Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur

Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha (बस एक कदम और ....!!!) on 11/12/13 under societies registration act 1860.

In March 2013 a group of dedicated voluntary workers joined hands with an intense desire to work for overall development of the community. The first step was to create a suitable platform for this.After much brain storming an NGO called ‘Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha’ was born. Further, as per the theme of our teami.e. – ‘Bas EkKadamAur’ i.e. ‘just one step more’ – so with great effortsthe ‘Niramay Bahu-Uddeshiya Seva Sanstha’ was duly registeredon a memorable date i.e.

दो दिवसीय बालिका सैन्य प्रशिक्षण शिविर – सिर्फ़ प्रशिक्षण नहीं, एक नया आत्मविश्वास जन्मा 16–17 नवम्बर 2025निरामय बहुउद्द...
30/11/2025

दो दिवसीय बालिका सैन्य प्रशिक्षण शिविर – सिर्फ़ प्रशिक्षण नहीं, एक नया आत्मविश्वास जन्मा

16–17 नवम्बर 2025
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर
प्रहार मिलिट्री स्कूल, नागपुर

इन दो दिनों में हमने सिर्फ़ 19 बालिकाओं को प्रशिक्षण नहीं दिया…
बल्कि उनके अंदर छिपी हुई ताकत, हिम्मत, अनुशासन, और नेतृत्व को जगते हुए देखा।
किशोरी बालिकाओं में शारीरिक क्षमता, आत्मविश्वास, अनुशासन, नेतृत्व और सैन्य भर्ती की समझ विकसित करने के उद्देश्य से दो दिवसीय सैन्य प्रशिक्षण शिविर आयोजित किया गया। सभी बालिकाओं ने उत्साहपूर्वक सहभाग लिया।

प्रथम दिन – प्रशिक्षण विवरण

1. उद्घाटन और परिचय

शिविर का उद्देश्य, नियम और दिनचर्या बताई गई।

2. शारीरिक प्रशिक्षण

स्ट्रेचिंग, रनिंग, स्क्वाट्स, पुश-अप्स और सांस से जुड़ी एक्सरसाइज कराई गई।

3. मार्चिंग और ड्रिल

सावधान-विश्राम, दाएँ-बाएँ मुड़, तथा मार्च-पास्ट की मूल बातें सिखाई गईं।

4. सैन्य अनुशासन प्रशिक्षण

समय का महत्व, आदेश पालन, और समूह में कार्य करने की तकनीक समझाई।

5. स्वास्थ्य एवं पोषण मार्गदर्शन

सही आहार, पानी का महत्व और नियमित व्यायाम पर जानकारी दी गई।

6. आपदा प्रबंधन प्रशिक्षण

प्राकृतिक व मानव निर्मित आपदाओं में बचाव के तरीके, रस्सी के उपयोग और मूलभूत तकनीकें सिखाईं।

7. घुड़सवारी सत्र

घोड़े पर सही तरीके से बैठना, नियंत्रण और सुरक्षा के नियम बताए गए। सभी बालिकाओं ने घुड़सवारी का अभ्यास किया।

8. Self-Confidence Session

• Social Anxiety
• Communication Skills
मेहक मैम (मनोवैज्ञानिक) द्वारा मार्गदर्शन।

9. कैंप फायर

निरामय संस्था के सचिव डॉ. उर्मिलाजी क्षीरसागर द्वारा कैंप फायर कार्यक्रम शुरू किया गया, जिसमें सभी बालिकाओं ने आनंदपूर्वक भाग लिया। कैंप फायर की रोशनी में उनकी मुस्कानें बता रही थीं कि ये बेटियाँ अब केवल सपने नहीं देखतीं—
उन्हें पूरा करने का साहस भी रखती हैं।

द्वितीय दिन – प्रशिक्षण विवरण

सुबह 6 बजे सभी बालिकाएँ उठीं। गाँव के बाहर रनिंग कराई गई और एक्सरसाइज हुई।
नाश्ते के बाद अतिरिक्त अभ्यास और घुड़सवारी का दूसरा सत्र हुआ।

1. सैन्य भर्ती परीक्षा मार्गदर्शन

अनुभवी प्रशिक्षकों द्वारा सेना भर्ती के पेपर पैटर्न और तैयारी तरीकों पर तीन सत्र लिए गए।

2. मानसिक शक्ति व प्रेरणा सत्र

ध्येय निर्धारण, आत्मविश्वास वृद्धि और दबाव प्रबंधन पर मार्गदर्शन।

3. टीम-बिल्डिंग गतिविधियाँ

समूह में समस्या समाधान, संवाद कौशल और नेतृत्व अनुभव कराया गया।

4. करियर मार्गदर्शन

भारतीय सेना में अवसर, योग्यता, चयन प्रक्रिया और परीक्षाओं की जानकारी दी गई।

5. समापन एवं अभिप्राय

समापन कार्यक्रम पर संस्था के अध्यक्ष श्रीप्रकाश जी पंडा ने इन बालिकाओं के अनुभव सुने तथा प्रशिक्षकों के सुझाव और भविष्य की दिशा पर चर्चा की।
पूर्व एयरफोर्स अधिकारी श्रीमती शिवानी देशपांडे, (प्रमुख, प्रहार समाज जागृति संस्था) ने सभी को प्रेरक मार्गदर्शन दिया।

आज हमें गर्व है कि हमारी ये 19 बेटियाँ
भविष्य की मजबूत, आत्मनिर्भर और सजग नागरिक बन रही हैं।
यही है निरामय का उद्देश्य—
गाँव–गाँव में आत्मविश्वास की ज्योत जलाना।

❤️🙏 प्रहार संस्था के सभी प्रशिक्षकों, अभिभावकों और हमारी बहादुर बेटियों को हार्दिक प्रणाम।
आप सभी ने मिलकर इस शिविर को यादगार बना दिया।

भव्य आरोग्य तपासणी शिबिर
11/10/2025

भव्य आरोग्य तपासणी शिबिर

आरोग्य भारती नागपूर व निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर, तर्फे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी नॅशनल कॅन्सर इन्स्ट...
31/08/2025

आरोग्य भारती नागपूर व निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर, तर्फे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथील कन्वेंशन सेंटर मध्ये एक महत्त्वाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला.
हा परिसंवादाचे शीर्षक 'इंटिग्रेटिव्ह अन्कॉलॉजी -आयुर्वेद व ऍलोपॅथी' असे होते त्यामध्ये पुण्याच्या वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट च्या आय आर सी टी सी या केंद्राद्वारे तज्ञ डॉक्टर्स ची एक चमू आली होती. त्यांनी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत त्यांच्या संस्थेतर्फे गेल्या 30 वर्षांमध्ये काय कार्य संशोधन उपचार इत्यादी कॅन्सर या विषयांमध्ये आयुर्वेदाद्वारे करण्यात आले आहे व सध्या ही करण्यात येत आहे त्याची विस्ताराने माहिती दिली
या कार्यक्रमासाठी नागपुरातील व विदर्भातील काही जिल्ह्यांच्या ठिकाणाहून विविध पॅथीचे डॉक्टर्स व इतर नागरिक जवळपास 200 जण एकत्र आले होते. या कार्यक्रमांमध्ये वरील संस्थेचे जगमान्य झालेले विविध संशोधनं व भारतातील व अमेरिकेतील पेटंट मिळविलेली आयुर्वेदिक औषधे याविषयी माहिती देण्यात आली.
विशेषतः कॅन्सरमध्ये रेडिओथेरपी व केमोथेरपी याच्यामुळे जे साईड इफेक्ट्स होतात त्याचा पेशंट ना खूप त्रास होतो तो आयुर्वेदिक औषधांनी कसा कमी होईल यावर संशोधन करण्यात आले आहे व त्याचे खूप चांगले परिणाम हे सुद्धा दिसून आलेले आहेत व ते सिद्ध करण्यात आलेले आहेत त्याबद्दल ही माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी रा. स्व. संघाचे पूर्व सरकार्यवाह माननीय श्री भैय्याजी जोशी अध्यक्ष म्हणून लाभले होते तसेच प्रमुख उपस्थित एनसीआयचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शैलेश जोगळेकर व एनसीआयचे वैद्यकीय संचालक मध्य भारतातील प्रख्यात व ज्येष्ठ कर्करोग तज्ञ डॉ. आनंद पाठक हे होते. वाघोलीच्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट या संस्थेतर्फे आलेल्या चमूचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी केले. संस्थेचे सर्व डॉक्टर्स हे एमडी आयुर्वेद व पीएचडी असे उच्चशिक्षित आहेत. हा परिसंवाद म्हणजे एक प्रकारे भारतीय आरोग्य चिंतन आधारित असा उपक्रम सर्व पॅथींच्या चिकित्सकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला.
माननीय भैयाजी जोशी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून आरोग्य क्षेत्रातील भारतीय दृष्टिकोनाचे महत्व अधोरेखित झाले. त्यांनी सांगितले की आजच्या काळात आधुनिक जीवनशैलीतून उद्भवणारे आजार रोखण्यासाठी आपल्या परंपरागत भारतीय आरोग्यशास्त्र, विशेषतः आयुर्वेद, योग व जीवनशैली शास्त्र यांचा अभ्यास व प्रचार-प्रसार आवश्यक आहे.
तसेच या परिसंवादात विविध शाखांमधील डॉक्टर, वैद्यकीय शिक्षक, संशोधक, विविध वैद्यक शाखांचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सहभागी डॉक्टरांनी आपल्या शाखेतील अनुभव मांडले व आरोग्य सेवेत भारतीय चिकित्सा पद्धतींचा कसा परिणामकारक वापर होऊ शकतो याविषयी सखोल चर्चा झाली. अनेकांनी प्रतिबंधात्मक आरोग्य, जीवनशैली सुधारणा, आहारशास्त्र व मानसिक आरोग्य या विषयांवर विचार मांडले.

या कार्यक्रमात भारतीय आरोग्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून समाजात निरोगी जीवनशैली कशी रुजवता येईल, याबद्दल ठोस दिशा देण्यात आली. परिसंवादामुळे सर्व डॉक्टरांना आपापले अनुभव कथन करण्याची संधी मिळाली आणि भावी आरोग्य कार्याची दिशा ठरवण्यास महत्त्वपूर्ण मंच उपलब्ध झाला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. विवेक धोंगडी व डॉ. अंजली देशपांडे यांनी केले व तसेच आरोग्य भारती व निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेची थोडक्यात माहिती देण्यात आली.
प्रास्ताविक डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी केले . नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट चा प्रारंभ व प्रगती श्री शैलेश जोगळेकर यांनी विशद केली. वैद्य आनंद तेंभुर्णीकर ह्यांनी अरिजि विषयात काम करणाऱ्या सगळ्या संघटनांचे अभिनंदन व आभार ह्या कार्यक्रमात मांडले।

एकंदरीतच हा परिसंवाद भारतीय आरोग्य परंपरेच्या पुनरुज्जीवनाचा आणि आधुनिक काळातील गरजेनुसार तिच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक महत्वाचा टप्पा ठरला.

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था गेली 12 वर्षे आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि संस्कार या चार स्तंभांच्या आधारे सातत्याने ग्...
18/08/2025

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था गेली 12 वर्षे आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि संस्कार या चार स्तंभांच्या आधारे सातत्याने ग्रामविकासासाठी कार्यरत आहे. आमचा ठाम विश्वास आहे की कोणतेही मोठे कार्य सक्षम व समर्पित टीमशिवाय शक्य होत नाही.

या वाटचालीला मान्यता मिळाली ती काल सेवासदन शिक्षण संस्था, नागपूर येथे आयोजित "मनशक्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवा" निमित्ताने. या प्रसंगी माननीय नितीनजी गडकरी काही कारणांमुळे उपस्थित नसल्याने, आदरणीय श्रीमती कांचनताई गडकरी यांच्या शुभहस्ते आम्हाला ग्रामीण आरोग्य व मानसिक आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान झालेला "सन्मान सत्कार पुरस्कार" आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

हा पुरस्कार केवळ आमच्या संस्थेचा नसून, तो ग्रामीण तसेच शहरी भागात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, आणि हितचिंतकांना समर्पित आहे.

आमच्या कार्याला ओळख देणाऱ्या सर्व आयोजकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.



आपल्या सर्वांच्या सहकार्याने निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेला उद्या दिनांक १७.८.२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सेवासदन, शिक्...
16/08/2025

आपल्या सर्वांच्या सहकार्याने निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेला उद्या दिनांक १७.८.२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सेवासदन, शिक्षण संस्था,नागपूर येथे माननीय नितीनजी गडकरी( केंद्रीय मंत्री, भारत सरकार) ह्यांच्या हस्ते लोणावळा येथील मनशक्ती संस्थेचा "मनशक्ती सन्मान सत्कार्याचा" पुरस्कार प्राप्त होणार आहे, कृपया आपण सर्वांनी जरूर यावे ही नम्र विनंती.🙏🏻

गावकुसाबाहेर उभारी घेणारी नवी पिढी — "किशोरी व्यक्तिमत्व विकास शिबीर" यशस्वी आयोजन२० गावांतील १००+ किशोरी मुलींनी घेतला ...
08/06/2025

गावकुसाबाहेर उभारी घेणारी नवी पिढी — "किशोरी व्यक्तिमत्व विकास शिबीर" यशस्वी आयोजन

२० गावांतील १००+ किशोरी मुलींनी घेतला स्व:रक्षण, नेतृत्व, कला आणि आरोग्याचा प्रेरणादायी अभ्यास

खापरी, दि. ७-८ मे:
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर यांच्या वतीने उन्हाळी किशोरी व्यक्तिमत्व विकास शिबीर नुकतेच उत्कर्ष विद्या मंदिर, खापरी येथे दोन दिवसीय आयोजित करण्यात आले.
शिबिरात २० गावांमधील सुमारे १०० हून अधिक किशोरी मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर व सचिव डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
पहिल्या सत्रात "किशोरावस्था : भारतीय संस्कृती, प्रकृती व विकृती" या विषयावर डॉ. रवींद्र सर आणि डॉ. उर्मिला मॅडम यांनी व्यक्तिमत्व विकास, आचरण व जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.

दुसरे सत्र डॉ. प्रियांका फाये यांनी "किशोरावस्थेतील शारीरिक आरोग्य व स्वच्छता" या विषयावर घेतले.
त्यानंतर श्री अमित पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली बिडिंग पट्यापासून कानातील दागिने बनविण्याची प्रत्यक्ष कार्यशाळा घेण्यात आली.
श्रीमती विद्या हरिदास यांनी सेंद्रिय शेती व पर्यावरणपूरक जीवनशैली यावर संवाद साधला.

दुपारच्या सत्रात टीम बिल्डिंग व विविध खेळांद्वारे मुलींमध्ये सामूहिक भावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देण्यात आला.
सुनीता मोंडेकर मॅडम यांनी आत्मसंरक्षणाचे विविध तंत्र प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे शिकवले. संस्थेचे
अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी समस्या निवारण आणि धैर्यपूर्वक निर्णय घेण्याच्या कौशल्यांवर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी योग व प्राणायाम सत्राने सुरुवात झाली.
यानंतर डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांनी भावनांचे नियमन या विषयावर चर्चात्मक सत्र घेऊन किशोरी मुलींचे मार्गदर्शन केले.
पूजा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कला-कौशल्य विकास कार्यशाळा पार पडली.

सौ. आदिती देशमुख यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर आणि त्याचे परिणाम यावर उपयुक्त माहिती दिली.
श्रीमती मनीषा संत यांनी "मी आणि कुटुंब" या विषयावर मुलींना सामूहिक विचारांची जाणीव करून दिली.
पोलीस निरीक्षक श्रीमती बावनकर यांनी संकटसमयी आत्मसंरक्षणाचे उपाय आणि सजगतेची गरज पटवून दिली.

शिबिराचा समारोप संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून केला. त्यांनी किशोरी मुलींना ध्येय निश्चिती वर सहज सोपे उदाहरण देऊन पुढील आयुष्यासाठी ध्येय निश्चित करण्याचे आवाहन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

शिबिरादरम्यान सर्व सत्रांना भरघोस प्रतिसाद मिळाला.
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून गावांतील किशोरी मुलींना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि सजग नागरिक बनवण्याच्या दिशेने हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

#किशोरी


किशोर व्यक्तिमत्व विकास शिबीर उत्साहात संपन्ननिरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी किशो...
03/06/2025

किशोर व्यक्तिमत्व विकास शिबीर उत्साहात संपन्न

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी किशोर व्यक्तिमत्व विकास शिबीर उत्साहात पार पडले. हे शिबीर दिनांक 27 व 28 मे 2025 रोजी उत्कर्ष विद्या मंदिर, खापरी येथे संपन्न झाले. या शिबिरात सायकी, जांभळापानी, वारंगा, डोंगरगाव, तुमडी, कच्चीमेट आदी गावांतील अनेक किशोरवयीन मुलांचा सहभाग होता.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर, व सचिव डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदलांबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर अमित सर यांनी लाकडी बिडिंग पट्टी पासून हस्तकला वस्तू – विशेषतः कानातले, मोबाईल स्टँड बनविण्याचे प्रात्यक्षिक घेतले व मुलांकडून प्रत्यक्ष कृती करून घेतली. श्रीप्रकाशजी पंडा यांनी विविध नवनवीन खेळ व कसरतींचे आयोजन करून शिबिरात उत्साह निर्माण केला.
रात्री भोजनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट दाखवण्यात आला.

दुसऱ्या दिवशी, सकाळी 6 वाजता वॉर्म-अप, सूर्यनमस्कार, रनिंग व खेळांच्या स्पर्धांनी दिवसाची सुरुवात झाली. यानंतर प्रशांत सिस्टला यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर सविस्तर माहिती दिली.

डॉ. नीलकंठ देशमुख यांनी आरोग्यसाक्षरता व व्यसनमुक्तीबाबत संवाद साधला. डॉ. सौ. उर्मिला क्षीरसागर यांनी भावनांचे नियमन व भावनांचे प्रकार यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन केले.

यानंतर मिटकॉन कंपनी च्या सौ. सोनाली मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन व उद्योगशिक्षण याबाबत माहिती दिली. त्यानंतर श्रीप्रकाश पंडा यांनी मुलांना PPT च्या माध्यमातून करियर मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मा. हरीशजी सायरे यांच्या हस्ते झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये व शैक्षणिक मार्गदर्शन केले.

या दोन दिवसांच्या शिबिरात मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासास चालना देणारे अनेक उपक्रम राबवण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन उत्तम पद्धतीने पार पाडल्याबद्दल संस्थे तर्फे सर्वांचे आभार.

भूमी सूपोषन आणि संरक्षण अभियान.
02/04/2025

भूमी सूपोषन आणि संरक्षण अभियान.




निरामय संस्थेचे भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान नव वर्षापासून सुरू.प्रस्तावना:वेद काळापासून भूमीला आपण आई मानले आहे. या क...
31/03/2025

निरामय संस्थेचे भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान नव वर्षापासून सुरू.
प्रस्तावना:
वेद काळापासून भूमीला आपण आई मानले आहे. या काळ्या आईवर हजारो वर्षांपासून संपूर्ण सृष्टीचा समतोल साधून अमृतासारखे अन्न देणारा निसर्ग पूरक शेती आपल्या देशात होत आली. परंतु हरित क्रांति नंतर रासायनीक खते, किटकनाशके, तणनाशके यांच्या अतिवापरांमुळे जमिनीचा आत्मा असलेली जिवाणू सृष्टि संपत चालली आहे. भारतातील एकूण शेतजमिनीच्या सुमारे 30 टक्के जमीन नापीक झाली आहे. जमिनीला केवळ पैसे कमविण्याचे साधन मानण्याच्या प्रवृत्तीमुळे आपल्या काळ्या आईचे शोषण होत आहे. निकटच्या भविष्यातील हे संकट ओळखून आजच सर्वानी जागे होण्याची गरज आहे.
उद्देश:
यादृष्टिनी सर्व शेतकऱ्यांना भूमातेचे महत्व समजावे व तिच्या पोषणासाठी आणि संरक्षणासाठी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी तिचे प्रथम पूजन करावे या उद्देशाने निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेने भूमी सुपोषण कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रमुख कार्यक्रम:
दि. 30/3/2025, रविवार चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सायकी शेतामध्ये भूमी सुपोषण कार्यक्रम साजरा करण्यात आला. सायकी, फुकेश्वर व डव्हा या तीन गावातील विवाहित जोडप्यांच्या हस्ते भूमातेची मंत्रोपचारामध्ये शास्त्रीय पद्धतीने पूजा करण्यात आली.
तसेच शेतातील गाय व वासरांची पूजा केली. संस्थेच्या सचिव डॉ. उर्मिला क्षीरसगर व उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर व अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी देखील भूमातेची व गाय-वासराची स्वहस्ते पूजा केली. यासाठी तीनही गावातील मुले-मुली, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष, श्रीप्रकाश पंडा यांनी शेतकारीं बांधवांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खत, गोकृपा अमृत, जिवामृत, दशपर्णी अर्क गांडूळखत इ. आपल्याच शेतात शास्त्रीय पद्धतीने तयार करून त्याचा शेतीत योग्य प्रमाणात वापर केल्यास आपण आपली जमीन रासायनिक खतांच्या दुष्परिणामापासून सुरक्षित राहून जमिनीचा कस वाढू शकतो हे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी यानंतर आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खत वापरून काळ्या आईचे संरक्षण करावे असे त्यांनी आवाहन केले. यानंतर सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------

गो आधारित शेची ( एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा) निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेने गो आधारित शेती प्रशिक्षण चे आयोजन दिनां...
29/03/2025

गो आधारित शेची
( एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा)

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेने गो आधारित शेती प्रशिक्षण चे आयोजन दिनांक 2 मार्च रविवार सकाळी 11 वाजता आपल्या सायकी केंद्र उमरेड येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमात पंचवीस गावातून निवळक शेतकऱ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यात महिल, पुरुषांसोबत कृषीकुंभ फार्मर प्रोडूसर कंपनीचे पदाधिकारी पण आले होते.या कार्यक्रमांमध्ये विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिल्लीहून आलेले ग्राम संकुल स्वावलंबन योजनेचे राष्ट्रीय समन्वयक श्री.अलोकजी गुप्ता यांनी सर्व शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांनी शेतकऱ्यांना विचारले की “तुमच्या गावात कोणते गृह उद्योग सुरू आहे व गावातील लोक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता कोणत्या वस्तू बाहेरून गावात आणतात आणि त्यापैकी किती वस्तू गावात बनतात.” असे विचारपूस झाल्यानंतर अधिकाधिक वस्तू आपल्या गावातच बनल्या पाहिजेत याचा महत्त्व सांगून त्यानी शेतकरी बंधूंना शेती एक व्यवसाय आहे या वर मार्गदर्शन केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते माननीय श्री. सुनीलजी मानसिंका (सदस्य जीवजंतू कल्याण बोर्ड, भारत सरकार व देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्र चे प्रमुख) त्यांनी आलेल्या शेतकऱ्यांना गाय मातेबद्दल विविध महत्त्वाची माहिती दिली. सोबतच त्यांनी सांगितले की गाय मुळे आपली सृष्टी सुरू आहे गायमातेमुळे आपला देश आधी विश्व गुरु होता. देशाची अर्थव्यवस्था, कृषी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था आणि अध्यात्मिक व्यवस्था गाय आधारित होती त्यामुळे आपण गायला माता म्हटलेलं आहे. गाय मातेचे अनन्यसाधारण असे महत्त्व त्यांनी सांगितले. गाय मातेत 33 कोटी देवी देवतांचा निवास आहे, गाईचं दूध अमृत आहे, म्हणून त्याला संपूर्ण आहार असे म्हटले आहे. गाईचे गोमूत्र विविध औषधे गुणांनी परिपूर्ण आहे. गायीच्या गोमुत्राचे प्रासन केल्याने विविध प्रकारचे आजार बरे होतात व मनुष्य निरोगी राहतो, गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने आपला बीपी नॉर्मल मध्ये राहते असे त्याने विविध पुरावे व वैज्ञानिक शोध शेतकऱ्यांसमोर सादर केले.

गो आधारित वस्तू जास्तीत जास्त लोकांनी वापरावे त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहील आणि गोमाता कत्तलखान्यात जाणार नाही असे पण त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याने गो आधारित शेती केली पाहिजे, देशी गाय च्या गोबर गोमूत्रा पासून उत्तम शेती होते. विविध शेतकऱ्यांचे गो आधारित सेंद्रिय शेतीचे अनुभव सांगून त्यांनी आलेल्या शेतकऱ्यांना नीट प्रशिक्षण घेऊन सेंद्रिय सेती करण्याचे आवाहन सुध्दा केले.

गो आधारित सेंद्रिय शेतीचे नीट प्रशिक्षण घेऊन शेती केली तर जमीन अधिक होत सुपीक होते, जमिनीत पाण्याची लेव्हल वाढेल, हवा शुद्ध राहील व लोकांसाठी विषमुक्त अन्न मिळेल. आज रासायनिक खतामुळे हवा, पाणी, जमीन, आणि अन्न हे दूषित झालेले आहे. त्या सजीव सृष्टी वर त्याचे भयानक परिणाम दिसतात आहे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या लोकांसमोर आलेल्या आहेत लोक विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त होत चाललेले आहे.

जर आपल्याला आपला देश सुदृढ बनवायचा असेल आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा अधिक सशक्त बनवायचा असेल तर गोवाधारित शेती करणे आवश्यक आहे. गोआधारित आणि गो उत्पादन चा वापर करणे आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला गायची रोज सेवा करायची आहे.

त्यानंतर रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनच्या अध्यक्षा जयश्री छाब्राणी मॅडम ने पण आलेल्या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले व आमच्या सारख्या संस्था तुमच्या पाठीशी आहेत असा आश्वासन देत शेतकऱ्यांना गोआधारित शेतीचे कडे जावे त्याचे प्रशिक्षण घेऊन आपण चांगली शेती करावी असे लोकांना आव्हान केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी शेतकऱ्यांना निरामय केंद्रात सुरू असलेले शेतीचे विविध प्रयोग सांगितले. गो आधारित शेती कशी करावी त्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. गांडूळ खताचे प्रकल्प दाखऊन, गांडूळ खत कसे तयार करावे? त्याची योग्य पद्धत आणि शास्त्र काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली व मुक्त विचरण गोठा पद्धतीचे काय फायदे आहेत आणि गोपाल भाई सुतरिया यांनी तयार केलेले गोकृपा अमृत चे कल्चर कसे तयार करावे याचे पण त्यांनी प्रशिक्षण दिले आणि

आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक किलो गांडूळ खत व एक लिटर गोकृपा अमृत देऊन आपल्या शेतामध्ये पण गो आधारित शेतीचे प्रयोग सुरू करावे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र क्षीररसागर आणि सचिव डॉक्टर उर्मिलाताई क्षीरसागर पण या कार्यक्रमात उपस्थित होत्या. सोबतच रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे पदाधिकारी श्री जुगल किशोर अग्रवाल, जनकल्याणकारी समिती चे सचिव श्री दीपक जी देशपांडे, नेत्रबन निसर्ग विज्ञान संस्थेचे अध्यक्ष श्री विजय जी घुघे, सामाजिक कार्यकर्ता श्री मुन्ना महाजन इत्यादी लोक उपस्थित होते. सर्व ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

सर्व शेतकऱ्यांना निमंत्रण
27/02/2025

सर्व शेतकऱ्यांना निमंत्रण

Address

Mate Square
Nagpur
440010.

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram