Absolute Fit The Healthy Active Lifestyle Club

Absolute Fit The Healthy Active Lifestyle Club we as a wellness coach helps people to lose weight and have healthy life.

12/04/2026

Satish Wadekar मी खूप उत्साहित आहे! 🎉 सतीश सर तुमच्या व्हिडिओमुळे खूप जणांना प्रेरणा मिळणार आहे यात काही शंकाच नाही! 🤩💪 अप्रतिम! 🌟✨

26/01/2026

https://form.svhrt.com/66c448eb3d8bc046aa148516

आरोग्याची पाठशाळा
हम फिट तो इंडिया फिट
आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आरोग्यपूर्ण विचारधारा, आनंदी मन आणि समृद्ध जीवनशैली यामुळे सुखी व उत्तम जीवन घडते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य व्यवस्थित राखणे फार गरजेचे आहे.
मिशन : फिट इंडिया — म्हणजे असा भारत घडवणे, जिथे आजारपणाला स्थान नसेल. प्रत्येक भारतीय इतका सक्षम असावा की तो औषधांशिवायही आपले आरोग्य उत्तमरीत्या सांभाळू शकेल.
यासाठी आपल्याला जीवनशैली सुधारण्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
आरोग्याची पाठशाळा येथे या संदर्भात योग्य मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.
तर मग, तुम्हीदेखील मिशन : फिट इंडिया चळवळीत लगेच सहभागी व्हा.
भारताला स्वस्थ आणि आनंदी बनवूया!

22/01/2026

मंदीर, मशीद, गुरूद्वारामध्ये जाणार्‍यांना आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवावी लागतात. पण चर्चमध्ये मात्र ती घालून आत गेलेलं चालते. 🤔
कारण उष्ण कटिबंधातील भारत व आखाती देशांत पूर्वी सगळीकडेच धूळ, मातीचे साम्राज्य होते. यामुळे स्वच्छता हेतु पादत्राणे बाहेरच काढत. याउलट युरोपीय देश बर्फाळ प्रदेशात येत असल्याने तेथे पायात कायम पादत्राणे घालणे, तेथील कडाक्याच्या थंडीमुळे गरजेचे असते. अन् महत्वाचे म्हणजे मंदिरे किंवा मशिदीत जमिनीवर बसून प्रार्थना करण्याची पद्धत आहे, त्यामुळे जमीन स्वच्छ असणे, ही धार्मिक गरज बनली. याउलट युरोपात जमिनीवर बसणे थंडीमुळे अशक्य होते म्हणून तिथे चर्चमध्ये बाकड्यांवर बसण्याची संकल्पना आली. 👈

हिंदू धर्मीय मृतदेह जाळतात (मूळची वैदिक परंपरा), मुस्लिम जमीनीत थेट दफन करतात, ख्रिश्चन ताबूतसह दफन करतात. अन् पारशी गिधाड सारख्या पक्ष्यांना खाण्यासाठी तो उंचावर ठेवतात. कारण भारतात पुरातन काळात अफाट जंगल असल्याने लाकूड सहज उपलब्ध होत असल्याने मृतदेह जाळणे, व्यवहार्य होते.. आखाती देशात मात्र सगळीकडे फक्त भूसभूशीत रेतच (मरुस्थळ ) असल्याने, जमॊन सहजतेने खोदून खोलवर मृतदेह गाडणे, सोयिस्कर होते.. युरोपीय देशातील थंड हवामान व जमीनीत ओलावा जास्त असल्यामुळे मृतदेहाला फक्त जमीनीत गाडणे पुरेसे नव्हते. यास्तव ते हवाबंद ताबूतसह मृतदेह गाडत. ज्यामुळे मृतदेह सडण्याच्या किंवा कुजण्याच्या प्रक्रियेतून (Decomposition) जास्त दुर्गंध न येता, अनकूल गती मिळते. अन् पारशी धर्माची जन्मस्थळी असलेल्या इराणमध्ये खडकाळ, मरुस्थळी जमीन आणि जंगलांचा सार्वत्रिक अभाव त्यांना पुण्यकर्म (पक्ष्यांचे खाद्य) म्हणत मृतदेह उंच जागेवर (टॉवर ऑफ सायलेंस) ठेवण्यास विवश करायचा.👈

तसेच 'हलाल' आणि 'झटका' या दोन पद्धतींमागे धार्मिक श्रद्धा नसून, त्या काळातील भौगोलिक परिस्थिती, अन्नाची साठवणूक करण्याची क्षमता आणि प्राण्याला होणाऱ्या वेदनांचे शास्त्र दडलेले आहे. 😔

हलाल पद्धतीत मानेची मुख्य रक्तवाहिनी (Jugular vein) कापली जाते, ज्यामुळे हृदय धडधडत राहते आणि शरीरातील जास्तीत जास्त रक्त बाहेर वाहून जाते. उष्ण हवामानात रक्त हे जीवाणूंच्या (Bacteria) वाढीसाठी उत्तम माध्यम असते. जर मांसामध्ये रक्त राहिले, तर मांस लवकर सडते. त्यामुळे ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी रक्ताचा पूर्ण निचरा होणे, गरजेचे होते. ( हळूहळू रक्त बाहेर गेल्यामुळे स्नायूंमधील ग्लायकोजेनचे रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होते, ज्यामुळे मांस मऊ राहण्यास मदत होते.).🙂‍↔️

याउलट ​झटका पद्धतीत प्राण्याचा मणका किंवा मान एका घावात तोडली जाते. यामुळे मेंदूचा शरीराशी असलेला संपर्क तुटतो आणि प्राण्याला वेदना जाणवण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.. संशोधनांनुसार, प्राण्याला ठार मारताना जास्त वेळ लागतो, तेव्हा त्याच्या शरीरात 'कोर्टिसोल' आणि 'ॲड्रवरिन' सारखी स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात, ज्याचा परिणाम मांसाच्या गुणवत्तेवर होतो.👈

याचप्रमाणे वेशभूषेचा संबंध 'स्टाईल' पेक्षा 'सर्वाइव्हल' (अस्तित्व टिकवणे) याच्याशी आहे.. आखाती देशांमध्ये पूर्ण अंग झाकणारे पांढरे झगे (थौब/कंदुरा) घालणे, उष्ण हवामानामुळे योग्य असते. कारण ​वाळवंटी प्रदेशात दोन मुख्य आव्हाने असतात: प्रचंड उष्णता आणि धुळीची वादळे.. विज्ञाननुसार पांढरा रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता शोषून न घेता परावर्तित (Reflect) करतो. यामुळे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा कमी राहण्यास मदत होते. अन् ​सैलसर झगे घातल्याने, जेव्हा वाळवंटात हवा वाहते, तेव्हा या कपड्यांमधून ती शरीरापर्यंत सहज पोहोचते. ज्यामुळे घाम लवकर सुकतो आणि नैसर्गिक 'एअर कंडिशनिंग' चा अनुभव मिळतो. तसेच वाळवंटातील कोरडी हवा आणि थेट सूर्यकिरणांमुळे त्वचा जळू शकते (Sunburn). यास्तव वाळूच्या वादळापासून डोळे, नाक आणि त्वचा वाचवण्यासाठी डोक्यावर 'गुत्रा' (रुमाल) आणि पूर्ण झगा आवश्यक ठरतो.

याउलट ​युरोपमध्ये आव्हान उष्णतेचे नसून कडाक्याच्या थंडीचे आणि आर्द्रतेचे (Moisture) असते. यामुळे शरिराची ​उष्णता टिकवून ठेवण्यासाठी (Insulation) लोकरीचे कपडे घालणे योग्य असते. लोकरीचे तंतू शरीराची नैसर्गिक उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत. ते हवेला अडवून ठेवतात, ती उष्णता रोधक (Insulator) म्हणून काम करते. तसेच युरोपीय कपडे शरीराला चिकटून किंवा फिटिंगमध्ये असतात. याचे कारण असे की, शरीराच्या जवळ असलेली गरम हवा बाहेरच्या थंड हवेने विस्थापित होऊ नये. अन् कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी त्यांना एकावर एक कपडे घालावे लागतात.

​आपल्या भारतातील 'साडी' किंवा 'धोतर' हे देखील आपल्या उष्ण आणि दमट हवामानासाठी डिझाइन केलेले 'Unstitched' (न शिवलेले) कपडे योग्य आहेत. जे हवा खेळती ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहेत, तरीही अक्कल गहाण ठेवून अंध नक्कल करत, अगदी देशातील न्यायालय व संसदेतील अति हुशार समजले जाणारे सुध्दा, बारा महिने कोट घालतात, जे ब्रिटिशांच्या थंड हवामानानुसार योग्य होते.

उत्तर भारतातील गंगा-यमुना आणि पंजाबचा प्रदेश हा जगातील सर्वात सुपीक मैदानी प्रदेशांपैकी एक असल्याने मुबलक पाणी आणि सुपीक मृदेमुळे इथे वर्षभर पिके घेणे शक्य होते. जेव्हा मानवाला शेतीतून पुरेशी कर्बोदके (Carbohydrates) आणि प्रथिने (डाळींमधून) मिळू लागली, तेव्हा शिकारीवर अवलंबून राहण्याची जोखीम कमी झाली. यामुळे मुख्यतः जैन आणि बौद्ध धर्माने 'अहिंसा' हे सर्वोच्च मूल्य मानून दैनंदिन जीवनात शाकाहाराला अति महत्व देत, मांसाहारावर मर्यादा आणल्या किंवा तो पूर्णपणे वर्ज्य केला. याउलट आखातातील ​वाळवंटी प्रदेशात शेतीसाठी मर्यादा होत्या. तिथे 'खजूर' आणि थोड्या प्रमाणात मिळणाऱ्या धान्याव्यतिरिक्त अन्नाचा मुख्य स्रोत 'पशुपालन' (शेळ्या, मेंढ्या, उंट) हाच होता. त्यात वाळवंटात फिरस्ती जीवन जगताना (Nomadic life) प्राणी सोबत बाळगणे आणि अन्नासाठी त्यांचा वापर करणे ही त्यांची भौगोलिक गरज होती. तसेच अत्यंत थंड हवामानात शरीराचे तापमान राखण्यासाठी उच्च उर्जा देणाऱ्या अन्नाची गरज असते, जी मांसाहार आणि चरबीयुक्त पदार्थातून मिळत असल्याने व बारामाही शेती होत नसल्याने मांसाहाराला इस्लाम प्रमाणे ख्रिस्ती धर्मात धार्मिक मान्यता मिळाली.😳

वाळवंटातील प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण (Dehydration) लवकर कमी होत असते. त्यात भर पडून मद्यप्राशनामुळे लघवीचे प्रमाण वाढून शरीर अधिक निर्जलित होते, जे अशा हवामानात जीवघेणे ठरू शकते. यामुळे अब्राहमिक धर्माचा भाग असतानाही म्हणजेच यहूदी व ख्रिस्ती धर्मीय मान्यतेच्या विरूध्द जाऊन इस्लाममध्ये मद्याला 'हराम' मानण्यामागे सामाजिक कारणांसोबतच हे नैसर्गिक आरोग्य विषयक कारण आहे. याउलट युरोपात थंडीच्या दिवसात नद्या आणि तलाव अनेकदा गोठतात. उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळतो, तेव्हा सभोवतालच्या जमिनीवरील कचरा, प्राण्यांची विष्ठा आणि इतर घाण वाहून थेट पाण्याच्या स्त्रोतात येऊन मिळाल्यावर जीवाणूंची वाढ होणे. तसेच काही घातक सूक्ष्मजीव (उदा. Cryptosporidium किंवा Giardia) थंड पाण्यातही जिवंत राहू शकतात. यामुळे पाणी अनेकदा दूषित व्हायचे. यास्तव फळांचा रस किंवा धान्यापासून बनवलेली वाईन/बीअर ही किण्वन (Fermentation) प्रक्रियेमुळे जंतूमुक्त आणि सुरक्षित मानली जात असे. तसेच, मद्य रक्ताभिसरण वाढवून थंडीत उब देण्यास मदत करते म्हणून ख्रिस्ती धर्मात त्याला धार्मिक आणि सामाजिक मान्यता मिळाली.😔
थोडक्यात अशा अनेक धार्मिक प्रथा- परंपरा, आचरण मागे धार्मिक नव्हेतर भौगोलिक परस्थिती कारणीभूत आहे !
रुपालीताई गिरनारे यांनी शब्दांकन
केलेली पोस्ट खुप चिंतनिय आहे
नक्कीच वाचा प्रतिक्रिया कमेंट्स मधून कळवा.🙏

८ व्या वर्षी 'पॅड' सांभाळणारी तुमची मुलगी... ही प्रगती की अधोगती? 🩸परवाची गोष्ट. ओपीडीत एक आई-बाबा आपल्या आठ वर्षांच्या ...
17/01/2026

८ व्या वर्षी 'पॅड' सांभाळणारी तुमची मुलगी... ही प्रगती की अधोगती? 🩸
परवाची गोष्ट. ओपीडीत एक आई-बाबा आपल्या आठ वर्षांच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती 'गोड डॉल' होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी.

तक्रार काय?
"डॉक्टर, तिला 'पाळी' (Periods) सुरु झाली आहे." 🩸

हे वाचून तुमच्या काळजात धस्स झालं ना?
मला नाही झालं. कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजचं झालंय. ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या, त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅड्सची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत.

"आई, मला रक्त का येतंय?" हा ८ वर्षांच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीज फाटलं होतं... आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं.

हे बालपण हिरावून घेणं नाही, तर काय आहे?

एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो, जे पचवायला तुम्हाला जड जाईल:

आपण आपली मुलं 'वाढवत' नाही आहोत, आपण त्यांना 'फुगवतोय'. 🐔

जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन ४० दिवसांत 'ब्रोयलर चिकन' तयार केलं जातं, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे. ही 'वाढ' नाही, ही शरीराची 'सूज' आहे!

याला जबाबदार कोण? आपली 'मॉडर्न' लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती!

बघा आपण नकळत त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय: 👇
🔥 ५०० रुपयांचा पिझ्झा की आयुष्याची होळी?
विकेंडला मॉलमध्ये ५००-८०० रुपयांचा पिझ्झा/बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून 'इन्स्टा'वर टाकता... "फॅमिली टाईम!"
अहो, तो 'फॅमिली टाईम' नाही, ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची 'होळी' आहे! तो रबरासारखा मैदा आणि 'प्रोसेस्ड चीझ' म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे.

शरीरात जेवढी चरबी जास्त, तेवढं 'इस्ट्रोजेन' जास्त तयार होतं. आणि हेच जास्तीचं हार्मोन त्या ८ वर्षांच्या मुलीच्या कोवळ्या मेंदूला सांगतं, "बाळा, तुझं बालपण संपलं, आता तू बाई झालीस!"

🔥 गरम अन्नासाठी प्लॅस्टिकचा डबा?
स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो, म्हणून तो मुलांच्या माथी मारताय?
जेव्हा तुम्ही त्यात वाफाळलेली गरम भाजी टाकता, तेव्हा त्यातील 'झिनो-इस्ट्रोजेन्स' (Xenoestrogens) अन्नात उतरतात. हे रसायन शरीरात गेल्यावर 'बहुरुपिया' (Imposter) सारखं वागतं. शरीराला वाटतं हे इस्ट्रोजेनच आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं.
तुमच्या 'फॅन्सी' सवयीने तुम्ही निसर्गाचं घड्याळच बिघडवून टाकलंय!

🔥 दूध-चिकन की 'हार्मोनल बॉम्ब'?
"डॉक्टर, पोरगी खूप बारीक आहे, तिला नॉन-व्हेज देऊ का? दूध किती पाजू?"
तुम्ही तिला खायला नक्की घाला, पण बाजारातलं ते ४० दिवसात फुगलेलं 'ब्रॉयलर' कोंबडं आणि पिशवीतलं 'केमिकल' दूध देताना शंभर वेळा विचार करा.

चिकन: त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी 'ग्रोथ हार्मोन्स'चे हेवी डोस दिले जातात. तेच तिच्या पोटात जातात. यामुळेच आजकाल चौथीतल्या मुलींच्या ओठांवर लव (Facial Hair) येते. हे PCOD चं पहिलं लक्षण आहे!

दूध: गाई-म्हशींना जास्त दुधासाठी दिलेली 'ऑक्सिटोसिन'ची इंजेक्शन्स दुधावाटे तुमच्या मुलीच्या इवल्याशा गर्भाशयाला 'मोठं होण्याचे' चुकीचे सिग्नल देतात.

तुम्ही 'प्रथिने' समजून जे खाऊ घालताय, ते प्रत्यक्षात 'हार्मोनल बॉम्ब' आहेत!

💉 सर्वात भयानक वास्तव:
या वयात पाळी सुरू झाली म्हणजे तिची हाडं लवकर जुळणार आणि उंची कायमची थांबणार. हे थांबवण्यासाठी मग उपाय काय? "हार्मोन सप्रेशन थेरपी!"

कल्पना करा... त्या ८ वर्षांच्या कोवळ्या फुलाला, तिची पाळी थांबवण्यासाठी पुढची ३-४ वर्षे दर महिन्याला एक वेदनादायक, जाड सुईचं इंजेक्शन घ्यावं लागणार! 💉😭
तुमची लाडकी लेक दर महिन्याला त्या सुईच्या भीतीनी थरथर कापणार आणि तुम्ही हतबल होऊन ते बघणार.

विचार करा पालकांनो...
१० वर्षांनंतर जेव्हा ती तुम्हाला विचारेल: "आई-बाबा, तेव्हाच का नाही लक्ष दिलं? त्या पिझ्झा-बर्गरपेक्षा माझं आयुष्य महत्त्वाचं नव्हतं का?” तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असेल?

अजूनही वेळ गेलेली नाही... सुधरा! ⚠️

✅ किचनमधून 'व्हाईट पॉयझन' (मैदा, साखर) फेकून द्या.
✅ प्लॅस्टिकच्या डब्याला काडी लावा: फक्त स्टील वापरा.
✅ मुलांना 'ब्रॉयलर' बनवू नका: त्यांना मातीत खेळू द्या, उन्हात धावू द्या.
✅ लाड करणं म्हणजे विष खाऊ घालणं नाही, हा निष्काळीजपणा आता थांबवा!

हा लेख वाचून विसरू नका. ही माहिती प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये पोहोचवणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे.
आपल्या मुलींचं बालपण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवं.

तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते का? तुमचे अनुभव खाली नक्की मांडा.

डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे


24/12/2025

छान सुरवात झाली आहे, कृपया तुम्ही शेयर करून सपोर्ट करा

R you interested ❓ then call me 9850397133-- 9370522907
19/12/2025

R you interested ❓ then call me 9850397133-- 9370522907

98503971339370522907
19/12/2025

9850397133
9370522907

12/12/2025

प्लॅस्टिकमध्ये भाज्या ठेवण्याचे 5 मोठे तोटे📍

1. ओलावा कोंडून भाज्या लवकर सडतात.

जेव्हा तुम्ही भाज्या प्लॅस्टिकमध्ये पूर्णपणे बंद करून ठेवता, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा नैसर्गिक ओलावा (बाष्प) आतच कोंडला जातो. या दमट वातावरणामुळे जिवाणू (Bacteria) आणि बुरशी (Fungus) वाढण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होते. परिणामी, भाज्या ताजे राहण्याऐवजी लवकर सडू लागतात आणि चिकट होतात.

2. इथिलीन वायूमुळे भाज्या लवकर खराब होतात.

फळे आणि भाज्या नैसर्गिकरित्या 'इथिलीन' नावाचा वायू सोडतात, ज्यामुळे त्या पिकण्याची प्रक्रिया होते. प्लॅस्टिकच्या पिशवीत हा वायू बंदिस्त झाल्यामुळे त्याचे प्रमाण वाढते. या वाढलेल्या वायूमुळे भाज्या गरजेपेक्षा जास्त आणि लवकर पिकतात, ज्यामुळे त्या लवकर खराब होतात आणि त्यांची चवही बिघडते.

3. हवा खेळती न राहिल्याने पोषक तत्वे नष्ट होतात.

भाज्या तोडल्यानंतरही 'जिवंत' असतात आणि त्यांना श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. प्लॅस्टिकच्या पिशवीमुळे हवा खेळती राहत नाही आणि भाज्यांचा श्वास गुदमरतो. यामुळे त्यांच्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखी आवश्यक पोषक तत्वे वेगाने नष्ट होतात.

4. रसायनांचा धोका (Chemical Leaching)

अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या, विशेषतः कमी दर्जाच्या पिशव्यांमध्ये 'बिस्फेनॉल ए' (BPA) आणि 'फ्थॅलेट्स' (Phthalates) सारखी हानिकारक रसायने असतात. जेव्हा भाज्या या प्लॅस्टिकच्या संपर्कात येतात, तेव्हा ही रसायने भाज्यांमध्ये मिसळण्याचा धोका असतो. अशा भाज्या खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

5. कर्करोगाचा धोका वाढतो.

दीर्घकाळ प्लॅस्टिकच्या संपर्कात राहिलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीरात हानिकारक रसायने जमा होतात. काही अभ्यासांनुसार, यामुळे भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

मग भाज्या कशा साठवाव्यात❓ योग्य पद्धत कोणती❓
कापडी किंवा सुती पिशव्या: भाज्या साठवण्यासाठी कापडी किंवा ज्यूटच्या पिशव्या हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे हवा खेळती राहते आणि अतिरिक्त ओलावा शोषला जातो.

पेपर टॉवेलचा वापर: पालेभाज्या (उदा. कोथिंबीर, पालक) स्वच्छ करून पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवल्यास त्या अधिक काळ ताज्या राहतात.

हवाबंद डबे (Airtight Containers): कापलेल्या भाज्या स्टीलच्या किंवा चांगल्या दर्जाच्या फूड-ग्रेड प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवू शकता.

थेट क्रिस्पर ड्रॉवरमध्ये: गाजर, काकडी, बीट यांसारख्या भाज्या कोणत्याही पिशवीशिवाय थेट फ्रीजच्या क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवल्या तरी चालतात.

सोयीस्कर वाटत असली तरी, प्लॅस्टिकमध्ये भाज्या साठवण्याची सवय आजच सोडा. छोट्याशा बदलामुळे तुम्ही भाज्या अधिक काळ ताज्या ठेवू शकाल आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकाल

एका व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतून एक प्रचंड हिरा विकत घेतला — अगदी अंड्याच्या पिवळ्या बलकाएवढा मोठा.पण त्याची निराशा झा...
25/11/2025

एका व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतून एक प्रचंड हिरा विकत घेतला — अगदी अंड्याच्या पिवळ्या बलकाएवढा मोठा.
पण त्याची निराशा झाली, कारण त्या हिऱ्यामध्ये आतून एक भेग होती.

त्याने एक कुशल ज्वेलरकडे जाऊन मार्गदर्शन मागितले.
ज्वेलरने नीट निरीक्षण करून सांगितले:

“हा हिरा दोन परिपूर्ण रत्नांमध्ये विभाजित करता येईल, आणि दोन्हीची किंमत मूळ हिऱ्यापेक्षा जास्त असेल.
पण एक चुकीचा घाव बसला तर तो तुकड्यांत फुटेल आणि पूर्णपणे निरुपयोगी होईल.
मी असा धोका घेणार नाही.”

व्यापारी जगभर फिरला — अनेक देशांतील दागिनेकारांना तो हिरा दाखवला.
प्रत्येकाचं उत्तर एकच — धोका खूप मोठा.

शेवटी कोणीतरी त्याला अॅमस्टरडॅममधील एका वृद्ध ज्वेलरबद्दल सांगितले —
ज्याच्या हाताला सोनेरी स्पर्श असल्याची ख्याती होती.

तो त्याच दिवशी तेथे पोहोचला.

वृद्ध ज्वेलरने हिऱ्याकडे भिंगातून पाहिले आणि पुन्हा इशारा केला.
तेवढ्यात व्यापाऱ्याने मध्येच बोलत म्हटले:

“ही कथा मी अनेकदा ऐकली आहे.
आता मी तयार आहे. फक्त हे काम करून टाका.”

ज्वेलरने मान हलवली, किंमत ठरवली, आणि मग शांतपणे शेजारी काम करणाऱ्या एका तरुण शिकाऊकडे वळला.

त्या मुलाने हिरा हातात घेतला, तळहातावर ठेवला,
आणि एकच स्वच्छ, अचूक प्रहार केला.

हिरा सुंदरतेने दोन निर्दोष रत्नांमध्ये विभागला.
त्याने वर बघितलेही नाही — फक्त ते रत्न परत गुरूकडे दिले.

आश्चर्यचकित व्यापाऱ्याने विचारलं:

“हा मुलगा तुमच्याकडे कित्येक वर्षे काम करत असेल?”

वृद्ध ज्वेलर शांतपणे हसला:

“याचा कामाचा तिसरा दिवस आहे.
त्याला त्या हिऱ्याची खरी किंमत माहिती नाही…
म्हणूनच त्याचा हात थरथरला नाही.”

---

✨ धडा:

कधी कधी आपण काहीतरी गमावण्याची जितकी जास्त भीती बाळगतो,
तितकेच ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्या करण्याची क्षमता आपल्यात कमी होते.

जीवनातील आव्हानांना तितकं जड समजू नका,
त्यांना हलकं माना…

तेव्हाच तुमचा हात स्थिर राहील. 💫

लेखक कल्लेश पाटील

21/11/2025

Look at mr. Rajendra prasad smile🥰🤩

21/11/2025

Mrs. Kulkarni started gaining lotoff confidence

Address

Sr. No. 168 , Tupe Nagar, Malwadi Near Medicare Hospital, Hadapsar Pune
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Absolute Fit The Healthy Active Lifestyle Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share