Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved

Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved, Health & Wellness Website, NAVI MUMBAI.

Shri Vishwatej Ayurved Research Hospital Is an Ayurvedic Panchakarma Treatment Hospital in kamothe Navi Mumbai where patients can be admitted & treated with purely Ayurvedic concepts with medicines ,Diet management & Panchkarma treatments.

04/04/2025

स्थुलपणा अनेक आजारांना आमंत्रण देतो तेव्हा त्यासाठी योग्य पद्धतीने उपचार होणे गरजेचे असते फक्त उपवास करुन किंवा ठोकताळा पद्धतीने औषधे घेऊन काही उपयोग होत नाही . त्यासाठी अगोदर नक्की स्थुलपणा आहे की नाही हे आयुर्वेदानुसार तपासूनच मग गरजेनुसार पंचकर्मादि औषधोपचार व लाइफस्टाईल बदल करुन त्यावर मात करता येते .

रायगड जिल्ह्यातील पहिले व्यक्तिगत आयुर्वेदिक हॉस्पिटल 👇

श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल
Dr Nitin Thorat MD(Ayu)
shop no. 4,5 & 6, Pushp Corner society,
plot number 76,77, sector 12, near Krishna hotel Kamothe Navi Mumbai Mobile 9867980769
9221596970.
Timings- morning 9.30-1.30 & at evening 5:30 to 9:30pm
(Sunday by prior appointment)
https://maps.app.goo.gl/bxACcMDe7dfZP5zY8

Shri Vishwatej Ayurved Research Hospital Is an Ayurvedic Panchakarma Treatment Hospital in kamothe Navi Mumbai where patients can be admitted & treated with purely Ayurvedic concepts with medicines ,Diet management & Panchkarma treatments.

श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॅास्पिटल ,कामोठे तर्फे आयोजित आयुर्वेदिय शरिरशुद्धी – वमन उपचार शिबिरशरिरात आजार निर्माण ...
06/02/2025

श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॅास्पिटल ,कामोठे तर्फे आयोजित

आयुर्वेदिय शरिरशुद्धी – वमन उपचार शिबिर

शरिरात आजार निर्माण कसे होतात ?-

वेळेवर जेवण न करणे , भुक नसताना केवळ समोर आवडीचा पदार्थ आहे म्हणुन भरपुर प्रमाणात खाणे , चहा चपाती, चहा बरोबर नमकिन बिस्किट्स /फरसाण खाणे, मलई चिकन ,बटर चिकन फ्रुट मिल्क शेक्स खाणे , जेवण झाल्यावर आईस्क्रिम्स खाणे , केळाचे शिकरण , दररोज दही , लोणचे ,दह्याचे ताक इ विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्रित खाणे, मैद्याचे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स , विनाकारण एलॉपीथिक औषधे ( डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय) खुप दिवस घेणे, सतत पॅकिंग अन्न /हॉटेलमधील अन्न खाणे ,व्यायाम न करणे , दिवसा जेवल्यानंतर झोपणे , रात्री विनाकारण जागणे , सतत गाडीवर लांबचा प्रवास करणे , सतत थंड पाण्याने स्नान करणे इ. विविध कारणांनी शरिरात विषारी पदार्थांची निर्मिती होऊन विकृत कफस्वरुपात वा पित्तस्वरुपात साठायला सुरुवात होते . हे विषारी पदार्थ शरिरात प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास शरिराचे नैसर्गिक पचनक्रिया वा चयापचय क्रिया बिघडवायला सुरुवात करतात . त्याचा दुष्परिणाम आतड्यांच्या मधील पचनव्यापारावर होऊन भुक मंदावते व पोट साफ होण्याच्या तक्रारी सुरु होतात . त्यातुन गॅसेस ,मलावष्ट्म्भ , पोटदुखी आम्लपित्त ,मुळव्याध यांसारखी लक्षणे निर्माण होतात. वेळिच या विषारांचा शरिराबाहेर निचरा न झाल्याने आजारांची निर्मिति होण्यास सुरुवात होते .
हे विषारी पदार्थ शरिराबाहेर काढुन टाकण्यासाठी आयुर्वेदामध्ये पाच प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्यांनाच “पंचकर्म” संबोधले जाते . त्यापैकी उलटीद्वारे हे विषारी पदार्थ वाहेर काढुन टाकण्याच्या प्रक्रियेला “वमन” असे म्हणतात .
वमन पंचकर्म ही आयुर्वेदातील एक महत्त्वपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शरीरातील कफदोष तोंडावाटे बाहेर काढला जातो. ही प्रक्रिया विशेषतः कफवृद्धीजन्य आजारांमध्ये उपयुक्त ठरते.

वमन पंचकर्माची प्रक्रिया:
1. पूर्वकर्म (तयारी):
• स्नेहन (तेल लावणे): रुग्णाच्या प्रकृतीनुसार ३ ते ७ दिवस औषधीयुक्त तूप किंवा तेल पाजले जाते. यामुळे शरीरातील दोष मृदू होतात.
• स्वेदन (शेक): स्नेहनानंतर संपूर्ण शरीराला औषधीयुक्त वाफेने शेक दिला जातो, ज्यामुळे दोषांचे संचय जठराकडे (पोटाकडे) सरकतात.
2. प्रधानकर्म (मुख्य प्रक्रिया):
• वमनाच्या दिवशी सकाळी रुग्णाला उलटी आणण्यासाठी योग्य औषध दिले जाते. हे औषध वैद्यांच्या देखरेखीखाली दिले जाते.
3. पश्चात्कर्म (नंतरची काळजी):
• वमनानंतर रुग्णाला काही दिवस विशेष आहार आणि पथ्यांचे पालन करावे लागते, ज्यामुळे शरीराची पुनर्बांधणी होते.

वमन पंचकर्माचे फायदे:
• सतत होणारी सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, दमा (अस्थमा) यांसारख्या कफवृद्धीजन्य आजारांमध्ये उपयुक्त.
• साइनसचा त्रास, डोकेदुखी, सतत सर्दी होणे, ॲलर्जी कमी करण्यासाठी मदत करते.
• सतत होणारे अपचन, अजीर्ण, आम्लपित्त यांसारख्या पचनासंबंधी तक्रारींमध्ये लाभदायक.
• त्वचारोग, सोरायसिस, पांढरे कोड यांसारख्या त्वचेच्या आजारांमध्ये उपयुक्त.
• स्थूलता कमी करण्यासाठी मदत करते. वंध्यत्व / मुल न होणे , ट्युब ब्लॉक असणे , पिसीओडी इ. विकारात उपयोगी
• प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सहाय्य करते.


वमन पंचकर्माची प्रक्रिया तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावी. स्वतः करण्याचा प्रयत्न केल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे, आपल्या आजारानुसार आणि प्रकृतीनुसार वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आम्ही आमच्या श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारची पंचकर्म चिकित्सा मागील २३ वर्षांपासुन करित आहोत .

सर्वसाधारणपणे वसंतऋतु सुरु झाल्यावर म्हणजेच फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान हे वमन कर्म केले जाते .

आपणही हे वमन कर्म करण्यास उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर संपर्क करु शकता. तसेच प्रथम नावनोंदणी केलेल्या २५ रुग्णांसाठी ही वमन चिकित्सा रु. १८०००/- ऐवजी २५% सुट मध्ये म्हणजेच रु.१३५००/- ( रु.५००/- नोंदणी शुल्क व रु.१३०००/- प्रक्रिया शुल्क ) मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.

संपर्कासाठी पत्ता :-

श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल

Dr Nitin Thorat MD(Ayu)

shop no. 4,5 & 6, Pushp Corner society,
plot number 76,77, sector 12, near Krishna hotel Kamothe Navi Mumbai Mobile 9867980769
9221596970.
Timings- morning 9.30-1.30 & at evening 5:30 to 9:30pm
(Sunday by prior appointment)

https://maps.app.goo.gl/bxACcMDe7dfZP5zY8

11/01/2025

मदन फळ किंवा गेळफळ किंवा मैनफळ हे आयुर्वेदामधलं पंचकर्म चिकित्सेसाठी उपयोगी असलेले एक महत्त्वाचं औषधी द्रव्य आहे. साधारण जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये मदन फळ पिकायला सुरुवात होऊन झाडापासून गळून खाली पडतात. त्याच्या आत मधला जो गर आहे तो पिकतो आणि त्याच्यापासून मदन पिंपली तयार होते आणि ही मदनपिपळी आयुर्वेदामधील पंचकर्म वमन म्हणजे उलटी द्वारे शरिरशुद्धीकरणसाठी मदनफळ पिपळी फांट वापरला जातो. हा मदन फळ पिपळी फांट वापरल्यामुळे उत्तम वमन रुग्णांमधील वेगवेगळया आजारांमध्ये बघायला मिळते.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर त्याच प्रमाणे पाटण तालुक्यातील सडा वाघापूर यासारख्या डोंगराळ प्रदेशांमध्ये मदन फळाचे भरपूर झाडे आपल्याला बघायला मिळतात. मार्केटमधून जुना कीड लागलेल्या मदन फळ आणून रुग्णांमध्ये वापरण्यापेक्षा या ठिकाणी भेटी देऊन ताजा व उत्तम चांगले गुणधर्म असलेला मदन फळ वापरणं कधीही श्रेष्ठ. त्या संदर्भातील हा व्हिडिओ आपणासाठी youtube ला अपलोड करत आहोत.

सोरायसिस हा फक्त त्वचेशी संबंधित आजार आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे, त्वचेचा भुसा पडणे ही प्रमुख लक...
04/01/2025

सोरायसिस हा फक्त त्वचेशी संबंधित आजार आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे, त्वचेचा भुसा पडणे ही प्रमुख लक्षणे असलेल्या त्वचा विकार सोरायसिस म्हणून ओळखला जातो. सोरायसिस हा त्वचारोग संसर्गजन्य किंवा आनुवंशिक नसून या रुग्णांनी घाबरावयाचे मुळीच कारण नाही. आयुर्वेद औषधीने सोरायसिस बरा करता येतो. जाणून घ्या सोरायसिस चे प्रकार अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#सोरायसिस #सोरायसिसप्रकार

27/12/2024

"वर्षातून किमान एकदा पंचकर्म केल्याने तुम्हाला खरोखरच लाभ होईल. बाकीच्या प्लेटलेट इंजेक्शन, हायड्रो थेरपी वगैरे नवनवीन थेरपीना काही फारसा अर्थ नाही."- डॉ. नरेश त्रेहान; मेदांता हॉस्पिटल्स संस्थापक. "मी डॉ. त्रेहन यांच्याशी पूर्ण सहमत आहे. आयुर्वेद म्हणजेच आयुष्याचं ज्ञान. फक्त औषधेच घ्या असं आयुर्वेद सांगत नाही. दिनचर्या, ऋतुचर्या पाळणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे."- डॉ. शिव कुमार सरीन; अग्रणीचे यकृतविकार तज्ज्ञ. यासाठी आम्ही आमचे स्वतःचे आयुर्वेदिक हॅास्पिटल सुरु करित आहोत जिथे या सर्व पंचकर्मांच्या शुद्धिकरण प्रक्रिया इंन्श्युरन्स क्लेममध्ये करुन घेऊ शकता.डॅा. नितिन थोरात एम डी (आयुर्वेद)

अभ्यंग हे एक ‘पूर्वकर्म’ आहे. शरीराला सुखावह वाटेल, सहन होईल इतके गरम, सुगंधी आणि वातघ्न असे तेल घेऊन ते शरीराला वरून खा...
28/10/2024

अभ्यंग हे एक ‘पूर्वकर्म’ आहे. शरीराला सुखावह वाटेल, सहन होईल इतके गरम, सुगंधी आणि वातघ्न असे तेल घेऊन ते शरीराला वरून खाली अशा गतीने हळूहळू चोळणे म्हणजे अभ्यंग. पंचकर्मातील प्रमुख कर्माच्या आधी केल्या जाणाऱ्या पूर्वकर्मापैकी एक म्हणजे अभ्यंग. पण अभ्यंगाचे स्वतंत्रपणेही अनेक फायदे आहेत. अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#अभ्यंग #अभ्यंगाचेफायदे #पूर्वकर्म #पंचकर्म #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार #आयुर्वेदिकऔषध See less. For more info visit us at http://www.svayurvedhospital.com/latest-update/-/7?utm_source=facebookpage

Salute to India’s missile man💐💐💐
14/10/2024

Salute to India’s missile man💐💐💐

Male Reproductive System have various disorders causing intertility regarding Oligospermia , Asthenospermia , Azoospermi...
27/09/2024

Male Reproductive System have various disorders causing intertility regarding Oligospermia , Asthenospermia , Azoospermia , Erectile Dysfunction , Premature Ej*******on Gynacomastia Etc . Ayurved has prescribed a thorough details about the system which treats all these topics efficiently.
ED, Premature Ej*******on, Male infertility, Gynacomastea, Best ayurved Doctor in Kamothe, Best Ayurved Hospital in Navi Mumbai, Ayurvedic Treatment in Navi Mumbai, Ayurved Hospital in Panvel Raigad . For more info visit us at http://www.svayurvedhospital.com/latest-update/male-reproductive-sy/6?utm_source=facebookpage

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोटाचे आरोग्य चांगले राहणे फार गरजेचे असतेकडकडीत भूक लागणे, पोट व्यवस्थित साफ होणे यास...
03/07/2024

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोटाचे आरोग्य चांगले राहणे फार गरजेचे असते
कडकडीत भूक लागणे, पोट व्यवस्थित साफ होणे यासारख्या साध्या मूलभूत गोष्टी शरीराच्या व्यवस्थित चालू असतील तर पोटाची अवस्था व्यवस्थित राहते आणि पर्यायाने आपल्या शरीरातील सप्त धातु आहेत, (रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र) हे चांगले राहतात.
आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार केसांची निर्मिती ही अस्थी धातू पासून म्हणजेच हाडांपासून होते. त्यामुळे ज्याच्या शरीरामधील हाडांची पोषकता चांगली असेल त्यांच्या शरिरामध्ये केसांचे आरोग्य सुदृढ राहते.. परंतु हेच जर एखाद्या पेशंटमध्ये पचनसंस्था व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा परिणाम हाडांवरती होतो.. शरीरातील कॅल्शियम गंधक त्याचप्रमाणे इतर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज कमी व्हायला सुरुवात होते आणि पर्यायाने केसांचे आरोग्य बिघडते…
तरी केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपली पचनसंस्था चांगली ठेवणे फार गरजेचे आहे.
आपल्या केसांच्या विकारांचा संदर्भामध्ये, त्याच्या वेगवेगळ्या कारणांचा आणि लक्षणांचा विचार करून आम्ही “केश संजीवनी कॉम्बो पॅक” मध्ये खालील औषधांचा अंतर्भाव केलेला आहे.
१)केश कल्प रसायन
केसांचे पोषण हे प्रामुख्याने शरीरातील लोह , गंधक , कॅल्शियम यासारख्या पदार्थावर अवलंबून असल्यामुळे आमच्या या केशकल्प रसायन या गोळ्यांमध्ये सल्फर लोह कॅल्शियम आवळा तसेच इतर अनेक आयुर्वेदिक उपयोगी वनस्पतींचा वापर केलेला आहे. यामधील एक एक गोळी सकाळ-संध्याकाळ उपाशीपोटी पाण्याबरोबर पोटातून घेतल्यास पित्ताचे तसेच पचनाचे त्रास तर कमी होतातच त्यासोबतच मूळ म्हणजे केसांमधील दोष दूर होऊन केस गळणे, केस पिकणे, कोंडा होणे, चाई पडणे यासारख्या केसांच्या आजारांचे मूळ कारणे दूर होऊन केसांची वाढ चांगली होते.केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होऊन नवीन काळेभोर केस तयार होण्यास सुरुवात होते.
२)केशारोग्य प्राश
यामध्ये आवळा पिंपळी माका जेष्ठमध मण्डुरभस्म कांतलोहभस्म प्रवाळभस्म स्वर्ण भस्म यांसारख्या केसांच्या आजारांवर उपयोगी अशा वनस्पतींचा वापर करून हे एक च्यवणप्राश सारखे गोड चवीचे औषध तयार केलेले आहे. हे औषध सकाळ-संध्याकाळ एक एक चमचा चघळून खाल्ल्यास केसांना गरजेचे असलेले विटामिन सी गंधक व लोह हे योग्य मात्रेमध्ये मिळून केसांचे आजार बरे होण्यास लवकर मदत होते.
३)केश संशोधन वटी
शास्त्राप्रमाणे केसांचे विकार होण्याच्या पाठीमागे शरीरातील वात पित्त हे दोष बिघडलेले असतात. शरिरातुन त्यांचे संशोधन होणे गरजेचे असते. यासाठी अजमोदा हिरडा आवळा ज्येष्ठमध यांसारख्या वनस्पतींचा वापर करून हे औषध तयार करण्यात आलेले आहे. याच्या दोन गोळ्या रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घेतल्यास शहरातील पित्त स्वरूपातील अतिरिक्त विषारांचा निचरा होऊन शरीराचे संशोधन होते व केसांचे आरोग्य सुधारते.
४)केश समृद्धी नस्य
केसांचे विकार हा प्रामुख्याने शरीराच्या वरच्या भागात असल्यामुळे उपचार करत असताना नाकावाटे दिलेले औषध हे शिर स्थानातील दोष दूर करून केसांच्या मुळाशी असलेले विविध प्रकारचे दोष शरीराच्या बाहेर काढून टाकते व केसांची मुळे घट्ट करते. त्याचप्रमाणे केसांच्या मुळांना स्निग्धता करून केस पांढरे होणे केस गळणे चाई पडणे केसांमध्ये कोंडा होणे यामध्ये खूपच उपयोगी पडते. औषधाचे 5 – 5 थेंब सकाळ-संध्याकाळ दोन्ही नाकपूड्यांमध्ये टाकून पाच दहा मिनिटे झोपून राहणे अपेक्षित आहे.
५)केशरंजन तेल
या तेलामध्ये पिकलेले केस काळे करण्यासाठी तसेच नवीन काळे केस येण्यासाठी उपयोग असले आयुर्वेदातील ब्राह्मी भृंगराज आवळा मंडुर भस्म कांतलोह भस्म जास्वंदीची फुले इत्यादी औषधांचा वापर करून हे तेल बनविण्यात आलेले आहे. याचा दररोज नित्यनेमाने केसांच्या मुळाशी लावण्यासाठी वापर केल्यास केस गळणे थांबते पण त्याचबरोबर पिकलेले केस काळे होण्यासाठी मदत होते.
६)केश दारूणक तेल
यामध्ये धोत्रा जास्वंद कडूनिंब माका यासारख्या या वनस्पतींचा वापर करून केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण व तो पूर्णतः बंद होण्यासाठी च्या निमित्त आयुर्वेदातील वनस्पतींचा वापर केलेला आहे. दररोज रात्री झोपताना केसांच्या मुळाशी हे तेल लावल्यास केसातील कोंडा पूर्णपणे बंद होऊन केस गळणे थांबते.
७)सुकेशा तेल
यामध्ये आवळा जास्वंद मेथी मंडूर भस्म ज्येष्ठमध त्याचप्रमाणे इतर औषधी वनस्पतींचा वापर करून केस काळे भोर व लांब सडक होण्यासाठी व दररोजच्या वापराच्या साठी या तेलाचे निर्माण केलेले आहे.याचा वापर दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर तसेच रात्री झोपताना केसांच्या मुळाशी लावल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते व केस सुदृढ होतात.
वरील केश संजीवनी कॉम्बो पॅक मधील सर्व औषधांची रचना ही केसांच्या विकारांचा व त्याच्या लक्षणांचा व कारणांचा विचार करून तयार केलेले असल्यामुळे कोणत्याही एका औषधाचा वापर केल्यास उपयोग होईलच असे नाही. परंतु त्यातील सर्व औषधांचा एकत्रपणे वापर केल्यास मात्र *केस गळणे, चाई पडणे, केस पिकणे, केस दुभंगणे, कोंडा होणे यासारख्या केसांच्या विकारांमध्ये खूपच चांगला परिणाम दिसून आलेला आहे. या संदर्भामध्ये मागील पंधरा वर्षापासून केलेल्या संशोधनामधून तयार झालेल्या औषधांचा वापर केल्या गेलेला आहे.
धन्यवाद
आमच्या शाखा-
कामोठे (नवी मुंबई)-दररोज
दादर(मुंबई)- प्रत्येक शनिवारी सकाळी
पुणे(सदाशिव पेठ)- महिन्याच्या पहिल्या रविवारी

डॉ. नितीन थोरात
MD(Ayu)

Address

Navi Mumbai

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919867980769

Website

https://www.svayurvedhospital.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved:

Share

Ayurvedic Panchakarma Treatment Center

Ayurveda is an ancient science having history of more than 5000 yrs. The principles of Ayurveda has been found very effective & potent as in now days also even if ,they were framed before hundreds of decades. Today, every research in Health science is focused on the remedy/treatment for disease but very little researches are lighting on prevention of diseases.