Sai Hospital Majalgaon

Sai Hospital Majalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sai Hospital Majalgaon, Hospital, Doctor's Lane, Samata Colony, Majalgaon.

गुढी पाडवा व रमजान ईद निमित्तसाई हॉस्पिटल, डॉक्टर्स लेन, माजलगाव येथे रविवार दि.07 एप्रिल 2024 रोजी ,'मोफत उपचार व मार्ग...
02/04/2024

गुढी पाडवा व रमजान ईद निमित्त
साई हॉस्पिटल, डॉक्टर्स लेन, माजलगाव येथे
रविवार दि.07 एप्रिल 2024 रोजी ,
'मोफत उपचार व मार्गदर्शन शिबीर '
तरी गरजू रुग्णांनी शिबिराचा फायदा घ्यावा ....

नेहमीप्रमाणे *साई हॉस्पिटल* रुग्णांना मदतीचा हात देत आहे. शहरात प्रथमच डायबेटीस रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि उपचार ...
25/06/2023

नेहमीप्रमाणे *साई हॉस्पिटल* रुग्णांना मदतीचा हात देत आहे. शहरात प्रथमच डायबेटीस रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि उपचार तेही कमी पैशात साई हॉस्पिटल उपलब्ध करून देत आहे, '*साई डायबेटीस क्लब*'च्या माध्यमातून...

जर तुम्हाला अचानक घाम फुटून चक्कर येतेय का ? जास्त तहान, भूक लागते? वारंवार लघवीला जावे लागते? हातापायांना मुंग्या / बधिरता येणे ?तर सावधान! ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात.

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी नीट नसणे यामुळे मधुमेह वेगाने पसरत आहेत. विशेष म्हणजे, *आता मधुमेह कोणत्याची वयाच्या रुग्णात आढळून येतोय*. काही वेळा तर जन्मजात बालकास देखील मधुमेह आढळून आला आहे. मात्र, नियमित उपचार घेतल्याने मधुमेह आटोक्यात येतो.

यामुळे लक्षणे, दिसून येत आहेत? किंवा तुम्हाला आधीच मधुमेह आहे तर आम्ही खास तुमच्यासाठी कमी खर्चात उपचारांची सुविधा देत आहोत. *साई हॉस्पिटल* यासाठी पुढाकार घेऊन सुरु करत आहे *साई डायबेटीस क्लब*....

अधिक माहिती साठी *साई हॉस्पिटल*, डॉक्टर्स लेन, समता कॉलनी, माजलगाव येथे अवश्य भेट द्या ...

25/03/2022

Sugarcane juice: उन्हाळ्याचा त्रास जाणवणार नाही, उसाच्या एक ग्लास रसात आहेत इतके पोषक घटक

उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. ऋतू बदलल्यानं खाण्याच्या सवयींमध्येही फरक पडतो. उन्हाळ्यात आपल्याला रसदार पदार्थ खावेसे वाटतात, कारण त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं, उत्साह वाढतो, उन्हाची तीव्रता कमी होते. उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस (Sugarcane juice) पिणं खूप फायदेशीर ठरू शकतं. कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध, उसाचा रस हाडांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. उसाचा रस प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा (Weakness) लगेच कमी होतो. उसाचा रस रोज प्यायल्यास शरीर उत्साही राहते, तसेच आरोग्याला अनेकदृष्ट्या फायदा होतो.

यकृत डिटॉक्सिफाय करते
उसाचा रस यकृतासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामुळे यकृत डिटॉक्स होते. उसाच्या रसामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट यकृतातील विषारी घटक काढून टाकतात आणि संक्रमणापासून संरक्षण करतात. काविळीच्या आजारात उसाचा रस अतिशय फायदेशीर मानला जातो.�
कॅन्सर
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, परंतु उसाच्या रसामध्ये असे अनेक घटक असतात जे शरीराला कॅन्सरसारख्या घातक आजारापासून वाचवतात. उसाचा रस प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो.

ऑस्टियोपोरोसिसवर प्रभावी
उसाचा रस रोज प्यायल्यास ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या टाळता येतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियमसारखे घटक हाडे मजबूत करण्याचे काम करतात.

युरिन इन्फेक्शन होत नाही
महिलांना अनेकदा युरिन इन्फेक्शन खूप लवकर होतं. त्यांनी उसाचा रस नियमित प्यायल्यास त्यांना खूप फायदा होऊ शकतो. उसाचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि UTI संसर्गाचा धोका कमी करतो.

त्वचा उजळते
जर तुमची त्वचा निस्तेज असेल किंवा अकाली सुरकुत्या पडण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही उसाचा रस नियमित प्यावा. यामुळे अकाली वृद्धत्व येण्याचा प्रकार टळतो, चेहरा तरुण दिसतो त्वचा चमकदार बनते आणि मुरुमांसारख्या समस्याही कमी होतात.

09/03/2022

वजन कमी करण्यासाठी Interval Walking आहे खूप फायदेशीर, समजून घ्या योग्य पद्धत

इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते.
बरेच लोक चालण्याने वजन कमी होत नाही म्हणून वैतागून जातात आणि शेवटी ते चालणे बंद करतात. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर इंटरव्हल चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, इंटरव्हल वॉकिंगमध्ये (Interval Walking) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होते. या चालण्याच्या दरम्यान शरीराला अनेक ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकसाठी एक वेळ निश्चित केली जाते.
इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. अशा प्रकारे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर इंटरवल ट्रेनिंग हा (Interval Walking For Weight Loss) सर्वोत्तम मार्ग असू शकतो.

पहिली स्टेप
यासाठी तुमच्याकडे स्मार्टवॉच किंवा स्टॉप वॉच असेल तर अधिक व्यवस्थित होईल. सर्व प्रथम 5 मिनिटांत वॉर्म अप वॉक करा. या 5 मिनिटात संथ गतीने चाला म्हणजे जास्त थकवा येणार नाही. असे केल्याने शरीर उबदार राहते आणि स्नायूंना पूल होणार नाही. यानंतर, एका मिनिटात सुमारे 100 पावले चालण्याचे ठरवा. यावेळी, खोल खोल श्वास घ्या. तुमचा श्वास सामान्य राहील याकडे लक्ष ठेवा.

दुसरी स्टेप
वॉर्म अप केल्यानंतर तुमचा पहिला इंटरवल सुरू करा. जर तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तर 30 सेकंदांचा गॅप ठेवा. या दरम्यान चालताना छोटी पावले टाका आणि पूर्ण जोर देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपले हात पुढे आणि मागे जोरदारपणे हलवा. इथे तुमचा श्वास थोडा लहान होऊ लागेल. 30 सेकंदांनंतर, सामान्य चालण्याकडे परत या आणि 2.30 मिनिटे तसेच चालणे ठेवा. त्याचप्रमाणे 5 पूर्ण इंटरवल करा आणि जेव्हा हा वर्क आऊट पूर्ण होईल, तेव्हा शेवटी 5 मिनिटांच्या कूल डाउनेच पूर्ण करा.

3री स्टेप
अशाप्रकारे, जर तुम्ही अर्ध्या तासाच्या वर्कआउटचे नियोजन करत असाल, तर सुरुवातीला 5 मिनिटे लाइट वॉर्म अप, 5व्या ते 7व्या मिनिटाला जलद चालणे, 7व्या ते 8व्या मिनिटाला लाइट वॉक, 8ते 10व्या मिनिटाला शक्य तितक्या वेगाने चालणे. नंतर 10व्या ते 11व्या मिनिटापर्यंत हळू चालत जा. त्यानंतर, 11 ते 13 व्या मिनिटापर्यंत वेगाने चालत जा. त्यानंतर 13-14व्या मिनिटाला हलके चालावे. 15 मिनिटांनंतर, ते आणखी हलके. मग हळूहळू चालणे वाढवा. 25 व्या ते 30 व्या मिनिटात, अतिशय हलके चालताना हळू हळू थांबा. अशा प्रकारे, तुम्ही अर्धा तास वेगाने आणि हळू चालत रहा.

इंटरवल वॉकिंग अ‌ॅडवान्स लेवलवर नेण्यासाठी टिप्स
- विश्रांतीची वेळ कमी करा.
- डोंगराळ किंवा उंच भागात चाला.
- तुमचा वेग वाढवा.
- बराच वेळ चाला.

27/01/2022

वयाच्या 40 नंतर आरोग्याच्याबाबतीत अनेकजण या 6 चुका करतात; आयुष्यभर भोगावे लागतात परिणाम

Unhealthy Habits To Avoid After 40 : या वयात स्वतःच्या तब्येतीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असताना अनेक लोक वाढत्या वयानुसार निष्काळजी बनतात. वृद्धत्वाची सुरुवात झाल्यानंतर लोक शारीरिक हालचालींपासून दूर राहतात आणि त्यांना त्याचा फटका लवकरच सहन करावा लागतो.

वाढत्या वयानुसार स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 व्या वर्षांनंतर, आपण आरोग्याबद्दल निष्काळजीपणा थांबवणं आणि शक्य तितक्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणं महत्त्वाचं आहे. असं न केल्यास हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका तर वाढतोच; शिवाय, आरोग्याशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवतात. खरं तर या वयात स्वतःच्या तब्येतीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असताना अनेक लोक वाढत्या वयानुसार निष्काळजी बनतात. वृद्धत्वाची सुरुवात झाल्यानंतर लोक शारीरिक हालचालींपासून दूर राहतात आणि त्यांना त्याचा फटका लवकरच (Unhealthy Habits To Avoid After 40) सहन करावा लागतो.
'ईटधिसनॉटदॅट'च्या मते, खरं तर हे वय असं असतं जेव्हा बहुतेक लोकांनी त्याच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात किंवा त्या पूर्ण होण्याच्या जवळ पोहोचलेल्या असतात. तसंच, आर्थिकदृष्ट्याही लोक बऱ्यापैकी स्थिर झालेले असतात. यामुळं या वयात सर्वांनाच आरामदायी जीवन जगायला आवडतं. परंतु शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की, चाळिशी पार केल्यानंतरही आपण आपली जीवनशैली निरोगी ठेवली पाहिजे आणि सक्रिय जीवन जगलं पाहिजे. मात्र, लोक या वयात शरीराला हानिकारक असलेल्या सवयींना बळी पडतात; ज्यामुळं त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

1.व्यायाम
चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक वयोगटात व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. मात्र, बरेच लोक 40 व्या वर्षांनंतर व्यायाम करणं टाळतात. पण दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर, या वयात तुम्ही तुमच्या दिनक्रमात योग, ध्यान, चालणं यांचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे. व्यायाम न केल्यानं लठ्ठपणा वाढतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका वाढू लागतो.
2. चुकीच्या स्थितीत बसणं
तुम्हाला वारंवार आणि बऱ्याच वेळासाठी चुकीच्या स्थितीत बसण्याची सवय लागली असेल, तर याच्यामुळं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हाडं दुखणं किंवा स्नायूंमध्ये गोळा येणं, मुंग्या येणं अशी समस्या जडू शकते. चुकीच्या आसनात वर्षानुवर्ष बसण्यामुळं मणक्याचा त्रासही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मणक्याचा व्यायाम करणं आवश्यक आहे. तसंच लॅपटॉप किंवा डेस्कटॉप समोर बसताना योग्य मुद्रेत बसावं.
3. धूम्रपान
तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल आणि चाळिशीनंतरही तुम्ही त्यावर नियंत्रण केलं नाहीत, तर ते श्वसनसंस्थेसाठी अधिकच हानिकारक ठरतं. यामुळं हृदयविकाराचा धोका वाढतो.

4. मेंदू तल्लक ठेवणारे खेळ
वयाच्या चाळिशीनंतर मेंदूचा व्यायाम करण्यात टाळाटाळ केली तर अल्झायमर किंवा कमकुवत स्मरणशक्तीची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत मेंदूला व्यायाम देणारे, तल्लक ठेवणारे खेळ, बुद्धिबळ, बोर्ड गेम आदी खेळ खेळले पाहिजेत.
5. रक्तदाबाची वेळच्या वेळी तपासणी न करणं
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळं चाळिशीनंतर रक्तदाब वाढण्याची समस्या जडणं ही बाब सामान्य झाली आहे. याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी रक्तदाबाची वेळच्या वेळी तपासणी करणं आवश्यक आहे. अन्यथा, पुढे मूत्रपिंड, हृदयाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात.
6. शरीराची दरवर्षी तपासणी न करणं
चाळिशीनंतर तुम्ही दरवर्षी शरीराची संपूर्ण तपासणी (General Check up) करणे राहणं फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, कोलेस्टेरॉल, बीपी, हृदयविकार, मूत्रपिंडाचं कार्य आदींची वेळच्या वेळी तपासणी केली पाहिजे. तुम्ही असं केलं नाही तर कोणतीही जुनी समस्या अचानक समोर येऊ शकते आणि जीवावरही बेतू शकते.

19/01/2022

थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा

हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होऊ लागतं, तेव्हा आपली मज्जासंस्था सक्रिय (सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम - sympathetic nervous system) होते आणि कॅटेकोलामाइन्सचा स्राव वाढवू शकते. यामुळं रक्तवाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते.

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो (Heart Attack ) हे तुम्हाला माहीत आहे का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होऊ लागतं, तेव्हा आपली मज्जासंस्था सक्रिय (सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम - sympathetic nervous system) होते आणि कॅटेकोलामाइन्सचा स्राव वाढवू शकते. यामुळं रक्तवाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते, ज्यामुळं हृदयगती, रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी तसेच रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढते.

कॅटेकोलामाइन स्राव म्हणजे काय?

शरीरात कॅटेकोलामाइन खूप महत्त्वाचं आहे. हे मानवी शरीरातील विविध प्रकारच्या ऊतींवर काही द्रव टाकतं. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक ताणतणावाखाली असते, तेव्हा पेशींमध्ये काही कॅटेकोलामाइन्स स्रवतात. हा शारीरिक प्रतिसाद सहसा निरोगी असतो. परंतु, त्याची वाढ हृदयविकारास कारणीभूत ठरते.

हृदयविकाराचा झटका येण्याचं मुख्य कारण म्हणजे ताण घेणं. जितका ताण घ्याल, तितका हृदयाविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, शक्य तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि एखादी बाब किंवा घटना मनाला लावून घेणं टाळा.
याशिवाय दररोज व्यायाम करण्याची सवय ठेवली तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. यासाठी तुम्ही सायकलिंग, योगासनासारख्या इनडोअर व्यायामाचा पर्यायही निवडू शकता.

अतिरिक्त प्रमाणात मीठ आणि साखरेचं सेवन टाळा. शक्य असल्यास, राईस ब्रान तेल किंवा मोहरीचं तेल आहारात वापरा. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणंदेखील खूप महत्वाचं आहे. जर, तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासोबतच हृदयालाही फायदा मिळतो.

27/12/2021

अंड्यातील बलक आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?

प्रोटीनचा (protein) सर्वांत उत्तम स्रोत म्हणजे अंडं (Egg). आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी बहुतांश जण आवर्जून आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश आहे, जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि शरीर फिट ठेवण्याचं कार्य करतात; मात्र अंड्यातला पांढरा भाग (Egg-White) अधिक फायदेशीर आहे की पिवळा भाग? अंड्यातला पिवळा बलक (Egg Yolk) खाण्यामुळे काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा आकर्षक शरीरयष्टी तयार करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी अंडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. अंड्यातला पिवळा बलक खाल्ल्याने काय नुकसान व फायदा होऊ शकतो, हे जाणून घेऊ या. अंड्यातला पिवळा बलक कोणी खाणं फायदेशीर आहे आणि कोणी खाणं टाळावं.

अंड्यातला पिवळा बलक खाण्याबाबत अनेकांच्या मनामध्ये नेहमीच गोंधळ असतो. वास्तविक, अंड्यातला पिवळा बलकदेखील पोषक तत्त्वांनी समृद्ध असतो. परंतु काही पौष्टिक घटक त्यामध्ये जास्त प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

संशोधकांच्या मते, तुमचं कोलेस्टेरॉल (cholesterol) जास्त असेल आणि तुम्ही अंड्यातला पिवळा बलक खात असाल आणि जंक फूडदेखील खात असाल, तर त्यामुळे तुमच्या शरीरातलं खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू शकतं. दुसरीकडे, तुम्ही एका आठवड्यात फक्त 3 अंडी त्यातल्या पिवळ्या बलकासह खाल्ली आणि जंक फूड खाल्लं नाही, तर ते त्रासदायक ठरत नाही. अंड्यातला पिवळा बलक मर्यादित प्रमाणात खाणं फायदेशीर ठरू शकतं. परंतु जास्त प्रमाणात खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
ज्यांना हृदयासंबंधीचे विकार आहेत किंवा ज्यांचं कोलेस्टेरॉल खूप जास्त आहे, अशा व्यक्तींसाठी अंड्यातला पिवळा बलक चांगला मानला जात नाही. कारण कोलेस्टेरॉल हृदयाच्या समस्यांशी संबंधित आहे. अंड्यातल्या पिवळ्या बलकामध्ये 1.6 ग्रॅम संतृप्त चरबी (saturated fat) असते, जी हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा सिक्स-पॅक बनवायचे असतील, तर तुम्ही अंड्याचा फक्त पांढरा भाग खावा. अंड्यातला पिवळा बलक खाऊ नये. ज्यांना वजन वाढवायचं आहे, ते अंड्याचा बलक खाऊ शकतात. अंड्यामध्ये 17 कॅलरीज असतात, तर अंड्यातल्या पिवळ्या भागामध्ये 55 कॅलरीज असतात.
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं म्हटलं जातं. अंड्यामुळे जास्त प्रोटीन्स मिळतात; मात्र अंड्यातला कोणता भाग शरीरासाठी फायदेशीर आहे, याची माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून अंडं खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होईल.

26/03/2021

काळजी घ्या,सुरक्षित रहा... !

आपल्याला तसलं काही नाही ... !

कधीतरी अंगात बारीक ताप येतो ,
मनात शंका येऊन जाते की आपल्याला कोरोनाची लागण झाली की काय ?
पण दुसऱ्याच क्षणी आपण ती नाकारतो आणि मग सुरू होतो शोध कारणांचा

काल जरा उन्हात फिरलो

पाणी बदललं

वातावरण गरम/गार झालं

जास्त काम झालं

काल फॅन खाली झोपलो

झोपच झाली नाही

खिडकी उघडी राहिली

icecream / कुल्फी खाल्ली

ऋतू बदलला

मला 1/2 महिन्यात असं होतच असतं

हे आणि असे अनेक कारणांची जुळवाजुळव करत आणि परिस्थिती चं गांभीर्य लक्षात घेऊन आपण दवाखाना गाठतो खरा पण तोवर आपली पूर्ण खात्री पटलेली असते की आपल्याला तसलं काही नाही म्हणजे कोरोनासारखं...

डॉक्टर दरवाज्यातच हटकतो मास्क का नाही घातला तर आपल्याला राग येतो,
आपण रागात खिशात ठेवलेला मास्क लावत आत्तापर्यंत लावलेला असल्याची ग्वाही देतो,
मग आपण डॉक्टर ला लक्षण सांगीतल्याबरोबर तो पहिली शंका कोरोनाची घेतो आणि त्यानुसार प्रश्न विचारायला लागतो , हे आपल्या लगेच लक्षात येत आणि मग आपण पूर्ण ताकद लावतो , आपल्याला कोरोना कसा झालेला नाही हे पटवून देण्यासाठी.

वरील कारणांबरोबरच
आपण कशी स्वतःची / कुटुंबाची काळजी घेतो ,

कसं गर्दीत जाणं टाळतो ,

कसं sanitisation करतो ई ई

इतकी कारणं देतो की डॉक्टरलाही प्रश्न पडावा की नेमकं बाहेर गर्दी कोण करतं?
लग्नात कोणती माणसं जातात ?
बाजारात फिरणारी , दुकानात , मेन रोड ला गर्दी करणारी माणसं नेमकी येतात कुठल्या ग्रहावरून...

डॉक्टर आपल्याला convince करण्याचा प्रयत्न करतात पण आपल्या निर्धारापुढे झुकतात कारण त्यांचं ही पुढचं पेशंट तोवर दोनदा डोकावून गेलेला असतो
मग तो advice मध्ये RTPCR आणि इतर तपासण्या लिहून आणि लक्षणांनुसार औषध देतो,
आपण injection साठी हट्ट करतो डॉक्टर गरजेनुसार देतो किंवा गरज नसल्याचं सांगतो
आणि पुढच्या पेशंट कडे वळतो...

आपण घरी येतो , औषधाचे एक दोन टक घेतल्यावर आपल्याला थोडं बरं वाटायला लागत आणि मग आपण डॉक्टर , कोरोनावर संशय घ्यायला लागतो.

कोरोना म्हणजे थोतांड

कोरोना म्हणजे डॉक्टरांचे लुबाडायचे धंदे

कोरोना म्हणजे खोटे रिपोर्ट

अशा एक ना अनेक गृहीतकांमुळे संशय इतका बळावतो की अनेकदा आपल्याला वेदनामुक्त केलेला *डॉक्टर आपल्याला खलनायक* वाटायला लागतो.

आपल्यासारख्या अनेकांच्या बाबतीत असं घडतं आणि त्यांचा या pandemic वरचा विश्वास उडतो,
पण काहींच्या बाबतीत मात्र...

2/3 दिवसात ते स्वतः किंवा घरातलं कोणीतरी दुसरं विशेषतः वृद्ध आजारी पडत आणि बघता बघता गंभीर होतं प्रसंगी आपल्याला सोडून जातं.

आज सर्रास असा प्रकार घडतांना दिसतो ,
आपण डॉक्टर , शासन , यंत्रणेने दिलेल्या सूचनांची पायमल्ली केली आणि गेला गेला म्हणता म्हणता कोरोना पुन्हा आ वासून उभा राहिला आहे.

ज्यांना हे थोतांड वाटतं त्यांनी एकदा तरी *ज्याच्या घरातलं कोणीतरी कोरोनाने दगावलं* आहे त्यांना भेटावं.

आपण हे लक्षातच घेत नाहीये की हेच या आजाराचं वैशिष्ट्ये आहे की 80-85% लोकांना उपचाराची गरजच पडत नाही किंवा अगदी जुजबी उपचाराने ते बरे होतात. पण हेच लोक कोरोना सर्वदूर पसरवायला कारणीभूत ठरतात आणि कोणीतरी निरपराध त्याचा बळी ठरतो.

आजही हॉस्पिटल रुग्णांनी गच्च भरले आहेत , बेड मिळणं दिवसेंदिवस अवघड होतं चाललं आहे .
आता तरी भानावर या ,

तज्ञांनी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करा.

मी तर म्हणेन अगदी सामान्य विज्ञान आहे यात आणि तेच प्रभावी हत्यार आहे कोरोना विरुद्ध लढण्याचं.

मास्क वापरा
गर्दी टाळा
हात धुणे
sanitisation
सकस आहार घ्या
लक्षण दिसल्यास स्वतःला इतरांपासून isolate करा.

या लेखातून प्रयत्न केला आहे आपण कुठे गाफील रहातो आणि आपल्याला नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. हे लक्षात आणून देण्याचा.

काळजी घ्या , सुरक्षित रहा !

कारण आपला निष्काळजीपणा मुळे इतर कोणाचं ही नाही फक्त आणि फक्त आपलं किंवा आपल्यांचं नुकसान होणार आहे.

वैद्यकीय क्षेत्राने स्वतःची विश्वासार्हता गमावली असली आणि त्यात बदल होण्याची , त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे. असे असले तरी आजही *अनेक डॉक्टर* अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत.
त्यामुळे टोकाचा अविश्वास आपल्याच नुकसानाचं कारण बनू नये एव्हडीच अपेक्षा आहे.

26/03/2021

काळजी घ्या,सुरक्षित रहा....!

आपल्याला तसलं काही नाही ... !

कधीतरी अंगात बारीक ताप येतो ,
मनात शंका येऊन जाते की आपल्याला कोरोनाची लागण झाली की काय ?
पण दुसऱ्याच क्षणी आपण ती नाकारतो आणि मग सुरू होतो शोध कारणांचा

काल जरा उन्हात फिरलो

पाणी बदललं

वातावरण गरम/गार झालं

जास्त काम झालं

काल फॅन खाली झोपलो

झोपच झाली नाही

खिडकी उघडी राहिली

icecream / कुल्फी खाल्ली

ऋतू बदलला

मला 1/2 महिन्यात असं होतच असतं

हे आणि असे अनेक कारणांची जुळवाजुळव करत आणि परिस्थिती चं गांभीर्य लक्षात घेऊन आपण दवाखाना गाठतो खरा पण तोवर आपली पूर्ण खात्री पटलेली असते की आपल्याला तसलं काही नाही म्हणजे कोरोनासारखं...

डॉक्टर दरवाज्यातच हटकतो मास्क का नाही घातला तर आपल्याला राग येतो,
आपण रागात खिशात ठेवलेला मास्क लावत आत्तापर्यंत लावलेला असल्याची ग्वाही देतो,
मग आपण डॉक्टर ला लक्षण सांगीतल्याबरोबर तो पहिली शंका कोरोनाची घेतो आणि त्यानुसार प्रश्न विचारायला लागतो , हे आपल्या लगेच लक्षात येत आणि मग आपण पूर्ण ताकद लावतो , आपल्याला कोरोना कसा झालेला नाही हे पटवून देण्यासाठी.

वरील कारणांबरोबरच
आपण कशी स्वतःची / कुटुंबाची काळजी घेतो ,

कसं गर्दीत जाणं टाळतो ,

कसं sanitisation करतो ई ई

इतकी कारणं देतो की डॉक्टरलाही प्रश्न पडावा की नेमकं बाहेर गर्दी कोण करतं?
लग्नात कोणती माणसं जातात ?
बाजारात फिरणारी , दुकानात , मेन रोड ला गर्दी करणारी माणसं नेमकी येतात कुठल्या ग्रहावरून...

डॉक्टर आपल्याला convince करण्याचा प्रयत्न करतात पण आपल्या निर्धारापुढे झुकतात कारण त्यांचं ही पुढचं पेशंट तोवर दोनदा डोकावून गेलेला असतो
मग तो advice मध्ये RTPCR आणि इतर तपासण्या लिहून आणि लक्षणांनुसार औषध देतो,
आपण injection साठी हट्ट करतो डॉक्टर गरजेनुसार देतो किंवा गरज नसल्याचं सांगतो
आणि पुढच्या पेशंट कडे वळतो...

आपण घरी येतो , औषधाचे एक दोन टक घेतल्यावर आपल्याला थोडं बरं वाटायला लागत आणि मग आपण डॉक्टर , कोरोनावर संशय घ्यायला लागतो.

कोरोना म्हणजे थोतांड

कोरोना म्हणजे डॉक्टरांचे लुबाडायचे धंदे

कोरोना म्हणजे खोटे रिपोर्ट

अशा एक ना अनेक गृहीतकांमुळे संशय इतका बळावतो की अनेकदा आपल्याला वेदनामुक्त केलेला *डॉक्टर आपल्याला खलनायक* वाटायला लागतो.

आपल्यासारख्या अनेकांच्या बाबतीत असं घडतं आणि त्यांचा या pandemic वरचा विश्वास उडतो,
पण काहींच्या बाबतीत मात्र...

2/3 दिवसात ते स्वतः किंवा घरातलं कोणीतरी दुसरं विशेषतः वृद्ध आजारी पडत आणि बघता बघता गंभीर होतं प्रसंगी आपल्याला सोडून जातं.

आज सर्रास असा प्रकार घडतांना दिसतो ,
आपण डॉक्टर , शासन , यंत्रणेने दिलेल्या सूचनांची पायमल्ली केली आणि गेला गेला म्हणता म्हणता कोरोना पुन्हा आ वासून उभा राहिला आहे.

ज्यांना हे थोतांड वाटतं त्यांनी एकदा तरी *ज्याच्या घरातलं कोणीतरी कोरोनाने दगावलं* आहे त्यांना भेटावं.

आपण हे लक्षातच घेत नाहीये की हेच या आजाराचं वैशिष्ट्ये आहे की 80-85% लोकांना उपचाराची गरजच पडत नाही किंवा अगदी जुजबी उपचाराने ते बरे होतात. पण हेच लोक कोरोना सर्वदूर पसरवायला कारणीभूत ठरतात आणि कोणीतरी निरपराध त्याचा बळी ठरतो.

आजही हॉस्पिटल रुग्णांनी गच्च भरले आहेत , बेड मिळणं दिवसेंदिवस अवघड होतं चाललं आहे .
आता तरी भानावर या ,

तज्ञांनी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करा.

मी तर म्हणेन अगदी सामान्य विज्ञान आहे यात आणि तेच प्रभावी हत्यार आहे कोरोना विरुद्ध लढण्याचं.

मास्क वापरा
गर्दी टाळा
हात धुणे
sanitisation
सकस आहार घ्या
लक्षण दिसल्यास स्वतःला इतरांपासून isolate करा.

या लेखातून प्रयत्न केला आहे आपण कुठे गाफील रहातो आणि आपल्याला नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. हे लक्षात आणून देण्याचा.

काळजी घ्या , सुरक्षित रहा !

कारण आपला निष्काळजीपणा मुळे इतर कोणाचं ही नाही फक्त आणि फक्त आपलं किंवा आपल्यांचं नुकसान होणार आहे.

वैद्यकीय क्षेत्राने स्वतःची विश्वासार्हता गमावली असली आणि त्यात बदल होण्याची , त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे. असे असले तरी आजही *अनेक डॉक्टर* अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत.
त्यामुळे टोकाचा अविश्वास आपल्याच नुकसानाचं कारण बनू नये एव्हडीच अपेक्षा आहे.

26/05/2020

करोना आजाराविषयी सोप्या भाषेत समजावून देतायत आमचे मित्र डॉ.संदीप सानप,consultant physician, वैद्यनाथ क्लीनिक, औरंगाबाद

महाभयंकर कॅन्सरला दूर ठेवायचं आहे... मग फक्त 20 मिनिटं चालाप्रौढ व्यक्तींनी हेल्दी राहण्यासाठी आठवड्याला किमान 150 मिनिट...
26/01/2020

महाभयंकर कॅन्सरला दूर ठेवायचं आहे... मग फक्त 20 मिनिटं चाला

प्रौढ व्यक्तींनी हेल्दी राहण्यासाठी आठवड्याला किमान 150 मिनिटं moderate-intensity aerobic exercise आणि 75 मिनिटं vigorous-intensity aerobic exercise किंवा दोन्ही प्रकारचे एक्सरसाईज करायला हव्यात, असं हेल्थ एक्स्पर्ट सांगतात आणि यानुसार शारीरिक कार्य केल्याने 7 प्रकारच्या कॅन्सरला दूर ठेवता येऊ शकतं, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

कॅन्सर... शब्द जरी उच्चारला तरी पायाखालची जमीन सरकते... कॅन्सरसारखा महाभयानक आजार आपल्याला होऊ नये, असं प्रत्येकाला वाटतं, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. तुम्हाला जर कोणी सांगितलं, की तुम्हाला कॅन्सरला दूर ठेवायचं असेल, तर फक्त दररोज किमान 20 मिनिटं चाला तर... विश्वास बसणार नाही ना? चालण्याने कॅन्सर कसा काय दूर राहिल असंच तुम्ही म्हणाल ना... मात्र दररोज किमान 20 मिनिटं चालण्याने एक ना दोन तर चक्क 7 प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये (Journal of Clinical Oncology) मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

संशोधकांनी ऑस्ट्रेलिया, युरोप आणि यूएसमधील 7,50,000 प्रौढ व्यक्तींचा अभ्यास केला, वॉकिंग, सायकलिंग, जॉगिंग केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो की नाही हे त्यांनी तपासलं.

संशोधनात संशोधकांना दिसून आलं की,

नियमित चालण्याने myeloma, non-Hodgkin lymphoma आणि कोलोन, ब्रेस्ट, किडनी, लिव्हर आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

अडीच तास अशा एक्सरसाईज केल्याने लिव्हर कॅन्सरचा धोका 18 टक्क्यांनी कमी होतो. आठवड्यातून 5 तास फिजिकल अक्टिव्हिटी केल्याने हा धोका 27 टक्क्यांनी कमी होतो.

महिलांनी नियमित 150 मिनिटं अशा एक्सरसाईज केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 6 टक्क्यांनी तर 5 तास एक्सरसाईज केल्याने 10 टक्क्यांनी कमी होतो. तर गर्भाशयाचा कॅन्सर आणि non-Hodgkin’s lymphoma चा धोका 18 टक्क्यांनी कमी होतो.

समान लेव्हलच्या एक्सरसाईज करणारे महिला आणि पुरुष दोघांनाही किडनी कॅन्सर होण्याचा धोका 11 ते 17 टक्क्यांनी आणि blood cancer myeloma 19 टक्क्यांनी कमी होतो

पुरेशा प्रमाणा शारीरिक कार्य केल्याने पुरुषांमधील कोलोन कॅन्सरचा धोका 14 टक्क्यांनी कमी होऊ शकतो

लोकं ज्याप्रमाणे प्रत्येक आठवड्याला आपली physical activity वाढवतात, त्यानुसार त्यांचा कॅन्सरचा धोकाही कमी होत जातो, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

दरम्यान ज्या अहवालावर हा अभ्यास करण्यात आला आहे, तो संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे मॉडरेट एक्सरसाईजमुळे कॅन्सरचा धोका कसा कमी होतो, हे समजण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

Address

Doctor's Lane, Samata Colony
Majalgaon
431131

Telephone

7588566886

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Hospital Majalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sai Hospital Majalgaon:

Share

Category