Dirghayu Ayurved Chikitsalay and Panchkarma center

Dirghayu Ayurved Chikitsalay and Panchkarma center Ayurveda Healthcare centre Dirghayu Ayurved Chikitsalay and Panchkarma centre is health care centre present in the heart of your city.

It helps you to stay healthy and fit with its Medication, Detoxifying procedures and enormous care.

https://youtube.com/?si=OHQD-Is176eczUjO
23/10/2024

https://youtube.com/?si=OHQD-Is176eczUjO

This channel is run by Ayurveda Physician. The main moto of the channel is making people aware about treatments in Ayurveda. This channel will give you authentic information which is depicted in Ayurveda literature. Stay tuned.... You can comment your problem. We will try our best to resolve it.

08/08/2024

☘️आयुर्वेदाचे बोल 🕊️

🌼खैय्के पान बना रस वाला....🌼

‘आपला देश’ किती विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोशाख, खाद्यपदार्थ, व्यंजने! हे सर्व खाद्यपदार्थ तिथल्या वातावरणाला, तेथील लोकांच्या प्रकृतीला अनुसरून बनवलेले. खरच आपले पूर्वज किती बुद्धिमान होते हे पदोपदी लक्षात येतं. सगळी कडे वेगवेगळे व्यंजनं असली तरी सगळी कडेच गुरु म्हणजे भरगच्च जेवणानंतर सारखंच खाल्लं जातं ते म्हणजे तांबुल किंवा पान.
काही दिवसांपूर्वी एका समारंभात गेलो होतो. तिथे आपलं नेहमी सारखं जेवणाच्या स्टॉल बरोबर आईस्क्रीम चा स्टॉल....आमचे जेवण आटोपली आणि ग्रुप निघाला आईस्क्रीम कडे! माझा हात पकडून एक मैत्रीण मला घेऊन निघाली.
“मी नही गं खाणार?” मी
“बसं गं ....चल मस्त आईस्क्रीम खाऊयात, तुझं नेहमीच असत, फास्ट फूड नाही खाणार, हे नाही खाणार ते नाही खाणार अँड ब्ला...ब्ला...ब्ला...” मैत्रीण. आम्ही एकच हसलो.
“पान असेल तर खाईन.” मी
“हे बरय! डॉक्टर साहेब पान खातील पण आईस्क्रीम नको.” पान तर हेल्थ साठी खराब असत ना.”? तिला समजावून सांगण्याची ती वेळ नव्हती आणि जागाही. मी आपली गप्प बसली. पानाचा बोकणा होताच तोंडात.
आम्ही घरी आलो पण “हेल्थ साठी पान खराब असत ना” हे तिचे वाक्य माझ्या डोक्यात फिरतच होते. पान हे हेल्थ साठी कधीच खराब नव्हतं. जो पर्यंत आपण त्यात तंबाखू, जर्दा टाकला नाही. तांबुल किंवा पान हे कफ वातहर असत. तांबुल खाल्ल्याने पचन सुधारते. आवाज चांगला होतो (म्हणजे बसला असेल तर), मुख स्वच्छ होण्यास मदत होते. मुखाचा दुर्गंध जातो. पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय बऱ्याच आयुर्वेदिक औषधात नागवेली पत्र म्हणजे पानाचा उपयोग केला जातो. पानात टाकण्यात येणारे जिन्नस पण शरीरासाठी योग्य असतात. जसे काथाने तोंड आले असल्यास फायदा होतो, चुन्यामध्ये कॅल्शियम प्रचुर मात्रेत असत. सोफ व ओवा अग्नी वाढवणारा असतो.
या उलट आईस्क्रीम! गरम गरम जेवणानंतर लगेच थंडगार आईस्क्रीम हे विरुद्ध असत. शिवाय जी अग्नी उदरात पेटली आहे, जी अन्न पचवणार आहे तिच्या वर आईस्क्रीम टाकून आपण विझवून टाकतो. ज्यामुळे अपचन होऊन अनेक व्याधी निर्माण होतात. बऱ्याच घरांमध्ये जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याचे रुटीन असत. जर असच रोज राहील तर बिपी, शुगर, लठ्ठपणा आलाच म्हणून समजा.
वेस्टर्न कल्चर फोल्लो करण्यापूर्वी एकदा शहानिशा करून मगच फोल्लो करा.

टीप – अम्लपित्त, पित्ताचे आजार, जळजळ असणार्यांनी तांबुल सेवन टाळावे.

वैद्या . मयुरी देशपांडे
एम.डी (कायाचिकित्सा), दीर्घायू आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म सेंटर, रामनगर, वर्धा.

15/04/2024

🕊️आयुर्वेदाचे बोल ☘️

🌼चिकित्सा नास्ति निष्फला |🌼

आयुर्वेद हे खरचं लाईफ सायन्स आहे. प्रोफेशनली आपण कसं असावं हे तर शिकवतोच शिवाय मनुष्य म्हणून पण कसे असावं हे पण सांगतो. याचा प्रत्यय प्रत्येक वेळीच येत असतो. काही वेळा शब्दात मांडायला वेळ नसतो तर काही वेळा शब्दच नसतात....
असाच एक अनुभव इतक्यात आला. कम्प्लेंट होती infertility ची. रुग्ण खूप दुरून माझा कडे आली होती. रुग्णेचा जॉब खूप धावपळीचा. कुठे पण ड्युटी कधी पण ड्युटी अशा प्रकारचा. रुग्णेला अजूनही खूप काही त्रास होते. खूप महागड्या ट्रीटमेंट घेऊन झाल्या पण काही केल्या पाळणा हले ना. दोघे पण खूप त्रासले होते. दुखी होते. बाईच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू गळत होते. “ काही पण द्या माम मी काही पण करायला तयार आहे” अस त्या म्हणायच्या. आजकाल वंद्यत्वाचे खूप पेशंट बघायला मिळतात. स्ट्रेस आणि खानपान हे मुख्य कारण आहे असं मला वाटतं. नाईलाजास्तव म्हणा किंवा जीभेस्तव म्हणा आपण हे विषारं पोटात घेतो आणि खूप पैसा कमावण्याच्या इच्छेने लाईफ सेटल करायच्या इच्छेने स्ट्रेस फुल जॉब्स किंवा व्यवसाय पण करतो.
बाई खूप दुरून यायच्या आणि ट्रीटमेंट घ्यायच्या. त्यांना बऱ्या पैकी आराम हि होता. पण मला वाटायचं कि या जास्त दिवस चिकित्सा घेणार नाही. असं वाटायला कारण हि होत ते म्हणजे त्यांचे राहणे खूप दूर असणे. मी त्यांना तिथले डॉक्टर्स पण suggest केले होते. फॉलो अपस पण व्यवस्तीत होणे गरजेचे असते आणि खरचं तसचं झालं त्यांनी दीड महिने ट्रीटमेंट घेतली आणि परत आल्याचं नाही. मग बऱ्याच महिन्यांनी आल्या. त्यांचे कुणी रीलेटिव वर्धेतच आहेत तर त्या आलेल्या होत्या. “कशा आहात तुम्ही”? मी. “मी ठीक आहे माम. तुम्ही कशा आहात”? “मी पण मस्त!” इति मी. “तुमचा प्रोब्लेम झाला का सोल्व?” मी. “नही माम मी अमुक अमुक ठिकाणी ट्रीटमेंट घेतेय.” दबक्या स्वरात पेशंट म्हणाल्या. “तुम्हाला भेटायला आले होती मी. दोन दा आली होती तुम्हाला भेटायला पण आपली भेट नही झाली”. मी “ओह” मे बी मी काही कामात असेल." मग थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या अगदी मैत्रिणीन सारख्या. “निघता निघता आमच्या गावी आले कि या, मी घ्यायला येईन तुम्हाला. काही स्पॉटस पण दाखवेल” . “नक्की”, मी होकारार्थी मान हलवली.

“क्वचित् धर्म क्वचित् मैत्री क्वचित् अर्थ क्वचित् यश!
कर्माभ्यासं क्वचितश्चेति चिकित्सा नास्ती निष्फला!!”

रुग्णाच्या सेवेने किंवा चिकित्सेने कधी धर्म, कधी मैत्री, कधी पैसा, कधी यश मिळत. हे काही मिळालं नाही तर अभ्यास तर नक्कीच होतो. इति आ. चरक

वै. सौ. मयुरी देशपांडे,
दीर्घायू आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म सेंटर, रामनगर, वर्धा.
९१३०२९२९४९

10/01/2024
https://youtu.be/cH6pRDYQ_gw
23/12/2023

https://youtu.be/cH6pRDYQ_gw

In this video, we'll be discussing the Ayurveda-based technique of Virechana. Virechana is a detoxification procedure that is used to cleanse the body and re...

08/12/2023

☘️आयुर्वेदाचे बोल🕊️

*हर सही जवाब आपको पाहुचायेगा स्वास्थ्य कि ओर...*

आयुर्वेद वैद्या कडे जायचंय म्हंटल कि प्रश्न विचारलेच जातील याची मनाशी गाठ मारून च जावं. अर्थात रुग्ण इतिहास च असतो तो! बरेच रुग्ण अगदी घोड्यावर बसून येतात. हो ला हो नही ला नाही अशा प्रकारचा संवाद असतो. चेहर्या वरचे हावभाव ...इससे क्या होगा अशा प्रकारचे....
एक महिन्या अगोदर अशाच एक महिला रुग्ण, घोड्यावर बसून आल्या. तक्रार होती फ्रोझेन शोल्डर ची! खूप औषध घेतले काही बरच नाहीये. काहीतरी द्या ज्याने लवकर बर वाटेल. मी आपलं रुग्ण इतिहास घेणे सुरु केले. तर उत्तरे उडवा उडवीची...त्यांच्या चेहरा वरून त्यांना खूप बोर होतंय असं दिसत होतं. वाटलं तर हो म्हणायचं नाहीतर नाही असं काहीसं सुरु होतं. रुग्णालाच काही इंटरेस्ट नाहीये हे बघून मी आपलं औषध दिलं, काही पथ्य अपथ्य सांगितलं आणि माझा मोर्चा बाहेर बसलेल्या रुग्णाकडे वळवला. त्या नंतर परत रुग्ण सात दिवसांनी आली. काहीच बरं नाहीये असं तीचं म्हणनं होतं. फक्त हलकं हलकं वाटतेय म्हणायची. मी हि रुग्ण माझी म्हणून मोजतच नव्हती कारण साहजिक आहे कि बरं नाही वाटल कि दुसरा तज्ञ्य शोधणार. आयुर्वेदाने तसही सांगितलयं कि जे रुग्ण ऐकत नाही...स्वतःला डॉक्टर समजतात ते त्याज्य आहेत. पण तरी जवळ पास एक महिना हे सत्र सुरु होतं. तिनी यायच मी औषधं द्यायचं. नंतर कळलं कि तिच्या जावयाने एकदा दाखवलं होतं अन त्यांना बरं होतं अन बाईंचा खर्च पण तेच करतात. एकदा दोघे सोबत आले.... कदाचित शेवटचं बघुया असा विचार असावा....मी त्यांना म्हंटल आज आपण परत एकदा हिस्टरी घेऊया पण या वेळी बरोबर उत्तर द्यावे लागतील. मागच्या वेळी सारखं नाही चालणार नाहीतर तुम्हाला कधी च बरं नाही वाटणार. बाई तयार झाल्या. खाण्यात काय असतं रोज विचारलं तर म्हणे काही नही आपलं तेच वरण भात भाजी पोळी.....जावई लगेच बोलले रोज काहीतरी गोड लागतं यांना. गोडा शिवाय तर होतचं नाही. माझं काम झालं मी आपला सुटकेचा निश्वास सोडला. काकू हे रोजचं गोड खाणं बंद करा आणि हि टेस्ट करून उद्या रिपोर्त्स घेऊन या. दुसर्या दिवशी बाई रिपोर्ट घेऊन आल्या. रिपोर्त्स ने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. HBa1C ची व्हल्यू गगनाला भिडली होती...औषधं तर योग्य अशीच चालली होती पण हेतू जो पर्यंत बंद होणार नव्हता तो पर्यंत काहीच होणे शक्य नव्हते. तिथून सात दिवसांनी परत बाई आल्या आपल्या फ्रोझेन शोल्डर असलेल्या सखी ला घेऊन...न मी काही बोलण्या पूर्वीच “हर सही जवाब आपको पाहुचायेगा स्वास्थ्य कि ओर” अशा आशयाचं त्यांनी आपल्या मैत्रिणीला सांगितलं.

'निदान परिवर्जन' ही चिकित्सेची पहिली पायरी आहे.

वैद्या मयुरी देशपांडे
एम डी (कायचिकित्सा)

Diabetes संबंधित पूर्ण माहिती....💯 आमच्या यूट्यूब चॅनल वर...?
20/10/2023

Diabetes संबंधित पूर्ण माहिती....💯 आमच्या यूट्यूब चॅनल वर...?

This videos will tell you the authentic information about ayurveda. This channel is runned by Registered Ayurved doctors/ practitioners.

उपवास....
10/09/2023

उपवास....

Our country is a country of festivals. Rituals and keeping fast is inseparable content of it. This video will tell you the proper way of doing Upwas which wi...

☘️आयुर्वेदाचे बोल 🕊️🪷स्तनपान आठवडा निमित्ताने 🌈                       “आई ग, बघ ना बाळाच पोटच नाही भरत, सारखा रडत असतो.”...
03/08/2023

☘️आयुर्वेदाचे बोल 🕊️

🪷स्तनपान आठवडा निमित्ताने 🌈

“आई ग, बघ ना बाळाच पोटच नाही भरत, सारखा रडत असतो.” रडक्या सुरात जिया आईला म्हणाली. "काय बाई आजकाल दुध च येत नाही बायकांना. आमच्या वेळी अस नव्हतं बर का बाळाला वरच काही देण्याची गरजच भासत नव्हती. काय ते फोर्मुला मिल्क आणि काय काय..."
असल्या प्रकारचा संवाद बहुतेक प्रत्येक घरातून ऐकायला मिळतो. सुवर्णप्राशना साठी येणाऱ्या बहुतेक माता आपलं दुख सांगतात. काय करू काय नाही असं आयांना होत आणि साहजिक पण आहे ते. पण खरच का हे अस होत असेल. इंथून १५-२० वर्षापूर्वी क्वचितच अस व्हायचं म्हणे. याचे आयुर्वेदानुसार उत्तर देण्याचा छोटासा यत्न मी करतेय....
दुध न येण्याचे कारणांमध्ये खूप कामाचा व्याप, दगदग, खूप टेन्शन घेणे या गोष्टी जास्त कारणीभूत असतात. आजकाल प्रत्येकच वर्किंग आई तीन साडे महिन्यात आपल्या कामावर जॉईन होते. डिलिव्हरी झाल्यानंतर हि कस होईल, आपण करू शकू का, आपण बाहेर गेलो तर बाळ राहील का, किवा काम नाही केलं तर आर्थिक तंगी वाढेल का कि आपण आपल कौशल्य विसरू असे एक ना अनेक विचार...विचारांची मांदियाळीच जणु.......
आयुर्वेद नुसार आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू आहेत.या प्रत्येकाचे उपधातु देखील सांगितले आहेत....आयुर्वेदानुसार उपधातूंना देखील तितकेच महत्त्व आहेत....यानुसार रस चा उपाधातू स्तन्य आहे. हे धातू जर बिघडले तर त्याचे उपधातू पण बिघडणारच ! रस बिघडण्याची कारणानमध्ये 'चिन्त्यानां च अतिचिंतनात्' म्हणजे खूप काळजी करणे, स्ट्रेस घेणे हा देखील महत्त्वाचा हेतू आहे. विशेष म्हणजे या वेळची थिम ' encouraging breast feeding empowering working parents' अशी आहे. खरच या फेस मध्ये खूप स्ट्रेस असतो. आणि आपण ज्या मानसिक स्थितीत असाल त्याचा परिणाम दुधाद्वारे बाळावर पण होऊ शकतो.
So take a chill pill and enjoy....

गुरू शीतं अतिस्निग्धं अतिमात्रं समश्नतां|
रसवाहिनी दुष्यन्ति चिंन्त्यानां च अतिचिंतनात्||

वैद्या मयुरी देशपांडे
दीर्घायु आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म उपचार केंद्र
रामनगर
वर्धा

03/08/2023

☘️आयुर्वेदाचे बोल 🕊️

🪷स्तनपान आठवडा निमित्ताने 🌈

“आई ग, बघ ना बाळाच पोटाच नाही भरत, सारखा रडत असतो.” रडक्या सुरात जिया आईला म्हणाली. "काय बाई आजकाल दुध च येत नाही बायकांना. आमच्या वेळी अस नव्हतं बर का बाळाला वरच काही देण्याची गरजच भासत नव्हती. काय ते फोर्मुला मिल्क आणि काय काय..."
असल्या प्रकारचा संवाद बहुतेक प्रत्येक घरातून ऐकायला मिळतो. सुवर्णप्राशना साठी येणाऱ्या बहुतेक माता आपलं दुख सांगतात. काय करू काय नाही असं आयांना होत आणि साहजिक पण आहे ते. पण खरच का हे अस होत असेल. इंथून १५-२० वर्षापूर्वी क्वचितच अस व्हायचं म्हणे. याचे आयुर्वेदानुसार उत्तर देण्याचा छोटासा यत्न मी करतेय....
दुध न येण्याचे कारणांमध्ये खूप कामाचा व्याप, दगदग, खूप तेन्सिओन घेणे या गोष्टी जास्त कारणीभूत असतात. आजकाल प्रत्येकच वर्किंग आई तीन साडे महिन्यात आपल्या कामावर जॉईन होते. डिलिव्हरी झाल्यानंतर हि कस होईल, आपण करू शकू का, आपण बाहेर गेलो तर बाळ राहील का, किवा काम नाही केलं तर आर्थिक तंगी वाढेल का कि आपण आपल कौशल्य विसरू असे एक ना अनेक विचार...विचारांची मांदियाळीच जणु.......
आयुर्वेद नुसार आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू आहेत.या प्रत्येकाचे उपधातु देखील सांगितले आहेत....आयुर्वेदानुसार उपधातूंना देखील तितकेच महत्त्व आहेत....यानुसार रस चा उपाधातू स्तन्य आहे. हे धातू जर बिघडले तर त्याचे उपधातू पण बिघडणारच ! रस बिघडण्याची कारणानमध्ये 'चिन्त्यानां च अतिचिंतनात्' म्हणजे खूप काळजी करणे, स्ट्रेस घेणे हा देखील महत्त्वाचा हेतू आहे. विशेष म्हणजे या वेळची थिम ' encouraging breast feeding empowering working parents' अशी आहे. खरच या फेस मध्ये खूप स्ट्रेस असतो. आणि आपण ज्या मानसिक स्थितीत असाल त्याचा परिणाम दुधाद्वारे बाळावर पण होऊ शकतो.
So take a chill pill and enjoy....

गुरू शीतं अतिस्निग्धं अतिमात्रं समश्नतां|
रसवाहिनी दुष्यन्ति चिंन्त्यानां च अतिचिंतनात्||

वैद्या मयुरी देशपांडे
दीर्घायु आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म उपचार केंद्र
रामनगर
वर्धा

11/07/2023

💫आयुर्वेदाचे बोल 🕊️

🌺उचलली जीभ लावली टाळ्याला....🌺

आता दोन दिवसांपूर्वी एका आघाडीच्या वर्तमान पत्रात बातमी वाचली, 'आयुर्वेदिक काढ्याने पिता पुत्राचा मृत्यू.....' घटना वाईटच घडली...त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! पण हेडलाईन काही मला पचली नाही. लगेच मी लिंक ओपेन केली. वाचता वाचता कळले कि त्यांनी सकाळीस नोन- व व्हेज चा बेत केला आणि रात्री लगेच पुरणाची पोळी खाल्ली. आणि त्यानंतर कुठला तरी काढा प्यायले. पण बातमीदाराने सरळ सरळ आयुर्वेदिक काढ्याची हेडलाईन टाकली....आयुर्वेदाने मला इतकं दिलंय माझे पण काही देणं लागतं. त्याला अनुषंगून हा लेख....
पहिला मुद्दा - आपणच विचार करा, एखादा आजार दुरुस्त करायचा म्हणजे आयुर्वेदाला कित्ती वेळ लागतो (तुमच्या विचारानुसार मी अस मानत नाही, कारण आपण खूप दिवसाचे अंगावर काढलेले असते...खूप अपथ्य सेवन केलेले असते. जेवढा रोग जुना तेवढा मुळासकट काढणे कठीण!) मग कस काय हो काढा घेतला अन लगेच मृत्यू झाला असेल अन तो हि फक्त १५ मिनटात !
दुसरा मुद्दा – अग्नि चा विचार आताच पावसाला सुरु झाला आहे. या दिवसात प्रत्येकाला भूक कमी लागते. आपण च म्हणतो ना ‘जे पिंडी ते ब्रम्हांडी’ अंड वीसे वेरसा! पावसाळ्यात सुर्यनारायण कधी दिसतात कधी नाही दिसत. तसच शरीरातील अग्नि च होत. अग्नि म्हणजे भूक सोप्याभाषेत सांगायचं झालंतर. पावसाळ्यात हि अग्नि मंदच असते. आणि जर हे भारी अन्न पचलं नाही तर त्याच अन्नविष तयार होत. मांस तर चांगली अग्नि असणार्यांनी पण पावसाळ्यात न खाल्लेले बरे. कारण मांस हे पचण्यास खूपच जड असतं. या दिवसात शुद्ध शाकाहार करावा. जेणे करून खालेले पचेल. पुरण पोळी हि देखील पचण्यास जड असते. हरबर्याची दालेपासून बनलेली असते. शरीरात दाह म्हणजे जळजळ निर्माण करणारी असते. म्हणून त्यावर साजूक तूप खाण्याची पद्धत आहे. शिवाय बरेच लोक मांसाहार केल्या नंतर गोड खाणे टाळतात. कारण मूळतः मधुर रस हा पचण्यास जड असतो.
तिसरा मुद्दा – food poisoning - पावसाळ्यात आपण जो काही आहार घेतो तो स्वच्छ असावा असाच आग्रह असतो. कारण पावसानंतर बरेच ठिकाणी पाणी साचतं. नळातून येणारं पाणी पण उकळून घ्या असं आपण सांगतो कारण या दिवसात microorganisms ला वाढण्यासाठी चांगली संधी असते. मांसाहार करायचाच असेल तर मांस स्वच्छ करून खूप उकळून खावे.
हे इतके सगळे मुद्दे असताना आयुर्वेदीक काढाच का म्हणून लिहावा. उद्या कुणाचा वर्तमान पत्र वाचतांना heart attack ने मृत्यू होईल तर आपण काय अशी बातमी पचवू शकू कि अमुक अमुक वर्तमान पत्र वाचल्याने एकाचा मृत्यू !

वैद्या मयुरी अ. देशपांडे
दीर्घायू आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म सेंटर
रामनगर, वर्धा
९१३०२९२९४९

Address

Renukai, Trimurti Chowk, Ramnagar
Wardha

Telephone

+919146131519

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dirghayu Ayurved Chikitsalay and Panchkarma center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dirghayu Ayurved Chikitsalay and Panchkarma center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram