Sharv Ayurved Clinic

Sharv Ayurved Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sharv Ayurved Clinic, Medical and health, Dabholkar's complex, C wing, 1st floor, near Datta mandir , Kherdi, Chiplun.

ज्येष्ठ वैद्य जेव्हा आवर्जून भेटायला येतात तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो.माझे गुरुवर्य 'वैद्य अनंत निमकर सर', 'वैद्य वि...
03/05/2025

ज्येष्ठ वैद्य जेव्हा आवर्जून भेटायला येतात तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो.
माझे गुरुवर्य 'वैद्य अनंत निमकर सर', 'वैद्य विवेक साने सर' यांनी 'शर्व आयुर्वेद क्लिनिक'ला सदिच्छा भेट दिली.
क्लिनिकची आणि कार्यपद्धतीची प्रशंसा केली.
आयुर्वेदाचे काम जोमाने करण्यासाठी प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिले अजून काय हवं.. !!!

नामांकित ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा खास आपले नाव काढून आपल्याला भेटायला येतात तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आज S.G.Phytoph...
21/12/2024

नामांकित ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा खास आपले नाव काढून आपल्याला भेटायला येतात तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो.

आज S.G.Phytopharma चे Director ''श्री .दिलीप गुणे सर'' यांनी "शर्व आयुर्वेद क्लिनिक" ला सदिच्छा भेट दिली.
आपल्या क्लिनिकची आणि कार्यपद्धतीची प्रशंसा केली.
आयुर्वेदाचे काम अजून जोमाने करण्यासाठी अशी प्रेरणा मिळाली तर अजून काय हवं.. !!!

18/10/2024



Rejuvenate this Diwali with 'Sharv Sugandhi Abhyang Snan'

Experience the bliss of traditional Ayurvedic oil massage and bath ritual with 'Sharv Sugandhi Ubtan'

Discover the ancient secrets of Abhyang Snan, a holistic ritual for body, mind, and soul. Our expertly crafted oil blends and Traditional Time tested formula of Ubtan will guide you through a transformative experience.

1. Relaxes and rejuvenates the body
2. Improves skin health and glow
3. Enhances mental clarity and focus
4. Boosts immunity and overall well-being
5. Prepares the mind and body for spiritual growth

- Book your Abhyang Snan Kit now...!!!

Contact us: 9421422958, 9404024628


your kit now

17/10/2024

Rejuvenate this Diwali with 'Sharv Sugandhi Abhyang Snan'

Experience the bliss of traditional Ayurvedic oil massage and bath ritual with 'Sharv Sugandhi Ubtan'

Discover the ancient secrets of Abhyang Snan, a holistic ritual for body, mind, and soul. Our expertly crafted oil blends and Traditional Time tested formula of Ubtan will guide you through a transformative experience.

1. Relaxes and rejuvenates the body
2. Improves skin health and glow
3. Enhances mental clarity and focus
4. Boosts immunity and overall well-being
5. Prepares the mind and body for spiritual growth

- Book your Abhyang Snan Kit now...!!!



your kit now

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानप्रबोधिनी चिपळूण संपर्क केंद्राच्या वतीने नांदिवसे राधानगर येथे महिला आरोग्य तपासणी शि...
10/10/2024

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानप्रबोधिनी चिपळूण संपर्क केंद्राच्या वतीने नांदिवसे राधानगर येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील महिलांची दिनचर्या, त्यांची जीवनशैली ह्याचे सर्वेक्षण करून त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेण्यात आल्या. महिलांना आयुर्वेदीय जीवनशैली संबंधी मार्गदर्शन तसेच त्वरित वेदनामुक्ती करिता अग्निकर्म व विद्धकर्म उपचार करण्यात आले. महिलांसोबत गावातील वृद्ध तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली.

ह्या प्रसंगी वैद्य प्रतिक मेहता, वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता, वैद्य स्वाती मुसळे, वैद्य राजश्री सोमण यांनी वैद्यकीय सेवा पुरविली. तसेच ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते श्री तुषार कदम, श्री सौरभ चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ह्या प्रसंगी माजी उपसरपंच श्री. प्रकाश शिंदे, श्री. भरत शिंदे, श्री. जयवंत चव्हाण, श्री. राणे सर, श्री. सुर्वे सर इत्यादि गावातील मान्यवर उपस्थित होते.

~ वैद्य प्रतिक विश्वास मेहता
~ वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता
शर्व आयुर्वेद क्लिनिक, खेर्डी, चिपळूण
094040 24628 , 9421422958

युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल विभागातील 9 वी आणि 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान प्रबोधिनीचा 'विद्या...
23/09/2024

युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल विभागातील 9 वी आणि 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान प्रबोधिनीचा 'विद्याव्रत संस्कार' हा उपक्रमआजपासून सुरू झाला. त्यानिमित्ताने 9 वी, 10 वी च्या विद्यार्थ्यांना युक्त आहार विहार याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. यासोबतच विद्यार्थ्यांची दिनचर्या आणि आयुर्वेदीय जीवनशैली अशी self assessment activity सुद्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने विवेचन केले गेले. विद्यार्थ्यांमध्ये packed foods, preservatives, artificial flavours, artificial colours ह्यांच्या दुष्परिणामांविषयी कमालीची जागरूकता आहे. त्यांचा natural गोष्टींकडे असलेला कल बघता त्यांना आयुर्वेदीय जीवनशैली बद्दल वारंवार मार्गदर्शन केल्यास अजून सकारात्मक परिणाम मिळतील एवढं नक्की..

ह्या संधीबद्दल गुरुकुलचे मनःपूर्वक आभार. श्री मोने सर, श्री पराग लघाटे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंदाचे मनापासून आभार आणि प्रणाम. 🙏🏻

~वैद्य प्रतिक विश्वास मेहता
वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता
शर्व आयुर्वेद क्लिनिक, खेर्डी, चिपळूण

25/04/2024

उन्हाळा आणि स्वास्थ्य भाग २:
मागच्या भागात आपण आहाराबद्दल पाहिले.
१. व्यायाम- उन्हाळ्यात शरीराचे बळ कमी असते. त्यामुळे व्यायाम अगदी थोडाचशरीरास झेपेल एवढाच करावा. मैदानी खेळ सकाळी लवकर (ऊन वाढायच्या आत) किंवा संध्याकाळी ऊन उतरल्यावर खेळावे. खेळून आल्यावर लगेच थंड पाण्याने आंघोळ करू नये किंवा थंड पाणी घटाघट पिऊ नये. जेवण झाल्यावर खेळ, व्यायाम असे शारीरिक कष्टाचे काम करू नये.
२. अंघोळ - उन्हाळ्यात गार पाण्याने अंघोळ केली जाते .परंतु डोक्यावर गरम पाणी आणि माने खालील भागात गार पाणी असे करू नये. शरीराच्या तापमानास समान असलेले पाणी घ्यावे. डोक्यावरून अंघोळ केल्यास ओल्या केसांनी पंख्याखाली बसू नये. अंघोळीच्या पाण्यात वाळा , गुलाब, मोगरा अशी सुगंधी द्रव्य/ फुले घालायला हरकत नाही. उन्हाळ्यात सारिवा, चंदन, कचोरा, वाळा अश्या सुगंधी व गुणाने थंड असणाऱ्या औषधीनी युक्त उटणे वापरल्यास घामाचे त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतात. उटणे ही फक्त दिवाळीत वापरायची गोष्ट नसून प्रत्येक ऋतुनुसार योग्य अशा औषधांनी बनवलेले उटणे अवश्य वापरावे.
३. घाम - उन्हाळ्यात घाम अधिक प्रमाणात येतो. घामाचे प्रमाण वय, लिंग,आहार, जीवनशैली (life-style), आपण करत असलेले काम, ऋतू अश्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. पित्त प्रकृती , स्थूल असणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात घाम येतो. तिखट, आंबवलेले, आंबट, खारवलेले पदार्थ अतिप्रमाणात खाल्ले असता, अगदी खूप राग आला, भीती वाटली, व्यायाम केला तरी देखील घाम येतो. घाम येणे ही नैसर्गिक क्रिया आहे त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. घामामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते, त्वचा सुकुमार व स्निग्ध ठेवण्यास मदत होते. ज्या व्यक्तींच्या घामाला वास येतो त्या व्यक्ती अनेक प्रकारचे deo, powders, spray यांचा अक्षरशः शरीरावर मारा करतात. यांमध्ये शरीरास त्रासदायक ठरणारी chemicals असतात. ज्याचा अतिप्रमाणात वापर करणे फार शहाणपणाचे नाही. यासाठी आपण वर सांगितल्याप्रमाणे उटण्याचा वापर करू शकतो. Pure cotton चे सैलसर कपडे घालावेत. Synthetic व mix कापडामुळे तसेच घट्ट कपड्यांमुळे घामाचे प्रमाण अजून वाढते. त्यातून काही लोकांचं म्हणणं असेल की आमच्या profession मध्ये deo is a must तर मग at least direct त्वचेवर न मारता तुम्ही जे कपडे घालणार आहात त्यावर मारा. त्यातल्या त्यात शरीराचं कमी नुकसान.
४. सन स्क्रीन - त्वचेचे tanning होऊ नये म्हणून spf 30 / SPF 50 वगैरे असणारी बरीच सन स्क्रीन lotion, creams लावली जातात. ह्या पासून होणाऱ्या side effects बद्दल नवीन काय सांगायचं? विविध संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की हि creams/lotions आरोग्यास फारशी हितकारक नसतात. आता काय करायचं. सर्वात उत्तम उपाय संपूर्ण शरीर झाकून घेणे. आयुर्वेदामध्ये पाऊस, वारा, धूळ, धूर, ऊन, बर्फ यांच्या निवारणासाठी छत्रधारणाचा उल्लेख आला आहे. थोडक्यात पाऊस, ऊन इत्यादी वरील घटकांचा थेट शरीराशी संबंध येऊ नये ह्यासाठी ते झाकून ठेवणे हे छत्रधारणातून अपेक्षित आहे. छत्रधारण हे कांती वाढवणारे, डोळ्यांसाठी हितकर (गॉगल्स हे सुद्धा एकप्रकारे डोळ्यांसाठीचे छत्रधारणच होय), ओज वाढविणारे, शुभकारक आहे. आत्ताच्या काळानुसार Scarf, Sun-coat, pure cotton चे सैलसर कपडे यांचा वापर करणे म्हणजे छत्रधारण. बाकी उन्हामुळे होणारे tanning कमी होण्यासाठी, त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी आयुर्वेदात औषधी तेलाने अभ्यंग, लेप, उटणे अशा विविध गोष्टी सांगितल्या आहेत त्यासाठी आपण वैद्यांच्या सल्ला जरूर घ्यावा.

- वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता 9421422958
- वैद्य प्रतिक मेहता 9404024628
"शर्व"आयुर्वेद क्लिनिक, दाभोळकर कॉम्प्लेक्स C विंग, पहिला मजला, दत्त मंदिराशेजारी, खेर्डी, चिपळूण

19/04/2024

उन्हाळा आणि स्वास्थ्य भाग १:
उन्हाळ्यात काम करायचा उत्साह नाही . फार भूक लागत नाही. तहान तहान होते. प्रचंड प्रमाणात गरम होते. मग अश्यावेळी गार असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामध्ये cold-drinks, milkshake, मस्तानी, थंड ताक/ मसाला ताक, दही, ice-cream, भरपूर प्रमाणात फ्रीजमधील गार पाणी अश्या पदार्थांचे सर्रास सेवन केले जाते. त्यांचा युक्तीने वापर केल्यास कोणताही अपाय होणार नाही आणि उष्णता शुद्ध आटोक्यात राहील. ते कसे हे पुढील लेखात पाहू.
१. Cold-drinks / शीतपेये : ही बऱ्याचदा carbonated असतात व ह्यामध्ये साखरेचा अतिरिक्त वापर केलेला असतो. अश्या पदार्थांमुळे पचनशक्ती सुधारण्या ऐवजी बिघडतेच, जंत होतात, दात ठिसूळ होतात आणि किडतात, भूक कमी होते, अनावश्यक वजन वाढते.
२. मिल्कशेक आणि मस्तानी - मस्तानी , मिल्कशेक, दूध +फळ यांचे मिश्रण असलेले पदार्थ पिणे सुरू होते. आयुर्वेदात हा संयोग विरुद्ध म्हणजे चुकीचा व आरोग्यास त्रासदायक आहे.
(मिल्कशेक वर स्वतंत्र लेख लिहिला आहे तो जरूर वाचावा. लिंक comments मध्ये)
३. मसाला ताक/थंड ताक/ दही - स्पर्शाला गार आहेत म्हणून हे पदार्थ शरीरासाठी थंड नसतात. हे गुणांनी उष्ण असतात. हे नियमित दीर्घकाळ सेवन केल्यास उष्णतेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे ताक / मसाला ताक / दही यांचे अतिप्रमाणात सेवन करू नये. त्याचे रूपांतर विविध त्वचारोग, पित्ताच्या विकारात होते. घरी केलेले ताजे गोड ताक वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावे.
४. Ice-cream - उन्हाळ्यातीळ अत्यंत आवडीचा पदार्थ. Ice cream खायचे असल्यास दुपारी जेवणाच्या आधी खावे. बहुतेक सर्व गोड पदार्थ हे थंड, स्निग्ध, पचायला जड असतात. जेवणापूर्वी पोट रिकामे असल्यामुळे हे पदार्थ सहज पचतात आणि त्याचा पचनशक्तीवर ताण येत नाही. त्यामुळे आईस्क्रीम, आमरस असे गोड पदार्थ जेवणानंतर खाण्याची फॅशन असली तरी आपण ते सुरवातीलाच खावे हे उत्तम.
५. पाणी - उन्हाळ्यात इतर ऋतूंपेक्षा जास्त तहान लागते. त्यामुळे तहान लागली की घटाघट पाणी प्यायले जाते. अशा वेळी आपल्याही नकळत गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाणी पिले जाते. बरेचदा जे ग्लास / तांब्या जे भांडे सापडेल तेवढे भरून थंड पाणी प्यायले जाते. अशाप्रकारे पाणी पिणे हे 'गुल्म' ह्या गंभीर व्याधीचे कारण होऊ शकते असे आयुर्वेदात म्हटलेले आहे. उन्हातून आलेल्या व्यक्तीला नुसते पाणी देण्या ऐवजी गुळाचा खडा आणि पाणी देण्याची पद्धत आपल्याकडे आहेच. पाणी पिताना सावकाश व तहान भागेल एवढेच थोडे थोडे पाणी घोट घोट (sip by sip) प्यावे. साधारणपणे 2 -3 घोट पाणी तहान भागवण्यासाठी पुरेसे असते. पुन्हा थोड्या वेळाने तहान लागल्यास पुन्हा पाणी प्यावे परंतु घटाघट पाणी रिचवू नये. शक्यतो माठातलेच पाणी प्यावे. फ्रीजमधले chilled पाणी पिऊ नये. नुसते पाणी पिऊन तहान भागत नसल्यास आवळा, कोकम, लिंबू सरबत, कैरीचं पन्हं, डाळिंब, मोसंबी, संत्र ही फळे खावीत. भूक कमी लागत असल्याने भूक असेल तेवढेच जेवण जेवावे. गहू, शेवया, रवा, तांदूळ यांची खीर खावी. (अहळीवाची खीर खाऊ नये. अहळीव उष्ण असल्याने उन्हाळ्यात शरीरास त्रासदायक ठरतात). जेवणामध्ये कमी तिखट (झणझणीत नको) रस भाजी, फोडणीचे वरण, आमटी , काकडी यांचा समावेश करावा. पचायला हलका, पातळ, थंड, स्निग्ध अशा स्वरूपाचा आहार असावा.

वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता 9421422958
वैद्य प्रतिक मेहता 9404024628
शर्वआयुर्वेद क्लिनिक, दाभोळकर कॉम्प्लेक्स C विंग, पहिला मजला, दत्त मंदिराशेजारी, खेर्डी, चिपळूण

पंचकर्म 'पंच' म्हणजे पाच आणि 'कर्म' म्हणजे प्रक्रिया किंवा Procedure. शरीराची अंतर्बाह्य शुद्धी करण्याच्या उद्दिष्टाने प...
08/04/2024

पंचकर्म

'पंच' म्हणजे पाच आणि 'कर्म' म्हणजे प्रक्रिया किंवा Procedure. शरीराची अंतर्बाह्य शुद्धी करण्याच्या उद्दिष्टाने पाच प्रमुख वेगवेगळ्या प्रक्रिया आयुर्वेदात वर्णन केल्या आहेत. वमन, विरेचन, बस्ति, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या पाच प्रक्रियांना एकत्रितपणे पंचकर्म असे म्हणतात.

पंचकर्म का करायचे ?
प्रत्येक शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतातच. ह्या तीन दोषांचे शरीरातील प्रमाण आहार, ऋतू इत्यादि विविध घटकांमुळे कमी जास्त होत असते. शरीर स्वस्थ राहण्यासाठी तिन्ही दोषांना त्यांचे त्यांचे काम व्यवस्थितपणे गरजेचे असते. जेव्हा ह्या दोषांचे शरीरातील प्रमाण खूप वाढते तेव्हा आपण आजारी पडतो. उदाहरणार्थ वात वाढला असता अंगदुखी, पाठ, कंबर, सांधेदुखी, वारंवार पोट फुगणे, भरपूर ढेकर येणे, कोरडी त्वचा असे आजार उद्भवतात. पित्त वाढले असता घसा, छाती, डोळ्यांची जळजळ, तोंडआंबट कडवट होणे किंवा त्या स्वरूपाची उलटी होणे, वारंवार तोंड येणे, उबाळू, लघवी किंवा गुदद्वारे रक्त पडणे हे त्रास दिसून येतात. कफ वाढला असता स्थौल्य, दमा, खोकला, मधुमेह हे आजार आढळून येतात. सध्याची जीवनशैली बघता हे तिन्ही दोष एकाच वेळी प्रमाणापेक्षा वाढून वरील लक्षणे मिश्र स्वरूपात किंवा ह्यापेक्षा वेगळेच त्रास झालेले सुद्धा आढळून येतात.

दोषांचे बिघडलेले प्रमाण पूर्ववत करण्यासाठी पंचकर्म मोलाची मदत करतात. वाढलेले दोष बाहेर काढून टाकणे आणि नवीन शरीर घटकांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार करणे हे पंचकर्माच्या साहाय्याने साध्य होते. थोडक्यात कॉम्प्युटर फॉरमॅट करून व्हायरस, corrupt files काढून टाकणे आणि नव्याने restart करणे होय. आपण गाडीचे ठराविक दिवसांनी servicing करतोच तसंच हे एकप्रकारे शरीराचं servicing होय. गाडीच्या servicing नंतर गाडी कशी छान चालते तसंच पंचकर्मानंतर शरीर अगदी कापसासारखं हलकं वाटतं प्रसन्न वाटतं. 'घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून' तसंच पंचकर्मानंतर शरीरात होणारे सकारात्मक बदल प्रत्येकाने स्वतः अनुभवावे हेच खरं.

पंचकर्म करताना घेण्याची काळजी

पंचकर्म ही एक शास्त्रीय पद्धत आहे ती पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीनेच व्हायला हवी. वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण, नस्य ह्या पैकी कोणताही एक उपक्रम व्यवस्थित पूर्ण करायला अंदाजे ७ ते १० दिवसांची आवश्यकता असते. पंचकर्म सुरू करण्याअगोदर आणि नंतर थोडे दिवस काही नियम आहारपद्धत पाळावी लागते. ह्या दरम्यान वैद्यांच्या सल्ल्याने काही थोडेफार बदल करून आपण आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवू शकतो. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. त्यांच्यातील आजाराचे स्वरूप वेगळे असते. प्रत्येक व्यक्तीचे नाडीपरीक्षण, प्रकृतीपरीक्षण करून त्याला योग्य असे पंचकर्म व किती दिवस पंचकर्म करावयाचे ते ठरवले जाते. 3 दिवसात संपूर्ण Detox, एका दिवसांत सर्व पंचकर्म अशा ऑफर्स म्हणजे केवळ प्रलोभने असतात. ती शास्त्रीय पद्धत नव्हे. अशा प्रलोभनांना बळी पडल्यास फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ शकते. त्यामुळे तज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचकर्म करावे हेच उत्तम. 'शर्व आयुर्वेद क्लिनिक' मध्ये याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाते. पंचकर्म झाल्यानंतर किंवा होत असतानाच्या काळात संपूर्ण आहार समुपदेशन, आयुर्वेदीय जीवनशैली ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. अशा प्रकारे शरीर शुद्धी केली असता त्याचे होणारे फायदे चरकसंहितेत पुढीलप्रमाणे वर्णन केले आहेत..

एवं विशुद्धकोष्ठस्य कायाग्नि: अभिवर्धते।
व्याधयश्च उपशाम्यन्ति प्रकृतिश्चानुवर्तते ।।
इंद्रियाणि मनो बुद्धी वर्णश्चास्य प्रसीदति।
बलं पुष्टि: अपत्यंच वृषता चास्य जायते ।।
जरां कृच्छ्रेण लाभते चिरं जीवति अनामयः ।
तस्मात् संशोधनं काले युक्तियुक्तं पिबेत् नरः ।।

भावार्थ - भूक वाढते, व्याधींचे निराकरण होते, मूळ शारीरिक प्रकृती टिकून राहते(थोडक्यात सर्व विकृती नष्ट होतात), ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुध्दी यांचे प्रसादन होते म्हणजेच कार्यक्षमता वाढते, वर्ण उजळतो, शरीर पुष्ट बलवान होते, अपत्यप्राप्ती होते, कामशक्ती वाढते, वार्धक्य उशिरा येते, निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे संपूर्ण शरीर शुद्धी करावी हेच उत्तम.

गाडीचं नियमित servicing करणारे आपण आपल्या शरीराच्या servicing कडे मात्र लक्ष देत नाही. आता हे एवढे फायदे पंचकर्माने होणार असतील तर तात्पुरत्या गोळ्या घेऊन आजार दाबून ठेवणे चांगले की या शास्त्रशुद्ध मार्गाने तो समूळ नष्ट करणे चांगले हे ज्याचं त्याने ठरवायचं. तुमच्यापर्यंत ही पद्धती परिणामकारकरीतीने पोहोचावी यासाठी आम्ही आहोतच!

वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता 9421422958
वैद्य प्रतिक मेहता 9404024628
शर्वआयुर्वेद क्लिनिक, दाभोळकर कॉम्प्लेक्स C विंग, पहिला मजला, दत्त मंदिराशेजारी, खेर्डी, चिपळूण

(पूर्वप्रसिद्धी - जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य विशेषांक)

जागतिक महिला दिनानिमित्त Gadre English Medium School, Chiplun मध्ये किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान होणारे शारीरिक ...
09/03/2024

जागतिक महिला दिनानिमित्त Gadre English Medium School, Chiplun मध्ये किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान होणारे शारीरिक व मानसिक बदल तसेच त्यामध्ये घ्यायची दक्षता याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मला निमंत्रित केले होते. स्त्रीचे आरोग्य ज्या विषयावर सर्वाधिक काळ अवलंबून असतं तो विषय म्हणजे मासिक पाळी. तरीही त्याबद्दल म्हणावी इतकी जागृती नसते. जेव्हा मासिक पाळी सुरू होते त्या वयातच जर त्याबद्दल योग्य शास्त्रीय माहिती दिली गेली, या विषयावर बोलताना शरम वाटण्याची गरज नाही हे ठसवलं गेलं तर त्या मुलींना आपल्या शरीराबद्दल, आरोग्याबद्दल माहिती घेताना संकोच वाटणार नाही. हा विचार करून Gadre English Medium School ने या विषयावर हे सत्र आयोजित केलं होतं.
पौगंडावस्थेतील बदलांना कशाप्रकारे सामोरं जावं, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वतःची कशाप्रकारे काळजी घ्यावी, कुठले sanitary products वापरावेत याबद्दल या मुलींच्या मनात असंख्य प्रश्न होते, त्यांना उत्तरं देताना अतिशय समाधान वाटलं. स्त्रीचं आरोग्य उत्तम राहणं हे तिच्यासाठी, तिच्या कुटुंबासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि हाच संदेश अतिशय संस्कारक्षम वयात असणाऱ्या मुलींपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल Gadre English medium school चे मनापासून आभार.

-वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता

08/01/2024

ताक / तक्रम् -
काही दिवसांपूर्वी एका मराठी अभिनेत्रीने "आयुर्वेदामध्ये तक्रकल्प सांगितला आहे आणि तो मी follow करते" असं म्हणत स्वतःचा उद्योग आयुर्वेदाच्या नावावर खपवण्याचे चुकीचे काम केले. अशा लोकांच्या कुठल्याही शास्त्राचा आधार नसलेल्या वक्तव्यांमुळे अनेक लोकांच्या मनात ताकाबद्दल उत्सुकता आणि शंका उत्पन्न झाल्या. तर हे ताक नेमकं कसं प्यायचं, कशासोबत प्यायचं, कधी प्यायचं, कोणी प्यायचं, आणि कोणी प्यायचं नाही हे बघूया. रात्री दुधामध्ये ऋतूनुसार कमी जास्त प्रमाणात विरजण घालायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे अदमुरे नसलेले पण खूप आंबट न झालेले कवडी पडेल असे गोड दही घुसळून त्याचे ताक करावे. ही प्रक्रिया महत्त्वाची असते. विकतचे दही आणून त्याचे केलेले ताक किंवा विकतच्या ताकामध्ये आपल्याला अपेक्षित गुणधर्म असतीलच असं सांगता येत नाही. अश्या घरी केलेल्या ताकामध्ये सैंधव/ हिंग/जिरेपूड/ ताक मसाला घालून मगच ते प्यावे. नुसते ताक पिऊ नये. आता आपण पाहू कोणी ताक पिऊ नये. अशक्त, दुर्बल असणाऱ्या व्यक्ती. सतत चक्कर येणे, अंगांची आग होत असल्यास, रक्ताचे विकार, त्वचाविकार, पित्ताचे आजार असल्यास, ज्यांना वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास होतो अश्या व्यक्तींनी ताक पिऊ नये. शक्यतो रात्रीच्या वेळी ताक पिऊ नये. ताकाचा गुणधर्म तुरट आहे. आपल्या आहारात जे षडरस असणं अपेक्षित आहे त्यातल्या तुरट चवीचा समावेश होण्यासाठी ताक हे उत्तम पेय आहे. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात ताकाचा समावेश केला तर तो हितकारक आहे. आयुर्वेदाने देखील काही आजारांमध्ये ताक पिण्यास सांगितले आहे पण ते नक्की कोणी प्यावे यासाठी तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच..

~वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता
~ वैद्य प्रतिक विश्वास मेहता
शर्व आयुर्वेद क्लिनिक, दाभोळकर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिराजवळ, खेर्डी, चिपळूण

विद्यार्थीनी ते Motivational speaker१२ वर्षांपूर्वी MES आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पहिल्या दिवसाची आठवण झा...
05/12/2023

विद्यार्थीनी ते Motivational speaker
१२ वर्षांपूर्वी MES आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पहिल्या दिवसाची आठवण झाली. पहिल्या तासासाठी ज्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थीनी म्हणून उपस्थित होते आज त्याच कॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद का शिकायचा, कसा शिकायचा आणि एकूणच आयुष्यात आयुर्वेदाचा विद्यार्थी म्हणून काय काय करायचं हे सांगण्यासाठी निमंत्रित म्हणून जाणं हा अनुभव नक्कीच आनंददायी व भावनिक होता. ☺️ कॉलेजचे मनापासून आभार..

वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता

Address

Dabholkar's Complex, C Wing, 1st Floor, Near Datta Mandir , Kherdi
Chiplun
415605

Opening Hours

Monday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919404024628

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharv Ayurved Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share