Vishwamaya Ayurved Chikistalay

Vishwamaya Ayurved Chikistalay Ayurved consultant

Online Garbhsanskar batch for pregnant women.
19/04/2024

Online Garbhsanskar batch for pregnant women.

Suwarnprashan 2 December 2023
02/12/2023

Suwarnprashan 2 December 2023

*खंडग्रास चंद्रग्रहण*अश्विन शु.१५  28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार *ग्रहण स्पर्श - रात्री ०१:०५**ग्रहण मध्य - रात्री ०१:४४**ग्...
28/10/2023

*खंडग्रास चंद्रग्रहण*
अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार

*ग्रहण स्पर्श - रात्री ०१:०५*
*ग्रहण मध्य - रात्री ०१:४४*
*ग्रहण मोक्ष - रात्री ०२:२३*

*ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट*

हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.

*ग्रहणाचा वेध*- शनिवार दि.28ऑक्टोबर2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत. *बाल,वृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१ पासुन वेध पाळावेत.*
वेधकाळामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग करता येईल.
*ग्रहकाळात म्हणजे रात्री ०१:०५ ते ०२:२३ या काळात पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग हे करु नयेत.*

*कोजागरी आणि ग्रहण*
यावर्षी दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असुन रात्री ०१:०५ ते ०२:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. *त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल* मात्र प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल.
शुभम भवतू
🙏🏼दाते पंचांग🙏🏼

25/10/2023
Patient suffering from skin disease since 10 yrs c/o ithching, and patches on skin Not having relief with internetnal me...
16/09/2023

Patient suffering from skin disease since 10 yrs
c/o ithching, and patches on skin
Not having relief with internetnal medication,

Bad history of vaman procedure at another place so worried about Panchkarm not having faith on Panchkarm but still convinced for , raktmokshan and virechan treatment and got best results with it on 3rd Day only patches decreased in depth and ithching also relieved.

Panchkarm results treatment disease #

World breastfeeding week 1st week of August .✨The theme for World Breastfeeding Week 2023 is "Let's make breastfeeding a...
03/08/2023

World breastfeeding week 1st week of August .

✨The theme for World Breastfeeding Week 2023 is "Let's make breastfeeding and work, work!"

🌱Breastfeeding awareness aims to highlight the importance of breastfeeding and the impact it has on nutrition, food security and poverty reduction as well as survival and the wellbeing of mother and baby.

The Benefits of Breastfeeding for Mom :⁠-

Reducing her risk of developing osteoporosis.
Reducing her breast cancer risk.
Reducing her ovarian cancer risk.
Producing oxytocin, which helps contract the uterus back to its pre-pregnancy size.
Burning calories and using mom's fat stores for her breast milk.

Dr Yogita Thite Jagtap
MD Ayurved.
094202 70093

  corn treatment  # without surgery      # best results with ayurveda #Dr Yogita Thite JagtapMD AYU094202 70093
17/07/2023

corn treatment # without surgery # best results with ayurveda #
Dr Yogita Thite Jagtap
MD AYU
094202 70093

Suwarnprashan
15/07/2023

Suwarnprashan

Now available in Pimple Saudagar Every Saturday Sunday.Contact for more detailsVd. Yogita Thite JagtapMD(Ayu), DYA.
15/07/2023

Now available in Pimple Saudagar Every Saturday Sunday.
Contact for more details
Vd. Yogita Thite Jagtap
MD(Ayu), DYA.

22/04/2023

*ONLINE GARBHSANSKAR Session for pregnant ladies*_🩺🩺

*BY*
*Dr. YOGITA THITE*
*M.D.(Ayu.)* 👩🏻‍⚕️
*Mob. 7030139004*

💻 *On Google meet*

🗓️ 22 April and 23 April 2023

Time : 11 a.m.- 12 noon**

📍💵 * fee :- 600/- Only


📖 _*••TOPICS••*_ 📖

22April - Saturday About Delivery

23 April - Sunday Post netal exercise

🎉 _*•• HIGHLIGHTS ••*_🎉

1)About Delivery

- What are sings of it?
-To do list for preparing for delivery.
-What is procedure?
-Normal labour/ Cessarion section?
-Types of it?
-What are emergency?
- What care should be taken before and after?
-

2)Post netal exercise

What necessary exercise to be done ongoing periods of pregnancy .
-When to start after delivery?
- What exercise to be done?
-precaution to be taken.

🎥 *• Location details.* 🎥

https://chat.whatsapp.com/FIJS45TggOACPT1MH7Id1B

➖➖➖➖➖➖
*For More Details Contact :📞Dr.YOGITA THITE*
🪀 *Whatsapp : 9420270093* *

*📞Call : 7030139004*
➖➖➖➖➖➖
💵💵💵💵💵
*Payment Details:*
Gpy/ Ppy

*9420270093*

च्यवनप्राश हे भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासो...
14/04/2023

च्यवनप्राश हे भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.

🌱च्यवनप्राश कशापासून बनवतात🌱

च्यवनप्राशमधील प्रमुख घटक म्हणजे आवळा. आवळ्यातून शरीराला व्हिटामिन सी चा मुबलक पुरवठा होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. एका अभ्यासाच्या अहवालानुसार, च्यवनप्राशाच्या सेवनाने अ‍ॅलर्जीमुळे होणारा दाह, पेशींना होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. च्यवनप्राशमुळे रोगप्रतिकारक पेशींचे कार्य सुधारते. यामुळे इंफेक्शनचे प्रमाण कमी होते.

च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा व इतर 40 रसायनद्रव्ये, रक्तशुद्धीकर द्रव्ये व त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.

वेगवेगळ्या कंपनीच्या च्यवनप्राश मध्ये वेगवेगळे इनग्रेडीयंट असतात, च्यवनप्राश मध्ये साधारणपणे ४० ते ५० प्रकारचे विविध जडीबुटी पदार्थ वापरले जातात. तरी देखील काही कॉमन असे पदार्थ जे च्यवनप्राश मध्ये असतात ते पुढील प्रमाणे -मध, लवंग, आवळा, केसर, तूप, इलायची, बेल, अडुळसा, तुळशी, अश्वगंधा, पिंपळपान, द्राक्ष, तेज पत्ता, निंब, हळद, शतावरी, तिळाचे तेल व साखर इ.

☘️च्यवनप्राश कसे खावे व खाण्या आधी घ्यावयाची काळजी☘️

च्यवनप्राश चे अनेक फायदे आहेत पण हे काही ठराविक लोकांनी न खाल्लेलेच चांगले राहील. चला तर मग जाणून घेऊया की चवनप्राश खाण्याची योग्य पद्धत व ते खाण्या आधी घ्यावयाची काळजी.

*लहान बाळांना म्हणजे साधारण १ वर्षाच्या पुढील व ७ वर्षा पर्यंतच्या मुला मुलींना साधारण अर्धा चमचा च्यवनप्राश दिलेले चांगले.

*दिवसातून एकच वेळा च्यवनप्राश खाल्लेले योग्य राहील.

*च्यवनप्राश सकाळी उपाशी पोटी खाल्लेले चांगले.

*कोमट पाणी आणि च्यवनप्राश देखील तुम्ही घेऊ शकता.

*वय वर्ष ७ ते १२ या वयोगटातील मुलामुलींना एक चमचा च्यवनप्राश देऊ शकता.

*१२ वर्षांच्या पुढील मुलामुलींना दररोज साधारण १ ते २ चमचे च्यवनप्राश दिवसाला खायला द्यावे.

*च्यवनप्राश खाल्ल्या नंतर साधारण अर्धा तास तरी आंबट व मसालेदार पदार्थ पदार्थ खाणे टाळा.

*साधारण १ वर्षाच्या आतील लहान बाळांना च्यवनप्राश खायला देऊ नये.

*ज्या व्यक्तींना श्वसनाचा त्रास आहे अशा लोकांसाठी च्यवनप्राश गुणकारी आहे परंतु त्यांनी ते दुधासोबत खाऊ नये.

*झोपण्या पूर्वी कधीही च्यवनप्राश खाऊ नये,असे केल्यास तुमचे दात लवकर खराब होऊ शकतात.

Dr Yogita Thite (Jagtap)
By Appointment 9420270093
Panchkarm specialist
Garbhsanskar specialist

**Vishwamaya Ayurved Chikistalay and Garbhasanskar center**
35/B Shreepad Sadan, Datta Nagar Datta Mandir, Rahatani.

https://www.facebook.com/yogita.thite89

आजकाल खुप धावपलिच्या कालामद्धे स्त्रियांचि स्वताचि कालजी घेने राहुनच जाते त्यात घारातिल वडिलधारी मंडली जवल नाही त्यामूले...
22/09/2022

आजकाल खुप धावपलिच्या कालामद्धे स्त्रियांचि स्वताचि कालजी घेने राहुनच जाते त्यात घारातिल वडिलधारी मंडली जवल नाही त्यामूले अजुनच प्रोब्लेम
अश्या वेली डिलिव्हरीनंतर काय कालजी घ्यावी ते समजत नाहीं, त्याबड्डल थोडे सांगावे वाटले ,

तर बघुया आयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!

लोकांना वाटतं की स्त्रीची डिलिव्हरी झाली म्हणजे ती सर्व त्रासातून मुक्त झाली, आता तिला कसलाही त्रास वा वेदना होणार नाही. पण मंडळी हा समज चुकीचा आहे. गरोदरपणात स्त्री जेवढा त्रास भोगते तेवढाच त्रास तिला डिलिव्हरी नंतर देखील भोगावा लागू शकतो. त्यातही डिलिव्हरी जर नॉर्मल (tips for normal delivery) झाली असेल तर स्त्री एकवेळा लवकर बरी होते पण सिझेरियन डिलिव्हरी (ceserean delivery)असेल तर त्या स्त्रीला अजून काही काळ अत्यंत वेदनेला सामोरे जावे लागते.

अशा काळात स्त्रीची शक्य तितकी काळजी घेणे गरजेचे असते. या काळात थोडाही हलगर्जीपणा झाला तर तिचा त्रास अधिक वाढूशकतो

सर्वात महत्त्वपूर्ण म्हंनजे स्त्री शरिरात डिलिव्हरी नंतर पुष्कल प्रमनात वात दोष वाढ़लेला असतो म्हनुन गरम वातावरण असलेल्या ठिकानी रहावे, गरम कपड घालावे, कान वाताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे म्हनुन कान सतत बांधवे.

**तेलाने मालिश"**

डिलिव्हरी नंतर स्त्रीने तेलाने अंघोळ करणे गरजेचे मानले जाते. एवढेच नाही तर हळूहळू शरीर पूर्वपदावर आल्यानंतर सुद्धा एक दोन वेळा तेलाने अंघोळ अवश्य करावी. यामुळे स्नायू आणि हाडांना मजबूती मिळते आणि त्वचेला सुद्धा तेज प्राप्त होते शिवाय शरीराला पोषण सुद्धा मिळते.
१ वर्षाने बस्ती पंचकर्म करून घेने.

***गरम पाण्याने अंघोळ***

डिलिव्हरी नंतर स्त्रीला शारीरिक वेदना मोठ्या प्रमाणावर होत असतात. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शारीरिक वेदना आणि तणाव कमी होतो. पोस्‍टपार्टमच नाही तर मासिक पाळी मध्ये सुद्धा पोटदुखी किंवा स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाणी अत्यंत उपयोगी मानले जाते. यामुळे शरीर रिलॅक्स होते

शेक **
वाढ़लेल्या वात दोष शामन करता शेक गरजेचा आहे.
तो घेतल्यास वातमुले आलेला शोथ कमि होतो, त्यामुले वजन आटोक्यात राहान्यास मदत होते.

पोस्‍टपार्टम बेल्‍ट***

आयुर्वेदाच्या अनुसार, पोस्‍टपार्टम बेल्‍ट परिधान केल्याने पोटाला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतो. डिलिव्हरी नंतर वात दोष वाढल्याने पोटात हवा भरते. आयुर्वेदाच्या मते पोस्‍टपार्टम बेल्‍टच्या मदतीने पोटाचा आकार कमी होण्यास खूप मदत होते. शिवाय पोटाचे स्नायू सुद्धा सैल होतात यामुळे मजबुती आणि संतुलन निर्माण होते.

भरपूर आराम करा**

डिलिव्हरी नंतर स्त्रीचे शरीर कमजोर होऊन जाते आणि या स्थितीमध्ये त्यांना बाळाला दूध पाजायचे असते. डिलिव्हरी नंतर सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तर नीट झोप सुद्धा मिळत नाही आणि झोप न मिळाल्याने तणाव निर्माण होतो, सतत चिडचिड होते. अशावेळी स्त्रीने बाळ झोपले की आपली सुद्धा झोप अवश्य पूर्ण करावी. त्यामुळे स्त्रीने शक्य तितका आराम करावा आणि पूर्ण बरे झाल्यावरच घरची जबाबदारी हातात घ्यावी.

आयुर्वेदानुसार डायट कसे हवे?

1) स्त्रीने आपल्या डायट मध्ये हळद, आले, धणे, जीरा आणि बडीशोप यांचा समावेश करावा.

2) या काळात जास्त तुर, हरभरा डाळ खाऊ नये कारण यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.
3) या काळात स्त्रीला आणि बाळाला कॅल्शियमची सर्वात जास्त गरज असते म्हणून दिवसातून दोन ते तीन ग्लास दुध न विसरता प्यावे.
4) तूप आणि पालेभाज्या जास्तीत जास्त खाव्यात आणि अधिकाधिक पाणी प्यावे.

या गोष्टी स्त्रीने आपल्या डायट मध्ये पाळल्या तर तिला डिलिव्हरी नंतरच्या काळात खूप लाभ होऊ शकतात. या नाजूक काळात जी स्त्री आपल्या आहारावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करते तिचे शरीर लवकरात लवकर पूर्ववत होते व ती आपले जीवन सामान्य स्त्री प्रमाणे जगू शकते.

वै योगिता थिटे- जगताप
आयुर्वेद
Rahatani, Pune
9420270093

*बस्ति चिकित्सा*☔☔☔☔☔☔☔☔☔मैत्रिणींनो पावसाळ्यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढू लागले असेल.पावसाळयात वाताचा प्रभाव...
16/09/2022

*बस्ति चिकित्सा*

☔☔☔☔☔☔☔☔☔
मैत्रिणींनो पावसाळ्यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढू लागले असेल.
पावसाळयात वाताचा प्रभाव वाढू लागतो, हवामानातील रुक्षता वाढते त्यामुळे स्वभावताच वाताचे प्राबल्य वाढते अशा परिस्थितीत *शरीरामध्ये देखील वातदोष वाढायला लागतो*.
पावसाळयात वात दोष वाढू नये म्हणून आपण काय केले पाहिजे.

🌱🌱आपण घ्यावयाच्या काळजी 🌱🌱
1) *अभ्यंग*
दररोज अंगाला तेल लावून मसाज करून आंघोळ करणे यामुळे शरीरात वाढ वाढणाऱ्या वातदोषाला अटकाव होतो.

2) *कोष्ण जल*
दररोज कोमट पाणी प्यावे .
शक्यतो बाहेरील पाणी पिऊ नये कारण वर्षा ऋतूमध्ये पाण्यात आम्लता आलेली असते आम्लतेच्या गुणधर्मामुळे ते पाणी पचावास हलके नसल्याने पाणी गरम करूनच प्यावे.

3) *सकस आहार*
बाहेरील चमचमीत पदार्थांचे जेवण टाळावे यामुळे पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारींवर आपण कंट्रोल करू शकतो
रोज रात्री शक्य तितका हलका आहाराचे सेवन करावे.

4) *व्यायाम*
सूर्यनमस्कार , कवायत, चालणे, प्राणायाम,योग ई. सहज सोपे व्यायाम वेळ काढून करणे.

5) *पंचकर्म*
स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म बस्ती चिकित्सा करून घ्यावी. आयुर्वेदामध्ये असं म्हणतात वर्षा ऋतू सुरू झाला की बस्ती द्यावा, बस्ती घ्यावा, सर्वांनी बस्ती घ्या.

तर असं का ते आपण पाहूयात बस्तीला आयुर्वेदानुसार *अर्धचिकित्सा* असं म्हटलेलं आहे

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
"वातोल्बणेषु दोषेषु वाते वा बस्तिरिष्यते । उपक्रमाणां सर्वेषां सोऽग्रणीस्त्रिविधश्च सः ॥ १ ॥ "

वातादिक दोषांवर किंवा केवळ वातावर बस्ति हितकारक आहे. तो *सर्व प्रकारच्या चिकित्सेमध्ये श्रेष्ठ* असून त्याचे निरूह, अनुवासन व उत्तर बस्ति असे तीन प्रकार आहेत.

म्हणजे सर्व पंचकर्म चिकित्सा एका बाजूला आणि फक्त बस्ती पंचकर्म एका बाजूला इतकं महत्त्व बस्ती या चिकित्साला देण्यात आलेला आहे.बस्ती चिकित्सामुळे आपण वातावर जय मिळवतो. त्याचा अर्थ असा की आपल्या शरीरात होणाऱ्या सगळ्या हालचाली चलन वलन हे वाताशी निगडित असतं
वातदोषमुळे इतर दोन दोषांचे कर्म ठीकप्रकारे होऊ शकते. पित्त व कफदोषाची कामे सुद्धा वातदोषावरच अवलंबून आहेत म्हणून वातावरील श्रेष्ठ चिकित्सा बस्ती याला इतके प्राधान्य देण्यात आले आहे.

🌱🌱🌱🌧️🌧️🌧️🌱🌱🌱

*बस्ती म्हणजे काय?*

"बस्तिना दियते इती बस्ति।"
बस्तिने दिली जाते म्हणजे बस्ति .जुन्या काळामध्ये प्राण्यांचे बस्ति (bladder)वापरून बस्ति दिला जात होता त्याला बस्ति चिकित्सा असे म्हणतात.
आता ती पद्धत बदलून त्याच्या जागी सिरिंज किंवा बस्ती पॉटने बस्ती दिला जातो.

अभ्यंग व स्वेदनपूर्वक मलद्वारातुन औषधी काढे व तेल देऊन दुषित दोषांना शरीराबाहेर काढुन शरीर शुध्दी करणे म्हणजे बस्ती.

🌱 *कोणी करावे?*🌱
आयुर्वेदानुसार स्वस्थव्यक्तीसाठी आणि रोगी व्यक्तीसाठी असं दोन्ही प्रकारे पंचकर्म सांगितलेले आहे स्वस्थ व्यक्तींनी पंचकर्म करताना ऋतूनुसार पंचकर्म करावे असे सांगितलेले आहे आता ऋतू नुसार म्हणजे काय तर ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या दोषाचा प्रकोप असेल तो दोष निरहरण करण्यासाठी केलेले पंचकर्म.
जसं की,
>शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन रक्तमोक्षण
>वर्षा ऋतूमध्ये बस्ती मन्याबस्ती कटीबस्ती इत्यादी
>वसंत ऋतु मध्ये वमन हे पंचकर्म सांगितलेले आहेत.

🍀🍀🍀 *रोगी व्यक्तीसाठी*🍀🍀🍀

- पॅरेलिसिस
- गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार,
-संधिवात, वातरक्त, आमवात
-गुल्म, पोटफुगी, अतिरिक्त पोटावरची चरबी( abdominal disturbance, obesity)
-पडसें (upper respiratory infection)
-शुक्र, वात व मल यांचा अवरोध,मलावष्टंभ (constipation, pcod, menstrual problems, infertility issue )
-अश्मरी (stone)
-रजोनाश ( स्त्रियांचा विटाळ बंद होणें ) (menopause syndrome)
- जुनाट वातरोग .

यामध्ये *स्थानिक बस्ती* पण वेगवेगळे केले जातात जसं की हृदयबस्ती , मन्याबस्ती, जानूबस्ती, कटीबस्ती.

🍀🍀मन्याबस्ति (ग्रीवा बस्ति)🍀🍀
या उपक्रमामध्ये मानेच्या ठिकाणी पाळे तयार करुन काही वेळे पर्यंत औषधी तेल पकडुन ठेवले जातात.

उपयोग: स्पाँडिलायटीस, मान आखडणे, दोन्ही हातास मुंग्या येणे,

🍀🍀जानुबस्ती 🍀🍀

गुडघ्याभोवती जानुबस्ती यंत्र लावुन त्यात औषधी तेल विशिष्ट काळ ठेवणे

उपयोग: संधीवात, सांध्याचीझीज होणे, गुडघेदुखी, कुर्चीका ईजा इ.

🍀🍀कटी बस्ती🍀🍀
या उपक्रमामध्ये कंबरेच्या ठिकाणी विशिष्ठ पध्दतीनेकेलेल्या पाळ्यामध्ये काही वेळ पर्यंत औषधी तेल पकडुन ठेवले जाते याशिवाय औषधी तेलांच्या धारा केल्या जातात.

उपयोग: स्पाँडिलायटीस, कटीस्तंभ,
कंबरदुखी, स्लिपडिस्क, सायटिका, पायास मुंग्या येणे,
पाय जड होणे इ.

पंचकर्म उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावेत. त्याने दुष्पपरिणाम होत नाहीत. हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर पंचकर्म उपचार वर्षातून किमान एकदा तरी करून घेतलाच पाहिजे.

क्रमशः
धन्यवाद!!!!

*सार्थ आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, रहाटणी*
*वैद्य योगिता थिटे*
*9420270093*
*MD Ayurved*

पंचकर्म चिकित्सा  पंचकर्म म्हणजे पाच चिकित्सा उपक्रम ज्याने सर्व शरीराची शुद्धी करण्यात येते. आयुर्वेदानुसार वाढलेल्या द...
22/07/2022

पंचकर्म चिकित्सा

पंचकर्म म्हणजे पाच चिकित्सा उपक्रम ज्याने सर्व शरीराची शुद्धी करण्यात येते. आयुर्वेदानुसार वाढलेल्या दोषांना बाहेर काढले जाते.
🌱🌱आता शरीरशुद्धी म्हणजे काय? 🌱🌱
तर आपण घरामध्ये नाही का जाळ्या जळमट्या वाढल्यानंतर घर कसं पूर्ण स्वच्छ करतो मग आपल्याला खूप प्रसन्न जाणवतं जेव्हा आपण आपल्या घरातील सगळा कचरा साफ करून छान चकचकीत करतो.

गाडी बंद पडली नादुरुस्त असेल तर आपण काय करतो ?गाडीची सर्विसिंग करून घेतो तिचं ऑइल चेंज करतो त्यामुळे गाडी व्यवस्थित सुरू होते चालू राहते आणि खूप दिवस आपण ती वापरू शकतो तिची वेळोवेळी सर्विसिंग करून तिचं आरोग्य व्यवस्थित टिकवून ठेवतो

त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या खाण्यापिण्यामधून वातावरणात होणाऱ्या बदलांमधून तसंच आपला विहार यामुळे शरीरामध्ये दोषांचं संतुलन बिघडून , कफ वात पित्त या तिन्ही पैकी कोणता ना कोणता दोष कमी अधिक प्रमाणात वाढतो . त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजार किंवा वेगवेगळे शारीरिक मानसिक त्रास होत असतात.

जसं की काही लोकांना वेळी अवेळी जेवणामुळे म्हणा किंवा खूप वेळा चहा पिऊन ऍसिडिटीचा त्रास होत असतो ज्यामध्ये बरेच जणांचे डोकं दुखतं काही जणांना उलट्या होतात काही जणांना आंबट तिखट ढेकर येऊन पित्त तोंडावाटे पडत काहीजणांना जुलाब होतात तसेच खूप वेळ काम कॉम्प्युटर समोर बसून आपली कंबर दुखते ,पाठ दुखते किंवा काही जणांना पोटाचे विविध त्रास असतात खाल्लेले पचत नाही, भूक लागत नाही काही जणांचे पोट साफ होत नाही, असे एक ना अनेक कारणांमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळे येत असतात पण मग त्यासाठी आपण दरवेळी डॉक्टर कडे जाऊन औषध पाणी करत नाही पण यापासून आपल्याला वेळीच उपचार घेणं पण गरजेचं असतं.
काही जण ऍसिडिटी वर तात्पुरता आराम मिळवण्यासाठी एखादी गोळी घेऊन आराम मिळवतात, काहीजण पाठदुखीसाठी पेनकिलर टेबलेट्स घेऊन आराम मिळवतात, पण रोगाचा समो उच्चाटन काही होत नाही ,तो त्रास दिवसेंदिवस वाढत जातात आणि वेगळेच अनेक अजून आजार उद्भवतात पण याच्यावर जर आपण वेळोवेळी पंचकर्म चिकित्सा करून घेतली आयुर्वेदिक औषधे घेतली तर याचा नक्कीच फायदा आपल्याला होऊ शकतो. पंचकर्मामध्ये वाढलेले दोष योग्य मार्गाने बाहेर काढून रोगाच्या समोर उच्चाटनासाठी चिकित्सा केली जाते.

🌟पंचकर्म कोणते?
वमन विरेचन बस्ती रक्त मोक्षण नस्य या पाच कर्मांना मिळून पंचकर्म असे म्हणतात.

🌱कोणी करावे?🌱
आयुर्वेदानुसार स्वस्थव्यक्तीसाठी आणि रोगी व्यक्तीसाठी असं दोन्ही प्रकारे पंचकर्म सांगितलेले आहे स्वस्थ व्यक्तींनी पंचकर्म करताना ऋतूनुसार पंचकर्म करावे असे सांगितलेले आहे आता ऋतू नुसार म्हणजे काय तर ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या दोषाचा प्रकोप असेल तो दोष निरहरण करण्यासाठी केलेले पंचकर्म.
जसं की,
>शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन रक्तमोक्षण
>वर्षा ऋतूमध्ये बस्ती मन्याबस्ती कटीबस्ती इत्यादी
>वसंत ऋतु मध्ये वमन हे पंचकर्म सांगितलेले आहेत.

पंचकर्म उपचार करताना रोग्याची शक्ती पाहिली जाते. हे उपचार सोसण्याची ताकद रुग्णामध्ये असली पाहिजे. वात, कफ व पित्त हे तीन दोष शरीरात वाढले असतील. सर्व शरीरात पसरले असतील व ते साम अवस्थेत असतील तर ते दोष वाढलेले असूनदेखील पंचकर्माद्वारे तसेच्या तसे बाहेर काढता येत नाहीत.
-->> साम अवस्थेतील रोग्याचे शोधन केल्यास रोग्याला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पाचन, स्नेहन व स्वेदन हे तीन पूर्व उपचार केले जातात व तद्नंतर पंचकर्म उपचार केले जातात.

🌱🌱पंचकर्माचे फायदे🌱🌱

*पंचकर्माने रोग शरीरातून समूळ नष्ट होतो.
*शरीरात अग्नी प्रदीप्त होतो. इंद्रिये प्रसन्न होतात.
*मन व बुद्धी आपापल्या कार्यांमध्ये उत्कर्ष करतात.
*शरीराचा वर्ण व कांती उजळते. त्वचा तजेलदार दिसू लागते.
*कार्यशक्ती म्हणजे स्टॅमिना वाढतो.
*शरीर पुष्ट व भारदार होते.
*वृद्धावस्था लवकर येत नाही.
*संतती नसलेल्यांना संततीप्राप्ती होते.
*निरोगी अवस्थेत दीर्घायुष्य मिळते.

पंचकर्म उपचार तज्ज्ञ व्यक्तिच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. त्याने दुष्पपरिणाम होत नाहीत. हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर पंचकर्म उपचार वर्षातून किमान एकदा तरी करून घेतलाच पाहिजे.

वैद्य योगिता थिटे.
आयुर्वेद तज्ञ

उत्तरबस्तीगर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत.वंध्यत्...
09/05/2022

उत्तरबस्ती
गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत.वंध्यत्वावर उत्तम उपयोग होतो.

उत्तरबस्ती चिकित्सा : गर्भावस्थेसाठी पाेषक
पंचकर्म मध्ये उत्तरबस्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गर्भाशयात दिली जाणारी आणि दुसरी मूत्रमार्गात दिली जाणारी.
अ) गर्भाशयात दिली जाणारी उत्तरबस्ती :हा विधी फक्त विवाहित स्त्रियांमध्येच करता येतो. त्यातही पाळीच्या ५ व्या ते ८ व्या दिवसांपर्यंतच गर्भाशयाचे मुख खुले असल्याने हा विधी करता येणे शक्य होते. इतर वेळी गर्भाशयात उत्तरबस्ती करता येत नाही.जिथे गर्भाशयात उत्तरबस्ती शक्य नसतो त्या ठिकाणी योनीपिचू हा विधी करावा लागतो.

फायदे : वारंवार होणारे गर्भपात, पीसीओडी, पाळीतील अनियमितता, ट्युबल ब्लाॅक, विविध कारणांनी असलेले वंधत्व यासारख्या आजारात उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. गर्भाशयाला बल देण्यासाठीसुद्धा उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत, असा अनुभव आहे.

ब) मूत्रमार्गात दिली जाणारी उत्तरबस्ती :
फायदे : मूत्रप्रवृतीवर नियंत्रण नसणे, खोकताना-शिंकताना मूत्रप्रवृती होणे, युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) पुरुषामध्ये पौरुषग्रंथी वृद्धी (प्रोस्टेट ग्लॅड), अडखळत मूत्रप्रवृती होणे यात उपयोग होतो. पुरुषांमध्ये मूत्रमार्ग व वीर्यस्रावाचा मार्ग एकच असल्याने वीर्यासंबंधी दोषांमध्येसुद्धा उत्तरबस्ती उपयुक्त ठरते. त्यामुळे शुक्रजंतूची संख्या कमी असणे, शुक्राणूंचे बल किंवा गती कमी असणे, अशा विविध कारणांमुळे पुरुषांत येणाऱ्या वंध्यत्वावर उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो.

Place

https://www.facebook.com/saarthayurved/

श्वेतप्रदरयोनिमार्गतुन श्वेत पाण्यासारखा द्रव पदार्थ स्त्रवनेयाची अनेक कारणे असु शकतात, अतिमैथुन, अतिशोक, अतिश्रम, वातप्...
06/05/2022

श्वेतप्रदर

योनिमार्गतुन श्वेत पाण्यासारखा द्रव पदार्थ स्त्रवने
याची अनेक कारणे असु शकतात, अतिमैथुन, अतिशोक, अतिश्रम, वातप्रकोप इत्यादि मूले.
हा स्त्राव वेदनारहित असतो , पालिच्या पूर्वी होतो, तर नैसर्गिक असतो,परंतु जर अतिप्रमानात स्त्राव असेल तर इन्फेक्शनच असू शकते.

**योनीमार्गात होणाऱ्या इन्फेक्शनची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे उपाय :**

स्त्रियांना योनीमार्गात होणारे फंगल इन्फेक्शन म्हणजे यीस्ट इन्फेक्शन होय. कॅंडीडा एल्बिंकास नावाच्या फंगस पासून ते होते. योनीमार्गात फंगस आणि बॅक्टेरिया यांचा प्रादुर्भाव झाला की अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.
स्त्री याना लवकर होते ,, का ते आपन बघु....

यीस्ट इन्फेक्शन म्हणजे काय?

स्त्रियांच्या योनीमार्गात थोड्याफार प्रमाणात यीस्ट असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु एखाद्या संसर्गाने किंवा सॅनिटरी पॅड, टॅम्पून्स यांच्या वारंवार वापरामुळे यीस्टच्या प्रमाणात वाढ होऊ शकते ते स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही.

योनीमार्गात येणारा घाम, अस्वच्छ आतील कपडे , डिओडरंट यामुळेदेखील असे इन्फेक्शन होऊ शकते.

जास्त ऍसिडीक साबण वरल्यामुळे देखील असे इन्फेक्शन होऊ शकते.

तसेच गरोदर स्त्रियांमध्ये अशा प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण जास्त असते. वेळेवर याचा उपाय केला नाही ही तर बाळाच्या जन्माच्या वेळी त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो.

योनीमार्गातील इन्फेक्शनची लक्षणे

१. योनीमार्गातून घट्ट आणि पांढरा स्त्राव बाहेर येणे.(श्वेतप्रदर)

२. योनीमार्गात आणि आजूबाजूच्या त्वचेला खूप खाज येणे.

३. योनीमार्ग आणि आजूबाजूची त्वचा लाल होणे.

४. संभोग करताना वेदना होणे.

५. योनीमार्गातून होणाऱ्या स्त्रावाला दुर्गंधी येणे.

६. योनीमार्गात वेदना होणे.

ही आहेत योनीमार्गातील यीस्टच्या इन्फेक्शनची लक्षणे. अशा प्रकारचा संसर्ग पुरुषांना देखील होऊ शकतो परंतु स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.

***योनीमार्गातील यीस्टचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी***

शारीरिक स्वच्छता न राखणे हे या इन्फेक्शनचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे गुप्तांगाची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.

१. स्वच्छ आणि सुती अंतर्वस्त्रे वापरावीत.

२. नायलॉन, रेयॉन इत्यादी सिंथेटिक कापडाची अंतर्वस्त्रे वापरणे टाळावे. असे कपडे ओले झाल्यानंतर लवकर वाळत नाहीत त्यामुळे इन्फेक्शन मध्ये वाढ होते.

३. वजन आटोक्‍यात ठेवावे. अशा प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण स्थूल लोकांमध्ये जास्त आहे.

४. रासायनिक पदार्थांनी युक्त असणारे सॅनिटरी पॅड, टेम्पून्स कालजी घ्यावी.

५.योनिमार्गाच्या स्वच्छतेसाठी खूप तीव्र ऍसिडीक साबण वापरू नये.

६. कोणत्याही संसर्गापासून वाचण्यासाठी आहार चांगला असणे अतिशय आवश्यक आहे त्यामुळे पौष्टिक आणि संतुलित आहार नियमित घ्यावा.

**योनीमार्गातील इन्फेक्शन वर करण्याचे घरगुती उपाय:-

१. आवला बीज गर (मज़्ज़ा) मध व साखर मिसलून खाने.

२. योनिमार्गाच्या स्वच्छतेसाठी गरम पानी, खायचा सोडा ( चिमुट) वापर करावा.

३. दूध शतावरी सेवन करावे.

४. शारीरिक स्वच्छता न राखणे हे या इन्फेक्शनचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे गुप्तांगाची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.

५.नारळाचे तेल

नारळाचे तेल/ खोबरेल तेल संसर्गावर विशेष गुणकारी असते. योनिमार्गाच्या आजूबाजूच्या संसर्ग झालेल्या भागात सलग दोन-तीन दिवस खोबरेल तेल लावावे. इन्फेक्शन कमी होते तसेच लालसरपणा आणि खाज येणे कमी होते.

६. कोणत्याही संसर्गापासून वाचण्यासाठी आहार चांगला असणे अतिशय आवश्यक आहे त्यामुळे पौष्टिक आणि संतुलित आहार नियमित घ्यावा.

परंतु हे उपाय वापरुनही इन्फेक्शन बरे झाले नाही अथवा सलग तीन दिवसांपेक्षा जास्त इन्फेक्शन होत राहिले तर स्त्रीरोगतज्ञ यांचा सल्ला अवश्य घ्या.

वैद्यांच्या सल्ल्याने योनिधावन, योनिधुपन, योनिपिचू चिकिस्ता करून घेने.

वै योगिता थिटे.

Started with New batch..
27/03/2022

Started with New batch..

हा विषय तसा जुनाच आहे पण तरी हि आज तुमच्या सोबत शेअर करावा अस् वाटतोय.    रमा आली, मला भेटायला  तेव्हा सांगत होतीरमा: अग...
07/02/2022

हा विषय तसा जुनाच आहे पण तरी हि आज तुमच्या सोबत शेअर करावा अस् वाटतोय.

रमा आली, मला भेटायला तेव्हा सांगत होती
रमा: अग माझा मुलगा रात्री खूप त्रास देतो, झोपतच नाही लवकर मग मला ही झोपायला उशीर होतो, मग सकाळी नुसती गड़बड़ गड़बड होते. काय करू काय नाही सुचतच नाही.

मी : (तिचा मूलगा जेमतेम ३-४ वर्षांचा असेल.)
का ग ?

रमा: अग नुसता पाय आपटत असतो.
(मग मला समजले काय् प्रोब्लेम असेल तो.)
तिला उपाय संगितला तर तिला विश्वास बसला नाही.
पण काही दिवसानी तीचा फोन आला खूप फरक जाणवतोय.

अशी तक्रार कदाचित पुष्कळ पालकांची असेल.
लहान मुलाना काही वेळेस काय होत आहे हे संगता येत नाही . मग ते त्यांच्या कृतीतून त्या गोष्टी सांगायचा किंवा मागायचा प्रयत्न करत असतात.

खर सांगायचे, अस का होते, अहो मुले इतके खेळतात, उट बस करतात, धावतात , सतत कही तरी धावपळ चालू असते, त्यामुले त्यांची energy सतत वापरली जाते मग पोषण आहार ( proteins) नाही मिळाले कि मग सतत पाय दूखू लागतात विशेष म्हणजे रात्रि हा त्रास् जास्त होतो म्हणून मग मूल रात्री खूप रडतात.

"याला ग्रोयिंग पेन ( growing pain) असे म्हणतात"
-हे सगळ्याच मुलांमध्ये थोड्याफार प्रमानात असतेच. वाढत्या वयामुळे हाडाची वाढ होत असते म्हनुनच हे ग्रोयिंग पेन लहान मूलामधे बघयला मिळते.

-हे विशेषता करुन मांड्या ,गुड़घे च्या मागे, पोटर्या (thighs, back of knees, calf muscles) इथे जानवते.

-रात्री जास्त असते.

- मुली मध्ये अधिक असते.

*पालक म्हणून आपल्यला काय केले पाहिजे अस तुम्हाला वाटत असेल*

१)यासाठी कोणतेही औषध घेण्याची आवश्यकता नाही.
२) रोज रात्री झोपण्यापूर्वी CBL Oil ने पायास मसाज वा पाय चेपणे हे नित्य नेमने करावे.
३) रोज सकाळी 6 ते 7 दरम्यानचे कोवळे ऊन अंगावर पडू द्यावे.
( Vitamin D फक्त कोवळ्या ऊनातच तयार होते जे Bony Epiphysis growth करते.)
४) आहारात नियमित देशी गायीचे दूध सेवन करावे.
५) कॅलशियमसाठी आवळा, कड़ीपत्ता, गावरान अंडी आहरात समविष्ट कारावी.

Growing Pain हा काही आजार नाही म्हणून कोणीही न घबरता वरील उपाय करावे. खूप अधिक प्रमाणमध्ये त्रास असेल तर जवळच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा.
लेख आवडल्यास नावासह नक्की फोर्वर्ड करा.

Dr Yogita Thite-Jagtap

सुवर्णप्राशन म्हणजे काय ?  सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक मेध्य औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते.  नवजात...
22/11/2021

सुवर्णप्राशन म्हणजे काय ?

सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक मेध्य औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते. नवजात बालकांपासून ते 16 वयोवर्षाच्या मुलांपर्यंत सार्‍यांना या औषधांचे काही थेंब दिले जातात. पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुलांवर 'सुवर्णप्राशना'चे संस्कार करणे अधिक हितावह ठरते. यामुळे मुलांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.

फायादे:-
१) रोग प्रतिकार शक्ती वाढते.
२) सर्व प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण होते.
३)भूक वाढते ,पचन नीट होते.
४) रंग सुधारतो.
५) स्मरणशक्ती वाढते. बुद्धी कुशाग्र बनते

पार्सल सुविधा* व *देशामध्ये कुठेही कुरियर* ची सुविधा उपलब्ध ( कुरियर चार्जेस वेगळे )

स्थळ:-

*विश्वमाया आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र*
३५ ब, श्रीपाद सदन, दत्त नगर मेन रोड, रहाटणी, पिंपरी ४११०१७

वेळ :- 25 November 2021
*सकाळी 9.30 ते रात्री 8*

Contact
Dr Yogita Thite
9420270093

Royal Abhyanga Snan Kit :-
24/10/2021

Royal Abhyanga Snan Kit :-

UbtanAll prepration with Sugandhi vanspati and skin nourishing vanspati.Benefits :---Helps in losing weight--Improves sk...
20/10/2021

Ubtan

All prepration with Sugandhi vanspati and skin nourishing vanspati.

Benefits :-

--Helps in losing weight
--Improves skin complexion.
--Helps to relieve stress and induce relaxation.
--Stimulates fat metabolism.
--Highly beneficial for people with diabetesand obesity.

15/10/2021
1) Abyang oilIt is made with all ayurvedic drugs like dashmool, bala, ashwganda and all other vat passifying dravya and ...
13/10/2021

1) Abyang oil

It is made with all ayurvedic drugs like dashmool, bala, ashwganda and all other vat passifying dravya and sugandi dravya with process according to granthas.

Nourishes the entire body—decreases the effects of aging
Softens and smoothens skin; wrinkles are reduced and disappear

2)Ubtan

All prepration with Sugandhi vanspati and skin nourishing vanspati.

Benefits :-

--Helps in losing weight
--Improves skin complexion.
--Helps to relieve stress and induce relaxation.
--Stimulates fat metabolism.
--Highly beneficial for people with diabetesand obesity.

UdwartanUdvartana has been included as a part of Dinacharya (daily healthy regimen) and can be done daily.  Udvartana is...
25/09/2021

Udwartan

Udvartana has been included as a part of Dinacharya (daily healthy regimen) and can be done daily.

Udvartana is a treatment based on powders composed of minerals, herbs and medicinal species. Then, Udvartana massage stimulates the metabolic process. So, the use of powders, either dry or applied after oil massage, has a mild dermis-abrasive effect, ideal for removing impurities and treating stains and eruptions. So, its active components contribute to purify and activate the metabolism of the skin, and is especially suitable for circulatory disorders, cellulite, fluid retention, obesity etc.

Types of Udwarthana –

Snigdha (oily) – also called Utsadana
and rooksha (dry) – called Udgharshana

Snigdha Udwarthana –

अस्नेह औषध चूर्णादिभिः घर्षणम् उद्घर्षणम्।{डल्हण, सु.चि.२४/५२}

Rubbing the powders of medicinal drugs over the body without the addition or admixture of oil or ghee is called Udgharshanam

उद्वर्तनं चात्र प्रविलापनीय विम्लापन करम्।
उद्घर्षणम् स्नेह औशध चूर्णादिभिः घर्षणम्॥
स्नेहस्य कल्केन उद्घर्षणं उत्सादनम्।{डल्हण सु.चि.२४/५

2) Ruksha Udvartana –
Ayurvedic Powder Massage

The heated herbal powder is applied to the body with fast upward massage strokes.
As this is a dry massage, herbal oil isn’t applied during the treatment. Dpending on the purpose of the Udvartana treatment it can be followed with a herbal steam to increase the detoxification benefits.

Benefits

उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलापनम्।
स्थिरीकरणम् अङ्गानां त्वक् प्रसादकरं परं॥{अ.हृ.सू.२/१५}
Ref – Ashtanga Hridaya Sutra Sthana Ch.2, verse 15

दौर्गन्ध्यं गौरवं तंद्रा कण्डू मलम् अरोचकम्।
स्वेद बीभत्सतां हंति शरीरपरिमार्जनम्॥{च.सू.५

Benefits of Udvartana

Helps in losing weight

Improves skin complexion.

Helps to relieve stress and induce relaxation.

Removes blockages in blood vessels.

Stimulates fat metabolism.

Reduces and balance vata and kapha.

Highly beneficial for people with diabetesand obesity.

Abhyang  बर का मित्रनों , आपल्या आचर्यानी खूप आदिच सांगितले आहे"अभ्यंग आचरेत नित्यम सजराश्रमवातः ।दृष्टिप्रसादपुषट्यायु:...
22/09/2021

Abhyang

बर का मित्रनों , आपल्या आचर्यानी खूप आदिच सांगितले आहे

"अभ्यंग आचरेत नित्यम सजराश्रमवातः ।
दृष्टिप्रसादपुषट्यायु: स्वप्नसुत्वकदार्ढयकृत ।।"

अ. हृ. सु. २
अभ्यंग स्नान हे काय फक्त दिवालीत नाही तर नेहमी केल गेल पाहिजे,

***अभ्यंगस्नान म्हणजे काय ?***

रोज सकाली आंघोल कारण्याआधी सर्वाँगाला तैल लावुन मालिश केली पाहीजे , त्यासाठि तिल तैल किंवा एतर औषधींतैलचा उपयोग करु शकतो.

फायदे:-

१) वार्धक्य दूर करते, चिर तारून्यासाठी
२) थकवा दूर करते , फ्रेश वाटते
३) वाताची दुखनी कमी करते
४) दृष्टि सुधारते
५) पुष्टि - मसल टोन सुधारतो
६) आयुष्य वाढ़वते
७) झोप शांत येते
८) कांती उजलते
९) रक्तप्रवाह सुरलित करते

Benefits of Abhyanga

Nourishes the entire body—decreases the effects of aging

Imparts muscle tone and vigor to the dhatus (tissues) of the body

Imparts a firmness to the limbs

Lubricates the joints

Increases circulation

Stimulates the internal organs of the body

Assists in elimination of impurities from the body

Moves the lymph, aiding in detoxification

Increases stamina

Calms the nerves

Benefits sleep—better, deeper sleep

Enhances vision

Makes hair (scalp) grow luxuriantly, thick, soft and glossy

Softens and smoothens skin; wrinkles are reduced and disappear

Pacifies Vata and Pitta and stimulates Kapha.

20/09/2021

गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत.वंध्यत्वावर उत्तम उपयोग होतो.

उत्तरबस्ती चिकित्सा : गर्भावस्थेसाठी पाेषक
पंचकर्म मध्ये उत्तरबस्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गर्भाशयात दिली जाणारी आणि दुसरी मूत्रमार्गात दिली जाणारी.

अ) गर्भाशयात दिली जाणारी उत्तरबस्ती

फायदे : वारंवार होणारे गर्भपात, पीसीओडी, पाळीतील अनियमितता, ट्युबल ब्लाॅक, विविध कारणांनी असलेले वंधत्व यासारख्या आजारात उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. गर्भाशयाला बल देण्यासाठीसुद्धा उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत, असा अनुभव आहे.

ब) मूत्रमार्गात दिली जाणारी उत्तरबस्ती :

फायदे : मूत्रप्रवृतीवर नियंत्रण नसणे, खोकताना-शिंकताना मूत्रप्रवृती होणे, युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) पुरुषामध्ये पौरुषग्रंथी वृद्धी (प्रोस्टेट ग्लॅड), अडखळत मूत्रप्रवृती होणे यात उपयोग होतो. पुरुषांमध्ये मूत्रमार्ग व वीर्यस्रावाचा मार्ग एकच असल्याने वीर्यासंबंधी दोषांमध्येसुद्धा उत्तरबस्ती उपयुक्त ठरते. त्यामुळे शुक्रजंतूची संख्या कमी असणे, शुक्राणूंचे बल किंवा गती कमी असणे, अशा विविध कारणांमुळे पुरुषांत येणाऱ्या वंध्यत्वावर उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो.

Address

Pimpri-Chinchwad
Pimpri
411017

Telephone

+917972908389

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwamaya Ayurved Chikistalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vishwamaya Ayurved Chikistalay:

Videos

Share

Nearby clinics