VedVipra HealthClinic & Fertility Center

VedVipra HealthClinic & Fertility Center WELCOME TO VEDVIPRA HEALTH CLINIC FERTILITY CENTER, KHARGHAR NAVI MUMBAI / SATARA, (MAH); INDIA.

31/07/2025

*आयुर्वेदिक पंचकर्म याबद्दल माहितीपर लेख*

*पंचकर्म – व्याधिप्रतिबंधात्मक व व्याधीनिवारणार्थ*

मुळात व्याधी होऊ नये यासाठी (Preventive )आणि आजार झालाच तर झालेला आजार कमी करण्यासाठी(Curative )आयुर्वेदिक पंचकर्म उपचार पद्धती

(Panchkarma For ” Prevention” of Diseases and
to “Treat” Diseases )

रुग्णांचा नेहमी एक प्रश्न असतो , पंचकर्म म्हणजे काय ? मग मसाज म्हणजे पंचकर्म का ? शिरोधारा म्हणजे पंचकर्म का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात .
जाणून घेऊ यात पंचकर्म विषयी

पंचकर्म म्हणजे सोप्या भाषेत शरीरशुद्धी साठी केले जाणारे पाच प्रकारची चिकित्सा उपक्रम
१) वमन
२) विरेचन
३) बस्ती
४) रक्तमोक्षण
5) नस्य

या पाच चिकित्सा उपक्रमांनाच पंचकर्म म्हणणे अपेक्षित आहे बाकी इतर जे उपक्रम आहेत म्हणजे शिरोधारा , स्थानिक बस्ती उदा. जानुबस्ती , मन्याबस्ती आदींचा समावेश पूरक पंचकर्म उपचारांमध्ये होतो .

पंचकर्म उपचारांसाठी प्रथमतः आमपाचन करणे आवश्यक आहे . त्यांनतर कर्म करण्याआधी स्नेहन स्वेदन हे पूर्वकर्म करावे व त्यानंतर च बस्ती आदी कर्म करावे . दोषस्तिथी व व्याधीनुसार योग्य ते पंचकर्म व नंतर पश्चात धूम, गंडूष, संसर्जनक्रम अशी कर्मे केली जातात .
पंचकर्म म्हणजे शोधन उपचार .
आता प्रश्न असा पडतो कि हे का करायचे ?
मग कुठलाही व्याधी नसताना पंचकर्म घेता येते का ?

पंचकर्माचे प्रयोजन

१) निरोगी व्यक्तिंमध्ये

निरोगी व्यक्तींनी शरीरशुद्धी म्हणजे DETOXIFICATION साठी ऋतू नुसार पंचकर्म हे अवश्य घ्यावे .
आजकाल सिडेंटरी लाइफस्टाइल यामुळे मेटाबोलिक डिसऑर्डर्स वाढत चालले आहेत .
स्थूलता , कमी वयात मधुमेह , रक्तदाब यांसारखे व्याधी यामुळेच वाढत आहेत . हे टाळण्यासाठी शरीरशुद्धी होणे अत्यावश्यक आहे . यासाठी ऋतूनुसार जे पंचकर्म सांगितले आहे ते आवर्जून घ्यावे .
वसंत ,शरद,वर्षा या ३ ऋतूंमध्ये अनुक्रमे वात , पित्त , कफ या दोषांचा प्रकोप होतो त्यामुळे या काळात त्या त्या दोषांचे शोधन करावे . वसंतात वमन , शरद ऋतूमध्ये विरेचन , रक्तमोक्षण व वर्षा ऋतूमध्ये बस्ती आदी पंचकर्म उपचार तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने नाडी परीक्षणांनंतर सुरु करावेत .

२) रसायन – वाजीकरण

रसायन चिकित्सा याचा अर्थ रस , रक्त इत्यादी सर्व सप्तधातू प्राकृत करून आयुष्य वर्धन करणारी चिकित्सा . वाजीकरण – शुक्रधातू प्राकृत करून आयुष्य वर्धन करणारी चिकित्सा .
या दोन्ही चिकित्सा सुरु करण्याआधी शरीरात वाढलेले दोष , मल इत्यादी पंचकर्म चिकित्सेने शरीराबाहेर काढून टाकणे अत्यावश्यक आहे .
INFERTILITY वंध्यत्व यावर चिकित्सा करत असताना तसेच स्त्री व पुरुष बीजशुध्दी साठी पंचकर्माच्या या प्रयोजनाचा आश्चर्यकारक अनुभव येतो . म्हणूनच PRECONCEPTION शोधन चिकित्सा , गर्भधारणा होण्याआधी स्त्री व पुरुष दोघांनी अवश्य घ्यावी .

३) व्याधीनुसार

विविध व्याधींमध्ये औषधी चिकित्सेसोबत पंचकर्म केले तर उत्तम परिणाम दिसून येतात . उदा. मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी,हाडांची झीज,वाताचे आजार यामध्ये बस्ती या पंचकर्माचा चांगला उपयोग होतो.बस्ती सारखे पंचकर्मातील कर्म तर वरदान आहे , यामुळेच बस्ती ला अर्धचिकित्सा म्हंटले आहे.
दमा, तमकश्वास च्या रुग्णांमध्ये वमन केले असता ASTHMA ATTACKS कमी होतात . रुग्णाला आराम पडतो .
PSORIASIS, रक्तदुष्टी, पिंपल्स,पित्ताचे त्रास असल्यास विरेचन , रक्तमोक्षण याचे खूप छान रिझल्ट्स येतात .
मायग्रेन , शिरोरोग, केसगळती , अकाली केस पांढरे होणे , दमा , वारंवार होणारी जुनाट सर्दी , इत्यादी व्याधींवर नस्य लाभदायक आहे . नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा घृताचे थेंब टाकणे .

योग्य प्रकारे रुग्णाची माहिती घेऊन त्याची प्रकृती , वय ,बल कामाचे स्वरूप, पूर्वी झालेले आजार, सध्याची लाईफ स्टाईल, खाणे पिणे, व्यायाम रोजच्या सवयी या सर्व व इतर अनेक बाबींचा विचार वैद्याद्वारे केला जाऊन त्यानंतर कोणते पंचकर्म करायचे हे ठरवले म्हणजेच व्यक्तीच्या प्रकृती व गरजेनुसार कर्म करताना कोणते तेल वापरावे कोणता काढा व औषधे बस्ती साठी किंवा पंचकर्मासाठी वापरावी हे वैद्याने अचूक ठरवावे लागते.

केले जाणारे पंचकर्म उपचार योग्य प्रकारे व्हावेत यासाठी रुग्णाने किंवा पंचकर्म करून घेणाऱ्या व्यक्तीने सर्व नियम पाळून कर्म केले म्हणजे पंचकर्माच्या काळामध्ये हलका आहार घेणे ,पचायला जड पदार्थ बंद करणे , वेळेवर झोपणे लवकर उठणे विनाकारण प्रवास दगदग जागरण या गोष्टी न करणे. आहाराची विहाराच्या पथ्य पाळणे या गोष्टी पाळून कर्म केले तर त्याचे खरंच खूप चांगले परिणाम दिसतात.
बऱ्याच लोकांची अशी धारणा असते की पंचकर्म करून शरीरशुद्धी केली म्हणजे मी काहीही करायला मोकळा किंवा आता शरीर शुद्धी झाली म्हणजे मी कसेही वागले तरी चालेल. तसे मुळीच नाही पंचकर्म करून शरीर शुद्ध झाल्यानंतर नको असलेल्या गोष्टी शरीरातून निघून गेल्या आता चांगला आहार विहार दिनचर्या पाळून ते शरीर निरोगी राखणे ही नंतरची आपलीच जबाबदारी आहे.आठवडा घालवून पूर्ण साफ आणि नीटनेटके केलेले घर मी पुन्हा अस्तव्यस्त केले तर परत आवरायला त्रास होणारच ना? त्याप्रमाणे पंचकर्म करून शरीरशुद्धी केल्यानंतर व्यक्तीने पुन्हा आजार होऊ
नयेत यासाठी योग्य खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे.

अशा पंचकर्मांमुळे पूर्वीचे सर्व त्रास कमी होऊन रुग्णाचे आयुष्य वाढते , quality of life सुधारते दोषस्तिथी , व्याधिअवस्था , रुग्णाचे कोष्ठ , अग्नी , सामता इत्यादी गोष्टींचा विचार करून तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म करावे .

पुढील श्लोकात आचार्य चरकांनी अतिशय सुंदर पद्धतीने पंचकर्म चे फायदे सांगितले आहेत .

” एवं विशुद्ध कोष्ठस्थ कायाग्नी अभिवर्धते !
व्याधयोश्चउपशामयंती प्रकृतिश्चानुवर्तते
इंद्रियांनी मनोबुद्धीवर्णश्चास्य प्रसीदति !!
बाळ पुष्टिर्पत्यम चा वृषता चास्य जायते !
जरा कृछएन लभते चिरंजीवथनाम: !!”

अशा प्रकारे पंचकर्म हे व्याधी प्रतिबंधात्मक(मुळात आजार होऊ नये यासाठी शरीर शुद्धी करून घेणे) व व्याधीनिवारर्णार्थ (झालेला आजार बरा करण्यासाठी) असे आहे. अनेक व्याधींमध्ये याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात , योग्य औषधी चिकित्सा व योग्य पंचकर्म यामुळे अनेक असाध्य व्याधींवर विजय मिळवता येतो .

आपण गाडी इत्यादि निर्जीव असलेल्या यंत्राची देखील सर्विसिंग नियमित करतो, घरची साफसफाई दर सणासुदीला करतो, मोबाईल साठी अनेक क्लिनींग अॅप्स वापरतो . विचार करा आपले शरीर तर चोवीस तास अव्याहतपणे चालणारे यंत्र आहे. त्याची काळजी वर्षानुवर्षे आपण घेत नाही .. detoxification, शरीरशुध्दी याची नितांत आवश्यकता आपल्या शरीराला आहे .
त्यामुळे निरोगी व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्यानुसार पंचकर्म अवश्य घ्यावे.

94226 00636

16/07/2025

*पालक भाजी*

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते. पालकाची पाने ही फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व पसरट अशी असतात. मराठीत पालक, इंग्रजीत स्पिनॅच तर शास्त्रीय भाषेमध्ये स्पिनासिया एॅलेरेकिया या नावाने ओळखली जाणारी पालक भाजी चेनोपोडिएसी या कुळातील वनस्पती आहे. पालकाचे देशी पालक आणि विलायती पालक असे दोन प्रकार पडतात. आपण सहसा देशी पालकच आहारामध्ये वापरतो. विलायती पालक हा प्रकार आशियामध्ये आढळतो.

औषधी गुणधर्म
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अ‍ॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.

उपयोग
० आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात. म्हणून मासांहर न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन हे वरदानच आहे.
० पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो. पालक, टोमॅटो, काकडी, कांदा यांचे सॅलड किंवा कोिशबीर बनवून त्यात थोडेसे िलबू पिळावे. िलबामध्ये असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे पालक भाजीमध्ये असणारे लोह संपूर्णपणे शरीरात शोषले जाण्याची प्रक्रिया होते. म्हणून सहसा पालक हा स्वच्छ धुऊन कच्च्या स्वरूपात खावा.
० पालकामध्ये विपुल प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा. पालकामध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.
० अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा वाटणे, धाप लागणे, वजन कमी होणे, जुलाब लागणे ही लक्षणे जाणवतात. असे होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा.
० अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.
० पालक ही भाजी जीवनशक्तीचे मूलस्रोत आहे. त्यामुळे एखाद्या स्तन्यपान देणाऱ्या मातेला पुरेसे दूध येत नसेल तर अशा वेळी बालकाच्या वाढीसाठी बाळ चार महिन्यांचे झाल्यानंतर पालक पानांचे सूप करून बाळाला पाजावे. यामुळे बाळाची वाढ चांगली होते.
० पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
० अंगावर गाठ येऊन जर सूज आली असेल तर अशा वेळी पालक पानांचे पोटीस गरम करून त्याजागी बांधावे.
० पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.
० आतडय़ांची ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील बनविण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर रस अनुशापोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतडय़ांतील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते.
० शहाळ्याच्या पाण्यातून ताजा पालक घेतल्यास मूत्र प्रमाण वाढून मूत्रातील आम्लता कमी होते व त्यामुळे लघवीला जळजळ, कमी होते..
डॉक्टर विजय साळुंखे

16/07/2025

🪧 *_आयुर्वेदशास्त्राने 80 वर्ष निरोगी जगण्या साठी काही नियम सागितले आहे...
त्यातले काही नियम ...._*
➖➖➖➖➖

1 ] रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणाशापोटी थंड (Room temperature) चे पाणी न थूंकता बेडवरच पिणे.
2 ] दात खासल्या नंतर आंघोळी च्या आधी, नंतर,चहाच्या अधी व नंतर लगेच पाणी पिऊ नये. [ थंड उष्ण चा परीणाम टाळणे ]
3 ] दिवसभरात दर दोन ते तीन तासा दरम्यान तांब्याभर पाणी प्यावे. येताजाता किंवा खुप लेट पिऊ नये.[पोट व किडणीला आराम पडण्यासाठी ]
4 ] जेवणाबरोबर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे, जेवणानंतर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणानंतर दोन ते तीन तासा दरम्यान तांब्याभर पाणी प्यावे. [ पचन अमृतासमान होते ]
5 ].रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे, [ दोन ग्लास उकळून अर्धा ग्लास करून प्यावे.] सक्तीचे नाही.[ पोटाचे विकार,चरबी,व वजन कमी होते ]
6 ].सकाळचे जेवण अकरा च्या आधी भरपेट करणे आवश्यक. सकाळचे जेवण =100%(राज्यासारखे) , दुपारी=50%( कामगरासारखे ) संध्याकाळी=25% (भिकाऱ्यासारखे) जेवण करावे.[ आरोग्याची गुरकिल्ली आहे ]
6 ].सकाळचे जेवण हे शडंरस, पंच रस युक्त असावे. [ सहा रस= गूळ, लिंबू, कारले, तिखट, खारट आणि जेवणानंतर बडीशोप ]
7 ].वजन कमी करण्यासाठी सकाळी अकराच्या आधी 100% जेवण करावे आणि संधयाकाळी 25% जेवण करावे असे रोज 3 ते 6 महीने न चुकता करावे पोट कमी होते, वजन 2 ते 4 कीलो कमी होते.
8 ] जेवणात रोज गाजर, बीट, मुळ्याच्या 2 ते 4 कच्या चकल्या सतत खाव्या. संध्याकाळी उपासी पोटी काळे मनुके किंवा अंजिर खावे. अठवड्यात 1 ते 2 डाळिंब सतत खावे.[रक्त व B12 छान वाढते]
टीप: =आयुर्वेद शास्त्रानुसार हेतू परीवर्जन हे सर्वात मोठे औषध मानले जाते. चुकीचे नियम सतत दीर्घ काळ केले जात असेल तर ते सतत होणाऱ्या आजारांना कारण नक्कीच होऊ शकतात. म्हणून आयुर्वेद शास्त्रानुसार नियम पाळावे.
रोज सकाळी 2 खजूर,2 आक्रोड आणि आर्धे डाळीलिंब... संध्याकाळी 1 अंजिर, थोडे काळे मनुके 3 ते 6 महिने सतत खावे.... जेवणात 2 चकल्या बीट, अर्धं गाजर,4 चकल्या मुळ्याच्या खाव्यात ... रोज सकाळी 11 च्या आत न्याहारी म्हणजे 100% जेवण करावे जेवणात थोडा गूळ + चतकुर लिंबू + चार चकल्या कारल्याच्या [मिठ मिरची लावून] + तिखट + खारट आणि जेवणानंतर बडीशोप, सुपारी घ्यावी म्हणजे सहा रसांचे जेवणं होते...
डॉक्टर विजय साळुंखे

16/07/2025

*सूर्यनमस्कार : -*
*आरोग्य चमत्कार!!*

सूर्यनमस्कार : - कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब....

एका सुर्यनमस्काराने सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.
संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, बांधेसूद , सुडौल .
३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट....…

३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास बघा बरं : -

वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज ,
टेनिस= २३२ कॅलरीज,
बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,
बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज,
फुट बॉल=२९८ कॅलरीज,
जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज,
धावणे= ४१४ कॅलरीज,
#सूर्यनमस्कार= #४१७कॅलरीज.

वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?

‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत....’
कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अति उत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत तेरा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते,
तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.

इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा आहे. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते....

सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?

सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ

सूर्यनमस्कार: -
योगाद्वारे सूर्या प्रति कृतज्ञता

‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.

सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्याला एक योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा.

ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.....

लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार आता सामान्य झाले आहेत. हे असे आजार आहेत की ज्यामुळे काही आजरांचा जन्म होतो. अशा परिस्थितीत असा एक आसन असणे आवश्यक आहे म्हणजेच हा आजार टाळण्यासाठी योग सर्वांसाठी तितकाच फायदेशीर आहे. म्हणजेच, एकाच योगनं अनेक आजार पळवून लावता येऊ शकतात.सूर्यनमस्कार असाच एक योग आहे.

जो काही आसनांचा निचरा आहे. सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या आरोग्यास बरेच फायदे होतील. सूर्यनमस्कार म्हणजे 10 योगासनांचा योग आहे. हा योग सर्वोत्तम कार्डियो मानला जातो.
हेच कारण आहे की, हृदयापासून डोक्यापर्यंत आणि मनापासून पोटापर्यंत सर्वात चांगलं आसन आहे. शरीर डिटॉक्स करून ब्लड सर्कुलेशन वाढवण्यासाठी या योगचे अनेक फायदे आहेत.

सूर्यनमस्कार करण्याचे शारिरीक आणि मानसिक फायदे
निरोगी शरीर आणि एक आनंददायक भावना
सूर्यनमस्कार केल्यानं केवळ शरीरचं निरोगी होत नाही तर यामुळे मेंदूही खूप थंड राहतो आणि एक सुखद पूर्तता होते. सूर्यनमस्कार करताना दिर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजन वाढतं. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुद्धा वेगानं होतं. हेच कारण आहे की मेंदू देखील अॅक्टिव्ह राहतं.

चांगले पचन प्रदान करते
सूर्यनमस्कार केल्यानं शरीरासोबतच पोटाजवळही बराच तणाव वाढतो. हा तणाव पोटाची पचनक्रिया चांगलं करण्यासाठी असतो. पचन तंत्र सुधारल्यावर शरीरातल्या अर्ध्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोटात जळजळ होणे किंवा ढेकर येणं या आणि अशा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र सूर्यनमस्कार केल्यानं या सर्व समस्या कायमच्या दूर होतात. सकाळी रिकामी पोटी सूर्यनमस्कार कमीत कमी दहा वेळा जरूर करा.
पोटाची चरबी वितळेल आणि वजन कमी होईल
सूर्यनमस्कार केल्यानं पोटावर सर्वात जास्त इफेक्ट पडतो आणि हे कारण आहे की, पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास सुरूवात होते. पोटाचे स्नायू देखील मजबूत होतात. पूर्ण शरीरातील वजन सहज कमी होण्यास सुरूवात होते.

मासिक पाळीशी संबधित समस्या दूर होतात
सूर्यनमस्कार महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या हे आसन दूर करतं. एवढंच नाही तर मेनोपॉजच्या वेळी होणारा त्रास आणि मानसिक समस्या देखील दूर करतात. मासिक पाळी नियमित करणं, अतिरक्तस्राव किंवा कमी रक्तस्राव योग्य करण्यासोबतच डिलीवरीच्या वेळी होणारे त्रास किंवा वेदना कमी करते.

शरीर डिटॉक्स करण्यास होते मदत
सूर्यनमस्कार करताना दिर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि कार्बन डायऑक्साइड आणि अन्य विषारी तत्त्व सुद्धा बाहेर येतात. सूर्यनमस्कार श्वासोच्छ्वास देखील सुधारित करते आणि फुफ्फुसांना बळकट करते.

स्मरणशक्ती चांगली होते आणि थायरॉईड ठीक होतं
सूर्यनमस्काराने स्मरणशक्ती देखील सुधारते. सूर्यनमस्काराचा परिणाम नर्व्हस सिस्टमवर पडतो आणि हे केल्यानं मेंदूमधून चांगल्या हार्मोन्सचे स्राव वाढतो. यामुळे केवळ तणावचं दूर होतं नाही तर यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते. इतकेच नाही तर खासकरून थॉयरायड ग्लँडची क्रिया सुद्धा सुधारते.

शरीर लवचिक होतं
सूर्यनमस्कार फुल बॉडी एक्सरसाइज आहे. ही सर्वात चांगली कार्डिओ एक्सरसाइज मानली जाते.
डॉक्टर
विजय साळुंखे.

16/07/2025

*👉टाचदुखी*

हा एक वातविकार आहे. वेळीच काळजी घ्या.

*कारणे* :

* नियमित पोट साफ न होणे.
* जड अन्नपदार्थ जास्तच खाणे.
* घाईघाईने जेवणे.

*उपाय* :

* एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या.
* लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा.
* हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळ संध्याकाळ करा.
* कोमटच पाणी प्या.
* पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. किंवा एरंडेल तेल रात्री कोमट पाण्यातून घेणे.
* हलका आहार घ्या.
* टाचेला श्वास रोखून तेल लावून माँलिश करा. श्वास सोडल्यावर माँलिश थांबवा. नंतर पुन्हा श्वास रोखून माँलिश करा. असे ५/१० वेळा करा. रिकाम्या पोटीच करा.
* रिकाम्या पोटी काहीवेळ श्वास रोखून टाचेवर चाला.
* नियमित प्राणायाम करा.
* आवळा पदार्थ खा.

*टाचदुखी कशामुळे होते ?*

बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला 'प्लांटर फेशिया‘ असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते.

प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये लहान फटी (मायक्रो टियर्स) विकसित होऊ शकतात. यामुळे प्लांटर फेशिया घट्ट होऊ शकतो आणि टाचदुखी जडते. अशा वेळी आजूबाजूची ऊती आणि टाचेचे हाड यांचा देखील काही वेळेस दाह होऊ शकतो. प्लांटर फॅसायटीस हे टाचदुखीचे सर्वांत सामान्य कारण आहे.

*सोपे उपचार* :

* खडे मीठ गरम पाण्यात टाकुन टाचा शेकाव्यात.
* टांचदुखी हा वाताचा प्रकार आहे. होमिओपथिच्या गोळ्या घ्याव्यात.
* मऊ चपला मिळतात त्या वापराव्या.
* फिजिओ थेरेपीचे काही सोपे एकसरसाइज, जसे भिंतीला हात टेकून उभे रहायचे अणि पायाच्या बोटानी टाचा वर उचलून जागच्या जागेवर जॉगिंग करायचं.
* जमिनीवर टॉवेल पसरून पाय त्यावर ठेवून पायाच्या बोटा नी टॉवेल जवळ आणायचा.
* टाचेवर बिब्बा घालून पहा.
* रूईचे पान व विटेचा तुकडा गरम करून त्याने टाचा शेकणे.
* गोडे तेलात मीठ घालून फेटावे व रात्री टाचेला लावून प्लास्टिकचा कागद बांधून झोपावे.
* पाण्याची pet वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहावे. सुरवातीला खुपच गार वाटते पण मग बरे वाटु लागते. असे साधारण ५-१०मिनिटे करावे. असे दिवसातुन २-३ वेळा करावे. दुसर्‍या दिवशी बराच फरक वाटेल. असे ३-४ दिवस केल्यावर खुपच फरक पडलेला जाणवेल.
* बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते.
* योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्‍यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.
* शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा.

दररोज पोट साफ राहू द्या !
डॉक्टर विजय साळुंखे

16/07/2025

*⏹️ व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता*

व्हिटॅमिन बी-१२ हे 'सायनोकोबालामिन' म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक जनुके) आणि ऊर्जेच्या निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता ही जीवनशैलीशी निगडित आणि विविध औषधांचा दुष्परिणाम यांमुळे होणारे आहे. अनेक रुग्णात बी-१२ ची कमतरता दिसून येते. मग यासाठी इंजेक्शन, गोळ्या असे विविध उपाय चालू होतात.

*बी-१२ ची कमतरता कशामुळे?*
बी-१२ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ते शरिरात शोषले जाते. 'कोबाल्ट' हे मिनरल (खनिज पदार्थ) बी-१२ मध्ये आहे. बी-१२ ची शरिराला अतिशय अल्प प्रमाणात आवश्यकता असते. त्याचा यकृतात साठा असतो. हा साठा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत बी-१२ ची कमतरता होण्याची शक्यता होत नाही. आहार समतोल असेल, म्हणजे सगळे घटक आहारातून शरिराला मिळत असतील, तर बी-१२ ची कमतरता सहसा होत नाही. मात्र कमतरता असेल, तर आरोग्याची हेळसांड होत आहे, असे समजावे. पालटलेली जीवनशैली हे कमतरता होण्याचे प्रमुख कारण आहे.

*कमतरता का होते?*
वय वाढत जाते, तसे पोटातील 'ॲसिड' स्रवण्याची प्रक्रिया मंदावते. 'गॅस्ट्रिक सर्जरी' (जठरा संबंधीचे शल्यकर्म), जुनाट सूज, दीर्घकाळ असलेला 'ॲनिमिया' (रक्तक्षय), थकवा अशा कारणांमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्वादुपिंडात बिघाड हेही बी-१२ च्या कमतरतेचे प्रमुख कारण असते. 'टाईप-२' मधुमेहामध्ये उपचारासाठी वापरले जाणारे मेटफॉर्मिन बी-१२ कमतरतेसाठी कारणीभूत ठरते.
# जर पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नसेल, तर बी-१२ हे R प्रोटीन सोबत मिसळत नाही. त्यामुळे शरिराची बी-१२ शोषून घेण्याची क्षमता न्यून होते.
# अनेकदा वेगवेगळ्या औषधांमुळे स्वतःचे तोंड कोरडे पडते, पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नाही. रक्तदाबावरील (ब्लड प्रेशर वरील) औषधे, तसेच नैराश्यावर उपचारासाठी घेण्यात येणारी औषधे यांमुळे अनेकदा तोंड कोरडे पडते.
# पोटामध्ये जर अल्प प्रमाणात आम्ल (ॲसिड) स्रवत असेल, तरी बी-१२ ची कमतरता निर्माण होते. पोटाच्या अल्सरवर उपचारासाठी जी औषधे वापरली जातात, त्यामुळे आम्ल स्रवण्याचे प्रमाण न्यून होते. बी-१२ ची कमतरता आणि अल्सर च्या गोळ्यांमध्ये संबंध असल्याचे संशोधकांना आढळले आहे.

*बी-१२ कमतरतेची लक्षणे*
भूक न लागणे, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, हातपायाला मुंग्या येणे ही लक्षणे असतील, तर डॉक्टर चाचणी करायला सांगतात. आवश्यकता असेल, तर पूरक औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. बी-१२ ची पातळी पुष्कळ न्यून असेल, तसेच कमतरतेची लक्षणे असतील, तरच औषध सुचवले जाते. जर बी-१२ हे आतडी नीट शोषून घेऊ शकत नसतील,

*आहार काय असावा?*
# बी-१२ चे स्रोत - दूध, दही, ताक,यात बी-१२ चे प्रमाण चांगले असते; मात्र अनेक शाकाहारी व्यक्तींचा प्रश्न असतो की, बी-१२ वाढवण्यासाठी आम्ही काय करायला हवे? तर शाकाहारी लोकांसाठी हे प्रमाण अधिक असणारी फळे आणि भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. उदा- पालक, बीटरूट, बटरनट स्क्वॅश (फळांपासून सिद्ध केलेले पेय), मशरूम, बटाटे यांसारख्या भाज्या बी-१२ चे चांगले स्रोत आहेत. जर शाकाहारी असाल, तर आहारात या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
# भूक न लागणे, एकाग्रते मध्ये बाधा, तोंडावर किंवा जिभेवर फोड येणे ही बी-१२ च्या कमतरतेची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसू लागताच फळे अन भाज्या यांचे सेवन चालू करावे.
# मशरूम मध्ये बी-१२ अधिक असते. बी-१२ ची प्रतिदिनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनुमाने ५० ग्रॅम वाळलेल्या मशरूमचे सेवन करावे लागेल. तसेच सफरचंद, केळी, ब्ल्यू बेरी, संत्री इत्यादी मध्ये बी-१२ हे थोड्या अधिक प्रमाणात मिळते.

*योग्य आहार नि नियमित व्यायाम*
जीवनशैलीशी निगडित कोणत्याही आजारापासून दूर रहायचे असेल, तर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टी आपल्याला कोणत्याही आजारापासून दूर ठेवू शकतात. आज पासूनच स्वतःचा आहार पालटा, तुमचे जीवन नक्की पालटेल.
डॉक्टर विजय साळुंखे

16/07/2025

*👉गाठाळलेल्या रक्तवाहिन्या - व्हेरिकोज व्हेन्स*

*प्राथमिक - आपल्या दिवसभरातील सर्व कृती पायांच्या मुळे आपल्याला करता येतात. त्यावेळी आपण उभे असतो वा चालत असतो. यामुळे पायातील त्वचेखालील निळ्या रंगाच्या नीलांमध्ये (व्हेन्स) रक्त साखळते. त्यांचा दाह होतो. त्या वेड्यावाकड्या होतात, कायमच्या जाड होतात. त्यावेळी त्यांचा थोडासा फुगीर गाठीसारखा भाग, उंचवटा बाहेर आलेला दिसतो. तिथे वेदना होऊ लागतात. पुढे पुढे तर चालणेही कठीण होते. या विकाराला गाठाळलेल्या रक्तवाहिन्या असे म्हणतात.*

*२) कारणे - पायांच्या सतत वापरामुळे पाय थोडे गरम होतात. हा गरमपणा त्वचेखालील रक्तवाहिन्यांना अपाय करतो. हे रोज घडत राहण्याने आणि वर्षानुवर्षे घडत राहण्याने रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. पूर्वीच्याच जागेत त्या राहू शकत नाहीत म्हणून त्या वर त्वचेजवळ येतात. त्यांचा गुंता दिसू लागतो.*

*३) उपचार-*
*१) बाहेरून घरात येताना हात-पाय धुणे. हा उष्णता विकार असल्याने आणि रोज पाय गरम होत असल्याने आपल्या पूर्वजांनी रोज करायचा अत्यंत सोपा उपाय शोधून काढला होता. तो म्हणजे बाहेरून घरात येताना प्रथम हात-पाय, तोंड धुवायचे व मगच घरात पाऊल टाकायचे. त्यासाठी पाण्याची बादली घराबाहेर ठेवत असत. हा उपाय, थोडा बदल करून आपण आजही वापरू शकतो. 'त्यासाठी अन्य कामे सुरू करण्यापूर्वी, बाथरूममध्ये जाऊन प्रथम हात-पाय, तोंड धुऊन शरीरातील वाढलेली उष्णता कमी करायची.' तशी ही पद्धत सोपी आहे. पण त्यासाठी सर्वांनीच ही सवय लावून घेतली पाहिजे. कारण ही समस्या सामान्यतः तिशीनंतर आढळते. म्हणजे पायातील रक्तवाहिन्यांचे रोज होणारे प्रसरण व रात्रीच्या थंड वेळात होणारे आकुंचन रक्तवाहिन्या त्या तीस-पस्तीस वर्षे सहन करतात. अखेर त्यांचा नाईलाज होतो. त्या वेड्यावाकड्या, जाड, टणक होतात. त्यांना पायाकडे गेलेले रक्त, हृदयाकडे परत पाठवण्यामध्ये अडचणी येतात म्हणून त्या दुखू लागतात. तसे पाहिले तर व्यक्तीला त्यांनी दिलेला हा एक संदेशच असतो. पुढच्या काळात दुःख सहन करण्यापेक्षा 'पाय धुण्या'चा हा सोपा उपचार रोज करायला काय हरकत.*

*२)लिंबाची साल आपण लिंबाचा रस अनेक ठिकाणी वापरतो व लिंबाची साल टाकून देतो. या सालीत 'प' जीवनसत्त्व असते. साधारणतः पाव लिंबाची साल रात्रीच्या वेळी बारीक करून तो लगदा एका पाण्याच्या बाटलीत भरून ठेवावा. बाटली जरा हलवून ठेवावी. रात्रभर तशीच राहू द्यावी. त्या बाटलीत सुमारे १५० ते २०० मि. लि. पाणी असेल तर दुसऱ्या दिवशी त्यातले ३०-४० मि.लि. पाणी एकूण तीन-चार वेळा प्यायचे. या पाण्यात लिंबाच्या सालीतील 'प' जीवनसत्त्व उतरत असल्याने, त्याचा फायदा होतो.
डॉक्टर विजय साळुंखे

16/07/2025

*तुम्ही गुडघेदुखीने त्रस्त आहात का??? चला तुम्हाला काही घरगुती उपाय सांगतो*........!

दालचिनी, जिरे, आले आणि हळद यांचा वापर गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पदार्थांमध्ये असे घटक आढळतात जे गुडघ्यांमध्ये सूज आणि वेदना कमी करतात.

* मेथीचे दाणे, सुंठ आणि हळद समप्रमाणात एकत्र करून बारीक करून दोन चमचे फकीचे गरम पाण्यासोबत रोज सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर सेवन केल्यास फायदा होतो.

* रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्राम नायजेला बिया एक चमचा चुरलेल्या मेथीच्या दाण्यामध्ये मिसळून एकदा घ्या.

* नेहमी मेथीचे दाणे सकाळी रिकाम्या पोटी आणि दुपारी आणि रात्री जेवणानंतर अर्धा चमचा पाण्यासोबत घेतल्याने सर्व सांधे मजबूत राहतील आणि सांधेदुखी कधीच होणार नाही.

* अंबाडीच्या बियांमध्ये २ अक्रोड मिसळून खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.

* मेथीचे लाडू खाल्ल्याने हात, पाय आणि सांधे दुखण्यापासून आराम मिळतो.

* अंकुरलेले मेथीचे दाणे खा आणि खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका.

* वयाच्या ३० वर्षांनंतर मेथीचे दाणे खाल्ल्याने शरीराचे सांधे मजबूत राहतात आणि वृद्धापकाळापर्यंत मधुमेह, रक्तदाब, संधिवात यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.

* मेथीचे दाणे कढईत किंवा कढईत गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर बारीक करा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा एक ग्लास पाण्यासोबत घ्या.

* मेथी दाणे बारीक वाटून घ्या आणि हिवाळ्यात 2 चमचे आणि उन्हाळ्यात एक चमचा सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्या.

मसाजसाठी तेल आणि फोमेंटेशन पद्धती
,
* एरंडाची पाने बारीक करून त्यात थोडे मोहरीचे तेल व थोडा कापूर टाकून गुडघ्यांवर लावा आणि लाल कापड बांधा. आता त्यावर हॉट कॉम्प्रेस लावा.

* घटकांमध्ये एरंडेल आणि मोहरीचे तेल, लसूणच्या 2 पाकळ्या आणि कापूर तेलाचा एकूण अर्धा भाग समाविष्ट आहे. कापूर गरम तेलात (काळजीपूर्वक) मिसळावा लागतो. तेल किंचित गरम झाल्यावर मसाज करून आळकची पाने गरम करून त्या जागी ठेवून त्यावर कापूस ठेवून लाल कापडाची पट्टी बांधावी. गुडघ्याच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी मसाज करावा.

*सांधे आणि गुडघेदुखी दूर करण्यासाठी तेल बनवण्याचा एक अतिशय प्रभावी सूत्र:
काळे उडीद 10 ग्रॅम, आले बारीक 5 ग्रॅम, कापूर 2 ग्रॅम घ्या. हे तीन घटक 50 ग्रॅम मोहरीच्या तेलात 5 मिनिटे गरम करा, आचेवरून काढा, गाळून घ्या आणि एका बाटलीत भरा. या मध्यम गरम तेलाने सांध्यांना मसाज केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. दिवसातून 2-3 वेळा मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. अळकची पाने गरम करून त्या जागी ठेवा आणि कापसाने झाकून लाल कापडाची पट्टी बांधा. शक्य असल्यास, लाल कपड्यात गुंडाळा आणि 15-20 मिनिटे उन्हात गुडघे टेकून बसा.
डॉक्टर
विजय साळुंखे

16/07/2025

*कॉलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातले हे पदार्थ; चांगल्या तब्येतीसाठी आजपासूनच खाणं सोडा.*

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्याला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅडला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात.

जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये या मेणासारख्या पदार्थाचे प्रमाण वाढते तेव्हा ते रक्त प्रवाह कमी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. यकृत प्रत्यक्षात ते तयार करते परंतु आपण जे पदार्थ खातो ते देखील त्याचे प्रमाण वाढवते. आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढते. हृदय निरोगी ठेवायचे असेल तर त्याचे सेवन टाळावे.

*प्रोसेस्ड मीट खाऊ नका*

क्लीव्हलँड क्लिनिकच्यानुसार बाजारात उपलब्ध असलेले फ्रोजन आणि पॅकेज केलेले मांस अधिक काळ निरोगी ठेवण्यासाठी त्यांना दीर्घ प्रक्रियेतून जावे लागते. सॉसेज, हॉट डॉग, बेकन, फ्रोझन कबाब इत्यादी प्रक्रिया केलेल्या मांसाची काही उदाहरणे आहेत. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ शकते. म्हणून शक्यतो अशा पदार्थांचा आहारात समावेश करू नका.

*जंक फूड*

जंक फूड हे वेगवेगळ्या प्रकारचे तेल, मसाले आणि मैद्यापासून बनवले जाते, जे कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात. या पदार्थांमध्ये चिप्स, नाचोस, मिल्क चॉकलेट, सोडा, फळांची चव असलेली पेये इत्यादींचा समावेश आहे.

*फ्राय फूड*

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार तेलात तळलेले पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी खूप वाईट असतात. या पदार्थांमुळे लठ्ठपणाही येतो. तळलेले अन्न प्रत्येकासाठी हानिकारक आहे.

*गोड पदार्थ*

शर्करायुक्त पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. आइस्क्रीम, केक, पेस्ट्री, डोनट्स इत्यादी पदार्थ टाळावेत. या सर्व गोष्टी हृदयासाठी घातक आहेत.

14/07/2025

*काही दुखणी आवडत्या व्यक्तींबरोबर हसण्या, खिदळण्यानेही बऱ्या होतात.*

काही दुखणी औषधांमुळे नाही, तर आवडत्या व्यक्तींच्या संगतीने बऱ्या होतात, हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे.

जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तींशी हास्यविनोद करतो, खिदळतो, तेव्हा मेंदूमध्ये "एंडॉर्फिन्स" आणि "ऑक्सिटोसिन" हे हार्मोन्स वाढतात.

हे नैसर्गिक पेनकिलर्स आहेत, जे शरीरातील वेदना कमी करतात आणि मानसिक शांती देतात.

शरीर आणि मन यांचं अतूट नातं आहे. जेव्हा मन प्रसन्न राहतं, तेव्हा शरीर देखील आरोग्यदायी राहू लागतं.

आपले भावनिक संबंध जितके सशक्त, तितकं मानसिक आरोग्य सुधारतं.

खास करून दीर्घकाळ चालणाऱ्या दुखण्यांमध्ये जसे की पाठदुखी, डोकेदुखी, अपचन यामध्ये हास्याचा मोठा फायदा होतो.

म्हणूनच, ज्या व्यक्तींच्या सहवासात आपण मुक्तपणे हसू शकतो, अशा नात्यांना जपणं, हे औषध घेण्याइतकंच आवश्यक आहे.
डॉक्टर विजय साळुंखे

06/07/2025

*सीताफळाची पाने ठेवतील या महाभयंकर आजारांना तुमच्या पासून दूर..*

सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुलांना सीताफळ खायला दिल्यास त्यांची शारीरिक वाढ उत्तमरित्या होते. स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे.

बाळंतपणानंतर किंवा चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही शारीरिक झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो.

सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.

काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात.
या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.

केस गळण्याचे प्रमाण अधिक असेल तर सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधात उगाळून लावा. नवीन केस उगवतील. सीताफळाच्या पानांचा लेप फोडांवर लावल्यास ते ठीक होतात.आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

ज्यांच्या हृदयाचे ठोके
जास्त ,उच्च रक्तदाब तसेच हृदयरोगाच्या पेशंटनी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते. सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नसíगक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते.

आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते. स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे.

बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो.

आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते. कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते.

ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.
डॉक्टर विजय साळुंखे
94226 00636

Address

KALPAK PARK, YADOGOPAL PETH 137, SAMARTH MANDIR TO PHUTKA TALAV Road, SATARA; (MAH)
Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when VedVipra HealthClinic & Fertility Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to VedVipra HealthClinic & Fertility Center:

Share