Satwa wellness and nutrition clinic

Satwa wellness and nutrition clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satwa wellness and nutrition clinic, Pune.

29/01/2023

Millets आहारतज्ञ यांच्या नजरेतून
अर्चना रायरीकर

ज्यावेळी आम्ही आहारतज्ञ म्हणून कॉलेज मध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळी जास्तीत जास्त लोक फक्त गहू आणि भात खात असत.
ज्वारी ,बाजरी आणि नाचणी ही जी भरडधान्य आहेत ही तेव्हा लोक फार कमी खात.
ही मी जवळजवळ 25 वर्षांपूर्वीची गोष्ट करते आहे त्यावेळी चपाती पोळी खाण्याचा ट्रेंड जास्त होता म्हणजे जास्तीत जास्त लोक चपातीचा आहारात समावेश करत.

आहार शास्त्राचा अभ्यास करतना असं लक्षात आलं की बाजरी ,ज्वारी ,नाचणी हे आपली पारंपारिक पदार्थ आहे इतकंच नव्हे तर या पदार्थांमध्ये तंतुमय पदार्थ, लोह, कॅल्शियम याचा जास्त भर आहे, इतकच नव्हे तर ह्याचा Glycemic इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातली शुगर वाढायला हे पदार्थ भातापेक्षा किंवा चपाती पेक्षा कमी वेळ लावतात आणि त्यामुळे हे पदार्थ घेणे जास्त उपयुक्त आहेत.
तरीही लोकांना कीतीही सांगितले तरी लोक पटकन भाकरी खायला तयार व्हायचे नाहीत.

भाकरी करता येत नाही
डब्यामध्ये भाकरी गार होते
चपाती खाल्ल्याशिवाय मला जमत नाही
अशा अनेक कारण लोक देत होते अजुनही देतात.

काही वर्षांमध्ये मात्र हा ट्रेंड बदलला हळूहळू हळू लोक झाली बाजरी, नाचणी कडे वळायला लागले.
मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार यांचे वाढलेले प्रमाण आणि जनतेमध्ये एकंदर आलेली जागरूकता यामुळे याचं प्रमाण वाढायला मदत झाली.
गेल्या वर्षातला ट्रेंड बघितला तर आता मात्र लोक बऱ्यापैकी ज्वारी ,बाजरी ,नाचणी खाऊ लागलेली आहेत. बरेचसे पेशंट आम्हाला आधीच सांगतात की आम्ही भाकरीच खातो कमीत कमी एक वेळा तरी आम्ही भाकरी खातो ती पण ज्वारी बाजरी नाचणी असे आम्हाला सांगतात.

माझ्या पेशंट चा एक अनुभव
Very nice diet given by Archana Rairikar to my mother. Her blood sugar level is under control now and her daily insulin intake reduced from 110 to 14. My father also eats Bhakri (Jawar, Bajra and Ragi mix roti) suggested by her to my mother as he finds it easy to digest.

हे झाल ज्वारी ,बाजरी आणि नाचणी बद्दल
पण सगळ्यांना हे उपयुक्त होईल असेही नाही.

ज्वारी मध्ये खूप जाती असतात .
यातल्या काही जाती अशा आहेत की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप आहेस तू आणि म्हणून ज्वारी खाल्ल्याने सुद्धा लोकांची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही
अशा वेळेस मग मी त्यांना एकतर ज्वारी बंद करायला सांगते किंवा मग ज्वारी, बाजरी ,नाचणी याचे पीठ एकत्र करून त्याचं भाकरी करायला सांगते.
ह्याच्या शिवाय जर आपण भाकरीच्या पिठात दोन चमचे सोयाबीनचे पीठ टाकलं तर त्याच्यातलं प्रोटीन वाढतं त्याचा अजून कमी होतो आणि शुगर जास्त कंट्रोल व्हायला मदत होते.
(सोयाबीन प्रक्रिया केलेले वापरावे ते कसे याची माहिती वेगळ्या लेखात देईन)

आता हळूहळू पॉझिटिव्ह मिनिट्स म्हणजेच सामा,सावा, कोडो, राळ आणि वऱ्याचे पॉलिश न केलेले तांदूळ या बद्दल जागरूकता वाढायला लागलेली आहे.
याचा glycemic index हा ज्वारी बाजरी नाचणी याच्या पेक्षाही अजून कमी असतो आणि त्यामुळे डायबिटीस कंट्रोल साठी याचा खूप जास्त उपयोग आपल्याला होऊ शकतो.
हळूहळू याच्याबद्दलची जागरूकता जनमानसात वाढू लागलेली आहे .
याच्याबद्दल आणि अशा अनेक पदार्थांबद्दल आपण माहिती करून घेऊ.

आता एवढेच लक्षात ठेवू यात की आपल्या धान्याची वर्गवारी आपण खालील प्रमाणे करायची आहे.

Negative food - तांदूळ आणि गहू -कारण यामध्ये ग्लायसीनिक इंडेक्स खूप जास्त आहे तसेच गव्हामध्ये glydine आहे जे बऱ्याच लोकांना पचत नाही तसेच गावामध्ये पेस्टिसाइड चे प्रमाण खूप जास्त असते.
जर आजारातन बरं व्हायचं आहे तर हे पदार्थ टाळावे.

Neutral food म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी -तुमची तब्येत उत्तम आहे तर तुम्हाला आरोग्यासाठी हे पदार्थ खूप चांगले आहेत. गरज असेल तर पुढची लेव्हल.

Positive millets-याच्यामध्ये सामा,सावा ,राळ, कोदो, आणि भगर यांचा समावेश होतो आणि याला पॉझिटिव मिलेट असं म्हटलं जातं कारण याचा आरोग्यावर होणारा परिणाम हा पॉझिटिव असतो

एक अनुभव

अर्चना रायरीकर त्यांच्या सल्ल्यानुसार जेवणात थोडे बदल केले जसे की पोळीच्या एवजी भाकरी (भाकरी पीठ मध्ये mix millet flour पण add केले ), सकाळी smoothy आणि millet rice, संध्याकाळी भूक लागली तर 1-2 seasonal फळे, रात्री परत भाकरी आणि millet खमीर. दोन्ही वेळा भरपूर भाज्या आणि salads आणि सकाळी sprouts. त्यामुळे मला खूप फायदा झाला. Energy level वाढली आणि sugar कमी झाली. सणासुदीच्या दिवसात थोडे गोड खाल्ले तरीही sugar control मधे असते. त्यामुळे गोड खाता ही येत आणि sugar च tension ही नाहीये. Weight is also under control. Thanks to Archana

आता मिलेटस चा उपयोग कसा होतो ते पुढे पाहू

अर्चना रायरीकर
Bsc, MSC in dietetics

 7588168204Only 199/-😌Do you need to get rid of belly fat?😌Do u feel bloated on stomach? Due to menopause or gases?😌Do y...
23/01/2023



7588168204

Only 199/-

😌Do you need to get rid of belly fat?

😌Do u feel bloated on stomach? Due to menopause or gases?

😌Do you find it difficult to reduce stomach fat inspite of regular excercises?

🎇🎇Here is a golden chance to understand,learn and join
Our Belly Fat Reduction Workshop 🎇🎇

🎊Adi's detox presents Belly Fat Reduction Workshop* on 24 th of January 2023

*Time :7:30 to 9 pm*
Fees: Rs. 199/- only

🎇 With Free 7 days belly fat challange 🎇

*Features include*

✅Diet to reduce belly fat
✅Natural fat burners DIY
✅Posters
✅Exercise tips
✅Breathing Techniques
✅Yogasanas
✅Many more techniques

Mode of instructions

✅Google meet or zoom
✅And Whatsapp

G pay: 7588168204 Dipti Ambekar / 99754 34568 Archana Rairikar

https://chat.whatsapp.com/EOuFLjSwVchBTSb8UGAMEp

05/10/2022

Detoxweek - what were some of the most common think people reported after joining the group for one week

*less craving for processed food*
*- bloating reduced or vanished*
*- *inflammation reduced, better skin and glowing face*
*pain gone*
*feeling much lighter*
*less brain fog, more clarity*
*enhanced vitality and strength stamina*
*weight loss*
*easier to take healthy choices*
*motivated to keep a healthy diet for self and family*
*skin issues improved*

On October we'll start into another Detoxweek -
Join us for enquiry

*नवरात्रीच्या तिसरा दिवस*  *अष्टमीच्या दिवस  रंग  निळा*  *निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी*  *झाड डोलते, हळू पान बोलते...
28/09/2022

*नवरात्रीच्या तिसरा दिवस*
*अष्टमीच्या दिवस रंग निळा*

*निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी*
*झाड डोलते, हळू पान बोलते*
*फांदीवरी कुहूकुहू गाणी*

असे हे निलमय जीवन

निळा रंग पंचमहाभूताच्या समुद्र आणि आकाश या तत्त्वापैकी आहे .निळ्या रंगाचा आणि वैद्यकीय क्षेत्राचा खूप जवळचा असा संबंध आहे.
बरेचदा हॉस्पिटलमध्ये नर्स, डॉक्टर, सर्जन यांचा युनिफॉर्म निळा असतो. हॉस्पिटलमध्ये काम करताना रक्त आणि इतर गोष्टींचा ज्यावेळी संबंध येतो त्यावेळी निळा रंग हा डोळ्यांना आणि मनाला शांत ठेवणारा व सुखावणारा असा आहे
शीतलता, स्निग्धता हि या रंगाची खासियत
आहे.निळा रंग निसर्गात अभावाने आढळतो .गोकर्ण याच्या फुलांचा चहा खूप सूंदर निळा असा होतो.पाणी गरम करून गॅस बंद करायचा,मग त्यात त्या फुलांच्या पाकळ्या टाकून 5 मिनींट झाकून ठेवायचे आणि मग तो चहा गाळून घ्यायचा.
यात फक्त सुंदर रंग नाही तर अँटी ऑक्सिडंटस आणि केरेटोनोइड्स आहेत. त्यामुळे चयापचय वाढते,लिव्हर चे कार्य सुधारते तसेच मूड देखील चांगला राहतो.

*निळा रंग पाण्याचा!*

रोज योग्य पाणी प्यायल्याने खूप फायदे होतात
रक्ताभिसरण सुधारणे, पचन आणि अभिशोषण चांगले होणे, कोठा साफ राहणे असे फायदे आहेत पण शरीराला व्यवस्थित पाणी मिळाले की खोटी भूक कमी होते. आणि वजन नियंत्रण राहते. तसेच युरिक ऍसिड आणि किडनी स्टोन चा त्रास होत नाही.

कृत्रिम निळा रंग सगळ्यात वाईट
मला येथे खास करून सांगायचे आहे की ते म्हणजे तयार सरबता विषयी !!
बाजारात रेडिमेड सरबत उपलब्ध असतात त्याचे दुष्यपरिणाम पण बघायला मिळतात जसे पोटात दुखणे, डोकेदुखी इत्यादी
तसे सगळेच कृत्रिम रंग हानिकारक त्यात निळा शरीराबाहेर पडायला जास्त वेळ लागू शकतो म्हणून तो जास्त हानिकारक!

त्या ऐवजी आपण नैसर्गिक रीत्या सरबताचा वापर करावा जसे की गोकर्ण चे सरबत इ सरबत घेतल्यावर आल्हाददायक वाटेल.
तसे निलमय ताजे स्वच्छ पाणी आपल्या दैनदिन आहाराचा भाग असू द्यावा.

अर्चना रायरीकर
श्रेया जाधव

Coming up
16/03/2021

Coming up

Detox Batch Coming Up

आहार, उपवास आणि आरोग्यसाबुदाणा भिजवला....शेंगदाणे भाजले......दही लावले.....बटाटे उकडले.....😁😁अरे इतकी तयारी तर दररोज पण ...
20/02/2020

आहार, उपवास आणि आरोग्य

साबुदाणा भिजवला....
शेंगदाणे भाजले......
दही लावले.....
बटाटे उकडले.....😁😁
अरे इतकी तयारी तर दररोज पण आपण करत नाही☺️
एकादशी आणि दुप्पट खाशी ही उपवासा बद्दलची म्हण अगदी तंतोतन्त पटणारी आहे. या दिवशी रोजच्या पेक्षा जास्त उष्मांक असलेले पदार्थ खाल्ले जातात.

*'महाशिवरात्रि'* च्या निमित्ताने घरोघरी उपवास केला जातो. काही लोक म्हणतात बाकी वरई शंकराला व्यर्ज असते पण आजच्या जमान्यात अशा प्रथा सगळेच पाळत नाहीत.
उपासाला काय खायचे काय नाही यात सुद्धा अनेक मतभेद दिसतात.
काही लोकांना उपवास आला की डाएट कसे करायचे याची काळजी वाटते तर काहींना पर्वणी😊
तसे असले तरी काटा आणि शुगर झूट ना बोले म्हणून साळसूदपणे परत आता मी काय खाऊ असे प्रश्न फोनवर येऊ लागतात.

फास्टिंग किंवा उपवास याला खरे तर खूप शात्रीय असा आधार आहे .सतत वर्षभर पचनशक्ती पोट यकृत इत्यादी काम करत असते त्याला काही ब्रेक देणे गरजेचे असते.
उपवासाने शरीराचे आणि पचनशक्ती चे नैसर्गिक पद्धतीने हिलींग होऊ शकते.म्हणजेच उपवास हे आजार किंवा रोग बरे करण्याचे एक प्रभावी माध्यम असू शकते.
जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला प्राण्यांचे निरीक्षण केले तर आपण बघतो की आजारी असले तर ते अन्न नाकारतात. बरे झाले की ते खाऊ लागतात.
खरा उपवास म्हणजे खर तर काहीही न खाणे ..
आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक हिप्पोक्रेटस म्हणतो की
औषध घेण्यापेक्षा एक दिवस उपवास करून पहा.म्हणजेच उपवास ही इज थेरपी म्हणून पण वापरली जाऊ शकते.
किटोजेनिक आहाराचे मूळ पण उपवासात आहे.
बायबल मध्ये एक चित्र आहे की एका मुलाला तोंडातून फेस येत असताना त्याचे वडील चिंतीत झाले आणि त्याला येशू कडे घेऊन गेले तेव्हा येशूने त्याला उपवास आणि प्रार्थना हे करायचा सल्ला दिला. हे वाचून पुढे कित्येक वर्षे उपवासाने फिट्स बऱ्या होतात म्हणून ही उपचार पद्धती वापरली जात असे.
1920 साली एक डॉक्टर ने 100 च्या वर मुलांच्या फिट्स उपवासाने बऱ्या केल्या आणि मेडिकल कॉन्फरन्स मध्ये त्याने त्याविषयी त्याचा प्रबंध सादर केला.

कडक उपवास केल्याने आपल्या शरीरात ग्लुकोज तयार होणे बंद होते आणि शरीर स्वतःचे फॅट्स वापरते त्यामुळे किटोन्स तयार होते आणि हे किटोन्स फिट्स थांबवतात.उपवासाला मर्यादा असल्याने आजकाल लोक उपवासाच्या ऐवजी किटोजेनिक डाएट करतात आणि त्यामुळे शरीरात किटोन्स तयार होऊन फिट्स कमी होतात, भूक कमी होते आणि वजन कमी होते.
आजकाल इंटरमीजीएट फास्टिंग सांगतात म्हणजे 16 तास खायचं नाही 8 तासच खायचं वैगेरे. त्यामुळे पण पोटाला थोडा आराम च मिळतो.
मुख्य म्हणजे किटो आणि intermediate fasting मध्ये इन्सुलिन कमी लागते त्यामुळे वजन कमी ग्लुकोज दोन्ही कमी होत असले तरी या गोष्टी अनेक दिवस आणि तज्ञ मंडळी म्हणजेच ट्रेण्ड आहार तज्ञांच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे. अन्यथा योग्य पोषण न मिळाल्याने पुढे त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात.

एक दिवस उपवास केला तर काहीही त्रास होत नाही.
आपल्याकडे उपवासाचा अर्थ साधना करणे आणि देवाचे नाव घेणे.नाम स्मरणात वेळ घालवणे. जेवणात वेळ न घालवणे आणि जेऊन सुस्ती न येऊ देणे.
उपासाचा खरा अर्थ म्हणजे पोटाला आराम देणे हा आहे. पण असे होतच नाही उलट अधिक खाल्ले जाते. आजार असणाऱ्या लोकांना आरोग्या च्या समस्या उद्भवतात.
उपवासाचे जवळ जवळ सगळे पदार्थ कार्बोदके किंवा पिष्टमय पदार्थ यात मोडतात.
उपासाच्या दिवशी पहिली आठवण येते ती म्हणजे साबुदाणा! जीवनसत्व , खनिजे , प्रथिन यांचा यात कणमात्र अंश नसतो. बाकीचे गोड पदार्थ , तळलेले पदार्थ यात तेल आणि साखरेचे प्रमाण खुप असते त्यामुळे उष्मांकात भरपूर भर पड़ते. उलट यात पौष्टिक असे काहीच नाही त्यामुळे वजन वाढण्यास हे कारणीभूत ठरतात. तसेच शेंगदाणे जास्त खाल्ले गेले तर पित्त ही होतेच होते.

पुढील बाबी लक्षात घ्या

१. उपवास करताना काहीच नाही खाल्ले तर अति उत्तम .यामुळे जठराला आराम मिळतो आणि पेशींचे पुनर्जीवन होते.
हे शक्य नसेल तर फळे किंवा फळांचा रस घेऊन उपवास करावा.त्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि फळे पचायला हलके असल्याने पचनशक्ती ला बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो.

2.मधुमेह,वयस्कर लोकांनी शक्यतो उपास टाळावेत. शिवाय गरोदर स्त्रियां , स्तनपान करणाऱ्या माता , लहान मुले,उच्च रक्तदाब किंवा कमी असणारे या लोकांनी उपवास तलाव
३. साबुदाणा, शेंगदाणे, तळलेले पदार्थ , बटाटे जास्त घेतले तर पित्ताचा त्रास होते
४.त्यातील पोषक पदार्थ म्हणजे फळे,ताक खजूर , राजगिरा , सुका- मेवा , सालासकट उकडलेली रताळी किंवा बटाटे असे पदार्थ खाऊ शकता शिवाय दूध दही पण घेऊ शकता. माफक प्रमाणात सुका मेवा पण चालतो.
राजगिरा भोपळा, काकडी, वऱ्याचे तांदूळ असे पदार्थ पण घेता येतात
काही लोक मखणा खातात तोही चांगला
शहाळ्याचे पाणी पण खूप चांगले.
५.पाणी भरपूर प्यावे म्हणजे खोटी भूक कमी होते आणि गरज वाटली तर फायबर सप्लिमेंट किंवा इसबगोल घ्यावे म्हणजे भूक कमी होते आणि पोटही साफ राहते
6.ताजी फळे भरपूर घ्यावी पण जेवताना किंवा दुधाबरोबर मिल्कशेक सारखी घेणे योग्य नाही
7.व्यायामाला सुट्टी नको नाहीतर खाल्लेले पचणार नाही आणि अजून त्रास होईल
8.अतिरिक्त चहा कॉफी चा मारा टाळावा.

रेसिपी टिप्स

लाल भोपळा किसून वाफेवर परतला आणि त्यात दाणे कोथिंबीर घालून ते लगेच तयार होते आणि अगदी कमी केलरीज

साबुदाणा वडा मिश्रण आप्पे पात्रात केले की न तळता कमी तेलात कुरकरीत तयार होतात

राजगिरा लाह्या दूध दही यातुन घेता येतील

थोडा पातळ दही करून त्यात काकडी , भोपळा रायता केला तर तो पोटभर खाता येतो.

दुपारी 12 पर्यंत फक्त फळे खाल्ली तर उत्तम

उपवासाची स्मूदी करताना almond milk, खजूर, केळे घालून एकत्र ब्लेंड करावे त्यात सब्जा सीड वरून हवे असले तर टाकावे.

शहाळ्याचे पाणी आणि त्यातील मलाई एकत्र ब्लेंड करून पण छान लागते

हे काहीही न पाळत एकादशी दुप्पट खाशी म्हणत उपवास करता येईल पण हा लेख आहार आणि आरोग्य याबाबतीत जागरूक असणाऱ्या लोकांसाठीच आहे हे जरूर लक्षात घ्यावे😀

Written by
Archana Rairikar
Shreya Jadhav
Neha sirsikar

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satwa wellness and nutrition clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram