Dr Kalyankar's Ayurveda Clinic

Dr Kalyankar's Ayurveda Clinic ✅"We are expertise in Cancer Treatment with Ayurvedic Treatment since year 2011.

NATIONAL AWARD WINNER FROM CENTRAL AYURVEDA RESEARCH INSTITUTE FOR CANCER, MINISTRY OF AYUSH, GOVT OF INDIA.
✅"Ayurvedic Immunotherapy is a key for cancer treatment."

"दोन्ही हातांनी त्या शिवानंद स्वामीची दाढी धरून ती चांगली खसखसून उपटावी एवढा राग मला आला होता...!!!"- स्वामी श्री शिवानं...
05/05/2025

"दोन्ही हातांनी त्या शिवानंद स्वामीची दाढी धरून ती चांगली खसखसून उपटावी एवढा राग मला आला होता...!!!"

- स्वामी श्री शिवानंद -

१९३८ साली 'ज्वाला' हा मराठी चित्रपट प्रचंड तोट्यात गेल्यामुळे प्रसिद्ध नट आणि निर्माते बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायक हे बंधू मोठ्या संकटात सापडले होते. अशा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे दुसरा एखादा हिट चित्रपट काढणे हाच असल्यामुळे ते तसं एखादं कथानक देण्याकरिता आचार्य अत्र्यांच्या मागे लागले होते. त्याच दरम्यान अत्रे यांच्या वाचनात 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हेच मरण !' हे स्वामी शिवानंद यांचं पुस्तक आलं होतं. त्याविषयी अत्रे लिहितात, "त्या पुस्तकातले चमत्कारिक विचार वाचून माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. "दोन्ही हातांनी त्या शिवानंद स्वामीची दाढी धरून ती चांगली खसखसून उपटावी एवढा राग मला आला होता!"
जेव्हा बाबुराव आणि विनायक अत्र्यांच्या घरी तगादा लावून बसले होते, तेव्हा अत्र्यांच्या डोक्यात त्या पुस्तकाचेच विचार घोळत होते. तसे ते घोळत असतानाच ते शौचालयात गेले आणि तिथे बसून विचार करता करता त्यांना 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कल्पना सुचली. त्यानंतर घडला तो इतिहास इथे सांगण्याची आवश्यकता नाही. ब्रह्मचारी चित्रपट तुफान यशस्वी ठरला आणि पेंढारकर बंधूंचं उखळ पांढरं झालं !

हे आठवण्याचं कारण म्हणजे त्यावेळी या घटनेला कारणीभूत असलेले ४२ वर्षांचे स्वामी शिवानंद काल दि. ४ मे २०२५ रोजी वयाच्या १२९ व्या वर्षी वाराणसीमधील आपल्या आश्रमात मरण पावले. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. बंगालमधील सिलहेट (सध्या बांगलादेशात) इथे गोस्वामी नामक आध्यात्मिक ब्राह्मण कुटुंबात १८९६ साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांचे आईवडील वारल्यावर स्वामी ओंकारानंद यांनी त्यांचा सांभाळ केला. आयुष्यभर त्यांनी 'व्याधीरहित मानवी जीवन' या विषयाला वाहून घेतलं होतं. त्यांचं सर्व लेखन आणि व्याख्याने त्याच विषयावर आहेत. १९२५ पासून पुढली जवळपास ३४ वर्षं ते इंग्लंडमध्ये होते. त्या काळात जगभर त्यांचे अनुयायी पसरले. त्यानंतर भारतात येऊन वाराणसीमधील कबीरनगर येथील आश्रमात ते स्थायिक झाले. "आम्हाला कोणतीही आर्थिक देणगी नको आहे. देणगी द्यायची असेल, तर ती शारीरिक, मानसिक आणि आत्मिक योगदानाच्या स्वरूपात द्यावी!" असं आवाहन ठळक अक्षरांत त्यांच्या वेबसाईटवर केलं आहे. यावरून त्यांची निस्पृह वृत्ती दिसते. मध्यंतरी पु. ना. गाडगीळ यांच्या एका कार्यक्रमात शिवानंद आले होते, तेव्हा ९७ वर्षांच्या दाजीकाका गाडगीळांनी "मला एरवी आशीर्वाद देण्याचं काम करावं लागतं. पण आज मी ज्याच्या पाया पडू शकेन असा माणूस इथे उपस्थित आहे !" असं म्हणून शिवानंद यांना साष्टांग नमस्कार घातला होता.

अशा या स्वामी शिवानंद यांचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान काँग्रेस सरकारने कधी केला नाही. मात्र २०२२ साली मोदी सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची थोडीफार पोच दिली होती. काल त्यांच्या मृत्यूनंतर मोदी आणि योगी यांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली वाहत असताना मी एवढंच म्हणेन, की त्यांच्या विचारांची खिल्ली उडवणाऱ्या आचार्य अत्र्यांसारख्या अनेकांना पुरून उरून त्यांनी स्वतः व्याधीरहित दीर्घायुषी जीवन जगून दाखवलं आणि स्वतःचे विचार सिद्ध केले आहेत. असा क्रियाशील महात्मा दुर्मीळच !

*- हर्षद सरपोतदार*

"Seminar On Oncology"Organised by Mahanagar Ayurveda Seva Sangh and Vishva Ayurveda Parishad.Special Thanks to Dr Vinaya...
23/03/2025

"Seminar On Oncology"
Organised by Mahanagar Ayurveda Seva Sangh and Vishva Ayurveda Parishad.

Special Thanks to Dr Vinayak Tayade Sir for giving me the opportunity to express my thoughts on Cancer and Ayurvedic Treatment.

I am delighted to be invited to speak at an Ayurvedic Seminar on the Evidence-Based Case Series Study on Brain Cancer with Ayurvedic Intervention.

This is a significant opportunity to showcase how Ayurveda is transforming cancer care with its holistic approach.

Through clinical experience and research, I have witnessed how Ayurvedic treatments can contribute to shrimant he humor size, improves quality of life, symptom relief, and even remarkable recovery in physical and psychological state of cancer patients.

At this seminar, presented real-life case studies demonstrating the scientific efficacy of Ayurveda in managing brain cancer and reducing the tumor size.

It is time to bridge the gap between traditional wisdom and western medicine.
Ayurveda holds immense potential, and we must continue exploring its role in oncology for the benefit of community.

Looking forward to sharing, learning, and advocating for a natural, holistic, and effective approach to cancer care.


DrKiran Kalyankar

⭕ *भारत देश कॅन्सरच्या विळख्यात*▪️ सामान्य माणसाने कॅन्सर हे नाव ऐकले, घेतले, किंवा वाचले तरी त्याला धडकी भरवते, कारणच त...
12/02/2025

⭕ *भारत देश कॅन्सरच्या विळख्यात*

▪️ सामान्य माणसाने कॅन्सर हे नाव ऐकले, घेतले, किंवा वाचले तरी त्याला धडकी भरवते, कारणच तसे आहे, कॅन्सर हा सामान्य रोग नाही कारण त्यावरचे सगळे उपचार व उपचार प्रणाली अजूनही परिपूर्ण नाही असे म्हटले तरी वावगे ठरत नाही, शिवाय आपल्या वैदकीय क्षेत्रातील मंडळींना त्या रुग्णाचे किती दिवस उरले आहेत हे सांगण्याची घाई जडली आहे, त्यामुळे तो रुग्ण व त्याचे नातेवाईक त्याच दिवशी अर्धमेले होतात व रुग्णाच्या बरा होण्याच्या आशा सोडतात, मुळात जर डॉक्टरांनीच आधी हार मानली असेल तर रुग्ण कुठून जिंकणार आणि इथेच कॅन्सर आपली दहशत निर्माण करतो आणि विजयाचा पाया रोवतो.

▪️आज भारतात जसा हृदयविकार दिवसेंदिवस वाढत आहे, अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत तसे आता कॅन्सरचे झाले आहे, कोरोना किंवा त्या सारख्या दुसऱ्या महामारी पेक्षा घातक रोग कॅन्सर आहे, पण आपल्या समाजाची शोकांतिका अशी आहे की वाढलेल्या कॅन्सर चा धोका कोणीच गांभीर्याने घेत नाही आहे.

▪️आपले वजन अचानक का घटले, आपल्या शरीरात का वेदना होत आहेत, आपल्या शरीरावर कसली गाठ आहे, कसले लाल चट्टे उठले आहेत, आपल्या शरीरातील लाल पेशी कमी होवून प्लेटलेट्स व सफेद पेशी अप्रमाणात का वाढल्या आहेत याचा जास्त विचार होताना दिसत नाही, कारण बेफिकिरी, आपल्याला कॅन्सर होवू शकत नाही किंवा आपल्या फॅमिली डॉक्टर यांना आपल्या आजाराचे तेवढे गांभीर्य वाटत नसते म्हणून आणि इथेच कॅन्सरला वाढण्याची संधी दिली जाते, कारण कॅन्सर हा सायलेंट किलर आहे तो आपल्या शरीरात कधी आला व कधी वाढला व कधी पसरला हे कळत नाही व जेव्हा कळते तेव्हा खूपच उशीर झालेला असतो, पण तरी सुद्धा आपण योग्य त्या उपचार प्रणाली कडे धावत नाही उलट सुलट उपचार करत बसतो आणि जीव गमावून बसतो, बर या मध्ये नुसता जीव जात नाही, तर उपचारासाठी प्रचंड पैसा जातो, कुटुंबाचे मानसिक स्वास्थ जाते, सगळी सुख चैन निघून जाते.

▪️मुळातच कॅन्सर एवढा का वाढला याचे कोडे सरकार सोडवताना दिसत नाही, याची प्रमुख कारणे माहीत असून सुध्दा आपण दुर्लक्ष करत असतो, उदाहरणं वाढलेले प्रदूषण, मिलावट पदार्थ, खराब किंवा जास्त जळलेले तेल, शिळ अन्न, फ्रोजन फूड, फास्ट फूड, हानिकारक रंग, केमिकल दूषित पाणी, त्याच पाण्यात तयार झालेले मासे, भाज्या, इंजेक्शन देवून कृत्रिमरित्या वाढविलेले बकरे, कोंबड्या, त्यांची अंडी, हानिकारक सॉफ्ट ड्रिंक, अती प्रमाणात कॅफ्फेन असलेले एनर्जी ड्रिंक, अती चहा, अती कॉफी, अती दारू, गुटखा, तंबाखूजन्य इतर पदार्थ, रासायनिक खते व त्यांच्या पासुन निर्माण झालेले धान्य ज्यात आर्सेनिक सारखे घातक विषद्रव्य आणि सर्वात मुख्य म्हणजे वाढत्या मोबाईल आणि कॅमेरा व त्याच्या हाई पॉवर लाइट्स च्या वापरा मुळे वाढलेले किरणोत्सर्ग ( रेडिएशन )

▪️बर सरकार वर सगळेच सोडून चालणार नाही, मान्य सरकारने सुध्दा या गोष्टींमध्ये लक्ष घातले पाहिजे व जे समाजासाठी घातक ठरत आहे त्यावर नियंत्रण अथवा बंदी आणली पाहिजे, पण आपली म्हणजेच समाजाची सुध्दा खूप मोठी जिम्मेदारी आहे, आपण पण आपल्या स्वतःवर व आपल्या कुटुंबावर या सगळ्या गोष्टी टाळण्याची किंवा नियंत्रित करण्यासाठी पत्थे लादली पाहिजेत, जेणे करून आपला धोका कमी होईल, शरीर सुदृढ राहील, आपली शारीरिक प्रतिकारशक्ती वाढेल व आपण या घातक आजारांना रोखू.

▪️ बऱ्याच oncologist म्हणजेच कॅन्सर वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून असे कळले आहे की जवळ जवळ ८८ प्रकारचे कॅन्सर असतात, त्यात रक्ताचा, पोटाचा ( म्हणजे नुसते पोट नाही तर पोटातील सगळ्या अवयवांचा ), स्तनाचा, त्वचेचा, हाडांचा, मेंदूचा कॅन्सर खूपच घातक असतो कारण यावर उपचार जरी केले तरी त्याला यश मिळेल याची खात्री देता येत नसते.

▪️कॅन्सर म्हणजे मानवांच्या अवयवांमध्ये निर्माण झालेली त्याच्याच पेशींची अनियंत्रित वाढ, या पेशी अनियंत्रित वाढल्या मुळे ते अवयव निकामी होते व पर्यायाने माणूस मृत्यूच्या दाढेत लोटला जातो, याच पेशींना कॅन्सर पेशी बोलतात.

▪️सध्याची जी उपचार प्रणाली आहे ती तीन प्रकारे कार्य करते, पाहिले कार्य जर तो बाधित निकामी अवयव शस्त्रक्रिया करून काढता आला तर नक्कीच काढला जातो व उर्वरित भागात रेडिएशन ( किरणोत्सर्गी उपचार ) दिल जाते जेणेकरून काही उरल्या सुरल्या पेशी नष्ट केल्या जातात. दुसरी उपचार पद्धती ही केमोथेरपी नावाने प्रसिद्ध आहे, यात एक ठराविक औषध मानवाच्या शरीरात सोडले जाते व त्या पेशींना नष्ट करते, पण या उपचार प्रणालीचे खूप दुष्परिणाम पाहायला मिळतात, जसे की केस गळणे, वजन घटणे, जेवणाची भूक संपणे, शरीर कृश होणे वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा सामान्य पणॆ हीच उपचार प्रणाली वापरली जाते कारण अजून या पेक्षा प्रगत उपचार प्रणाली अमलात आल्या नाही आहेत. तिसरी प्रणाली डायरेक्ट रेडिएशन जसे मगाशी सांगितले की रेडिएशन म्हणजे बाधित अवयावर थेट किरणोत्सर्ग वापरणे आणि त्या पेशी नष्ट करणे, पण या सगळ्या उपचार प्रणाली बघितल्या तर एक लक्षात येते की त्या बाधित अवयव आणि त्या अनियंत्रित पेशींसोबत शरीरातील चांगल्या पेशी सुध्दा मारते.

▪️या सगळ्यामुळे होते काय की माणूस आपली शरीराची प्रतिकारशक्ती गमावून बसतो व कृश होतो, व हे सगळे बघून बघून तो मनातून खचतो, शिवाय या उपचार प्रणाली खूपच वेदनादायी असतात यामुळे माणूस आपली जगण्याची उमेद घालवतो आणि शेवटी शेवटी मृत्यू मागतो किंवा स्वतःच तो कवटाळतो आणि कॅन्सर मुळे जे मृत्यू प्रमाण वाढले आहे ते या मुख्य कारणामुळेच, यातून पण जे धीराने त्या आजाराशी लढतात व मनात तीव्र इच्छा आणि विश्वास बाळगतात ते ह्या आजारावर मात करून परत एक सुदृढ आयुष जगतात.

▪️पण यांचा टक्का खुच कमी आहे, कारण बहुतेक कॅन्सर बाधित आपली जगण्याची आशा या रोगाचे निदान झाल्याझाल्या सोडतात आणि हेच आपल्या समाजाचे अपयश आहे, हेच आपल्या वैदकीय मंडळींचे अपयश आहे, कारण जर या मंडळींनी त्यांना आधार दिला, धीर दिला व या आजारावर मात करण्याची शाश्वती दिली तर तो रुग्ण कधी हरणार नाही, सगळ्या वेदना पण सहन करेल व परत व्यवस्थीत आहार, शरीराची प्रतिकारशक्ती, मानसिक दृढता मिळवून या आजाराला हरवून टाकेल.

▪️आजच्या या लेखामुळे १० जणांना जरी फायदा झाला त्यांना मी जागे केले असे मानले तर या लेखाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असे मानेनं व प्रयागराजच्या कुंभात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त झाले असे मी दृढ मनाने मानेनं...तुम्ही सुध्दा या लेखाला दुसऱ्यांपर्यंत पोचवून हे मानू शकता व स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि इतरांना मदत करू शकता शिवाय सरकारला सुध्दा या गंभीर विषयावर जाग आणू शकता.

जय हिंद !!
श्री सचिनसिंह

*भोगी ,संक्रांत आणि आरोग्य*🌎🔥🧥🏋🏻‍♂️🎋आज भोगी आणि उद्या मकरसंक्रांत. सूर्याचा मकरराशीत प्रवेश होतो , हा उत्तरायणाचा सोहळा ...
13/01/2025

*भोगी ,संक्रांत आणि आरोग्य*
🌎🔥🧥🏋🏻‍♂️🎋

आज भोगी आणि उद्या मकरसंक्रांत.
सूर्याचा मकरराशीत प्रवेश होतो , हा उत्तरायणाचा सोहळा म्हणजे
*मकरसंक्रांत*, भारतात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

भारतीय संस्कृतीत *उत्सव* म्हणजे नुसताच जल्लोष, धागडधिंगा करणे अपेक्षित नाही .
*सणाच्या निमित्ताने निसर्गाशी नाते जोडण्याचा, अधिक दृढ करण्याचा व आरोग्यासाठी उपकारक अशा गोष्टी , समाजात उत्सवपूर्वक रुजवण्याचा प्रयत्न*
*हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य!*

हेमंत ऋतूत हवेमध्ये गारठा असतो .शीत गुणामुळे शरीरातही *थंडपणा आणि कोरडेपणा* वाढलेला असतो . यांना संतुलित करण्यासाठी , आहारामध्ये *स्निग्ध व उष्ण गुणांचे* पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक असते .यासाठी अतिशय उपयुक्त अशा दोन गोष्टी म्हणजे, *तीळ आणि गूळ*.

*गंमत अशी आहे की निसर्गसुद्धा ज्या काळात जे वापरणे ,आवश्यक असते त्याची आधीच निर्मिती आपल्यासाठी करून ठेवतो*.
शरद ऋतूमध्ये फुलावर असणारा तीळ , हा हेमंत ऋतुपर्यंत खाण्यासाठी चांगला तयार झालेला असतो.

तीळ हे गुणांनी स्निग्ध असतात.
खरं म्हणजे *तेल* या शब्दाची व्युत्पत्ति *तिळापासून जे बनते ते तेल* अशी आहे.
*तिळातील तेलामुळे शरीरामध्ये स्निग्धपणा येतो , त्वचा मुलायम होते, शरीराचं पोषण होतं . बऱ्याचजणांना कमी पडणारे कॅल्शिअम तिळामधून भरपूर प्रमाणात मिळते* .

मग म्हणून मग तीळ बाराही महिने खायचे का ?
तर नाही, फक्त याचं ऋतूमध्ये खायचे आहेत. तेही नुसतेच खाल्ले जातं नाहीत, तर त्याच्याबरोबर शेंगदाणे, खोबरे असे इतर स्निग्ध जिन्नस व गूळ घालून - *तिळाचे लाडू ,तिळाच्या वड्या ,गुळाची पोळी , चिकी ,गजक,रेवडी* अशी वेगवेगळ्या प्रदेशानुसार, वेगवेगळ्या प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवली जातात .
असा हा *तिळगुळ सगळ्यांना वाटून आनंदोत्सव करायचा. त्यामुळे केवळ शरीरातला नाही, तर नात्यामधला स्नेह सुद्धा वाढतो*.

या तिळाबरोबर *थंडीत अतिशय उपयोगी ,शरीराला ताकद देणाऱ्या , लोहतत्व वाढवणाऱ्या गुळाचा जेव्हा संगम होतो*, तेव्हा *अधिकस्य अधिकम् फलम्*, या न्यायाने त्याचा स्वाद व उपयोगिता अधिक वाढते.
तुळशीच्या लग्नानंतर उसाची गुऱ्हाळे चालू होतात. ताजा
गूळ तयार होत असतो .या काळात रोजच्या आहारात तुपासह गुळाचा अवश्य समावेश असावा .

आहारात इतर तेलांच्याऐवजी, याकाळात *तिळाचे तेल* वापरायला हरकत नाही .

भरपूर ताजा चारा उपलब्ध असल्यामुळे , हेमंतात गाईच्या दुधात स्निग्धांश भरपूर असतो . त्यामुळे *गायीचे दूध, गाईचे तूप* हे पदार्थ आहारामध्ये भरपूर प्रमाणात वापरण्यास हरकत नाही .

पण हो, *या सर्व पौष्टिक आहारा बरोबर , भरपूर व्यायाम मात्र करायचा आहे, नाहीतर हे सर्व खाऊन अजीर्ण होण्याची शक्यता जास्त !*

वांगी ,फ्लॉवर, मटार,कोबी,पावटा,
गाजर ,नवलकोल,
हिरवे घाटे अशा भाज्या , *बटाटा, रताळे, सुरण* यासारखे कंद हे *अतिशय स्वादिष्ट ,पण पचायला जड असतात . या दिवसात मात्र, या सर्व भाज्या चवीला उत्तम असतात आणि सहज पचतातही* .

या भाज्या वापरून, त्याला भरपूर तेल, मसाले यांची जोड देऊन , *भोगीची मसालेदार भाजी,गुजराथी पद्धतीचा उंधियो ,शेतावरील पोपटी ,हुरडा पार्ट्या* असे विविध कार्यक्रम या काळात मोठया उत्साहाने केले जातात .
*त्यामुळे तन-मन, दोघांनाही नवी ऊर्जा मिळते हे नक्कीचं !*

हेमंत ऋतूत दिवस लहान व रात्र मोठी असते, त्यामुळे *सकाळी लवकर कडकडीत भूक लागते. त्यावेळी जर काही खाल्ले नाही, तर पाचकअग्नी , शरीरधातूनाच पचवून टाकतो आणि शरीर क्षीण होऊ लागते* . म्हणून *सकाळी उठल्यावर लगेच क्षुधाशांती करावी असे आयुर्वेदाने सांगितले आहे*.

म्हणून हेमंत ऋतूत सकाळी लवकर उठून व्यायाम ,अभ्यंग, स्नान इत्यादी आटपून लवकर पौष्टिक नाश्ता करावा.
आजही *धुंधुरमास* ही अतिशय सुंदर ,आरोग्यदायी प्रथा खेड्यातून पाळली जाते .

थंडीचा कडाका असल्याने गुणाने *उष्ण असलेल्या बाजरीची भाकरी, भरपूर तूप किंवा लोणी* *लावून ,त्याबरोबर तीळ घातलेली मुगाची खिचडी तसेच वांगी,गाजर,पावटा,हरभरे यांची चमचमीत भाजी* असा भोगीचा खास बेत असतो ,आज बहुतेकांनी या बेताचा आस्वाद घेतला असेलचं!

एरवी पचायला जड असणारा *सुका मेवा* सध्या जरुर खावा .सध्याच्या
घाई गडबडीच्या जीवनात , साग्रसंगीत नाश्ता करण्यास वेळ नसल्यास *खारीक, खोबरं, बदाम, पिस्ते ,काजू ,खसखस* हे सगळे पदार्थ घालून केलेले *साजूक तुपातले आणि गुळाच्या पाकात मुरवलेले डिंकाचे लाडू ,मेथीचे लाडू* सवडीच्या वेळेस बनवून ठेवावे.

रोज सकाळी एक *डिंकाचा वा मेथीचा लाडू एक ग्लास दूध* असा इन्स्टंट नाश्ताही
शरीराला उत्तम बल देणारा ठरतो.

एकंदरीत या दिवसांमध्ये खाण्यापिण्याची रेलचेल असते आणि पचवण्याची ताकद असते. तरीसुद्धा अपचनाच्या बारीक-सारीक तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सर्वात उत्तम औषध म्हणजे *आले*.
आल्याच्या वड्या, आलेपाक किंवा भाज्यांमध्ये मसाला म्हणून आल्याचा भरपूर वापर करावा. *आल्याचा वाटून रस काढून ,त्यात लिंबू आणि सैंधव मीठ मिसळून, काचेच्या बाटलीत भरून ठेवले की ,रुचकर पाचक तयार !* पोटाच्या बारीक-सारीक तक्रारीसाठी केव्हाही चमचाभर पाचक घेतले, की काम फत्ते !

*आल्यापासून बनवलेली सुंठ मात्र गुणांनी रुक्ष आणि तीक्ष्ण असल्यामुळे या दिवसात फारशी वापरू नये*.

हेमंत ऋतूत येणाऱ्या *भोगी आणि संक्रांत* या सणांच्या निमित्ताने , या सर्व खाद्य पदार्थांची आठवण आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला करून दिली आहे , ती अत्यंत आरोग्यदायी आहे व आनंददायी सुद्धा ....

वैद्य उर्मिला पिटकर
Everyone

Scientific research Paper published was coverage by various reputed news papers.🌿 Revolutionizing Cancer Care with Evide...
09/01/2025

Scientific research Paper published was coverage by various reputed news papers.

🌿 Revolutionizing Cancer Care with Evidence based Ayurveda 🌿

At 10th World Ayurveda Congress
We are proud to share a milestone in our journey to bring hope and healing to cancer patients worldwide. Presented a research paper on "Efficacy of Ayurvedic Treatment in reducing Brain Tumour Size: A Case Series Study" at the prestigious International World Ayurveda Conference.

This study sheds light on the transformative potential of Ayurveda in treating complex conditions like brain cancer.
Our evidence-based findings highlight how personalized Ayurvedic therapies can reduce tumor size, Enhances recovery along with Survivorship and Improves patients' Quality of life.

At Dr. Kalyankar’s Ayurvedic Cancer Clinic & Swaayu Cancer Care Centre, we remain committed to blending ancient wisdom with modern research to provide holistic cancer care.

💡 Let’s explore the power of Ayurveda to transform lives! If you or your loved ones are seeking Ayurvedic solutions for cancer care, connect with us today.

📞 Contact us: (+91) 8898630831

Together, let's make healing a holistic journey! 🌱

🌿 Revolutionizing Cancer Care with Evidence based Ayurveda 🌿At 10th World Ayurveda CongressWe are proud to share a miles...
14/12/2024

🌿 Revolutionizing Cancer Care with Evidence based Ayurveda 🌿

At 10th World Ayurveda Congress
We are proud to share a milestone in our journey to bring hope and healing to cancer patients worldwide. Presented a research paper on "Efficacy of Ayurvedic Treatment in reducing Brain Tumour Size: A Case Series Study" at the prestigious International World Ayurveda Conference.

This study sheds light on the transformative potential of Ayurveda in treating complex conditions like brain cancer.
Our evidence-based findings highlight how personalized Ayurvedic therapies can reduce tumor size, Enhances recovery along with Survivorship and Improves patients' Quality of life.

At Dr. Kalyankar’s Ayurvedic Cancer Clinic & Swaayu Cancer Care Centre, we remain committed to blending ancient wisdom with modern research to provide holistic cancer care.

💡 Let’s explore the power of Ayurveda to transform lives! If you or your loved ones are seeking Ayurvedic solutions for cancer care, connect with us today.

📞 Contact us: (+91) 8898630831

Together, let's make healing a holistic journey! 🌱

🌱🌿Welcoming Our Patient from Hungary...!!!🌿🌱At Dr. Kalyankar's Ayurvedic Cancer Clinic & Swaayu Cancer Care Centre, we’r...
05/11/2024

🌱🌿Welcoming Our Patient from Hungary...!!!🌿🌱

At Dr. Kalyankar's Ayurvedic Cancer Clinic & Swaayu Cancer Care Centre, we’re honored to welcome our newest patient from Hungary, who has journeyed to India to receive authentic Ayurvedic treatment for cancer.

With each patient, we witness the healing power of Ayurveda, a tradition that transcends borders to offer hope and relief. Our dedicated team is here to provide personalized, holistic care, focused on improving quality of life and supporting recovery.

Thank you for placing your trust in us, and we look forward to supporting you on your healing journey.

✅Ayurveda_for_Better_Health
✅Ayurvedic_Immunotherapy_Cancer
✅Improves_Quality_of_Life
✅Extended_Survivorship

🌍 From South Africa to India - A Journey of Healing 🌍We’re thrilled to share the inspiring recovery story of a patient w...
28/10/2024

🌍 From South Africa to India - A Journey of Healing 🌍

We’re thrilled to share the inspiring recovery story of a patient who traveled all the way from South Africa to seek Ayurvedic care. With personalized treatments rooted in ancient wisdom, we’ve been able to witness a remarkable turnaround in their health.

At Dr. Kalyankar's Ayurvedic Cancer Clinic & Swaayu Cancer Care Centre, we believe in holistic healing that strengthens both body and spirit.
Thank you to our wonderful patient for trusting us on this journey to recovery.

Address

Navi Mumbai
410210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Kalyankar's Ayurveda Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Kalyankar's Ayurveda Clinic:

Share