Rohini Marriage World

Rohini Marriage World Through Rohini Marriage World, we explore the various ways that would help one and all of us create a healthy family system and a healthy society.

13/05/2018
https://www.facebook.com/ROHINIJOSHIVADHUVARPUNE/photos/a.451303528396831.1073741828.365282536998931/762792543914593/?ty...
09/03/2018

https://www.facebook.com/ROHINIJOSHIVADHUVARPUNE/photos/a.451303528396831.1073741828.365282536998931/762792543914593/?type=3&theater

विवाहामुळे नवीन नाती निर्माण होतात, नाती जपली जातात. योग्य जोडीदारामुळे हे शक्य होते! त्याच्या निवडीसाठी विश्वासू माध्यम - 60 वर्षाची भक्कम साथ असलेली
तुमच्या अपेक्षा जाणून त्यानुसार तुमच्यासाठी समर्पक स्थळ सुचवणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारी विवाह संस्था म्हणजे फक्त ब्राह्मण उपवधू वरांसाठी www.brahmanvadhuvar.com
आपल्या सेवेत
9423866400
9096599981
.
#फक्तब्राह्मण #उच्चशिक्षित #जोशीवधूवरपुणे

18/02/2018

*फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित प्रथम वधूवर परीचय मेळावा*व्यवसायिक जोडीदार (ज्यांचे profession business आहे  .example- C.A ,a...
14/02/2018

*फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित प्रथम वधूवर परीचय मेळावा*

व्यवसायिक जोडीदार (ज्यांचे profession business आहे .example- C.A ,architects , advocate , hotel management , business owners , interior designers, doctor... etc ) हवा आहे.किंवा ज्यांना व्यवसायीक जोडीदार चालणार आहे ) अश्या मुला मुलींसाठी
*स्थळ* रोहिणी ऑफीस, टिळक स्मारक मंदिर समोर, टिळक रोड, पुणे
*दिनांक*25 फेब्रुवारी 18
*वेळ*सकाळी 10 तें 1
*वयोगट :*35 वर्षा पर्यंत

*विनापत्य घटस्फोटित मेळावा*
*मेळावा स्थळ :*रोहिणी ऑफीस, टिळक स्मारक मंदिर समोर, टिळक रोड, पुणे
*दिनांक* 25 फेब्रुवारी 18
*वेळ* दुपारी 2.30 ते 5
*वयोगट :* 35 वर्षा पर्यंत

*पूर्व नाव नोंदणी आवश्यक* मेळावा फी 500

*सम्पर्क*9423866400, 9130016760

05/08/2016

रे वधूपक्षा ...

( विषयाच्या आजूबाजूने सुरुवात करून फिरत फिरत मुद्द्यावर यावं , की सुरुवातीच्या ओळीतच थेट मुद्द्याला हात घालावा, या संभ्रमात आहे. मुद्दा मांडताना कोणाच्या जाणिवांबद्दल अनास्था दाखवल्यासारखे होईल का, याही विचारात आहे. )

तर, आजचा हा संवाद 'वधू'च्या कुटुंबाशी, तिच्या आईशी, बाबांशी, भावाशी, बहिणीशी किंवा जवळच्या मैत्रिणीशीसुद्धा.

प्रत्येक घरातल्या मुलीची साधारण अशी गोष्ट असते. शाळेपर्यंतचं शिक्षण झाल्यावर, स्वतःच्या आवडीने पुढचा मार्ग निवडल्यावर, करीअरमधले एक एक टप्पे ती गाठत राहते. तिची स्वतःची एक ओळख तयार होते. तिच्या असण्याला तिच्यापुरता एक अर्थ मिळत जातो.

यथावकाश साहजिकच तिचे 'सहजीवन' सुरु होते. ती एका वेगळ्या भूमिकेत शिरते. आता तिच्या परिघात काही नवीन चेहरे, नावं, नाती येतात. काही वेगळ्या अपेक्षा येतात. वेगळ्या अणू-रेणूंच्या बदलाने तिच्या अस्तित्वाची केमिस्ट्री बदलते. ती स्वेच्छेने तिचा अग्रक्रम बदलते, काही गोष्टी मागे ठेवते, काहींची गती कमी करते, लहानपणापासून अनुभवलेल्या, शिकलेल्या नीतिमूल्यांना धरून स्वतःच्या तत्वांशी तडजोड करते.
'आई' झाल्यावर ती आणखीन एका भूमिकेत विरघळून जाते.

तिच्या जवळच्यांनी- आई-बाबांनी हे सारं पहावं, अगदी साक्षी-भाव मनात ठेवून पहावं. पण तेव्हाही ( तिच्या निर्णय-क्षमतेचा अनादर होणार नाही, अशा रितीने) तिला ही जाणीव करून द्यावी की "हे फक्त एक लहानसं वळण आहे. इथे स्पीड थोडा आटोक्यात आणायचा मात्र, इथे रेंगाळायचं नाही. लवकर पुढे जायचंय.

परिस्थितीची गरज समजून तू घेतलेल्या निर्णयाचं आम्हाला कौतुक आहे, अभिमान आहे. पण तुझ्या कामातून तुला सापडलेली तुझी ओळख आम्ही तुझ्या डोळ्यात चमकताना पूर्वी पाहिलीये. आणि ती चमक तुझा अविभाज्य भाग आहे हे आम्हाला ठाऊक आहे.

तुझी एक स्वतंत्र वाट आहे. तुझा स्वतंत्र प्रवास आहे. एक मुलगी, एक पत्नी, एक आई ही सारी रुपं तुझा परीघ आहेत. पण तुझ्या केंद्रस्थानी 'तू' आहेस. 'तू'च असायला हवीस. तुझ्यात 'तू' उरली नाहीस तर ही सगळी नाती पोकळ असतील.
या सार्‍या नात्यांच्या सोबतीने वा सोबतीशिवाय, त्यांच्या मदतीने वा मदतीशिवाय तुझी वाट तू चालत रहा. स्वतःचं बोट सोडू नकोस. "

असे सुचवताना पारंपरिक विवाहाबद्दल भाष्य करण्याचा विचार नाही. स्त्रीवादी विचारांचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न तर अजिबात नाही.
मुद्दा एवढाच की एक माणूस म्हणून , स्वतंत्र विचार असलेली व्यक्ती म्हणून प्रत्येकाला / प्रत्येकीला 'स्व- अविष्काराची' ( self-actualization ) आंतरिक ओढ असते. कौटुंबिक गरजांप्रमाणे एखाद्या टप्प्यावर ही गरज बाजूला ठेवणे क्रमप्राप्त आणि योग्य आहे. पण या गरजेकडे दुर्लक्ष करण्याची सवय नकळत लागते आणि मग 'स्वतःशी ताटातूट झाल्याची' किंवा ' खूप काही मागे राहून गेल्याची' नकारात्मक भावना मनात दाटायला लागते.

काहीतरी निसटून जातंय याची योग्य वेळीच जाणीव करून देणारं कोणीतरी असावं लागतं. म्हणून प्रत्येकासाठीच हा छोटासा रिमाईंडर. तिच्या अस्तित्वाची जाणीव आणि तिच्या समाधानाची परिभाषा तिच्यापाशी कायम राहिली तर ती स्वतः एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व असेल आणि ही प्रसन्नता तिच्या परिघावरही पसरत राहील.

-- कल्याणी काणे

27/06/2016

---आपणही बदलायला हवं !---

परंपरा ! जी एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे विचारांचे फारसे निकष न लावता पाठवली जाते ती ? की ; जी बदलत्या काळाच्या बदलत्या गरजांनुसार प्रत्येक पिढीगणिक आपलं रूप बदलत पुढे जाते ती ?

बांधिलकी ! दोन व्यक्ती एकत्र येऊन एक प्रवास सुरु करतात आणि एकत्रच चाललं पाहिजे, दुसर्‍याचं वेगळं अस्तित्व रहाताच कामा नये असा अट्टाहास बाळगतात, ती बांधिलकी ? की दोन व्यक्ती एकत्र येऊन एक प्रवास सुरु करतात आणि एकत्रपण जपतानाही परस्परांतल्या स्व-भावाचा आदर आणि जपणूक करतात ती बांधिलकी ?

हे सगळं नुसतं शब्दांत मांडण्याइतकं वरवरचं न राहता याच्या खोलात जाऊन विचार व्हायला हवा. भूमिका बदलत आहेत, अपेक्षा बदलत आहेत, आपणही बदलायला हवं.

एक सशक्त आणि समृद्ध अशा समाजाचा पाया म्हणजे त्या समाजाचं अर्थकारण, शिक्षण आणि कुटुंबव्यवस्था. असं अर्थकारण जे त्यातल्या प्रत्येक घटकाला सक्षम करतं आणि स्वतः सशक्त होत रहातं. शिक्षण या शब्दांत कोर्सेस, अ‍ॅडमिशन, ग्रेड, सर्टिफिकेट, डिग्री, डिप्लोमा यापेक्षा अजून फार पुढचा अर्थ अपेक्षित आहे. शिक्षण- शिकणं, मिळत असलेल्या माहितीच्या ओघातून नेमकं ते वेचणं, त्यावर स्वतः विचार करण, स्वतःची तार्किक, भावनिक, सामाजिक बैठक पक्की करणं, त्यानुसार तारतम्याने वागणं, विविध कौशल्य आत्मसात करणं आणि व्यक्ती म्हणून विकसित होत रहाणं म्हणजे शिक्षण. आणि कुटुंबव्यव्स्था म्हणजे जिथे भावनांचं पोषण होतं, आदर, प्रेम काळजी, विश्वास यांची देवाणघेवाण होते, सुरक्षितता पुरविली जाते, आपलेपणाच्या भावनेने व्यक्ती जोडलेल्या असतात ते सशक्त कुटुंब. आणि अशा सशक्त कुटुंबाचा कणा असतो एक सशक्त लग्न !

उत्क्रांतीची पाने उलटी उलगडत गेलं तर असं लक्षात येतं की माणसाला स्थैर्य, सुरक्षितता आणि आपलेपणा हवासा वाटू लागल्यावर समाजव्यवस्थेचा उगम झाला. विविध इच्छा, आकांक्षा, राग, लोभ इत्यादी भावना आणि सत्ता, सत्तेसाठी संघर्ष अशा विविध बाबतीत माणसाचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण निर्माण होउ लागलं. विचारांच्या जोरावर माणूस गतिशील राहिला आणि पुढे आला. इतरही सजीवांमधे कमी- अधिक प्रमाणात संगती, कुटुंब तयार होणं हे घडत गेलंच. पण माणसाचं विश्व समृद्ध होत गेलं ते या तीन स्तरांवर झालेल्या प्रगतीमुळे - अर्थकारण, शिक्षण आणि कुटुंब-व्यवस्था.

काळ थांबला नाहीये, तो सरकतोय पुढे. माणसाची गती मंदावली नाहीये. तो वेगाने पुढे जातोय. कक्षा रुंदावत आहेत, भावविश्व बदलत आहेत, भूमिका बदलत आहेत, अपेक्षा बदलत आहेत. त्याच्या भावनिक गरजांचं पोषण जिथे होतं त्या कुटुंबाचं रूप बदलतंय. त्या रुपामधे हरवलेला परंपरेचा चेहरा हताशपणे शोधत बसण्यात अर्थ नाही; किंवा अतिपुरोगामी विचारांच्या अधीन होण्यातही अर्थ नाही. व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक गोष्टीत बदल होतोय. त्यावर विचार व्हायला हवा. प्रश्न पडायला हवेत. ते मांडायला हवेत.

ट्रान्झिशन, ट्रान्स्फॉर्मेशन, ट्रान्सेडन्स वगैरे शब्द फक्त ह्युमॅनिटी सायन्सेसच्या रिसर्च पेपरपुरते मर्यादित न राहता ते आपल्या रोजच्या जगण्यात मिसळायला हवेत. प्रवाह बदलत असेल तर भोवतालच्या परिस्थितीशी त्या प्रवाहाला थोडं झगडावं लागतं. थोडं परिस्थिती नमतं घेते, थोडं प्रवाह नमतं घेतो. मानवी जगणं समृद्ध करत असेल अशा मूल्यांना धरून हे बदल घडत असतील तर ते स्वीकारार्ह आहेत. किमान त्यावर सर्व भूमिकांमधून विचार नक्कीच व्हायला हवा. रुढींचा टणकपणा, कठोरपणा थोडा कमी केला आणि आवळून घेतलेल्या कक्षा डोळसपणे सैलावल्या तर या स्थित्यंतराकडे बघण्याची एक नवी दॄष्टी मिळू शकेल. विनाकारण काहीच नको. अकारण पेटून आंधळं बंडही नको. आणि पांगळी श्रद्धाही नको.

विवाहसंस्थेचं चित्र झूम इन करत करत दिसणार्‍या प्रत्येक पैलूपाशी थोडं थांबणार आहे. नाती जोपासण्यासाठी लागणारी कौशल्ये, पाश्चात्य गोष्टींचा प्रभाव, बांधिलकी, अनिश्चिततेची भिती, संवाद कौशल्य अशा वेगवेगळ्या विषयांवर डॉ. शिरिषा साठे यांच्याशी चर्चा करून ते मुदद्दे आपल्यासमोर मांडणार आहे व आपल्या मतांची वाट पाहणार आहे. कुटुंबसंस्थेकडे आणि पर्यायाने विवाहसंस्थेकडे नव्या विचाराने पाहण्याच्या प्रयत्नाला या लेखाने सुरुवात.

- कल्याणी काणे

Wonderful interaction with Dr. Shirisha Sathe...about relationships and their intricacies.....
30/05/2016

Wonderful interaction with Dr. Shirisha Sathe...about relationships and their intricacies.....

Hi all... As the society is going through a phase of rapid transition, it is time we explored various perspectives about...
22/05/2016

Hi all... As the society is going through a phase of rapid transition, it is time we explored various perspectives about the term 'Companionship'. Please do come to the interactive session and let us know how you look at the phase.

Healthy marriages make healthy families and healthy families make the society healthier.

Warmest,
Kalyani

21/05/2016

Hello,

Thank you for visiting Rohini Marriage world.
This page is created for interaction about the 'Marriage System' and various aspects of the Family System related to happy and healthy companionship. We will keep you informed about the articles being uploaded on the website through this page. we seek your feedback and inputs to keep this transaction on.

Please keep in touch for further updates.

Warmest,
Kalyani

Address

White House, Opp Tilak Smarak Auditorium, Tilak Road
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohini Marriage World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Rohini Marriage World:

Share