Shatavari Ayurved

Shatavari Ayurved We are Shatavari Ayurved ,We believe in scientific treatment of patients with Ayurved based on knowl

दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।दीपो हरतु मे पापं दीपज्योति नमोऽस्तु ते।।शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसंपद...
01/11/2024

दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं दीपज्योति नमोऽस्तु ते।।
शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसंपदा ।
द्वेषबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते ।।

दीपोत्सव के पावन पवित्र पर्व पर आप सभी को तत्पुरुष मर्यादापुरुषोत्तम श्रीराम का आशीर्वाद तथा आद्याशक्ति जगदम्बा माँ की असीम अनुकंपा प्राप्त हो । ईश्वर से इसी प्रार्थना के साथ, आप सभी को सपरिवार दीपोत्सव की हार्दिक मंगलकामनाएँ |
🙏शुभ दीपावली🙏

शास्त्र ज्ञानशिवाय  शस्त्र वापरता येत नाही,शस्त्र वापरताना शास्त्र ज्ञान आवश्यकच आहे,असा तो  जाणणाराच खरा वैद्य आहे.*"यत...
12/10/2024

शास्त्र ज्ञानशिवाय शस्त्र वापरता येत नाही,
शस्त्र वापरताना शास्त्र ज्ञान आवश्यकच आहे,
असा तो जाणणाराच खरा वैद्य आहे.

*"यतो धर्म ततो जय:"*

# शस्त्रपूजन
#विजयादशमी
#दसरा

12 October जागतिक संधिवात दिवस
12/10/2024

12 October जागतिक संधिवात दिवस



आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्...
12/10/2024

आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।
वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्।
पश्चाद्‌ रावण कुम्भकर्ण हननम्‌, एतद्धि रामायणम् ||

भवतां सर्वेषां कृतेSपि विजयदशम्‍या: हार्दिकी शुभकामना ||

*किं स्तौमि त्वां गणाधीश योगशान्तिधरं परम् । वेदादयो ययुः शान्तिमतो देवं नमाम्यहम्॥*गणाधीश ! आप योगशान्तिधारी उत्कृष्ट द...
07/09/2024

*किं स्तौमि त्वां गणाधीश योगशान्तिधरं परम् । वेदादयो ययुः शान्तिमतो देवं नमाम्यहम्॥*

गणाधीश ! आप योगशान्तिधारी उत्कृष्ट देवता हैं, मैं आपको क्या स्तुति कर सकता हूँ ! आपकी स्तुति करने में तो वेद आदि भी शान्ति धारण कर लेते हैं अतः मैं आप गणेश देवता को नमस्कार करता हूँ ।
🙏🏻

दुर्वा ही गणपतीला  सगळ्यात आवडती वनस्पती सांगितली जाते त्यामुळे या वनस्पतीला गणपतीच्या पूजना मध्ये खूप महत्व आहे दुर्वा ...
06/09/2024

दुर्वा ही गणपतीला सगळ्यात आवडती वनस्पती सांगितली जाते त्यामुळे या वनस्पतीला गणपतीच्या पूजना मध्ये खूप महत्व आहे दुर्वा ही अतिशय थंड गुणधर्माची वनस्पती आहे त्यामुळे ती वात पित्त कफ या तिन्ही विकारावर अतिशय गुणकारी ठरते बगीच्यामध्ये गवतात या दुर्वा असतात म्हणून कित्येकदा डॉक्टर डोळ्यांचे विकार असणाऱ्या ना गवतावरून चालायला सांगतात थंडगार दुर्गावर चालल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते पोटांच्या विकार देखील गुणकारी ठरते याशिवाय गर्भपात उदररोग अतिसार रक्त पित्त प्रदर गर्भस्राव अधिविकारावर उपयुक्त ठरते तसेच कांतिवर्धक म्हणूनही याचा उपयोग होतो असे आयुर्वेदात सांगितले आहे. 🌻Aim of ayurveda:
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतूरस्य विकार प्रषमनंच To maintain the health of healthy person and to cure the disease of diseased person.🌿

श्री गणेश पूजन आणि २१पत्री याची माहिती*१. मधुमालती / मोगरा*मधुमालती म्हणजे मालती किंवा चमेली (शास्त्रीय नाव - Jasminum s...
06/09/2024

श्री गणेश पूजन आणि २१पत्री याची माहिती

*१. मधुमालती / मोगरा*
मधुमालती म्हणजे मालती किंवा चमेली (शास्त्रीय नाव - Jasminum sandac/Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

*२. भृंगराज / माका*
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

*३. बिल्व / बेल*
बेलाची पाने (Aegle Marmelos). बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतडय़ाच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

*४. दूर्वा*
दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

*५. बदर / बोर*
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus jujuba /Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

*६. धत्तूर / धोत्रा*
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura metale/ Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

*७. सुरसा / तुळस*
तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

*८. शमी*
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.

*९. अपामार्ग / आघाडा*
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाडय़ाचा क्षार हा अर्श, मूत्राशमरी यांत उपयुक्त आहे. याच्या बियांची खीर भस्मक सारख्या आजारांत वापरतात. आघाडय़ाचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

*१०.बृहती / डोरली*
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). खोकला आणि दम्या सारख्या आजारांत हे औषध उपयुक्त आहे. पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांत याची भाजी येते.

*११. करवीर / कण्हेर*
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). अर्धांगवात, पक्षाघात यासारख्या गंभीर आजारा

*बैल-पोळा*मुक्या जनावरांप्रती आपल्या संस्कृतीत आलेला आदरभाव म्हणजेच बैल पोळा.या पोळ्याचे सणांच्या निमित्ताने अधिकाधिक लो...
02/09/2024

*बैल-पोळा*
मुक्या जनावरांप्रती आपल्या संस्कृतीत आलेला आदरभाव म्हणजेच बैल पोळा.
या पोळ्याचे सणांच्या निमित्ताने अधिकाधिक लोकांनी सेंद्रिय गोष्टीचे सेवन करून तसेच सेंद्रिय शेती त्याला प्राधान्य देऊन आपल्या आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी प्रयत्न करावा. आपणा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

*काला आणि आयुर्वेद*आपले हिंदू संस्कृती नुसार येणारे सणवार आणि त्यावेळी केले जाणारे विशिष्ट पदार्थ ही केवळ रूढी परंपरा नस...
26/08/2024

*काला आणि आयुर्वेद*

आपले हिंदू संस्कृती नुसार येणारे सणवार आणि त्यावेळी केले जाणारे विशिष्ट पदार्थ ही केवळ रूढी परंपरा नसून त्याचा बदलत्या ऋतूशी ,हवामानाशी आणि आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे .
श्रावण महिना सुरु झाला की सणवारांची अगदी रेलचेल चालू होते आणि मग येतो श्रीकृष्ण जन्माचा उत्सव म्हणजेच जन्माष्टमी !! व त्याबरोबर येते ती बालगोपालांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची पर्वणी म्हणजे दहीहंडी !!(शतावरी आयुर्वेद क्लिनिक,औरंगाबाद)
थर लावून दहीहंडी फोडायची आणि प्रसाद खायचा हा त्या मागचा महत्वाचा हेतू ! गोपाळकाल्याची त्यादिवशी चवही अप्रतिम असते.
गोपाळकाल्यातील महत्वाचा घटक म्हणजे लाह्या हा आहे .पावसाळा सुरु झाला की नवीन येणारे पाणी पचायला जड असते आणि हवामानामुळे आपली पचनशक्ती मात्र क्षीण होते म्हणूनच श्रावण महिन्यात उपवासाचे वेगळे महत्व आहे .अश्यावेळी जे पदार्थ खायचे ते पचायला हलके हवेत म्हणून ह्या लाह्यांचे प्रयोजन .
त्यात थोडी चव हवी ,वैविध्य हवे म्हणून साळीच्या लाह्या,ज्वारीच्
या लाह्या,चुरमुरे असं सगळं एकत्र करतात.(शतावरी आयुर्वेद क्लिनिक,औरंगाबाद)
गोकुळची आठवण काढून दही,दूध ,लोणी त्यात मिसळवतात.
दही खाण्याचा विशेष हेतू म्हणजे या दिवसांमध्ये आयुर्वेदानुसार अम्ल रसाचा जास्त वापर करायला हवा म्हणून दही खायला परवानगी !
म्हणूनच काही जण काल्यात लिंबाचे लोणचेही टाकतात.नुसत दही टाकलं तर सगळ्या लाह्या दह्यातील पाणी शोषून घेतात आणि काला कोरडा होतो म्हणून थोडे दूध घालातात.
पचनशक्ती वाढावी म्हणून त्यात आले किसून घालायचे,चवीला मीठ ,साखर मिसळायचे आणि मग आवडत असेल तर वरून चांगल्या तुपात जिरे,हिंग,आणि हिरवी मिरची अशी छान झणझणीत फोडणी द्यायची .वरून ताजी हिरवीगार कोथिंबीर भुरभूरायची की झाला मस्त ,चविष्ट गोपाळकाला तयार .
"पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ज्या वेळी हवेत अधिक गारवा असेल त्यावेळी वातजन्य विकारांच्या शमनासाठी प्रामुख्याने अम्ल (आंबट) आणि लवण (खारट ) रस असणारे तुपात किंवा तेलात तयार केलेले स्निग्ध भोजन करावे" असे आयुर्वेद सांगते.
गोपाळकाला खायला हवा म्हणजे त्याची जिभेला छान चव तर येईलच आणि शिवाय पावसाळ्यात शास्त्रीय आहार खाता येईल ते वेगळंच !!पूर्ण पावसाळा संपेपर्यंत अधूनमधून असा गोपाळकाला करून खायला काहीच हरकत नाही.

*वैद्य. अमित वैष्णव*
*मो-9561333566*

19/08/2024
 🇮🇳
15/08/2024

🇮🇳

*शतावरी आयुर्वेद क्लिनिक**नागपंचमी आणि आयुर्वेद*नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.नागपंचमीला चिरणे, तळणे,भाजणे हे स...
09/08/2024

*शतावरी आयुर्वेद क्लिनिक*

*नागपंचमी आणि आयुर्वेद*

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नागपंचमीला चिरणे, तळणे,
भाजणे हे संस्कार न करता अन बनवायचे असते. म्हणून हळदीच्या पानात
लपेटलेल्या पातोळ्या केल्या जातात. काही वेळा तांदळाची खीर केली
जाते,जे पचण्यास सहज आणि हलकी असते. त्यातही हळदीची पाने घालतात. ती केवळ वास यावा म्हणून नव्हे तर
त्याचे औषधी गुण घरातील प्रत्येकाला मिळावेत म्हणून. हळद ही रक्त शुद्ध
करते. मासिक पाळी साफ ठेवायला मदत करते. रक्तातील साखर नियमित
करते. मनाला शांती देते. कावीळ, नेत्ररोग, कृमी इ. आजारांवर हेच रामबाण
औषध आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात ती सहज उपलब्ध होते.
नागपंचमी साजरी करताना निसर्ग आणि माणूस यांच्यातील दुवा साधण्याचा काम आपल्या पूर्वीच्या लोकांनी केले आहे. शेतकरी बांधवांसाठी नागपंचमी हा महत्त्वाचा सण आहे. शेतातील उंदीर, घुस यांचा प्रबंध करून शेतातील पिकांचे संरक्षण करण्याचे काम नाग करत असतात त्यांच्या प्रती कृज्ञता दाखवण्यासाठी हा सण शेतकरी बांधव मोठ्या जोमाने साजरा करतात.
आयुर्वेदमध्ये "अगद तंत्र" याचे स्वतंत्र वर्णन केले आहे त्यात विष चिकित्सा वर्णन केली आहे.
याप्रकारे माणूस आणि निसर्ग यांना जवळ करण्यासाठी तसेच स्वाथ्य संदर्भात शास्त्रीय उपाय योजना पूर्ण करण्यासाठी सणांचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे फक्त गरज आहे ती आपण समजून घेण्याची आणि शास्त्रीय दृष्ट्या पारखण्याची.

*वैद्य. अमित वैष्णव*
*मो-9561333566*

Address

E/2 Kasliwal Ranwara , Near Mahersing Nike College , Behind Emerald City, Garkheda Parisar Aurangabad
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 9pm
Thursday 10am - 1pm
6pm - 9pm
Friday 10am - 1pm
6pm - 9pm
Saturday 10am - 1pm
6pm - 9pm
Sunday 6pm - 9:30pm

Telephone

+919561333566

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shatavari Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shatavari Ayurved:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram