
12/09/2025
स्मृतिभ्रंश जनजागृती अभियान
दिनांक 7 सप्टेंबर 2025 रविवार रोजी आस्था फाउंडेशन औरंगाबाद या सेवाभावी संस्थेद्वारा स्मृतिभ्रंश जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या पदयात्रेत छ. संभाजी नगर शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, सायकलिस्ट फाउंडेशन चे सदस्य, पंख फाउंडेशन, जिल्हा रुग्णालय, IMA, स्मृती विश्वम युनिव्हर्स ऑफ मेमरी, BAMU, Inner Wheel Club of aurangabad Lotus शहरातील मान्यवर व्यक्ती, डॉक्टर्स, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पदयात्रेत स्मृतीभ्रंश या विषयी जनजागृती चे विविध घोषवाक्ये उद्घोषित करण्यात आली डॉ.विद्या शेनॉय, सचिव, अल्झायमर व इतर संबंधीत विकार सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई उपस्थित होत्या.
डॉ. अनुपम टाकळकर, अध्यक्ष, आय एम ए यांनी स्मृतीभ्रंश झेंड्याद्वारे तसेच हवेत फुग्याचे गुच्छ सोडून पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला.
हि पदयात्रा तापडिया नाट्यगृह निराला बाजार ते इंडियन मेडिकल असोसिएशन पर्यंत काढण्यात आली.
पदयात्रेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल मध्ये "स्मृतिभ्रंश जनजागृती" या विषयावर प्रमुख पाहूणे डॉ. अनुपम टाकळकर यांचे स्वागत आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केले.
डॉ.विद्या शेनॉय व डॉ.माणिक भिसे या प्रमुख वक्त्यानी मार्गदर्शन केले.
डॉ. टाकळकर-- स्मृतीभंश हा आजार आहे, या आजारावर प्रतिबंध पूर्णता करता येत नाही . यावर "आपली जीवन शैली" चे महत्व सांगितले उपचार योग्य ठरतो. स्मृतिभ्रंश व्यक्ती बाबत आपण सहानुभूती भावनेने पहावे.
डॉ. भिसे. मनोविकार तज्ञ, प्रेरणा हॉस्पिटल छ. संभाजी नगर यांनी स्मृतीभ्रंश हा एक मेंदूचा आजार आहे यामुळे आपल्या आयुष्यात मेंदूला सतत कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. असे सांगितले.
डॉ.विद्या शेनॉय यांनी प्रत्येकाने स्वतःहून विविध कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करावा, आपला आहार, विहार ,व्यायाम ,सत्संग , छंद इत्यादी बाबतीत स्वतःहून सहभागी होणे,अत्यंत गरजेचे आहे. स्मृतिभ्रंश आढळल्या नंतर उपचार करण्यात संकोच नको.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सुरेश कुलकर्णी कोषाध्यक्ष यांनी केले