वैद्य सुविनय दामले

वैद्य सुविनय दामले VD. Suvinay Damle is a well known Ayurveda Expert in Kudal Maharashtra, He is now Invited Member of

08/12/2023

दूष्य देशम् वयम् कालं
अनलं प्रकृती वयः
सत्त्व सात्म्यम् तथा आहारम्
अवस्थाश्च पृथक्विधः
जसे दूष्य, जसा देश, वय, ऋतु, भूक, प्रकृती, वय, मानसिकता, आवडनिवड, उपलब्धतेनुसार आहार, या गोष्टी अवस्थानुसार बदलत असतात.
तसा प्रत्येक वेळेस स्वतंत्र विचार करावा.
1.आपल्याला आवडत असेल ते खावे
2.पचत असेल तर खावे.
3.आईवडीलांनी जे खाल्लंय ते खावे.
4.आपल्या अवतीभोवती जे उपलब्ध असेल तेच खावे.

04/09/2023

*वजन कमी करायचं खुळ*

वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
3 सप्टेंबर 2023.

वजन कमी करायचंच हाये, हे कोणत्या आरोग्य शास्त्रात लिहिलंय ?

ही नको ती खुळं पाश्चात्य विचारावर आधारीत डाॅक्टर, तत्सम डायेटीशीयन्स ललना आणि जिम इन्स्ट्रक्टर महोदय वारंवार सांगत असतात.

एकच चुकीची गोष्ट वारंवार सांगितली की ती खरी वाटायला लागते. हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. त्यामुळेच वजन कमी करायलाच हवं हा अत्यंत चुकीचा सिद्धांत प्रस्थापित झाला आहे.

परवा एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या वयोगटातील रुग्णांनी दवाखान्यात येऊन हीच मागणी केली की माझं वजन कमी होत नाही, वजन कमी करायचंच आहे. यात विशेष म्हणजे आघाडीवर सर्व महिला आघाडीच होती. एक मुलगी चौदा वर्षाची होती, एक बावीस वर्षाची होती तर एक चक्क बासष्ट वर्षाची होती. आणि त्यात बासष्ट वर्षाच्या वैद्य होत्या. सर्वांचा हट्ट एवढा की वजन कमी करायचंच आहे.

वजन का कमी करायचंय ? असं विचारल्यावर मात्र उत्तर कुणाकडेही नव्हतं. घाबरत घाबरत उत्तर येत होतं.. "सगळेच म्हणतात ना वजन कमी करायचंय म्हणून !?"
आता याला काय म्हणावं ? 🤨

नरवीर तानाजी मालुसरेंनी कधी वजन कमी करण्याचा अट्टाहास धरला नव्हता, ना शूरवीर बाजीप्रभुंनी ! ना पंचपांडवापैकी भीमांनी.

म्हणूनच मी याला *वजन कमी करण्याचं खुळ* म्हणतो. वजनावर आपली प्रतिकारशक्ती अवलंबून असते. जगण्याची उमेद जशी मनावर अवलंबून असते, तशीच ती वजनावर पण अवलंबून असते.
आणि वजनदार माणसांची भारताला गरज आहे; बडाघर पोकळ वाश्यांची नाही. नेहेमीच ताकदवान असणं आवश्यक आहे; जाड असणं नाही.
आमचे माननीय पंतप्रधान पहा, नाहीतर गृहमंत्री ! एकदम फीट. ना वजन कमी करण्याचा आटापीटा; ना कधी आजारी दिसलेत.

असो.

तर मी काय लिहित होतो, वजन का कमी करायचं, या प्रश्नाचं प्राॅपर उत्तर कुणालाच सांगता येत नव्हतं. एकानं बीएमआय चं पालुपद रटवलं, तर एकानं हार्ट एटॅक होईल म्हणून मत व्यक्त केलं तर काहीजणाना फिटनेस हवा असतो, तर काही ~जणांना~ जणींना छत्तीस चौवीस छत्तीसचं आकर्षण असतं.

पुरूषांना मात्र यातलं कोणतंही कारण मनापासून पटत नाही. "मला वजन कमी करायचंय" म्हणून सांगायला पुरूष फारच कमी संख्येने येतात. त्यांना उलट बाॅडी बिल्डींग करायची असते. भरदार छाती, पिळदार शरीर, डौलदार चाल आणि पोटावर सहा बिस्किटं असली की यांची आयुष्याची सगळी मेहनत कामी येते, असं यांना उगीचच वाटत असते. माझ्या लहानपणी कधी अमिताभ, धर्मेंद्र, शत्रुघ्न, शशीकपूर, गब्बरसिंग संजीवकुमार कधी सिक्सपॅकच्या मागे लागले होते, असं दिसलं नाही. यांचे उघड्या छातीचे फोटो कुठल्याही मासिकाच्या कव्हरपेजवर दिसले नाहीत. पण सल्लू, संजय, शारुखच्या जमान्यापासूनच्या तरुणाईला सिक्स पॅकचं जाम वेड लागलंय. जीम जाॅईन केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. त्याची फी एडजेस्ट करायला बापाला आणि जीमच्या वेळेला जेवणाची वेळ एडजेस्ट करायला मातोश्रीचं वजन कमी होत रहातं, हा भाग वेगळा.

महिलांच्या सौंदर्य स्पर्धातून हे खुळ, भारतीय तरुणींच्या नेत्री उतरवलं जातं. भले भविष्यात सगळे सांधे खिळखिळे झाले तरी बेहत्तर, भले गालफटं खाली बसली तरी चालतील, पण माझं वजन उतरवायचंच आहे, या भ्रमात ती आपली प्रतिकारशक्ती कमी करून घेतेय, हे लक्षात येईपर्यंत तिच्या हाडाची काडं झालेली असतात.
आणि डोसक्यावरील केसांची रया तर पार बिघडून गेलेली असते. शरीरातील स्निग्धपणा कमी झाल्याने थायराॅईडची पातळी देखील बिघडायला लागते आणि आयुष्यभर ती गोळी पण संगतीला येते.

शरीराचा स्निग्धपणा कमी करून चालत नाही. सांध्याचे वंगण, आतड्यातील ओलेपणा, डोळ्यातील तेज, नखांची चमक, त्वचेची मार्दवता, केसांची लकाकी, हाडांचा मजबूतपणा, काम झेपण्याची कार्यकारी शक्ती इ सार्‍या गोष्टी या शरीरातील वजनाशी, स्निग्धत्वाशी जुळलेल्याच असतात. ही चेन ब्रेक झाली की आरोग्याचे पुढील मणी, फिटनेसच्या माळेतून, गळायला सुरवात झालीच म्हणून समजा.

या नादात व्हिटामिन ए, बी, बी6, बी12, सी, डी, डी 2, इ. ते अगदी पार झेड पर्यंत सर्व रिपोर्टस देखील बिघडायला सुरवात झालेली असते. जे मिळवायचं आहे ते सोडून, ही विकतची दुखणी मात्र भरल्या खात्या पित्या घरात ओढवून आणतोय, हे लक्षातच येत नाहीये.

वजन आणि जाडी या दोन वेगळ्याच गोष्टी आहेत. फुग्यात हवा भरली तर फुग्याची जाडी वाढेल. पण वजन वाढणार नाही. आणि हवा काढून टाकली तर जाडी कमी होईल, पण वजनात एवढुसा पण फरक होणार नाही.
तसंच शरीराचं आहे. वात भरलेला असेल तर फक्त जाडी वाढलेली दिसेल, पण चरबी वाढलेली असेल तर वजनात देखील वाढ दिसेल.

काय असायचं ते असूदेत, जे जिथे अतिरिक्तपणे वाढलंय, ते तिथून जेवढं कमी व्हायला हवंय तेवढंच कमी करायचं असेल तर, कोणताही डाएट प्लान न पाळता, फक्त प्रदक्षिणा आणि लोटांगणं घालावीत. परिणाम नक्कीच दिसतो.

जेवढं वजन त्याच संख्येत लोटांगण आणि वजनाच्या निम्म्या संख्येत प्रदक्षिणा.
पहिल्यांदा प्रदक्षिणा नंतर लोटांगणं.
प्रदक्षिणा उभं राहून दोन्ही दिशेत... उलट सुलट आणि लोटांगण झोपून एकाच दिशेत. एकाच ठिकाणी गोल गोल लोळलात तरी चालेल, नाहीतर एका भिंतीपासून समोरील भिंतीपर्यंत लोळत गेलात तरी चालेल. पण परत लोळत येताना मात्र जिथे डोकं होतं त्या दिशेत पाय आणून, दिशा बदलून, लोटांगण घालत परतावे. म्हणजे एकाच कुशीने वळत लोटांगणं पूर्ण होतील.

लोटांगण घालताना खाली मऊशार गादी नसावी तर, घट्ट पृष्ठभाग असावा. फरशी, जमिन, वाळू, लाॅन, टेरेस, बाल्कनी, खिडकी कट्टा, दिवाण, बाक, इ.इ. कुठेही लोटांगण घातली तरी चालतील. माझ्या एका रुग्णेच्या कामवाल्याबाईने तर पहाटे लवकर उठून, तिच्या झोपडीच्या समोरील डांबरी रस्त्यावर लोटांगण घालून स्वतःची जाडी दोन महिन्यात पाच इंच कमी केली. इच्छा असली की अन्य कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही, हे खरे !
आणि उभं राहून प्रदक्षिणा घालायला, कोणत्याही ठिकाणची दीड बाय दीड फुटची जागा पण पुरते.

हे अस्सल भारतीय व्यायाम प्रकार करताना सुरवातीला थोडीशी चक्कर येईल, पोटात ढवळेल, पडल्यासारखं वाटेल, वाटूदेत. उलटी झाली तर अवश्य करावी. नंतर पाच सहा दिवसात हे त्रास पण कमी होत जातात. हलकेपणा येतो. मुख्य म्हणजे वजन कमी न होता पोटाची जाडी, आकार कमी होतो. सीट, मांड्या, दंडाचा आकार कमी होतो. त्यासाठी हे पाचही अवयव मिमी मध्ये टेलर टेपने मोजून ठेवावेत. एक महिन्याने पुनः मोजावेत, म्हणजे खरा फरक समजेल. उगाचच शंका घेत रहाण्यापेक्षा प्रत्यक्ष करून पहा म्हणजे परिणाम दिसेल. नंतर स्वानुभव शेयर करा.

आणि जाड असणं हा देखील गंभीर गुन्हा असल्याप्रमाणे वाटून घेत, स्वतःला विनाकारण नैराश्याच्या गर्तेत लोटू नका.

अशी पराभूत मानसिकता असलेल्या व्यक्तींचे रिपोर्टस देखील थोडेफार बदललेलेच येतात. याना फॅटी लिव्हर, बाॅर्डरवर साखर, पित्ताशयात खडे, गर्भाशयात गाठ, किंवा एखाद्याला मानेतली काखेतली अथवा स्तनातील गाठ, किडनीत खडा अथवा पोटातच काहीतरी गोळा वगैरे आढळून येतो. कोणताही त्रास नसताना फक्त रुग्णांना घाबरवणारे असे रिपोर्टस, थेट रुग्णांच्या हाती कशाला देतात कोण जाणे ?
यामागील रहस्य कधी कळलं नाही.

आमच्या विशाखाताई आणि
निर्मितीताई यांची जाडी ( किंवा वजन देखील) त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आड कधी आलेले पाहिलेले नाही. किती स्वच्छंदी, आनंदी दिसतात. आणि त्यांच्या रंगमंचावरील हालचालीमधे देखील किती सहजपणा असतो ना ! त्यांच्या अभिनयाकडे लक्ष गेले तरी त्यांची जाडी अथवा वजन आपल्या डोळ्यांना पण दिसत नाही.

ताकद, मजबूती, आपली कार्यकारीशक्ती, प्रतिकारक्षमता, आपले व्यक्तिमत्त्व इ. विसरून आपली फिगर, सिक्स पॅक, बीएमआय, वजन ऊंची इ. च्या मोहातून वेळीच बाहेर पडायला हवं. नाहीतर नको ते पथ्य पाळायच्या "हट्टाहासात" आहारातील विविध रसांचा आस्वाद घेण्याऐवजी विविध वासांच्या कृत्रिम गोळ्यांवर जगायची वेळ येऊ नये, म्हणजे मिळवली.
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
जनहितार्थ प्रसारीत,
कुणालाही नाहक बदनाम करण्यासाठी हा लेख लिहिलेला नाही. नाहीतर जाणीवपूर्वक पोलीस कलम 500 लावतील. 😝

04/09/2023

*"अनुपशये दारो दारी फिरे!*
*असती असे विकार काही!*
*चमत्कारिक भासते सारे!*
*दीर्घतेला त्या सुमार नाही !"*

ह्या वैद्यकीय कवितेचा संदर्भ कळवा...
संदर्भ = कविता वाचताच काय आठवले ? ते कळवा !
( अभ्यासू वैद्य मित्र-मैत्रिणीं साठी )

भयंकर त्रस्त जरी तो..
त्याचे त्यास न उमजे काही !
अस्वस्थ उरी उदरी जरी तो..
स्पष्ट व उघड असे काहीच नाही !

कसकसले जरी तरी त्या..
ज्वर म्हणावेसे नाही काही !
करीतो काम दिनरात वेळेवर..
पण उत्साह दिसे न काही !

म्हणता यार "ये रे खा रे "
तो भक्षतो नित्य सारे !
भूक व चव विचारता..
कुठे नावाला ही नाही !

करतो मजा मस्ती भारी...
पण मनाची पाटी ती कोरी !
जगतो उसने अवसान आणोनी...
कारण केवळ देहधर्म म्हणोनी !

जरी लावली लाली पावडर...
चेहरा पडलेला जाहला फिका रंग !
असे जरी पेहराव आखीव रेखीव..
सुकलेला देह नाही कुठली उमंग !

नुरले तेज नाही उत्साह नावाला..
होतोय आता भार स्वतःचा स्वतः ला !
दावता उत्तम वैद्यास, झाला पहा बोध...
तुमच्या व्याधीचे नाव आहे *"मलावरोध !"*😅

- वैद्य प्र. प्र.व्याघ्रसुदन

28/08/2023

काही आजार वयानुसार होत असतात. जसे मोतीबिंदु, प्रोस्टेट इ.

काही पूर्वकर्म वा प्रारब्धानुसार होत असतात. अंध, अपंग इ.

काही आजार जन्मजात असतात, जसे ओठ दुभंगणे, स्वमग्नता इ.

तर काही अपघाताने होत असतात. रोड एक्सीडंट, खून इ.

काही सरकारी आजार असतात. कोरोना लसीकरण

तर काही आपल्या चुकांमुळे होत असतात. अपथ्य करणे, नियम न पाळणे इ.

काही चुकीची औषधे कायमस्वरूपी घेत राहिल्याने असतात, जसे, बीपी कोलेस्टेरॉल

तर काही भीतीपोटी जन्माला येत असतात. ओसीडी, स्वप्न पडणे इ.

यापैकी आपणाला होत असलेला आजार कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय हे शोधून काढून तसे औषध वा पथ्य सुचवणे एवढे वैद्याचे काम असते.

त्याकरीता रुग्णाची पूर्ण तपासणी वैद्याने स्वतः करणे आवश्यक असते. स्वतःचे चातुर्य, हस्तकौशल्य, प्रश्नपरीक्षा, सद्सद् विवेकबुद्धी, परिस्थितीचा अंदाज, रुग्णाची शारिरीक मानसिक अध्यात्मिक स्थिती, इ गोष्टींची तपासणी करून निदान करणे आवश्यक असते.

काही वेळेस धीर देणे, काही वेळेस चार शब्द प्रत्यक्ष बोलणे, काही वेळा आशीर्वाद देणे, काही वेळेस शमन शोधन औषध देणे, काही वेळेस प्रार्थना करणे, करायला लावणे, काही वेळा रुग्णाला स्पर्श करणे आवश्‍यक असते.

एवढे करूनही रुग्ण बरा होणे हे ईश्वराच्याच हाती असते.

एक कटुसत्य
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
🌹🌹🌹🌹🌹🌹

30/06/2023

या वर्षीच्या ज्ञानांगणतर्फे आयोजित केलेल्या बालक पालक शिबिरात मी सहभागी झाले होते तसेच नेहमीच्या कामाच्या व्यापातुन शक्य तितके दामले गुरुजींनी यापूर्वी घेतलेले युट्युब वरचे लाईव्ह सेशन्सही पाहत आहे . जमेल तेव्हा युटूबवरचा दामले उवाच हा चॅनलही बघत आहे.
शिबिरात दामले गुरुजींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी रोज रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करण्याचा निश्चय केला त्यामुळे पोटाच्या तक्रारी बऱ्याच अंशी कमी झाल्या.
सूर्यास्तानंतर मला जास्त पाणी पिण्याची सवय होती ती शिबिरामध्ये मोडली त्यामुळे रात्रीची झोप सलग होऊ लागली.
शिबिरात दामले गुरुजींनी सांगितलेला वन पॉट मिल चा कन्सेप्ट मनापासून पटला या कन्सेप्टमुळे सर्व पदार्थांचा मनापासून आस्वाद घेता येऊन पचनशक्तीवरसुद्धा अतिरिक्त ताण पडत नाही
शरीरातील वात कमी करण्यासाठी दामले गुरुजींनी सांगितलेला एक उपाय म्हणून मी सकाळ संध्याकाळ माझ्या कानात तेल घालायला सुरुवात केली
मला गेल्या २४ वर्षांपासून ग्रहणीचा त्रास असल्याने अँलोपॅथीच्या डॉक्टरांनी मला भरपूर पाणी पिण्यास सांगितले होते . पण दामले गुरुजींनी शिबिरात केलेल्या मार्गदर्शनामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने आपल्या पोटात किण्वन किर्या घडते हे उमगले त्याप्रमाणे पाणी पिण्याच्या सवयीत योग्य तो बदल केल्यावर माझी पोटदुखी बंद झाली.
दामले गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पावसाळा वगळता मी रोज जेवणात उन्हात ठेवून गरम झालेलेच पाणी पिते
दामले गुरुजींनी सांगितलेल्या दिनचर्येमुळे दिवसभर काम करायला उत्साह वाटतो
दामले गुरुजी तुम्हाला मनापासून कोटी कोटी धन्यवाद

25/12/2022

आपल्या अंध क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकलाय, त्यांच्यासाठी एक लाईक झालाच पाहिजे!

25/12/2022

१२ डिसेंबर १९३० रोजी बाबू गेनू यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानानंतर पूर्ण भारतभर स्वदेशी मालाची चळवळ अधिक प्रखर झाली आणि ब्रिटीश हादरून गेले.

11/12/2022

*वैद्य सुविनय दामले कृत, भारतीय गुरुकुल परिवार*

स्वयंपाक घरातील मुलांचा वावर आणि मुलांना स्वावलंबी कसे बनवावे, या विषयावर तीनही गटात, एक लेख पाठवून त्यावर प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

शंभराहून जास्त पालकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आपल्या तीनही गटात प्रतिसाद उत्साहपूर्ण होता. आपल्या पाल्याला घरातील कामांची कशी सवय लावली, मुले काय करतात याबद्दल आनंदाने माहिती दिली.

त्यातल्या काही महत्त्वपूर्ण विचारांचे संकलन केले आहे.

*१.* जीवन विषयक शिक्षण लिंगविरहित असावे. हे मुलींचे काम, हे मुलांचे काम असा फरक नको, ही भावना त्यांच्या मनात रुजवायची.
*२.* मातीत चिखलात खेळायला शिकवावे.
*३.* छोटी छोटी कामे सांगत लहानपणीच सुरुवात करावी.
*४.* आज घरातील कामाला बाई मिळते, उद्या मिळणार नाही.
*५.* ज्याला जेवायला लागते, त्याला जेवण करणं आलंच पाहिजे.
*६.* स्वतःची,घराची, परिसराची, स्वच्छता राखणे लहानपणापासून शिकवले पाहिजे.
*७.* मुले स्वतःहून तयार होत नाहीत. त्यांच्या कलाने घेत त्यांना शिकवावे.
*८.* घर सगळ्यांचे आहे, घरातील कामे सर्वांची आहेत, हे आचरणातून समजावून द्यावे.
*९.* मुलांच्या वयानुसार त्यांच्या इतर सवयीनुसार हळूहळू सुरुवात करावी. मुलांच्यात काही दोष असतील तर तेही हळूहळू निघून जातात.
*१०.* ऐकवावे हा मोठ्यांचा, आणि ऐकून घेणे हा आपला गुण समजला, की सगळं जमायला लागतं.
*११.* कोणत्याच कामाची लाज वाटू नये. काम आपण आपल्या स्वतःच्या घरासाठी करतो, ही भावना मुलांच्या मनात रुजवली पाहिजे. घरची लादी पुसणे असो किंवा शेण काढणे असो.
*१२.* घरातील मोठ्यांनी मध्ये हस्तक्षेप केला तर, तुमच्या मुलाला काय शिकवायचे ते तुम्ही ठरवले, आमच्या मुलांसाठी हे आम्हाला ठरवू द्या, असे त्यांच्या कलाकलाने सांगून पहा.
*१३.* मुलांचे कौतुक त्या त्या वेळी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा आणि तुमचाही हुरुप वाढतो.
*१४.* मुलांना जिभेच्या आवडीवरून पोटाला आणि एकूणच प्रकृतीला आवश्यक अशा पदार्थांकडे नेण्याचं आव्हान पालकांसमोर आहे.
*१५.* मुलांचा नीटनेटकेपणा सुरुवातीला नसतो पण जशी समज वाढेल तसा तोही येईल.
*१६.* पालकांच्या आणि मुलांच्या अँगर मॅनेजमेंट साठी सत्र घेण्याची खूप गरज आहे.
*१७.* मुलांना स्वावलंबी बनवताना, त्यांना हे माहीत नसते की त्यामधूनच आपण नकळत स्वतःला घडवत असतो. कधी हट्टाने, लाडीगोडीने, प्रेमाने, राग देऊन किंवा जबाबदारी घेऊन कामे करून घ्यावी लागतात.
*१८.* मुलांना घरातल्या पदार्थांची, भाज्यांची, निसर्गाची, ओळख होत जाते.
*१९.* अगदी लहान असल्यापासून त्यांना सवय लावावी लागते, मग ती आपल्याला सवय लावतात.
*२०.* मुले इतरांच्या वागणुकीचे निरीक्षण करीत असल्याने, घरातील कामे करायला आधी मोठ्यांना शिकवावे लागेल...
*२१.* थोडी मोठी मुलं बाहेरून भाजी, वाण सामान आणणे शिकले की त्यांना व्यवहार ज्ञान कळू लागते.
*२२.* मुलांवर विश्वास ठेवायला पालकांनी शिकले पाहिजे, चुकत चुकत शिकतील, आपण त्यांच्या पाठीशी आहोत हा विश्वास मुलांना दिला पाहिजे. त्यांनी केलेल्या पसारा त्यांनाच आवरायला शिकवायला पाहिजे. हे करताना संयमाने, प्रेमाने वागले पाहिजे.
*२३.* हल्लीची मुलं खूप हुशार आहेत. त्यांच्या कल्पनेला आपण वाव दिला पाहिजे. चांगल्या गोष्टीचं कौतुक वेळीच केलं पाहिजे त्याचबरोबर चूकही त्याचवेळी जाणवून दिली पाहिजे.
*२४.* मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात त्यामुळे घरातलं वातावरण आणि मोठ्यांचं वर्तनही अनुकरणीय हवं.
*२५.* घरकामात घरातील प्रत्येकाचा सहभाग असला तर ते कंटाळवाणे न होता आनंदाने होतं.
*२६.* मुलांच्या वयाप्रमाणे त्यांना पॉकेटमनी ( ₹ २०/- ते ५०/-) देऊन त्याचा जमाखर्च लिहायला सांगितला तर एखादी आवश्यक वस्तू घेण्यासाठी स्वतः ठरवून त्यासाठी बचत करायची सवय लागेल.
*२७.* आपण थोडं कठोर होऊन मुलांना त्यांच्या शाळेची तयारी स्वतःच करायला लावावी.
*२८.* मुलांना योग्य आहार कोणता हे समजले पाहिजे. पारंपारिक आहाराचे महत्त्वही कळले पाहिजे.
*२९.* मुलांनी स्वयंपाकघरात काम केलं पाहिजे असं अजिबात नाही. वेळ आली की करतीलच की.
*३०.* निसर्गात बॅलन्स असतोच.
*३१.* कधीतरी काहीही न करता नुसते शांत बसता आले पाहिजे.

*चर्चेत सहभागी झालेले*👇

अद्विका पेडामकर, श्रावणी जंगम व आई विद्या, प्रथमेश गोलम व आई प्रीती. आई केतकी पडवी, १८ व १० वर्षाची मुले व आई हर्षा जाधव, प्रशांत गोडकर, आई रुपाली शेलार. आई Myiras Naturals, मीरा बापट व आई नेहा, १० वर्षाची मुलगी व ५ वर्षाचा मुलगा आणि आई स्नेहल राणे, आदित्य, आई वैष्णवी सामंत, मुलगा १४ व मुलगी ८ वर्षे आई प्रिया कुळकर्णी, ९ वर्षाचा मुलगा व आई मनाली गोलतकर, १४ वर्षे मुलगा व आई मिनाक्षी नाईक, वेदान्त व आई गौरी यशवंत पंडित, रुद्र १० वर्ष व आई मुग्धा पाध्ये, १२ वर्षे मुलगा व आई धनश्री केळकर गोखले, मृण्मयी १६ व अर्णव ११ वर्षे आणि आई निकिता भागवत, ८ वर्षांची मनवा व आई मानसी आचवल, आई डॉ. सुनीता नागवेकर, दोन मुले व आई वैद्य अर्चना चौगुले, वेदिका ८ वर्षे व आई वैद्य पल्लवी नाफड जोशी, आई अश्विनी पत्की, डॉ शिल्पा गोरे, एडव्होकेट तेजस्विनी, आई स्वाती अभंग, आई वनिता कमलेश, डॉ. मुक्ता, श्यामला बर्वे, मुलगा व मुलगी आणि आई वैद्य प्राजक्ता देवल, आई अनुराधा भंडारे, आई प्रिती बाजपेयी, ६ वर्षाची मुलगी व आई प्रीती परांजपे, गार्गी १९ वर्षे व आई मधुरा गोखले, आर्यन १० वर्षे व आई कोमल नरे सावंत, देवकी साठे, स्मिता बागुल, गायत्री जोशी.

आणि अजून पुष्कळ मंडळी. अनावधानाने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर क्षमस्व.🙏
... ही स्वावलंबनाची कहाणी सुफळ संपूर्ण. 👏👏👏👏👏👏

🌻 **भारतीय गुरुकुल परिवार**🌻नमस्कार मंडळी, आपल्या ऑनलाईन गुरुकुलला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. **हे आपले नवीन युट्युब चॅन...
22/11/2022

🌻 **भारतीय गुरुकुल परिवार**🌻

नमस्कार मंडळी, आपल्या ऑनलाईन गुरुकुलला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

**हे आपले नवीन युट्युब चॅनेल.**

https://youtube.com/channel/UCEmCCZA5p-rgsOXXLLZn6tg

उघडा, व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.

ठरल्याप्रमाणे भेटूच.

भारतीय गुरुकुल परिवार ओळख आणि उद्दिष्टे

https://youtu.be/cP_vBeZI1Ro

जीवनशैलीतून हरवलेले भारतीयत्व जपण्यासाठी ....... भारताचे समर्थ सुपुत्र आणि सुकन्या घडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ....

19/11/2022

नाजुक साजुक रेवुन
तुला जमनार नी..
कवा बनाला लागंल एकविरा
त कवा भवानी....

19/11/2022

काही दिवसांपुर्वी पुण्यात रहाणाऱ्या एका नटाने समाजमाध्यमावर आगरी भाषेतील वाक्य रचना टाकून त्याखाली #मराठीठारमारी ह्या हॅशटॅगचा वापर केला होता नंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडल्यानंतर त्यांनी ती डीलेटही केली पण खरं तर आगरी भाषा ही मुळात मुळ मराठी म्हणजेच ‘पाकृत मराठी’ जपत आली आहे कसे ते बघुया. 🙂
आगर म्हणजे भात, मासे,मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला व फळे संवर्धन करण्याची जागा!
आगरी भाषा मुळात अनेकांना वाटते की ती आगरी समाजाचीच भाषा आहे परंतु खाडी किनारी न आगरात ज्यांचा ज्यांचा संबंध आहे म्हणजेच सारी दर्यावर्दी लोकं ही भाषा बोलतात. मुळत: आगरी भाषा मुंबई,नवी मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,नाशिक आणि गुजरातच्या सिमा भागात बोलली जाते.
त्याच जीवंत उदाहरण म्हणजे या साऱ्या भागात अनेक ठिकाणांची नावे ही आगरी भाषेतील आहेत.
‘आळी’ या मराठी शब्दाचे आगरी अनुवाद ‘वली’ होतो, जसे की बोरिवली,कांदिवली,डोंबिवली..
मुळत: आगरी भाषेने प्रमाण मराठी पेक्षा अनेक प्राकृत भाषेतील शब्द जतन केले आहे.
प्राकृत मराठीत ‘आम्ही’ ऐवजी ‘अमी’ म्हटले जाते
आगरीतही अगदी अमी,आमी बोलले जाते.
‘ओळख’ या मराठी शब्दाचे प्राकृत मराठी रुप ‘वलख’ आणि आगरीतही ‘वलख’ म्हटले जाते.
त्याच प्रमाणे अनुक्रमे प्रमाण मराठीतील
एरव्ही,नवरा,शिडी
साठी आगरी आणि प्राकृतात
यरव्ही,नोवरा,निसान
म्हटले जाते.
याचा असा अर्थ होतो की प्राकृत मराठीचे संवर्धन केले ते खरे ‘आगरी भाषेने’.
म्हणुनच संत साहित्यातही या भाषेचा प्रभाव वा प्राकृत भाषेमध्ये साम्य दिसते.
संत तुकारामांच्या अभंगातील पुढील ओवी ‘जवं मोठा चाले धंदा,तंव बहिण म्हणे दादा’ आता या ओवीतील ‘जवं-तंव’ हे शब्द आगरीत सर्रास वापरले जातात असे अनेक उदाहरणे आपल्याला संत साहित्यात अगदी ज्ञानेश्वरीतही मिळतील.
तरी काही लोकांना आगरी अशुध्द भाषा वा शिवराळ भाषा आहे असा भ्रम आहे!

-सर्वेश रविंद्र तरे
#आगरयान

10/11/2022
07/10/2022

हेळवी:- जन्माची नोंद हवी? पण सरकारी कचेरीत ती सापडत नाही अशा वेळी एकमेव उपाय राहतो तो म्हणजे हेळवी.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमाभागात हेळवी नावाने प्रसिद्ध अशी जमात राहते. जन्माच्या नोंदी ठेवायची खूप मोठी जबाबदारी या समाजाने खूप पूर्वी पासून जपली आहे. यांच्या कडे तुमचा मूळ पुरुष ते आजतागायत सर्व जन्माच्या नोंदी सापडतील. या सर्व नोंदी हे लोक मोडी लिपीत ठेवतात. वर्षानुवर्ष वापरलेल्या वह्या अगदी व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत.

हेळवी लोकांनी प्रत्येक समाज , प्रत्येक गाव वाटून घेतलं आहे. हे लोक दर २-३ वर्षांनी त्या त्या गावात जावून नवीन जन्माच्या नोंदी घेतात आणि त्या बदल्यात तांबा पितळे ची भांडी किंवा उदरनिर्वाह चालेल इतके पैसे घेतात.
अस म्हटलं जात की जन्माच्या नोंदी ठेवायचं हे काम भगवान शंकराने यांना दिलं आहे आणि गावोगावी फिरावं लागतं म्हणून आपला नंदी देखील या लोकांना दिला.

____ ओंकार तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,खानापूर

Address

Atharv Plaza, Kudal Vengurla Road, Kudaleshwar Mandir Marg, Laxmi Wadi, Rawoolwadi
Kudal
416520

Opening Hours

Monday 9am - 1pm
2pm - 10pm
Tuesday 9am - 1pm
7pm - 10pm
Wednesday 9am - 1pm
7pm - 10pm
Thursday 9am - 1pm
7pm - 10pm
Friday 9am - 1pm
7pm - 10pm

Telephone

+912362223423

Alerts

Be the first to know and let us send you an email when वैद्य सुविनय दामले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

VD Suvinay Damle

VD. Suvinay Damle is a well known Ayurveda Expert in Kudal Maharashtra, He is a Vice President of Ayurveda Vyaspeeth Group, Limca Book awarded him for ethical medical practice, Recently he is being titled as a Guru of Bhartiya Ayurved. He has also worked with Rastrabandhu Rajiv Bhai Dixit. His health tips on Social Media captured very huge audience in a very short period of time. His motive of spreading awareness and knowledge of Ayurveda, true Indian lifestyle and tradition got wider reach. He started following Barter System in his Clinic which helped many poor people to get treated by him. He has build a passionate team for spreading the knowledge of Ayurveda, He and his team is also working for spreading the awareness of Bhartiya Gurukal (True Indian Education System).