Chaitanya Medical - Otur

Chaitanya Medical - Otur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chaitanya Medical - Otur, Junnar.

आता कोविड १९ ची तपासणी घरीही शक्य... Covifind Test Kit Available... MRP ₹ 250/-
08/09/2021

आता कोविड १९ ची तपासणी घरीही शक्य...
Covifind Test Kit Available...
MRP ₹ 250/-

24/08/2021

*करोना लसीकरण जनप्रबोधन* 👉 *1) लस का घ्यावी़?*कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झ...
03/04/2021

*करोना लसीकरण जनप्रबोधन*

👉 *1) लस का घ्यावी़?*
कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे.

👉 *2.लसिकरणाची कार्यक्षमता आहे का?*
सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.

👉 *3. लस सुरक्षित आहे का?*
सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत.

👉 *4. आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का?*
आता तरी सगळीकडे कोविशिल्ड - सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे नामको लसिकरण सेंटरला जे उपलब्ध आहे ते घ्या.

👉 *5. दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते?*
६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येवून नोंदणी करावी.

👉 *6. लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होवू शकतात?*
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्व सामान्य
दुष्परिणाम साधरणपणे दिसतात. ते
१ ते २ दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल/क्रोसीन या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत. वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वीत झाल्याचे लक्षण आहे.

👉 *7. लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?*
लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे. उपाशीपोटी जावू नये. लसिकरण सेेंटरवर कमी जास्त वेळ लागु शकतो त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्कीटे, कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घेवून जावे. तसेच जातांना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेवून जावे.

👉 *8.लस किती वेळा घ्यावे?*
पहिला डोस घेतला की साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.

👉 *9. कॅन्सर व इतर आजाराच्या रूग्णांनी लस घ्यावी का?*
नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसिकरण करून घ्यावे.

👉 *10. ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?*
१०० टक्के.... मुळात लस याच लोकांसाठी बनली आहे ज्यांना असे आजार - Co-morbidity आहेत. फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रूग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्याने लसिकरण करावे.

👉 *11. ॲलर्जीक ब्रोन्कायटीस (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?*
नक्कीच घेऊ शकता परंतु ॲलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

👉 *12. कोविड होवून गेल्यावर पण लस घ्यावी का?*
हो १०० टक्के कारण कोविड नंतर बनणा-या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधी पर्यंत राहतात.

👉 *13. नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी?*
कोविड होवून गेल्यावर ८ ते १२ आठवडयांनी लस घ्यावी.

👉 *14. मी सर्व नियम पाळतो मला वर्षभरात कोरोना झाला नाही, माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे तरी मी लस घ्यावी का?*
१०० टक्के...... हो

👉 *15. लहान मुलांना लस दयावी का?*
१६ वर्षाखालील मुलांना देवू नये.

👉 *16. गर्भवती महिलांना लस दयावी का?*
सध्या त्याचा डेटा उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी देवू नये.

👉 *17. लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?*
हो. लसिकरण नंतरही हलगर्जिपणा करून चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.

👉 *18. लस नंतर १०० टक्के कोरोना होणार नाही का?*
असे अजिबात नाही पण झाला तरी तो सौम्य असेल.

👉 *19. जर लस घेवूनही कोरोना होणार असेल तर लसिचा हेतू काय?*
१. कोविडची दुसरी लाट टाळणे.
२. मृत्यू दर कमी करणे.
३. गंभीर रूग्णांचे प्रमाण कमी करणेे.

👉 *20. लस घेतल्यावर रोग प्रतिकारक शक्ती कधी तयार होणार?*
पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसानंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते पण त्यासाठी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.

४५ ते ५९ वयोगटातले व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील सर्वांनी हे लसीकरण करून स्वतःला व आपल्या परीवाराला कोरोना संक्रमणापासुन सुरक्षीत ठेवा.*

आपले स्नेहांकित
*आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे*
_______________

👉 *कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव* :
👉१) जर समजा तुम्ही दुपारी २ वाजता लस घेतली तर त्या दिवशी तुम्हाला शक्यतो काहीच त्रास होणार नाही,
पण रात्री झोपल्यानंतर रात्री थोडीशी *थंडी* आल्यासारखी वाटेल..
👉२) अंगात *ताप* असल्यासारखे वाटेल परंतु जर तुम्ही thermameter ने ताप चेक केला तर तो बहुधा नॉर्मल म्हणजे *१००*℃ पेक्षा कमीच भरेल....
👉३) अंगात किंचित,कमी अधिक प्रमाणात *कणकण* जाणवू शकते..
👉४) बरेच डॉक्टर, सिस्टर,आणि मेडिकोज, तुम्हाला अशा वेळेस
1) T.Crocin500mg/Fepanil500mg/Paracetamol 500mg/Dolo 650mg अशा प्रकारच्या टॅब्लेटस घ्यायला सल्ला देतील, Or T.Zerodol-P..
जर तुम्हाला जास्त डिस्कम्फर्ट Discomfort वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही ती टॅबलेट घेऊ शकता....
अथवा *न घेता सहन करू शकता*
याला *immunogenic response* Of Our Own Body असे संबोधल्या जाते....
तो आला म्हणजे Body is preparing that immunogenic response..
It's natural.. तो नैसर्गिक,आणि नॉर्मल असतो..
त्याला *घाबरायची* गरज नसते..
👉५) तुमच्यापैकी काही जणांना *हातपाय दुखणे* , *अशक्तपणा*,,
*डोके जड पडणे* *डोकेदुखी*, *जुलाब*, क्वचित *उलट्या* असे पण लक्षणे दिसून येऊ शकतात...
त्यावेळेस पण जनरल मॅनेजमेंट करायची...
जी की आपण नेहमी करतो..

*सर्वात महत्वाचे म्हणजे*
तुम्हाला लसीकरणाच्या अगोदर ,नंतर, तुमचे *Hydration* ( *तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी चांगली गाठणे आवश्यक* आहे.) मेंटेन ठेवणे अतिआवश्यक आहे...
त्यामुळे *भरपूर पाणी,लिक्विड डायट,लिंबू शरबत, ताक, मोसंबी ज्यूस, सफरचंद ज्यूस* आदींचा वापर करावा...
जेणे करून तुमचा येणारा *ताप, ताप-तत्सम कणकण* केवळ तुमच्या पाणी पिण्याने आणि इतर गोष्टींने निघून जाईल..
👉६) *दुसऱ्या* दिवशी अगदी सकाळी तुम्हाला *अशक्तपणा*, *कमजोरी*, *हातपाय दुखणे*, *पूर्ण बॉडी-पेन ,अंगदुखी* असे किरकोळ त्रास होऊ शकतात...
पण जर तुम्ही व्यवस्थित गोष्टी फॉलो केल्या तर तो त्रास कमी होईल...
एकदा का *२४* तास झाले की त्रास हा *शून्य* होतो म्हणजे संपतो...

👉७) दुसरा डोस हा *२८* दिवसानंतर घ्यावा, व तो *लक्षात* ठेवावा, *लिहून* ठेवावा...

👉८) काही जणांना इंजेक्शन च्या जागी किरकोळ *सूज*, *लालसरपणा*, *हाताला जडपणा* *हात हलवताना त्रास,दुखणे* आदी त्रास उद्भवू शकतात...
तो त्रास पण हळूहळू कमी होणारा असतो..
परंतु तुम्हाला कुठल्याही क्षणी जर वाटले की हा त्रास थोडा *नॉर्मल* पेक्षा वेगळा आहे,त्यावेळेस तुम्ही लगेचच *तज्ञ* डॉक्टरांचा *सल्ला* घ्यावा...व *उपचार* करावेत..

👉९) लसीकरण केल्यानंतर *अर्धा* तासात सहसा असले त्रास होतात,
ते त्रास तिथे थांबून *रुल आऊट* म्हणजे जिथल्या तिथे *देखरेखीखाली* थांबून सोडवावेत.
त्यामुळे *लसीकरण* केल्यानंतर आम्ही तुम्हाला *अर्धा* तास *under-obeservation* ( *देखरेखीखाली*) तिथेच Observation Room मध्ये थांबायला सांगतो....
👉१०) लसीकरण हे पूर्णपणे *सुरक्षित* आहे, व विश्वास ठेवून घ्यावे..
👉११) *मनातील भीती* पूर्णपणे काढून टाकावी,जेणे करून *Psychologically* ( *मानसिक दृष्ट्या*) तुम्ही फिट असाल तर बाकीच्या गोष्टी ह्या *सुकर* होतात....

 ... ...
25/10/2020

...
...

 #पाश्चरायन... जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... फ्रान्समधल्या एका गावात कुणीतरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ...
29/09/2020

#पाश्चरायन...

जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे...
फ्रान्समधल्या एका गावात कुणीतरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ऐकली...
किंचाळणाऱ्या मुलाचं नाव होतं ‘निकोल’ अन् ती ऐकणाऱ्याचं नाव होतं ‘लुईस.’

निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली...
निकोल किंचाळतांनाचा कुत्र्यासारखंच गुरगुरू लागला-त्याचं शरीर आकुंचन पावलं-त्याला पाण्याची भिती वाटू लागली-हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करू लागला...
महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला...

पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपुर्ण नाव होतं ‘लुईस पाश्चर’.
लुईस यांनी या काळात अनेक संशोधनं केले पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंचाळण्याचा आवाज येत राहिला मग त्यांनी चावणाऱ्या-पिसाळलेल्या कुत्र्यांवर संशोधन सुरू केलं...

मदतनीस रक्सच्या सहाय्यानं त्यांनी अश्या काही कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलं आणि त्यांच्या तोंडाचा फेस-लाळ परीक्षानळीत जमा करत गेले...

या लाळेचं इंजेक्शन जेव्हा नाॅर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा ते ही पिसाळल्यासारखं करू लागलं...
हेच इंजेक्शन सश्याला दिलं ते तर बिचारं पॅरालाईज होत काही क्षणात मरून गेलं...
यावरून एक गोष्ट मात्र लक्ष्यात आली ही ‘लाळ’ जीवघेणी आहे...

लुईसच्या या प्रयोगशाळेत दिवसरात्र भुंकणारे कुत्रे त्यांची काळजी घेणं-ते चावणार नाही याची काळजी घेणं-लाळ जमा करणं असं क्लिष्ट काम चाललं होतं...

मदतनीस रक्सनं पाश्चरना एक निरिक्षण सांगितलं ते म्हणजे ‘या लाळेचा संसर्ग थेट मेंदूवर परिणाम करतो.’
यावर प्रयोग करूयात म्हणजे लाळेचं इंजेक्शन शरीरात इतरत्र देण्यापेक्षा थेट डोक्यात देऊन बघितलं तर?
‘छे छेऽऽ’ पाश्चरनं त्याला थेट नकार दिला...
मानेल तो रक्स कसला? पाश्चर सुट्टीवर जाताच भावानं देऊन टाकलं दोन हेल्दी कुत्र्यांना हे लाळेचं इंजेक्शन
दोन आठवड्यातच हे दोन्ही कुत्रे दगावले...
रक्स थोडा हैराण झाला...आता पाश्चर रागावणार...

पाश्चर सुट्टीवरनं परतले...त्यांनी रक्सचं कांड ऐकलं
आणि त्यांनी ते ऐकून त्याला चक्क ‘शाबासकी’ दिली...
हे सिद्ध झालं होतं की लाळेतला विषाणु थेट मेंदूवर हल्ला करतो...

अश्यातच एक आधीच पिसाळेला कुत्रा त्यांच्या प्रयोगशाळेत आणला...त्याला त्यांनी ते लाळेचं इंजेक्शन दिलं आणि ‘मरण’ तर दूर हा कुत्रा चक्क हळूहळू बरा होऊ लागला...
बघता बघता त्याची सगळी लक्षणं नाहीशी झाली थेट तसंच जसं आधी सर्दी खोकला होतो-वाढतो-आपोआप कमी होतो...

याचा अर्थ शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते...
आजारी कुत्र्यात पण ती तयार झाली होती...

पाश्चरनी ही संधी हेरली...या कुत्र्यात विषाणुविरुद्ध ॲंटिबाॅडी तयार झाल्या होत्या,ते बचावलं होतं आता वेळ होती ‘लस’ बनवायची...

पाश्चरनं प्रयोगशाळेतील चारपैकी दोन कुत्र्यांना लाळेचं इंजेक्शन दिलं ते वाचले इतर दोन गेले...
पाश्चरना वाटलं फ्रान्समधल्या यच्चयावत कुत्र्यांना हे इंजेक्शन द्यावं म्हणजे सगळे सुरक्षित होतील...
सल्ला महाग होता आणि श्वानप्रेमीही ‘सरसकट लस द्यावी की नको?’ या संभ्रमात होते...

विचारविमर्श झाला (फ्रान्स होतं म्हणून,आपल्याकडं एव्हाना मिडिया ‘पिसाळली’ असती) त्यातनं असं ठरलं की थेट कुत्र्यांना लस देण्याऐवजी त्यांनी ज्यांना चावा घेतला त्या माणसांना ही लस दिली तर?

हे लाॅजिकल होतं,तसंही पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्या घेतल्या लागलीच काही होत नाही विषाणू मेंदूपर्यंत जायला काही दिवस तर घेतोच...

पण इथंही एक समस्या होती आतापर्यंत असा प्रयोग माणसावर थेट कधीच झाला नव्हता,तो कसा व्हावा?
कुत्रा माणसाला चावल्यावर...
पण जाणुनबुजून कुणी कुत्र्याकडून कसं चाववून घेईल?

‘सर्किट’ नसेल तो शास्त्रज्ञ कसला...
अहो फक्त ‘पॅशन’ नाही तर एक ‘वेड’ असावं लागतं एखाद्या गोष्टीपाठी लागण्यासाठी...
पाश्चरनं पिसाळलेल्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालायची तयारी केली पण तेवढ्यात शेजारच्या खेड्यातून ‘जोसेफ’ नावाच्या एका दहा वर्षीय मुलाला कुत्रा चावल्याची बातमी आली...
जोसेफची आई त्याला पाश्चरकडं घेऊन आली...
पाश्चरनं जोसेफला लस दिली...जोसेफ वाचला...तारीख होती ६ जुलै १८८५.

हळूहळू ही बातमी जगभर पसरली...जगभरातून पत्रांचा वर्षाव झाला...चर्चा झाल्या...
रशियात एके दिवशी एकोणीस शेतकऱ्यांना कोल्हा चावला...सगळे थेट पॅरीसला जाऊन धडकले...
प्रारंभी भाषेची जरा अडचण जाणवली पण ‘वेदनेची आणि सहवेदनेची’ एक वेगळी भाषा असते...
शेतकऱ्यांसाठी लसी तयार करण्यात आल्या सगळे वाचले...

त्याआधी अश्या हल्ल्यात अनेक लोकं दगावायचे...
रशियाचा राजा ‘झार’ पाश्चरवर खूष झाला त्यानं पाश्चरला थेट रत्नजडीत बक्षिस पाठवलं आणि संस्थेच्या स्थापनेसाठी पैसेही...

बालपणी शाळेत मंद-मठ्ठ म्हणून ज्याला हिणवलं गेलं त्यानं जगाची रेबिज-काॅलरा-ॲंथ्रक्स पासून सुटका करत पाश्चरायजेशनसारखी प्रक्रिया जगाला दिली...

विचार करा एकदा ‘रेबिज’ झाला की आजही औषध नाही...रेबिजनं होणारा मृत्यू हा सगळ्यात दयनीय आणि भयावह असावा...लस शोधून पाश्चरनी या जगातल्या असंख्य प्राणीमात्रांवर अनंत उपकार करून ठेवलेत...

खऱ्या अर्थानं ‘महामानव’ असलेल्या या शास्रज्ञाचा आज स्मृतीदिन...२८ सप्टेंबर.

विनम्र आदरांजली💐

♻️ फार्मसिस्ट...तुमचा जवळचा आरोग्यमित्र ♻️            कुठल्याही आरोग्यविषयक अथवा इतरही आपत्तींमध्ये "फ्रंटलाईन वॉरियर्स"...
24/09/2020

♻️ फार्मसिस्ट...तुमचा जवळचा आरोग्यमित्र ♻️

कुठल्याही आरोग्यविषयक अथवा इतरही आपत्तींमध्ये "फ्रंटलाईन वॉरियर्स" च्या भूमिकेत डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा घटक म्हणजे फार्मसिस्ट. हा घटक तसा प्रमुख मात्र तरीही काहीसा दुर्लक्षित. खरे तर फार्मसिस्ट हा पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील दुवा समजला जातो. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर फार्मसीचे रितसर शिक्षण घेतलेला विद्यार्थी म्हणजे फार्मसिस्ट. हाच फार्मसिस्ट पुढे जाऊन औषधांच्या निर्मितीमध्ये, औषधांच्या संशोधन कार्यामध्ये, औषध विषयक शिक्षण व्यवस्थेमध्ये, औषधांच्या मार्केटिंगमध्ये, औषध विषयक क्लिनिकल रिसर्चमध्ये, हॉस्पिटल फार्मसीमध्ये आणि रिटेल फार्मसीमध्ये आपले अमूल्य असे योगदान देत असतो. या सर्वच क्षेत्रांत फार्मसिस्टची भूमिका तशी खूपच महत्वाची असते पण ‘फार्मसिस्ट’ हे संबोधन जेव्हा आपण वापरतो, तेव्हा रुग्णांशी थेट संपर्कात येणारी अशी हॉस्पिटल आणि मुख्यतः औषध दुकानांतील केमिस्टची भूमिकाच आपल्याला अधिक अभिप्रेत असते. ही भूमिका काळानुरूप थोडी बदलत गेली. फार पूर्वी फार्मसिस्ट, फार्मसीमध्ये स्वतः औषधे बनवून रुग्णांना द्यायचे. पण औद्योगिक क्रांती झाली, तंत्रज्ञान प्रगत झाले आणि बहुतांशी औषधे कारखान्यात बनून पॅक होऊन दुकानात पोचू लागली. औषधांची विक्री हे फार्मसिस्टचे मुख्यतः काम झाले.

आधुनिक औषधे अत्यंत प्रभावी, कमी मात्रेतही गुणकारी, त्वरित परिणाम करणारी पण घातक दुष्परिणामही असलेली. योग्यपणे वापरली तर अमृत, अन्यथा विषारी होवू शकणारी. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषधांचे प्रकारही (डोसेज फॉर्मस्) नव्याने विकसित होत गेले. डॉक्टर रोगनिदान व उपचारांत तज्ज्ञ, पण फार्मसिस्ट हा औषधतज्ज्ञ, त्यामुळे फार्मसिस्टची रुग्णाभिमुख भूमिका विकसित व विस्तारीत होत गेली. जागतिक आरोग्य संघटनेनेही या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. फार्मसिस्ट हा डॉक्टरांना पूरक व आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक झाला. बहुतांशी देशांत आज फार्मसिस्ट औषध व आरोग्याविषयक समुपदेशन, प्रिस्क्रिप्शनची पडताळणी, दुष्परिणाम व औषध आंतरक्रिया टाळण्यासाठी रुग्णांना/डॉक्टरांना सल्लामसलत, रक्तशर्करा/रक्तदाबसारख्या तपासण्या अशा अनेकविध सेवा रुग्णांना देत आहेत. काही देशांमध्ये तर विशेष प्रशिक्षित फार्मसिस्ट औषधे लिहून देण्याचे किंवा कन्सल्ट फार्मसिस्टचे काम करत आहेत. वृध्दांसाठी खास सेवा चालू आहेत. एकंदर फार्मसिस्ट हा पेंशट व डॉक्टर यांच्यातील दुवा आहे.

आपल्याकडे कमीत कमी डिप्लोमा इन फार्मसी इतके शिक्षण झाल्यावर रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून काम करता येते. इतर साऱ्या देशांप्रमाणेच औषधांची विक्री, ही रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या उपस्थितीत त्याच्या देखरेखीखाली व्हावी यासाठी तब्बल १९४० पासून औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ तसेच फार्मसी कायदा १९४८ इत्यादी कायदे अस्तित्वात आहेत. मग या कायद्यांनुसार सर्व औषध दुकानांतून फार्मसिस्ट कार्यरत आहेत का? आज फार्मसीच्या शिक्षणाची सोय मुबलक असल्याने फार्मसिस्टची संख्याही तुल्यबळ आहे. मात्र तरीही, सर्व ठिकाणी नाही, परंतु काही मेडिकल दुकानांमध्ये फार्मसिस्ट हा केवळ नामधारी अथवा मग भिंतीवरील सर्टीफिकेट करीता आणि बिलांवरील सहीकरीता मर्यादित राहतो हे वास्तव आपल्या एकंदर व्यवस्थेचे अपयश दर्शविते. संपूर्ण भारतात दहा लाखांहून अधिक दुकाने आहेत. दुकानाकडे लायसन्स असेल व फार्मासिस्टचे सर्टिफिकेटही नियमाप्रमाणे भिंतीवर असेल पण प्रिस्क्रिप्शन हाताळण्यास, औषधे देण्यास रजिस्टर्ड फार्मसिस्ट प्रत्यक्षात असेलच असे नाही. केरळसारख्या काही ठिकाणी परिस्थिती थोडी ठीक आहे. उत्तर भारतातील काही भागांत तर दुकानात फार्मसिस्ट औषधालाही शोधून सापडत नाही, त्यापेक्षा आपल्याकडील स्थिती तुलनेने बरी आहे, इतकेच. समाजाच्या आरोग्याशी निगडीत, रुग्णहितासाठी केलेल्या कायद्यांची शासन-प्रशासनाकडूनच सैल अंमलबजावणी, कायदे केवळ पुस्तकातच राहणे असे चित्र कमीअधिक स्वरूपात सर्वच राज्यांत आहे.

मुळात ज्यांच्या हितासाठी हे सर्व कायदे, नियम आहेत त्या ग्राहकांमधेच औषधे सजगपणे घ्यावीत इत्यादी जाणीवा अगदी अलीकडील काळापर्यंत निर्माण झाल्या नाहीत व त्यामुळे त्या अनुषंगाने येणाऱ्या फार्मसिस्टच्या महत्वपूर्ण भूमिकेची जाणीव व अपेक्षाही निर्माण झाल्या नाहीत. मूलभूत पायाच कच्चा राहिल्याने रुग्णाभिमुख सेवा विकसित होणे वगैरे बाबींना वावच मिळाला नाही. अशा रुग्णाभिमुख भूमिकेसाठी फार्मसीचे शिक्षण अगदीच कुचकामी नक्कीच नसले, तरी सक्षम करणारेही नव्हतेच. परिणामी औषधदुकान हे औषधविक्रीचे केंद्र इतकेच समीकरण झाले. फार्मसी व्यवसायाचा केंद्रबिंदू हा रुग्ण आहे, नुसती औषधे नव्हे. आपण औषधांसाठी नाही, रुग्णांसाठी आहोत हा विचार संबधितांमध्ये पहिल्यापासनूच रुजला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते साधारणत ५० टक्के रुग्ण औषधांचा योग्य वापर करत नाहीत. आपल्याकडे औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्धता, सेल्फ मेडिकेशनचे प्रचंड प्रमाण, फार्मसिस्टचा अजून फारसा विकसित न झालेला रोल, अशिक्षित व गरीब रुग्ण या पार्श्वभूमीवर हे प्रमाण जास्तच असण्याची शक्यता आहे. करोडो रुपये औषधांच्या चुकीच्या वापराने वाया जातात. बाजारपेठेत एक लाखावर ब्रँडस् आहेत. नावे सारखी, पण औषधी द्रव्य मात्र वेगळे, गुणधर्म वेगळे. त्यामुळे अत्यंत जबाबदारीने प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषध देणे गरजेचे असते. मृत्यूच्या सर्व कारणांमध्ये औषधांच्या दुष्परिणामाने होणाऱ्या मृत्यूंचा क्रमांक चौथा (एड्स, कॅन्सरच्याही वर) आहे. या वस्तुस्थितीचा विचार केल्यावर फार्मसिस्टच्या भूमिकेची आवश्यकता अधिक लक्षात येईल.

जरी अजूनही फार्मसीचा व्यवसाय हा ‘ट्रेड’ स्वरूपात अडकला असला, तरी जेव्हा कधी आपल्या फार्मसिस्टना औषधविक्रीखेरीज काही रुग्णोपयोगी काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी या संधीचे सोने केले आहे. देशावर आजपर्यंत आलेली अनेक संकटे असतील जशी की भूकंप, महापूर, वादळे, साथीचे आजार किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, या सर्वांमध्ये फार्मसिस्ट लोकांनी एकत्र येत ज्ञान रुपाने, वस्तू रुपाने आणि आर्थिक स्वरुपात उल्लेखनीय अशी भूमिका वेळोवेळी बजावली आहे. आजही बहुतेक ठिकाणी कोणताही आर्थिक मोबदला नसताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, गरजू रुग्णांना समुपदेशन करत हेल्थ कॅम्प आयोजित केले जातात. या माध्यमातून व्यवसायातील तीव्र स्पर्धा व इतर अनेक अडचणींना तोंड देत हे फार्मसिस्ट, फार्मसिस्टचा रोल खऱ्या अर्थाने साकार करत आहेत.

ग्राहकांनीही दुकानांतील फार्मासिस्टच्या उपस्थितीसाठी व त्याच्या रुग्णभिमुख कामासाठी आग्रही होणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ कायदा सांगतो म्हणून नव्हे, तर सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक म्हणून फार्मासिस्टकडे व फार्मसी प्रॅक्टिसकडे ब​घितले गेले पाहिजे. दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा होतो. आरोग्य व्यवस्थेमध्ये फार्मसिस्टचे अढळ आणि महत्त्वाचे असे स्थान आहे. या व्यवस्थेतील त्यांच्या योगदानाबद्दल अजिबात दुमत नाही कारण शेवटी ‘फार्मासिस्ट जेथे, आरोग्य वसे तेथे’ असे म्हणता येईल. आपल्या देशातही नजिकच्या भविष्यात आरोग्यदायी भारताचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आपण सर्वच घटकांनी प्रयत्नशील राहूयात आणि या "फ्रंटलाईन वॉरियर्सनां" 'वर्ल्ड फार्मसिस्ट डे' च्या निमित्ताने शुभेच्छा देऊयात.

*डॉ. नितीन पाटणकर यांची एक अतिशय उपयुक्त पोस्ट शेअर करीत आहे. नक्की वाचा !**१) कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ?* *...
03/09/2020

*डॉ. नितीन पाटणकर यांची एक अतिशय उपयुक्त पोस्ट शेअर करीत आहे. नक्की वाचा !*

*१) कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ?*

*नाही. या व्हायरसमुळे न्यूमोनिया होत नाही. कोरोनामुळे फुफुसात जे काही होते, आपण त्याला न्यूमोनिया समजून उपचार करीत राहतो हे कदाचित चुकत असावे.*

*SARS2 Corona व्हायरस हिमोग्लोबिनला चिकटून बसतो.*

*त्याला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात लोहाचे कण (ions) सुटे होऊन रक्तात मिसळतात.*

*त्या मुळे हिमोग्लोबिन पुरेसा ऑक्सिजन वाहून नेउ शकत नाही.*

*शरीरातील महत्वाच्या आणि मोठ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो.*

*उपचारानंतर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला तरी त्याला वाहून नेणारे हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा झपाट्याने वाढत जाऊन अनेक अवयव एकाच वेळी निकामी होतात. याला Resistant Hypoxia with Rapid Multi-organ Failure असे म्हटले जाते.*

*रक्तातील वाढते लोहकण हे इतके मारक असतात की त्यांच्यामुळे फुफुसांना तीव्र इजा होते. या इजा होण्यामागे फुफुसातील ऑक्सिजन आणि रक्तातील लोहकण यांची रिॲक्शन जबाबदार असते. याला Powerful Oxidative Damage म्हटले जाते.*

*कुठच्याही जंतुसंसर्गात, जर फुफुसांचा संसर्ग असेल तर न्यूमोनिया होतो. पण सुरवातीस तो डावीकडे किंवा उजवीकडे; एकाच बाजूस आणि असमान असतो. कोरोना मध्ये ऑक्सिजन आणि लोहकणाच्या लढाईत फुफुसांचे कुरुक्षेत्र झाल्याने प्रत्येक वेळी दोन्ही फुफुसांना मोठ्या प्रमाणात इजा होते, जी ‘सी. टी.’ स्कॅन वर दिसते. याच वर्णन Bilateral Ground-glass Appearence असे केले जाते त्याला दुसरी उपमा नसल्याने त्याला Bilateral न्यूमोनिया समजून उपचार दिले जातात.*

*आता हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे पुढील परिणाम बघू.*

*ऑक्सिजन कमी पडतो आहे हे जाणवून शरीर हिमोग्लोबिन तयार करण्याची गती वाढवते. (म्हणून कोरोना बाधितांमध्ये हिमोग्लोबिन जास्त दिसते)*

*रक्तातील सुटे लोहकण आणि त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचा पुन्हा वापर किंवा निचरा करण्यासाठी शरीरातील ferritin हे द्रव्य वाढते. (कोरोनाच्या पेशन्ट मध्ये म्हणूनच रक्तातील चाचण्यांमध्ये ferritin खूप जास्त प्रमाणात दिसून येते).*

*मलेरियामध्ये वापरले जाणारे क्लोरोक्वीन किंवा सध्या चर्चेत असलेले हायड्रॉक्सि-क्लोरोक्वीन ही औषधे मलेरियाच्या जंतूंपासून हिमोग्लोबिनला वाचवण्याचे काम करते, तसेच ते कोरोना व्हायरसपासून हिमोग्लोबिनला वाचवित असावे.*

*अजूनही कोरोनाचे विषाणू हिमोग्लोबिनपासून वेगळे कसे करायचे हे आपल्याला ठाउक नाही. (पेशन्टला अगदी व्हेंटिलेटर मधून जरी ऑक्सिजन पुरवला तरी तो ऑक्सिजन पुढे न्यायला पुरेसे हिमोग्लोबिन नसेल तर त्या ऑक्सिजन मुळे फुफुसांनाच जास्ती इजा होऊ शकते. आज आपण जे व्हेंटिलेटर वापरण्याचे नियम (protocol) पळतोय ते न्यूमोनिया किंवा 'ए.आर.डी.एस.' साठी बनवलेले असल्याने ते कोरोना बाधितांसाठी फायदेशीर ठरत नसावेत असा संशय काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.*

*यावर अजून संशोधन होईलच. आजतरी कोरोनाने संपूर्ण जगाला एक मोठे कोडे घातले आहे हे नक्की. गोष्ट इथेच संपत नाही. वाढत्या लोहकणांमुळे लिव्हरवर ताण पडतो आणि तब्येत फार झपाट्याने बिघडू लागते. हिमोग्लोबिनची परिणामकारकता कमी होत जाणे, रक्तातील लोहकण वाढत जाणे आणि महत्वाच्या अवयवांचा ऑक्सिजन पुरवठा कमी होणे यामुळे फुफुसांसोबत इतर अवयव निकामी होत जातात हे आपण बघितले.*

*आता आपण यासाठी आहारात काय बदल करू शकतो हे पाहूया...*

*शरीराची कोरोनाविरोधी शक्ती वाढविण्यासाठी फळे, भाज्या यांचा वापर आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात घेणे हे उपाय आपण करतोच आहोत. त्या बरोबरीने खालील बदल करायचे आहेत.*

*अ] लोहकणांपासून सुरक्षा*

*१) लिंबू फ्रीझर मध्ये ठेवून ते घट्ट झाले की ते सालीसकट किसून घेणे. त्यात मीठ टाकून त्याचे सरबत घेणे. माणशी एक लिंबू तरी सालीसकट पोटात घेणे.*

*२) हळकुंड मिळाल्यास त्याची पावडर करून किंवा मग तयार हळद घेऊन दिवसभरात निदान एक चमचा हळद गरम पाण्यातून पोटात घेणे.*

*३) आपला साधा चहा, आले घातलेला चहा हाही उपयोगी पडतो.*

*या तीन गोष्टी अजूनही सहज मिळतात. यातील काही औषधी द्रव्यांमुळे सुटे लोहकण शरीराबाहेर टाकायला मदत होते. तसेच ऑक्सिजनमुळे होणारी इजा होण्यापासून सुरक्षा मिळते. या सोबत काही अन्न- औषधे ( Nutraceutical ) उपयोगी पडू शकतील उदा. पिकनोजेनॉल, कुटकी , कुरकुमिन इत्यादी.*

*ब] महत्वाच्या अवयवांना कमी ऑक्सिजनमध्ये काम चालू ठेवण्यास मदत करणे. बीटरूट, पालक आणि कोबी यांचा रस (स्मूदी) लसणीचा मुबलक वापर भेंडीच्या, भोपळ्याच्या किंवा कलिंगडाच्या बिया दोन चमचे दिवसभरात पोटात घेणे.*

*या सोबत काही अन्न- औषधे ( Nutraceutical ) उपयोगी पडू शकतील उदा. arginine, CoQ 10*

*कोरोना काय करतो याची जी माहिती समोर येत आहे त्या माहितीच्या आधारे ‘विस्डम क्लिनिक’ तर्फे वरील आहार सुचवले आहेत. यात कोरोना ज्या जागी वार करतो तिथे सुरक्षाकवच देण्याचा प्रयत्न आहे. फळे खा, भाज्या खा, प्रोटीन्स घ्या. या ज्या जनरल सूचना असतात त्यांना पर्याय म्हणून नाही तर पूरक म्हणून या सूचना आहेत.*

*डाॅ. नितीन पाटणकर एम्.डी.*
*Consultant in Diabetes, Obesity, Dharana and Sound Therapy*

* Clinics and Jupiter Hospitals*

* *

 #आरोग्यवर्धक_हळदपाणीदैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. या तक्रारी अशा असतात की त्यास...
24/05/2020

#आरोग्यवर्धक_हळदपाणी

दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. या तक्रारी अशा असतात की त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचीही आवश्यकता नसते तरीही त्या त्रासदायक असतात. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास या त्रासांपासून आपली सुटका होऊ शकते. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. सकाळी उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अर्थात सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरी त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीही नक्कीच याबद्दल विचार कराल...

१)अन्नपचन चांगले होते

हळद ही आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उत्तम उपाय म्हणून ओळखली जाते. हळदीमुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत होते तसेच पित्त रसाची निर्मिती होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. पित्तरसामुळे अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे शरीरातील पचनक्रीया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही जंकफूड खात असाल तर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद घ्यायलाच हवे.

२)शरीराची सूज कमी करण्यास मदत

अनेकांना विविध कारणांनी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना सूज येते. हळदीमध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना अर्थायटीससारख्या समस्या असतील त्यांनी न चुकता सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद घ्यायलाच हवे.

३)साखरेची पातळी नियमित राहण्यास उपयुक्त

शरीरात असणाऱ्या साखरेची योग्य पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी हळद उपयुक्त असते. यामुळे शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्यांनी रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद प्यायल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४)चेहरा उजळण्यास मदत

हळद ही त्वचेसाठीही उत्तम औषध आहे. तुम्ही नियमितपणे चेहऱ्याला हळद लावली तर चेहरा उजळण्यास मदत होते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास तसेच शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते. त्यामुळे हळद आणि कोमट पाण्याचे सेवन त्वचेसाठीही फायद्याचे ठरते.

५)प्रतिकारशक्ती वाढते

कोणत्याही आजाराशी ऋतूशी, अन्न-पाण्याशी सामना करण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. हळदीमुळे ही प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

हेच कारण आहे ज्यामुळे आजही अमेरिकेला भारतापुढे औषधासाठी हात पसरावे लागतात. जरूर वाचा.
11/04/2020

हेच कारण आहे ज्यामुळे आजही अमेरिकेला भारतापुढे औषधासाठी हात पसरावे लागतात. जरूर वाचा.

सध्या एकच विषय चर्चेचा आहे, जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाशी कस लढायचं? अजूनही या संसर्गजन्य रोगावर इलाज सापडलेला न.....

मलेरियावरचं सर्वात जुनं औषध 'क्विनाइन' स्मगलिंग करावं लागलं होतं माहितेय का?गेले चार दिवस हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या मलेर...
09/04/2020

मलेरियावरचं सर्वात जुनं औषध 'क्विनाइन' स्मगलिंग करावं लागलं होतं माहितेय का?

गेले चार दिवस हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या मलेरियावरच्या औषधाची बरीच चर्चा तुम्ही ऐकली-वाचली असेल. कोविडच्या आजारावर या मलेरियाच्या औषधाचा वापर करण्याचा अमेरिकेने निर्णय घेतल्यावर हे औषध आणायचे कुठून हा मोठा प्रश्न अमेरिकन शासनापुढे होता. भारतातल्या चार मोठ्या कंपन्यांकडे या औषधाचा पुरवठा करण्याची क्षमता आहे. पण काही दिवसांपूर्वी अमेरिकेनेच त्यांपैकी सगळ्यात मोठ्या कंपनीची एफडीएची मान्यता नाकारली होती आणि त्या कंपनीकडून येणाऱ्या आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर भारत सकारनेच या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते.
आता नाईलाज झाल्यावर भारताने पुरवठा करावा म्हणून ट्रंप सरकारने आपल्या सरकारवर बराच दबाव आणला आहे. कालच्या एका बातमीत तर ट्रंपतात्यांनी 'नंतर बघून घेईन' अशा टाइपची धमकी पण भारताला दिली होती. आता पुढे काय होईल ते कळेलच. पण आज आम्ही तुम्हाला मलेरियाच्या एका जुन्या औषधाची मनोरंजक स्टोरी सांगणार आहोत. तर वाचकहो, या जुन्या औषधाचे नाव आहे क्विनाइन म्हणजे आताच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे आजोबा!!! चला तर वाचू ही रंजक कथा!!!
क्विनाइन म्हणजे सिंकोना नावाच्या झाडाच्या सालीपासून बनवलेले औषध!
सिंकोना या वनस्पतीचे मूळस्थान म्हणजे दक्षिण अमेरिका. यांतल्याच एका देशात म्हणजे पेरूमध्ये धर्मप्रसारासाठी युरोपियन पाद्री जेव्हा पोहचले तेव्हा त्यांना या वनस्पतीची उपयुक्तता कळली. पेरूच्या सरकारने ही वनस्पती देशाबाहेर जाऊ नये म्हणून कडक कायदे केले होते. पण तरीसुध्दा या वनस्पतीचे 'स्मगलिंग' होऊन या वनस्पतीची लागवड इतर देशांत सुरु झाली. त्यामुळे सिंकोनाच्या सालीच्या भुकटीला आधी 'जेसुइट पावडर' असे नाव मिळाले होते.
तसं पाह्यलं तर जगात एकूण चाळीस प्रकारच्या सिंकोना प्रजाती आहेत. पण त्यांपैकी फक्त चारच प्रजाती उपयुक्त आहेत. त्या चार प्रजातींपैकी सिंकोना ऑफीसिनालीसची प्रामुख्याने लागवड करण्यात आली. १६७७ साली लंडन फार्माकोपीयात या औषधाचा मलेरियावरील औषध म्हणून समावेश करण्यात आला. आता या औषधाला 'जेसुइट पावडर ' म्हणणे योग्य दिसले नसते. म्हणून अधिकृत नाव म्हणून सिंकोनाच्या सालीचे नाव क्विनाइन असे नोंदण्यात आले.
१८२० साली पेलेटिअर आणि कॅवेंटॉ या दोन रसायनशास्त्रज्ञांनी सिंकोनाच्या सालीपासून शुध्द क्विनाइन वेगळे केले. १८२० पूर्वी झाडाची साल वाळवून त्याची वस्त्रगाळ भुकटी केली जायची. त्यानंतर ही भुकटी एखाद्या द्रावात, शक्यतो वाईनमध्ये मिसळून प्यायली जायची. त्याकाळात तेव्हा मलेरियाच्या जंतूंचा म्हणजे प्लाज्मोडीयमचा शोध लागला नव्हता. पण या भुकटीने ताप कमी होतो, मलेरिया बरा होतो याचे ज्ञान लोकांना होते. १९४४ साली वुडवर्ड आणि डोरींग या दोन शास्त्रज्ञांना प्रयोगशाळेत रासायनिकरित्या क्विनाइन तयार करण्यात यश मिळाले. त्यानंतर सिंकोनाच्या सालीच्या भुकटीचा वापर कमी होत गेला.
पण सिंकोना हे नाव पण या वनस्पतीला कसे मिळाले यामागेही एक गमतीदार किस्सा आहे. त्याकाळी पेरूमध्ये लुई फर्नांडेझ हा स्पेनचा व्हाइसरॉय होता. हा व्हाईसरॉय चिंकोनाचा उमराव होता. त्याच्या पत्नीला म्हणजे अ‍ॅना डी ओसोरिओला मलेरिया झाला तेव्हा तिने या वनस्पतीच्या काढ्याचा वापर केला. आपल्या पतीसोबत जेव्हा ती पेरूत आली तेव्हा ती मलेरियाने पुन्हा आजारी पडली. तेव्हा जवळच्या एका शहरातल्या सरकारी अधिकार्‍याने हे तिला औषध पाठवले. अशा अनोळखी उपायांवर विश्वास नसल्याने आधी तिने आजारी पडलेल्या नोकराला दिले. तो बरा झालेला पाहून सिंकोनाची उपयुक्तता तिला समजली. १६३८ साली त्यांची बदली मायदेशी स्पेनला झाली तेव्हा सोबतच्या सामानात ती सिंकोनाच्या साली मोठ्या प्रमाणात घेऊन गेली. नेमकी त्याच वेळी स्पेनमध्ये मलेरियाची साथ आली. अ‍ॅना डी ओसोरिओने आणलेल्या औषधाचा त्याकाळी इतका उदोउदो झाला की त्या भुकटीला लोकं काउंटेस पावडर म्हणायला लागले. त्यानंतर कार्ल लिनीअस या वनस्पती शास्त्रज्ञाने या वनस्पतीला Chinchona हे नाव दिले.
भारताच्या इतिहासात पण सिंकोनाचा हिस्सा आहेच. १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दानंतर कंपनी सरकारची सत्ता संपुष्टात आली. ब्रिटिश सरकारने सत्ता हातात घेतल्यावर पुन्हा युध्द होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सैन्य इथे आणण्याचा निर्णय घेतला. या सैन्यापुढे मोठी समस्या होती मलेरियाची. त्याकाळी भारतात मलेरिया हा कायम छळणारा आजार होता. तेव्हा भारतात सैन्य आणण्याच्या सोबत इथे सिंकोनाची लागवड करण्याचा पण निर्णय घेण्यात आला. निलगिरी प्रांतात अडीच लाख रोपे लावून या कामाची सुरुवात करण्यात आली. १९४४ नंतर सिंथेटीक क्विनाइन आल्यावर सिंकोनाची गरज संपली. पण मलेरियाचा प्रादुर्भाव कायम होता. म्हणून गावोगावी पोस्ट ऑफीसाच्या मार्फत मलेरियाच्या गोळ्यांचे वितरण व्हायचे.
तर वाचकहो, औषधाचे राजकारण हा विषय आजचा नव्हे, तर फार जुना आहे इतकंच या लेखात आम्हाला सांगायचं होतं!!!

07/04/2020

ांत_दान
आता सर्वात्मक देवे ।
विनाकारण न फिरावे ।
घरीच बैसोनि द्यावे ।
एकांतदान हे ॥ 1॥
एकमेका कर न मिळवावे ।
दुरुनीच नमस्कारावे ।
अंतर सुरक्षित राखावे ।
परस्परांमाजी ॥ 2॥
सदासर्वदा हात धुवावे ।
रुमालाविणा ना शिंकावे ।
कोमट जल प्राशावे ।
थंड वर्जावे सर्वथा ॥ 3॥
घरी बसण्याचा येता कंटाळा ।
जोपासावी एखादी कला ।
मदत करावी गृहिणीला ।
पुण्य लागे ॥ 4॥
करा स्वच्छता सदनाची ।
त्याच बरोबर तनाची ।
काढा जळमटे मनाची ।
शूचिर्भूत व्हावया ॥ 5॥
मनन आणि चिंतन ।
थोडा वेळ नामस्मरण ।
चुकविता येईल मरण ।
तुम्हासहित इतरांचे ॥ 6॥
आजपावेतो खूप पळाला ।
दे विश्रांती थोडी शरीराला ।
सादर व्हावे समयाला ।
संत वचन हे ॥ 7॥
आहे विषाणू चे संकट ।
करी मनाला बळकट ।
सकारात्मकतेचे उभारी तट ।
सभोवताली ॥ 8॥
वेळ नव्हती म्हणोन ।
केले नसेल वाचन ।
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन ।
आता तरी वाचावा ॥ 9॥
आयुष्यभर पुरेल ।
पुरोनिया उरेल ।
ग्रंथांची रेलचेल ।
संतकृपेकरोनी ॥ 10॥
आवाहन करी वारंवार ।
केंद्र व राज्य सरकार ।
धोका वाढेल फार ।
बेफिकीरिने ॥ 11॥
खाकी वर्दी आणि डॉक्टर ।
सोबत स्वच्छता कामगार ।
काळजी घेती तत्पर ।
सकल जनांची ॥ 12॥
हेही दिस जातील निघोन ।
उद्या येईल आशेचा किरण ।
तोवर संयमाचे पालन ।
कर मनुजा ॥ 13॥
येथ म्हणे श्री निसर्गरावो ।
कोरोना ना पसरावो ।
स्वच्छतेचे गीत गावो ।
जनकल्याणहेतू ॥ 14॥

01/04/2020

खासदार डाॅ.अमोल कोल्हे हे सांगताहेत डिंगोरे येथील कोरोनाबाधित रुग्णाचा प्रवास ऐका...

Address

Junnar

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanya Medical - Otur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share