Sharv Ayurved Clinic

Sharv Ayurved Clinic Ancient Wisdom | Modern Wellness
Authentic Ayurvedic Treatment
Panchakarma • Detox • Lifestyle & Diet

चातुर्मास आणि आयुर्वेद "अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।"  भगवद्गीत...
11/07/2025

चातुर्मास आणि आयुर्वेद

"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।" भगवद्गीता
अर्थ: "मी वैश्वानर होऊन, सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात राहतो. प्राण आणि अपान वायूच्या मदतीने, चार प्रकारचे अन्न पचवतो."
मागच्या लेखात आपण पाहिले की चातुर्मास म्हणजे नेमके काय होते. विष्णू अर्थात साक्षात वैश्वानर म्हणजेच जाठराग्नी. हा जाठराग्नी ४ प्रकारचे अन्न म्हणजेच खाद्य, चोष्य, लेह्य, पेय पचवतो. आता जर साक्षात विष्णू स्वतःच निद्राधीन झाले तर साहजिकच प्राणिमात्रांच्या शरीरातील जाठराग्नि वर देखील त्याचा परिणाम होणारच. जे पिंडी तेच ब्रम्हांडी. अर्थात जाठराग्नि मंद झाल्यामुळे भूक मंदावते. शरीर कोणतेही पचण्यास जड असे अन्नपदार्थ सहज पचवू शकत नाही. त्यामुळे धार्मिक कार्ये आणि त्याच्या अनुषंगाने उपवास, लंघन असे सांगितले आहे.

आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता चातुर्मास हा साधारणपणे वर्षा आणि शरद ऋतुंचा काळ. या चार महिन्यांमध्ये संततधार पाऊस, दमट हवा, मध्येच ऊन मध्येच पाऊस, आणि शेवटी शेवटी शरद ऋतु मधील कडाक्याचे उन (October heat) असे अनेकविध वातावरणातील बदल आपण अनुभवतो. त्यामुळे शरीरातही अनेक बदल सतत होत असतात. ह्या बदलांना सामोरे जाताना शरीराचा कस लागतो. बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल खाण्यापिण्यात थोडेसे जरी बदल झाले तरी त्यामुळे अपचन, पोटात गॅस, जुलाब, ताप, सर्दी असे अनेक त्रास वरचेवर होत आहेत. पचनशक्ती (जाठराग्नि) कमी झाल्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे आधीच कमी झालेल्या पचनशक्तीला विश्रांती मिळावी म्हणून ह्या उपवासाचा फायदा होतो. पण त्यासाठी उपवासाचे पदार्थ हे पचायला हलके, गरमागरम, ताजे, भूक वाढवणारे, सात्विक असे असावे. खूप तिखट, मांसाहार, दही, मसालेदार पदार्थ, खूप तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. "रोगाः सर्वेsपि मन्देsग्नौ"आयुर्वेदामध्ये सर्व रोग होण्याचे प्रमुख कारण जाठराग्निमांद्य सांगितले आहे. याचाच अर्थ पचनशक्ती कमी असताना हलका आहार सेवन केला तर शारीर स्वास्थ्य टिकून राहते.

या काळात झाडांची लवकर वाढ होते. पशुपक्षी, जलचर यांसाठी हा प्रजनन काळ असतो. अनेक ठिकाणी पावसाळ्यात मासेमारीवर बंदी घातली जाते. निसर्ग, शरीर यांचे संतुलन ठेवले तरच sustainable विकास होईल. आहारावर नियंत्रण ठेवून, सवयी आणि जगण्याच्या पद्धतीत शास्त्रीय पद्धतीने बदल करुन शरीरास भविष्यात होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाच्याच हिताचे आहे. जरासं खाल्ल म्हणून काय बिघडतंय असा विचार करून खातच राहिलं तर ते थोड थोड कधी मोठ होत हे समजतच नाही आणि मग प्रश्न पडतो मी तर काही चुकीच केलं नाही तरी आजारपण का येत? चातुर्मासाचे पालन करणे हे सर्वथा शरीराची ताकद व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

~ वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता

चातुर्मास म्हणजे चार मास. आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा, चार महिन्यांचा काळ. हा काळ देवांच्या निद्राधीन ...
10/07/2025

चातुर्मास म्हणजे चार मास. आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा, चार महिन्यांचा काळ. हा काळ देवांच्या निद्राधीन होण्यापासून निद्रेतून जागे होण्याचा काळ मानला जातो. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात (एक वैश्विक महासागर) प्रस्थान करून शेषनागावर निद्राधीन होतात. देव निद्राधीन होतात त्यामुळे या एकादशीला देवशयनी, हरि शयनी अथवा शयनी एकादशी म्हटले जाते. यास पद्मा एकादशी देखील संबोधले जाते. आणि कार्तिकी एकादशीला देव निद्रेतून जागे होतात म्हणून तिला देवउत्थान किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. चातुर्मास हा देवतांचा निद्रेचा काळ असल्याने वाईट शक्तींपासून सर्व लोकांचे रक्षण व्हावे यासाठी या काळात व्रते, विधी, दान आणि तपे केली जातात. त्यामुळे या काळात अनेक सप्ताहांचे व सत्यनारायणाच्या पूजांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. भगवान विष्णू निद्रावस्थेत का जातात हे जाणून घेऊ. पौराणिक कथेनुसार बळी हा असुर राजा होता. समुद्र मंथनात अमृत फक्त देवांनाच दिले यामुळे दैत्य आणि असुरांचे गुरु शुक्राचार्य नाराज झाले. असुरांवर अन्याय झाला अशी त्यांची भावना होती. त्यांनी घोर तपश्चर्या करून संजीवनी विद्या प्राप्त केली. आपली विद्या त्यांनी बळी राजाच्या समर्थनासाठी वापरली. गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाने व बळीच्या नेतृत्वाने असुर साम्राज्याने यश संपादन केले. बळीने तिन्ही जगांवर अधिकार प्राप्त केला. त्यावेळी इंद्रदेव व सर्व देवांनी भगवान विष्णूच्या आश्रय घेतला. भगवान विष्णूंनी इंद्राला पुन्हा स्वर्ग मिळवुन देण्यासाठी आणि स्थिती पूर्ववत करण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवले. त्यांनी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती हिच्या पोटी जन्म घेतला. त्यांचे हे रूप अतिशय लहानखुरे होते. त्यांची उंची अतिशय कमी होती. त्यामुळे वामन असे त्यांचे नामकरण झाले. हाच विष्णूचा दशावतारातील पाचवा अवतार.भगवान विष्णूने वामनाच्या रूपात बळी राजाकडे दान म्हणून तीन पावले जमीन मागितली. बळी राजा नीतिवान आणि दानशूर असल्याने त्याने ही याचना मान्य केली व राज्यात कुठेही तीन पावले जमीन घेण्याची परवानगी दिली. त्याक्षणी वामनाने आपला आकार वाढवत नेत महाकाय रूप धारण केले. मग एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवुन दोन पावले घेतली. आणि मग बळीला विचारले “आता तिसरे पाऊल कुठे ठेवु?” त्यावेळी बळी राजा म्हणाला “तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा भगवान”. त्याने स्वतःला देवाला समर्पित करून टाकले. वामनाने तिसरे पाऊल राजाच्या डोक्यावर ठेवले.भगवान विष्णूंनी आपल्या पावलांनी पृथ्वी आणि स्वर्ग पुन्हा प्राप्त केला. त्यांनी पृथ्वी मानवांना आणि स्वर्ग देवांना पुन्हा देऊन टाकला. आणि बळीराजाला त्याच्या कृत्याचे बक्षीस म्हणून पाताळात पाठवून त्याला तिथे अनंतकाळ राज्य करण्याचा आशीर्वाद दिला व स्वतः त्याच्या इच्छेखातर त्याच्या राज्याचे द्वारपाल होण्यास तयार झाले. पाताळ लोकात गेल्यामुळे भगवान विष्णूला आपले सर्व अधिकार हे त्यागावे लागले. प्रदीर्घ काळानंतरही भगवान विष्णू वैकुंठलोकात पोहोचले नाहीत तेव्हा लक्ष्मीसह सर्व देवी-देवता काळजीत पडले. तेव्हा नारदजींनी माता लक्ष्मीला उपाय सांगितला. त्याच्यावर विश्वास ठेवून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी राजा बळीच्या घरी पोहोचली आणि मदतीची याचना केली. त्यांनी बळी राजाला राखी बांधून आपले भाऊ बनवले व वचन घेऊन भगवान विष्णूला पातळ लोकातून मुक्त केले.माता लक्ष्मीला दिलेल्या वचनामुळे राजा बळीने भगवान विष्णूंना आपल्या वरदानातून मुक्त केले. तेव्हा भगवान विष्णूंनी बळी राजाला आशीर्वाद देऊन चातुर्मासात पाताळ लोकात निवास करतील असे सांगितले. बळी राजाने सांगितले की, आता तुम्ही माझे नातेवाईक झाला आहात त्यासाठी आणखी काही काळ मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. रक्षाबंधनापासून धनत्रयोदशीपर्यंत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पाताळ लोकात वास्तव्य करतात.म्हणूनच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत भगवान विष्णू चातुर्मासात पाताळलोकात योगनिद्रेत जातात.

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

~ ऐश्वर्या पंचपोर-मेहता

गुरुकुल विभागात विद्याव्रत संस्कार उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून व्याख्यानमाला.विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्वा...
06/07/2025

गुरुकुल विभागात विद्याव्रत संस्कार उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून व्याख्यानमाला.

विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्वाला पूरक असणारे संस्कार देण्याचं काम गुरुकुल मध्ये वर्षभर चालू असतं त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल मध्ये विद्याव्रत संस्कार हा कार्यक्रम योजलेला आहे.

विद्याव्रत घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्याव्रताबद्दलची संकल्पना परिपूर्ण समजून घ्यावी या उद्देशाने विद्याव्रतातील पहिले उपव्रत युक्ताहारविहार या व्रताबद्दलचे मार्गदर्शन युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी आणि खेर्डीमध्ये आयुर्वेदाची सेवा देणारे युवा वैद्य प्रतीक मेहता यानी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत मुलांची गप्पा मारत मोकळ्या संवादातून केले.

आवडते पदार्थ आणि त्याची आपल्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्तता किंवा त्याच्या अतिरेकामुळे होणारे हानी, खानपान सवयीसंबंधित अपुरा विचार त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी वैद्य मेहता यांनी मुलांसोबत मोकळेपणाने चर्चा केली.

मुलांच्या सक्रिय सहभागामुळे या मार्गदर्शन सत्रात
' *युक्ताहारविहार* ' ही थोडीशी अवघड संकल्पना सहज सुलभ पद्धतीने समजून घेण्यास मदत झाली.

या पुढील दीड महिन्यात दर आठवड्याला एक उपव्रत याप्रमाणे अनुक्रमे इंद्रियसंयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्याय प्रवचन, सद्गुरुसेवा आणि राष्ट्रअर्चना या उपव्रतांचे मार्गदर्शन पूर्वनियोजित व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांसाठी होणार आहे.

HbA1c reduced from 6.2 to 5.1 in just 2 months
15/06/2025

HbA1c reduced from 6.2 to 5.1 in just 2 months

आमचे गुरुबंधू वैद्य योगेश वैशंपायन सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी गौरी गद्रे-वैशंपायन मॅडम यांनी ''शर्व आयुर्वेद क्लिनिक...
08/06/2025

आमचे गुरुबंधू वैद्य योगेश वैशंपायन सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी गौरी गद्रे-वैशंपायन मॅडम यांनी ''शर्व आयुर्वेद क्लिनिक'' ला आवर्जून सदिच्छा भेट दिली. आयुर्वेद क्षेत्रामध्ये विविध नवीन पूरक उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

 #जलौकावचरण  #रक्तमोक्षण    #गळू  #विद्रधी   relife @शर्व आयुर्वेद क्लिनिक
04/06/2025

#जलौकावचरण #रक्तमोक्षण #गळू #विद्रधी relife @शर्व आयुर्वेद क्लिनिक

नामांकित ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा खास आपले नाव काढून आपल्याला भेटायला येतात तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आज S.G.Phytoph...
21/12/2024

नामांकित ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा खास आपले नाव काढून आपल्याला भेटायला येतात तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो.

आज S.G.Phytopharma चे Director ''श्री .दिलीप गुणे सर'' यांनी "शर्व आयुर्वेद क्लिनिक" ला सदिच्छा भेट दिली.
आपल्या क्लिनिकची आणि कार्यपद्धतीची प्रशंसा केली.
आयुर्वेदाचे काम अजून जोमाने करण्यासाठी अशी प्रेरणा मिळाली तर अजून काय हवं.. !!!

18/10/2024



Rejuvenate this Diwali with 'Sharv Sugandhi Abhyang Snan'

Experience the bliss of traditional Ayurvedic oil massage and bath ritual with 'Sharv Sugandhi Ubtan'

Discover the ancient secrets of Abhyang Snan, a holistic ritual for body, mind, and soul. Our expertly crafted oil blends and Traditional Time tested formula of Ubtan will guide you through a transformative experience.

1. Relaxes and rejuvenates the body
2. Improves skin health and glow
3. Enhances mental clarity and focus
4. Boosts immunity and overall well-being
5. Prepares the mind and body for spiritual growth

- Book your Abhyang Snan Kit now...!!!

Contact us: 9421422958, 9404024628


your kit now

17/10/2024

Rejuvenate this Diwali with 'Sharv Sugandhi Abhyang Snan'

Experience the bliss of traditional Ayurvedic oil massage and bath ritual with 'Sharv Sugandhi Ubtan'

Discover the ancient secrets of Abhyang Snan, a holistic ritual for body, mind, and soul. Our expertly crafted oil blends and Traditional Time tested formula of Ubtan will guide you through a transformative experience.

1. Relaxes and rejuvenates the body
2. Improves skin health and glow
3. Enhances mental clarity and focus
4. Boosts immunity and overall well-being
5. Prepares the mind and body for spiritual growth

- Book your Abhyang Snan Kit now...!!!



your kit now

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानप्रबोधिनी चिपळूण संपर्क केंद्राच्या वतीने नांदिवसे राधानगर येथे महिला आरोग्य तपासणी शि...
10/10/2024

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानप्रबोधिनी चिपळूण संपर्क केंद्राच्या वतीने नांदिवसे राधानगर येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील महिलांची दिनचर्या, त्यांची जीवनशैली ह्याचे सर्वेक्षण करून त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेण्यात आल्या. महिलांना आयुर्वेदीय जीवनशैली संबंधी मार्गदर्शन तसेच त्वरित वेदनामुक्ती करिता अग्निकर्म व विद्धकर्म उपचार करण्यात आले. महिलांसोबत गावातील वृद्ध तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली.

ह्या प्रसंगी वैद्य प्रतिक मेहता, वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता, वैद्य स्वाती मुसळे, वैद्य राजश्री सोमण यांनी वैद्यकीय सेवा पुरविली. तसेच ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते श्री तुषार कदम, श्री सौरभ चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ह्या प्रसंगी माजी उपसरपंच श्री. प्रकाश शिंदे, श्री. भरत शिंदे, श्री. जयवंत चव्हाण, श्री. राणे सर, श्री. सुर्वे सर इत्यादि गावातील मान्यवर उपस्थित होते.

~ वैद्य प्रतिक विश्वास मेहता
~ वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता
शर्व आयुर्वेद क्लिनिक, खेर्डी, चिपळूण
094040 24628 , 9421422958

युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल विभागातील 9 वी आणि 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान प्रबोधिनीचा 'विद्या...
23/09/2024

युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल विभागातील 9 वी आणि 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान प्रबोधिनीचा 'विद्याव्रत संस्कार' हा उपक्रमआजपासून सुरू झाला. त्यानिमित्ताने 9 वी, 10 वी च्या विद्यार्थ्यांना युक्त आहार विहार याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. यासोबतच विद्यार्थ्यांची दिनचर्या आणि आयुर्वेदीय जीवनशैली अशी self assessment activity सुद्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने विवेचन केले गेले. विद्यार्थ्यांमध्ये packed foods, preservatives, artificial flavours, artificial colours ह्यांच्या दुष्परिणामांविषयी कमालीची जागरूकता आहे. त्यांचा natural गोष्टींकडे असलेला कल बघता त्यांना आयुर्वेदीय जीवनशैली बद्दल वारंवार मार्गदर्शन केल्यास अजून सकारात्मक परिणाम मिळतील एवढं नक्की..

ह्या संधीबद्दल गुरुकुलचे मनःपूर्वक आभार. श्री मोने सर, श्री पराग लघाटे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंदाचे मनापासून आभार आणि प्रणाम. 🙏🏻

~वैद्य प्रतिक विश्वास मेहता
वैद्य ऐश्वर्या पंचपोर - मेहता
शर्व आयुर्वेद क्लिनिक, खेर्डी, चिपळूण

25/04/2024

उन्हाळा आणि स्वास्थ्य भाग २:
मागच्या भागात आपण आहाराबद्दल पाहिले.
१. व्यायाम- उन्हाळ्यात शरीराचे बळ कमी असते. त्यामुळे व्यायाम अगदी थोडाचशरीरास झेपेल एवढाच करावा. मैदानी खेळ सकाळी लवकर (ऊन वाढायच्या आत) किंवा संध्याकाळी ऊन उतरल्यावर खेळावे. खेळून आल्यावर लगेच थंड पाण्याने आंघोळ करू नये किंवा थंड पाणी घटाघट पिऊ नये. जेवण झाल्यावर खेळ, व्यायाम असे शारीरिक कष्टाचे काम करू नये.
२. अंघोळ - उन्हाळ्यात गार पाण्याने अंघोळ केली जाते .परंतु डोक्यावर गरम पाणी आणि माने खालील भागात गार पाणी असे करू नये. शरीराच्या तापमानास समान असलेले पाणी घ्यावे. डोक्यावरून अंघोळ केल्यास ओल्या केसांनी पंख्याखाली बसू नये. अंघोळीच्या पाण्यात वाळा , गुलाब, मोगरा अशी सुगंधी द्रव्य/ फुले घालायला हरकत नाही. उन्हाळ्यात सारिवा, चंदन, कचोरा, वाळा अश्या सुगंधी व गुणाने थंड असणाऱ्या औषधीनी युक्त उटणे वापरल्यास घामाचे त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतात. उटणे ही फक्त दिवाळीत वापरायची गोष्ट नसून प्रत्येक ऋतुनुसार योग्य अशा औषधांनी बनवलेले उटणे अवश्य वापरावे.
३. घाम - उन्हाळ्यात घाम अधिक प्रमाणात येतो. घामाचे प्रमाण वय, लिंग,आहार, जीवनशैली (life-style), आपण करत असलेले काम, ऋतू अश्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. पित्त प्रकृती , स्थूल असणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात घाम येतो. तिखट, आंबवलेले, आंबट, खारवलेले पदार्थ अतिप्रमाणात खाल्ले असता, अगदी खूप राग आला, भीती वाटली, व्यायाम केला तरी देखील घाम येतो. घाम येणे ही नैसर्गिक क्रिया आहे त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. घामामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते, त्वचा सुकुमार व स्निग्ध ठेवण्यास मदत होते. ज्या व्यक्तींच्या घामाला वास येतो त्या व्यक्ती अनेक प्रकारचे deo, powders, spray यांचा अक्षरशः शरीरावर मारा करतात. यांमध्ये शरीरास त्रासदायक ठरणारी chemicals असतात. ज्याचा अतिप्रमाणात वापर करणे फार शहाणपणाचे नाही. यासाठी आपण वर सांगितल्याप्रमाणे उटण्याचा वापर करू शकतो. Pure cotton चे सैलसर कपडे घालावेत. Synthetic व mix कापडामुळे तसेच घट्ट कपड्यांमुळे घामाचे प्रमाण अजून वाढते. त्यातून काही लोकांचं म्हणणं असेल की आमच्या profession मध्ये deo is a must तर मग at least direct त्वचेवर न मारता तुम्ही जे कपडे घालणार आहात त्यावर मारा. त्यातल्या त्यात शरीराचं कमी नुकसान.
४. सन स्क्रीन - त्वचेचे tanning होऊ नये म्हणून spf 30 / SPF 50 वगैरे असणारी बरीच सन स्क्रीन lotion, creams लावली जातात. ह्या पासून होणाऱ्या side effects बद्दल नवीन काय सांगायचं? विविध संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की हि creams/lotions आरोग्यास फारशी हितकारक नसतात. आता काय करायचं. सर्वात उत्तम उपाय संपूर्ण शरीर झाकून घेणे. आयुर्वेदामध्ये पाऊस, वारा, धूळ, धूर, ऊन, बर्फ यांच्या निवारणासाठी छत्रधारणाचा उल्लेख आला आहे. थोडक्यात पाऊस, ऊन इत्यादी वरील घटकांचा थेट शरीराशी संबंध येऊ नये ह्यासाठी ते झाकून ठेवणे हे छत्रधारणातून अपेक्षित आहे. छत्रधारण हे कांती वाढवणारे, डोळ्यांसाठी हितकर (गॉगल्स हे सुद्धा एकप्रकारे डोळ्यांसाठीचे छत्रधारणच होय), ओज वाढविणारे, शुभकारक आहे. आत्ताच्या काळानुसार Scarf, Sun-coat, pure cotton चे सैलसर कपडे यांचा वापर करणे म्हणजे छत्रधारण. बाकी उन्हामुळे होणारे tanning कमी होण्यासाठी, त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी आयुर्वेदात औषधी तेलाने अभ्यंग, लेप, उटणे अशा विविध गोष्टी सांगितल्या आहेत त्यासाठी आपण वैद्यांच्या सल्ला जरूर घ्यावा.

- वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता 9421422958
- वैद्य प्रतिक मेहता 9404024628
"शर्व"आयुर्वेद क्लिनिक, दाभोळकर कॉम्प्लेक्स C विंग, पहिला मजला, दत्त मंदिराशेजारी, खेर्डी, चिपळूण

Address

Dabholkar's Complex, C Wing, 1st Floor, Near Datta Mandir , Kherdi
Chiplun
415605

Opening Hours

Monday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919404024628

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharv Ayurved Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram