SIPE Education

SIPE Education SIPE Education is the support for
Mindfulness training and coaching by
SIPE Mind app
Mindfulness ther

SIPE Education is the support system to inculcate new healthy habits It has trained SIPE Educators who help you to fix goals and plan action.They will motivate and monitor your action plan

*माईंडफुलनेसचा महिमा वर्णावा किती..!*ते सिनेमा,सिरीयलच्या कोर्टरुम सीनमधे एक डायलॉग असतो बघा; *जो भी कहूँगा सच कहूँगा,सच...
26/09/2024

*माईंडफुलनेसचा महिमा वर्णावा किती..!*

ते सिनेमा,सिरीयलच्या कोर्टरुम सीनमधे एक डायलॉग असतो बघा; *जो भी कहूँगा सच कहूँगा,सच के सिवा कुछ नही कहूँगा..*
अगदी त्याच धर्तीवर माझे माईंडफुलनेसबद्दलचे अनुभव सांगायचे आहेत..
अगदी जसं घडलं तस्सच..!

*इथे ना कोणी पक्षकार,*
*ना कोणता पक्ष..*
*इथे फक्त वर्तमानात लक्ष..!*

(उपरोक्त महत्वाच्या विषयाची व्याप्ती लक्षात घेता अनुभव कथन जरा दीर्घ होण्याची शक्यता नाकारता येत नाही..तेव्हा हा लेख वेळ काढून शांतपणे वाचावा असं मी सूचवेन..)

नमस्कार 🙏
मी डॉ. सुहास धनाजी वीर
एम.डी.आयुर्वेद (बालरोग)
मो.नं.97 665 665 97

तर कुठे होतो आपण??
अर्थातच वर्तमानात...😊

गेल्या वर्षभरापासून माईंडफुलनेसचा सराव करतोय..
तो एक दिवस आहे आणि आजचा एक दिवस आहे..

मागे वळून पाहतो तर काय..!??

*"कोण होतास तू ??* *काय झालास तू ???"*

*"तो मी नव्हेच !!!"*

हे *आरोहन* आहे बरं..
*अवरोहन* नव्हे...
😄

माईंडफुलनेसचा महिमा एका वाक्यात सांगायचा झाला तर,
*रोजच्या आयुष्यातील ताणतणावांना कृतीशीलपणे सामोरे जात अधिक व्यापक, अधिक समृद्ध आणि रसरसशीत आयुष्य जगायला शिकलोय,जगत आहे आणि कायम जगत राहणार !*😇

ज्यांच्यामुळे हे आयुष्य अधिक रसरशीत झालं अशा आदरणीय डॉ.यश वेलणकर सर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना
कोटी कोटी धन्यवाद..!

जेव्हा कधी सरांसोबत प्रत्यक्षात भेट होईल तेव्हा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करने बाकी आहेच.
🙌🙇🏻‍♂️
I mean it..!

तर माईंडफुलनेसची जोडलं जाण्याचं मुख्य कारण म्हणजे
*'एखाद्या गोष्टीचा अगदी खोलात जाऊन विचार करण्याची माझी सवय..'*

आणि

*'एखाद्या घटनेला तात्काळ साधक-बाधक प्रतिक्रिया देण्याची वृत्ती..'*

अशातच चार-पाच वर्षांपूर्वी मला माझ्या मूळ गावापासून दूर 250 km अंतरावर
छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद येथे सहकुटुंब स्थलांतरीत व्हावं लागलं..
तेही गावाकडील आयुर्वेद क्लिनिक,आयुर्वेद वनस्पती लागवड तसेच औषध निर्मिती सोडून.😞

स्थलांतरचं मुख्य कारण होतं,
माझ्या पत्नीची छत्रपती संभाजीनगर येथे नव्यानेच लागलेली नोकरी आणि त्यासोबतच माझं पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण (आयुर्वेद एम.डी.)

पदवीनंतर तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर MD Entrance परीक्षा देऊन स्वतःच्या मेरिटवर पदव्युत्तर शिक्षणाला प्रवेश घेतला होता पठ्ठयाने..!😎
(State Merit Rank- *475.*
SEBC Rank- *79*.)
सन 2019 साली मराठा आरक्षण लागू होतं..
असो..

पदवी मिळाल्यावर दरम्यानच्या काळात आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरु केली होती गावाकडे..

झालं मग....🤦🏻‍♂️
नविन ठिकाण,नविन लोकं,नविन आव्हाने,नविन भूमिका..
त्यातच इन्कम सोर्स थेट निम्म्यावर आला..
शैक्षणिक कर्जासोबतच कौटुंबिक कुरबुरी आणि बरंच काही...

नविन आव्हानाला घाबरत होतो अशातला काही भाग नव्हता,
पण हळूहळू ताला-सुरात ठेका धरु लागेलेल्या आयुर्वेद प्रॅक्टिसची भैरवी करणं मनाला जरा आर्त करुन जात होतं.😞

जात्याच जरा खोलात जाऊन विचार करण्याची सवय आणि त्यात ही अशी परिस्थिती...
म्हणजे आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला,हातात जळता टेम्भा आणि आजूबाजूला गवताच्या गंजी...!🫣

झाली ना राव होरपळ सुरु...

अशीच होरपळ पदव्युत्तर शिक्षणाच्या बाबतीतही कायम राहिली.
वाटलं होतं,पदव्युत्तर शिक्षणाचा ज्ञान यज्ञ सुरु झालाय.
त्याच्या तेजाने उजळून निघू..
पण कशाचं काय..!?
तिथेही मनस्वास्थ्याच्या समिधा टाकून प्रचंड होरपळच नशिबाला आली..!

(पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आलेल्या *तिखट जाळ*
अनुभवावर एक वेगळाच शोधप्रबंध लिहिला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे..
पण ते म्हणतात ना,
*You are not suppose to be wash your Dirty Lenin in public..*🤫)

प्राप्त परिस्थितीचे चटके बसूच नयेत अशा बाळबोध समजूतीचा मी नव्हतो बरं..!
किंबहुना नसलचं पाहिजे..

पण चटके बसणे आणि होरपळ होणे यात गुणात्मक फरक आहेच ना ओ..!

मग ही बाह्याभ्यांतर झालेली होरपळ थांबली ती आदरणीय डॉ.यश वेलणकर सरांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या ध्यान सरावाने..
होरपळ नुसतीच थांबली नाही तर त्यामुळे झालेले व्रण सुद्धा हळूहळू कमी होऊन नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या गुलाबी त्वचेप्रमाणे बाह्य आणि अंतरंग दिसू लागलं..
*तो मी नव्हेच...*😄

सरांच्या App मधील ऑडिओ तसेच रविवारच्या ध्यान सरावामुळे बऱ्याचशा गोष्टी समजू लागल्या.
त्या अंमलात आणू लागलो.

मला जी अतिरिक्त विचार करण्याची सवय होती.
तसेच तात्काळ प्रतिक्रिया देण्याची वृत्ती होती...
या दोन्हीही गोष्टी खूप कमी झाल्या..

*विचार येणं आणि त्यावर आपण विचार करत राहणं यातील अत्यंत महत्वाचा फरक समजला.*

विचार येणं आपल्या हातात नाही पण त्या विचारांवर विचार न करणं,त्यांना महत्व न देणं हे मात्र आपल्याच हातात आहे याची सुस्पष्ट जाणीव झाली.

विचार आणि कृतीमध्ये ठरवून अंतर ठेवता येऊ लागलं.

प्रत्येक घटनेला प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असंही काही नाही..
आणि प्रतिक्रिया द्यायची आवश्यकताच असेल तर विचार भावना स्थिर ठेवून प्रतिक्रिया देता येतेच की..!
या गोष्टीच भान अजून चांगल्या पद्धतीने विकसित झालं..

*आता दुसऱ्या बाजूला खोलात जाऊन विचार करण्याच्या माझ्या या सवयीचा एक आयुर्वेद चिकित्सक म्हणून मला प्रचंड फायदाच व्हायचा बरं..*

म्हणजे असं बघा...

रुग्णाचा आजार नेमका कोणत्या कारणाने म्हणजे नेमकं काय खाल्ल्याने,काय केल्याने झाला असावा?

तो आजार लवकर बरा करण्यासाठी कमीतकमी कोणती बरे औषधं देता येतील?
ती औषध कशासोबत (अनुपान) देता येतील?

रुग्णाला सहज पाळता येणारं पथ्य कसं सांगता येईल?

या अशा अनेक गोष्टी बाबतीत कोणत्याही आयुर्वेद चिकित्सकाला आपलं विचारचक्र वेगाने फिरवावच लागतं...
यशस्वी आयुर्वेद चिकित्सेच गमक आहे ते..!

*उपरोक्त बाबतीत एक आयुर्वेद चिकित्सक म्हणून माझी ही अतिविचार करण्याची सवय वरदान ठरत होती..😇*

*पण इतरवेळी अन्य संदर्भाने मी वेगळ्या भूमिकेत शिरल्यावर हेच विचारचक्र मला गरागरा फिरवून चिंता,भीती,निराशेच्या गर्तेत लोटून देत होतं..*

*साक्षी ध्यान*
*मीचं गाठोडं*
*विचारांच्या प्रवाहातून वेगळं होण्याची तंत्रे*
*सजग कृती*
इत्यादीमुळे माझ्या मनात येणाऱ्यां असंख्य विचारांवर »
विचार करणाऱ्या चक्राची गती माझ्या नियंत्रणात आली..

मनात येणारे विचार हे नेमकं कोणत्या मी च्या संदर्भात आहेत.?
याचं भान विकसित होऊ लागलं..
*आयुर्वेद डॉक्टर मी..*
*पदव्युत्तर शिक्षण घेणारा विद्यार्थी मी....*
*प्राप्त परिस्थितीत होरपळलेला मी..*
असे अनेक मी.

यासोबतच ते विचार भूतकाळातील की भविष्यकाळातील?
त्या विचारांच्या मूळाशी कोणती भावना आहे?
इत्यादी गोष्टी अगदी लख्खपणे समजू लागल्या.

ध्यान सरावाच्या वेळी येणाऱ्या विचारांची,उत्पन्न भावनांची फक्त नोंद घेऊ लागलो..
आणि आवश्यकतेनुसार त्या त्या विचार,भावनेच्या संदर्भात ध्यान सरावानंतर ठरवून विचार करु लागलो..🤔✅

*विचार🔁भावना🔁संवेदना इत्यादीमुळे शरीरात होणारे बदल समजू लागले..*
*उदा-छाती गच्च होणं,पोटात गोळा उठणं,हृदयगती वाढणं,कधी कधी कंठ दाटून येणं*

*या अशा बदलांचा प्रतिक्रिया न करता साक्षीभावाने स्वीकार करता येऊ लागला..*

मन उदास असेल किंवा उत्तेजित असेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मनस्थितीला वजा-अधिक नंबर देता येऊ लागलं..

सतत वजा एक दोन अवस्थेत राहण्याचा कालावधी,त्याची वारंवारता खूप कमी झाली..

*करुणा ध्यानाच्या* नियमित सरावामुळे माझ्यातील क्षमता आणि कमतरता नव्याने समजल्या.कमतरतांचा स्वीकार केला.
क्षमतांचा विकास आणि कमतरतेच्या परिपूर्तीसाठी योग्य ती पावले उचलली जाऊ लागली...
परिणामी माझं अपडेटेड व्हर्जन मला रोज नव्याने मिळू लागलं..

इतरांप्रति करुणा भाव जागृत झाला..
ज्यांनी मला जाणतेपणी किंवा अजाणतेपणी त्रास दिला त्यांनाही माफ करायल जमलं..
नाहीतर याआधी त्रास देणाऱ्याला भाजू की भिजू घालू असं व्हायचं..😅😅

व्यावसायिक क्षमता कशी वाढली बघा
👇
*ठरवून विचार करण्याचं कौशल्य अधिक विकसित झाल्यामुळे* मी सहज उपलब्ध होणाऱ्या एकेरी आयुर्वेद वनस्पती बाबत जरा जास्तच खोलात जाऊन विचार करुन औषध म्हणून वेगवेगळ्या रुग्णांत,वेगवेगळया व्याधीत वापर करुन त्याचे भन्नाट रिझल्ट मिळवू लागलो..

*सजग कृतीमुळे* औषध निर्माणाच्या कृतीमध्ये निश्चितच अधिकचा सफाईदारपणा आला.उत्पादकता वाढली..

हे सर्व माईंडफुलनेसच फलित..!

अशी एक ना अनेक फायद्याची जंत्री आहे..पण विस्तार भयास्तव इथेच विराम घेतलेला इष्ट ठरेल.

आता सुजाण वाचकांच्या मनात साहजिकच प्रश्न आले असतील की हे सगळं फलित व्हायला किती दिवस लागले?
रोज किती मिनिट सराव करावा लागला..?

तर उत्तर आहे..
स्वतःशी प्रामाणिक राहून रोज 20 मिनिट नियमितपणे सराव सुरु केल्यापासून साधारणपणे एक-दिड महिन्यातच सकारात्मक बदल जाणवायला सुरुवात झाली..
पुढील दिडेक महिन्यात आणखी सुधारणा झाली..
त्यात सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रविवारचा ध्यान सराव आणि त्यानंतरची प्रश्नोत्तरे,चर्चा इत्यादीमुळे तर याला डबल इंजिन लागलं..😄

शेवटी समारोपाकडे येताना इतकंच सांगावसं वाटतं,
*माईंडफुलनेसचा सराव हा सर्वार्थाने समृद्ध जीवन जगण्याचा राजमार्ग आहे...*

पण त्यासाठी तुम्हाला माईंडफुलनेस कोचच्या मार्गदर्शनुसार स्वतः पुढाकार घेऊन ध्यान सराव करणं अत्यंत गरजेचं....

अहो,त्या क्रिकेट मॅचमध्ये नाही का; एक रन काढण्यासाठी दोघाही बॅट्समनला धावाव लागतं...
तसंच काहीसं माईंडफुलनेसच समजा हवं तर..

इथे स्ट्राइकवर डॉ.यश वेलणकर सर,अकल्पिता मॅडम,मंजिरी मॅडम तसेच अन्य सदस्य आहेत..
आणि नॉन स्ट्राईकवर तुम्ही,मी,आपण सर्वजणच सराव करणारे..

इथे काही काळ स्वतः कोचच बॅटिंग करतात.😄
समोर फास्ट बॉलर असताना,
टाइट फिल्डिंग मधून ते गॅप काढत आहेत..

तर आपल्याला फक्त पुढाकार घेऊन स्क्रीझ सोडून धावायचं आहे..एखाद दुसरी ओव्हर झाली की आपण स्वतःहून स्ट्राईकला येऊन भावनिक त्रासांच्या चेंडूना तंत्रशुद्ध पद्धतीने कधी डिफेन्स करत,तर कधी सोडून देत,तर कधी कधी सीमारेषेच्या बाहेर टोलवत आपल्याच मनस्वास्थ्याची मॅच जिंकायची आहे..!

मग कधी खेळताय मॅच..!?
I mean कधी करताय माईंडफुलनेसचा सराव !??

आज आत्ता ताबडतोब ना..!

द्वारा -
डॉ सुहास धनाजी वीर
एम.डी.आयुर्वेद (बालरोग)
मो.नं. 97 665 665 97

*स्मार्ट फोन चे व्यसन हि समस्या नाही ....*- डॉ यश वेलणकरyashwel@gmail.comस्मार्ट फोन चे तंत्रज्ञान गेल्या पंधरा वीस वर्ष...
30/03/2024

*स्मार्ट फोन चे व्यसन हि समस्या नाही ....*- डॉ यश वेलणकर
yashwel@gmail.com
स्मार्ट फोन चे तंत्रज्ञान गेल्या पंधरा वीस वर्षात विकसित झाले. मात्र माणसाच्या मेंदूत सत्तर हजार वर्षापूर्वी एक तंत्रज्ञान विकसित झाले. ते तंत्रज्ञान म्हणजे विचार करण्याचे तंत्रज्ञान होय. अन्य साऱ्या प्राण्यांच्या मेंदूत विचार निर्माण होतात पण ते ठरवून एखाद्या गोष्टीचा विचार करू शकत नाहीत, ते माणूस करू शकतो. विचार करण्याच्या , कल्पना करण्याच्या या कौशल्यामुळे माणसाने संस्कृती, सारे तंत्रज्ञान विकसित केले. आणि आता तो त्या तंत्रज्ञानाचा गुलाम होण्याची दाट शक्यता आहे.
हि गुलामी टाळायची असेल तर मेंदूतील विचार करण्याचे तंत्रज्ञान समजून घेऊन त्यावर स्वामित्व मिळवायला हवे.
स्मार्ट फोन खूप उपयोगी आहे, तसेच विचार करण्याचे तंत्रज्ञान देखील उपयुक्त आहे. पण सतत फोनवर राहणे जसे थांबवता यायला हवे , आवश्यक तेव्हा फोन घ्यायला हवा, थोडा वेळ तो बाजूला ठेवायला हवा, तसेच ठरवून काही वेळ ,आवश्यक कृतींचा विचार करायला हवा आणि काही वेळ विचार करत राहणे थांबवता यायला हवे.
आपण फोन बाजूला ठेवू शकतो तसेच विचार करत राहणे काही वेळ बाजूला ठेवता येऊ शकते.
हे महत्त्वाचे आहे आणि शक्य आहे हे प्रथम बुद्धीला समजायला आणि पटायला हवे.
ते पटले तरी लगेच शक्य होत नाही. त्यासाठी सराव करावा लागतो.
असा सराव केला की विचार येणे आणि विचार करणे यातील फरक लक्षात येऊ लागतो. *विचार येत राहणे यावर आपले नियंत्रण नाही पण विचार करत राहणे थांबवता येते*.
विचार निर्माण करणे हे सर्वच प्राण्यांच्या मेंदूचे काम आहे.
एखादा आवाज ऐकू आला की हा कसला आवाज आहे हे माणसाला समजते तसेच कुत्र्याला मांजराला देखील समजते ,म्हणजेच त्यांच्या मेंदूत देखील विचार निर्माण होतो. त्यानंतर काही कृती आवश्यक आहे का हे त्यांचा मेंदू ठरवतो आणि त्यानुसार अन्य प्राणी कृती करतात.
माणसाच्या मनात देखील असा विचार येतो, आणि तो त्यावर विचार करत राहण्याची कृती करू लागतो. काहीवेळा हि कृती आवश्यक असते, पण प्रत्येक वेळी विचार करत राहणे आवश्यक नसते.
*हे अनावश्यक विचार करत राहणे कमी करता येते आणि त्यासाठी स्मार्ट फोन चा उपयोग करून घेता येतो*. त्यासाठी ठरावीक वेळी फोनमधील ऑडियो ऐकून त्यातील सूचनांनुसार लक्ष देण्याचा सराव करावा लागतो. असा सराव केला की विचारांच्या प्रवाहातून वेगळे होण्याचे कौशल्य विकसित होते. लक्ष जाणे आणि लक्ष देणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत हे अनुभवता येते.
असे कौशल्य विकसित झाले की आवश्यक असते त्यावेळी आपण फोन वापरू शकतो तसेच आवश्यक असते त्यावेळी विचार करू शकतो. विचार करत राहणे काही वेळ थांबवता येते तसेच काही वेळ ठरवून फोन बाजूला ठेवता येऊ शकतो. म्हणूनच स्मार्ट फोन हि समस्या नाही, सतत विचार करत राहणे हि समस्या आहे. आणि त्यावर उपाय आहे.

*अंधश्रद्ध कबुतरे - डॉ यश वेलणकर*अंधश्रध्दा केवळ माणसात असतात असे नाही कबुतरे देखील अंधश्रद्ध असू शकतात असे वर्तन शास्त्...
17/03/2024

*अंधश्रद्ध कबुतरे - डॉ यश वेलणकर*
अंधश्रध्दा केवळ माणसात असतात असे नाही कबुतरे देखील अंधश्रद्ध असू शकतात असे वर्तन शास्त्रज्ञ डॉ स्किनर यांनी 1950 मध्येच एका प्रयोगात दाखवून दिले होते.
त्यांनी एक पिंजरा केला होता , त्यामध्ये कबुतरे ठेवली होती आणि त्यांच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जात होत्या.
कबुतरे इकडे तिकडे फिरत असताना त्यांनी ठरावीक ठिकाणी स्पर्श केला की त्यांना आवडीचे खाद्य पिंजऱ्यात पडायचे.
असे पुन्हा पुन्हा होऊ लागले त्यावेळी ती कबुतरे तेथे पुन्हा पुन्हा स्पर्श करू लागली.
एखाद्या गोष्टीचा भीती निर्माण करणाऱ्या दुसऱ्या गोष्टीशी संबंध निर्माण केला तर ज्याची भीती वाटत नव्हती त्याची भीती वाटू लागते हे वॉटसन या शास्त्रज्ञाने एका छोट्या मुलावर पूर्वी दाखवून दिले होते. त्यांनी त्या मुलाच्या मनात सशा विषयी भीती निर्माण करून दाखवली होती. ससा दाखवला आणि त्याच वेळी भीतीदायक आवाज केला की बाळ घाबरते, रडू लागते. असे पुन्हा पुन्हा केले की काही काळानंतर ससा दिसला आणि आवाज झाला नाही तरीही बाळ रडू लागते. याला वर्तन चिकित्सेत कंडिशनिंग असा शब्द वापरला जात होता.
कबुतरांचे वर्तन पाहिल्या नंतर डॉ स्किनर यांनी कंडिशनिंग चे दोन प्रकार केले. तत्काळ भीती निर्माण करते ते क्लासिकल कंडिशनिंग आणि एखादी कृती केली की त्याचा नंतर फायदा होतो हे जाणवले की ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते ते ऑपरांट कंडिशनिंग होय.
प्राण्यांचे सारे वर्तन असे कंडिशनिंग मुळे होत असते आणि माणसं देखील त्यांच्या कंडिशनिंग नुसार वागतात असे वर्तन शास्त्रज्ञ behaviour scientist चे म्हणणे होते. एखादी कृती केली की त्याचा परिणाम दिसतो, तो तसाच का दिसतो याची कार्य कारण मीमांसा न करता माणसे काही कृती करतात त्यावेळी त्यांना अंधश्रद्ध म्हणतात. कबुतरे देखील तसेच वागतात हे दाखवून देण्यासाठी स्किनर यांनी या प्रयोगाचा रिसर्च पेपर लिहिला त्याचे शीर्षक superstitious pigeons अंधश्रद्ध कबुतरे असे ठेवले. सध्या प्राण्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या कडून विविध कसरती करून घेतात त्यामध्ये हे कंडिशनिंग चे तत्व वापरले जाते.
स्किनर यांना असे वाटत होते की सर्व माणसांचे वर्तन अशा दोन कंडिशनिंग चा वापर करून बदलता येईल, त्यांच्यातील भीती, द्वेष, मत्सर, हिंसा कमी करता येईल. असे स्वप्न रंगवणारी वॉल्डन टू नावाची कादंबरी देखील त्यांनी लिहिली.
मात्र माणसाचे वर्तन केवळ दुसऱ्यांनी केलेल्या कंडिशनिंग मुळे बदलता येत नाही. कारण माणूस विचार करू शकतो, स्वतः चे मूल्य ठरवू शकतो. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला खायला देऊ शकतो. स्वतः च्या सवयी प्रयत्नपूर्वक बदलू शकतो. कोणतीही कृती करण्यापूर्वी मी हे का करणार आहे असा प्रश्न स्वतः ला विचारून त्याचे उत्तर शोधू शकतो. योग्य उत्तर मिळत नसेल तर स्वतः चे वर्तन बदलू शकतो.
मात्र बऱ्याच वेळा माणसे असा मूल्यांचा, हेतुंचा विचार न करता वागत असतील तर त्यांचे कंडिशनिंग करता येते हे सध्या सोशल मीडिया दाखवून देते आहे. भविष्यात तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होईल त्यानुसार हे तंत्रज्ञान ज्यांच्या हातात आहे तेच माणसांचे वर्तन नियंत्रित करू लागतील आणि तंत्रज्ञान माणसांचा स्वामी बनेल. अशी भीती अनेक विचारवंतांनी व्यक्त केली आहे.
हे टाळायचे असेल आणि सामान्य माणसाला तंत्रज्ञानाचे स्वामी व्हायचे असेल तर त्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करताना आपण हे कशासाठी वापरतो आहे, म्हणजे माझे मूल्य काय आहे आणि मी हे किती वेळ पाहणार,ऐकणार आहे याचा विचार करावा लागेल.तसे ठरवून वागावे लागेल. केवळ सवयीने तो वागत राहिला तर त्याच्या साऱ्या सवयी तंत्रज्ञान कंडिशनिंग करेल आणि कबुतरे त्यांचे वागणे बदलू शकत नाहीत,तशीच स्थिती माणसाची होईल. कबुतरे किंवा अन्य प्राणी आणि माणूस यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाच्या मेंदूत प्रि फ्रंटल कॉर्टेक्स अधिक विकसित असतो. त्यामुळे माणूस ठरवून स्वतः च्या चुकीच्या सवयी बदलू शकतो. ही क्षमता तो सजग राहू लागला तरच शक्य आहे. अन्यथा माणसे देखील अंधश्रद्ध कबुतरे वागतात किंवा सशाला घाबरणारा छोटा मुलगा हेल्प लेस होऊन घाबरतो, रडत राहतो, तशीच वागू लागतील, त्यांच्या भावना तंत्रज्ञान नियंत्रित करू लागेल.

12/01/2024
Mind The Pauseती अशी का वागते? हा प्रश्न पडणार्‍या सर्वांसाठीSIPE Education & Lok Biradari Mitramandal Pune brings a uni...
16/08/2023

Mind The Pause
ती अशी का वागते? हा प्रश्न पडणार्‍या सर्वांसाठी

SIPE Education & Lok Biradari Mitramandal Pune brings a unique workshop for 'Men and Women', facing the Menopause, "Mind the Pause"

चाळिशीत ती अशी का वागते? हे बर्‍याचदा तिचं तिलाही कळत नाही, इतरांना अवघड जातच. मग ऐकीव माहितीच्या आधारावर 'तिचा मेनोपाॅज चालू आहे म्हणून ती अशी वागतेय" असं लेबलही कधीकधी लावलं जातं.
प्रेस्टीज प्रेशरची पूर्वी जाहिरात होती, 'जो बीवी से करें प्यार, वो प्रेस्टीजसे कैसे करें इन्कार?'....तसं तुम्ही स्वत: अथवा तुमच्या जवळची 'ती' ३५-५५ ह्या वयोगटात असेल तर ह्या वर्कशाॅपला तुम्ही नक्की रजिस्टर करा. मेनोपाॅजला समजून घेऊ, त्याच्याशी लढण्यापेक्षा मैत्री करू!

Speaker- डाॅ. यश वेलणकर- आयुर्वेदाचार्य, माईंडफुलनेस कोच

संपर्क- 9146364940 / 9226958888
Sunday, 20th August, 10 am to 1 pm @ Fergusson College, Pune

Fees- 500/- Per person,
Google Pay number- 9422054551

05/08/2023

*'माईंड द पाॅज'...!*

मेनोपाॅजला सामोरं जाणार्‍या स्त्री-पुरूषांसाठीचं एक युनीक वर्कशाॅप!

*चाळिशीत ती अशी का वागते?* ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणार्‍या प्रत्येकाने हे प्रत्यक्ष (ऑफलाईन) वर्कशाॅप अटेंड करायला हरकत नाही. आपण स्वत:, आपली आई, सहचारिणी, बहीण, मैत्रिण, सह-कर्मचारी...किंवा बाॅस सुद्धा...!! तिच्या आरोग्या बद्दल काळजी वाटत असेल, तिच्या ताणाबद्दल जाणून घ्यायचं असेल, किंवा *मेनोपाॅज* हा विषय माइंडफुलनेसच्या अंगाने अभ्यासण्याची ईच्छा असेल अश्यांनी लवकरात लवकर रजिस्टर करावं.

रविवार दि. २० आॉगस्ट, सकाळी १०-१,

स्थळ- *फर्ग्युसन काॅलेज, पुणे* वक्ते- *डाॅ.यश वेलणकर*, आयुर्वेदाचार्य आणि माइंडफुलनेस कोच.

अधिक माहितीसाठी संपर्क- 9607059213

रजिस्ट्रेशन शुल्क- रू. 500/- फक्त
*गुगल-पे नंबर- 9422054551

*माणसे आत्महत्या का करतात - डॉ यश वेलणकर*2021 या वर्षात झालेल्या  संशोधनानुसार भारतात दर तीन मिनिटांनी एक आत्महत्या होते...
03/08/2023

*माणसे आत्महत्या का करतात - डॉ यश वेलणकर*
2021 या वर्षात झालेल्या संशोधनानुसार भारतात दर तीन मिनिटांनी एक आत्महत्या होते.
शालेय विद्यार्थी ,शेतकरी, उद्योगपती, पोलीस अधिकारी, अध्यात्मिक गुरू, कलाकार अशा सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील माणसे आत्महत्या करतात.
आयुष्यात संघर्ष करीत यशस्वी झालेली माणसेही आत्महत्या करतात.
सकारात्मक विचार करायचा उपदेश करणारी माणसे देखील काहीवेळा आत्महत्येचा प्रयत्न करतात.
असे का होते?
१. काही वेळा आत्महत्या ही बेभान होऊन केलेली कृती असते. तरुण विद्यार्थी तीव्र रागाच्या भरात आत्महत्या करतात. अशा आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेली माणसे त्याक्षणी मी काय करत होते याचे मला भान नव्हते असे सांगतात. बॉर्डर लाईन स्वभाव विकृती असणारी मोठी माणसे देखील अशी भावनेच्या भरात आत्महत्येचा प्रयत्न करतात.
अशा आत्महत्या कमी करण्यासाठी शालेय वयापासून भावनांची सजगता विकसित करायला हवी. भावनांची तीव्रता टाळता आली तर या आत्महत्या कमी होऊ शकतात.
2. डिप्रेशन असलेल्या व्यक्तीना भविष्याविषयी निराशा आणि एकटेपणा वाटत असतो. त्यांच्या मनात येणारे विचार याच प्रकारचे असतात.त्या विचारांमुळे अशी माणसे आत्महत्या करतात.
असे विचार येत असतील तर मानस तज्ज्ञांशी संपर्क करून विचारांच्या समुद्रात पोहण्याचे कौशल्य विकसित करायला हवे.
3. डिप्रेशन ची बाह्य लक्षणे दिसत नसताना देखील काही प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्ती आत्महत्या करतात.
त्यांची प्रतिमा, इमेज त्यांना आयुष्यापेक्षा अधिक प्रिय असते. हि व्यक्ती अपयशी झाली अशी होणारी टीका त्यांना सहन होणारी नसते. अशी यशस्वी माणसे हा मानसिक ताण कमी करण्यासाठी कुणाची मदत घ्यायला देखील तयार नसतात.
माणूस कितीही यशस्वी आणि सकारात्मक विचार करणारा असला तरीही त्याच्या मनात कचरा निर्माण होत असतो. पैलवान व्यक्तीच्या शरीरात देखील मल मूत्र निर्माण होते,तसेच हे आहे.
स्वतः च्या प्रतिमेच्या प्रेमात पडणे हा देखील मनातील कचराच असतो.
स्वतः च्या परिस्थितीकडे, शरीर मनाकडे काही वेळ तरी साक्षी होऊन पाहण्याचा सराव केला तरच मनाच्या कोपऱ्यात साठलेला कचरा दिसू शकतो.
त्यासाठी अशा सर्व यशस्वी व्यक्तींनी काही वेळ तरी कामात व्यग्र न राहता मनात आपोआप येणारे विचार पाहायला हवेत, त्यांचा शरीरावर होणारा परिणाम अनुभवायला हवा.
असा सराव केला तर बदललेल्या परिस्थितीचा ताण कमी होतो.
माणसांनी एकमेकांशी व्यक्त व्हायला हवे, प्रेमाचे नाते संबंध निर्माण करायला हवेत हे खरे असले तरीही तो उपाय पुरेसा नाही.
स्वतः च्या मनात येणाऱ्या भावना आणि विचार यांची सजगता विकसित करण्याचे कौशल्य विकसित करण्याचे महत्त्व अधिकाधिक लोकांना पटेल तेव्हाच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. हे कौशल्य शाळा कॉलेज मध्ये शिकवायला हवे, यशस्वी माणसांनी विकसित करायला हवे.
त्याची सुरुवात आपण स्वतः पासून करू शकतो. आणि इतरांना या विषयी माहिती देत राहू शकतो.

Welcome my newest followers! Excited to have you onboard!Murlidhar Namdas, Shreya Kondaskar, Netra Surve
16/06/2023

Welcome my newest followers! Excited to have you onboard!

Murlidhar Namdas, Shreya Kondaskar, Netra Surve

17/05/2023

Learn to enjoy activities in daily life

*Mindfulness for Teachers* *खास शिक्षकांसाठी सजगता कार्यशाळा*सजगता ही केवळ माहिती किंवा संकल्पना नाही, तो मेंदूचा व्याया...
17/04/2023

*Mindfulness for Teachers*
*खास शिक्षकांसाठी सजगता कार्यशाळा*
सजगता ही केवळ माहिती किंवा संकल्पना नाही, तो मेंदूचा व्यायाम आहे. त्यासाठी नियमित सराव लागतो.
असा सराव का करायचा आणि कसा करायचा हे तीन दिवसांच्या कार्यशाळेत समजून घ्यायचे आणि नंतर रोज किमान दहा मिनिटे ऑडियो ऐकून सराव करायचा.
त्याचसाठी
खास शिक्षकांसाठी लोणावळा येथे निवासी सजगता कार्यशाळा.
आणि नंतर ॲप मधील सहा महिन्यांचा प्रोग्राम
प्रशिक्षक - डॉ यश वेलणकर
एका रूम मध्ये दोन व्यक्ती राहतील.
प्रति व्यक्ती तीन दिवसांची फी
रु सहा हजार आहे. यामध्ये दोन वेळचे शाकाहारी जेवण, नाष्टा ,चहा मिळणार आहे.
त्याच बरोबर SIPE Mind app मधील सहा महिन्यांचा mindfulness program मोफत दिला जाईल, ज्याची फी रु एक हजार दोनशे आहे.
थोड्याच जागा शिल्लक आहेत.
त्वरित संपर्क साधावा.
कालावधी - बुद्ध पौर्णिमा 5 मे सकाळ ते रविवार 7 मे संध्याकाळ
*स्वतः अनुभव घ्यायचा आणि नंतर विद्यार्थ्यांची भावनिक सजगता विकसित करायची*
त्यासाठी 9146364940 या नंबर वर व्हॉट्स ॲप ने तुमचे नाव आणि
*शिक्षकांसाठी कार्यशाळा*
असा मेसेज पाठवावा.
तुमचे काही प्रश्न असतील तर विचारावे.

https://youtu.be/udmeLFruNWU
14/04/2023

https://youtu.be/udmeLFruNWU

स्मृती स्वच्छ करण्यासाठी साक्षी भाव आवश्यक आहे

Address

Manubar Mansion , 1st Floor, Ambedkar Road, Opposite Chitra Cinema Dadar
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when SIPE Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to SIPE Education:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram