Wellness Consulting by Dr. Vrushali Raut

Wellness Consulting by Dr. Vrushali Raut We create "Happy Workplaces" by providing

- Well-being solutions
- Assessments
- Counselings
- Tr Our mission is to create happy workplaces for every Indian.

India is emerging as the fastest growing economy but rapid industrialization is also impacting public health index of India. We strongly believe that a healthy functioning employee is the best asset for any organization and "Happy Workplaces" aims to help organizations to achieve it.

उद्या शनिवार, २२ मार्च, २०२५ रोजी सकाळी ११ ला होणार्‍या या दीड तासाच्या ग्रुप सेशनच्या रजिस्ट्रेशन व फी संबधित माहितीसाठ...
21/03/2025

उद्या शनिवार, २२ मार्च, २०२५ रोजी सकाळी ११ ला होणार्‍या या दीड तासाच्या ग्रुप सेशनच्या रजिस्ट्रेशन व फी संबधित माहितीसाठी 9822509226 यावर सकाळी ९ ते सायंकाळी ८ च्या दरम्यान संपर्क करा.
#मराठी #मन

२०२४ संपत आले आहे. या वर्षात काय कमविले याचा लेखाजोखा केल्यास हे वर्ष  माझ्यासाठी "भावनिक संपत्ती" वाढविणारे ठरले. अर्था...
30/10/2024

२०२४ संपत आले आहे. या वर्षात काय कमविले याचा लेखाजोखा केल्यास हे वर्ष माझ्यासाठी "भावनिक संपत्ती" वाढविणारे ठरले. अर्थात या चांगल्या बदलाची सुरवात गेल्या दिवाळी पासून झाली असे म्हणता येईल.

मे २०२२ मध्ये कोविड झाल्यावर ओमिक्रोनच्या संसर्गाने ब्रेन फॉग अनुभवला. सोबतीला फुफ्फुसांवर चांगलाच परिणाम झाला त्यामुळे बुद्धी व शरीर हे दोन्हीही मंद झालीत. सक्तीची विश्रांती माझ्यासाठी एक प्रकारे शिक्षा ठरली कारण अश्या पद्धतीने आजारपण हे कधीच आले नव्हते. मात्र ही शिक्षा भोगताना आयुष्याला नवीन दिशा मिळाली. जवळपास १० महिने मी काहीच केले नाही. त्यांनतर मार्च २०२३ पासून घरातून झेपेल असे काम सुरु केले. या कामात अर्थात वाचन व लिखाण असल्याने मी ते मनापासून एन्जॉय केले, त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

या संपूर्ण काळात अगदी बोटावर मोजण्याइतकी लोक सोडलीत तर मी एकटीच होते. या एकटेपणात मी भरपूर वाचन केले व त्यावरून माझे दुसरे पुस्तक आकारास आले. या काळात मला खऱ्या अर्थाने नात्यांची किंमत कळली. पैसा येतो आणि जातो, कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्षात आधार देणारी नाती हीच खरी संपत्ती आहे☺️

अनेक वर्ष कॉर्पोरेट मध्ये काम केल्याने दुःख दाबून कामात झोकून मी मुखवटा घालून वावरले. हा मुखवटा या काळात मी प्रयत्नपूर्वक काढून फेकला. टोकाच्या कठीण भावना नाकारल्या हे लक्षात आले. म्हणून मी स्वतःला वेळ दिला, स्वतः मध्ये जाणीवपूर्वक बदल केलेत, अश्या अनेक गोष्टी हिंमतीने केल्यात ज्या आधी टाळल्या होत्या. या प्रक्रियेत अर्थात self reflection म्हणजे स्वतःला जसे आहे तसे बघितले. गेली अनेक वर्ष काही ठिकाणी मी स्वार्थी व उतावळेपणाने वागले कारण नात्याला द्यायला जी ऊर्जा लागते ती माझ्याकडे नव्हतीच अश्याना मी उद्धट किंवा अहंकारी वाटली असेल म्हणून त्यांना फोन व मेसेज करून परिस्थिती सांगितली.

आपले मन अशांत असले कि आपण त्या मनाला शांत करण्यात आपली ऊर्जा घालवितो अश्या वेळी आपल्या आजूबाजूच्या नात्यांवर दुष्परिणाम होतो. गेल्या १०-१२ वर्षात सोशल मीडिया मुळे बदललेला समाज हा एकटेपणा वाढवायला कारणीभूत आहे. यशस्वी व आनंदी असाल तरच लोक तुमच्याशी संबंध ठेवतात. दुःख, अपयश व निराशा असेल तर लोक टाळतात. त्यामुळे लोक थोडं देखील दुःख व अपयश आले कि त्याचा सामना न करता आयुष्य संपवितात. भावनांना अनुभवणे व त्या योग्य पणे व्यक्त करणे हे स्वतःसाठी व नात्यासाठी सर्वात गरजेचे आहे.

आपल्याकडे रक्ताची, जातीची व व्यवहाराची नाती असतात, त्यात भावनांना स्थान नसते.

स्वतः मधील हा बदल मला समुपदेशन करण्यात कामी आला.
फेब्रुवरी २०२४ पासून मी नियमितपणे वैयक्तिक व कॉर्पोरेट पातळीवर समुपदेशन व प्रशिक्षण करायला सुरवात केली. निव्वळ पुस्तकातून शिकून समुपदेशन करण्यापेक्षा आलेल्या अनुभवांच्या आधारे लोकांना मार्गदर्शन करणे वेगळे असते. सर्व मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी व अभ्यासकांनी आधी स्वतः ला वेळ द्यावा असे मला आवर्जून सांगावसे वाटते.

गेल्या ९ महिन्यात ६५५ च्या वर लोकांना मार्गदर्शन केले आहे. अर्थात यामध्ये वैयक्तिक पातळीवरील समुपदेशन हे वेळखाऊ व भावनिक रित्या कठीण असले तरी त्यातून अनेकांना चांगली दिशा मिळाली आहे. बऱ्याच लोकांनी मात्र एक-दोन सेशन नंतर प्रयत्न सोडून दिलेत. शक्यतो डिप्रेशन, चिंता, ताण व मानसिक आघात यावर मी समुपदेशन करते. या सर्व अनुभवातून मी पण शिकत गेले.

बालसंगोपन व पालकत्व हे आपल्या भावनिक आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम करते. समुपदेशनाला येणाऱ्या लोकांना आरसा दाखविला जातो ज्यातील आपली प्रतिमा अनेक लोक बघू शकत नाही. दुसऱ्यांनी बदलाव , मी बदलणार नाही असे म्हणणारी लोक त्यांच्या नात्यांना याचा त्रास होतो हे समजू शकत नाही.

दाबलेले भावनिक त्रास हे शारीरिक व्याधीतून बाहेर येतात उदा बीपी, शुगर, झोपेच्या समस्या, पोटाच्या समस्या, लैंगिक समस्या, स्मरणशक्तीवर दुष्परिणाम, लक्ष विचलित राहणे ज्यामुळे अर्थात नाती व आर्थिक बाबींवर परिणाम होतो.

स्त्रियांच्या तुलनेत पुरुष समुपदेशन करण्यासाठी जास्त येतात, अनेक जण केवळ एक किंवा दोन सेशन मध्ये सकारात्मक बदल अनुभवतात. करोनानंतर वाढलेल्या डिजिटल संवादामुळे आलेला एकटेपणा, समाजातील भावनिक बधिरता ज्यात सोशल मीडियाने भर घातली आहे.

समुपदेशकाने काही सांगितलं तर ते ऐकून आपल्या वागण्यात बदल करणे व तो बदल वागण्यात रुजविणे याला वेळ लागतो. त्यातही नातं कसे निभवायचे याचे अनेकांना ज्ञान नसल्याने एकटेपणा वाढतो मात्र काही सेशन नंतर लोकांमध्ये सुधार दिसून येतो.

समुपदेशन हे त्या व्यक्तीला नवीन दृष्टिकोन देत. जुनी विचार करण्याची किंवा आयुष्य जगण्याची पद्धत जी अहितकारी आहे ती बदलून नवीन हितकारी पद्धत आत्मसात करणे हेच समुपदेशनाचे उद्दिष्ट आहे.

पैसा, यश, झटपट प्रसिद्धी, सत्ता ही कधीच मन:शांती देत नाही, व्यक्ती नात्यातून जन्माला येते, नात्यांसोबत जगते व नात्यांमुळेच मृत्यूनंतर देखील स्मरणात राहते.

या दिवाळीत लक्ष्मीपूजन तर धड्याक्यात कराच सोबत आतापर्यंत आपण नात्यात किती गुंतवणूक केली व आपली प्रेमाची ठेव किती जमा झाली याचा पण जरा हिशोब करा.

यावर्षीच माझी तरी "प्रेमाची ठेवी" मजबूत झाली आहे🥰😍
#मराठी #दीपावली #दिवाळी #मन #प्रेम #भावना

प्रत्येक भारतीयाला टाटा समूहात काम करायची इच्छा आहे मात्र टाटा समुहासारखा बिझनेस करावा असे मात्र किती भारतीयांना वाटत कि...
29/10/2024

प्रत्येक भारतीयाला टाटा समूहात काम करायची इच्छा आहे मात्र टाटा समुहासारखा बिझनेस करावा असे मात्र किती भारतीयांना वाटत किंवा किती भारतीय टाटा समूहाचे बिझनेस मॉडेल वर त्यांचा व्यवसाय चालवितात?

रतन टाटा यांच्या जाण्याने गेले काही दिवस आपण घरातील व्यक्ती गेल्यासारखा शोक अनुभवला. याअगोदर देखील अनेक मोठे व्यावसायिक पडद्याआड गेलेत पण रतन टाटा यांच्या जाण्याने संपूर्ण भारत व जगभरातील भारतीय दुःख अनुभवत आहोत.

आधुनिक भारताबद्दल ज्या काही मोजक्या गोष्टींचा सच्चा अभिमान असेल तर त्यातील एक टाटा समूह आहे.

पारसी समूहाचे भारतासाठी योगदान हे इतके आहे की आपण त्यांच्या शिवाय आजच्या भारताचा विचार करू शकत नाही. १२०० वर्षाच्या अगोदर भारतात आश्रयास आलेल्या पारसी समूहाने "आम्ही दुधात साखर विरघळते तसे भारतात राहू" हे वचन पूर्णपणे निभावले.

काँग्रेसचे सह संस्थापक दादाभाई नौरोजी, टाटा समूहाचे संस्थापक, जमशेदजी टाटा, भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, शास्त्रज्ञ डॉ होमी भाभा हे व असे अनेक क्षेत्रातील दिग्ग्ज हे पारसी समूहातील आहेत. अत्यंत कमी लोकसंख्या असूनही भारतासाठी पारशी समाजाचे अमूल्य असे योगदान आहे. १२०० वर्षाच्या अगोदर पारशी समाजाच्या पूर्वजांनी जे वचन भारताला दिले होते त्याची पूर्तता आजही होत आहे. हा कलियुगातील चमत्कार म्हणावा लागेल.

माणूस म्हणून जन्माला एकटं आलो असलो तरी जन्माला घालायला आई वडील व आपल्याला घडविण्यात असंख्य लोकांचे योगदान असते. एवढं असूनही आयुष्यात कोणतेही यश मिळल्यावर आपण ते आपलं समजतो. सर्व प्रकारची नाती आपल्याला सामाजिक ओळख देतात, मानसिक तोल सांभाळतात. भारतीय समाजातील अनेक परंपरा या नात्यांना साजऱ्या करणाऱ्या आहेत. जिवंत व्यक्तीच नव्हे तर निसर्गाचे आपण देणे लागतो.

गेल्या ४० वर्षाच्या काळात भारतातच नाही तर जगभरात अमेरिकन संस्कृती हावी झाली आहे. अमेरिकन सिनेमा, केबलच्या काळात अमेरिकन सिरीयल व त्यांनतर OTT, सोशल मीडिया यामुळे अमेरिकेसारखा "आत्मकेंद्रित" समाज जगभरात उदयास आला आहे.

भारत आता अमेरिकेची भ्रष्ट कॉपी म्हणून जगत आहे. अमेरिकेचे "झटपट" बिझिनेस मॉडेल असो किंवा लग्नाचे मॉडेल आता भारतात चलनात आहे. डोपामिन म्हणजे आनंद जिथून मिळेल तेवढा उपभोगायचा व मग बोर झालं कि नवीन काहीतरी करायचे अश्या एकटेपणाच्या चक्रव्यूहात भारत अडकल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या सुरु प्रचंड वाढल्या आहेत. झटपट पैसा, सांपत्तिक गोष्टी, या मिळविण्याच्या नादात आपण आपली खरी संपत्ती म्हणजे "नाती व आरोग्य" गमावलं आहे.

पारशी व त्यातही टाटा समूहाकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे सतत वैयक्तिक स्वार्थाचा विचार करण्याऐवजी वैयक्तिक व सामाजिक या दोन्ही घटकांचा तोल साधत आयुष्य जगायला शिकणे, किंबहुना सामाजिक पैलू हा नेहमीच मोठा राहील कारण आपण समाजामुळे आहोत, आपली शारीरिक व मानसिक रचनाच ही समूहात राहायला झाली आहे. आपण एकटे जगूच शकत नाही हे विज्ञान सांगत. कोणताही व्यवसाय करताना निव्वळ नफ्याचा विचार न करता ज्या समाजातील विविध साधन (निसर्ग व मनुष्यबळ) वापरून आपण व्यवसाय चालवितो त्याचा विचार करायलाच हवा. ते बहुतेकांनी न केल्याने निसर्गाचा तोल बिघडला आहे.

टाटा समुहासारखा कामगार व कर्मचारी केंद्रित बिझिनेस भारतात दुसरा नाही. employee welfare/कर्मचारी कल्याण चे सर्वात जास्त आधुनिक प्रयोग टाटा मध्ये झाले आहेत. भारतात आठ तास काम, कर्मचाऱ्यांना पेन्शन, त्यांना प्रेरणा द्यायला प्रशिक्षण हे व अश्या अनेक गोष्टी टाटा समूहात पहिल्यांदा सुरु झाल्यात.
alcoholic anonymous/AA असो किंवा अगदी ताज हॉटेल वरील हल्ल्यात शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला आजन्म समुपदेशक देणे हे काम फक्त रतन टाटाच करू शकले.

आजही बहुतेक भारतीय उद्योग कर्मचारी/कामगार यांच्या मानसिक आरोग्याला पुरेसे महत्व देत नाहीत.

टाटा मोटर्स मध्ये मला काही वेळा ट्रेनिंगची संधी मिळाली व कामगारांचे मानसिक आरोग्य हे पुस्तक टाटा मोटर्सच्या HR कडून मागविण्यात आले हे माझ्यासाठी अभिमानाची बाब राहील.

वैयक्तिक तोल व सामाजिक शांतता या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
आत्मकेंद्रितपणा सोडून सामाजिक भान ठेवत वैयक्तिक व व्यावसायिक नाती सांभाळत, कठीण काळात एकमेकांना साथ देत भारताच्या प्रगतीत हातभार लावणे हीच रतन टाटांना खरी आदरांजली राहील🙏🙏🙏🙏

#रतनटाटा

निसर्गाच्या व विज्ञान हे दोन्ही मनाला व शरीराला "शांतता" हवी हे सांगत. सर्व थेरपी व समुपदेशन देखील त्या व्यक्तिला शांतता...
02/10/2024

निसर्गाच्या व विज्ञान हे दोन्ही मनाला व शरीराला "शांतता" हवी हे सांगत.

सर्व थेरपी व समुपदेशन देखील त्या व्यक्तिला शांतता मिळावी म्हणून काम करतात.

महात्मा गांधींनी केलेले सत्याचे व शांतीचे प्रयोग हे सर्वात अवघड होते.

एक व्यक्ति म्हणून व मानसशास्त्रज्ञ म्हणून देखील गांधी अगदी थोडे कळले असे म्हणेन कारण शांततेचा व अहिंसेचा मार्ग सोपा नाहीच हे स्वत:चे आत्मपरिक्षण व इतरांचे समुपदेशन केल्यावर कळते.

हा लेख २०२० मध्ये लिहिला होता, कसा सुचला हे अजूनही आठवत नाही.

https://www.aksharnama.com/client/article_detail/4695

Aksharnama

ही ‘मिलेनिअल पिढी’ पिढी पैसा व त्यातून येणारी सुखं याच्याच विचार करणारी असल्याने ‘सामाजिक बांधील

कोणतेही काम हे तुमच्या जिवापेक्षा मोठे नाही. कामाच्या ठिकाणचा ताण असह्य होत असेल तर ब्रेक घ्या किंवा काम सोडून द्या, दुस...
01/10/2024

कोणतेही काम हे तुमच्या जिवापेक्षा मोठे नाही.

कामाच्या ठिकाणचा ताण असह्य होत असेल तर ब्रेक घ्या किंवा काम सोडून द्या, दुसरे काम मिळते मात्र दुसरे आयुष्य मिळत नाही.

झोपेच्या नियमांनुसार जसे अजिबात न झोपणे हे मेंदुसाठी घातक आहे तसेच रात्री खूप उशिरा झोपून सकाळी उशिरा उठणे हे देखील तेवढेच धोकादायक आहे.
दोन्ही परिस्थितीत झोपेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.

झोपेची कमतरता अनुभवत असलेला मेंदू हा डिप्रेशन, चिंता, ताण व आत्मघाताचे विचार या गोष्टी अनुभवायला लागतो.

हा पोस्ट वाचणार्‍या पैकी कोणीही या परिस्थिति मधून जात असेल तर तुमच्या ओळखीच्या समुपदेशकाशी संपर्क साधा.

#मराठी #ताण #आत्महत्या #मानसिक #मानसिकआघात #नोकरी

"मजदूर का पसीना सूखने से पहले उसे उसकी मज़दूरी मिल जानी चाहिए" आज २०२४ मध्ये यावर विचार केल्यास कामाच्या मजदूरी सोबत काम...
18/09/2024

"मजदूर का पसीना सूखने से पहले उसे उसकी मज़दूरी मिल जानी चाहिए"

आज २०२४ मध्ये यावर विचार केल्यास कामाच्या मजदूरी सोबत कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य या गोष्टीला तितकेच महत्व आहे.
मजदूरी देतो म्हणून कसेही काम करा, आम्ही म्हणेल तसे करा ही कामाच्या ठिकाणची संस्कृती विघातक आहे. कंपन्या जरी परदेशी असल्या तरी त्यात काम करणारी भारतीय मंडळी ही या परिस्थितीला जबाबदार आहेत. कामाच्या ठिकाणचे वातावरण खेळीमेळीचे व सर्व दृष्टीने सुरक्षित असावे अशी धोरण परदेशी कंपन्यांची असली तरी भारतीय लोक त्या धोरणांची अंमलबजावणी करत असल्याने त्यात भारतीय मानसिकता सगळीकडे दिसते.

कॉर्पोरेट कंपन्यामध्ये काम करणार्‍या बहुतेक "संस्कारी" भारतीयांना कामासोबत स्वत:ची ओळख जोडणे फार आवडते, ज्या कंपनीत काम करतात ते सतत मिरवत आपली निष्ठा सिद्ध करणे हे यांचे आद्य कर्तव्य आहे. जी कॉर्पोरेट जनता ४० च्या वर आहे तिला gen Z शी कनेक्ट होताना जड जाते व gen Z चे स्वत:ची आव्हान वेगळी आहेत जी समजून घेण गरजेचे आहे.

आपला समाज हा किती निष्ठुर होत चालला आहे याचे हे आणखी एक उदाहरण.
पालकांनी मुला मुलींना जॉब साठी त्रास न देता त्याची परिस्थिति समजून घ्या.

काम हे आयुष्य नाही. एखाद्या कंपनीत नाही पटल तर सरळ दूसरा जॉब बघा.
जॉब दूसरा मिळतो, आयुष्य दुसरे मिळत नाही.

#मराठी #मानसिक

२००८ ला राजधानी एक्सप्रेस मधून प्रवास करताना एक भारतीय सैन्यात असलेला अधिकारी व त्याचे कुटुंब सहप्रवासी होते, प्रवास दिल...
16/09/2024

२००८ ला राजधानी एक्सप्रेस मधून प्रवास करताना एक भारतीय सैन्यात असलेला अधिकारी व त्याचे कुटुंब सहप्रवासी होते, प्रवास दिल्लीपर्यंत असल्याने बऱ्याच गप्पा झाल्यात. तो अधिकारी पंजाबी होता आणि मी मराठी आहे हे समजल्यावर त्याने लगेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला सुरवात केली. भारतीय सैन्यात महाराजांचे स्थान किती आदराचे आहे हे तो ज्या पद्धतीने सांगत होता त्यावरून मला खूप छान वाटले.

अमराठी सैनिक युद्धात लढायची हिंमत यावी यासाठी महाराजांचे नाव घेतात. व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलशाली शत्रूशी लढताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या guerilla warfare ज्याला मराठीत गनिमी कावा म्हणतात त्याचा वापर करून अमेरिकेला सळो कि पळो करून सोडले.

दुर्दैवाने ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले व लढले त्या महाराष्ट्रातील जनता मनाने एवढी कमकुवत झाली आहे.

विद्यार्थी आत्महत्येचा बाबतीत महाराष्ट्र्र भारतात एक नंबरवर आहे. अपघात, खून, बलात्कार, विचित्र प्रकारच्या हिंसक घटना वाढते याचे प्रमाण बघता महाराष्ट्र राज्यातील रोजचा दिवस नेटफ्लिक्स वरच्या एखाद्या विचित्र वेब सिरीज सारखा वाटतो. बुद्धिवंतांचे शहर पुणे आता कोयता गॅंग व ड्रग साठी बातम्यात राहत.
स्त्रियांसाठी सुरक्षित समजले जाणारे मुंबई शहर आता कोणासाठीही सुरक्षित नाही.

जिथे स्त्री शिक्षणाची सुरवात झाली असा महाराष्ट्रातील मुली-स्त्रिया या रील्स बनविणे व सासू सुनेचे सिरिअल्स बघण्यात मग्न आहेत.वेगवेगळ्या सामाजिक सुधारणांची सुरवात जिथून झाली त्या महाराष्ट्रातील तरुणाई मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या विळख्यात असून ती दिशाहीन झाली आहे.

"लढणारा महाराष्ट्र्र" हा "रडणारा महाराष्ट्र" का झाला असावा ?

छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य त्यांच्या आईने घडविले. त्यांची आई मजबूत नसती तर काय झाले असते? परकीयांच्या अन्यायात पिचलेला महाराष्ट्राला चैतन्य देण्याचे काम एका बाईने केले. जिजाबाईंचे चरित्र वाचल्यावर त्या काळाच्या किती पुढे होत्या हे कळत. अर्थात त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जसे घडविले व त्यांच्या जोडीदाराने, शहाजी महाराजांनी त्यांना दिलेली मोलाची साथ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदीप्यमान आयुष्य घडवायला कारणीभूत ठरले.

जिजाबाई या जसे व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे तसेच पालकत्वाचे देखील आहे. "स्वाभिमानाने जगणे" ही आयुष्यातील मूलभूत गरज आहे व त्यासाठी हवे तेवढे कष्ट करण्याची तयारी हवी. छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजी सकट अनेक भाषा अवगत होत्या. बुद्धी व ताकत एकत्र असण्याचे दुर्मिळ उदाहरण ते होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबासारख्या शत्रूशी २७ वर्ष लढणारी राणी ताराबाई ही देखील एक स्त्री होती. जिजाबाई किंवा राणी ताराबाई रडत राहिल्या असत्या व लढल्या नसत्या तर काय झाले असते?

अठरा पगड जातींना सोबत घेऊन महाराष्ट्रात उभे राहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्याचा दरारा हा पुढे देखील कायम राहिला. महाराष्ट्र्र हा अनेक सुधारणांचा व औदयोगिक क्रांतीचा केंद्र राहिला आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक सुबत्ता, सुरक्षित सामाजिक जीवन व विविध कला, खेळ यांचे मानबिंदू म्हणून मिरविणाऱ्या महाराष्ट्राची सध्याची अवस्था दयनीय आहे.

एकेमकांमध्ये भांडण्याची व पाय ओढण्याची वृत्ती, इंग्रजीच्या दूर राहणे, काळासोबत बदल न करणे, सतत इतिहासात रमणे यामुळे मराठी जनता नोकरी व व्यवसाय यामध्ये मागे जात आहे. अश्या वेळी स्त्रियांकडून खंबीरपणाची अपेक्षा असताना त्याच भावनिकरित्या गडबडलेल्या आहेत. कोणत्याही युद्धात सर्वात मोठे शस्त्र हे हिंमत असते, आपल्या पूर्वजांनी लढून, त्याग करून, प्रसंगी मरण पत्करून महाराष्ट्राला उभे केले आहे. याला तशीच ठेवायची जबाबदारी आपली आहे. अश्यावेळी हिंमत हारून कसे चालेल ?

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनही आपण जर निराशेत जात असू तर महाराज आपल्याला कळलेच नाही असेच खेदाने म्हणावे लागेल.

#शिवाजीमहाराज #शिवराय #मराठी #महाराष्ट्र
#छत्रपती #छत्रपतीसंभाजीमहाराज #जिजाऊ
#मानसिक #मन

Child Psychology संबंधित वाचलेले हे पहिलेच पुस्तक असले तरी ज्या पद्धतीने हे पुस्तक लिहिल्या गेले आहे ती अत्यंत परिणामकार...
14/09/2024

Child Psychology संबंधित वाचलेले हे पहिलेच पुस्तक असले तरी ज्या पद्धतीने हे पुस्तक लिहिल्या गेले आहे ती अत्यंत परिणामकारक असल्याने पुस्तक कुठेही गंभीर होत नाही. Oprah Winfrey सारख संवादातील जगविख्यात नाव असल्याने भाषा ओघवती असून दुःख, शोषण व क्लेश सुद्धा अंगावर येत नाही. trauma/आघात यासंबंधी म्हणून हे पुस्तक वाचायला घेतले मात्र लहानपणी मेंदूचे झालेले प्रोग्रामिंग हे शेवटपर्यंत व्यक्तीला कसे वागायला भाग पडते हे बघून थक्क व्हायला होत.

अमेरिकेशी संबंधित असल्याने आफ्रिकन समुदाय, फॉस्टर होम, पिढ्यानपिढ्या टिकणारे शोषणाचे परिणाम हे वाचून माझ्या स्वतःच्या बालपणा साठी देवाचे आभार मानले. कोणाचे बालपण किंवा आई वडील परिपूर्ण नसतात मात्र आई वडिलांशिवाय, आई वडिलांच्यात सलोखा नसणारे, काळजीवाहू व्यक्ती नीट नसलेले किंवा अस्थिर स्थितीत काढलेले बालपण त्या व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक व अर्थात मानसिक आरोग्यावर न पुसणारा परिणाम करते.
सतत भीती, चिंता असलेल्या वातावरणात कोणाची आनंदी वाढ होईल?

"ज्याला प्रेम मिळत नाही तो प्रेम देऊ शकत नाही.
ज्याची काळजी घेतली जात नाही तो दुसऱ्याची काळजी घेउ शकत नाही."
हे या पुस्तकात फार प्रभावीपणे सांगितले आहे.
प्रौढ व्यक्तींमध्ये दिसणारे वर्तुणूकीचे पॅटर्न हे लहानपणीच्या प्रोग्रामिंग मधून आले असतात.

आफ्रिकन समुदाय हा गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होत असताना ज्या स्थित्यंतरातून गेला त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेले अत्याचार, शोषण व त्यातून त्यांच्या सामाजिक आरोग्यावर झालेले परिणाम हे या पुस्तकाद्वारे कळतात.

पुस्तकात वेगवेगळ्या केस स्टडीच्या आधारे लहानपणी प्रेम व काळजी न मिळालेल्या लहान बाळांना पुढे जाऊन काय काय त्रास होऊ शकतो हे उत्तम पद्धतीने सांगितले आहे. भारतात ज्या पद्धतीची लग्न व पालकत्वाच्या अमानवी पद्धती अजूनही आहेत त्यामुळे त्या बालमनावर न पुसलेले परिणाम होतात ज्यातून पुढे व्यसन व गुन्हे यांच्या मार्गाला अशी मूल आपोआप जातात किंवा मानसिक आरोग्याचे त्रासासोबत आयुष्य काढतात.

गुन्हेगार हे जन्मतः नसतात तर ज्या पद्धतीने त्यांना वातावरण मिळत ते गुन्हेगार तयार करत.

या सोबत मॉडर्न काळाची देणगी असलेला एकटेपणा व त्या अनुषंगाने आलेले मानसिक आरोग्याच्या समस्या याचे मूळ हे
- व्यक्तीकेंद्रित समाज
-आत्मकेंद्री व्यक्ती
- स्पर्शाची न भागलेली भूक
-स्क्रीन चे व्यसन
-वरील सर्व घटकांमुळे आलेला एकटेपणा व त्यामुळे अति क्रियाशील झालेली मेंदूतील ताण-व्यवस्था. (stress response system)
- या सर्वांतून आलेले नैराश्य, चिंता तसेच वेगवेगळी व्यसन.

अमेरिका, युरोप व जपान या देशांत जवळपास ६० टक्के घरात एकच व्यक्ती राहते. भारतात तर लोक प्रचंड असून नाती नसल्याने एकटेपणा खूप आहे.
समुदाय म्हणून आपण तुटलो आहोत. त्यात राजकीय मतभेद आगीत तेल ओतण्याचे काम करतात. सोशल मीडियावरील नाती ही पोकळ असून त्याचा आपल्या मानसिक शांती साठी काहीही उपयोग होत नाही उलट त्याने प्रश्न आणखी वाढतात.

यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे मेंदू हा लवचिक असून प्रयत्न पूर्वक बदलल्या जाऊ शकतो फक्त त्यासाठी समुपदेशन, पर्यायी उपचार व मुख्य म्हणजे आपल्याला समजून घेणारा समुदाय आवश्यक आहे. मॉडर्न मेडिसिन ने समुदायाची ताकत लक्षात घेतली नसून केवळ गोळ्या इंजेकशन चा वापर करून व्यक्ती बरी होत नाही तर त्या व्यक्तीला ओळखणार, पाठिंबा देणारे व कोणत्याही परिस्थितीत सोबत राहणारा प्रत्यक्षात एक समुदाय मिळाला कि त्या व्यक्तीला सुरक्षित वाटून बरे होण्याची प्रक्रिया जलद गतीने होते.

#आघात #मानसिक #आशा #मानसिकआघात #बालपण

महाभारतात श्रीकृष्ण लढण्याची हिंमत घालविलेल्या अर्जुनाला जो मार्ग दाखवतो ते एक प्रकारे समुपदेशन असत. खचलेल्या अर्जुनाला ...
12/09/2024

महाभारतात श्रीकृष्ण लढण्याची हिंमत घालविलेल्या अर्जुनाला जो मार्ग दाखवतो ते एक प्रकारे समुपदेशन असत. खचलेल्या अर्जुनाला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देणे व त्याला लढण्यासाठी प्रेरणा देणं हे सांगणारा कृष्ण आपल्या आयुष्यात हवा असे प्रत्येकाला वाटत.

"मॅडम, माझ्या बहिणीला खूप त्रास आहे, तुम्ही तिला काही मदत करू शकता का" ? असे विचारणारा भाऊ,
"माझ्या मुलाला मदतीची गरज आहे, त्याचे हाल बघवत नाही" अशी विनवणी करणारी आई,
"माझा सहकारी नीट काम करत नाही त्याला थोडे मार्गदर्शन करा मॅडम", अशी सूचना देणारी एखाद्या कंपनीतील मॅनेजर हे सर्व एक प्रकारे श्रीकृष्ण असतात.
वाट हरविलेल्या अर्जुनाचा रथाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करणारे, त्याची वाईट काळात साथ न सोडणारे.

जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक त्रासाचा सामना करायला सुरवात करते म्हणजे नेहमीच्या शांत व आनंदी जगण्यातून काहीतरी वेगळे वागते तेव्हा बऱ्याच लोकांना स्वतःच या गोष्टी लक्षात येऊन ते मदत मागायला येतात व अशी लोक लवकर सुरळीत होतात कारण त्यांची ती स्वतःची इच्छा असते. आपल्याला यातून बरे व्हायचे आहे हा निर्णय त्यांचा स्वतःचा असतो.

याउलट डिप्रेशन, व्यसन, चिंता, अश्या त्रासातून जाणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला काही त्रास आहे हे मान्यच करत नाही, त्यातून स्वतःहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही तो पर्यंत प्रत्यक्ष श्रीकृष्ण जरी त्याला उपदेश द्यायला आला, स्वतःचे विश्वरूप दाखविले तरी त्या व्यक्तीत फरक पडणार नाही. अर्थात हे वागणं त्या व्यक्तीच्या आत्मघाताची सुरवात असते.

खिन्न मानसिक स्थिती असताना आजूबाजूला असणारी हितचिंतक लोक दुश्मन वाटतात, त्यांचे सल्ले जे काळजीतून आले असले तरी उदास व्यक्तीला आवडत नाहीत. अश्या काळोखात पुढचे काहीच दिसत नसले तरी श्रीकृष्ण कोणत्यातरी रूपात आपल्याला आशेचा किरण दाखवत असतो.

अनेक वर्ष मानसिक त्रासातून गेल्यावर योग्य वेळी, कित्येक लोकांनी दिलेले सल्ले व मदत माझ्यासाठी जीवनदायी ठरले.

२०२० च्या सुरवातीला "तू मराठीतून लिही आणि लिखाण सोडू नकोस" असे सांगणारा अनाहूत सल्ला,
२०२० च्या शेवटी "मॅडम तुम्ही ट्विटरवर परत येऊन लिखाण करा, लोकांना चांगल वाचायला मिळेल" असा मोलाचा सल्ला,
२०२२ मध्ये आजारी असताना, कोणीतरी माझ्यावर दया करून मिळवून दिलेले लिखाणाचे काम,
अश्या ठिकाणी मला न मागता आवश्यक ती मदत मिळाली.

या सोबत कामाच्या ठिकाणी सांभाळून घेणारे काही सहृदय सहकारी, काही मित्र मैत्रिणी, कित्येक वेळा अनोळखी लोकांनी मदत केल्याने माझा खडतर काळ निभला.
आज मागे वळून पाहताना या सर्वांचे मी ऐकले नसते, गरज पडल्यास स्वतःहून मदत मागितली नसती तर काय झाले असते याची कल्पना करवत नाही.

आपल्याशी नीट बोलणारी, मदत करणारी लोक आपल्याकडून फायदा व्हावा म्हणून नाही तर त्यांना आपली काळजी आहे म्हणून मदत करत असतात,
त्यांचे न ऐकणे, मनाला येईल त्या गोष्टी करणे हे तुमचं नुकसान करतात, इतरांचे आयुष्य पुढे जाते, तुम्ही मात्र मागे राहता. मग यात दोष कोणाचा ?

तुम्ही ठरवलं तर तुमचे नुकसान कोणीच करू शकत नाही त्यामुळे मेंदूतील नकारात्मक विचारांना शरण न जाता त्यांच्याशी अर्जुनासारखे लढून मनातील काळोखावर विजय मिळवायला हवा.

या काळोख व प्रकाशाच्या लढाईत श्रीकृष्ण हा नेहमी तुमची साथ देईल😇

#मानसिक #मन
#सुख #आशा
#आयुष्याच्या_पुस्तकातून #आयुष्य #शुभसकाळ #प्रेम #आनंद #मराठी #महाराष्ट्र #भावना #मानसिकआघात #आघात #आरोग्य #मदत #गीता #श्रीकृष्ण #मार्गदर्शन

National Crime Records Bureau (NCRB) च्या अहवालानुसार आत्महत्येच्या बाबतीत भारत जगात एक नंबरवर आहे. गेल्या आठवड्यात जाही...
10/09/2024

National Crime Records Bureau (NCRB) च्या अहवालानुसार आत्महत्येच्या बाबतीत भारत जगात एक नंबरवर आहे.

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या एका अहवालात भारतातील विद्यार्थी वर्गात आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असून महाराष्ट्र्र राज्य यात आघाडीवर आहे.

हा पोस्ट जो कोणी वाचत असेल त्यांना किंवा त्यांच्या आजूबाजूला कोणालाही खालील लक्षण आढळली तर लगेच त्यावर मदत घ्या.

हा आत्मघाताचा क्षण टाळता येतो.

आयुष्य एकदाच मिळत त्यामुळे काहीही झाल तरी तुम्ही त्या संकटातून बाहेर पडू शकता. आशा ठेवा व मदत मागायला लाजू नका.

#मराठी #महाराष्ट्र #आत्महत्या #डिप्रेशन #निराशा #आशा

प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत🥰प्रेमात देवदास झालेल्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.  देवदास अपयशी प्रेम...
09/09/2024

प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत🥰

प्रेमात देवदास झालेल्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

देवदास अपयशी प्रेमासाठी स्वतःचे आयुष्य उध्वस्त करून घेतात किंवा जिच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीला जीवानिशी मारतात. दोन्ही प्रकारात हिंसा आहे, प्रेम नाही.

प्रेम ही सकारात्मक भावना आहे असे आपण मानतो पण ती अनेक पुरुषांचे आयुष्य उध्वस्त करत आहे हे देखील सत्य आहे. सध्या प्रेम व लग्न या दोन्ही गोष्टींचा फटका पुरुषांना जास्त बसतो असा माझा डेटा सांगतो.

समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुण वर्गात पुरुषांचे प्रमाण खूप जास्त आहे, ब्रेकअप झाला म्हणून समुपदेशनासाठी येणाऱ्या मुली फार कमी आहेत. माझ्याकडे येणाऱ्या मुलींचे मेसेज हे फार गमतीशीर असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरची व्यक्ती एका विषयातील अभ्यासक असून तिला काहीतरी कळत असावे असे त्या मला अजिबात जाणवू देत नाही, माझा ज्ञानाचा अहंकार तिथे लगेच उतरतो. अश्या मुलींना प्रश्न असा असतो कि हा अमुक बॉयफ्रेंड आहे पण त्याला आयटी/सरकारी जॉब नसल्याने त्याला मी होकार देत नाही आणि यावर त्यांना माझं मत फुकटात हवं असत.😄

कामाला जाताना मेट्रोत शाळेतील मुलं-मुली जोडपं म्हणून वावरतात त्यावेळेस मी समजून जावं कि या पारोचा पूर्ण अभ्यास व काम हा देवदास करणार. पुढे हेच सत्र कॉलेज मध्ये सुरु राहत. मुलांकडून काम करून घेणे, सर्व गरजा पूर्ण करून घेणे (यात शारीरिक सुख पण येत) व पुढे नोकरीच्या ठिकाणी चांगलं ऑपशन मिळालं की याला पण धक्का मारून पुढे निघून जाणे हे ठरलेले आहे. कामाच्या ठिकाणी काम न करता बाकी सगळं करून लग्न मात्र व्यवस्थित पद्धतीने केलं जात. वेश्या बिचाऱ्या मजबुरीने या धंद्यात येतात. सर्व शिकून देखील इंस्टाग्राम वर शर्टाची बटण उघडे टाकून अश्या मुली कोणती क्रांती करतात यावर संशोधन व्हायला हवे.

एवढं वापरून फेकून दिल्यावर देवदास काय करतो तर तो डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःचा अभ्यास, करिअर बरबाद करून घेतो. या जुन्या आठवणीत रमलेला देवदास वर्तमानकाळातील बहुमूल्य वेळ वाया घालवितो.

अनेक मुली लग्न झाल्यावर किंवा ब्रेक अप झाल्यावर देखील आधीच्या बॉयफ्रेंडच्या संपर्कात राहतात, या मुली स्वतःचे आयुष्य चांगले जगत असून या मुलांशी संबंध ठेवतात, त्यांना भावनिक रित्या ब्लॅकमेल करत असतात. नात्यातील दोन संवेदनशील पुरुषांचे अश्या पद्धतीने जीव जाताना बघितले आहेत त्यामुळे स्त्रिया आयुष्य बरबाद करू शकतात याची खात्री आहे.

तुम्ही म्हणाल की देवदासला कळत नाही का ?

खरी ग्यानबाची मेख इथेच आहे. अनेक देवदासांचा अहंकार अश्या प्रेमाने सुखावतो, स्वतःची ओळख पुरेशी झालेली नसताना प्रेमात पडणे हे हॉर्मोन्सचा खेळ असून त्यात शारीरिक आकर्षण जास्त असत. देवदासला कसे खेळावयाचे हे पारोला माहीत असत, ती देवदासाचा अहंकार कुरवाळत असते, त्याच्या प्रगतीशी तिला काही घेणंदेणं नसत. किती पुरुष माझ्यावर मरतात/हा माझ्या प्रेमात देवदास कसा झाला हे या मुलींना मिरवायला आवडत. माझं लग्न झाल्यावर किंवा ब्रेक-अप झाल्यावर देखील हा अजूनही मला follow करतो याने त्यांचा अहंकार सुखावतो, यात त्या पुरुषाचे किती हाल होतात याच्याशी यांना काही सोयरसुतक नसत. पुरुषाला आपले आयुष्य बरबाद होतय याची जाणीव होत असली तरी आपला गेम होतोय हे त्याला कळत नाही किंवा कळेपर्यंत खूप उशीर झाला असतो. या अनारोग्यादायी नात्यात जाणाऱ्या मुलांच्या/पुरुषांच्या व्यक्तिमत्वात अनेक दोष असतात, घरची ओढ कमी असते, काही स्वभावाने साधे असतात, अनेकांना मानसिक त्रास असतात त्यामुळे मुलींकडून मिळालेली स्वीकृती त्यांना तात्पुरता आनंद देते.

सरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या पुस्तकावर आधारित देवदास सिनेमात हिरो देवदास हा जमीनदाराचा मुलगा असून पारो ही सामाजिक दृष्ट्या काही पायऱ्या खाली असते. हा अहंकारी जमीनदार त्याच्याच तोलामोलाच्या मुलीच्या का प्रेमात पडत नाही? देवदासचा आधुनिक अवतार असलेला अनुराग कश्यपचा देवं डी मध्ये देखील श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी असेच प्रकरण आहे. ज्या नात्यात आपल्यात चांगला बदल होईल, प्रगती होईल असे नाते अहंकार सुखावत नाही तर ते आपल्याला आव्हान देत म्हणून ज्या नात्यात प्रगती होते ते नातं खरं प्रेम असत. असे नाते दोघांचीही प्रगती करत.

अनेक वेळा आयुष्यातील आव्हान पेलता येत नाही म्हणून प्रेम हा सुटकेचा मार्ग म्हणून वापरलं जात. वाढत्या वयात अनेक ताण असतात त्यावेळेस "नात्यात असणं" हा तात्पुरता विरंगुळा असतो जे अनेकांच्या लक्षात येत नाही.

२५ पर्यंत शरीर व मेंदू पूर्णपणे विकसित नसतो त्यामुळे या वयात शारीरिक संबंध ठेवणं हे अत्यंत धोकादायक ठरत. २५ नंतर सारासार विचारबुद्धी विकसित होते त्यामुळे किमान तोपर्यंत शारीरिक नियंत्रण ठेवणं पुढे नात्यात व करिअर मध्ये कामात येत. माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या प्रत्येक देवदासला मी हेच समजावून सांगत असते.

ज्या मुली हुशार असतात, ज्यांची आयुष्यात ध्येय असतात त्या अश्या मार्गाला जात नाहीत. त्या स्वतः प्रगती करतात व सोबत जोडीदाराला पुढे जायला मदत करतात.

ज्यांना आयुष्यात काहीच नसत त्यांना देवदासची पारो व्हायचे ध्येय असते.

देवदास सिनेमातील पात्राला डिप्रेशन असून म्हणून तो व्यसनाच्या आहारी जातो हे आपल्याला आता कळत मात्र हे पात्र साकारताना अभिनेते दिलीप कुमार याना खरच डिप्रेशन येऊन ते त्या काळी लंडन मध्ये उपचारासाठी गेले होते.
केवळ पात्र साकारल्याने एवढा त्रास तर खरंच जे देवदास होत असतील त्यांना काय त्रास होत असेल कल्पना करा.

एवढा त्रास करून घेणाऱ्या मुलांना/पुरुषांना एवढेच सांगणे आहे की ज्याच्यासाठी आयुष्य बरबाद होत आहे ते प्रेम असू शकत नाही.

चांगलं नातं तुमची वाट बघत आहे, जरा धीर धरा मात्र असे नाते सापडल्यास त्या व्यक्तिला सोडू नका. 😊

#नाती #प्रेम #ब्रेकअप #आयुष्य #मराठी #व्यसन #यश #आशा

Address

Poona

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919822509226

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wellness Consulting by Dr. Vrushali Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wellness Consulting by Dr. Vrushali Raut:

Share