31/10/2018
आपल्या आयुष्यावर दिशांचा बराच प्रभाव होत असतो. करिअरपासून कौटुंबिक सौख्यापर्यंत अनेक गोष्टी दिशांवर अवलंबून असतात.
पश्चिम दिशेला वरुणराजाचं राज्य असतं. या ठिकाणी शनीचा उच्चभाव आणि शुक्राची स्वगृह असणारी तुळा राशी मांडली जाते. ही दिशा बिघडलेली असता पती-पत्नीतल्या मतभेदांमुळे वैवाहिक सौख्यात बाधा येते. घरामध्ये ही दिशा व्यवस्थित असेल तर अशा घरात शनिची चिकाटी आणि श्रमशीलता तर शुक्राचं ऐश्वर्य, सुख आणि भोग सहज अनुभवाला येतात. उपदेशांमध्ये पंचमहाभूतांचा आविष्कार होतो. माणसाचं मन जलतत्वाचं आहे. हे जलतत्व ईशान्य दिशेला वास करतं. त्यामुळे ज्या घरात ईशान्य दिशा उत्तम असते त्या ठिकाणी मनामध्येच ईश्वरीय शक्तीचा संचार होतो आणि प्रत्येक कार्यात यश मिळतं. माणसाची बुद्धी ही वायुतत्वाची असून हे वायुतत्व वायव्य दिशेत वास्तव्य करतं. ज्या घरामध्ये वायव्य दिशेत दोष असतो तिथे जीवनात धरसोड प्रवृत्ती दिसून येते. अशा घरांमध्ये ठाम निर्णय घेतले जात नाहीत. माणसाचा अहंकार हा अग्नीतत्वाचा असून अग्नीतत्व घराच्या आग्नेय कोनात राहतं. महत्त्वाकांक्षा, कर्तृत्व आणि पराक्रम हे सात्विक अहंकारातून प्रकट होतात. माणसाचं चित्त पृथ्वीतत्वाचं असून मन आणि बुद्धीचं जोडचित्त या तत्त्वात असतं. ज्या घरामध्ये नैऋत्य दिशा बिघडलेली असते तिथे राहूचा प्रभाव रवि आणि चंद्राचा अस्त म्हणजेच मन आणि बुद्धीचे असंतुलन अनुभवायास येतं.