्तम स्थानात ज्या शुभ ग्रहांची दृष्टी पडते त्यांच्या महादशेत विवाह योग घडून येतात. तर हे प्रामुख्याने पाहिले जाणारे गोचर योग आहेत.
धन्यवाद 🙏
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहीतीसाठी ❗ज्योतिष आणि अध्यात्म ❗या ग्रुपला आवश्य भेट द्या.
.
🍂
Gajanan Parab.
Whtsp- 9403435853.