Baalmaitra

Baalmaitra ‘Baalmaitra’ is actively involved in guiding and counseling children, adolescent, and parents r

14/05/2025


#9011037488





8वी ते 12वी तल्या आपल्या मुलांची aptitude test केल्यानंतर पालकांच्या, मुलांच्या फीडबॅक साठी खूप आभारी आहोत.

1. ऑनलाइन करिअर टेस्ट जी भारतातील मुलं मुली घरबसल्या कुठूनही देऊ शकतात...
2. त्यानंतर विद्यार्थ्याचा पर्सनल करिअर guidance रिपोर्ट जो psychometric टेस्ट नंतर तयार केल्या जातो...जिथे तुम्ही मुलांच्या study habits, learning styles, memory, examination techniques, study interest, personality जाणून घेऊ शकता.
3. आणि सगळ्यात महत्वाचे तज्ञ करिअर समुपदेशकासोबतचे वैयक्तिक सेशन - चर्चासत्र !! त्यावरून मुलांमधील क्षमता तपासून उपयुक्त वेगवेगळ्या परीक्षा, महाविद्यालये, भारतातील विविध अभ्यासक्रम, विद्यापीठे, कॉलेज चे रँकिंग, वेगवेगळ्या शाखांचे कटऑफ मार्क आणि परीक्षांची तयारी, धोरणे या बद्दल माहिती दिली जाते.
- स्वाती बापट
Counseling psychologist
www.baalmaitra.com

11/05/2024

Thank you so much parents for detailed feedback about counseling and aptitude testing.

02/05/2024

Thank you so much for aptitude testing and personailsed career counseling detailed feedback. It motivates me to do my best.

11/04/2024







खूप धन्यवाद डिटेल फीडबॅक बद्द्ल. 🙏

1. ऑनलाइन करिअर टेस्ट जी भारतातील मुलं मुली घरबसल्या कुठूनही देऊ शकतात...
2. त्यानंतर विद्यार्थ्याचा पर्सनल करिअर guidance रिपोर्ट जो psychometric टेस्ट नंतर तयार केल्या जातो...जिथे तुम्ही मुलांच्या study habits, learning styles, memory, examination techniques, study interest, personality जाणून घेऊ शकता.
3. आणि सगळ्यात महत्वाचे तज्ञ करिअर समुपदेशकासोबतचे वैयक्तिक सेशन - चर्चासत्र !! त्यावरून मुलांमधील क्षमता तपासून उपयुक्त वेगवेगळ्या परीक्षा, महाविद्यालये, भारतातील विविध अभ्यासक्रम, विद्यापीठे, कॉलेज चे रँकिंग, वेगवेगळ्या शाखांचे कटऑफ मार्क आणि परीक्षांची तयारी, धोरणे या बद्दल माहिती दिली जाते.

हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही...
09/04/2024

हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा 🙏🙏

हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी चे आणि भरभराटीचे जावो ह...
09/04/2024

हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी चे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा 🙏🙏

' वीर सावरकर ' हा रणदीप हुड्डा यांचा सिनेमा अत्यंत प्रभावी,  मनाची पकड घेणारा आणि अस्वस्थ करुन सोडणारा सिनेमा आहे.  इतिह...
25/03/2024

' वीर सावरकर ' हा रणदीप हुड्डा यांचा सिनेमा अत्यंत प्रभावी, मनाची पकड घेणारा आणि अस्वस्थ करुन सोडणारा सिनेमा आहे. इतिहासाचे नेमके वास्तविक सादरीकरण करून हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय आहे ? हे पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत सक्षमपणे पोचविण्याचे काम त्यांनीं या सिनेमाद्वारे केलें आहे. Hats off to you Randeep! अनेक दस्तावेज, इतिहासाची पाने पिंजून काढून, इतर कुणावरही आरोप प्रत्यारोप न करता जसा इतिहास आहे तसा, अनेक वर्षांनंतर, या सिनेमाच्या निमित्ताने सर्वांसमोर आला आहे. या विषयात अजिबातच रस न दाखवणारे किंबहुना हा विषयच गाठोड्यात टाकून माळ्यावर टाकणारे, स्वतः चे व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी सावरकर , हिंदुत्व असे विषय बघितले की हात वर करणारे, स्वतःचाच स्वार्थ कायम जपणारे, 'नको रे बाबा त्या भानगडीत पडू' म्हणून रणदीप हुड्डा यांना सल्ला देणारे ' शुभचिंतक ' अवती भवती असताना, वीर सावरकर यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण सिनेमा काढण्याचे शिवधनुष्य सशक्त उत्तम पेलल्याबद्दल रणदीप हुड्डा यांचे खूप अभिनंदन आणि त्यांना शतशः नमन. सावकारांच्या आयुष्यातील काळीज हेलावून टाकणारे, हृदय पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग रणदीप यांनी अभिनयाने, उत्तम दिग्दर्शनाने जीवंत उभे केले आहेत. जिथे असे प्रसंग पाहूनच मनाचा थरकाप होतों तिथे तर ज्यांनी हया मरणयातना, काळ्या पाण्याचा नरक दोन दशकांपेक्षा अधिक काळ भोगला त्यां वीर सावरकरांचे किती हाल झाले असतील? अळ्या असलेले अन्न खात, विसर्जन विधी देखील त्याच अत्यंत अंधाऱ्या खोलीत उरकित , उघड्या अंगावर चाबकाचे फटके सहन करित, कोलु चालवीत , अत्यंत घायाळ अंगावर समुद्राच्या मिठाच्या पाण्याने आंघोळ करीत कसे राहिले असतील? साता समुद्रापार घर कुटुंबाची पर्वा न करता एकच ध्यासाने, एका स्वप्नपूर्तीसाठी ते कसे राहिले असतील? 'वीर ' हा शब्द सुद्धा सावरकर यांच्यापुढे कमी पडून नतमस्तक होतो ! इतक्या मरणप्राय यातनेतही शरीर आणि मनाची इतकी शक्ति त्यांनी कुठून आणली असेल? मातृभूसाठी आर्त कविता करण्याचे मनाचे हळवेपण कसे जपले असेल? गुलामीची तीव्र चीड आणि म्हणून मायभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे एक आणि एकच ध्येय उराशी बाळगून, अखंड भारताचे स्वप्न पाहण्याचे समर्थ धाडस आणि सशक्त प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केले. ' फोडा आणि राज्य करा ' हया इंग्रजांच्या नीतीचा त्यांनी कायम विरोधच केला. त्यावेळी देशांतर्गतही चाललेल्या सत्ताकारणाबाबत त्यांचा दृषटीकोन वेगळा होता. जात, पात, धर्म या पलीकडेही एकसंघ, सर्वाँना जोडून ठेवणारा, समावेशक असा हिंदु धर्म ; हिंदू हा केवळ एक धर्म नाही तर हिंदुत्व हया विचारसरणीचा तो एक भाग आहे, आसेतू हिमालय अखंड एक भारत , आणि त्यासाठी आवश्यक सशस्त्र क्रांतीचा मार्ग असे ओजस्वी जाज्वल्य विचार यात प्रभावीपणे आले आहेत. अंदमान नंतरही रत्नागिरीत त्यांचे कार्य चालू राहिले. स्वातंत्र्या आधी आणि नंतरही त्यांचा द्वेष झाला. कारावासच पदरी आला. का आणि कुणाला ते नको होतें? अनेक विषयांत रणदीप हुड्डा यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे.
खरा इतिहास आणि वास्तव समजून घेण्याची तयारी आणि इच्छा असणाऱ्यांनी, अनेक जणांच्या आयुष्याची होळी झाल्यामुळे आजचे आपले मिळालेले स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सर्वांनी , एकदा तरी हा सिनेमा अवश्य बघावा.
- स्वाती बापट
पुणे.

          to 12th students करिअर निवडणे हा विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. १५-१६ या ...
09/03/2024




to 12th students

करिअर निवडणे हा विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. १५-१६ या वयात शरीरातील, मनातील बदलांमुळे मुलं जरा aggressive वागू शकतात...मोकळं बोलू शकत नाहीत...विचार मनातच ठेवतात... आई बाबा आजी पेक्षाही मित्र मंडळी जवळची वाटतात... अनेक पालक पण मुलांना मदत करू बघतात... त्यांना मुलांच्या या confusion ची जाणीव असते. करिअर चे आता खूप ऑप्शन्स असल्याने नेमके काय? हा प्रश्न पडू लागतो. शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून करिअर मार्गदर्शनाची गरज भासते.8वी ते 12वी इयत्तेतील विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेकदा खूप प्रश्न असतात. जसे, मुलांनी नेमके कोणते करिअर करायचे? त्यासाठी कुठली शाखा निवडायची? कुठले कोर्सेस उपलब्ध असतात? त्यासाठी कुठली entrance exam द्यायची? त्याचे cut off marks कसे असतील? इत्यादी... बरेच कोर्सेस जसे की डिझाईन, इंजिनिअरिंग, मेडिकल, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट नेमके काय घ्यावे? विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल नेमका कूठे आहे? अशा अनेक बाबतींत विद्यार्थी थोडे confused असू शकतात...त्यांना नेमके काय करावे, कुठले विषय-कोर्स घ्यावे, करिअर निवडी बद्दल स्पष्टता नसते...मुलं अनेकदा घरी मोकळं बोलतही नाहीत... अभ्यास,मार्क्स हा विषय क्वचित घरी भांडणाचा, वादावादीचा होउन बसतो! १५- १६ वर्षाची ही मुलंही अडनिड्या वयाची असतात..अजूनही ' खूप कळते पण वळत नाही ' या वयातली! अशात करिअरचा निर्णय खूप महत्वाचा असतो.
पालकही मुलांसाठी खूप supportive असतात. मुलांना जे हवं ते शिक म्हणतात. क्लासेस लावून देतात... मुलांची अनेक अर्थी सोय बघतात...पण अनेकदा मुलं आणि पालक आपला निर्णय योग्य आहे का ?? अशा गोंधळलेल्या अवस्थेतच राहतात. अनेकदा गणित सायन्स तितकेसे आवडत नसतांना, विशेष जमतही नसतांना अनेक मुलं ज्युनिअर कॉलेज मध्ये 'science ' घेतांना दिसतात. त्यामागे 'अनेक ऑप्शन्स ओपन राहतील ' हा त्यांचा विचार असतो.. खूपदा कॉमर्स, आर्ट्स मध्ये ही अनेक करिअर ऑप्शन्स आहेत हे अनेकदा माहीत नसते.... अनेक विषयातील अनेक संधींची पूर्ण माहिती पालकांना, मुलांना नसते... त्यात आपण कूठे करिअर करु शकू? आपल्या क्षमता कोणत्या आहेत? हे समजून घ्यावे लागते..
नेमक्या अशा वेळी psychometric टेस्ट , aptitude test कामी येते. इथे मुलांची नेमकी आवड, त्यांची passion , त्यांचे उपजत गुण , त्यांच्या अभ्यासाच्या सवयी, त्याचे एकंदर व्यक्तिमत्त्व, त्यांचे करिअर मधील नेमके गोल किव्वा लक्ष काय आहे?? अशा अनेक बाबी लक्षात घेऊन मुलं आणि पालकांचे counseling केले की मुलांना आणि पालकांना दिशा मिळते...आधार वाटतो...अनेक अडचणी ते बोलून दाखवतात...त्यांना त्यांचाच मार्ग सुचत जातो... अनेक मुलांना,पालकांना बरेचदा करिअर बद्दल खूप माहिती असते... गूगल मुळे खूप गोष्टी कळलेल्या, शोधलेल्या असतात...पण तरीही नेमके कोणते कोर्स, पुढें त्यात नोकरीची संधी, पगार, जॉब प्रोफाइल, growth prospects अशा बाबतींत अजून महिती त्यांना जरुर हवी वाटते... psychometric टेस्ट, aptitude टेस्ट, study habits टेस्ट, personality टेस्ट रिपोर्ट्स मुळे मुलांबद्दल एक स्पष्ट चित्र त्यांना मिळते....मनाला एक validation, समाधान मिळते. निर्धास्त मनाने पालक मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक ही मग करु शकतात... इतर दुसऱ्या शहरात पाठवायचे का? असे महत्वाचे निर्णय घेऊ शकतात....नेमक्या कुठल्या करिअर साठी आपण उत्तम आहोत?? आणि कुठल्या सवयी आपल्याला अजूनही सुधारता येतील??? हे देखील मुलांना counselling दरम्यान कळते...अनेकदा पालक मुलांच्या चुकीच्या सवयीबाबत त्यांना सांगून थकून जातात...तेच करिअर कौन्सेलर कडून, टेस्ट रिपोर्ट्स च्या माध्यमातून मुलांना सांगितले गेले की मुलं त्या बाबतीत नीट विचार करु लागतात. स्वतः त बदल करायची तयारी दाखवतात... वेगवेगळे कोर्स, कॉलेज , entrance exam, cut-off, आणि करिअरच्या बाबत अधिक स्पष्टता येत जाते..

विद्यार्थी आपले करिअर निवडतात तेव्हा अनेकदा ते त्यांना मिळालेल्या गुणांवर अवलंबून असते! ' मला अमुक विषयात मार्क चांगले म्हणून मी तमुक करिअर निवडतो ' असे वाक्य कानी पडते! हे किती योग्य, अयोग्य हे ही आपल्याला तपासून पाहता येते.. करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थी त्यांच्या व्यक्तिमत्त्व, आवडी आणि करिअर योग्यतेबद्दल जागरूकता मिळवू शकतात ....त्यांची पूर्ण क्षमता ते वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिकदृष्ट्या ओळखू शकतात...ही किती मोठी उपलब्धि आहे !! तीन सोप्या टप्प्यात हे आपण साधू शकतो...
1.ऑनलाइन करिअर टेस्ट जी भारतातील मुलं मुली घरबसल्या कुठूनही देऊ शकतात...
2. त्यानंतर विद्यार्थ्याचा पर्सनल करिअर guidance रिपोर्ट जो psychometric टेस्ट नंतर तयार केल्या जातो...जिथे तुम्ही मुलांच्या study habits, learning styles, memory, examination techniques, study interest, personality जाणून घेऊ शकता.
3. आणि सगळ्यात महत्वाचे तज्ञ करिअर समुपदेशकासोबतचे वैयक्तिक सेशन - चर्चासत्र !! त्यावरून मुलांमधील क्षमता तपासून उपयुक्त वेगवेगळ्या परीक्षा, महाविद्यालये, भारतातील विविध अभ्यासक्रम, विद्यापीठे, कॉलेज चे रँकिंग, वेगवेगळ्या शाखांचे कटऑफ मार्क आणि परीक्षांची तयारी, धोरणे या बद्दल माहिती दिली जाते.
8वी ते 12वी इयत्तेतील विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत गरजेच्या आणि उपयुक्त असणाऱ्या ह्या टेस्ट आहेत...त्यांचे रिपोर्ट्स counselling psychologist तपासतात आणि विद्यार्थी, पालकांशी चर्चा करतात. ह्यामुळे योग्य निर्णय घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांना मदत मिळू शकते.

- स्वाती बापट
(Counseling psychologist, career counselor )
www.baalmaitra.com
अधिक माहिती साठी कृपया 9011037488 या नंबर वर संपर्क साधावा.

• How can individuals look ‘within’? • What are thoughts and are they helpful or harmful? • How to become aware and accept oneself exactly as we are?

08/03/2024
आज गीता जयंती! पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 11 व्या दिवशी, एकादशीला,  गीता जयं...
22/12/2023

आज गीता जयंती! पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 11 व्या दिवशी, एकादशीला, गीता जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली होती.
भगवद्गीतेचा सर्वात मोठा गुण हा आहे की ती आपल्या सर्वाँना विचार करण्यास प्रवृत्त करते, निर्णय घेण्यास प्रवृत्त करते आणि जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करते आणि हे सर्व आपले स्वतः चे व्यक्तिमत्व मान्य करत! भगवद्गीता वर्तमानाशी जुळवून घेते आणि वर्तमानात स्वतःला रुजवून एखाद्या समस्येवर चर्चा करते, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त करते. 🙏

जगात दररोज कुठेतरी गोंधळलेला अर्जुन कृष्णाचा सल्ला घेतो. श्रीकृष्ण पहिला कौन्सेलर मार्गदर्शक!! भगवद्ग गीतेद्वारे, भगवान श्रीकृष्ण हजारो वर्षांपासून विविध समस्यांवर व्यक्तींशी चर्चा करत आहेत आणि त्यावर उपाय शोधत आहेत आणि गीतेद्वारे तेच कायम करत राहतील. गीता प्रत्येकास मदत करते. व्यक्ती स्वतः ला स्वीकारू लागते. गीता अध्ययनाने आत्मसाक्षात्काराचे ( self actualisation) क्षण सर्वाँना वारंवार अनुभवास येवोत हीच सदिच्छा. 😊🤗🙏🙏
स्वाती बापट

खूप वर्षांपासूनची  मंगलाताईंशी अगदी सहज ओळख. 'पंचवटीकर' असल्याने  भेटी झाल्या की अनेकदा अनौपचारिक गप्पा व्हायच्या.. साल ...
18/07/2023

खूप वर्षांपासूनची मंगलाताईंशी अगदी सहज ओळख. 'पंचवटीकर' असल्याने भेटी झाल्या की अनेकदा अनौपचारिक गप्पा व्हायच्या.. साल २०१५-१६ .मी एकदा त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या दरवाज्यावर असणाऱ्या दुधाच्या आजच्या मागणीसाठी लावलेला पुठ्ठ्याचा गोल लगेच नजरेत भरला. त्यावर १/४ , १/२ ,१ , १.५ असे गोलाकार घड्याळात काढलेले आकडे आणि त्यावरचा काटा!! बेल वाजवली आणि दार उघडे पर्यंत तेच बघत बसले!!! दूध टाकणाऱ्या मुलालाही गणित अगदी सहज चटकन कळले असते इतक्या सोप्या पद्धतीने ही आखणी! शिवाय त्यातली मौज ती वेगळीच! माझ्या उन्हाळी शिबिरातल्या जवळ्पास 70 मुलांसाठी एक गणीतासंदर्भात काय करता येईल ? काही गणितातील गम्मत कोडी घेऊया का? असा विचार घेऊन मी त्यांच्या घरी गेले होते. त्यांनी लगेच होकार दिला. तारखा, वेळा ठरल्या. ' गणिती गप्पा शिबिर ,' पार पडले. एकदा ' "निसर्गात गप्पा मारू ग' , आमची ' खगोल' ची बाग खूप छान आहे .. घेऊन ये सगळ्या मुलांना..." त्यांचा निरोप मिळाला. लगेच त्यांच्या बागेतला नारळीकर उभयतांसोबतचा तासभर फेरफटका सगळ्या मुलांनी अनुभवला...वेगवेगळया झाडापानाफुलांची, कीटकांची त्यांनीं खूप माहिती पुरवली. ' मुलांना विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे ' , त्यांना प्रश्न पडले पाहिजेत ' हा एक विचार त्या नेहमी बोलून दाखवीत. म्हणून पुढे एकदा प्रश्न उत्तर तास ठरवला होता... मंगलाताईंना हवी ती प्रश्न मुलांनी विचारायची...मग त्यांनी अतिशय सोप्या भाषेत , उदाहरणे देत त्या सगळ्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. . इथे त्या थांबल्या नाहीत बरं का ! ...त्यांनी मुलांना उलट कोडी टाकायला सुरुवात केली!!!! मुलांकडून उत्तरं आली की वरचेवर कठीण प्रश्न येऊ लागली.., त्यांच्या हॉलमध्ये जमलेला मुलांचा घोळका, सगळयांना त्यांनी दिलेला खाऊ विसरणे कसे शक्य आहे ? आम्ही सगळे येणार म्हणून जवळ्पास ७० जणांसाठी मुद्दाम आखून त्यांनी खाऊ तयार ठेवला होता! मुलं निघता निघता दोन्ही उभयतांच्या सहीसाठी त्यांना गराडा घालू लागली.. त्यावर त्या मुलांना म्हणल्या ' तुम्ही एखादा प्रश्न पोस्टकार्ड वर लिहून पाठवायचा... त्याच्या उत्तराबरोबरच मी सही पण करून पाठवून देईन! ' मुलं तात्पुरती हिरमुसली पण लगेच कुठला प्रश्न लिहून पाठवू या? असा विचार करू लागली... काही मुलांनी लगेच पुढच्या आठवडयात विचार कृतीत आणला आणि पोस्टकार्ड पत्रपेटीत पडले देखील! मुलांना लहानपणापासूनच कल्पक विचार करता यावा यासाठी पालकांनी पण जागरूक असले पाहिजे.. दिवाणखान्यात चर्चा रंगल्या पाहिजेत... जाता येता त्या मला पालकत्वच शिकवत होत्या हे मला आज जाणवते. त्यांनी मला आवर्जुन वाचायला दिलेली अनेक पुस्तके आज माझ्या संग्रही आहेत. अनेक वर्ष सकाळ संध्याकाळी चालतांना गाठभेट झाली तर अतिशय प्रेमळ चौकशी त्या करीत. , पुढे काय करते आहेस? काम चालू राहावे यासाठी प्रेरणा- पाठपुरावा त्या सतत करीत राहिल्या.., आणि अगदी अलीकडे गेल्या जानेवारीत टेकडी पायथ्याशी दोघेही सकाळी कोवळ्या उन्हात चक्कर मारायला आले होते. ..मी ही त्यांच्या जवळ बाकावर बसत निवांत गप्पा मारत त्यांची सोबत अनुभवली. .. दोघांचा एकत्र फोटो काढला.. लगेच त्या म्हणाल्या' ' 'अग तुझा पण घे न आमच्या सोबत एक ' म्हणून गोड हसल्या! त्यांना कॅन्सर होता ! गेल्या काही महिन्यातल्या शारीरिक त्रासातून काल मंगलाताई नारळीकर यांची सुटका झाली आणि अनेक वर्षांच्या जुन्या आठवणी मनात रेंगाळत राहिल्या.. तुमच्या ज्ञानाची, वेळोवेळी दिलेल्या भरभरुन आशीर्वादाची सोबत कायम माझ्या पाठीशी असेल मंगलाताई !! आदरणीय मंगलाताई नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

स्वाती बापट
बालमैत्र बालविकास आणि समुपदेशन केंद्र

Address

Pune
411008

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919011037488

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baalmaitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Baalmaitra:

Share