Trivikram Yogic Kriyas & Healing Academy

Trivikram Yogic Kriyas & Healing Academy MAHARASHTRA NO. 1 Spirtual Education
ISO CERTIFIED ACADEMY

UDAYAM(MSME) GOVERNMENT REGISTERED

Vijay pawar (M.A.Bed)
ISO CERTIFIED CENTRE
UDYAM GOVERNMENT REGISTERED
ALL SPIRITUAL ,YOGA , OCCULT SCIENCE , RESEARCH
KRIYA YOG,

15 Years Experience in this field

हम वही सोच नई

आम्ही तेच विचार नवे

23/08/2025

नमस्कार सर

मी दिलीप मुळे
मी शांभवी क्रिया कोर्स केला त्याचा अनुभव
गेली 18 दिवस मी शांभवी चा कोर्स करत आहे, हा कोर्स सकाळी असतो पावणे पाच वाजता, त्यामुळे सकाळी लवकर उठायची सवय लागली, शांभवी क्रियामुळे दिवसभर एकदम फ्रेश वाटते
आळस येत नाही
एकाग्रता वाढली,
मनाचे अतिरिक्तविचार शांत झाले
आत्मविश्वास वाढला
निगेटिव्ह विचार कमी झाले
डोळ्याच्या विजन मध्ये सुधारणा झाली

सरांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

21/08/2025

शांभवी क्रिया खुपच पॉवरफुल

अविनाश पाटील
संभाजीनगर

हरी ओम 🙏 आत्ताच मी विजय पवार सरांकडे शांभवी चा क्लास केला त्याचे इतके अप्रतिम फायदे आणि अनुभव आले ते शब्दात सांगता येणार नाहीत तरी थोडे फार सांगतो, माझी एकाग्रता खूपच वाढली आणि ध्यान करण्यासाठी आधी खूपच वेळ लागत होता पण आता बसल्या बसल्या लगेच डोळे वर करून शांभवी लागते आणि क्षणार्धात ध्यान लागायला लागते, त्या सोबत पाठीतून वरच्या दिशेला एनर्जी प्रवाह जात असल्याचे जाणवते, दिवसभर खूप फ्रेश वाटते आणि निर्णय क्षमता वाढली, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते समजून जाते, असे खूपच सकारात्मक अनुभव रोज येत आहेत, विशेष म्हणजे मी त्रिविक्रम अकादमी मध्ये जाईन झाल्या पासून माझ्या जीवनात खूपच सकारात्मक बदल घडले आहेत, याचे सर्व श्रेय विजय पवार सरांचे आहे, त्यासाठी सरांचे कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏

थैंक यू ओ मच सर

21/08/2025

देवा, तुझे दर्शन झाले की, दृष्टी खिळून राहते. ती मागे वळतच नाही. हे पंढरीनाथा, माझ्या चित्ताने तुझ्या पायांना मिठी मारली आहे.

शांभवी क्रिया मुळे खूप दैवी अनुभव आलेत खरच खूप सुंदर कोर्स आहे

#तुझ्या

20/08/2025

मी प्रिया गायकवाड
शांभवी क्रिया कोर्समधे आलेला अनुभव

Sir, डोक्यावर बर्फ ठेऊन आम्हाला शिकवण्याची पद्धत मनाला खूप भावली. इतका अनुभव असून तसूभर ही गर्व नाही. मी पणा नाही. 15 दिवस तुमच्या सूचना, आवाजाची(बाळा) सवय झाली. आताही कधी बसले ध्यानाला की वाटते सर बघतात. चुकलं की आवाज देतायत.

दिवसभर sir खूप फ्रेश वाटत. Energy वाढलीय. Positivity वाढलीय. थकवा दूर झालाय.

तुमचं मार्गदर्शन मला लवकर लाभले या करिता मी देवाचे आभारी आहे.

सर मला aakashik पण करायचंय. पण पैशाच्या अभावी थोड लांबवलंय. पण नक्की करेन.

🙏🏻 धन्यवाद sir. तुमचा आशिर्वाद असाच राहुदेत.
Trivikram yogik Kriyas &Healing Academy
096650 70296

थैंक ऊ
प्रिया गायकवाड

19/08/2025

नमस्कार विजय सर,
शांभवी क्रिया अनुभव
शांभवी क्रियेचा कोर्स तुमच्याकडून शिकताना मला एक विलक्षण अनुभव मिळाला. तुम्ही समजावून सांगण्याची पद्धत, प्रत्येक टप्प्यावर दिलेली मार्गदर्शनाची स्पष्टता आणि साधेपणा मनाला खूप भावला.

