Shree diabetic and foot care speciality centre

Shree diabetic and foot care speciality centre Dedicated diabetic foot care centre and diabetic foot wound management

14/01/2022
24/07/2020

*Covid-19 आणि वर्षाऋतू*
*भाग 1*
🤧😷 🌧️☂️☘️

गेल्या काही वर्षापासून *नेमेचि येतो मग पावसाळा*
या नियमाला सोडून 'जून' महिन्यात हमखास हजेरी लावणारा पाऊस , खूप उशिराने ,म्हणजे साधारण जुलैच्या मध्यावर सुरू होताना दिसतो आहे .
तोही मधेच काही वेळ इतका जोरदार पडतो , की सगळे जलमय होते आणि नंतर एकदम गायब होतो ,मग प्रचंड उन्ह पडते, जणू काही ग्रीष्म ऋतू सुरू झाला असे वाटावे !
हल्ली सगळयाच ऋतूंचे संतुलन काहीसे ढळल्यासारखे दिसत आहे , त्यामुळे नेमकी ऋतुचर्या काय सांगावी ,हाही एक प्रश्नच आहे .😇

त्यात कोरोनानेही आपला मुक्काम अपेक्षेपेक्षा खूपच जास्त लांबवलेला आहे ,अजूनही तो दीर्घकाळपर्यत आपल्याबरोबर राहणार अशी दाट शक्यता दिसत आहे.
खरतरं जरा नीट विचार केला , तर यासारखे अगणित जिवाणू -विषाणू या सृष्टीमध्ये पूर्वीपासून होते आणि पुढेही राहणार आहेत .
गेली 100 -150 वर्षे मानव जातीने विकासाच्या नावाखाली, निसर्गाविरुद्ध वागण्याचा जो चंग बांधलेला आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल मोठ्या प्रमाणावर ढळू लागला आहे. हा समतोल पुन्हा स्थापित करण्यासाठी कोरोना, वादळे ,पूर यासारखे वेगवेगळे इशारे देऊन , निसर्ग मानवजातीला स्वतःच्या वर्तनाचा पुनर्विचार करायला सुचवत आहे.पण तरीही आपण जागे न झाल्यास, मानव जातीचा विनाश अटळ आहे .

*निसर्ग ही शक्ती माणसापेक्षा विशाल-विराट आहे, तिच्याशी जुळवून घेणेच मानवजातीसाठी श्रेयस्कर आहे* हे आयुर्वेदाच्या थोर ऋषी महर्षींनी जाणलेले होते.

*निसर्गात प्रत्येक ऋतूनुसार बाह्य वातावरणात जे बदल होतात,त्यानुसार आहार -विहारात योग्य बदल करून, आपल्या शरीराचे संतुलन कसे राखावे, आरोग्य कसे उत्तम ठेवावे, हेच आयुर्वेदातील ऋतुचर्येत सांगितलेले आहे* .

कोरोनाच्या लढाईत निर्णायक ठरणारी
रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी , सध्या प्रत्येकजण धडपडत आहे .
*पण रोगप्रतिकार क्षमता ही काही फक्त औषधे घेऊन वाढत नाही, तर बाह्य वातावरणाशी संतुलन राखणारा आहार-विहार करणे*
(जो पचवणे शरीराला सहज, सोपे होते) ,
*हे रोगप्रतिकारक्षमता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे* .

नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहायचे असेल तर फारशी शक्ती वापरावी लागत नाही ,पण नदीच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचं असल्यास मात्र बरीच शक्ती खर्च करावी लागते , खूप ताण पडतो . *(निसर्ग नियमांच्या विरुद्ध वागत रहिल्यामुळे, जे सध्या आपणा बहुतेक लोकांचा बाबतीत घडत आहे )*

याचे ऋतूचर्येतील उदाहरण द्यायचं झाल्यास
पावसाळ्याच्या काळात हवेतील गारवा व दमटपणा वाढल्यामुळे पचनशक्ती मंद झालेली असते अशा वेळी चमचमीत भजी -वडे यासारखे पदार्थ वारंवार खाल्ले , तर ते पचवण्यासाठी पचनशक्तीवर खूप ताण पडतो ,असे जड अन्न नीट पचत नाही ,रोग निर्माण करणारा आमदोष तयार होतो ,शरीराचे पोषण नीट होत नाही, परिणामी शरीराची प्रतिकारक्षमता खालावते ,शरीर रोगांना चटकन बळी पडते.

त्याउलट पावसाळ्यात मंद झालेला अग्नी लक्षात घेऊन , पचायला हलके पदार्थ खाणे, आवश्यकतेनुसार उपास करणे असा ऋतुसुसंगत आहार विहार ठेवल्यास पचनशक्तीवर ताण पडत नाही ,अन्नाचे पचन उत्तम होते, शरीराचे नीट पोषण होते व परिणामी आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहते ,शरीर निरोगी राहते.

आयुर्वेदात सांगितलेल्या *दिनचर्या व ऋतुचर्या* यांचे महत्व कालातीत आहेच , परंतु सध्या असलेल्या कोरोनामय वातावरणात हे सर्व समजून घेण्याची व आचरणात आणण्याची नितांत आवश्यकता जाणवत आहे ,म्हणूनच एवढ्या विस्ताराने लिहिले.

सध्या रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या औषधांचा मारा करण्याची जणू चढाओढच लागलेली आहे . *आपण कसेही वागायचे व केवळ औषधे खात राहायची ही स्वतःच स्वतःची केलेली शुद्ध फसवणूकचं आहे* .

*त्यामुळे निरोगी राहण्यासाठी केवळ औषधावर अवलंबून न राहता , त्याआधी आयुर्वेदात सांगितलेली योग्य जीवनशैली समजून घेऊन , ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास , आपण नक्कीच अधिक निरोगी राहू ,हे सर्वांनी नीट लक्षात घेतले पाहिजे* .

तेव्हा आता पुढील काही भागांमधून जाणून घेऊया सध्या चालू असणाऱ्या *वर्षा ऋतूतील आहार विहाराबद्दल*
त्यामुळे सध्या रोगराईसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वर्षा ऋतुतही आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकणार आहोत .

धन्यवाद 🙏

*वैद्य उर्मिला पिटकर*,मुंबई
एम् डी (आयुर्वेद )
पी.एच.डी.
*आयुर्वेद व्यासपीठ*
कोकण विभाग अध्यक्ष

21/07/2020

We are really thankful to our clinical staff ,the way they have supported and did their duties in this Covid 19 pandemic .
As appreciation , all clinical staff are insured as corona kavach policy for next 91/2 months .
Thanks to all my clinical staff .

18/06/2020

On international yoga day .........

06/06/2020

Dear All,

*Best Wishes to all of You....*
*Real Exam of Corona in begins as Unlock-1 starts...*
*Your Theoretical Training and Tuition for Corona is over now...*
*Practical Exam begins .....
Government may Relax or withdraw *Lock-Down,* but you must follow it very strictly because you are only a *Number* to the Government but you are *Whole World To Your Family*

&

For

Us too.....

*Remember it always....🙏🙏🙏😊*

15/04/2020

*दधिचीची लेकरं*
*द्वारकानाथ संझगिरी*

आज मला आठवण येतेय ती सावित्रीबाईं फुलेंची.

कारण सध्या माहोल दर्दभरा आहे. माहोल करोनाचा आहे.

१२३ वर्षापूर्वी असंच यमाचं रौद्र रूप घेऊन प्लेग आला होता. सावित्रीबाईंनी पुण्याबाहेर प्लेगचं क्लिनिक उघडलं. ध्येय एकच - जनसेवा. ती काही डॉक्टर नव्हती. पण कुणीतरी तिला कळवलं, पुण्यात महारवाड्यात कुणा गायकवाड नावाच्या इसमाचा मुलगा प्लेगने तळमळतो आहे. ती उठली आणि थेट महारवाड्यात गेली. तिने त्या मुलाला स्वत:च्या पाठीवर घालून क्लिनिकमध्ये नेलं. तिच्या या कृतीने प्लेग चिडला असावा. त्याने सावित्रीला दंश केला. ती प्लेगने गेली. जनसेवेसाठी तिने प्लेगला स्वतःची आहुती दिली.

हाफकिन हा गोरा माणूस मुंबईत येऊन प्लेगवर लस शोधत होता. ती बनवल्यावर इतर कोणावर प्रयोग करण्याआधी त्याने ती आधी स्वतःला टोचली. काय हिम्मत असेल! लस कशी तयार होते हे मी सांगायची गरज नाही.

डॉ. द्वारकानाथ कोटणीस ह्यांची कहाणी तुम्हाला ठाऊक असेलच. केवळ पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाला मान देऊन ते चीनला गेले. जपान-चीन युद्ध पेटलं होतं. चीन तेंव्हा भारताचा मित्र होता. त्या युध्दात जखमी चीनी सैनिकांवर उपचार करण्यासाठी चार भारतीय डॉक्टर्स गेले होते. त्यात एक डॉ. कोटणीस होते. ते सैनिक ना आपल्या धर्माचे, ना आपल्या देशाचे, तरी त्यांच्यासाठी कोटणीसांनी स्वत:चे प्राण पणाला लावले. ह्याला खराखुरा मानवतावाद म्हणतात. माणसाने माणसासाठी धाव घेणं. या कामात अनेक वेळा त्यांनी न झोपता बहात्तर तास सलग काम केलं. ह्या श्रमापायी वयाच्या केवळ बत्तिसाव्या वर्षी ते गेले.

यांना मी ‘दधिचीची लेकरं’ म्हणतो. देवांचा राजा इंद्र ह्याला जिंकता यावं म्हणून दधिचींनी प्राणत्याग केला आणि आपली हाडं इंद्राला वज्र बनवायला दिली. हा सर्वोच्च त्याग.

आजही अशी दधिचीची लेकरं जगभर आहेत.

आयर्लंड देशाचे अनेक डॉक्टर्स जगातल्या अनेक देशांत काम करतात. सध्या त्यातले अनेक त्यांच्या मायदेशी परतलेत. आपल्या देशातल्या रोग्यांची सेवा करण्यासाठी. त्यांचे पंतप्रधान स्वतः डॉक्टर. आपला मराठी माणूस डॉ. वराडकर. त्याने ठरवलं की आठवड्याचा एक दिवस कोरोना रोग्यांसाठी द्यायचा. हे सुरक्षित महालातून बाहेर पडून जीवाचा धोका पत्करणे आहे. ही वृत्ती सेहवागची आहे. आव्हानांचा स्वीकारं करायचा. पहिलं त्रिशतक पूर्ण करताना एकेरी धावेऐवजी षटकार ठोकायचा. पण वराडकरंचा हा षटकार मानवतेचा षटकार आहे. त्यातून जाणारा संदेश उच्च कोटीचा आहे.

इटलीत शंभर डॉक्टर्स धारातीर्थी पडले. पण तरीही क्युबातून पन्नास डॉक्टर्स तिथे लढायला गेले. हे सर्व आधुनिक दधिची आहेत.

आपल्याकडे कोवळी, नुकतीच डॉक्टर झालेली, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी पालिकेच्या हॉस्पिटल मधली साडेतीनशे लेकरं प्रत्यक्ष कोविड रोग्यांची सेवा करतायत. हीसुद्धा त्याच दधिची कुटुंबातली. त्यांना तर पर्याय नसतो. क्रिकेटमध्ये नवा खेळाडू आला की त्याला सिली पॉईंट किँवा शॉर्टलेगला उभं करतात. तिथे चेंडू लागायची शक्यता जास्त असते. तसंच ह्या शिकणाऱ्या डॉक्टरांचं आहे. हे पेशंटजवळ सिलीपॉईंटला असतात. जोखीम जीवाची असते.

माझा वर्गमित्र डॉ. सुभाष ओरस्कर हा एम डी आहे. तो आजही रोज चाळीस पेशंट तपासतो. खरं तर तो तसा धोकादायक वयातला. बरं, त्यातले बहुतेक रुग्ण हे चेस्ट इन्फेक्शनचे असतात.

मी त्याला म्हटलं ,"तू हे जे करतोहेस त्याला शुरत्व म्हणायचं की वेडेपणा? तुला दधिची व्हायचंय का?"

तो म्हणाला "कॅलक्युलेूटेड रिस्क. मी सर्व खबरदारी घेतो. अरे, आपली कोवळी मुलंमुली सिलीपॉईंटला उभे असताना आम्ही निदान सीमारेषेवर तरी फिल्डींग नको का करायला? तंबूत किँवा कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून कसं चालेल? मग या मुलांनी का जीव धोक्यात घालावा?” मी त्याला सलाम ठोकला. कारण माझ्या मुलाच्या एका मित्राचा तोंडाचा कॅन्सर जेव्हा पुन्हा उफाळून आला होता तेव्हा त्याच्या डॉक्टरने त्याला तपासायला नकार दिला होता.

ह्याची दुसरी बाजू माझा दुसरा डॉक्टर वर्गमित्र दीपक हट्टंगडी मांडतो. तो त्याच्या नर्सिंग होममध्ये पेशंट तपासतो. तो म्हणतो "अनेक डॉक्टर्सना काम करायचंय. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या अडचणी येतात. एका मित्राच्या नर्सिंग होम मध्ये दोन गंभीर अवस्थेतले रोगी आले. ते जगू शकले नाहीत. मरणानंतर ते कोरोनासाठी पॉझिटीव्ह निघाले. त्याबरोबर इतर पेशंटनी नर्सिंग होमवर केस टाकायची धमकी दिली. बरं, ज्यांची क्लिनिक्स सोसायटीत आहेत त्या बऱ्याच सोसायट्या त्यांना प्रॅक्टिस सुरू करू देत नाही आहेत. आमच्या नर्सिंग होमची नर्स घरी गेली तर तिला सोसायटीत घेतलं जात नाही. अनेक अडचणी आहेत. सांगायचं काय तर सर्वच खेळाडू तंबूत बसलेले नाहीत. त्यांनाही क्षेत्ररक्षणाला यायचं आहे.”

हे अगदी खरंय. सर्वात दांभिक आपण मध्यमवर्गीय सुखवस्तू सोसायटीत राहणारी मंडळी आहोत. अत्यंत भित्रे आणि कातडीबचाऊ. बिरबलाच्या माकडीणीच्या गोष्टीची आठवण करून देणारे. कोविडच्या रोग्यावर उपचार करणारे काही डॉक्टर्स भाड्याने ज्या सोसायटीत राहत त्यांना तिथून काढलं गेलं, ते विषाणू घरी घेऊन येतील म्हणून.

हा बेशरमपणा आहे. आपल्याला इतकी जीवाची भीती असेल तर मग त्या डॉक्टरांनी जिवाची बाजी का लावावी? मला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली. दोन डॉक्टरेट मिळूनही त्यांना कुणी घर देत नव्हत राहायला. ती सामाजिक अस्पृश्यता होती, ही मृत्यूच्या भीतीची अस्पृश्यता आहे. कुठल्याश्या फंडात पैसे फेकले, गॅलरीत उभं राहून टाळ्या वाजवल्या, पणत्या पेटवल्या, भारतमाता की जय म्हटलं की आपली सामजिक बांधिलकी संपली. प्रेक्षकांनासुध्दा एक भूमिका करता येते. ती तरी आपण करूया. ह्या डॉक्टर्स आणि नर्सेस ह्यांना दूर न ढकलण्याची.

दधिची होणं दूर, पण दधिचीला आपण भारतात जन्म घेतला ह्याचं दुःख होऊ नये एवढीतरी सामाजिक बांधिलकी आपण दाखवूया.
As received.

Address

Zojwala Complex , Behind Hotel Ramdev Kalyan W
Kalyan
421301

Opening Hours

Monday 7:30am - 9:30am
Tuesday 7:30am - 9:30am
Wednesday 7:30am - 9:30am
Thursday 7:30am - 9:30am
Saturday 7:30am - 9:30am
Sunday 7:30am - 9:30am

Telephone

+19892874710

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree diabetic and foot care speciality centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree diabetic and foot care speciality centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram