Dr Shilpa Samant

Dr Shilpa Samant I am a wellness coach, doctor by profession and writer by passion.

My mission is to create awareness among people about diet and lifestyle and help them lead a peaceful and blissful life.

16/11/2023

soaps

14/11/2023

#दीपावली #पाडवा #शुभदिन #शुभंभवतु

श्री धन्वंतरी पूजन 🙏🙏🙏
10/11/2023

श्री धन्वंतरी पूजन 🙏🙏🙏

           #धनत्रयोदशी,  #धन्वंतरी पूजनसमुद्रमंथनाची कथा आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले त्...
10/11/2023



#धनत्रयोदशी, #धन्वंतरी पूजन

समुद्रमंथनाची कथा आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले त्यातून जी रत्नं बाहेर पडली त्यापैकी एक भगवान धन्वंतरी. देवांचे वैद्य. भगवान धन्वंतरींची मूर्ती पाहिली असता त्यांच्या हातात शंख, चक्र,जलौका अर्थात जळू आणि अमृतकुंभ दिसून येतो. यातील प्रत्येक गोष्ट ही प्रतिकात्मक आहे. शंख पावित्र्य दर्शवितो. पूजाविधीमध्ये शंखनाद करतात. हा नाद वातावरणात पवित्र लहरी उत्पन्न करतो. चक्र म्हणजे गतिशीलता. ऊर्जा आणि स्थित्यंतराचे प्रतिक! जलौका अर्थात जळू ही दूषित रक्त शोषून घेते आणि नवसंजीवनी देते. अमृतकुंभ हा अमरत्व प्रदान करणारा आहे!!!

जर खोलवर विचार केला तर यातून आयुर्वेद का जन्माला आला हे आपल्याला समजेल. शरिरातील दोष, अशुद्धी काढून टाकणे, ऊर्जा स्थापित करणे, शरीर पवित्र म्हणजे निरोगी ठेवणे आणि अमरत्व म्हणजे लाक्षणिक अर्थाने मरण टाळणे किंवा अमर होणे असे नसून वृद्धावस्थेत देखील रोगमुक्त आणि क्रियाशील रहाणे. असे जीवन जगण्यासाठी मदत करतो तो आयुर्वेद !!!!

आधुनिक काळात आपण prevention is better than cure असे म्हणतो. पण हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने हेच अधोरेखित केले आहे.

आयुर्वेदाचे तत्त्वच मुळी "स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् , आतुरस्य विकार प्रशमनम् " असे आहे.
म्हणजे जो निरोगी आहे त्याचे आरोग्य अबाधित ठेवणे ही प्राथमिकता आणि मग त्यानंतर आतुर अर्थात रोगी व्यक्तीचे विकार प्रशमन !!!

याकरिता दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, पथ्य,अपथ्य,कुपथ्य,औषधीकल्प, औषधी संग्रह, औषधविधी, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक संस्कार इतकेच काय तर आयुर्वेद सुप्रजा निर्माण होण्यासाठी गर्भाधान, गर्भसंस्कार कसे करावेत हे अतिशय सूक्ष्म पातळीवर जाऊन वर्णन करतो.

थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेद सर्वसमावेशक आहे. मानवी जीवनातील प्रत्येक आयामाला त्याने स्पर्श केलेला आहे. मानसिक रोगांचा त्याकाळी देखील खोलवर अभ्यास केलेला दिसतो. फक्त शारीरिक व मानसिक पातळीवर न थांबता त्याहीपलीकडे जाऊन आध्यात्मिक पातळीवरील व्याधी आणि त्यांवरील उपाययोजना यांचे सुद्धा वर्णन केले आहे.

इतकेच नव्हे तर विषचिकित्सा, प्राण्यांचे रोग व त्यावरील उपाय यांचा परामर्श घेतलेला दिसतो.

मानवी जन्म मिळणे हे खरोखरच भाग्याचे आहे. आणि आपल्याला लाभलेला हा देह काळजीपूर्वक सांभाळणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कारण या शरीराच्या माध्यमातून आपण इतर सर्व हेतू साध्य करु शकतो.

शरीरमाद्यं खलु धर्म साधनम् | म्हणजे धर्म, अर्थ,काम, मोक्ष यापैकी कोणताही टप्पा गाठण्यासाठी शरीराने आपली साथ देणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी शरीरशुद्धी करणे, साठलेले दोष, अशुद्धी काढून टाकणे फार गरजेचे असते. म्हणून पंचकर्म हे शरीरशुद्धी साठी अतिशय उपयुक्त आहे. यात cellular level पर्यंत detoxification केले जाते. शरीराला नवसंजीवनी प्राप्त होते.

अशा आयुर्वेदाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. आणि आयुर्वेद रुपी अथांग सागराचा संपूर्ण अभ्यास करणे या एका जन्मात तर शक्यच नाही. पण आपण भारतीयांनी अभिमानाने आयुर्वेदाची महती सर्व जगाला सांगितली पाहिजे. हा आपला अमूल्य राष्ट्रीय ठेवा जतन आणि वृद्धिंगत करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले पाहिजेत.

आयुर्वेदाचे अवतरण ज्यादिवशी झाले तो दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी श्री धन्वंतरी पूजन करून या विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

आजच्या दिवशी सर्व प्राणीमात्र व चराचर सृष्टीला निरामय आरोग्य लाभो हीच श्रीधन्वंतरी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

#धनत्रयोदशी
दि. १० नोव्हेंबर २०२३
© डॉ. शिल्पा सामंत.

10/11/2023

       मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?.....आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस ! मन म्हणजे काय याच्या बऱ्याच व्याख्या आपण वा...
10/10/2023



मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?.....

आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस !
मन म्हणजे काय याच्या बऱ्याच व्याख्या आपण वाचल्या असतील. वैद्यकीय भाषेत मनाचं स्वास्थ्य आणि त्याचं महत्त्व काय यावर बरेच लेख आपण नेहमीच वाचत असतो.
आपल्या शरीरातील मन नावाचा हा अवयव मात्र दाखवता येत नाही. त्याच्या भावभावनांची अनुभूती फक्त येते.
मन हे अथांग समुद्रासारखं आहे. त्याच्या तळाशी अनेक मौल्यवान रत्नं दडलेली आहेत. त्याचप्रमाणे या सागराच्या पोटात कचरा सुद्धा साठलेला असतो. हा कचरा म्हणजे नकारात्मक भावना. एखादं निमित्त पुरतं आणि मनाच्या सागराला उधाण येतं. अशावेळी भावनांचा कडेलोट होतो आणि मनात साठलेला कचरा शब्दरुपाने बाहेर पडतो. अश्रू सुद्धा झरझर वाहू लागतात. आणि एकप्रकारे मनावर साठलेलं ओझं हलकं करतात.

पण काही प्रसंगात भावना गोठतात, अश्रू आटून जातात. अशावेळी ती व्यक्ती कोणत्याही प्रकारे व्यक्त होत नाही. अगदी जिवंत पुतळाच जणू! इथे समुपदेशनाची हळुवार फुंकर खूप उपयोगी ठरते. वर्षानुवर्षे एखाद्या नकारात्मक भावनेशी झगडणाऱ्या व्यक्तीला हवा असतो विश्वासाने आपले म्हणणे ऐकणारा एक आधार!

समुपदेशक हा तटस्थ असतो. तो फक्त उपाय सुचवतो, मार्ग दाखवतो. पण शेवटी त्या मार्गावर वाटचाल मात्र आपल्यालाच करायची असते. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत कोणताही उपदेश मग तो हितकारक का असेना, तो स्विकारण्याची अवस्थाच नसते. म्हणून काही वेळा समुपदेशनाबरोबरच औषधं सुद्धा गरजेची असतात. या औषधांमुळे तुफानी वादळासारख्या घोंगावणाऱ्या भावना काबूत येतात. मन स्थिर आणि ग्रहणशील झालं की मग विवेकीपणे विचार करणं शक्य होतं.

आजकाल टेन्शन, डिप्रेशन, स्ट्रेस, स्पर्धा, जगण्याचा भरधाव वेग, नातेसंबंधात येणारा दुरावा, विभक्त आणि नॅनो कुटुंब हे सगळे घटक जगणं कठीण करतायत. यासोबतच सोशल मीडिया आणि त्याचा अनिर्बंध वापर हा देखील मनःशांती बिघडण्यासाठी कारणीभूत आहे.

अशावेळी आपल्या मनाची अर्थात भावनांची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. त्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक भावना कोणत्या हे समजून घेतले पाहिजे.
प्रेम, आनंद, काळजी घेणे, आदर, परोपकार, समजून घेणे अर्थात शेअरिंग आणि केअरिंग या सुखद, सकारात्मक भावना आहेत. याविरुद्ध द्वेष, मत्सर, संताप, भीती, लाज, अपराधीपणा, एकाकीपणा, उपेक्षा, अनादर अशा अनेक नकारात्मक भावना आहेत.

जगताना संपूर्ण सुखी किंवा पूर्णतः दुःखी अशी व्यक्ती कधीच नसते. आपल्या आयुष्यात काही जमेच्या बाजू तर काही उणीवा असतात. फक्त मानवी मनाची प्रवृत्ती अशी आहे की आपला फोकस माझ्याकडे काय नाही इथेच जास्त असतो. एकदा हे समजलं की मग जाणीवपूर्वक माझ्याकडे काय आहे हे मनाला विचारावं. आपली बलस्थानं लक्षात आली की त्यावर काम करावं, मेहनत घ्यावी. यात मनाला गुंतवले की मग नकारात्मकता पूर्वी इतकी सलत नाही हे नक्की!

REBT (Rational Emotive Behaviour Therapy) अर्थात विवेकनिष्ठ भावना व वर्तन पद्धती ही मानसोपचारातील एक उपचार पद्धती आहे. यात आपल्याला भावभावनांचे नियमन कसे करावे हे शिकवले जाते. या उपचार पद्धतीचे जनक आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस. त्यांचं आयुष्य म्हणजे अनेक भावनिक दृष्ट्या हतबल करणाऱ्या प्रसंगांची मालिकाच आहे. त्यातून समन्वय साधून चांगल्या गोष्टी कशा पहाव्यात आणि संतुलित, विवेकपूर्ण विचार कसा करावा हे त्यांनी सांगितले आहे.

आयुर्वेदात तर मन आणि शरीर यांचा एकत्रितपणे विचार केलेला दिसतो. एवढेच नव्हे तर यापलीकडे जाऊन आत्मा या विषयी सुद्धा सखोल विवेचन केले आहे. म्हणजे आधुनिक विज्ञान जिथे physical, mental, emotional health असा विचार करते तिथे हजारो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रात spiritual aspect चा देखील विचार केलेला आहे. याचबरोबर योगशास्त्र सुद्धा मनाचे सशक्तीकरण करणारे आहे. प्राणायाम, ध्यानधारणा यामुळे भावनांचे नियंत्रण योग्य प्रकारे करता येते.

भगवद्गीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय यात जगण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे त्याचा आधार ' विवेक ' हाच आहे. आपल्या कडे एक अतिशय सुंदर म्हण आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी ! विपरीत बुद्धी म्हणजे अविवेकी वागणे, त्यातून येणारी संकटे आणि परिणामस्वरूप होणारा मानसिक त्रास तसेच शारिरीक, सामाजिक, कौटुंबिक सर्व पातळ्यांवर येणारी अस्वस्थता!!!

म्हणून आजच्या world mental health day च्या निमित्ताने मनाशी मैत्र साधूया !
आपल्या भावना ओळखणे, त्यासाठी न लाजता मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशक यांची मदत घेणे यात कोणताही कमीपणा मानू नये.

मानसिक आरोग्य याविषयी असणारी अनास्था निदान स्वतःच्या कुटुंबापुरती तरी दूर करुया. तरच सुदृढ मन असणारा समाज निर्माण होईल. आत्महत्या, नैराश्य हे आधुनिक युगातील विकार आहेत. आणि यांच्याशी लढण्यासाठी निकोप मन, भक्कम आधार देणारे सुहृद तसेच विवेकपूर्ण विचार करणारा समाज या मुलभूत गरजा आहेत.

बऱ्याच वेळा मानसिक आजारातून पूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तीला समाज संपूर्णपणे स्वीकारत नाही ही वस्तुस्थिती आहे.

मन मनास उमगत नाही,आधार कसा शोधावा या अवस्थेपासून प्रगल्भ होत होत आपण मनाच्या या टप्प्यावर यावे की जिथे आपलं आयुष्य सत्य, सुंदर, मंगलमय, प्रार्थना असावी.

देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य, सुंदर, मंगलाची नित्य हो आराधना
दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना
भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना
सत्य, सुंदर, मंगलाची नित्य हो आराधना.

©Dr Shilpa Samant

Watch this amazing Marathi songs 'Mana Tujhe Manogat' from the Marathi movie 'Kalat Nakalat', Directed by Kanchan Nayak and Produced by Smita Talwalkar. Song...

11/09/2023
 #बहरला हा मधुमास ....श्रावण महिना म्हणजे सृष्टीसौंदर्य!!!हिरवागार निसर्ग आपल्या डोळ्यांना सुखावतो, मन शांत करतो आणि या ...
19/08/2023

#बहरला हा मधुमास ....

श्रावण महिना म्हणजे सृष्टीसौंदर्य!!!

हिरवागार निसर्ग आपल्या डोळ्यांना सुखावतो, मन शांत करतो आणि या श्रावणातील व्रतवैकल्ये, पूजापाठ, पुरणावरणाचा नैवेद्य यामुळे सात्त्विक समाधान लाभते.

श्रावणातील सोमवारी शंकराला वहायची शिवामूठ, मंगळागौरीची पूजा, बुधपूजन, बृहस्पती पूजन, जराजिवंतिका पूजन,आदित्य पूजन असा प्रत्येक वाराचा मान असतो. पूर्वीच्या काळात या प्रथा अगदी साग्रसंगीत पाळल्या जात पण आता बदलत्या काळानुसार आपण यातला मतितार्थ समजून घेतला तर आपल्या पूर्वजांची ज्ञानी वृत्ती लक्षात येते. निसर्ग आणि आरोग्य यांची सांगड घालणारी श्रावणातील व्रतवैकल्ये आणि त्यांच्याशी निगडीत कथासुद्धा बोधप्रद आहेत.

श्रावणाची सुरुवात होते ती नागपंचमीने !!!
नागपंचमीच्या दिवशी जमिन खणू नये, शेतातील भाज्या उपटून आणू नयेत असा संकेत आहे. त्यामागचे कारण म्हणजे साप हा सुद्धा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. वारुळ असलेली जमीन सकस असते असे शेतकरी आजही सांगतात. या जीवांचा अधिवास संरक्षित करण्याचे निमित्त म्हणून नागपंचमीचा सण. या सणाला लाह्यांचाच नैवेद्य का बरं? तर पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. लाह्या फुलवलेल्या ज्वारीपासून बनतात त्यामुळे पचायला अतिशय हलक्या असतात. कोकणात, गोव्यात हळदीच्या पानातील पातोळ्या बनवतात. हळद इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम आहे. कोरोनाच्या काळात हळदीचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. देशावर विशेषतः कर्नाटकात तंब्बिट्टाचे लाडू बनवले जातात.

असाच रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण !!! बहिणभावाचे नाते समृद्ध करणारा !!!
नारळी पौर्णिमा किनारपट्टीवर विशेष उत्साहाने साजरी करण्यात येते. या दिवशी समुद्राची पूजा करुन मगच मासेमारी नव्याने सुरू होते. पावसाळ्यात मासे अंडी घालतात. त्यांचा प्रजनन काळ सुरू असल्यामुळे या दिवसात मासेमारी बंद असते. शिवाय समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून तो शांत रहावा यासाठी प्रार्थना करतात. मग सजवलेल्या होड्या सागरात लोटल्या जातात.

किनारपट्टीवर प्रमुख आहार म्हणजे मासे, भात आणि नारळ !!!
म्हणून या दिवशी खास मान असतो तो नारळीभात आणि ओल्या नारळाच्या करंज्यांचा.
यातून ज्या प्रदेशात जे पिकते ते आपल्या शरीरासाठी सर्वात योग्य असते हे लक्षात येईल. म्हणूनच पाश्चात्य खाद्यसंस्कृतीच्या आहारी जाऊन नूडल्स, ओट्स, परदेशी फळं यांना अवास्तव महत्त्व देणे योग्य नाही. सजगपणे आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल की निसर्ग आपली काळजी घेतच असतो. आणि ज्या ऋतुमध्ये जे अन्न हितकारक ते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देत असतो.

श्रावणात उगवणाऱ्या टाकळा, कुर्डू, शेवगा, कंटोली, अळू, अळंबी, तेरं अशा कित्येक रानभाज्या म्हणजे औषधी गुणांची खाणच !!!

आपल्या आदिवासी भगिनी या रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येतात. मध्यंतरीच्या काळात लुप्त झालेल्या या रानभाज्या आता मात्र दिमाखात मिरवताना दिसतात. ठिकठिकाणी, शाळांमध्ये भरणारे रानभाजी महोत्सव मनाला खूप आनंद देतात. या दिवसात आवर्जून मुलांना घेऊन तिथे भेट द्यावी. आपल्या संस्कृतीचा आदर त्यांच्या मनात बिंबवला जाईल यात दुमत नाही. नेहमीच्या शॉपिंग मॉल मधल्या भटकंती ऐवजी हा अनुभव त्यांचे भावविश्व नक्कीच समृद्ध करेल.

मंगळागौरीच्या पूजेतील पत्री पाहिली तर लक्षात येईल की या सर्व औषधी वनस्पती आहेत आणि आयुर्वेदात त्यांचे सुंदर वर्णन केले आहे. यातील अनेक प्रकारच्या पत्री म्हणजे बेल, तुळस, मोगरा, अर्जुनसादडा, आघाडा, जाई, जुई, मका, बोर, चमेली, डाळिंब, कण्हेर, शमी, विष्णुक्रांता, डोरली, धोत्रा, दुर्वा, शेवंती, रुई इत्यादी. विशेषत: स्त्री रोगांमध्ये या वनस्पती खूपच उपयुक्त आहेत.

मंगळागौरीचे पारंपारिक खेळ म्हणजे तर सर्वांग सुंदर व्यायाम. हल्लीच आलेल्या " बाईपण भारी देवा " या मराठी चित्रपटातील मंगळागौरीची पूजा आणि त्यानिमित्ताने दिलेला सुंदर संदेश सर्वांनाच हवाहवासा वाटला !!!

गोकुळाष्टमी आणि दहीकाला हा खास बाळगोपाळांचा सण !!! सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव यांची शिकवण देणारा हा सण मैत्रीची महती सुद्धा सांगतो.

श्रावणाची सांगता होते तो दिवस म्हणजे पोळा आणि मातृदिन!!!

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांचे मित्र म्हणजे बैल. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून पोळा साजरा करण्यात येतो. बैलांना छान सजवून, औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी बैलांना संपूर्ण आराम !!!

मातृदिन हा आईची महती सांगणारा सण. ज्या क्षणी स्त्री बाळाला जन्म देते, त्यानंतर तिची प्रत्येक कृती, प्रत्येक विचार हा त्या बाळाभोवतीच फिरत असतो. जरी ही आई कामाच्या निमित्ताने घराबाहेर असली तरी " घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी " अशीच मातेच्या मनाची अवस्था असते. म्हणूनच मातृदिनाच्या दिवशी लेकुरवाळी बाई आपल्या अपत्यांचे दीर्घायुष्य आणि निरामय आरोग्य यासाठी पूजा करते.

कितीतरी कवींनी श्रावणातील सौंदर्याचे वर्णन केले आहे. हिंदी चित्रपटात तर ' सावन‌ ' या शब्दाभोवती गुंफलेली अनेक गीते आहेत. हिंदू संस्कृतीनुसार हा महिना अतिशय पवित्र असा आहे.

चहूबाजूंनी उमलून आलेले निसर्गसौंदर्य आणि सणांची रेलचेल पाहून खरंच श्रावण महिना म्हणजे " बहरला हा मधुमास ...." असंच म्हणावंसं वाटतं.

© डॉ.शिल्पा सामंत.
B.A. M.S.

22/12/2022

Switzerland 🇨🇭💙🇨🇭

(Photo by~)

1st to 7th SeptemberNutrition weekNutrition is not only the food we eat but it's all about what we feed our mind and sou...
04/09/2022

1st to 7th September
Nutrition week
Nutrition is not only the food we eat but it's all about what we feed our mind and soul with...
For total health a healthy balance of physical, mental and spiritual well-being is required.
On occasion of Nutrition Week you can avail the facility of online consultation.
The session will cover All aspects of Nutrition.
For appointment wa on 7796324867.

Address

Kudal
416520

Telephone

+919821776455

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Shilpa Samant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share