Adhar Clinic

Adhar Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adhar Clinic, Medical and health, at. post ashti, Partur.

04/01/2024

एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. असं आपण क्वचित कधी म्हणून जातो आणि त्या शब्दात अडकतो!

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !

भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या...

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो..

भावना दुखावली,असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो !

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली, तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं..

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं..

कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात.. तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं.

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना
आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं..

बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.
म्हणून...

*कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच...!*..
व.पु.काळे

🙏

02/01/2024

राम अतिशय स्नेहाने सिते कडे पाहत म्हणाले, सीते,परमात्म्याचे विश्व सरळ रेषेत नाही, वृत्ताकार आहे. ह्यात न कोणी कोणाच्या पुढे चालत असतो ना कोणी कोणाच्या मागे ,
कारण सगळेच एकमेकांच्या पुढे मागे चालत आहेत .
म्हणून जो अग्रग्रामी आहे तोच अनुगामी आहे आणि जो अनुगामी आहे तोच अग्रग्रामी सुद्धा आहे.
कोणतेही वृत्त तेव्हाच व्यवस्थित गतिमान होऊ शकते जेव्हा पुढे चालणाऱ्याला मागे चालण्याची कला अवगत असते आणि मागे चालणाऱ्यांमध्ये पुढे चालण्याची क्षमता असते.

08/12/2023

मानुस तेव्हा च हारतो जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते

02/12/2023

माझी संसारची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथ जोडीदार कमी पडेल तिथ आपण उभं राहायचं

18/04/2023

**आधार क्लिनिक*
*
_*उष्माघात*_

*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

*आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*.

घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे.

पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

*शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

- *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*.

*रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
- माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व *आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..

*ऊष्माघात टाळा*.

*उन्हाचा पारा चढत आहे*.. त्यामुळे *
*उष्माघात टाळण्या साठी
खालील उपाययोजना करा..*
शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

- *काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या*.

शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

- *डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा*.

- आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.

- कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.

*दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.

- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.

*अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास* तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.
🙏🙏🙏🙏

डॉ.नितेश पताळे आधार क्लिनिक.

11/01/2022

फक्त कॉपी पेस्ट .सोर्स व्हॉट्स ऍप.

काल डॉक्टर Dileep Deodhar ह्यांनी लिहिलेल्या पोस्टची संक्षिप्त कॉपी...
= = = = = = = = =

कोणत्याही हवेतून पसरणाऱ्या विषाणूंचा आजार जगातील यच्चयावत कोणत्याही उपायाने, अगदी लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी या उपायाने थोपवाता येत नाही, हे उघड सत्य आहे.

आजपर्यंत फ्लूसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी कधीही टेस्टिंग केले जात नव्हते. सिझनल फ्लू हा दरवर्षी येत राहणारच आहे. कोणतीही बंधनं घातली तरी फ्लूची साथ दोन ते तीन आठवडे राहतेच. ज्यांची इम्युनिटी चांगली असते, त्यांना फ्लू होऊन गेलेला कळतही नाही. सर्वांचे टेस्टिंग करण्याची आवश्यकता नसते. कोणत्याही फ्लूच्या साथीत रूग्णांचा संपर्क येणार्‍या व न येणार्‍या लोकांना फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एका घरात एक रूग्ण सापडला तसाच तो प्रत्येक घरात सापडण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्या संपर्कात येणार्‍यांना विलगीकरणात ठेवले तर संपूर्ण जगरहाटी बंद होईल. रस्त्यातून जाता येता मास्क लावल्याने कोविड होत नाही किंवा साथ पसरणार नाही हा भ्रम आहे.

आतापर्यंत मास्क लावून काळजी घेतलेल्या अनेकांना कोविड होऊन गेला आहे, हे उघड सत्य आहे. ज्यांना कोविड झाला आहे आणि त्याच्या अगदी जवळून संपर्कात येणार्‍यांनी मास्क लावणे जरुरीचे असते.

आपल्यामुळे इतरांना कोविड होतो ही कल्पना चुकीची आहे. तसे असते, तर डॉक्टर मंडळींना रोजच कोविड झाला पाहिजे. आणि त्या भीतीने त्यांनी पेशंटही बघणं बंद केले तर काय होईल?

कोविड कोणालाही होऊ शकतो, कारण प्रत्येक जण श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही. आपल्याला निसर्गाने आणि जन्मदत्यांकडून मिळालेली इम्युनिटी, हा एक चमत्कार आहे. नाहीतर माणसं रोजच आजारी पडली असती.

साथीमध्ये रूग्ण संख्या ही वाढणारच असते, म्हणून त्याला साथ म्हणतात. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची रोजची गणती करणं आणि ती प्रसिध्द करणं यामुळे जनतेमध्ये फक्त भिती पसरते, कारण ९९% लोकं बरे होतात. पण त्याला प्रसिध्दी दिली जात नाही, हे देशाचे दुर्दैव आहे.

फ्लू प्रतिबंधक व्हॅक्सिन हे सत्तर - ऐंशी टक्के इम्युनिटी देते, आणि परत ते प्रत्येकाच्या नैसर्गिक इम्युनिटी वर अवलंबून असते.

फ्लूचा कायमचा नायनाट करण्यासाठी कधीही व्हॅक्सिन निघू शकणार नाही, हेही उघड सत्य आहे, ‌कारण प्रत्येक वर्षी व्हायरसचा व्हेरिएंट बदलतो, हे जनतेला आता कळले आहे. हे वैद्यकीय जगतास माहिती होतेच.

फ्लूचे व्हॅक्सिन ह्या वर्षी वर्षातून तीनदा घ्यायला लागणार आहे, ह्यावरुन लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे आणि हे दरवर्षी हे तुम्ही करणार आहात का?... फ्लूचे व्हॅक्सिन फक्त ज्यांना फुफ्फुसाचा चिवट आजार आहे किंवा इतर शारीरिक आजारांमुळे ज्यांची इम्युनिटी कमी असेल त्यांना वर्षातून फक्त एकदाच द्यायला पाहिजे.

वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आमच्या Preventive and Social Medicine या पुस्तकात दिल्या आहेत, आणि गेली ४७ वर्ष फॅमिली डॉक्टर म्हणून काम करताना यांचा मी अनुभव घेतला आहे.

२०१० साली जेव्हा स्वाईन फ्लूने भितीचे वातावरण पसरले होते तेव्हा असं सत्य लिहिणारे माझे लेख कोणीही छापत नव्हते आणि आता तर मिडिया हाऊसेस आमच्यासारख्या डॉक्टरांचे सत्य कथन करणारे लेख छापत नाहीत ही सामाजिक शोकांतिका आहे... आणि म्हणून गेली दोन वर्षे सातत्याने फेसबुकवर लिहून समाज प्रबोधन करून समाजातील भीती घालविण्याचे अखंड काम करत आहे...

माझ्यासारखा एक सामान्य फॅमिली डॉक्टर हे एका हाती प्रयत्न करतो आहे, त्यालाच आज मूर्ख ठरविले जात आहे पण मी परत परत सांगतो
I am proud to be fool... कारण संपूर्ण दोन वर्ष मी, माझी सून सुलक्षणा आणि माझी सहकारी डॉक्टर दिपाली शहा अखंडपणे सर्व पेशंटना अगदी कोविडच्या सुध्दा - त्यांच्याजवळ बसून, हात लावून तपासत आहोत... या शब्द व स्पर्शाने ते लवकर बरे होतात, ही वस्तुस्थिती आहे... अशा घबराट पसरविली जाणार्‍या काळात पेशंटला भावनिक व मानसिक आधार देऊन आजाराला सामोरं जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, ही काळाची गरज आहे.

- डॉ दिलीप देवधर
०९ जानेवारी २०२२

Address

At. Post Ashti
Partur
431507

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 2pm

Telephone

919423396447

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adhar Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share