Dr.Deepa Shirgaonkar

Dr.Deepa Shirgaonkar young hearts and minds on current affairs, poem katha, inspiration for youth kids and women updates

With Papa Mummy Kitchen – I just got recognised as one of their top fans! 🎉
13/08/2025

With Papa Mummy Kitchen – I just got recognised as one of their top fans! 🎉

13/08/2025

ण हिंसइ पाणं, ण पाणवधं पस्सइ।

कोणत्याही जीवाला मारू नये, किंवा जीवाच्या वधाकडे पाहूनही आनंद मानू नये हे सत्य आहे.

पण साप कितीही जवळचा मित्र वाटला तरी आपण त्याला आपल्या घरात पाळतो का? नाही कारण त्यामुळे कधी कधी आपला जीव जाऊ शकतो हे आपल्याला पक्के माहित असते. म्हणून हा धोका माणूस म्हणून स्वीकारत नाही
अशाच प्रकारे कबुतरे सुद्धा माणसाच्या फुफुस साठी silent killer बनतात.. मग स्वतः साठी जे धोकादायक आहे ते समाजातील समस्त मानवजातीसाठी तरी किती हिताचे आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे

4.जीवो जीवस्य न हिंस्यात् सर्वेषां भूतदर्शनात्।

इतर सर्व जीवांमध्ये स्वतःचा जीव बघावा. त्या सर्व जीवात माणूस नावाचा प्राणी येतो. साने गुरुजी यांच्या भाषेत जर सांगायचे झालें तर.....
"खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे "

त्यातल्या त्यात माणूस नावाच्या प्राण्याला अगोदर स्थान द्यावे...

उरले सुरले प्रेम इतर भूतदयेस ठेवावे!

डॉ.दिपा.

26/07/2025

"Eternal vigilance is the price of liberty".

24/07/2025

श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र

अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः। स्वामि कार्तिकेयो देवता। अनुष्टुप छंदः। मम सकल विद्यासिद्ध्यर्थ जपे विनियोगः।

श्रीस्कंद उवाच ।।

योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनंदनः । स्कंदकुमारः सेनानीः स्वामिशंकरसंभवः ।।१ ।।

गांगेयः स्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः । तारकारिरूमापुत्रः क्रौंचारिश्च षडाननः ।।२।।

शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः । सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रदः ।।३।।

शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत् । सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन ।।४ ।। अष्टविंशति नामानि मदीयानीति यः पठेत् । प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।

महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम् । महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।

इतिश्री रुद्रयामले प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम् ।

संपुटमंत्र :

या देवी स्तूयते नित्यं विबुधैर्वेदपारगैः । सा मे वसतु जिव्हाग्रे ब्रह्मरुपा सरस्वती ।।

23/07/2025

Fate gives, but effort takes .

दैव देते आणि कर्म नेते l

23/07/2025

या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता ।

या वीणावर दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥

या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता ।

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ll

---

या कुन्देन्दु तुषारहार धवला

– जी कुंद फुलासारखी, चंद्रासारखी आणि हिमाच्या हारासारखी शुभ्र (पांढरी) आहे,

या शुभ्रवस्त्रावृता

– जी शुभ्र (पांढऱ्या) वस्त्रांनी वेष्टित आहे,

या वीणावर दण्डमण्डितकरा

– जिने हातात वीणा आणि दंड धारण केला आहे,

या श्वेतपद्मासना

– जी शुभ्र (पांढऱ्या) कमळावर विराजमान आहे,

या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

– जिला ब्रह्मा, विष्णू (अच्युत), शंकर (महादेव) यांच्यासह सर्व देवता नेहमी वंदन (पूजा) करतात,

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा

– अशी भगवती सरस्वती देवी, जी सर्व अज्ञान दूर करणारी आहे, ती मला (विद्यार्थ्याला / भक्ताला) संरक्षण देवो.

19/07/2025

आज आपण संत तुकाराम आणि श्री स्वामी समर्थ रामदास यांच्या दोन अभंग वाणी पाहुयात

1) संत तुकाराम

मना सज्जना भक्तीपंथेची जावे।
जनीं सन्मानावे सद्भावें॥१॥

परी निर्धारु ठेवावा अंतरीं।
भवभय न करी चित्त शुद्ध॥२॥

जे जे भेटेल ते ते लाभले।
दीनांनाथे केले सर्वस्व॥३॥

अखंड नाम घेता चित्त शुद्ध राहे।
शेवटी विष्णुपदी मिळे सुख॥४॥

तुका म्हणे ऐसा अनुभव येता।
पडो नये चुकता मार्ग भक्तीचा॥५॥

अर्थ (संक्षिप्त):

हे सज्जन मना! भक्तीच्या मार्गावर चाल.

सर्व प्राण्यांत सन्मानाने वाग आणि अंतःकरणात भक्तीचा निर्धार ठेव.

जो काही योगायोगाने भेटेल, त्यालाच परमेश्वर समज.

अखंड हरिनाम घेत राहिल्यास अंतःकरण शुद्ध राहते आणि शेवटी मोक्ष मिळतो.

तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचा हा मार्ग अनुभवला तर चुकायचं काहीच कारण नाही.

श्री स्वामी समर्थ रामदास यांचा सार्थ दासबोध मधील एक श्लोक:

🌼 अभंग:
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य तें सर्वभावें करावें ।।

🌿 शब्दशः अर्थ:
मना सज्जना – हे सज्जन मन!
भक्तिपंथेचि जावें – भक्तीच्या मार्गानेच चालावे.
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें – म्हणजेच मग श्रीहरी सहज मिळतो (स्वभावतःच).
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें – लोकांमध्ये जे निंदनीय आहे, ते सर्व सोडून द्यावे.
जनीं वंद्य तें सर्वभावें करावें – आणि जे वंदनीय आहे, ते मनापासून करावे.
🌟 सोप्या मराठीत अर्थ:
हे सज्जन मन! भक्तीच्या मार्गानेच चालत राहा.
कारण असं केल्याने परमेश्वर (श्रीहरी) सहज मिळतो.
लोकांमध्ये जे वाईट, तुच्छ, निंदनीय आहे ते त्यागा.
आणि जे चांगलं, पूजनीय आहे, त्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा.

डॉ .दिपा.
19/7/2025

10/07/2025

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥"

भाग.5
अंजू

जुन्या व जाचक वाटणाऱ्या रूढी तोडायचा प्रयत्न तिने नेहमी केला पण तो प्रत्येक वेळी फोल ठरला कारण तिच्यामध्ये त्याच्या प्रति असणारे प्रेम व समर्पण भावना हेच ते कारण.प्रत्येक गोष्टीत याला ते आवडणार नाही म्हणून सतत घाबरून सशाचे काळीज बनून घरातून वावरायची .

काळ्याशार ढगरुपी संकटाचे एक आभाळ सावट बनून आयुष्यात त्याच्या रुपात पसरले होते .

त्याला आवडायचे म्हणून त्याचे नाव तिच्या हातावर गोंदून घेतले होते .माझ्या घरात रहायचे असेल तर तोंड वर करून असे का म्हणून मला कधी विचारायचे नाही ही सक्तीची ताकीद त्याचीच होती.

जे काही असेल ते आपल्या घरच्यांसाठी आणि आपल्या या जोडीदारासाठी म्हणत दिवस पुढे जात होते जणू काही मारुन मुटकून जगणे ही रीतच झाली होती.तिला शिक्षणाची आवड होती म्हणून M.A . Economics केले होते . एक विश्वास ठेवून अंजलीने श्रीधर शी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता लग्न करण्याचा अगोदर त्याने बजावून सांगितले होते तू नोकरी केलेली मला आवडणार नाही गोष्ट तिने पण मान्य केली होती....कधीतरी तो बदलेल व आपला विचार करेल असे वाटत होते. त्याचा राग म्हणजे मनगटात गंडा आणि हातात दंडा याचाच मेळ असायचा. हिंसक पद्धतीने अंजुला वेळोवेळी मारहाण त्याने केली होती.

त्याच्यासाठी काही नवीन नव्हते. तिच्या माहेरला जाणाऱ्या परतीच्या वाटा त्याने बंदिस्त होऊन काळाच्या पडद्यात केव्हाच गाडून टाकल्या होत्या.......

तो बोलला एवढी तयार होऊन कुठे बाहेर चालली का? अंजू म्हणाली ऑनलाईन नोकरीच्या जागा सुटल्या आहेत मी अर्ज भरू का.. त्याच्या मनाला तिचा तो शब्द रुचला नाही.. रागाच्या भरात त्याच्या हातात असणारी गाडीची किल्ली मांडीत खोलवर रुतवली .हेच पाय घेऊन बाहेर पडू वाटतंय ना .....बाहेर पडलीस तर तंगड्या तोडून हातात देईन ..त्याचा तिच्या मांडीतून वाहणाऱ्या रक्ताच्या पिचकारीतीन बाहेर पडला..

ही होती आणखी एक जिवंत कथा.....

पुरुषांना बायकांचे हक्क मुळापासून खोडून टाकण्यात खरं पौरुष्य वाटते.लोक काय म्हणतील या भीतीने ती मुलगी कुठे ट्रीटमेंट घ्यायला गेली नाही.ना कुठे दाद मागितली नाही...बऱ्याच अंजली पाऊलपाउला वर तुम्हाला ही भेटतील. तुम्हाला हक्क आहे रूढी, परंपरा आदर्श व संस्कार याच्या नावाखाली एका साखदंडात बांधून बंदिस्त ठेवण्याचा....

क्रमशः.......

डॉ. दिपा.

विटा,सांगली

09/07/2025

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥"

भाग 4

इरावती

मी इरावती माझे वडील पेशाने शिक्षक होते त्यांची फिरती नोकरी..तारुण्याच्या लाटेमध्ये मी कशी वाहत गेले हे मला कळले नाही. मृगजळी स्वप्नांना मी भुलले आणि स्वतःच स्वतःची कबर खांदली .आणि तू ज्यांना काका म्हणून हाक मारते त्यांच्याशी मी लग्न केले..

एक असा काळ होता की भरपूर कामे कॉन्ट्रॅक्टर म्हणून तो घेत होता.त्या उमेदीत त्याने टुमदार असा बंगला बांधला..... सोन्यानान्या ने मला पूर्ण भरवून टाकली होती...पण पैसा हातात खेळायला लागला तसाया बाबाला बाई आणि बाटली या दोन्हीं व्यसनांनी पछाडले होते.माझ्या संसाराला लागलेली जणू ही दोन ग्रहणेच् ही...

या माणसाने जेवढे मिळवले अवघ्या काही दिवसात घालवले.पहिला आमचे घर गहाण ठेवले.ज्या भिंतीना स्वप्नांची पंख देऊन रचले ते सुद्धा आता आमचे राहिले नव्हते . एक-एक विट जशी ढासळत गेली तशाच मनातल्या आशा पण ढासळत होत्या.

दिवसभर आपल्याच भिंतीच्या कोपऱ्यांना प्रश्न विचारायचे आपले सांत्वन आपणच करायचे. मी इतकी देखणी आई तर मला चाफेकळी माझी म्हणत माझी दृष्ट काढायची..पण माझे सौंदर्य आज या माणसाला हळू हळू टोचू लागले कुठ बाहेर निघाले की सतत संशयाचे टोमणे त्यांच्या तोंडात असायचे.....चालली बघा नटून थटून तिच्या यारा भेटायला... .

घरातला बाजारहाट सुद्धा मीच करायचे मुले आज लग्नं झाली तरी जबाबदारी घेत नाहीत मी तरी काय करू म्हणजे या बोचऱ्या जाचातून सुटका होईल...आज वय माझे 55 झाले निम्मे आयुष्य जगून झाले.एक अडचण बाजूला सारली की रोज एक नवीन संकट येते.

नवरा म्हणजे देव तुझ्या संसाराची ठेव रोज मनाला समजावून सांगायचे, आणि पुढे चालत राहायचे.एवढंच हातात होते माझ्या.आपल्या मनातली कालवा कालव कोणाला सांगायची पण कुठलीच मुभा नव्हती यासाठी.काही वर्षापूर्वी मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन यांच्याशी लग्न केले याचे प्रायश्चित तर भोगत नसेन ना.......

आज सणवार आहे म्हणून म्हटलं गोडाचा स्वयंपाक करूया . कणिक मळून एक एक पोळी बनवत होते .पोळी काठोकाठ फुगायची .मी कुठे तरी त्या हवेला मार्ग करू दिला की ती पुन्हा तिचा पूर्वीचा आकार घ्यायची.या पोळीसारखें मी पण गच्च विचाराच्या हवेने तुडुंब भरली आहे.पण मला रिकामे करेल असा कोणता मार्ग माझ्या आयुष्यात आहे का नाही. विचार करतच एक एक गोष्ट हातावेगळी करत सगळा स्वयंपाक उरकला.

बाहेरून सगळे जण दमून भागून येतील..आल्या आल्या फ्रेश वाटावे म्हणून डेटॉल पाण्यात टाकून फरशीला पोचा मारून घेतला.घर स्वच्छ केले .धुणी भांडी झाडू पोचा झाला की माझ्या मनाला पण आतून बाहेरून स्वच्छ झाल्याचे भाव नेहमी मनी यायचे..

नवऱ्याची स्वारी दारात आल्याची दिसताच यांचे ताट वाढून ठेवले..तोपर्यंत यांनी आत चिखलाच्या चपला जोरात आत भिरकावून दिल्या पूर्ण दारू पिऊन आले होते ..उभाही राहता येत नव्हते.त्यांचा तोल सावरावा म्हणून मी त्यांच्या कंबरेत हात घातला तेंव्हा अंगात वीज सरकावी तसा माझा हात जोरात झटकला.तुम्ही सगळ्या बायका नालायक ,पाषाणहृदायो असता.तुम्हाला नुसता आमचा पैसा पाहिजे असतो.तुम्ही अंगावरची कपडे बदलता तसे रोज एक माणूस बदलता.मी जिला माधुरी समजत होतो ती बाजार बसावी दुसऱ्याला घेऊन भटकत होती.सगळ्या बायका सारख्याच तू माझ्या अंगाला झटू नको..म्हणत तोल सावरत होते..मी गप्पगुमान आत जाऊन तयार केलेले ताट आणले आणि जेवणासाठी त्यांना आर्जव केली. त्या माणसाला राग कशाचा आणि कोणावर आहे हे पण आजही या घडीला कळत नाही.

इतक्यात ते बरळू लागले तू दिलेले विष सुद्धा मी खाणार नाही ..असल्या ताटावर मी मुततो ..म्हणत त्या भरल्या ताटात तो खरोखर ह्या माणसाने ताटात लघुशंखा केली...सगळ्या भिंती रंगवून ठेवल्या.....

मी डोक्याला हात लावून त्या घाणेरड्या वासाने बरबटलेल्या भिंती पुसत होते...एक एक कण गोळा करत परमेश्वराची आतून क्षमा मागत...सांडलेल्या संसार त्या ताटात पुन्हा बसतोय का बघत एक एक हुंदका आत गिळत होते...भाताच्या एका एका शीताला विचारले तुमच्याही वाट्याला माझ्यासारखे विस्कटने आले बाबांनो..मी तर माझ्या नशिबाला समजून घेत आले तुम्ही पण समजून घ्या..

क्रमशः

डॉ.दिपा

विटा,सांगली

08/07/2025

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥"—

मनुस्मृती, अध्याय 3, श्लोक 56

भाग 3

इंदू

ती मला जेंव्हा जेंव्हा भेटायची तेंव्हा तेव्हा तिच्या मनातले दुःख सांगायची .वयामुळे गुडघेदुखीचा त्रास चालू झाला होता.आज माझे वय झाले पण शरीराबरोबर अनुभव पण म्हातारे झाले बघ म्हणत गप्पा मारायची .

ती शेतात राबराबून पूर्ण काळवंडलेली व काय तर अगदी सडपातळ.पण तिच्या डोळ्यांकडे बघितले की ती गोठ्यात बांधलेल्या कपिला गाई इतकी निरागस होती....

घरात तिघी बहिणी आणि एक छोटा भाऊ म्हणून बापाने डोक्यावरचे ओझे खांद्यावर करायचे म्हणून पटापट सांगून स्थळ आली की आम्हाला उजवून टाकलं..

लग्न झाले आणि माझा वनवास सुरू झाला...लग्न झाल्यावर माझ्या आयुष्यात सासू नावाची भिंत सतत अडथळा आणायची. ज्याच्याबरोबर लग्न लावले त्याचे तोंड बघायची पण बंदी बरीच वर्षे आम्हाला नवरा बायको म्हणून एकत्र सुद्धा येऊन दिले नव्हते .

तुसडेपणा तिच्या सासूच्या ठायी ठासून भरला होता.जेवायला अन्न सुद्धा भिकाऱ्यासारखे मिळायचे...कधी कधी टोपल्यातली रात्रीची शिळी भाकरी ती जनावराला टाक म्हणून द्यायची मी ती लुगड्यात गुंडाळून अंघोळीला गेले की तिथे आवाज न करता घशाखाली घालायची..

कधी अंगाला अंगभरून कपडा नसायचा आहे त्या लुगड्याला सतरा ठिगळे लावलेली असायची...गावात जरी आम्ही पाटलाच्या सुना होतो तरी हाल कुत्र्याचे ..

शेतात काम करताना चूक झाली तर कधी कधी तू ज्याला शांत आजोबा म्हणून ओळखते त्यांनी सुद्धा त्यांच्या आई समोर कितीदा तरी उसांने चोपून अंगावर वळ उठे पर्यंत मारहाण करायची...

आई बापाची परिस्थिती फार हलाकीची त्यामुळे माहेरी सुद्धा जायची मुभा नसायची.

सासरा तर त्याच्यापेक्षा तिरशिंगराव एकदा चहा थंडगार का दिला म्हणून चहाचा कप हातातून च भिरकावून दिला .

त्यावेळी माझाच हात होरपळून निघाला होता...15 दिवस तो हात काही बरा झाला नव्हता...कधी कालवणात चटणी चुकून जरी जास्त पडली सासू ने कितीतरी वेळा माझ्या खात्या ताटात पाणी ओतायचा कार्यक्रम केलेला..

एकदा तर आमच्या एका सोयऱ्याच्या लग्नाला सासू आणि सासरा गेले होते त्यांनी केलेला आहेर काय पटला नाही... असली कापडं आम्ही आंघोळीचे पाणी तापवायला वापरतो म्हणत खरोखर चुलीत घातली होती..

पण यासाठी आम्ही कधी प्रतिकार केला नाही...

आमचे हाल शेजारी पाजारी बघायचे पण मदत करायची कुणाची हिम्मत नसायची एक मास्तरीण तेवढी तिला अजिबात घाबरायची नाही तिच्यातले काही शिळेपाके भाकरी कोंडा तुझ्या शेळीला घाल म्हणून त्या माझ्या हातात द्यायच्या ..पण काय सांगू तुला अन्न शेळीला कुठले मीच शेळी बनून कितीदा तरी ते शिळे अन्न पोटात जनावराच्या गोठ्यात जाऊन खाल्लंय ...

आमची परवड आता तुमच्या पिढीला सांगून तरी काय पटणार आहे का.... ती प्रत्येक वेळी आपले दुःख माझ्याजवळ सांगत असे... तिला हलके वाटायचे..

ही इंदू 70 च्या दशकातील जरी असली तरी आजची इंदू यापेक्षा तरी वेगळे आयुष्य जगत आहे का?

डॉ.दिपा

विटा, सांगली

07/07/2025

"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥"

भाग.2
साधना तुझं काय चुकलं?

साधना भोसले, 16–17 वर्षे वय असलेली साधना 12वी ची विद्यार्थीनी. साधना आटपाडीतील खेबूडकर कॉलेज मधील ती विद्यार्थिनि होती. त्या दिवशी हॉस्टेलमधून ती आई वडिलांना भेटण्यासाठी घरी आली होती.अचानक20 जून, रात्री 9 ला सराव चाचणीचे गुण आले; आणि त्या NEET चाचणी सराव परीक्षेत साधनाला अवघे 72 गुण मिळाले आणि या गोष्टीचा राग धरून वडील व साधना यांच्यात वाद झाला.या वादात ती वडिलांना उलट सुलट बोलली..आज कालची मुले जशी उत्तरे आईवडिलांना उलटी उत्तरे देतात.आम्ही एवढे मार्क पाडतोय तुम्ही किती मार्क पाडले तुमचे आमच्या वयात असताना काय कर्तृत्व होते.असा वाद घालून मुले जणू पालकांच्या वर्मावर बोट ठेवतात.या वादातून त्यारात्री वडीलाने दगडाच्या पेस्टलने तिला मारण्याचा प्रयत्न केला; त्यात साधना गंभीर झाली .पण अशाही अवस्थेत साधनाला तसेच सोडून जन्मदाता बाप जागतिक योगा दिवस साजरा करण्यासाठी शाळेत गेला.पाठीमागे हे लेकरू सिरीयस झाले म्हणून 21 जून, सकाळी तिला रुग्णालयात दाखल केले पण तिचा मृत्यू झाला होता .22–23 जून ला सरांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने FIR दाखल केले आणि भोसले सरांना न्यायालयीन कोठडी मिळाली.

साधनाची अभ्यासात तशी फार हुशार होती 10वीत ~92.6% गुण मिळवले होते..परंतु दहावीच्या मार्क आणि NEET चे मार्क व अभ्यास पद्धती यात जमीन अस्मानाचा फरक आहे दहावीला 95 टक्के पाडणारा विद्यार्थी बऱ्याचदा 75 टक्के वर जातो हा शिक्षण पद्धतीमध्ये असणारा फरक आहे कारण अभ्यासाची काठिण्यापातळी बऱ्यापैकी उंचावलेली असते.आपले मराठी मुल त्याचा प्राविण्याचा आलेख या स्पर्धेत खाली घेऊन येते...हे आजचे नाही वर्षानुवर्षे दिसणारे ज्वलंत चित्र आहे पण समजून कोण घेतो. खरं तर इयत्ता 9 ते 12 वी हा one nation one syllabus हा पॅटर्न हवा. हेच यांच्यावरचे अचूक उत्तर असू शकेल .कारण माझ्या मराठी मुलांची टक्कर 12 वी NEET व JEE मध्ये ही ICC bord,CBSC board या मुलांशी असते...आणि कोणी काहीही म्हणो भाषेमुळे sylabus मुले मुले inferioty complex मध्ये जातात आणि त्यांचा performace ढासळत वरचेवर जातो...

पण पालक या नात्याने तुम्ही त्याच्या 10 वी च्या आणि बारावीच्या मार्कशी तुलना करत बसतो.त्यात पालक जर शिक्षक असतील तर ते आपल्या मुलाचा व स्वतः चा प्रेशर कुकर करून टाकतात.गावची पोरं शहाणी करणाऱ्या या मास्तरांच्या मुलांकडे सर्व गावाचे लक्ष असते... जाणून भुजून मास्तरच्या मुलाला किती मिळाले याकडे वरचेवर पाहणी हे एक काम केले जाते.म्हणून शिक्षक भल्या मोठ्या अपेक्षांचे शिवाळ आपल्या मुलाच्या मानेवर ठेवतात.आणि या मुलांना रोज मिळणारे शाब्दिक चाबकाचे फटके हे काही कमी नसतात.पण शेवटी त्याची क्षमता असेल तेवढीच गुणवत्ता घेऊन हा विद्यार्थी पास होतो..
..जगाला शहाणे करणाऱ्या हा लोकांचा मेंदू नेमका असतो कुठे. माझ्या hostel life मधील एक किस्सा सांगू वाटतोय एका शिक्षकाची मुलगी माझ्याबरोबर शिकायला होती.ते सर इतके काटकसरी होते की मुलीला नाश्ता करायचा असेल तर तू फक्त भूक लागली की केळी खात जा..पण इतर कुठले पदार्थ खायचे टाळत जा...कारण केली 20 रुपये डझनाने भेटायची...पण केळी खाल्ली की तिचा बालदमा उसळून यायचा याकडे ते दुर्लक्ष करायचे..आपले पैसे पैसे वाचवायचे म्हणून हा त्यांचा अट्टाहास.आम्ही पण सर्वजण हुशार तिचे वडील भेटायला येणार म्हटले की तेवढ्या दिवशी टेबलावर केळी सजवून ठेवायचो. पुन्हा महिन्याने ते भेटायला यायचे...एक दिवसाचा शो सजवण्यात आम्ही पण तिला मदत करायचो...हट्ट यांचा पण शिक्षा मुलांच्या त्या पोटाला असा तो खेळ असायचा...

बऱ्यापैकी शिक्षक लोक त्यांच्या मुलांना IIT इंजिनीयर किंवा डॉक्टर बनवण्याची स्वप्ने दाखवतात.आणि त्याचीच परिणिती अशी की मुले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत.बऱ्यापैकी शिक्षकांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेंव्हा बरेच शिक्षकपाल्य हे कर्नाटकमधून आपली वैद्यकीय शिक्षण पूर्ण करूनघेतात.आता तर परदेशातून सुद्धा शिक्षण घेण्याकडे या मुलांचा कल वाढतो आहे. ज्या मेरिट मध्ये आहोत त्या मेरिट मधून महाराष्ट्रातून तरी शिक्षक त्यांच्या मुलांची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत.

हेच शिक्षक समाजाला व तेथील लोकांना घाबरूनच जणू काय आपल्याच मुलांवर साम, दाम ,दंड,भेद याचे प्रयोग करत राहतात.असे करणे मुलांसाठी किती हिताचे आहे.

*याच्यामध्ये अजून पुढे जाऊन विचार करायचा असेल तर शाळा शाळांमधून आता मानसिक (PSA) व कौन्सेलिंग सेवा बळकट करणे गरजेचे आहे..

*पालकांसाठी संवाद कौशल्ये आणि मूलविषयक संभाषण प्रशिक्षण

*स्थानिक पातळीवर व बालकल्याण समितींच्या माध्यमातून सतर्कता वाढवणे ही तितकेच गरजेचे वाटते.

डॉ.दिपा
विटा,सांगली

05/07/2025

"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥"
— मनुस्मृती, अध्याय 3, श्लोक 56

📜 शब्दशः मराठी अर्थ:
यत्र – जिथे
नार्यः – स्त्रिया
तु – खचितच / खरंच
पूज्यन्ते – पूजल्या जातात / आदराने वागविल्या जातात
रमन्ते – रमतात / प्रसन्न होतात
तत्र – तेथे
देवता: – देवता
यत्र एता: तु न पूज्यन्ते – ज्या ठिकाणी या स्त्रिया पूजल्या जात नाहीत
सर्वाः तत्र अफला: क्रियाः – तेथील सर्व क्रिया निष्फळ होतात
🌸 मराठीत सुलभ अर्थ:
"ज्या घरात किंवा समाजात स्त्रियांचा सन्मान आणि पूजन केले जाते, तिथे देवताही आनंदाने वास करतात. पण ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मान दिला जात नाही, तिथे केलेले सर्व शुभकार्य निष्फळ ठरतात."

🧭 (संदेश):
या श्लोकाचा संदर्भ आपल्या दैनंदिन जीवनाशी लावायला गेले तर आताच्या स्त्रियांना या श्लोकात जसे सांगितले आहे त्या दर्जाचे स्थान मिळते का याचा विचार करण्याची गरज आहे.
अलीकडची ताजी उदाहरणे आपण घेऊयात .यानिमित्ताने स्त्रियांच्या अंतरंगातील ज्वालामुखी रोज नव्याने कसा उसळून बाहेर पडतोय हे बघूया.या लेखमालिकेत आपण सर्व जिवंत कहाण्यांची मालिका वाचणार आहोत.

1) वैष्णवी हगवणे...
आई वडिलांनी लडिवाळाने वाढवले गेलेले लेकरू सासरच्या लोकांनी सासरी छळून कुस्करून मारले असेच म्हणावे लागेल.
आज ती या जगात नाही पण तिच्या वाट्याला जे त्यांनी दिले त्याचा आशीर्वाद म्हणजे त्या कुटुंबाची आपल्या देशात निघालेली मानहानी रुपी धिंड.
कदाचित चुकली असेल तीसुध्दा पण तुमचे दिवटे असे कोणते परिपूर्णतेचे पुतळे होते याचे सामाजिक भान ठेवले असते तर एक कळी उमलायच्या आत चितेत जळाली पण.
त्या काळामध्ये एका ब्राह्मण लेखकाने एक लेख लिहला होता....
आईशप्पथ तुम्हाला सांगतो या ठिकाणी नरवणे असता तर अख्खा महाराष्ट्र पेटविला असता...हगवणे आहे म्हणून सारे कसे निमूटपणे चालले आहे....

ते वाक्य माझ्या काळजाला इतके लागले की कितीतरी दिवस त्याच्यावर विचारमंथन करण्यात गेले शब्द तिखट असले तरी हे वाक्य खऱ्या बाजूची बोचरी शाल पांघरूण बसले होते.

आम्हा मराठ्यांच्या लेकी सुनांना संस्काराच्या शिदोरीत एक डोस नेहमी पाजला जातो " बायांनो जाती साठी माती खा"
जसं असेल तसं स्वीकारून संसार नेटका करायचा प्रयत्न करा... भले तु तिथे जरा होरपळली तरी चालेल..
आमचे जातबंधव मिरवणुका जयंत्या साजऱ्या करत असताना गाडीचे सायलेन्सर काढून धूर फेकत आपण वाघाची वंशावळ आहोत हे गर्जून सांगतात...पण पोटच्या पोरीला कधी हा सांगत नाहीत की तू वाघाची "बछडी" आहेस ....वेळप्रसंग बघून तुझी वाघनखे बाहेर काढ....
तिच्यावर लहानपनापासून एकच संस्कार केला जातो
जसे असेल तसे राहायचे.तू जर अशी वागली तर समाजात आमची काय इज्जत राहील."इज्जत" हा शब्द ओशाळलेल्या ढगासारखा वाटतो....आणि याच इब्रतीसाठी आमच्या पोरी घरोघरी जाळल्या जातात...

माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगावीशी वाटते .लहान असताना आमच्या शेताच्या वाटेवर एक पडकी विहीर लागायची .विहिरीत पाणी होते..पण त्याचा शेतीसाठी पण कोणी वापर करायचे नाही.माणूस तर लांब पण साधे जनावर पण तिकडे फिरकायचे नाही.

मी एके दिवशी माझ्या आईला विचारले या विहारीची अशी अवस्था का..लोक इथे जायला घाबरतात का...तिने एक गोष्ट सांगितली खूप वर्षापूर्वी एक खूप सुंदर बाई या गावात संसार करायला आली होती..तिचा नीटनेटकेपणा,उठावदारपणा काही नतभ्रष्ट माथेफिरून रुचला नाही.तिची जिरवायची म्हणून कुणीतरी तिची कळ
काढली पण ते भांडण गावाच्या पंचासमोर पेटून उठले
पण त्या भांडणात तिच्या कपड्यांची चिरफाड झाली... आख्या गावासमोर आपण उघडे पडलो हे तिला सहन झाले नाही आणि तिने याच विहिरीत आत्महत्या केली बघ मग त्या खोड काढणाऱ्या माणसांना पोलिसांनी शिक्षा दिली असेल होय ना ग मी म्हटले..तसे झाले नाही बाळा..ते सर्व प्रकरण पंच लोकांनी आतल्या आत दाबून ठेवले गेले....तिला न्याय नाहीच मिळाला ना मग......
तसे नसते बाळा या जगात तू जी पण चांगली वाईट कामे करशील याचा सर्व हिशेब परमेश्वर ठेवतो बघ .तिला सरतेशेवटी न्याय मिळाला ना ...तोही देवाच्या दारात...ज्यांनी कारण नसताना छळले ....त्याचा वंश वाढला नाही...आणि त्याचा मृत्यू फार दैनीय व वाईट झाला...
पण आमच्या कितीतरी लेकीबाळी पुरुषी अहंकार,
सासू व नंदेचा छळकपट या कारणाने मातीत परत सामावल्या......

मुळात

स्त्रियांचा सन्मान हा संस्कृतीचा पाया आहे हे आपण विसरलो आहोत.
तिचा आदर, सन्मान, सुरक्षितता हे आता कुणाला तितके महत्वाचे वाटत नाही.

ज्या समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, तिथे नैतिक व आध्यात्मिक अधःपतन होतो, ही शिकवण आपली पुराणें देतात.पण लक्षात कोण घेतो.
आधुनिक काळात हा श्लोक gender equality,
women empowerment,
family values
यावर भाष्य. आणि विवेचन करत असताना दिसतो

परवा मला मनिषा भेटली admit होती तासभर गप्पा मारत होती....सलाईन संपली आणि जाता जाता मला म्हणाली बरं झालं मला पोरगी दिली नाही देवाने...तिला तळहाताच्या फोडा सारखे जपाआणि जीव घ्यायला कसायाच्या दारात बांधा .....

मी म्हटले तुझ्या दोन पोरांच्या बरोबर लग्न करायसाठी कोणालातरी दोन पोरी जन्माला घालायला लागणारच की ....तुला सासू बनायला आवडतं खमकी आई बनायला नको...ती हसायला लागली..तुमच्यासारख्या बायकाच तिचे जन्माला येणे नाकारता हे फार वाईट आहे ...

जगराहाटी चालायची असेल तर तिचे जन्माला येणे नाकारू नका.......

क्रमशः

डॉ दिपा.

विटा,सांगली .

Address

Vita

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Deepa Shirgaonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category