आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय

  • Home
  • India
  • Phaltan
  • आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय

आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय Atrey Ayurved & Panchkarma chikitsalaya is authentic & established ayurved clinic in Phaltan city

we offer authentic ayurved medicinal and panchkarma treatment with precise ayurved diagnosis and proper diet consultation.

19/09/2023
*थायरॉईड विकार - मोफत शिबिर*  *रविवार दिनांक 11/06/2023 सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे. पर्यंत.* हे शिबिर कोणासाठी ? सर्व रुग्...
10/06/2023

*थायरॉईड विकार - मोफत शिबिर*

*रविवार दिनांक 11/06/2023 सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे. पर्यंत.*

हे शिबिर कोणासाठी ?
सर्व रुग्ण विशेषत: स्त्री रुग्ण ज्यांना पुढील लक्षणे आहेत.

*अचानक वजन वाढणे / कमी होणे
*सर्व अंगावर / चेहऱ्यावर/ दोन्ही पायावर सूज असणे
*मासिक पाळीचे विकार , केस गळणे/ भूक मंदावणे
*अती चिडचिड होणे / मानसिक ताण तणाव/ झोप न येणे/ अती झोप येणे, अनुत्साह जाणवणे.
*छातीत धडधड होणे / भीती वाटणे.

अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आपल्याला थायरॉईड विकार तर नाहीत ना? या साठी मोफत शिबिरा मध्ये आवश्य भाग घ्यावा

*शिबिरातील सुविधा*

मोफत रुग्ण तपासणी, मोफत आहार सल्ला आणि मार्गदर्शन.
थायरॉईड विकाराचे निदान ज्या व्दारे होते ती Thyroid Function Test, केवळ रुपये 250/- मध्ये उपलब्ध.

आधुनिक शास्रानुसार थायरॉईड हा एक अंत स्त्रावी ग्रंथी आणि बरेच वेळा auto immune disease स्वरूपाचा विकार असून आयुर्वेद नुसार याचे मूळ कारण हे सदोष आहार, बदललेली जीवन शैली, चुकीची दिनचर्या, मानसिक ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव या मध्ये आहे. अशा रुग्णामध्ये वरील कारणांमध्ये बदल करून आयुर्वेद औषधी योजना व पंचकर्म चिकित्सा केल्यास रुग्णाच्या तक्रारी लवकर कमी होतात.आणि थायरॉईड लेवल( TSH) पण कमी होतात.

विशेषत: आधुनिक चिकित्सा घेऊन थायरॉईड लेवल नियमित असून ही लक्षणे / तक्रारी कमी होत नाहीत अशा रुग्णामध्ये आयुर्वेद चिकित्सा खूपच उपयुक्त.

गेल्या १२ वर्षा पासून थायरॉईड विकाराच्या अनेक रुग्णांना आयुर्वेद चिकित्सेने फायदा झालेला आहे आणि अनेक रुग्णामध्ये आधुनिक चिकित्सा न घेता पण थायरॉईड विकार नियमित ठेवण्यात यश आलेले आहे

तेव्हा ज्यांना पूर्वी पासून थायरॉईड विकार आहे किंवा वरील लक्षणे असल्यास या मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यवा..

धन्यवाद

डॉ अनिश पंडित MD(आयु.)

आत्रेय आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
मोनिता विश्व फेज 2,डी.एड कॉलेज चौक , फलटण.

*संपर्क: 8446550733/7588380542*

 # Corona Care in Ayurved. घरगुती उपाय करण्या पूर्वी आयुर्वेद  तज्ञाचे मत घ्या. आजकाल कोरोनाच्या परिस्थिती मध्ये घरगुती ...
22/06/2020

# Corona Care in Ayurved.

घरगुती उपाय करण्या पूर्वी आयुर्वेद तज्ञाचे मत घ्या.

आजकाल कोरोनाच्या परिस्थिती मध्ये घरगुती उपाय म्हणून अनेक जण आयुर्वेद औषधांचा उपयोग करत आहेत. फेसबुक आणि वाॅटसअप वरुन अशा अनेक गोष्टींविषयी माहिती घेत असतात. पण ह्याचा वापर करण्यापूर्वी आपल्या आयुर्वेद डाॅक्टरांना आवश्य सल्ला विचारावा..आयुर्वेद हे subjective ( रुग्णाप्रति भिन्न स्वरुपाचे) आहे. त्या मध्ये रुग्णाची प्रकृती, वय, त्याची लक्षणे, त्याचा आहार, ॠतूचर्या या सारख्या अनेक गोष्टीचा विचार करुन वैद्य रुग्णास औषध देत असतो आणि मगच ते रुग्णास गुणकारी ठरते. आपल्या आयुर्वेद डाॅक्टरांना आपल्या विषयी वरील सर्व माहिती असल्याने ते आपणास काय योग्य आणि काय अयोग्य हे चांगले जाणतात. आजकाल सोशल मिडियावर घरगुती औषधाच्या नावाखाली अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण सर्वच गोष्टी प्रत्येकास लागू पडत नाही. यास कारण देखील आयुर्वेदाचे मूळ स्वरुपच आहे. सध्याच्या कोरोना काळात आयुर्वेद या कोरोना काळात कसा उपयुक्त आहे हे सांगण्याच्या गडबडीत काही objective ( common to all) अशी औषधे आणि आहार कल्पना सांगितल्या जातात. पण त्या आपणास उपयोगी पडतील की नाही याची पडताळणी आपल्या आयुर्वेद डाॅक्टर करुन घेणे गरजेचे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर अनेक पित्ताचे त्रास असणारे रुग्ण तुळस, मिरे, दालचिनी, तमालपत्र, या सारख्या औषधांचे काढे घेऊन मुखपाक, गळ्यात आणि छातीत जळजळ होणे, गुददाह, उलटी होणे, सर्वांगाची आग होणे या सारखी लक्षणे घेऊन चिकित्सालयात येतात. याचाच अर्थ एवढ्या उष्ण काळात पित्ताचे त्रास असणा-या रुग्णासाठी ही औषधे उपयोगी ठरत नाहीत.अशा व्यक्तीसांठीही आयुर्वेदात अनेक औषधे उपलब्ध आहेत त्यायोगे कोरोना होऊ नये म्हणून प्रतिकार शक्ती निर्माण करता येते. तेव्हा कोरोनासाठी कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या आयुर्वेद डाॅक्टरांचा सल्ला आवश्य घ्या....

(या सारखी सर्वासाठी उपयुक्त माहिती पुढच्या लेखात)

सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय:|

वैद्य अनिश अनिल पंडित MD( आयुर्वेद)
फलटण व पुणे
8446550734

फलटण मधील रुग्ण सेवेची ६ वर्षे पूर्ण ....आत्रेय आयुर्वेद  व पंचकर्म चिकित्सालयाचा दस-याच्या शुभ मुहूर्तावर ७ वा वर्धापन ...
08/10/2019

फलटण मधील रुग्ण सेवेची ६ वर्षे पूर्ण ....
आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालयाचा दस-याच्या शुभ मुहूर्तावर ७ वा वर्धापन दिन ..त्या निमित्त स्ववास्तू मध्ये पू.जेचे आयोजन...
आपण सर्व रुग्णांनी दाखवलेल्या विश्वास, आई वडील व गुरुंचे आशिर्वाद आणि सर्व मित्रांच्या शुभेच्छा यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत...तेव्हा सर्वांचे आशिर्वाद व शुभेच्छा सदैव अशाच राहो.. सर्वांचे मनःपूर्वक आभार....
डाॅ. अनिश अनिल पंडित MD.(ayu)
डाॅ. अस्मिता अनिश पंडित BAMS

आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
मोनिता विश्व फेझ 2 , माईंड सीड स्कूल शेजारी,
ट्रेनिग काॅलेज चौक, लक्ष्मीनगर फलटण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Delivered lecture on clinical aspect of  Pandu rog @ Pune
28/08/2019

Delivered lecture on clinical aspect of Pandu rog @ Pune

Case of vitiligo.completely cures within three months  ayurved chikitsalaya.
30/06/2019

Case of vitiligo.completely cures within three months ayurved chikitsalaya.

Now in pune also.. Peth.
18/03/2019

Now in pune also.. Peth.

थंडी आली....भाग 2अभ्यंगम् आचरेत नित्यम |थंडीचा जोर चांगलाच वाढू लागलाय. हवेत गारवा आहे तसेच कोरडेपणा पण आहे. हे दोन्ही घ...
02/12/2018

थंडी आली....भाग 2

अभ्यंगम् आचरेत नित्यम |

थंडीचा जोर चांगलाच वाढू लागलाय. हवेत गारवा आहे तसेच कोरडेपणा पण आहे. हे दोन्ही घटका मुळे शरीरातील वात दोषाची वृध्दी होऊन अनेक गंभीर आजार उत्पन्न होतात.
कुणाचे गुडघे दुखतात तर कुणाची कंबर तर पायाचे गोळे, तर कुणाला पोट साफ न होण्याची समस्या तर कुणाला गॅसेसचे प्राॅब्लेम..असे विविध प्रकारचे आजार या थंडी मध्ये दिसून येतात. निसर्गातील थंड आणि कोरड्या वातावरणाचा परिणाम होऊन शरीरातील स्नेहांश कमी होऊ लागतो आणि वाताचे विकार डोके वर काढू लागतात. या करीता थंडीमध्ये स्निगध पदार्थांचा ऊपयोग आहारामध्ये अंत्यत आवश्यक ठरते.
पोटातून स्निग्ध पदार्थ घेण्याबरोबरच त्वचेवर स्नेह लावणे महत्वाचे असते. आयुर्वेदात शरीरात तैल लावण्याच्या उपक्रमास अभ्यंग म्हटले जाते. खरेतर दिनचर्येमध्ये रोजच अंभ्यंग करणे आवश्यक असते. पण थंडीमध्ये तर ते अत्यावश्यक ठरते.

अभ्यंगाचे फायदे.
1. त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन मऊ होते.
2. शरीरात वाढलेला वात दोष कमी होऊन वेदना कमी होतात.
3. थकवा कमी होतो व ऊत्साह निर्माण होतो
4. शरीरास धष्टपुष्ट बनवितो
5. चांगली झोप येण्यास मदत होते
6. स्नायू बळकट होतात. त्वचा व स्नायूची लवचिकता वाढते
7 . वार्धक्य दूर ठेवते(anti aging)
8. तसेच गुडघेदुखी, कंबरदुखी, संधीगत वात ,आमवात या सारख्या वात विकारात वैद्याच्या सल्ल्याने अभ्यंग केल्यास निश्चित फायदा होतो.

सामान्य पणे सकाळी स्नान करणे पूर्वी अभ्यंग करणे उत्तम
सामान्यपणे तीळ, मोहरी तैलाचा अभ्यंग साठी उपयोग केला जातो. वेदना व आजाराचे स्वरुप या नुसार विविध औषधी तैलाचा पण ऊपयोग केला जातो.
तेव्हा या थंडीत नेहमी अभ्यंग करा आणि निरोगी रहा.....

वैद्य अनिश पंडित
आत्रेय आयुर्वेद चिकित्सालय

17/11/2018

थंडी आली भाग 1

Say No to moisturizer...start exercise

थंडी आली की स्वेटर पायमोजे हातमोजे शाल या ऊबदार कपड्यांची शोधाशोध सुरु होते.तसेच शोधाशोध होते ती moisturiser क्रीम ची...सध्या बाजारात अनेक क्रीम्स उपलब्ध आहेत टी.व्ही वर दिवसभर जाहीरातही पाहतो..खरचं या क्रिम्स चा उपयोग होतो का??
हिवाळ्यात त्वचेला येणारा कोरडेपणा हा वातावरणातील थंडपणामुळे असतो. थंडपणामुळे रोमरंध्रे संकुचित झाल्यामुळे स्वेद प्रवर्तन होऊ शकत नाही.
स्वेदस्य क्लेद विधृति ...। वाग्भट.स्वेद हा क्लेदाचे धारण करुन त्वचेला मृदू ठेवतो. पण स्वेदा अभावे त्वचेला कोरडेपणा येतो.
आपण जर शरीरा मध्ये स्वेद प्रवर्तन करु शकलो तर कोणत्याही moisturizer ची गरज भासणार नाही.
या साठी दिनचर्येतील व्यायामाचा उपयोग होतो. शिवाय ग्रंथकारांनी शीत कालामध्ये व्यायाम करण्यास ही सांगितले आहे.
तेव्हा या थंडीत स्वेदागम होईपर्यत(घाम येईपर्यंत) व्यायाम केल्यास कोणत्याही moisturizer ची गरज भासणार नाही व आरोग्य प्राप्ती पण होईल.
तसेच आयुर्वेदात वर्णित स्नेहन स्वेदन केल्यास ही त्वचेची मृदूता टिकवून ठेवता येईल.

- वै.अनिश अनिल पंडित
8446550733

Address

Monita Vishwa Phase 2 Training College Chowk, Behind Aryaman Hotel Nr. Mind Seed School Phaltan Mob. 8446550733
Phaltan
415523

Telephone

8446550733

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category