या साधनेतून मला आतून एक वेगळी शांती, स्थिरता आणि ऊर्जा जाणवली. मन शांत झाल्यासारखं वाटलं आणि सकारात्मकतेचा प्रवाह अनुभवायला मिळाला. तुमच्या मार्गदर्शनामुळे मला ही क्रिया नीट समजली आणि आता ही साधना माझ्या

आध्यात्मिक प्रवासात मोठा आधार ठरेल, याची खात्री वाटते.

तुमच्या वेळेसाठी, संयमासाठी आणि दिलेल्या शिकवणीसाठी मी मनापासून आभारी आहे. तुमचे मार्गदर्शन नेहमी असेच मिळत राहो, हीच प्रार्थना🙏🙏

कृष्णा कांबळी
मुंबई

11/06/2025
https://youtu.be/xufBCQHCYTA?si=-EgXGgqLKtnPWLfZ
11/04/2025

https://youtu.be/xufBCQHCYTA?si=-EgXGgqLKtnPWLfZ

🎙️ TAP Podcast प्रस्तुत – रेकी आणि त्यामागील सत्य! विजय पवार यांच्यासोबत विशेष चर्चा रेकी म्हणजे नक्की काय? हे एक उर्जात्...

05/04/2025

।। Hari Om ।।
पैसे अडकलेत समोरची व्यक्ती टाळतीय ? . ...
हे करा .अनुभवसिद्ध उपाय नो १)
एक प्रचंड प्रभावशाली आणि उपाय आहे की, ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत. उधार पैसे घेतले पण तो परत करत नाहीये त्याला परत करणारे हे उपाय आहेत. हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करेल. तुमचे पैसे परत करण्याचा निश्चय करेल. जर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन-तीन दिवसात तुमचा पैसा तुमच्याकडे परत येईल. तेव्हा ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीकडे पैसे येतील ते पैसे परत करील.

हे उपाय करताना तो विश्वासाने, श्रद्धेने करावा हा उपाय आपण शुक्रवारी करायचा आहे. माता लक्ष्मीचा वार आहे. शुक्रवारच्या दिवशी आपण कापरापासून काजळ तयार करायचे आहे. वाटीमध्ये किंवा कोणत्याही पात्रात भरपूर कापूर घ्या. 10 ते 12 वड्या घ्या. तो जाळल्या नंतर त्यातुन धूर बाहेर पडतो यावरती एक छोटीशी वाटी धरा व काजळी गोळा करा. या पात्रामध्ये तर त्या ठिकाणी काळसर अशा प्रकारचं काजळी त्या ठिकाणी जमा होईल आणि जमा झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकायचे, त्याला बाजारात सरसो का तेल असंही म्हणतात. तर मोहरीचे तेल घेऊन आपण त्यात थोडे . दोन-तीन थेंब तरी गाईचे तूप टाकावे.
मग त्यानंतर त्या ठिकाणी काजळ तयार होईल. या काजळाचा वापर करून आपण भुजपत्रावर जर ते नसेल तर अगदी साधा कोरा कागद ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा प्रकारचा कोरा कागद त्यावरती आपण आपल्या शत्रूंच म्हणजे ज्यांच्याकडे पैसे अडकले त्याचे नाव लिहायचय. फक्त पहिलं नाव संपूर्ण नाव लिहण्याची आवश्यकता नाही. तुमची इच्छा असेल तर पूर्ण नाव लिहिलं आणि तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्ती बद्दल तुम्ही विचार करत आहात तेव्हा त्या व्यक्तीविषयी हा टोटका लागू पडतो. ज्याने उधार पैसे घेतले आहेत. त्याचे सात वेळा नाव घ्या. त्याच्या नावावर थाप मारा. त्यानंतर हा जो कागद आहे तो कागद आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. जर एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत अडकले असतील तरी असेच करावे

कोणतेही कोपऱ्यामध्ये तिजोरीत, तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा.त्या ठिकाणी त्यावरती काही ना काही तरी जड वस्तू ठेवायची. अशी व्यक्ती आपले उधार पैसे देईल. त्यामुळे उधार घेणाऱ्या व्यक्तीचे मन परिवर्तन होईल आणि तो आपले पैसे परत देतो, असा हा उपाय करा.
उपाय २
कार्तवीर्य द्वादशनामस्तोत्रम् ॥
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान् ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ १॥
कार्तवीर्यः खलद्वेषी कृतवीर्यसुतो बली । सहस्रबाहुः शत्रुघ्नो रक्तवासा धनुर्धरः ॥ २॥
रक्तगन्धो रक्तमाल्यो राजा स्मर्तुरभीष्टदः ।
द्वादशैतानि नामानि कार्तवीर्यस्य यः पठेत् ॥ ३॥
सम्पदस्तत्र जायन्ते जनस्तत्र वशं गतः ।
आनयत्याशु दूरस्थं क्षेमलाभयुतं प्रियम् ॥ ४॥
सहस्रबाहुसशरं महितं सचापं रक्ताम्बरं रक्तकिरीटकुण्डलम् ।
चोरादि-दुष्टभय-नाशं इष्टदं तं ध्यायेत् महाबल-विजृम्भित-कार्तवीर्यम् ॥ ५॥
यस्य स्मरणमात्रेण सर्वदुःखक्षयो भवेत् । यन्नामानि᳚महावीर्यश्चार्जुनः कृतवीर्यवान्᳚ ॥ ६॥
हैहयाधिपतेः स्तोत्रं सहस्रावृत्तिकारितम् ।
वाञ्चितार्थप्रदं नृणां स्वराज्यं सुकृतं यदि ॥ ७॥ ॥
इति कार्तवीर्य द्वादशनाम स्तोत्रम् ॥

पैसे अडकले असतील तर
कोणी पैसे द्यायला टाळाटाळ करत असेल तर हा जप अडकलेल्या पैसे अनुसार /११ वेळा रोज करणे ..तुम्हाला हे स्तोत्र रोज म्हणण्यास सुरवात करा .

Trivikram Yogik Kriyas Healing Academy

https://wa.me/c/919665070296

   #रेकी  #ऊर्जा  #वैश्विकऊर्जा  #हिलींग    #डिस्टन्स_रेकी  काही दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचलं , त्यात लेखकाने आतंकवादी र...
02/04/2025

#रेकी #ऊर्जा #वैश्विकऊर्जा #हिलींग #डिस्टन्स_रेकी
काही दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचलं , त्यात लेखकाने आतंकवादी रेकी करतात अश्या आशयाच्या बातम्या येतात त्याचं खंडन असं केलं की 'आतंकवादी , गुन्हेगार रेकीचा दुरुपयोग करतात त्याला आपण काही करू शकत नाही.' इथेच त्या रेकी तज्ञांची विदवत्ता कळली. मलाही अनेकदा अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे की बातम्यां मध्ये जे सांगतात की अमुक अमुक आतांकवाद्याने त्या जागेची आधी रेकी केली होती. तर ती रेकी आणि तुम्ही शिकवता ती रेकी एकच आहे का??
मुळात गुन्हेगार जी रेकी करतात त्याला टेहाळणी , त्या जागेवर किंवा व्यक्तीवर सतत पहारा ठेवून , पाठलाग करून त्याच्यावर नजर ठेवणे हा प्रकार असतो म्हणजे त्यांना त्या व्यक्तीची/जागेची पूर्वकल्पना घेणे नंतर त्याचा घातपात घडवून आणणे.
तर गुन्हेगार जे करतात ती रेकी आणि मी ज्या रेकी बद्दल बोलणार आहे त्या रेकीचा कोणताही संबंध नाही. रेकीचा गैरवापर जवळपास अशक्य आहे.
#रेकी_म्हणजे_काय?
रेकी म्हणजे ‘वैश्विक ऊर्जा’ तीच ऊर्जा जी सर्वत्र विराजमान आहे. जी ह्या सृष्टीचं संतुलन आणि पालन करीत आहे. पुरातन काळात अनेक ऋषी मुनी संवादाने, दृष्टीने , स्पर्शाने कधीकधी त्या व्यक्तीचं समरण करून सुद्धा त्याला व्याधीमुक्त , विकारमुक्त करायचे. आपल्या भारतभूमीत ही विद्या जवळपास सर्वांना आधीपासून अवगत होती. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे?? तर त्याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपण ‘दृष्ट’ काढतो तो प्रकार सुद्धा रेकीचाच आहे. एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून प्रार्थना करणे , चांगलं चिंतन करणे हा सुद्धा रेकीचा च प्रकार आहे.
#रेकीचा_उगम
ही दैवी शक्ती आहे ती स्वयंसिद्धा आहे. ती त्या परमेश्वराची शक्ती आहे. तिचा उगम शोधणे म्हणजे समुद्रात फेकलेली टाचणी शोधणे होय. पण तरीही लोकांना नाव लागतंच म्हणून हा उहापोह. ही विद्या सर्वत्र पसरलेली होती मात्र जापान मधील एका व्यक्तीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की नेमकी जगातील सर्व महान लोकांच्या कडे असं कोणतं सामर्थ्य होतं की जेणेकरून ते लोकांची दुःख , व्याधी साधा स्पर्श करून , लोकांकडे बघून दूर करायचेत. भगवान गौतम बुध्द , महावीर , जिझस , भारतात तर असंख्य ऋषी होऊन गेले जे अश्या विद्येत निपुण होते. ही उत्सुकता निर्माण झालेली व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून 'डॉ मिकाऊ उसुई' होते . जग ह्यांनाच रेकीचा शोधकरता मानतो.
डॉ मिकाऊ उसुईना जापान मधील अनेक भिक्खुंना भेटले पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. एका मठाच्या अधिपतींनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारतात जाऊन ‘अथर्ववेदाचा’ अभ्यास करा. ,ते भारतात आले. अथर्ववेदाचा अभ्यास मकेला. अथर्ववेद म्हणजे अश्या असंख्य विद्यांचा समुद्र आहे. काही ऋषीमुनीचं मार्गदर्शन घेतलं. काहींच्या मते ते हिमालयात सुद्धा गेले. तेथे त्यांना अनेक ज्ञात अज्ञात ऋषी मुनी भेटले.
भारतात असे असंख्य ऋषी मुनी साधू संत होऊन गेले ज्यांच्याकडे ही ऊर्जा सहज होती. त्यातील काहीं नावं म्हणजे संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत एकनाथ , साईबाबा. ह्या सर्वांनी जे काही चमत्कार केले ते त्या वैश्विक ऊर्जेच्या बळावरच.
उदाहरण देतो त्यात बरंच काही कळेल. संत ज्ञानेश्वरांनी एकदा एका रेड्यावर वर हात ठेवला आणि तो रेडा वेद बोलायला लागला , जड भिंत चालवणे , पाठीवर मुक्ताबाई ला मांडे भाजायला लावणे. थोडक्यात रेकी ही सुद्धा योग विद्याच आहे. त्यासाठी मात्र तुमचं मन सकारात्मक , करुणेने भरलेलं आणि साधनेची तयारी असलेलं असावं लागतं.
डॉ मिकाऊ उसुई भारतातुन परत पायदेशी गेले. आणि ते एका जंगलात जाऊन 21 दिवस एकांतात राहिले. त्या काळात ते निराहर राहिले. परंतु त्यांना साधारण 15 दिवसांनी सुद्धा काहीच जाणीव झाली नाही म्हणून थोडे निराश झाले. आणखी 2 3 दिवस गेल्यावर त्यांना वाटायला लागलं की जावं निघून माघारी. पण 3 दिवसांसाठी का बरं साधना भंग करावी ? म्हणून ते 21 दिवस पूर्ण होईपर्यंत थांबले. तरीही काहीच जाणीव झाली नाही. जंगलातून बाहेर पडताना त्यांना भूक लागली होती. म्हणून का खेडेगावात एका घरी त्यांनी ‘जेवायला काही मिळेल का?’ अशी विचारणा केली. त्याकाळी कुणीही जेवायला मागितलं तर सहज द्यायचे. त्या गृहिणीने सांगितलं बसा थोडावेळ मी काहीतरी शिजवून देते. ती स्त्री घरात निघून गेली. डॉ मिकाऊ उसुई अंगणात बसलेले होते. त्यावेळी त्या घरातील लहानगी अंगणात खेळत होती. तिच्या पायाला ठेच लागली. ती रडायला लागली. डॉ मिकाऊ उसुईंनी तिला विचारलं ‘काय झालं?’ तिने रडत रडत पायाच्या अंगठयाकडे बोट दाखवलं. रक्त येत होतं आणि तिला वेदना सुद्धा होत होत्या. डॉ मिकाऊ उसुईंनी तिच्या त्या अंगठ्याला स्पर्श केला, तत्क्षणी तिच्या अंगठयातील रक्त येणं थांबलं आणि वेदना सुद्धा थांबल्या.
ती रडायची थांबली आणि म्हणाली , ‘तुम्ही हात लावता बरोबर रक्त येणं थांबलं आणि दुखणं सुद्धा’ त्यावेळी डॉ मिकाऊ उसुईंच्या लक्षात आलं की आपल्या नकळत निसर्गाने आपल्या पदरी किती मोठं दान टाकलं.
असाच अनुभव जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सुद्धा आहे. गाथा इंद्रायणीच्या डोहात सोडल्या नंतर त्यांनी अन्नत्याग केला होता. कितीतरी दिवस ते तसेच इंद्रायणीच्या काठी बसलेले होते. रामेश्वरसशास्त्रीच्या अंगाची लाही लाही होत होती , त्यांना इंद्रायणीच्या काठावर स्नानासाठी आणलेलं असताना संत तुकोबारायांनी फक्त करुणामय हृदयाने मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्यांच्या अंगावरून हात फिरवला. आणि रामेश्वर शास्त्री ठणठणीत झाले. नंतर रामेश्वर शास्त्रींनी तुकोबांना गुरू केलं.
थोडक्यात ही विद्या सनातन आहे. सनातन म्हणजे ना आदी आहे ना अंत. ती फक्त वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट होत राहते.
डॉ मिकाऊ उसुई आणि त्यांच्या शिष्यांनी रेकीचा जगभर प्रचार आणि प्रसार केला. ही विद्या भारतात सुद्धा आली. गुरू शिष्य ह्या परंपरे नुसार ही विद्या शिकविली जाते. ह्यालाच पूर्वी आणि आजही दीक्षा देणे म्हणतात.
#रेकी_लेव्हल
डॉ मिकाऊ उसुई आणि त्यांच्या नंतरच्या अनेक चांगल्या साधकांनी रेकीच्या लेव्हल शोधल्या.
#फर्स्ट_लेव्हल
ही लेव्हल खरं तर फक्त स्वतःसाठी आहे. ह्या पहिल्या लेव्हल ला स्पर्शचिकित्सा सुद्धा म्हणू शकता.
ही लेव्हल म्हणजे रेकी मधील abcd आहे. ह्याची 21 दिवस रोज न चुकता साधना करावी लागते.
ह्यात मनातील नकारात्मक भाव दूर करणे.
सतत सकारात्मक विचार करणे।
आसनसिद्धी.
उर्जेशी एकरूपता.
शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकणे आणि शरीर शुद्ध करणे
इत्यादी गोष्टी शिकता येतात.
ह्या लेव्हल मध्ये इतरांना रेकी देता येते , मात्र मर्यादा आहेत. इतरांना रेकी देताना स्वतःला सुरक्षा द्यावी लागते , ती ह्या लेव्हल मध्ये स्वतःला घेता येत नाही. सुरक्षा तुमच्या रेकी मास्टर कडून अथवा परिचता कडून घ्यावी लागते. तसेच ज्या व्यक्तीला रेकी द्यायची आहे ती व्यक्ती समोर असावी लागते. स्पर्श करून रेकी द्यावी लागते.
#सेकंड_लेव्हल #डिस्टन्स_लेव्हल
ही लेव्हल फर्स्ट पेक्षा खुप सहज आहे. परंतु ही लेव्हल शिकायला फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेली अनिवार्य आहे.
ह्या लेव्हल मध्ये सिम्बल (चिन्ह) शिकवली जातात. ह्या लेव्हल ची सुद्धा 21 दिवसांची साधना पूर्ण करावी लागते.
स्वतःला तसेच इतरांना रेकी देता येते.
व्यक्ती , वस्तू समोर नसली तरी चालते.
स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. ह्यालाच डिस्टन्स लेव्हल म्हणतात.
स्वतःला सुरक्षा घेणे , परिवाराला देणे , आपल्यावर जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींना सुरक्षा देणे.
तुमच्या ध्येयप्राप्तीला रेकी देऊशकता. असेच अनेक फायदे आहेत.
ह्या दोन लेव्हल कमीत कमी शिकाव्या. ह्यापुढील लेव्हल मात्र प्रोफेशनल लेव्हलला जायचं असेल तरच शिकाव्यात.
#थर्ड_लेव्हल , #सायकीक_सर्जरी. ह्या लेव्हल्स ला #मास्टर_हिलर म्हणतात.
काहींनी रेकीचे अनेक रूप शोधून काढलीत. त्यात नारायण रेकी , करुणा रेकी इत्यादी आहेत. अनेकांनी अनेक सिम्बल्स शोधून काढलेत. ती सुद्धा ह्यापुढील लेव्हल मध्ये शिकवली जातात.
#रेकी_मास्टर ही फोर्थ लेव्हल असून तुम्ही ह्या लेव्हल नन्तर इतरांना दीक्षा देऊ शकता. अर्थात पहिल्या तीन लेव्हल साठी.
#रेकी_ग्रँड_मास्टर ही पाचवी लेव्हल असून ह्या लेव्हल मध्ये तुम्ही इतरांना पाचही लेव्हलची दीक्षा देऊ शकता.
#रेकीची_फायदे
रेकीने तुम्ही स्वतःला उर्जावान ठेवू शकता.
आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी.
इतरांना ऊर्जा देता येते.
स्वतःचे व इतरांचे आजार बरे करण्यास मदत करू शकता.
रेकी आयुष्य वाढवत नाही मात्र आयुष्यात उत्तम जीवन जगण्यास नक्कीच मदत करते.
तुमचे ध्येय , तुमच्या इच्छा पूर्ती होण्यासाठी रेकी देऊ शकता.
कधी कोणतं संकट आलं तर त्यातून मार्ग सुचण्यासाठी रेकी देऊ शकता.
अगदी ट्रॅफिक लागलं तर रेकी द्या , तुमचा मार्ग नक्कीच मोकळा होईल.
घरात मुलं अभ्यास करत नसतील त्यांना द्या.
कुणी आजारी असेल त्या व्यक्तीला द्या.
कुठे अपघात झाला तर त्या अपघात ग्रस्त व्यक्तीला द्या , मोठा अपघात असेल तर त्या संकटात मदत करणाऱ्या लोकांना सुद्धा रेकी द्या.
#रेकीचे_नियम
रेकी शिकताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागतात , त्यातील काही नियम शिकताना सांगितली जातात. काही नियम हे इथेही सांगता येतात.
रेकी काहीतरी मोबदला घेऊन द्यावी. तो आपापला ठरवावा.
रेकी परवानगी घेऊन द्यावी.
मुकप्राण्यांना रेकी देताना अनुमती आणि मोबदल्याशिवाय द्यावी.
कुणाच्या विषयी द्वेषभावना , पूर्वग्रह मनात न ठेवता रेकी द्यावी.
रेकीचा गैरवापर जवळपास अशक्य आहे. त्यामुळे तो विचार मनात असेल तर त्यागावा.
रेकी ही कल्याणकारी , गुणकारी आणि करुणामय ऊर्जा आहे. तिचा सदुपयोग करून जीवन नितांत सुंदर करता येतं.
#रेकी_मास्टर , #पास्टलाईफ_रिग्रेटर , #मेडिटेशन_मास्टर #स्पिरिच्युअल_हिलर

रेकी हीलिंग ही एक अशी पद्धती आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील बहुतेक सर्वच समस्या संपुष्टात येणार आहेत. रेकी हिलिंग हे ना...
22/03/2025

रेकी हीलिंग ही एक अशी पद्धती आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील बहुतेक सर्वच समस्या संपुष्टात येणार आहेत. रेकी हिलिंग हे नाव आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकले असेल पण त्याबद्दल अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही. रेकी हीलिंग म्हणजे काय? हीलिंग चे फायदे काय काय होतात? शारीरिक आणि मानसिक समस्या यावर रेकी हीलिंग कितपत काम करते? रेकी हीलिंग कोणाला सर्वात जास्त फायदेशीर आहे? रेकी हीलिंगचे काही तोटे आहेत का? रेकी हीलिंग कसे शिकता येईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला हवी असतात. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.

✅ What is Reiki Healing & How Does It Work?
✅ Benefits of Reiki for Mind, Body & Soul
✅ Energy Healing benifits
✅ How Reiki Can Help in Daily Life
✅ Myths & Facts About Reiki Therapy
✅ Live Reiki Demonstration & Practical Tips

If you're curious about Reiki or looking for ways to enhance your spiritual and emotional health #फुल 🔮✨ 💫 💫💜🧘‍♀️🙏🕉 💫💜🧘🏾‍♀️ 👣 🙏🏼

20/03/2025

रेकी ने कोणते आजार व कोणत्या negative energies दूर करू शकतो हे पाहू.

#& Healing Academy

#

07/03/2025

#रेकी शिकणे का फायदेशीर आहे
अनेक प्रोब्लेम सुटू शकतात???

🔮✨ #
🔮✨ #फुल
+919665070296

Address

Phaltan
Satara
415523

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trivikram Yogic Kriyas & Healing Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Trivikram Yogic Kriyas & Healing Academy:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram