Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur

Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha (बस एक कदम और ....!!!) on 11/12/13 under societies registration act 1860.

In March 2013 a group of dedicated voluntary workers joined hands with an intense desire to work for overall development of the community. The first step was to create a suitable platform for this.After much brain storming an NGO called ‘Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha’ was born. Further, as per the theme of our teami.e. – ‘Bas EkKadamAur’ i.e. ‘just one step more’ – so with great effortsthe ‘Niramay Bahu-Uddeshiya Seva Sanstha’ was duly registeredon a memorable date i.e.

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था गेली 12 वर्षे आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि संस्कार या चार स्तंभांच्या आधारे सातत्याने ग्...
18/08/2025

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था गेली 12 वर्षे आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि संस्कार या चार स्तंभांच्या आधारे सातत्याने ग्रामविकासासाठी कार्यरत आहे. आमचा ठाम विश्वास आहे की कोणतेही मोठे कार्य सक्षम व समर्पित टीमशिवाय शक्य होत नाही.

या वाटचालीला मान्यता मिळाली ती काल सेवासदन शिक्षण संस्था, नागपूर येथे आयोजित "मनशक्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवा" निमित्ताने. या प्रसंगी माननीय नितीनजी गडकरी काही कारणांमुळे उपस्थित नसल्याने, आदरणीय श्रीमती कांचनताई गडकरी यांच्या शुभहस्ते आम्हाला ग्रामीण आरोग्य व मानसिक आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान झालेला "सन्मान सत्कार पुरस्कार" आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

हा पुरस्कार केवळ आमच्या संस्थेचा नसून, तो ग्रामीण तसेच शहरी भागात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, आणि हितचिंतकांना समर्पित आहे.

आमच्या कार्याला ओळख देणाऱ्या सर्व आयोजकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.



आपल्या सर्वांच्या सहकार्याने निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेला उद्या दिनांक १७.८.२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सेवासदन, शिक्...
16/08/2025

आपल्या सर्वांच्या सहकार्याने निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेला उद्या दिनांक १७.८.२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सेवासदन, शिक्षण संस्था,नागपूर येथे माननीय नितीनजी गडकरी( केंद्रीय मंत्री, भारत सरकार) ह्यांच्या हस्ते लोणावळा येथील मनशक्ती संस्थेचा "मनशक्ती सन्मान सत्कार्याचा" पुरस्कार प्राप्त होणार आहे, कृपया आपण सर्वांनी जरूर यावे ही नम्र विनंती.🙏🏻

गावकुसाबाहेर उभारी घेणारी नवी पिढी — "किशोरी व्यक्तिमत्व विकास शिबीर" यशस्वी आयोजन२० गावांतील १००+ किशोरी मुलींनी घेतला ...
08/06/2025

गावकुसाबाहेर उभारी घेणारी नवी पिढी — "किशोरी व्यक्तिमत्व विकास शिबीर" यशस्वी आयोजन

२० गावांतील १००+ किशोरी मुलींनी घेतला स्व:रक्षण, नेतृत्व, कला आणि आरोग्याचा प्रेरणादायी अभ्यास

खापरी, दि. ७-८ मे:
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर यांच्या वतीने उन्हाळी किशोरी व्यक्तिमत्व विकास शिबीर नुकतेच उत्कर्ष विद्या मंदिर, खापरी येथे दोन दिवसीय आयोजित करण्यात आले.
शिबिरात २० गावांमधील सुमारे १०० हून अधिक किशोरी मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर व सचिव डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
पहिल्या सत्रात "किशोरावस्था : भारतीय संस्कृती, प्रकृती व विकृती" या विषयावर डॉ. रवींद्र सर आणि डॉ. उर्मिला मॅडम यांनी व्यक्तिमत्व विकास, आचरण व जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.

दुसरे सत्र डॉ. प्रियांका फाये यांनी "किशोरावस्थेतील शारीरिक आरोग्य व स्वच्छता" या विषयावर घेतले.
त्यानंतर श्री अमित पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली बिडिंग पट्यापासून कानातील दागिने बनविण्याची प्रत्यक्ष कार्यशाळा घेण्यात आली.
श्रीमती विद्या हरिदास यांनी सेंद्रिय शेती व पर्यावरणपूरक जीवनशैली यावर संवाद साधला.

दुपारच्या सत्रात टीम बिल्डिंग व विविध खेळांद्वारे मुलींमध्ये सामूहिक भावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देण्यात आला.
सुनीता मोंडेकर मॅडम यांनी आत्मसंरक्षणाचे विविध तंत्र प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे शिकवले. संस्थेचे
अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी समस्या निवारण आणि धैर्यपूर्वक निर्णय घेण्याच्या कौशल्यांवर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी योग व प्राणायाम सत्राने सुरुवात झाली.
यानंतर डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांनी भावनांचे नियमन या विषयावर चर्चात्मक सत्र घेऊन किशोरी मुलींचे मार्गदर्शन केले.
पूजा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कला-कौशल्य विकास कार्यशाळा पार पडली.

सौ. आदिती देशमुख यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर आणि त्याचे परिणाम यावर उपयुक्त माहिती दिली.
श्रीमती मनीषा संत यांनी "मी आणि कुटुंब" या विषयावर मुलींना सामूहिक विचारांची जाणीव करून दिली.
पोलीस निरीक्षक श्रीमती बावनकर यांनी संकटसमयी आत्मसंरक्षणाचे उपाय आणि सजगतेची गरज पटवून दिली.

शिबिराचा समारोप संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून केला. त्यांनी किशोरी मुलींना ध्येय निश्चिती वर सहज सोपे उदाहरण देऊन पुढील आयुष्यासाठी ध्येय निश्चित करण्याचे आवाहन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

शिबिरादरम्यान सर्व सत्रांना भरघोस प्रतिसाद मिळाला.
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून गावांतील किशोरी मुलींना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि सजग नागरिक बनवण्याच्या दिशेने हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

#किशोरी


किशोर व्यक्तिमत्व विकास शिबीर उत्साहात संपन्ननिरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी किशो...
03/06/2025

किशोर व्यक्तिमत्व विकास शिबीर उत्साहात संपन्न

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी किशोर व्यक्तिमत्व विकास शिबीर उत्साहात पार पडले. हे शिबीर दिनांक 27 व 28 मे 2025 रोजी उत्कर्ष विद्या मंदिर, खापरी येथे संपन्न झाले. या शिबिरात सायकी, जांभळापानी, वारंगा, डोंगरगाव, तुमडी, कच्चीमेट आदी गावांतील अनेक किशोरवयीन मुलांचा सहभाग होता.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर, व सचिव डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदलांबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर अमित सर यांनी लाकडी बिडिंग पट्टी पासून हस्तकला वस्तू – विशेषतः कानातले, मोबाईल स्टँड बनविण्याचे प्रात्यक्षिक घेतले व मुलांकडून प्रत्यक्ष कृती करून घेतली. श्रीप्रकाशजी पंडा यांनी विविध नवनवीन खेळ व कसरतींचे आयोजन करून शिबिरात उत्साह निर्माण केला.
रात्री भोजनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट दाखवण्यात आला.

दुसऱ्या दिवशी, सकाळी 6 वाजता वॉर्म-अप, सूर्यनमस्कार, रनिंग व खेळांच्या स्पर्धांनी दिवसाची सुरुवात झाली. यानंतर प्रशांत सिस्टला यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर सविस्तर माहिती दिली.

डॉ. नीलकंठ देशमुख यांनी आरोग्यसाक्षरता व व्यसनमुक्तीबाबत संवाद साधला. डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांनी भावनांचे नियमन व भावनांचे प्रकार यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन केले.

यानंतर मिटकॉन कंपनी च्या सौ. सोनाली मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन व उद्योगशिक्षण याबाबत माहिती दिली. त्यानंतर श्रीप्रकाश पंडा यांनी मुलांना PPT च्या माध्यमातून करियर मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मा. हरीशजी सायरे यांच्या हस्ते झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये व शैक्षणिक मार्गदर्शन केले.

या दोन दिवसांच्या शिबिरात मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासास चालना देणारे अनेक उपक्रम राबवण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन उत्तम पद्धतीने पार पाडल्याबद्दल संस्थे तर्फे सर्वांचे आभार.

भूमी सूपोषन आणि संरक्षण अभियान.
02/04/2025

भूमी सूपोषन आणि संरक्षण अभियान.




निरामय संस्थेचे भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान नव वर्षापासून सुरू.प्रस्तावना:वेद काळापासून भूमीला आपण आई मानले आहे. या क...
31/03/2025

निरामय संस्थेचे भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान नव वर्षापासून सुरू.
प्रस्तावना:
वेद काळापासून भूमीला आपण आई मानले आहे. या काळ्या आईवर हजारो वर्षांपासून संपूर्ण सृष्टीचा समतोल साधून अमृतासारखे अन्न देणारा निसर्ग पूरक शेती आपल्या देशात होत आली. परंतु हरित क्रांति नंतर रासायनीक खते, किटकनाशके, तणनाशके यांच्या अतिवापरांमुळे जमिनीचा आत्मा असलेली जिवाणू सृष्टि संपत चालली आहे. भारतातील एकूण शेतजमिनीच्या सुमारे 30 टक्के जमीन नापीक झाली आहे. जमिनीला केवळ पैसे कमविण्याचे साधन मानण्याच्या प्रवृत्तीमुळे आपल्या काळ्या आईचे शोषण होत आहे. निकटच्या भविष्यातील हे संकट ओळखून आजच सर्वानी जागे होण्याची गरज आहे.
उद्देश:
यादृष्टिनी सर्व शेतकऱ्यांना भूमातेचे महत्व समजावे व तिच्या पोषणासाठी आणि संरक्षणासाठी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी तिचे प्रथम पूजन करावे या उद्देशाने निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेने भूमी सुपोषण कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रमुख कार्यक्रम:
दि. 30/3/2025, रविवार चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सायकी शेतामध्ये भूमी सुपोषण कार्यक्रम साजरा करण्यात आला. सायकी, फुकेश्वर व डव्हा या तीन गावातील विवाहित जोडप्यांच्या हस्ते भूमातेची मंत्रोपचारामध्ये शास्त्रीय पद्धतीने पूजा करण्यात आली.
तसेच शेतातील गाय व वासरांची पूजा केली. संस्थेच्या सचिव डॉ. उर्मिला क्षीरसगर व उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर व अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी देखील भूमातेची व गाय-वासराची स्वहस्ते पूजा केली. यासाठी तीनही गावातील मुले-मुली, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष, श्रीप्रकाश पंडा यांनी शेतकारीं बांधवांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खत, गोकृपा अमृत, जिवामृत, दशपर्णी अर्क गांडूळखत इ. आपल्याच शेतात शास्त्रीय पद्धतीने तयार करून त्याचा शेतीत योग्य प्रमाणात वापर केल्यास आपण आपली जमीन रासायनिक खतांच्या दुष्परिणामापासून सुरक्षित राहून जमिनीचा कस वाढू शकतो हे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी यानंतर आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खत वापरून काळ्या आईचे संरक्षण करावे असे त्यांनी आवाहन केले. यानंतर सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------

गो आधारित शेची ( एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा) निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेने गो आधारित शेती प्रशिक्षण चे आयोजन दिनां...
29/03/2025

गो आधारित शेची
( एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा)

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेने गो आधारित शेती प्रशिक्षण चे आयोजन दिनांक 2 मार्च रविवार सकाळी 11 वाजता आपल्या सायकी केंद्र उमरेड येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमात पंचवीस गावातून निवळक शेतकऱ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यात महिल, पुरुषांसोबत कृषीकुंभ फार्मर प्रोडूसर कंपनीचे पदाधिकारी पण आले होते.या कार्यक्रमांमध्ये विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिल्लीहून आलेले ग्राम संकुल स्वावलंबन योजनेचे राष्ट्रीय समन्वयक श्री.अलोकजी गुप्ता यांनी सर्व शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांनी शेतकऱ्यांना विचारले की “तुमच्या गावात कोणते गृह उद्योग सुरू आहे व गावातील लोक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता कोणत्या वस्तू बाहेरून गावात आणतात आणि त्यापैकी किती वस्तू गावात बनतात.” असे विचारपूस झाल्यानंतर अधिकाधिक वस्तू आपल्या गावातच बनल्या पाहिजेत याचा महत्त्व सांगून त्यानी शेतकरी बंधूंना शेती एक व्यवसाय आहे या वर मार्गदर्शन केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते माननीय श्री. सुनीलजी मानसिंका (सदस्य जीवजंतू कल्याण बोर्ड, भारत सरकार व देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्र चे प्रमुख) त्यांनी आलेल्या शेतकऱ्यांना गाय मातेबद्दल विविध महत्त्वाची माहिती दिली. सोबतच त्यांनी सांगितले की गाय मुळे आपली सृष्टी सुरू आहे गायमातेमुळे आपला देश आधी विश्व गुरु होता. देशाची अर्थव्यवस्था, कृषी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था आणि अध्यात्मिक व्यवस्था गाय आधारित होती त्यामुळे आपण गायला माता म्हटलेलं आहे. गाय मातेचे अनन्यसाधारण असे महत्त्व त्यांनी सांगितले. गाय मातेत 33 कोटी देवी देवतांचा निवास आहे, गाईचं दूध अमृत आहे, म्हणून त्याला संपूर्ण आहार असे म्हटले आहे. गाईचे गोमूत्र विविध औषधे गुणांनी परिपूर्ण आहे. गायीच्या गोमुत्राचे प्रासन केल्याने विविध प्रकारचे आजार बरे होतात व मनुष्य निरोगी राहतो, गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने आपला बीपी नॉर्मल मध्ये राहते असे त्याने विविध पुरावे व वैज्ञानिक शोध शेतकऱ्यांसमोर सादर केले.

गो आधारित वस्तू जास्तीत जास्त लोकांनी वापरावे त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहील आणि गोमाता कत्तलखान्यात जाणार नाही असे पण त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याने गो आधारित शेती केली पाहिजे, देशी गाय च्या गोबर गोमूत्रा पासून उत्तम शेती होते. विविध शेतकऱ्यांचे गो आधारित सेंद्रिय शेतीचे अनुभव सांगून त्यांनी आलेल्या शेतकऱ्यांना नीट प्रशिक्षण घेऊन सेंद्रिय सेती करण्याचे आवाहन सुध्दा केले.

गो आधारित सेंद्रिय शेतीचे नीट प्रशिक्षण घेऊन शेती केली तर जमीन अधिक होत सुपीक होते, जमिनीत पाण्याची लेव्हल वाढेल, हवा शुद्ध राहील व लोकांसाठी विषमुक्त अन्न मिळेल. आज रासायनिक खतामुळे हवा, पाणी, जमीन, आणि अन्न हे दूषित झालेले आहे. त्या सजीव सृष्टी वर त्याचे भयानक परिणाम दिसतात आहे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या लोकांसमोर आलेल्या आहेत लोक विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त होत चाललेले आहे.

जर आपल्याला आपला देश सुदृढ बनवायचा असेल आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा अधिक सशक्त बनवायचा असेल तर गोवाधारित शेती करणे आवश्यक आहे. गोआधारित आणि गो उत्पादन चा वापर करणे आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला गायची रोज सेवा करायची आहे.

त्यानंतर रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनच्या अध्यक्षा जयश्री छाब्राणी मॅडम ने पण आलेल्या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले व आमच्या सारख्या संस्था तुमच्या पाठीशी आहेत असा आश्वासन देत शेतकऱ्यांना गोआधारित शेतीचे कडे जावे त्याचे प्रशिक्षण घेऊन आपण चांगली शेती करावी असे लोकांना आव्हान केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी शेतकऱ्यांना निरामय केंद्रात सुरू असलेले शेतीचे विविध प्रयोग सांगितले. गो आधारित शेती कशी करावी त्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. गांडूळ खताचे प्रकल्प दाखऊन, गांडूळ खत कसे तयार करावे? त्याची योग्य पद्धत आणि शास्त्र काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली व मुक्त विचरण गोठा पद्धतीचे काय फायदे आहेत आणि गोपाल भाई सुतरिया यांनी तयार केलेले गोकृपा अमृत चे कल्चर कसे तयार करावे याचे पण त्यांनी प्रशिक्षण दिले आणि

आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक किलो गांडूळ खत व एक लिटर गोकृपा अमृत देऊन आपल्या शेतामध्ये पण गो आधारित शेतीचे प्रयोग सुरू करावे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र क्षीररसागर आणि सचिव डॉक्टर उर्मिलाताई क्षीरसागर पण या कार्यक्रमात उपस्थित होत्या. सोबतच रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे पदाधिकारी श्री जुगल किशोर अग्रवाल, जनकल्याणकारी समिती चे सचिव श्री दीपक जी देशपांडे, नेत्रबन निसर्ग विज्ञान संस्थेचे अध्यक्ष श्री विजय जी घुघे, सामाजिक कार्यकर्ता श्री मुन्ना महाजन इत्यादी लोक उपस्थित होते. सर्व ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

सर्व शेतकऱ्यांना निमंत्रण
27/02/2025

सर्व शेतकऱ्यांना निमंत्रण

निरामय वार्षिकोत्सव कार्यक्रम २०२५
12/02/2025

निरामय वार्षिकोत्सव कार्यक्रम २०२५

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर चा  ११ वा वार्षिक उत्सवदि. २ फेब्रुवारी २०२५  स्थळ – बुटीबोरी-उमरेड रोडवरील खापरी...
05/02/2025

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर चा ११ वा वार्षिक उत्सव
दि. २ फेब्रुवारी २०२५
स्थळ – बुटीबोरी-उमरेड रोडवरील खापरी (डव्हा) गावातील शाळेजवळील पटांगण
वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यन्त
रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेचा ११ वा वार्षिक उत्सव दरवर्षी प्रमाणे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व पूर्व सरकार्यवाह, मा. भैय्याजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर ग्रामीण मधील ६५ गावातील किमान १३०० गावकरी व नागपूर शहरातील २०० नागरिकांच्या उपस्थितीत बुटीबोरी-उमरेड रोडवरील खापरी (डव्हा) गावातील शाळेजवळील पटांगणावर संपन्न झाला.
सर्वप्रथम सकाळी १० वाजता निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सायकी शेतावर मा. भैय्याजींचे आगमन झाले व त्यांचे हस्ते प्रथम भारतमातेचे पूजन करण्यात आले. गावकऱ्यांच्या पाऊल भजनाच्या गजरात, संस्थेच्या सचिव डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी औक्षण करून भैय्याजींचे स्वागत केले. नंतर निरामय संस्थेच्या हितचिंतकांनी आपला परिचय मा. भैय्याजींना करून दिला तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीही आपला परिचय करून देऊन आपापल्या भूमिका व जबाबदाऱ्यांची ओळख करून देऊन कामाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ग्राम विकास समितीच्या सदस्यांशी संवाद साधला, समितीच्या कार्याविषयी जाणून घेऊन पुढील यशस्वी कार्याबद्दल आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा. भैय्याजींनी कृषीकुंभ शेतकरी उत्पादन संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीकरिता मार्गदर्शन केले.
तदनंतर या उत्सवासाठी खापरी (डव्हा) या गावातील शाळेजवळील प्रांगणात उभारलेल्या सुशोभीत भव्य मंडपात मा. भैय्याजींचे आगमन झाले. तेथे आसपासच्या गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी निरामय च्या सहकार्याने सुरु केलेल्या लघु उद्योगाच्या उत्पादनांचे, रानभाजी व पौष्टिक खाद्य पदार्थांचे स्टॉल्स इत्यादींचे प्रदर्शन भरविले होते. गावातील महिलांनी लावलेल्या या प्रदर्शनातील रानभाजी स्टॉल्स ची स्पर्धा देखील संस्थेने आयोजित केली होती. मा. परीक्षकांनी निकाल जाहिर केला व कार्यक्रमाच्या शेवटी महिलांना बक्षिसे देण्यात आली.
लघुउद्योजकांच्या उत्पादनांमध्ये पंचगव्यापासून बनवलेल्या शॅम्पू, हेअर कंडिशनर, तेल, साबण, फेस पॅक, फिनाईल, धूपबत्ती, इत्यादी उत्पादनांचा समावेश होता. तसेच कापडी पर्सेस, बॅग्ज् इत्यादींचाही समावेश होता. मा. भैय्याजींनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्व महिलांचे भरभरून कौतुक केले. तसेच खापरी(डव्हा) येथे निरामय संस्थेचा जो दवाखाना चालतो त्या दवाखान्यात इ.पी.एच.सी.(टेलीमेडिसीन) मशीन बसाविण्यात आली त्या मशीनचे उदघाटन मा. भैयाजींच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे आसपासच्या २५ गावांमध्ये जे अभ्यास केंद्र चालतात त्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट, नागपूर चे माजी संचालक मा. श्री जी एस नटराजन यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलामुलींनी भक्तिगीतांवरील नृत्ये, भजन, देशभक्तीगीतांवरील वरील नृत्ये, गीते व भाषणे सादर केली.
यानंतर भैय्याजी व इतर प्रमुख अतिथि व संस्थेचे पदाधिकारी मंचावर स्थानापन्न झाले. निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सचिव डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी संस्थेच्या मागील वर्षभराच्या विकास कार्याच्या अहवालाचे वाचन केले. किशोरी विकास व सखी केंद्र सुकळीच्या कु. हर्षा तलांडे यांनी संस्थेच्या कार्यामुळे आसपासच्या गावातील आरोग्याविषयक स्थितीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. त्यानंतर चिमणाझरी गावाच्या श्रीमती वंदना तुमडाम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या प्रयत्नामुळे गावातील महिलांना लघुउद्योगाचे महत्व समजून एम् गिरी, वर्धा सारख्या संस्थेतून प्रशिक्षण मिळाल्याने महिला आत्मविश्वासाने लघुऊद्योगाकडे वाटचाल करीत आहे असे त्यांनी सांगितले. गावांमध्ये मागील अकरा वर्षांपासून सुरु असलेल्या अभ्यास केंद्राचा विध्यार्थी, राजेंद्र सहस्त्रबुद्धे याने अभ्यास केंद्रातील संस्कारांमुळे त्याच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे विश्लेषण आपल्या मनोगतात व्यक्त केले.
मंचावर उपस्थित खापरी (डव्हा) गावचे सरपंच श्री विजय कुंभरे यांनी गावाच्या ग्रामविकासाच्या कार्याचा आढावा घेतला व त्यात निरामय संस्थेचा मोलाचा वाटा आहे हे व्यक्त केले.
त्यानंतर एम गिरी वर्धा या संस्थेचे संचालक मा. डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी गावकऱ्यांना लघु उदयोग व ग्रामोद्योगाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गावातील लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन लघुउदयोगाद्वारे स्वावलंबी होण्यास प्रोत्सहीत केले व भविष्यातील सहकार्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात मा. भैयाजींनी संस्थेच्या प्रगतीचे भरभरून कौतुक केले तसेच महिला उद्योजिकांनी नवीन कौशल्ये शिकून घेऊन स्वावलंबनाच्या मार्गावरील त्यांच्या वाटचालीची वाखाणणी केली. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना असे म्हंटले की, आजही भारताची बहुसंख्य जनता ग्रामीण भागात वसत असल्याने ग्रामीण भारत खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून आपापसातील भेदाभेद विसरून; एकोप्याने राहून; आपली संस्कृति, परंपरा व संस्कारांचे जतन करावे व त्याद्वारे गावांची सर्वंकष स्थिति अधिकाधिक मजबूत करीत आपल्या भारत देशाच्या सशक्तीकरणामध्ये बहुमोल हातभार लावावा. तसेच ग्रामविकासासाठी आवश्यक संघटन, पर्यावरण संरक्षण, जैविक शेती, समरसता इत्यादींचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संचलन श्रीमती रश्मि देशपांडे व श्री. विलास खनगन यांनी केले. निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.

कृपया आपण सर्वांनी आपल्या मित्र परिवारासह निरामाच्या 11 व्या वार्षिक उत्सवात जरूर यावे. 🙏🏻 कार्यक्रमाचे स्थान :-* खापरी ...
01/02/2025

कृपया आपण सर्वांनी आपल्या मित्र परिवारासह निरामाच्या 11 व्या वार्षिक उत्सवात जरूर यावे. 🙏🏻

कार्यक्रमाचे स्थान :-* खापरी (डव्हा), शाखेच्या बाजूला, बुटीबोरी-उमरेड रोड, उमरेड तहसील, नागपूर जिल्हा.

व्यक्तित्व विकास शिबीर 2024निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर,  स्वास्थ्य शिक्षा, स्वाबलंबन तथा संस्कार के माध्यम से...
14/12/2024

व्यक्तित्व विकास शिबीर 2024

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर, स्वास्थ्य शिक्षा, स्वाबलंबन तथा संस्कार के माध्यम से गत 11 वर्षो से नागपुर ग्रामीण, उमरेड तथा हिंगना तहसील के 65 गांव में ग्राम विकास के कार्य निरंतर कर रही है।

संस्था के द्वारा ग्रामीण भागों में बच्चों और युवाओं को व्यक्तिमत्व विकास शिबीर तथा अन्य उपक्रमों के माध्यम से उन्हे सही दिशा देने का कार्य शुरू है। इस वर्ष यह शिबीर दिनांक 30 नवंबर 2024 से 1 दिसंबर 2024 को प्रहारगढ़, प्रहार समाज जागृति संस्था, उमरेड रोड के स्थान पर लिया गया था।

गांव के युवाओं में पुलिस भर्ती और सैन्य भर्ती की इच्छा होती है और इसके लिए वो प्रयासरत भी रहते है। इसलिए प्रहारगढ जैसी सैन्य प्रशिक्षण संस्था में इस शिबीर का आयोजन किया गया था। इस शिबीर में विविध गांव से कुल 40 शिक्षार्थी आए थे।

यह सैनिक प्रशिक्षण संस्था होने के कारण यहां पर विविध प्रकार के प्रशिक्षण दिए गए जिसमें आत्मरक्षा डक वॉक, वर्टिकल रोप, पैरेलल रोप, टार्जन स्ट्रिंग, बैलेंस बेयर, फिगर ऑफ़ एट, दौड़ तथा घुड़सवारी जैसे सैन्य भर्ती के लिए आवश्यक प्रशिक्षण दिए गए। यहां के शिक्षकों ने बहुत ही अच्छे से ग्रामीण बच्चों का मार्गदर्शन किया। साथ इस संस्था की प्रमुख संचालिका पूर्व फ्लाइंग ऑफिसर शिवाली ताई देशपांडे जी ने बच्चों और युवाओं को पोकसो कायदा, भरती पूर्व तयारी, करियर मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, योग्य आहार, व्यायाम तथा एक सैनिक का साहस, त्याग, और अनुशासन का महत्व बताकर सभी बच्चों का मार्गदर्शन किया।
शिविर के समारोह कार्यक्रम में श्रीमती वैशाली ताई खटी जी का भी मार्गदर्शन प्राप्त हुआ, जो गत 20 वर्षो से ऐतिहासिक विषयो पर एकपात्री प्रयोग कर समाज जागृति का कार्य कर रहीं है। इस शिबीर में वो जीजामाता की वेशभूषा में आकर सभी बच्चों और युवाओं का मार्गदर्शन कर उनको देशभक्ति से भर दिया। साथ ही उन्होंने बच्चों को शिवाजी महाराज, रानी पद्मावती और रानी लक्ष्मीबाई के अपार शौर्य तथा बलिदान के किस्से सुनाकर बच्चो को अपने राष्ट्र के प्रति समर्पण होकर मातृभूमि की सेवा करने का आवाहन किया। शिबीर के अंत में संस्था के अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा ने इस शिबीर को यशस्वी बनाने के लिए सभी सहयोगी लोगों का आभार प्रकट किया।

Address

Mate Square
Nagpur
440010.

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram