Dr. Anuja's Health World

  • Home
  • Dr. Anuja's Health World

Dr. Anuja's Health World Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Anuja's Health World, Doctor, Baner, .

26/08/2023

घेऊया डोळ्यांची काळजी..

Bacterial and viral conjunctivitis अर्थात् eye flu म्हणजेच सामान्य भाषेत डोळे येणे.. काय आहे हे नेमकं?
तर डोळे येणे हा एक अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असून पावसाळ्यात विशेषकरून ही साथ दिसून येते.

काय आहेत लक्षणे?

डोळ्यांचा लालसरपणा
जळजळ
खाज
चिकट पिवळा स्त्राव येणे
सकाळी डोळे उघडते वेळी पापण्या एकमेकांना चिकटून बसणे
पापण्यांना सूज येणे
प्रकाश सहन न होणे
ही सारी लक्षणे एक अथवा दोन्ही डोळ्यांना दिसू शकतात.

समज गैरसमज -
डोळे येणे हे बाधित व्यक्तीकडे नुसते बघितले तरी होते, किंवा हवेतून देखील याचा प्रसार होतो असा एक मोठा गैरसमज आहे.
प्रत्यक्षात, हा एक संसर्गजन्य आजार असून बाधित व्यक्तीच्या नेत्र स्त्रावाशी संपर्क आल्यास थेट अथवा बाधित व्यक्तीच्या टॉवेल, कपडे किंवा इतर संसर्गित वस्तूंशी संपर्क आल्यास अप्रत्यक्षरीत्या पसरू शकतो.

संसर्गापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?

संसर्गित व्यक्ती जोवर स्त्रावमुक्त होत नाही, तोवर तिच्या संपर्कात जाणं टाळावं.
हात वारंवार आणि स्वच्छ धुवावेत.
आपला टॉवेल, कपडे इतरांनी वापरू नयेत, याची दक्षता घ्यावी.
डोळ्यांना सतत स्पर्श टाळावा.
घराबाहेर जातेवेळी डोळ्यांच्या संरक्षणार्थ गॉगल्स किंवा चष्म्याचा वापर जरूर करावा.

डॉ. अनुजा डोके
095611 74891

22/08/2023

सुंदर साजिरा श्रावण आला...

श्रावण म्हटलं, की पाऊस, सणवार अन् जोडीला उपवासदेखील आलेच.. मग पेशंट्स सुद्धा वाढतात.. तक्रारी काय, तर पित्त, मळमळ, डोकेदुखी, अपचन.. याचे मूळ कारण असते ' उपवास '
याशिवाय, उपवासाने वजन कमी होण्याऐवजी वाढल्याच्याच तक्रारी जास्त दिसून येतात. याचे कारण शोधून त्यावरील उपाय सांगण्यासाठीचा हा लेखप्रपंच..
मुळात, आपल्याकडे उपवासाला खाल्लं काय जातं, तर साबुदाण्याची खिचडी, वराईचा भात/ भगर, तळलेले पापड, केळी, रताळी, बटाट्याचा कीस, रताळ्याचा हलवा.. हे सगळं काहीच्या काही कॅलरीज असणारं आहे.

उदा.

केळी - १०० ग्राम - ८९ कॅलरीज
बटाटा - १०० ग्राम - १०३ कॅलरीज
रताळी - १०० ग्राम - ८६ कॅलरीज
साबुदाणा - १०० ग्राम - ३३२ कॅलरीज
भगर - १०० ग्राम - ११० कॅलरीज
बटाटा चिप्स - १०० ग्राम - ५३६ कॅलरीज
केळी चिप्स - १०० ग्राम - ५१९ कॅलरीज

बरं, इतकं सारं आपण एकाच उपवासादिवशी खातोय असंही नाही.. तर श्रावणात पुष्कळ उपवास भक्तिभावाने केले जातात आणि दरवेळी असं काही खाल्लं जातंच.. मग आपण स्वतःहूनच स्थौल्य, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे हे.
परिणामी, तब्येतीचं सगळं तंत्रच बिघडून जातं.

मग आता तुम्ही म्हणाल, खायचं तरी काय??
बघूया काय करता नी खाता येऊ शकतं -
पोषणमूल्ययुक्त आहार -
१. फ्रूट सॅलड बाउल -
यात संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, किवी, पीअर, पेरू यांचाच वापर असावा.
केळं, चिकू, द्राक्षे, सीताफळ ही फळे रक्तातली साखर वाढवणारी असल्यामुळे ह्यांचा वापर टाळणे उत्तम.
२. जर गोड खाण्याची इच्छा होतेय, अशा वेळी मग सफरचंद वगैरेची खजूर घालून खीर बनवावी जेणेकरून पौष्टिक पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
३. Hydrated राहण्यासाठी लिंबू पाणी, शहाळ्याचं पाणी, ताक यांचा आहारात समावेश असावा.
४. भूक लागल्यास असावेत म्हणून सोबत अक्रोड, बदाम, न खारवलेले पिस्ते ठेवावेत.
५. तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्याने पित्तप्रकोप होऊ शकतो म्हणून तसे पदार्थ टाळले तर बरे.
६. भाजलेले मखाणे खाऊ शकता. पोट भरण्यास मदत होते शिवाय कॅलरी काउन्ट आटोक्यात राहतो.

तर, अशा काही साध्या सोप्या पण महत्त्वाच्या बदलांनी आहार सकस, चौरस बनतोच, शिवाय उपवासादिवशी थकल्याची भावना न होता उपवास आनंददायी होतो.
मग तुम्हीही खात्रीने म्हणाल,

सुंदर साजिरा श्रावण आला...

डॉ. अनुजा डोके.
095611 74891

07/02/2023

व्यायामाचा आनंद

व्यायाम अर्थात एक्सरसाइज... ऐकल्यावरच सगळ्यात कंटाळवाणा वाटणारा पण आजच्या युगात अगदी मस्ट असणारा प्रकार..

तसं तर हल्लीची तरुण पिढी आता आरोग्य आणि फिटनेस बाबतीत जागरूक झाली आहे. त्यामुळे योग्य व्यायाम अन् डाएट करण्यावर तरुण मंडळी भर देतात, परंतु व्यायाम करताना कधी कधी लहान सहान चुका केल्या जातात. त्यामुळेच हा व्यायाम कंटाळवाणा ठरू शकतो.

मोनो टोनस एक्सरसाइज : ( सतत तोच तो व्यायाम प्रकार करणे )
कोणतीही गोष्ट वारंवार करत राहिली की ती कंटाळवाणी वाटू लागते. तेच व्यायामाच्या बाबतीतही आहे. रोज तोच तो व्यायाम प्रकार केला तर एकसुरीपणा जाणवू लागतो आणि कालांतराने व्यायामच नकोसा वाटू लागतो. यासाठीच व्यायाम करताना विविध प्रकार अंगीकारले जावेत जसे की ॲब्ज, एरोबिक्स, कार्डिओ एक्सरसाईझेस, वेट ट्रेनिंग, सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम.

कमी प्रमाणात खाणे :
कमी खाल्ल्याने वजन कमी होईल हा भ्रम आहे. कमी खाण्याने शरीरात व्यायामासाठी ऊर्जा राहत नाही. परिणामी शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने व्यायाम करण्याचा कंटाळा येतो, असं कारण बहुतेक जण देतात आणि हेच दुष्टचक्र चालू राहते.
योग्य प्रमाणात आहार घेतल्यास शरीरातील ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे व्यायाम करण्यास साहजिकच उत्साह येतो.

सर्टिफाईड ट्रेनर्स : ( प्रमाणपत्रप्राप्त प्रशिक्षक )
ते तुमच्यासाठी योग्य व्यायामाचा आराखडा आखतात, नियोजन करतात. तुमची शरीरयष्टी, जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीनुसार आणि कामाच्या वेळेनुसार ते व्यायाम करवून घेतात. योग्य प्रकारे प्रोत्साहन ते देतात.

कंटिन्यूअस व्यायाम :
व्यायाम करताना देखील ब्रेक आवश्यक असतो, जेणेकरून तुम्ही पुन्हा उत्साहाने व्यायामाला लागू शकता. ( पण तो ब्रेक अति लांबला गेला तर तुमचे व्यायामातील सातत्य आणि पर्यायाने स्वारस्य निघून जाऊ शकते. ती काळजी घेतली जावी.) योग्य प्रमाणात ब्रेक शरीरासाठी देखील आवश्यक आहेच.

आता राहिला प्रश्न व्यायामानंतर दिसणाऱ्या परिणामाचा, तर एखाद्या कामात यश मिळालं की आपोआपच प्रोत्साहन देखील मिळतं. तेच व्यायामाच्या बाबतीत देखील आहे. थोडासा फॅट लॉस झाला की तुम्हाला देखील हुरूप येईल आणि अजून जोमाने तुम्ही व्यायाम करायला लागाल आणि अर्थातच व्यायामाचा आनंद घेऊ शकाल.

डॉ. अनुजा डोके.
9561174891

बैठी जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम                       शीर्षकावरूनच लक्षात आला असेल आजचा विषय. बैठी जीवनशैली म्...
20/01/2023

बैठी जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम

शीर्षकावरूनच लक्षात आला असेल आजचा विषय. बैठी जीवनशैली म्हणजे थोडक्यात शारीरिक हालचालींचा अभाव. कॉम्प्युटरच्या युगात कॉम्प्युटर समोर बसून तासन् तास काम केले जाते, याशिवाय दिलेली टार्गेट्स पूर्ण करणे, लॉगिन करण्याच्या ठरलेल्या वेळा पण लॉग आऊट करायला काहीही काळवेळ नाही. थोडक्यात दहा ते पाचच्या कामाचा जमाना राहिलेला नसल्यामुळे ती कामे वेळेतच पूर्ण करण्याचे बंधन, मग ते काम ऑफिसमध्ये जाऊन असो किंवा घरून. ऑफिस मधून पण जेव्हा काम असते तेव्हा देखील गाडीवर किंवा गाडीत बसून येणे जाणे. म्हणजेच चालणे अभावानेच होते आणि आता तर कोविड मुळे बहुतांश लोकांना घरून काम करण्याचा पर्याय प्राप्त झाला. त्यामुळे घरातल्या घरात हालचालींवर आणखी मर्यादा आल्या. शिवाय या काळात कंपन्यांनी लोकांना कामावरून कमी करायला सुरुवात केल्यामुळे तो मानसिक तणाव, कामाचा अतिरिक्त ताण या सगळ्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला आहे. तसेच लहान मुलांना देखील दोन वर्षे कोविडच्या काळात घरूनच शालेय अभ्यासक्रम कम्प्युटर द्वारे शिकवला गेल्यामुळे बैठकीचे प्रमाण वाढले.
एका शास्त्रीय अभ्यासानुसार पुष्कळ वेळ एकाच जागी बसून राहण्याने हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो.
उच्च रक्तदाब (हाय बीपी), मधुमेह (डायबेटीस), यासारखे आजार उद्भवण्याचे प्रमाण वाढते आहे.
याशिवाय बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे आणि बसण्याच्या चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखीच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
याशिवाय हालचालीच्या अभावामुळे तसेच बेकरी प्रॉडक्टचे अतिरिक्त सेवन आणि तुलनेत पाणी कमी पिणे यामुळे मलावरोधासारख्या पोटाच्या तक्रारी वाढत आहेत.
शिवाय कोलेस्ट्रॉल म्हणजेच लिपीड अर्थात रक्तातील वाईट चरबीचे प्रमाण वाढते आहे आणि हे हृदयविकारासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते.
अगदी लहान मुलांमध्ये देखील स्थौल्य म्हणजेच वजन वाढण्याची समस्या दिसून येते आहे.

मग या सगळ्यावर उपाय काय?

कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून दर तासाने दहा मिनिटे कामाच्या ठिकाणी वॉक घ्यायचा. मग तुम्ही फोनवर मीटिंग करणे, महत्त्वाची कामे फोनवर बोलता बोलता करत चालणे अशा गोष्टी देखील करूच शकता.
दररोज सकाळी पाऊण ते एक तास भरभर चालणे अर्थात ब्रिस्क वॉक घेणे यामुळे शरीराचे रक्ताभिसरण उत्तमरीत्या होते, मूड दिवसभर फ्रेश राहतो.
मोबाईल मध्ये ॲप्स डाऊनलोड करून तुम्ही त्यावर पावले मोजत चालू शकता.
निरनिराळे व्यायाम करू शकता. यात cardio exercises, बेली फॅट रिडक्शन साठी ॲब्ज, एरोबिक्स असे पर्याय उपलब्ध आहेत.
शिवाय दोरीवरच्या उड्या मारणे पोहणे सायकलिंग हे देखील उत्तम व्यायाम आहेत ज्यात शरीराचे सर्व स्नायू समाविष्ट होतात.
योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार या पारंपारिक व्यायामांचे महत्त्व मी वेगळे सांगायला नको.
मुलांचा स्क्रीन टाईम थोडा कमी करून इनडोअर गेम्स ऐवजी आउटडोर गेम्स साठी मुलांना प्रोत्साहन द्या.
काम करतेवेळी बसताना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे पाठ, कंबर, गुडघेदुखी, सांधेदुखी उद्भवली असेल तर त्यासाठी तुम्हाला आरामदायी वाटेल अशा खुर्च्या आणि टेबलांचा वापर करा.
आजकाल एरगोनोमिक सेशन्स होतात त्यात खास शरीराची काम करतेवेळी ठेवण कशी असावी यावर अभ्यासपूर्ण माहिती दिली जाते.

आहार शैली विषयी काही :
आहार अर्थातच सर्व समावेशक असावा म्हणजे सर्व पोषणमूल्ययुक्त आहाराचे सेवन केले जावे. सीजनल फळे, भाज्या, हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करावे. रात्रीचे जेवण शक्यतो साडेआठ पर्यंत करावे आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने अर्धा तासभर चालावे, जेणेकरून रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
याशिवाय जेवणानंतर लगेचच झोपू नये. दोन ते तीन तासांचा गॅप जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये असावा.
दरवर्षी शरीरातले सगळे पॅरामीटर्स अर्थात शरीरात सर्व व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी लॅब टेस्ट करून घ्याव्यात.
चाळीशी नंतर त्या अगदीच गरजेच्या असल्या तरी आता हे प्रमाण तिशीपर्यंत आलेले आहे. म्हणून बैठ्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम पाहता आपल्या शरीराचे आरोग्य आपल्याच हातात आहे.
शरीरमादयं खलु धर्म साधनम् असे म्हटले जाते, ते उगाच नाही.. म्हणजेच शरीर हे अमूल्य आहे, त्याची जपणूक, रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

डॉ. अनुजा डोके
9561174891

मकरसंक्रांतपर्व आणि आरोग्यमकरसंक्रांतीचा सण हा देशभरात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकरसंक्रांत, मकर संक्रमण, लोह...
16/01/2023

मकरसंक्रांतपर्व आणि आरोग्य

मकरसंक्रांतीचा सण हा देशभरात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकरसंक्रांत, मकर संक्रमण, लोहरी, उत्तरायण, मकरविलक्कु, पोंगल, बिहू, पौष सोंगक्रांती, खिचडी पर्व, पेद्दा पंदुया अशा विविध नावांनी हा सण भारतभर ओळखला जातो.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि हा काळ सौर महिना म्हणून ओळखला जातो.

आता ह्या सणाचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊया.

सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्याने हा काळ ऋतुसंधीचा काळ मानला जातो आणि शरीरात बदलांना सुरुवात होते. आणि हाच तो काळ असतो जेव्हा आजारांना निमंत्रण मिळते. सर्दी, ताप खोकल्याचे रुग्ण ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडते आणि शरीराला उबेची, उष्णतेची गरज असते. संक्रांतीला तीळगूळ सेवन करण्यामागे हेच कारण आहे. तीळ हे उष्ण गुणधर्मी, तसेच शरीराला स्निग्धता प्रदान करणारे असतात. बाजरीची भाकरी देखील तीळ लावून आवर्जून केली जाते, कारण बाजरी देखील उष्ण गुणात्मक असते. आहारात या पदार्थांचा अंतर्भाव केल्याने शरीरात उष्णता आणि स्निग्धता निर्माण होऊन रुक्षता आणि थंडीपासून बचाव होण्यासाठी मदत होते.
याशिवाय या काळात मटार, गाजर, हिरव्या पालेभाज्या यांची रेलचेल असते. बाजारात पुष्कळ प्रमाणात हे उपलब्ध असते. त्यांचा सढळ हस्ते स्वयंपाकात वापर केला जायला हवा. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळ्यात आपला जाठराग्नी प्रदीप्त असतो ( थोडक्यात सांगायचं तर, थोड्या थोड्या वेळाने भूक लागते आणि खाल्लेलं सहजरीत्या पचतंदेखील.) अशा वेळी सीझनल फळे, भाज्या, तीळगूळ, तिळाच्या पोळ्या, शेंगाच्या पोळ्या, बाजरीची भाकरी, गाजराचा हलवा, मटारचे विविध पदार्थ, पुष्कळ तूप घालून डाळखिचडी ह्यांचा आहारात समावेश केला की ते सहज पचून जाते.( वाण म्हणून सुगडामध्ये जे भरलं जातं, ते ऊस, बोरं, डहाळा, मटार, घेवडा हे शेतीतले सीझनल प्रॉडक्टच आहेत.)
असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं, की थंडीतला व्यायाम हा शरीरासाठी लाभदायी असतो. आता थंडीत अंथरुणातून बाहेर पडायला नको वाटतं हा भाग निराळा, पण खरंच एकदा का उठून चालणे, पळणे किंवा घरच्या घरी व्यायाम केला, की शरीरात ऊब, उष्णता निर्माण होऊन ती या थंडीच्या दिवसांत दिवसभरासाठी एनर्जी देते.
याशिवाय हाडांची दुखणी, गुडघा, पाठ, कमरेची दुखणी या काळात जोर धरतात. पादाभ्यंग, स्नेहाभ्यंग असे आयुर्वेदाने सांगितलेले उपाय याच काळात केले जातात आणि यासाठी तीळ तेल, मोहरीचे तेल, खोबरेल तेल, महानारायण तेल, काही आयुर्वेदिक medicated oils वापरली जातात, ( आयुर्वेदानुसार शरीरात थंडीच्या काळात वात प्रकोप झालेला असतो. त्याचे शमन ह्या तेलांनी होते.) जेणेकरून शरीर स्निग्ध राहील आणि शरीराला कार्यरत राहण्यासाठी आवश्यक वंगण मिळू शकेल.
संक्रांतीला काळे कपडे परिधान करावेत असं म्हटलं जातं पण केवळ तेव्हाच नव्हे, तर सर्वसाधारणपणे हिवाळ्यात गडद अथवा काळ्या रंगाचे कपडे घातल्याने त्यात उष्णता शोषली जाऊन शरीराचे रक्षण होते, असे विज्ञान सांगते.

तर अशा प्रकारे ह्या संक्रांती पर्वाचा आणि आपल्या आरोग्याचा गहन संबंध आहे.
त्यामुळे हिवाळ्यात आपली आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सगळ्यांना संक्रांतीच्या आरोग्यदायी शुभेच्छा..

डॉ. अनुजा डोके.
9561174891

शरीरात आवश्यक असणारी वेगवेगळी जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, फायबर्स, पिष्टमय घटक पदार्थ या सगळ्यांमध्ये विटामिन बी १२ ही मह...
01/01/2023

शरीरात आवश्यक असणारी वेगवेगळी जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, फायबर्स, पिष्टमय घटक पदार्थ या सगळ्यांमध्ये विटामिन बी १२ ही महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रामुख्याने मांसाहार जे करतात त्यांना याची कमतरता जाणवत नाही, परंतु शाकाहार करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण कमी झालेले आढळून येते.

B१२ शरीरामध्ये भूमिका

उतीय निर्मिती म्हणजेच टिशू फॉर्मेशन, लाल रक्तपेशींची निर्मिती आणि मज्जा संस्था अर्थात नर्वस सिस्टीम निरोगी बनवण्यासाठी B12 महत्त्वाची भूमिका बजावते.
हे विटामिन मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तसेच ताणतणाव कमी होण्यासाठी देखील याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. व्हिटॅमिन ही दोन प्रकारची असतात. fat soluble आणि water soluble.
व्हिटॅमिन बी १२ हे fat soluble व्हिटॅमिन आहे.

विटामिन B१२ कमतरतेची कारणे-

हे मुख्यतः मांसाहारी गोष्टींमध्ये आढळते, खाद्यपदार्थांमध्ये आढळते. त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता दिसून येते.
तसेच एखाद्या शस्त्रक्रियानंतर याची कमतरता आढळून येते, कारण शरीरामध्ये रक्तस्त्रावामुळे लाल रक्त पेशींचे प्रमाण कमी झालेले असते. तसेच या व्यतिरिक्त शरीरातील एंट्रीन्सिक फॅक्टर ची कमतरता हीदेखील विटामिन बी 12 च्या कमतरतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

B १२ कमतरतेची लक्षणे

विटामिन बी १२ शरीरामध्ये कमी पडू लागल्यास त्याची लक्षणे शरीरभर दिसून येतात. ती पुढील प्रमाणे
अशक्तपणा ( गळून गेल्यासारखे वाटते)
लक्षात न राहणे (स्मरणशक्ती वर परिणाम)
मुंग्या येणे (हातापायांना मुंग्या येतात)
बधिरत्व ( एखादा अवयव सुन्न पडल्यासारखा होतो)
केस गळणे
थकवा येणे
डोकेदुखी
दृष्टीवर परिणाम होणे
तोंडात व्रण (तोंड येणे)
नैराश्य (nervous system वर होणाऱ्या परिणाम मुळे)
त्वचा पिवळसर होणे ( लाल रक्तपेशी ची निर्मिती कमी होत असल्यामुळे)
नाडीचे ठोके जलद गतीने पडणे (पल्पिटेशन)
बद्धकोष्ठत्व ( आतड्यांची हालचाल मंदावते)

विटामिन बी १२ कमतरता भरून कशी काढाल?

शाकाहारी लोक आपल्या आहारामध्ये -
पनीर
दही
सोयाबीन
ब्रोकोली
टोफू
चीज
अन्य दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकतात, जेणेकरून विटामिन बी १२ चा काही अंश शरीरामध्ये जाऊ शकतो.

मांसाहारी स्त्रोत
मासे
अंडी
चिकन
मटण
कोळंबी
शेल्फिश
बीफ
या काही मांसाहारी पदार्थांमधून विटामिन बी १२ शरीराला उत्तम प्रकारे मिळते.
माश्यांमध्ये सार्डिन, टूना, सल्मोन हे काही मासे व्हिटॅमिन बी १२ चे उत्तम स्त्रोत आहेत.
अंडी खाताना त्यातील पिवळा बलक खावा जेणेकरून व्हिटॅमिन बी १२ मिळू शकते.
याशिवाय माश्याच्या लिव्हर मधून देखील ओमेगा ३ फॅटी एसिड आणि व्हिटॅमिन बी १२ मिळते.

व्हिटॅमिन बी १२ शरीरात शोषले जाण्यासाठी आंबवलेल्या पदार्थांचा जसे की इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा यांचा आहारात समावेश करावा, जेणेकरून विटामिन बी १२ शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषले जाते. तसेच पाणी पुष्कळ प्यावे, म्हणजेच water intake भरपूर असावा.

विटामिन बी १२ च्या कमतरते अभावी पुढील आजार होऊ शकतात-

मेगालो ब्लास्टिक ॲनिमिया
चेतासंस्थेशी अर्थात नर्वस सिस्टीमशी संबंधित आजार गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत
हृदयाशी संबंधित समस्या.

औषधी स्वरूपात व्हिटॅमिन बी १२-

जेव्हा आहारातून मिळणाऱ्या विटामिन बी १२ शरीराला पुरेसे पडत नाही तेव्हा ते औषधी स्वरूपात बाहेरून आपल्याला शरीरात आणावे लागते.
पाण्यासोबत गोळी घेणे
चावून खाणे
जिभेखाली ठेवणे
या स्वरूपामध्ये औषधे अर्थात विटामिन बी १२ची सप्लीमेंट्स दिली जातात.

याव्यतिरिक्त डॉक्टर तुम्हाला इंजेक्शनच्या स्वरूपात देखील हे औषध देऊ शकतात.
किती कमतरता आहे, यासाठी serum vit. B१२ अशी एक टेस्ट करून मग त्यावर देण्यात येणाऱ्या औषधाचे स्वरूप ठरवले जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. अनुजा डोके
9561174891

World AIDS Day ( जागतिक एड्स दिवस) जगभरातील लोकांना एचआयव्ही (HIV) संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी जागतिक एड्स दिन (World ...
01/12/2022

World AIDS Day ( जागतिक एड्स दिवस)

जगभरातील लोकांना एचआयव्ही (HIV) संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदा ऑगस्ट 1987 मध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आज आपण या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहेत. तसेच या रोगाची कारणं, लक्षणं (AIDS symptoms) आणि उपायांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

World AIDS Day :
का साजरा केला जातो जागतिक एड्स दिवस? जाणून घ्या कारण, लक्षणं आणि बचावाचे उपाय!

जागतिक एड्स दिन साजरा करण्यामागचा उद्देश या आजाराविषयी लोकांमध्ये जागरुकता पसरवणे हा आहे. एड्स ही आधुनिक काळातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीपर्यंत 37 दशलक्षाहून अधिक लोक एचआयव्हीचे बळी ठरले आहेत आणि जागतिक स्तरावर हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाणे ही चिंताजनक बाब आहे.

एड्स रोग म्हणजे काय?
AIDS चा फूल फॉर्म Acquired Immune Deficiency Syndrome असा आहे. सगळ्यात प्रथम हा विषाणू १९८६ साली दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. हा एक संसर्गजन्य लैंगिक रोग आहे. ज्या विषाणूपासून त्याची उत्पत्ती होते त्याला ह्युमन इम्यून डेफिशियन्सी व्हायरस (HIV) म्हणतात. जीवाणूंशी लढण्यासाठी शरीराच्या स्वतःच्या नैसर्गिक शक्तीला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात, जी आपल्या शरीरात पांढऱ्या पेशींद्वारे निर्माण होते, परंतु एड्सचा विषाणू या पांढऱ्या रक्तपेशींना निष्क्रिय करून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो, ज्यामुळे विषाणूशी लढण्याची शरीराची शक्ती संपते. यामुळे व्यक्ती ही कमकुवत होते आणि वारंवार आजारी पडते. थोडक्यात हा आजार हळूहळू व्यक्तीचे शरीर आतून पोखरत जातो.

एड्स कसा पसरतो?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, एचआयव्ही हा विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे किंवा गर्भधारणेदरम्यान मातेकडून बाळाला किंवा बाळाच्या जन्मादरम्यान आईपासून बाळापर्यंत पसरू शकतो. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे या संसर्गाची प्रकरणे अधिक दिसतात. हे टाळण्यासाठी आरोग्य तज्ञ लोकांना कंडोम वापरण्याचा सल्ला देतात.

एड्सची लक्षणे काय? :
पीडित व्यक्तीच्या चेहऱ्यावर पांढरे ठिपके दिसतात.
जास्त घाम येतो.
वारंवार थकवा येतो.
अचानक वजन कमी होते.
खूप ताप, वारंवार जुलाब, सतत खोकला किंवा घसा खवखवतो, मुळातच रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने वारंवार आजारी पडायला होते.
मांड्या आणि काखेत सूज येते.
शरीरावर खाज आणि जळजळ होते.
न्यूमोनिया, टीबी किंवा त्वचेचा कँसर होतो.

एड्सपासून असा करता येईल बचाव :
एड्स एक जीवघेणार आजार आहे. दुर्दैवाने या आजारावर अद्यापही उपचार उपलब्ध नाहीत. त्यातल्या त्यात आयुष्यमान वाढण्यासाठी औषधोपचार केले जातात. हा रोग होऊ नये यासाठी काळजी घेणे हाच याचा एकमेव उपाय आहे. याच उपायांविषयी जाणून घेऊया...

असुरक्षित सेक्स, समलैंगिक सेक्स आणि वेश्यांसोबत सेक्स टाळा.
फक्त तुमच्या जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवा.
संभोगानंतर लघवी करुन तुमचे गुप्तांग स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.
सार्वजनिक शौचालये वापरताना स्वच्छतेची पुरेशी खबरदारी घ्या.
ओठांवर जखम असेल, रक्त स्त्राव होत असेल तर चुंबन घेणे टाळावे.
या आजाराचे विषाणू लाळेद्वारे तुमच्या रक्तात पोहोचू शकतात आणि तुम्हाला या आजाराचा त्रास / संसर्ग होऊ शकतो.
सलूनमध्ये दाढी करताना नवीन ब्लेड वापरण्यास सांगा आणि आग्रह धरा.
एड्सची लागण झालेल्या महिलांनी गरोदर राहू नये, कारण हा आजार त्यांच्या बाळांनाही पसरू शकतो.
इंजेक्शन घेताना फक्त डिस्पोजेबल सिरिंज आणि सुया वापरा. त्या वापरल्या जात आहेत का याची खात्री करून घ्या.

- डॉ. अनुजा डोके
9561174891

17/11/2022

गोवर

गोवर हा मुख्यतः लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. कुपोषणामुळे आपल्या देशात गोवरचे अनेक दुष्परिणाम आणि मृत्यू देखील होतात. म्हणूनच मुलांच्या महत्त्वाच्या सहा संसर्गिक आजारांमध्ये याचा देखील समावेश केला गेलेला आहे.( हे सहा आजार म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर)
सुदैवाने गोवर विरुद्ध परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. पूर्वी गोवर साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी साथीच्या स्वरूपात येत असे. आता लसीमुळे या साथीचे प्रमाण कमी झालेले आहे. आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षापर्यंत येऊन जातो, परंतु तो उशिरा देखील येऊ शकतो. एकदा गोवर होऊन गेला की जवळपास आयुष्यभर टिकणारी गोवर विरुद्धची प्रतिकारशक्ती शरीरात तयार होते, म्हणून त्या व्यक्तीला परत गोवर होण्याची शक्यता जवळपास नसतेच, परंतु एखाद्या व्यक्तीला गोवर लहानपणी झालेला नसेल तर तो आयुष्यात कधीही होऊ शकतो.

कारणे :
गोवर हा रोग एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर उष्ण वातावरणात फार काळ तग धरू शकत नाही, परंतु थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो, म्हणून हिवाळ्यात हा आजार जास्त आढळतो. गोवरचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणू प्रवेशानंतर साधारणपणे दहा दिवसांनी गोवरांची लक्षणे दिसू लागतात. गोवरचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात, नंतर रसग्रंथी, पांथरी, टॉन्सिल तोंडाचा अंतर्भाग, श्वासनलिकांचे आतले आवरण इत्यादी जागी ते पसरतात. सगळ्यात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकेच्या आतल्या भागात गोवराच्या विषाणूमुळे होतात. म्हणूनच गोवरमध्ये खोकला येतो आणि बऱ्याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. बालकाला आधीच क्षयरोग असेल तर गोवरमध्ये तो जोर धरतो, कुपोषणाची तीव्रता वाढते आणि मेंदूला सूजदेखील कधीकधी येऊ शकते.

निदान :
प्रामुख्याने हा लहान मुलांचा आजार आहे. शरीरात विषाणू प्रवेश झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी ही लक्षणे दिसतात. डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ते तीव्रताप, खोकला हा त्रास जाणवतो. या काळात मोहरीएवढे लालसर ठिपके तोंडात गालाच्या अंतर्भागावर दिसतात. हे ठिपके हीच प्रामुख्याने गोवरची आढळणारी खूण आहे. पण एक-दोन दिवसात हे ठिपके जातात, त्यामुळे रोग निदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही, परंतु ठिपके दिसल्यास मात्र गोवराचे निश्चित निदान होते. दोन ते चार दिवसातच ताप वाढत जातो. अंगावर पुरळ उठायला सुरुवात होते. पुरळ लालसर असतात. त्यात पू होत नाही. ताप यायला लागल्यापासून तीन ते सात दिवसात पुरळ दिसू लागतात. हे पुरळ चेहऱ्याकडून सुरू होऊन पायांकडे पसरतात. पायांवर पुरळ पोहोचेतो ताप उतरतो. खोकला मात्र त्यानंतरही काही दिवस असतो. पुरळ जाताना पुरळाच्या जागी पिवळसर ठिपका दिसतो आणि मग अस्पष्ट होतो. पुरळ सर्वसाधारणपणे कानाच्या मागे चेहरा, मान या क्रमाने छाती पोट यावर येतात आणि शेवटी हातापायावर पसरतात. पुरळ ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने वरून खाली नाहीसे होत जातात आणि काही दिवस त्यांच्या जागी खुणा राहतात. तोंडातील पुरळामुळे काही खाता येत नाही. भूक मंदावते. त्यानंतर ठिकठिकाणीच्या रसग्रंथी सुजतात, थोड्या दुखऱ्याही असतात. पोटातल्या रसग्रंथी सुजल्यामुळे काही मुलांना पोटात दुखते. टॉन्सिल्स, अडेनो ग्रंथी आणि पांथरी हे देखील रससंस्थेशी संबंधित असल्याने थोड्याफार सुजतात आणि दुखतात. खोकला देखील असतो.
पुरळ निघायला लागल्यानंतर सहा ते सात दिवसात मूल बरे होते. ताप उतरल्यानंतर पुन्हा येऊ लागल्यास किंवा पुरळ पायापर्यंत गेल्यावर देखील तापाचे शमन झाले नाही तर गोवरच्या दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दुष्परिणाम :
जिवाणू संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे न्यूमोनिया, कान दुखणे, सुजणे, फुटणे, क्षयरोग इत्यादींचा त्रास होऊ शकतो. मेंदूला वर उल्लेखल्याप्रमाणे सूज आल्यास मूल दगावू शकते. मुख्य दुष्परिणाम म्हणजे कुपोषण आणि न्यूमोनिया.

उपचार :
यात लक्षणांनुसार औषधे दिली जातात उदाहरणार्थ ताप आल्यास ताप कमी करण्यासाठी औषध दिले जाते. न्यूमोनिया झाल्यास त्यासंबंधीची औषधे चालू करून काळजी घ्यावी लागते. काही मुलांची भूक मंदावते. अशावेळी खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन खाण्यापिण्याअभावी येणारा अशक्तपणा टाळलेले कधीही चांगले.

प्रतिबंधक लस :
गोवर टाळण्यासाठीचे प्रभावी माध्यम म्हणजे त्यावरील प्रतिबंधक लस. ही लस खाजगी तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये देखील उपलब्ध असते. बाळाच्या शरीरात जन्मतः मातेकडून आलेली प्रतिकारशक्ती सहा महिन्यांपर्यंत असते. म्हणूनच ही लस त्या सहा महिन्यानंतर 9 ते 15 व्या महिन्यांपर्यंत बाळाला दिली जाते. लस टोचल्यानंतर काही मुलांना थोडा ताप किंवा पुरळ येतात, पण हे काही काळच टिकते. एक ते दोन दिवसांमध्ये हे कमी होऊन जाते. आता बाजारात एम एम आर नावाचे कॉम्बिनेशन असलेली लस उपलब्ध आहे. मिजल्स (गोवर), मम्पस (गालगुंड) अँड रूबेला (जर्मन गोवर) अशा तिन्ही आजारांविरुद्ध ही लस प्रभावी आहे.

सध्या मुंबई मध्ये गोवरची साथ मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा लेख देत आहे.
याचा असंख्य वाचकांना आणि पालकांना फायदा होईल, अशी आशा व्यक्त करते.

अधिक माहिती आणि उपचारांसाठी संपर्क -
डॉ. अनुजा डोके.
9561174891

MeaslesMeasles is a common and serious childhood exhanthematous illness. Nowadays, Mumbai is facing measles outbreak..  ...
16/11/2022

Measles

Measles is a common and serious childhood exhanthematous illness.

Nowadays, Mumbai is facing measles outbreak..

Let's see some important information regarding this viral infection - its causes, symptoms, treatment and of course, the preventive measures.

Measles is caused by an RNA virus belonging to paramyxovirus family. The virus is transmitted by droplet spread from the secretion of the nose and throat usually 4 days before and 5 days after the rash. The disease is highly contagious with secondary attack rates in susceptible household contacts exceeding 90%. The portal of entry is the respiratory tract where the virus multiplies in the respiratory epithelium.
The incubation period is around 10 days.

Features / Symptoms :
* The disease is most common in preschool children, infants are protected by transplacental antibodies, which generally decay by 9 months ( hence the rationale for vaccination at this age.)
* Fever, cold, runny nose, conjunctival congestion and dry hacking cough is there.
* KOPLIC SPOTS of measles appear on 2nd or 3rd day of the illness as gray/ white grains of sand like lesions with surrounding erythema opposite the lower second molars on the buccal mucosa.
* The rash usually appears on the fourth day with rise in fever as faint reddish macules behind the ears, along the hairline and on the posterior aspect of the cheeks.
* The rash rapidly spreads to the face, the neck, chest, arms, trunk, thighs and legs in that order over the next 2-3 days. It then starts fading in the same order that it appeared and leaves behind brownish discoloration, which fades over the next 10 days.
* Modified measles seen in partially immune individuals is a much milder and shorter illness. hemorrhagic measles is characterized by a purpuric rash and bleeding from the noses, mouth or bowel.

Diagnosis :
The diagnosis is clinical, may be confirmed by estimating the levels of IgM antimeasles antibody that is present 3 days after the rash and persists for 1 month.
* Measles needs to be differentiated from other childhood exhanthematous illnesses.
- The rash is milder and feverless prominent in rubella.
- In roseola infantum, the rash appears once fever disappears while in measles, the fever increases with the rash.
- In rickettsial fevers, the face is spared which is always involved in measles.

Complications :
Complications are very frequent in the very young, the malnourished and the immunocompromised.
The most common complications are ottitis media and bacterial bronchopneumonia.
Other respiratory complications include laryngitis, bronchitis, bronchiectasis and latent M. tuberculosis infection.
Gastrointestinal complications include persistent diarrhoea, appendicitis, hepatitis and ileocolitis.

Treatment :
* Treatment is mainly supportive and comprises antipyretics, maintenance of hygiene, ensuring adequate fluid and calorie intake, humidification etc.
* Vit. A reduces morbidity and mortality of measles and a single oral dose of 1,00,000 units below 1 year and 2,00,000 units over the age of 1 year is recommended.

Prevention :
One attack of measles generally confers lifelong immunity.
Measles vaccine is a live attenuated vaccine.
A heat sensitive vaccine, it's stored frozen and has a shelf life of 1 year at 4-8°c.
The vaccine should be used within 4 hours of reconstitution as the potency drops rapidly after reconstitution.
The vaccine is administered subcutaneously or intramuscularly over the anterolateral thigh or upper arm. An attenuated infection ensues and 10-20% of children may have mild fever and a macular rash 7-10 days after vaccination, the illness lasts 1-3 days.
Since maternal immunity may interfere with the immune response to the vaccine, it is administered in our country at 9 months.
In case of an outbreak, vaccine administration as early as 6 months of age may be carried out, with a repeat dose at 12-15 months as part of measles or MMR vaccine.

Kindly contact
Dr. Anuja Doke
9561174891

Address

Baner

411045

Opening Hours

Monday 09:00 - 22:00
Tuesday 09:00 - 22:00
Wednesday 09:00 - 22:00
Thursday 09:00 - 22:00
Friday 09:00 - 22:00
Saturday 09:00 - 18:00
Sunday 09:00 - 22:00

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Anuja's Health World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram