Chitanya Vadhuvar Kendra

  • Home
  • Chitanya Vadhuvar Kendra

Chitanya Vadhuvar Kendra प्रतिक्षा संपली जावई-सुनेची"चैतन्य" म?

सप्रेम नमस्कार,

श्री. सतीश सराफ,

१. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून व दैवी आशीर्वादाने प्रवृत्त होऊन.

२. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आम्ही सेवा देत आहोत.

३. आजच्या धकाधकीच्या, पळापळीच्या वातावरणात वधुवर सुचक केंद्र काळाची गरज बनली आहे.

४. आजकाल नातेवाईक, जवळचे संबंधित, पैसा व वेळ खर्ची पडेल म्हणून या भानगडीत पडत नाहीत म्हणून हे सेवाकार्य आम्ही हाती घेतले आहे.

५. अनेक पालकांना त्यांच्या मुलामुलींसाठी योग्य वधुवर निवडून देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

६. आम्ही फक्त सुचक आहोत, मध्यस्थी, पसंती व व्यवहार यात कोणताही संबंध ठेवत नाही.

७. आमच्या सेवेने आपण घरबसल्या, ऐच्छिक व पसंतीनुसार स्थळे प्राप्त करू शकता.

८. आपुलकीच्या भावनेने विश्वासार्ह सेवा.

९. विविध शहरातील विवाह संस्थांशी सल्लग्न.

१०. उत्स्फूर्तपणे आम्ही य सेवा कार्यात लीन आहोत.

22/08/2024

🎯 *विवाह एक भीषण परिस्थिती*...
😔😔😔😔😔
पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. *फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही.* कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
*शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे.* याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे.
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. *तेही आपणचं आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.*
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारचं आहेत.पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
*अशी अपेक्षा*
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही.
*पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या.*
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्तापाला अर्थ नाही.
*आवडल्यास पोस्ट फाॅरवर्ड करा.*
विजय घासे,अ.नगर 🙏

आधारित.

15/06/2024

👍 फक्त बायोडाटा पाहून नातेसंबंध तयार होत नाहीत,संवाद साधा,कॉल करा.
👍 समोरच्या व्यक्तींची फोन येण्याची वाट पाहू नका,स्वतः कॉल करा.
👍 मंगल कधीच अमंगल होत नाही, विवाह हे शुभ कार्य आहे.
👍 आपली मुलगी स्टार आहे,तर त्यांचा मुलगाही सुपरस्टार आहे
👍 ९० टक्के लोक आपल्या सारखीच आहेत,सर्व गुणसंपन्न कोणीच नाही.
👍 विवाह योग्य वयातच विवाह करा, वय वाढत जाणं योग्य नाही.
👍 सूट होईल त्यांच्याशीच संपर्क करा,ज्यांच्या अपेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी वेळ वाया घालू नका, त्यांच्या अपेक्षा आहेत,त्यात तुम्ही असाल तर ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील हे लक्षात ठेवा.
👍 रंग रूपापेक्षा गुणांकडे लक्ष द्या,प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कमी असणारच आहे.त्यासाठी पुढे ॲडजस्टमेंट करा.
👍 तुम्हाला कॉल करेल त्याचा सन्मान करा,स्थळ तुम्हाला पसंत नसेल तर योग्य कारण सांगून नकार कळवा,कदाचित तुम्हाला अपेक्षित असणारं स्थळ त्यांच्या एखाद्या नातेवाईकाकडे ही असू शकते,हा विचार करा.
👍 अमिताब बच्चन पेक्षा जया बच्चन उंचीने १२ इंच छोटी होत्या.
👍 करीना सैफ अली पेक्षा सोळा वर्षांनी लहान होती.
👍 सचिन पेक्षा अंजली तीन वर्षाने मोठी आहे.
👍 ऐश्वर्याला मंगळ होता, अभिषेकला मंगळ नव्हता
👍 दुसऱ्या मधील कमीपणा शोधण्यापेक्षा आपल्यातील दोष शोधा.
👍 सकारात्मकता बाळगा.
*पुढे पाठवा...परिवर्तन घडवा*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*

==ज्या वधुवर मुला मुलींचे बायोडाटा गेली दोन चार वर्षे झाली, वेगवेगळ्या वधुवर ग्रुपवर येत आहेत , त्यांना एक विनंती आहे की , तुमच्या अपेक्षा कमी करायला हव्यात !
आजुन पण वेळ गेलेली नाही ,योग्य वेळी अपेक्षामध्ये बदल केला पाहिजे !
नाहीतर आजुन पुढे दोन चार वर्षे लग्न जमणार नाही !
तेव्हा योग्य वय योग्य अपेक्षा ठेवली पाहिजे ! तरच तुम्हाला तुमच्या योग्य स्थळ मिळतील !
नाही तर तुमचे फक्त बायोडाटाच वेगवेगळ्या वधुवर ग्रुपवर बघायला मिळेल बाकी काही होणार नाही !
तेव्हा वेळीच जागं होणं गरजेचं आहे !
गेली चार चार वर्ष तुम्हाला तुमच्या अपेक्षा प्रमाने स्थळ मिळत नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्याल ऐवढे तुम्ही नक्कीच सुज्ञ आहात !
एकदा वय वाढलं की अनेक समस्या निर्माण होतात !
लग्न होणार कधी ? मग स्थिरस्थावर होणार कधी ? मग लगेचच मुलबाळ नको म्हणून पुढे आणखीन काही वर्षे जातात !
मग मुलबाळ होण्याचे वय निघुन गेले की परत मुलबाळ होण्यासाठी दवाखाना , तंत्रमंत्र ,उपास , नवस सुरू होतात !
त्यासाठी परत लाखो रुपये खर्च करायची वेळ येते !
मग टेस्टट्यूब बेबी चे आता त्यामुळेच अनेक हॉस्पिटल झाले आहेत ,तिकडे लाखो रुपये खर्च करावा लागतो !!
काहींना त्यातूनही मुलबाळ होत नाही , मग अनाथाश्रमातुन मुल दत्तक घ्यायची वेळ सुद्धा अनेकांवर आली आहे !!
त्यामुळे किती प्रमाणात अपेक्षा ठेवायच्या ते ठरवा !! आणि वेळीच निर्णय घ्या !!
खासकरून कुंडली जुळवायच्या भानगडीत पडू नका !!
आपल्याच आजूबाजूला जरा लक्ष देऊन बघा ,
कुंडली जुळलेली अनेक लग्नं मोडली आहेत !
अनेक जण विधुर विधवा झालेल्या पण दिसतील !!
तेव्हा कुंडली जुळवण्यापेक्षा , मनं जुळतात तिथं चांगली सोयरीक जमते !!
अनेक प्रेमविवाह यशस्वी झालेली सध्या दिसत आहेत ,त्यांनी काय कुंडली बघून प्रेम केलेले असते का ??

==================

🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹      ♦️ *विचारपुष्प*♦️*लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा,* *सध्याच वैवाहिक ज...
10/09/2023

🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹

♦️ *विचारपुष्प*♦️

*लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा,*

*सध्याच वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे*.. *नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या* *आहेत .प्रत्येकालाच आपलं म्हणणं, करिअर महत्त्वाचं वाटतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षाच असला पाहिजे.अशा बऱ्याच शंका, धास्ती ज्या मुली लग्न करण्यासारख्या झाल्या आहेत त्या मुलींच्या आईच्या मनात येतात. अशीच एक आई तिच्या मुलीचं लग्न ठरलेले आहे. आणि तिला पत्रातून काही गोष्टी सांगत आहे*...
*त्यानिमित्ताने आईचे लाडक्या लेकीला पत्र*
*प्रिय बेटा गोड पापा व आशीर्वाद* .
*लेक लाडकी माहेरची होणार सुन तु सासरची* " *यानिमित्ताने आईकडून हे पत्र खास तुझ्यासाठी*..
*पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुझ्या मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी. कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत*
*दोन घराण्यांचे रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे*.
*बेटा ,विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं. उंबरठ्यावरच माप ओलांडताना पहिल्या पावला बरोबरच हजारो मैलांचा नवीन प्रवास सुरू होणार आहे.तेच पहिलं पाऊल विश्वासाने पडलं की पुढचा प्रवास सुखकर होईल .हे पाऊल घरात टाकताना तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली की संसार सुखाचा होईल..हे लक्षात ठेव. आणखी एक ,सुख हे बूमरँग सारख असतं ,दुसऱ्याला दिल की फिरून ते आपल्यापाशी येतं*
*तु समजूतदार आहेस. पण माझ्यातल्या आईला काळजी वाटते म्हणून हा पत्रप्रपंच*.
*बेटा , विवाह यशस्वी होण्याचं गुपित फक्त योग्य जीवनसाथी मिळवण्यात नसून योग्य जीवनसाथी बनण्यात आहे*.
*संसार सुखाचा करण्यासाठी दोघे एकमेकांचे सोबती व्हा, बारीक-सारीक तडजोडी स्वीकारा. हट्टीपणा कमी केलात तर सगळेच हट्ट पुरवले जातील. कुटुंबातील सदस्यांचा आदर राख , प्रेमाने वाग ते ही मग तुला आपली मानतील, प्रेम, सुख तुला ही नक्कीच मिळेल*.
*महत्त्वाचं मोबाईल , फेसबुक व्हाट्सअप, चॅटिंग पासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न कर. त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा घरांमध्ये संवाद ठेव .थोड अवघड जाणार आहे पण सवय कर*.
*एक राहिलंच, फावल्या वेळात किंवा रोज मला फोन करण्यापेक्षा सासुबाईंशी संवाद ठेव . छोट्या छोट्या गोष्टी मला फोनवरून सांगण्यापेक्षा सासूबाईंचा सल्ला घे. मला तर काय तुझ्याशी गप्पा मारायला आवडेलच पण नकळत माझी माया तुला माझ्यातच गुंतवून ठेवले. त्यापेक्षा तू सासुबाईंशी मैत्री कर त्याच तुझ्या हितचिंतक व मार्गदर्शक आहेत. माझे व पप्पांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच*..
*तुझे बालपण , अल्लडपणा संपून आता तू गृहिणी होणार आहेस. तुझ्या आगमनाने त्या घरची तू भरभराट करशील दोन्ही घराण्याचे नाव उज्वल करशील हे नक्कीच*..
*बेटा ,तुला वाटेल आधुनिक काळात मी पत्र लिहिले आहे पण हेच पत्र तुझ्या कायम सोबत असेल मोबाईल मधील मेसेज सारखे डिलीट होणार नाही.. तुला खूप खूप आशीर्वाद*...
*तुझीच लाडकी*
*आई उर्फ मम्मी*
*****

📜 *दैनिक पंचाग व आध्यात्मिक माहितीसाठी

●┈┉❀꧁꧂❀┉┈●

WhatsApp Group Invite

Address


Opening Hours

Monday 11:00 - 13:00
17:00 - 20:00
Tuesday 11:00 - 13:00
17:00 - 20:00
Wednesday 11:00 - 13:00
Thursday 11:00 - 13:00
17:00 - 20:00
Friday 11:00 - 13:00
17:00 - 20:00
Saturday 11:00 - 13:00
17:00 - 20:00

Telephone

+919823966616

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chitanya Vadhuvar Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chitanya Vadhuvar Kendra:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram