Adhar Clinic

Adhar Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adhar Clinic, Medical and health, at. post ashti, Partur.

04/01/2024

एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. असं आपण क्वचित कधी म्हणून जातो आणि त्या शब्दात अडकतो!

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !

भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या...

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो..

भावना दुखावली,असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो !

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली, तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं..

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं..

कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात.. तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं.

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना
आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं..

बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.
म्हणून...

*कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच...!*..
व.पु.काळे

🙏

02/01/2024

राम अतिशय स्नेहाने सिते कडे पाहत म्हणाले, सीते,परमात्म्याचे विश्व सरळ रेषेत नाही, वृत्ताकार आहे. ह्यात न कोणी कोणाच्या पुढे चालत असतो ना कोणी कोणाच्या मागे ,
कारण सगळेच एकमेकांच्या पुढे मागे चालत आहेत .
म्हणून जो अग्रग्रामी आहे तोच अनुगामी आहे आणि जो अनुगामी आहे तोच अग्रग्रामी सुद्धा आहे.
कोणतेही वृत्त तेव्हाच व्यवस्थित गतिमान होऊ शकते जेव्हा पुढे चालणाऱ्याला मागे चालण्याची कला अवगत असते आणि मागे चालणाऱ्यांमध्ये पुढे चालण्याची क्षमता असते.

08/12/2023

मानुस तेव्हा च हारतो जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते

02/12/2023

माझी संसारची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथ जोडीदार कमी पडेल तिथ आपण उभं राहायचं

18/04/2023

**आधार क्लिनिक*
*
_*उष्माघात*_

*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

*आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*.

घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे.

पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

*शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

- *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*.

*रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
- माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व *आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..

*ऊष्माघात टाळा*.

*उन्हाचा पारा चढत आहे*.. त्यामुळे *
*उष्माघात टाळण्या साठी
खालील उपाययोजना करा..*
शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

- *काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या*.

शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

- *डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा*.

- आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.

- कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.

*दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.

- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.

*अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास* तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.
🙏🙏🙏🙏

डॉ.नितेश पताळे आधार क्लिनिक.

11/01/2022

फक्त कॉपी पेस्ट .सोर्स व्हॉट्स ऍप.

काल डॉक्टर Dileep Deodhar ह्यांनी लिहिलेल्या पोस्टची संक्षिप्त कॉपी...
= = = = = = = = =

कोणत्याही हवेतून पसरणाऱ्या विषाणूंचा आजार जगातील यच्चयावत कोणत्याही उपायाने, अगदी लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी या उपायाने थोपवाता येत नाही, हे उघड सत्य आहे.

आजपर्यंत फ्लूसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी कधीही टेस्टिंग केले जात नव्हते. सिझनल फ्लू हा दरवर्षी येत राहणारच आहे. कोणतीही बंधनं घातली तरी फ्लूची साथ दोन ते तीन आठवडे राहतेच. ज्यांची इम्युनिटी चांगली असते, त्यांना फ्लू होऊन गेलेला कळतही नाही. सर्वांचे टेस्टिंग करण्याची आवश्यकता नसते. कोणत्याही फ्लूच्या साथीत रूग्णांचा संपर्क येणार्‍या व न येणार्‍या लोकांना फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एका घरात एक रूग्ण सापडला तसाच तो प्रत्येक घरात सापडण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्या संपर्कात येणार्‍यांना विलगीकरणात ठेवले तर संपूर्ण जगरहाटी बंद होईल. रस्त्यातून जाता येता मास्क लावल्याने कोविड होत नाही किंवा साथ पसरणार नाही हा भ्रम आहे.

आतापर्यंत मास्क लावून काळजी घेतलेल्या अनेकांना कोविड होऊन गेला आहे, हे उघड सत्य आहे. ज्यांना कोविड झाला आहे आणि त्याच्या अगदी जवळून संपर्कात येणार्‍यांनी मास्क लावणे जरुरीचे असते.

आपल्यामुळे इतरांना कोविड होतो ही कल्पना चुकीची आहे. तसे असते, तर डॉक्टर मंडळींना रोजच कोविड झाला पाहिजे. आणि त्या भीतीने त्यांनी पेशंटही बघणं बंद केले तर काय होईल?

कोविड कोणालाही होऊ शकतो, कारण प्रत्येक जण श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही. आपल्याला निसर्गाने आणि जन्मदत्यांकडून मिळालेली इम्युनिटी, हा एक चमत्कार आहे. नाहीतर माणसं रोजच आजारी पडली असती.

साथीमध्ये रूग्ण संख्या ही वाढणारच असते, म्हणून त्याला साथ म्हणतात. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची रोजची गणती करणं आणि ती प्रसिध्द करणं यामुळे जनतेमध्ये फक्त भिती पसरते, कारण ९९% लोकं बरे होतात. पण त्याला प्रसिध्दी दिली जात नाही, हे देशाचे दुर्दैव आहे.

फ्लू प्रतिबंधक व्हॅक्सिन हे सत्तर - ऐंशी टक्के इम्युनिटी देते, आणि परत ते प्रत्येकाच्या नैसर्गिक इम्युनिटी वर अवलंबून असते.

फ्लूचा कायमचा नायनाट करण्यासाठी कधीही व्हॅक्सिन निघू शकणार नाही, हेही उघड सत्य आहे, ‌कारण प्रत्येक वर्षी व्हायरसचा व्हेरिएंट बदलतो, हे जनतेला आता कळले आहे. हे वैद्यकीय जगतास माहिती होतेच.

फ्लूचे व्हॅक्सिन ह्या वर्षी वर्षातून तीनदा घ्यायला लागणार आहे, ह्यावरुन लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे आणि हे दरवर्षी हे तुम्ही करणार आहात का?... फ्लूचे व्हॅक्सिन फक्त ज्यांना फुफ्फुसाचा चिवट आजार आहे किंवा इतर शारीरिक आजारांमुळे ज्यांची इम्युनिटी कमी असेल त्यांना वर्षातून फक्त एकदाच द्यायला पाहिजे.

वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आमच्या Preventive and Social Medicine या पुस्तकात दिल्या आहेत, आणि गेली ४७ वर्ष फॅमिली डॉक्टर म्हणून काम करताना यांचा मी अनुभव घेतला आहे.

२०१० साली जेव्हा स्वाईन फ्लूने भितीचे वातावरण पसरले होते तेव्हा असं सत्य लिहिणारे माझे लेख कोणीही छापत नव्हते आणि आता तर मिडिया हाऊसेस आमच्यासारख्या डॉक्टरांचे सत्य कथन करणारे लेख छापत नाहीत ही सामाजिक शोकांतिका आहे... आणि म्हणून गेली दोन वर्षे सातत्याने फेसबुकवर लिहून समाज प्रबोधन करून समाजातील भीती घालविण्याचे अखंड काम करत आहे...

माझ्यासारखा एक सामान्य फॅमिली डॉक्टर हे एका हाती प्रयत्न करतो आहे, त्यालाच आज मूर्ख ठरविले जात आहे पण मी परत परत सांगतो
I am proud to be fool... कारण संपूर्ण दोन वर्ष मी, माझी सून सुलक्षणा आणि माझी सहकारी डॉक्टर दिपाली शहा अखंडपणे सर्व पेशंटना अगदी कोविडच्या सुध्दा - त्यांच्याजवळ बसून, हात लावून तपासत आहोत... या शब्द व स्पर्शाने ते लवकर बरे होतात, ही वस्तुस्थिती आहे... अशा घबराट पसरविली जाणार्‍या काळात पेशंटला भावनिक व मानसिक आधार देऊन आजाराला सामोरं जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, ही काळाची गरज आहे.

- डॉ दिलीप देवधर
०९ जानेवारी २०२२

28/06/2020

अति महत्वाचे

कोरोनामुळे प्रत्येक दवाखाण्याच्या वेळा बदललेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी सकाळीच फोन करून विचारपूस करावी, कारण डॉक्टर दवाखान्यातून घरी जातात तेव्हा पूर्ण कपडे धुवून अंघोळ करून घरात जातात कारण घरात लहान मुले वयस्कर आईवडील असतात. त्यामुळे त्यानंतर त्यांना दवाखान्यात येणे काठीन असते इमर्जन्सी असली तर काहीतरी पर्यायी व्यवस्था केलेली असतेच किंवा स्वतः ही येतात पण जनरल पेशंट साठी येणे कठीण असते. कारण त्यांना परत नवीन कपडे घालणे आणि घरी गेल्यावर परत धुवून टाकणे आणि परत अंघोळ ह्या सर्व गोष्टी करणे शक्य नाही मग अशावेळी आपण नाराज होतो पण अशा कठीण समयी ते आपल्याला सेवा देत आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे . म्हणून जनतेस नम्र विनंती की कोरोना काळात वेळेचे पालन सक्तीने करावे आणि डॉक्टरांना सहकार्य करावे.

एक डाॅक्टर

18/05/2020

अर्सेनिकम अल्बम कसे काम करते. काय आहे ते.
अर्सेनिकम अल्बम हे मूलद्रव्य, एक मेटलॉईड आहे. म्हणजे ना धड धातू ना अधातू. जसा हा कोविड १९ किंवा कुठलाही व्हायरस, ना धड सजीव ना धड निर्जीव.
पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात आहे. पाण्यातही असते थोड्या प्रमाणात. त्याची काही अडचण नसते. काही ठिकाणच्या पाण्यात त्याचे प्रमाण जास्त असते. तेथे त्यामुळे बरेच रोग निर्माण होतात.
इलेक्ट्रोनिक्स अर्सेनिकवरच चालते. लाईट एमिटिंग डायोड म्हणजेच LED याच्या पासूनच बनवतात.
जसे आयुर्वेदात जशास तसे, किंवा विषाला विष मारते असे म्हणतात. तसेच होमिओपॅथी मध्ये सुद्धा आहे. म्हणजे नाकातून तुपासारखा पदार्थ येत असेल तर थेंबभर नाकात तूप टाकायचे.
मग ते आत जाऊन आतील नाजूक त्वचेवर एक पातळ थर तयार करते आणि रोग जंतूंपासून त्वचेचा बचाव करते आणि सर्दी बरी होते.
तसेच होमिओपॅथीचे मुल तत्व आहे. एखादा पदार्थ शरीरात गरजेपेक्षा जास्त झाला की शरीरात जी लक्षणे उत्पन्न होतात ती लक्षणे त्याच पदार्थाचे विरळीकरण म्हणजे डायल्युशन करून दिल्यास ती नाहीशी होतात असा तो सिद्धांत ढोबळ मानाने आहे.
उदाहरणार्थ शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाले तर तहान लागते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते.
जर शरीरात जास्त झालेले पाणी जर मिठामुळे असेल तर सूक्ष्म प्रमाणातील मीठ दिले तर ते पाणी आणि त्याचबरोबर ते मीठ बाहेर टाकले जाते. या औषधाच्या सुक्ष्मतेला किंवा विरळीकरणाला पोटन्सी असे म्हणतात.
हि पोटन्सी कशी वाढवतात? तर औषधाचे द्रावण बनवतात. त्याला मदर टिंक्चर, म्हणतात. मग एक भाग मदर टिंक्चर आणि ९९ भाग द्रावण घेऊन आपटून आपटून ते एकजीव करतात. हि झाली एक पोटन्सी. म्हणजे त्यात मुळ औषध एक टक्काच राहते.
त्यातील एक भाग घेऊन परत हीच प्रक्रिया केली की पोटन्सी दोन झाली. म्हणजे त्यात मूळ औषध हजारात एक असे झाले. असे तीस वेळा केले की ३० पोटन्सी झाली.
अर्सेनिकम अल्बम ३० यातील ३० चा अर्थ त्या औषधाची पोटन्सी ३० आहे असा आहे. ३०, ३०c, ३०CH सगळ्याचा अर्थ एकच. म्हणजेच त्या औषधात अर्सेनिकचा एखादाही अणु सापडणे मुश्कील. मग त्याचा विषारीपणा कुठून असणार.
त्याच्याशी कुठलीही केमिकल रिएक्शन होणारच नाही. आपल्या घराच्या पाण्याच्या टाकीत त्यापेक्षा खूपच जास्त अणु असतील. म्हणून ते औषध विषारी आहे असे म्हणणे हा गैरसमजाचा भाग आहे.
मग साहजिकच प्रश्न निर्माण होईल कि मग त्याला अर्सेनिक का म्हणायचे? इथेच आधुनिक विज्ञानाचा घोळ सुरु होतो.
"वाण नाही पण गुण लागणे" अशी मराठीत म्हण आहे. तसे या औषधाचा गुण त्या द्रावणाला लागतो. हा त्या द्रावणाचा तसेच पाण्याचा गुणधर्म आहे. भारतीय तत्वज्ञानात स्थूल आणि सूक्ष्म हि संकल्पना असल्याने भारतीयांना ते कळायला कठीण जाऊ नये.
आधुनीक विज्ञानाला अजून सूक्ष्म कळायला, त्याची मोजपट्टी मिळालेली नाही. जेंव्हा मिळेल तेंव्हा अमेरिका आम्हीच सूक्ष्माचा शोध लावला असे म्हणेलच.
तर अर्सेनिकची जी लक्षणे आहेत. अनेक आहेत ती. तशी लक्षणे शरीरात दिसल्यावर जर हे औषध दिले तर ती लक्षणे नाहीशी होतात. अर्थात प्रत्येक औषधाचा डोस, ते कितीवेळा द्यायचे, त्या साठी त्याची पोटन्सी काय असावी याचा अतिशय बारकाईने अभ्यास केल्यावर मग ते औषध म्हणून सिध्द किंवा प्रुव्ह झाले असे म्हटले जाते.
इतरही अनेक पैलू आहेत. पण आत्तापुरते हे पुरे.
आयुर्वेदातील वात पित्त आणि कफ ह्या तीन प्रकारच्या प्रकृती माहिती असतात. तशाच होमिओपॅथी मध्येही तीन प्रकारच्या प्रकृती असतात. त्यामुळे औषधेही त्या त्या प्रकृतीची वेगवेगळी असतात. त्यात वंशाचा म्हणजे रेसचाही फरक पडतो.
त्यामुळे आधुनिक वैद्यकाच्या दृष्टीने एकच रोग असलेल्या तीनही प्रकारच्या रुग्णांना एकच औषध असे मानले जाते. पण आयुर्वेद आणि होमिओपॅथी मध्ये तीनही रुग्णांना वेगवेगळी औषधे दिली जातात. अर्थात काही औषधे तीनही प्रकृतीच्या लोकांना लागू पडणारीही असतात.

आधुनिक विज्ञान साधारण पासष्ठ टक्के रुग्ण बरे झाले कि औषध बरोबर आहे असे मानेल. आणि उरलेल्यांना हे औषध लागू पडत नाही का? मग बदलून देऊ असे म्हणून मोकळे होते. दुसरे औषध उरलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीसाठी असेल तर ते लागू पडते.
पण सगळ्यांसाठी एकच पेटंटेड औषध असे मानणाऱ्या औषध कंपनीला ते मान्य होत नाही. असे कसे असे कसे? हा त्यांचा प्रश्न होतो. म्हणूनच आधुनिक वैद्यकाच्या पद्धतीने आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषधांच्या टेस्ट होऊच शकत नाहीत.
सबघोडे बारा टक्के हा प्रकार आयुष औषधात नसतोच. आणि त्यावरच आधुनिक वैद्यक अडून बसलेले आहे. त्यांची रिसर्च करण्याच्या पद्धतीत ते औषध लागू न पडणाऱ्या लोकांना अपवाद म्हणून मोकळे केले जाते. आणि हा प्रकार किमान दहा टक्के असतो, हेच मुळी अवैज्ञानीक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
सर्वे सुखिन सन्तु आणि बहुजन सुखाय असा तो फरक आहे.
मग प्रश्न पडतो कि मग असे असताना होमिओपॅथी मध्ये सगळ्या लोकांसाठी प्रतिबंधात्मक एकच औषध कसे?
तर जेंव्हा एखादा वात प्रकृतीचा रोग कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये बळावतो तेंव्हा त्याची शरीर प्रकृतीही वातमय होत जाते.
तसेच साथीच्या रोगांमध्ये ती लक्षणे निर्माण झाल्यावर सगळ्यांची प्रकृती तशीच होत जाते. म्हणून एकच प्रतिबंधात्मक औषध सगळ्यांना लागू पडते. म्हणूनच आधुनिक औषधे बर्याच लोकांना लागू पडतात. सगळ्या नाही.

आता या कोविड१९ या विषाणू मुळे होणाऱ्या आजारात जी सगळी लक्षणे आहेत ती सगळी लक्षणे अर्सेनिक औषधाचीही आहेत. काही जण म्हणतात, मला डायरियावर अर्सेनिक दिले होते. मग घशाच्या आणि छातीच्या दुखण्यावर हे कसे चालेल?
तर कोविद१९ मध्ये एक दोन टक्के लोकांना डायरीयाही होतो हे त्यांना माहित नसते.
तर अर्सेनिक औषध घेतल्यावर काय होते?
हे औषध घेतल्यावर त्याने सूक्ष्म प्रमाणात तीच लक्षणे तयार होतात. आपल्याला ती कळणारही नाहीत. पण शरीराच्या हेरखात्याला ते लगेच कळते त्यांना कोविड१९चे व्हायरस आल्यासारखे वाटते आणि त्यासाठीची प्रतिजैविके, म्हणजेच ऍंटीबॉडीज तयार होऊ लागतात. हि कोविड १९ वर लागू होणारीच असतात.
हि प्रतिजैविके शरीरभर कोविड १९ च्या विषाणूंना शोधत राहतात. आणि महिन्या दोन महिन्यांनी विरून जातात. म्हणून हे औषध महिन्यानंतर साथ राहिलीच तर परत घ्यायचे असते.
मधल्या काळात जर काही विषाणू शरीरात शिरलेच तर लगेच या आधीच तयार असलेल्या सैन्याने त्यांचा नाश होतो. म्हणजे हि प्रतिजैविके त्या व्हायरस बरोबर स्वतःला जोडून त्याचे एका निरुपद्रवी परमाणु मध्ये रुपांतर करते. आणि सैन्यालाही कळते खबर पक्की होती. आणि मग ते आपल्या मेमरीत असे विषाणू आले होते त्यांना या ब्रिगेडच्या सैनिकांनी नेस्तनाबूत केले असे लिहून ठेवले जाते.
मग शरीर त्या विषाणूला भविष्यात केंव्हाही प्रतिकार करू शकते. जसे पुन्हा ते अतिरेकी आले कि त्या ब्रिगेडची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु होते आणि लगेच त्यांचा फडशा पाडला जातो.
म्हणून लस किंवा नोसोड घेतल्यावर दीर्घकाळ त्या रोगाला होऊ देणार नाही अशी शरीराची यंत्रणा तयार होते. अर्सेनिक हे औषध असल्याने महिन्याभरानंतर ते परत घ्यावे लागते. ह्याचा तीन दिवसांचा कोर्स झाल्यावर कोणी बाधित झालेला नाही.
नोसोड म्हणजे होमिओपॅथीची त्या रोगावरची लस. लहान मुलांना लसी टोचल्या नंतर थोडा ताप वगैरे येतो तसे होमिओपॅथी नोसोड मध्ये होत नाही हा महत्वाचा फायदा आहे. आणि स्वस्तही असते.

आता लक्षणे तीच असल्याने कोविड्चे संक्रमण झाल्यावर पॉझीटिव्ह झाल्यावर मग परत अर्सेनिकच घ्यायचे का? घेतले तर फायदा होईलच पण झपाट्याने बरे होईलच असे सांगता येणार नाही. त्याचा डोसही जास्ती वेळा द्यावा लागेल.
कारण त्याच्या प्रकृती प्रमाणे सगळी लक्षणे दिसतीलच असे नाही. मग त्याची लक्षणे बघून त्याच्या प्रकृतीमानाचा विचार करून अचूक औषध दिले कि सहा तासात आराम पडायला लागून दोनचार दिवसात तो निगेटिव्ह होऊन बरा होईल.
अर्थात आधीच अर्सेनिकचा डोस घेतला असल्यास बाधा होण्याची शक्यता लाखात एक. झालीच तरी लक्षणे सौम्यच राहतील.
म्हणूनच होमिओपॅथीचा मोठ्या प्रमाणात आणि लवकर वापर सुरु केलेल्या इराण, जर्मनी आणि केरळ मध्ये रुग्णांचा आलेख उतरणीला लागला आहे. संपत आला आहे. आठवड्याभरात केरळ करोना मुक्त होईल.
कँफर 1M म्हणजे आपला भीमसेनी कापूर, त्याचीही चर्चा केली जात आहे. मुळात त्याचे प्रयोग इराण मध्ये केले गेले आहेत. भारतात अर्सेनिकाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन त्याची योग्यता सिध्द झाली आहे.
इराण हि भारता पेक्षा वेगळी रेस आहे. भारतातील पारशी लोकांकडे बघितल्यावर ते लक्षात येतेच. त्यामुळे ते येथेही प्रभावी ठरेलच असे नाही. तेही वापरून पाहायला हरकत नव्हती. पण ६ मार्चलाच आयुष मंत्रालय आपल्या निष्कर्षांवर पोहोचले होते.
मग आपल्या येथे काय केले पाहिजे? काय करायला हवे होते हा भाग सोडून देऊया. फिजीशियनचे काम सर्जनला दिल्यावर जे व्हायचे ते झालेच आहे. अजूनही महाराष्ट्रात कोविड१९ वर होमिओपॅथीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत नाही.
मराठी आणि गुजराथी हि एक वेगळी रेस आहे. ज्वारीची भाकरी खाणारी ही मंडळी. रबरी पदार्थ जास्त असलेला गहू त्यांना पचत नाही. सरसोंका तेल ते सहन करू शकत नाहीत.
या रेसमध्ये मृत्युदर सगळ्यात जास्त आहे. संख्याही जास्त आहे. गुजराथ मध्ये आयुष औषधांचा वापर सुरु झाल्यावर मृत्युदर सुधारला आहे तसेच लोकांमध्ये आयुष औषधे वाटल्याने संख्या कमी राहिली आहे.
केरळ हा कोकणचाच शेवटचा भाग आहे. मराठी लोकांना ते पटत नसले तरी ते स्वतःला कोकणीच समजतात. सह्याद्री आणि समुद्रामधील चिंचोळी पट्टी, कोकण. खरेतर महाराष्ट्र आणि गुजराथ प्रमाणेच केरळमध्येही परदेशातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे.
तसेच बहुतेक तरुण वर्ग बाहेरगावी असल्याने वृद्धांची संख्या जास्त आहे. तरीही १०० जण बरे झाले तर एखादाच मृत्युमुखी पडतो. आणि महाराष्ट्रात तीनचार जण बरे झाले तर एकाचा मृत्यू होतोय. महाराष्ट्रात कोविड योद्ध्यांचाही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत सहभाग आहे.
आज महाराष्ट्र वगळता भारताचा आणि गुजराथचाही रुग्ण दुप्पट होण्याचा वेग वीस दिवसांवर गेला आहे. तर महाराष्ट्र कित्येक दिवस दहा दिवसांचा उम्बरठाही ओलांडू शकला नाही.
गुजरातचा मृत्यू दर झपाट्याने भारतापेक्षाही कमी होईल असे दिसत आहे.

आपण एक हजार रुपयाच्या लसीची वाट बघत थांबू शकत नाही. सरकारी पातळीवर सुरु झाले तर अर्सेनिक ३० माणशी रुपया पेक्षाही कमी पडेल. १० टक्क्यांपेक्षाही जास्त रुग्ण कोविड योद्धे आहेत. त्यांच्यात अर्सेनिकचे वाटप सुरु झाले पाहिजे. जेणे करून त्यांच्यात प्रतिकारशक्ती बरोबरच आत्मविश्वासही वाढेल.
जे जे तयार होतील त्या आयुष डॉक्टरांना त्यांच्या पद्धतीने रोगांवर मुक्त पणे उपचार करू दिला पाहिजे. आमच्या कडे औषध नाही पण तुम्ही आमच्याच पद्धतीने मरा हा हेका सोडून दिला पाहिजे.
पुणे, शिर्डी येथील पालिकांनी आपल्या कर्मचार्यांना अर्सेनिक ३० वाटले आहे. पोलिसांनाही वाटण्याची व्यवस्था होत आहे. मुंबईलाच काय अडचण आहे कळत नाही. कोणी झारीतील शुक्राचार्य असतील तर त्यांना बदलले पाहिजे.
मालेगाव मधील होमिओपॅथी औषधांची दुकाने उघडू दिली पाहिजेत. लोकांना हवी आहेत ती औषधे. आज महाराष्ट्रभर लोक जागे झाले आहेत. उत्तुंग पॅटर्न सगळी कडे मोठ्या प्रमाणावर राबवला जात आहे. पण अजूनही संपर्कात आलेल्या लोकांना वेगळे ठेवले तरी त्यांना अर्सेनिक ३० दिले जात नाही हे बरोबर नाही.
आता उत्तुंग पॅटर्नच्याही पुढे जाऊन सगळ्या लोकांना अर्सेनिक ३० वाटले पाहिजे. दाट वस्त्यांपासून हे काम सुरु केले पाहिजे. आपापल्या नगरसेवकांवर आणि आमदार खासदारांवर यासाठी दबाव आणला पाहिजे. जे अन्न आणि रेशन देऊ शकतात ते एक रुपयाच्या गोळ्या नाही देऊ शकत?
उपयोग नाही झाला तर एकच रुपया फुकट जाईल. पण उपयोग झाला तर किती तरी जीव वाचतील. उद्योग लवकर सुरु झाले तर किती उत्पन्न वाढेल. हजार रुपयाची लस येईपर्यंत थांबता येणार नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे.
चला अर्सेनिक वाटायला सुरु करूया. औषधाचे नाव अर्सेनिक अल्बम ३०. कुठल्याही होमिओपॅथीच्या दुकानात मिळेल, किंवा डॉक्टर कडे मिळेल. अनेक जनरल मेडिकल स्टोर्स मध्येही मिळेल.
होमिओपॅथी डॉक्टरांच्या मदतीने आपणही मोठ्या प्रमाणात बाटल्यात ते भरू शकाल आणि वाटूही शकाल. हाफ ड्रामच्या बाटलीत ३० नंबरच्या गोळ्या भरायच्या आणि त्यात चार थेंब औषध टाकायचे आणि झाकण लावून हलवायचे. ह्या बाटलीत पाच जणांच्या कुटुंबाला पुरेल एव्हढे औषध तयार होते.
प्रत्येकाने आपल्याला करोनाची बाधा होऊ नये म्हणून हे घ्यायचे, असे आयुष मंत्रालयाने सुचवले आहे. मोदींनीही सुचवल्रे आहे. अगदी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही हे देता येते.
लहान बाळांना तीन ऐवजी एकच गोळी द्यायची. बाकी घरातील सर्वांनी सकाळी चूळ भरून तीन गोळ्या घ्यायच्या. गोळ्यांना हात लावायचा नाही. झाकणात घेऊन सरळ जिभेवर टाकून चोखायच्या. मग अर्धा तास ब्रश खाणे पिणे काही करायचे नाही. पाणी प्यायला हरकत नाही. असे फक्त तीन दिवस करायचे. दिवसातून फक्त एकदाच सकाळी एकदम तीन गोळ्या घ्यायच्या.
घराजवळच्या होमिओपॅथी दुकानात किंवा डॉक्टर कडे मिळेल. बरेच जनरल मेडीकलवालेही ठेवतात. किंवा गुगल वर "homeopath medical near me" असा सर्च करायचा.
धुळ्याची पोलीस कंपनी मालेगावला कार्यरत होती. मालेगावला कार्यरत असणाऱ्या इतर कंपन्यातील पोलिसांना बाधा झाली. पण धुळ्याच्या ८२ पैकी एकाच पोलिसाला बाधा झाली इतरांना नाही. कारण इतरांनी हे औषध घेतले होते. एकाने घेतले नव्हते त्यालाच फक्त बाधा झाली. आता आपणच आपल्याबद्दल विचार करावा.
याचे काहीही साईड इफेक्ट नाहीत. सेफ आहे. आपण सगळे सेफ होऊया आणि आपल्या देशालाही या दहशतीतून मुक्त करूया.

22/07/2018

We treat he cures

Address

At. Post Ashti
Partur
431507

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 2pm

Telephone

919423396447

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adhar Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share