15/09/2025
५ आरोग्यवर्धक प्राणायाम क्रम🧘🏻
▪️ भास्त्रिका ▪️ अनुलोम विलोम ▪️ नाडीशोधन
▪️ कपालभाती ▪️ भ्रामरी
🧘🏻♀️ भास्त्रिका प्राणायाम
▪️फायदे:-
*भस्त्रिका प्राणायाम असा प्राणायाम आहे जो सतत केल्याने पोटाची चरबी कमी होते. पण यासाठी सतत सराव करणे आवश्यक आहे. दररोज 10 ते 15 मिनिटे केला गेला तर आपले वजन देखील कमी होते.
*सतत भस्त्रिका प्राणायाम केल्याने वेळेवर भूक लागते.
*हवा व पित्त यांमुळे होणारे बहुतेक रोग दूर ठेऊन शरीरात उष्णता निर्माण करते
*श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त.
*नाडी प्रवाह शुद्ध होतो.
*गळ्यातील खरखर व पोटातील जळजळ कमी होते.
*नाक आणि छातीच्या संबधित आजारांवर परिणाम होवून त्या पूर्णपणे कमी होऊ शकतात.
*एपेटाइट यामुळे दुरुस्त होते.
*ट्युमर यामुळे बऱ्यापैकी बरा होऊ शकतो.
*शरीरात ऑक्सिजन चांगल्या मात्रेत शरीरात पोहोचतो.
*मनाला शांतता मिळते.
🧘🏻♀️अनुलोम-विलोम प्राणायाम
▪️फायदे:-
*शरीरातील विविध नाड्या शुद्ध होतात. शरीर अधिक शांत व शक्तिशाली बनते.
*वातासंबंधी रोग ठीक होतात.
*शरीरातील सांधे दुखी, गाउट, सर्दी आणि प्रजनन अंगांशी सबंधित रोग ठीक होतात.
*उच्च रक्त दाबाची समस्या दूर होते.
*मधुमेहात अत्यंत लाभदायक फायदे होतात.
*अनुलोम विलोम मासपेशिसबंधित रोगांनाही ठीक करतो.
*ऑर्थरायटीस साठी फरच उपयोगी ठरतो.
*मानसिक ताण दबाव, चीडचीडेपणा, राग, चिंता, उच्च रक्तदाब यापासून नक्कीच मुक्ती मिळते.
*निद्रानाशावर हहा एक रामबाण उपाय मानला जातो.
*मासिक पाळीतील अनियमितता दूर होते.
*मनाचे धैर्य वाढते, कोणतेही काम करण्याची क्षमता वाढते.
*सकारात्मक उर्जा वाढते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
*शरीरातील रक्तात ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिसळले जाते.
*शरीरात रक्ताचे संचालन सुदृढ होते.
*नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळते.
चयापचयात सुगमता येते.
एसिडीटी , ग्यास अपचन, एलर्जी, अस्थमा सारख्या रोगांवर लवकर आराम मिळतो.
🧘🏻♀️ नाडी शोधन प्राणायाम
▪️फायदे:-
*शरीर आणि मनातील संचित ताणताणाव प्रभावीपणे घालवण्यास आणि तणावमुक्त होण्यास मदत करते.
*मन शांत आणि स्थिर करण्यासाठी अतिशय उत्तम असे श्वासाचे तंत्र.
*बऱ्याचशा अभिसरण आणि श्वसनाच्या समस्यांवर चिकित्सेप्रमाणे काम करते.
*निद्रानाश वर उपयुक्त प्रणायाम.
*मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांमध्ये मिलाफ घडवून आणण्यास मदत करते जे आपल्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक आणि भावनिक बाजूंशी परस्परसंबंधित आहे.
*नाडी, सूक्ष्म शक्तीमार्ग शुद्ध आणि संतुलित करण्यास मदत करते ज्यामुळे शरीरात सहज प्राण (जीवनशक्ती) प्रवाह सुनिश्चित होतो .
*शरीराचे तापमान संतुलित ठेवते.
🧘🏻♀️ कपालभाती प्राणायाम
▪️फायदे:-
*शरीरातील टॉक्सिन बाहेर काढायला मदत होते.
*पोटावरच मेद कमी होतो.
*हा प्राणायम केल्याने खेळाडूंच्या कौशल्यात वाढ होते.
*दम्याच्या रुग्णांनी नियमित संथ गतीने कपालभाति केल्यास त्यांचा आजार बराच बरा होऊ शकतो.
*मासिक पाळीचे विकार बरे होतात.
*मेटाबॉलिजममध्ये वाढ होते आणि वजन कमी होऊ लागतं.
*बद्धकोष्ठता, अपचन, गॅससारख्या पोटाशी संबंधित आजार बरे होतात.
*श्वसनाचा मार्ग साफ होतो आणि श्वसनाशी निगडीत सर्व आजार दूर होतात व श्वसन सुधारते.
*सायनस शुद्ध होतं, त्यामुळे मेंदू सक्रिय करण्यास मदत होते.
*एकाग्रता वाढते व मुलांची अभ्यासात प्रगती होते
🧘🏻♀️भ्रामरी प्राणायाम
▪️फायदे:-
*मानसिक ताण, संताप आणि अस्वस्थता यापासून झटपट सुटका होते.
*अर्धशिशी सुसह्य करण्यात मदत करते.
*एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
*आत्मविश्वास निर्माण होतो
*रक्तदाब कमी करण्यात उपयोगी ठरतो.
*नसांमध्ये शक्ती वाढते, मेंदु शांत आणि क्रियाशील होतो.
*हा रागास कमी करून विवेकाची जागृती करतो.
*निद्रानाश असेल तर ह्या प्राणायामाचा नित्यनियमाने सराव उपयोगी ठरतो.
*लहान मुलांची एकाग्रत वाढते व त्यांची अभ्यासात प्रगती होते.
*पचनकार्य क्षमतेत वाढ होऊन रक्त शुद्ध होते.