Radhakishan Pawar

Radhakishan Pawar राज्याध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना.
महाराष्ट्र राज्य उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे

20/07/2024
*आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी* *सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा* *4 लाखापेक्षा अधिक...
08/07/2024

*आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी*

*सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा*

*4 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ*

पुणे - आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यातून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंडींमध्ये सहभागी झालेल्या २ लाख १९ हजार ५०५ वारकऱ्यांना ४ जुलै पर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या विशेष उपक्रमाअंतर्गत आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

आषाढीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी विभागाचे ६,३६८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कार्यरत आहे. त्या अनुषगांने विभागाकडून दररोज आढावा घेतला जात आहे. या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार असे सर्व कर्मचारी सेवा देणार आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ असणार आहे. यासह ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाब चा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात येणार आहेत, कारण आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने मोठी प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज असणार आहेत. जेणेकरून कोणालाही काही त्रास होत असेल तर त्याला त्वरित आरोग्य सेवा देता येणे शक्य होणार आहे.

या फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत असणार आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात येणार आहे. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय असणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवेची वैशिष्ट्ये –

- पालखी सोहळा २०२४ साठी एकूण मनुष्यबळ - ६,३६८
- प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २५८
- वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४*७ उपलब्ध – ७०७
- दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ५८८५
- महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना – १३६
- पालखी मार्गावर आरोग्य दूत – २१२
- पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ८७
- आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.
- विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती.

*अत्यंत महत्वाचे**माझे फेसबुक Account कोणीतरी "राधाकिशन पवार (Radhakishan Pawar)" या नावाने नवीन तयार केले आहे. ते Accou...
31/05/2024

*अत्यंत महत्वाचे*

*माझे फेसबुक Account कोणीतरी "राधाकिशन पवार (Radhakishan Pawar)" या नावाने नवीन तयार केले आहे. ते Account Fake असुन त्या account वरून Friend Request आली तर Accept करू नका. त्यावरून विविध प्रकारची मागणी केली जात आहे. माझ्या व्हाट्सएप मधील प्रोफाइल चा फोटो घेऊन अकाउंट दिसत असेल,तरी सर्वांना विनंती आहे की, त्या Account ला Fake Account म्हणून Report करावे. हि विनंती.*

आपला,
*डॉ. राधाकिशन पवार*

*खालील लिंक वर क्लिक करून त्या Fake Account वर जावून Report करावे.*

Someone has created a fake account with my profile photo on Facebook Multiple people have reached out to me informing me...
28/05/2024

Someone has created a fake account with my profile photo on Facebook
Multiple people have reached out to me informing me about this scam.

Please be careful and report immediately if you encounter any scam.

09/05/2024
*धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू: प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब.*लोककल्याणकारी नेता, विकासाचा महामेरू म्हणजेच प्...
15/03/2024

*धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू: प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब.*

लोककल्याणकारी नेता, विकासाचा महामेरू म्हणजेच प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब. साहेबांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला, शिक्षणाची प्रचंड गोडी असलेल्या साहेबांकडे आज इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी असून त्यांनी पी.एच.डी देखील केली आहे. आता हे सगळं सांगण्यामागचे कारण म्हणजे, महाराष्ट्राचा राजकारणात फार थोडे लोक असे आहेत जे उच्चशिक्षित देखील आहेत व ज्यांची मातीशी नाळ जोडलेली आहे. सावंत साहेब हे त्यातलेच एक.

सावंत साहेबांकडे बघितलं की आश्वस्थ वाटतं. कारण एका सुशिक्षित, अभ्यासू आणि कष्टकरी वर्गाची जाणीव असणाऱ्या माणसाच्या हातात आपले नेतृत्व आहे. साहेबांचा प्रवास अगदी स्वच्छ आणि प्रामाणिक असा राहिलेला असून, तो आपल्या सर्वांपुढे जसा आहे तसा मांडतांना साहेब स्वतः देखील कधी संकोच करत नाहीत. पूर्व आयुष्यात काही काळ प्राध्यापक राहिलेल्या तानाजीराव सावंत साहेबांच्या बोलण्यात शब्दाला कायम सत्याची धार, आवाजात जरब आणि व्यक्तिमत्त्वात निर्भिडपणा दिसून येतो. साहेब जिथे गेले तिथे साहेबांनी सोनं केल्याचे आज संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या डोळ्यांनी पाहिलंय.

साहेब प्रतिनिधित्व करत असलेला भूम परंडा वाशी हा मतदारसंघ महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र या जिल्ह्यांमध्ये हरितक्रांती करण्यासाठी व दुष्काळाचा ठसा कायमस्वरूपी पुसण्यासाठी या तालुक्यात उदय झाला तो प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा. साहेबांनी आपल्या भूम परंडा वाशी मतदारसंघाला 'सुजलाम सुफलाम' करण्यासाठी शिवजल क्रांती आणली आणि ती यशस्वी देखील करून दाखवली. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे विकासाची मोठी दृष्टी असल्यामुळे भूम परंडा वाशीच्या विकासाचा गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी साहेब २४ तास परिश्रम घेत आहेत.

विकासाची गंगा खेचून आणायची असेल तर केवळ मतदार संघात वजन असून उपयोग नसतो तर सरकार दरबारी वजन असेल तरच कोणतेही काम तत्काळ मार्गी लागतं, हे साहेब मंत्री झाल्यापासून अनुभवायला मिळालं. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प व्हावा यासाठी साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि या प्रकल्पासाठी साहेबांनी तब्बल ११ हजार ७०० कोटी इतका निधी खेचून आणला. साहेबांच्या या प्रयत्नामुळे आज या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या सिंचन प्रकल्पामुळे तब्बल १३३ गावामध्ये हरितक्रांती होणार आहे. परंडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा व बीड जिल्ह्यातील आष्टी या ९ तालुक्यातील एकूण ३३ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या भागातील शेतकरी कायम पोट जाळणाऱ्या दुष्काळाने होरपळून निघाला आहे. कधी पावसाअभावी, कधी अतिवृष्टीने तर कधी अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्याच्या नशिबाची पार त्रेधा उडवली. शेतात राबण्याची, अहोरात्र कष्ट करण्याची हिंमत असलेल्या या भागातील शेतकऱ्याला कायम सतावणारा प्रश्न होता हक्काच्या पाण्याचा. ही पाण्याची गरज ओळखून या भागाला मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळवून देण्याचं काम आदरणीय सावंत साहेब करत आहेत. लवकरच आपल्या जिल्ह्यात या प्रकल्पाचं पाणी वाहण्यास सुरुवात होणार आहे. शिवजल क्रांती आणि कृष्णा मराठवाडा सिंचन आणून जिल्ह्यात खऱ्या अर्थानं हरित क्रांती आणण्याचे काम आदरणीय सावंत साहेबांनी केले असेच म्हणावे लागेल.

आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर साहेबांनी धाराशिव जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जिल्ह्यात आरोग्याच्या अनुषंगाने विविध योजना आणल्या आहेत. आशिया खंडातला पहिला सुसज्ज असा फिरता दवाखाना साहेबांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यात राबवला. इतकचं नाही तर साहेबांनी जिल्ह्यात आरोग्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय उभारणी आणि अनेक रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात आले. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या जिल्ह्यातील नागरिकांची उपचारासाठी होणारी पायपीट आता थांबली आहे.

राजकारण करत असताना साहेब सामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी कायम आग्रही राहिले. कोणतेही पद असो, साहेबांनी एखादी गोष्ट ठरवली की साहेब ती पूर्ण करणार हे गणित ठरलेलं आहे. याचाच पुरावा द्यायचा तर, धाराशिव जिल्ह्यातील विकासकामे आणि राज्याच्या सक्षम आरोग्य यंत्रणेकडे बघितले की आपल्याला लक्षात येईल. आज विकसित जिल्ह्याला पुन्हा पुन्हा विकसित केल्याचे पुरावे देणारे लोक असताना साहेबांनी अविकसित अशा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तेथील पाणी प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा मूलभूत प्रश्नांवर काम केले. २१ महिन्यात तब्बल ८५० कोटींचा निधी आज धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विकासासाठी साहेबांनी आणला. ही जिल्ह्याला मिळालेली मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.

राज्याचे आरोग्यमंत्री या नात्याने गेल्या २१ महिन्यात जनतेच्या हिताचे तब्बल २२ निर्णय घेत यशस्वी अंमलबजावणी देखील केली. आज दुर्गम भागातील महिला आरोग्याचे बळकटीकरण, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, नवजात शिशू, तरुण अशा सर्व वर्गातील जनतेला सामावून घेणाऱ्या व त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असलेल्या योजना साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात राबवताना आपण पाहिले आहे.

आरोग्य खात्याचे काम सांभाळणे ही मोठी जिकीरीची गोष्ट असून राज्याचा आरोग्यच्या गाडा सक्षमपणे चालविण्यासाठी योग्य निर्णय, यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी, काटेकोर नियोजन, योग्य निर्णयक्षमता असणे अत्यंत गरजेचे असून साहेबांच्या अंगी हे सर्व गुण दिसून येतात.

साहेबांची एक शिकवण नेहमीच असते की, तुम्ही समोरच्या माणसाला त्याच्या पैशाच्या श्रीमंतीवरती तोलू नका, त्या माणसाचा स्वभाव आणि माणुसकी याच्यावरती किंमत ठरवा, कारण ते नेहमीच बोलतात पैशापेक्षा माणसाची श्रीमंती खूप मोठी आहे. आपण जितकी माणसं आपल्या सोबत जोडू तीच माणसं अगदी शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहेत. श्रीमंती आज असेल तर उद्या नसेल ह्या गोष्टी बदलत राहतात. पण प्रेमाने आणि आपुलकीने जोडलेली माणसं आणि त्यांच्या असलेल्या आशीर्वाद हे कधीच बदलत नाही. माणूस आणि माणुसकी हीच खरी श्रीमंती आहे साहेबांची हीच शिकवण प्रेरणा देणारी ठरते आणि साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही ती जोपासत आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आम्ही देखील एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.

असे लोकांच्या मनातले, दूरदृष्टी असलेले, संवेदनशील, कार्यकुशल व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व असलेले आमचे लाडके नेते, आदरणीय प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! साहेब आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना!

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांचे लोकार्पण..!सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपु...
13/03/2024

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांचे लोकार्पण..!

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असणाऱ्या सोलापूर शहर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि स्वतंत्र महिला रुग्णालय तसेच ट्रॉमा केअर सेंटर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय वळसंग या सर्व ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतींचे आणि १४ वित्त आयोगाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या १६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

नुकतीच आपण सर्वसामान्य जनतेसाठी राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबवली आणि आरोग्य विभागातील अतिरिक्त ताण कमी केला. याशिवाय औषधांचा आणि वैद्यकीय साधनांचा तुटवडा भासणार नाही यांची काळजी घेतलीच तसेच राज्यभरात सुसज्ज असे दवाखाने उभा करून खऱ्या अर्थाने महायुती सरकार नागरिकांच्या हिताचे आणि गतिमान सरकार असल्याचे कृतीतून सिध्द केले.

नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे काम आपण गेल्या दोन वर्षांपासून करत आहोत. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी आपण कायमच प्रयत्नशील आहोत त्याच अनुषंगाने शहर आणि जिल्ह्यात नव्याने रुग्णालये उभारली. या रुग्णालयाच्या उभारणीत आणि अंतर्गत आरोग्य सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी वेळोवेळी आढावा बैठका आयोजित करून रुग्णालयाच्या प्रगती बाबत कायम आढावा घेतला. ही चारही रुग्णालये नागरिकांच्या सेवेत हजर होत असताना मला विशेष आनंद होत आहे. या रुग्णालयात असणाऱ्या सुसज्ज अश्या आरोग्य सुविधांचा येत्या काळात शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे प्रमुख मान्यवर, लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सोलापूर #लोकार्पण #रूग्णालय #आरोग्य #सुविधा #तानाजी_सावंत #महायुती_सरकार #गतिमान_सरकार #आरोग्य_सुविधा #वळसंग #अक्कलकोट #ट्रॉमा_सेंटर #दक्षिण_सोलापूर

पोलिओ रविवार - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम-2024:'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम - 2024' अंतर्गत राज्याच्या सार्...
03/03/2024

पोलिओ रविवार - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम-2024:
'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम - 2024' अंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन आज रविवार, दि. 3 मार्च 2024 रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जात आहे. सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस देऊन सहकार्य करावे, ही विनंती!
#पोलिओ_रविवार #लसीकरण

*आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुर...
05/02/2024

*आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु.*

राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदाबाबत महायुतीचे सरकार कायमच सकारात्मक राहिले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी आणि पदावरील आरोग्य कर्मचाऱ्यांचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी २८ ऑगस्ट २०२३ रोजी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील *एकूण १० हजार ९४९ पदांसाठी* घेण्यात आलेल्या रिक्त पदाकरीता पात्र उमेदवारांची दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. सदरील भरती प्रक्रियेतील १० संवर्गातील यामध्ये आहारतज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृह नि वस्त्रपाल, ग्रंथपाल आदी पदांची अंतरिम निवड व प्रतिक्षा याद्या व गुणवत्ता याद्या दिनांक ०२/०२/२०२४ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

या १० संवर्गातील नियुक्ती ८ फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून, उर्वरीत संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादी ८ दिवसात लावण्यात येणार असून, नियुक्त्या देखील लवकरच करण्यात येणार आहेत. एकूणच भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन तसे निर्देश ही दिले होते.

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने आणि निर्देशानुसार ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी टीसीएस या एजन्सीची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स ची व्यवस्थाही लावण्यात आलेली होती.

टीसीएस कडून निवड यादीतील उमेदवारांचे बायोमॅट्रीकव्दारे घेतलेल्या हाताच्या बोटांचे ठसे व फोटो कागदपत्रे पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडील प्रतिनिधींमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तेव्हा बायोमॅट्रीकव्दारे घेतलेले ठसे व प्रत्यक्ष उपस्थित उमेदवारांचे बोटांचे ठसे व फोटो आयडी याची अंतिम तपासणी करण्यात येणार आहेत.

मा. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निर्देशानुसार ही पद भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांच्यामार्फत परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेत विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व टिसीएस चे प्रतिनिधी यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतलेली आहे.

गेल्या पाच वर्षात प्रथमच एकूण १० हजार ९४९ पदांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या या सर्व जागा भरणे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाल्या आहेत.

या मेगा भरतीच्या पूर्ततेनंतर मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आरोग्यमंत्र्यांनी उचललेले हे स्तुत्य पाऊलच म्हणावे लागेल.

माझ्या नावाने फेसबुकवर काढलेले अकाउंट फेक आहे, विश्वास ठेवू नये - डॉ.राधाकिशन पवारमाझा फोटो व नावाने कुणीतरी फेक अकाउंट ...
20/01/2024

माझ्या नावाने फेसबुकवर काढलेले अकाउंट फेक आहे, विश्वास ठेवू नये - डॉ.राधाकिशन पवार

माझा फोटो व नावाने कुणीतरी फेक अकाउंट तयार केले आहे. तो सर्वांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून इनबॉक्स मध्ये पैशांची मागणी करीत आहे.

माझ्या नावाने डुप्लिकेट फेसबुक अकाऊंट ओपन करून मेसेंजर द्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची बाब काही जणांनी आत्ताच निदर्शनास आणून दिली. सर्वांना विनंती आहे, कृपया कुणीही ऑनलाईन फ्राॅडला बळी पडू नका.

सर्वांनी सावध रहावे व माझ्या नावाने कुणी पैसे मागत असेल तर त्याला बळी पडू नये...

डॉ.राधाकिशन पवार
सहसंचालक, हिवताप हत्तीरोग व जलजन्यरोग, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, अटल चॅरिटेब...
05/01/2024

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, अटल चॅरिटेबल फौंडेशन लोकनेते आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित "अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर" कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब व मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री. शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते मान्यवरांना प्रभू श्री राम यांच्या अयोध्यातील मंदिराची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले.

सदर शिबिर ५ जानेवारी ते ७ जानेवारी असे तीन दिवसीय आयोजित करण्यात आले असून PWD मैदान, नवी सांगावी पिंपरी-चिंचवड येथे पार पडणार आहे. सदर शिबीरामध्ये मोफत कॅन्सर तपासणी, मोफत एक्स रे, मोफत सोनोग्राफी, सर्व रक्त तपासणी तसेच मोफत डायलिसीस या आरोग्य तपासण्या पार पडणार आहे. तरी या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराला भेट देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी !!

या शिबिरासाठी मावळ मतदार संघाचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे, आमदार श्री.महेश दादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, माजी मंत्री श्री.बाळा भेगडे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी महापौर माईताई ढोरे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ यंपल्ले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोपने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, आरएमडी जिल्हा रुग्णालय प्रमुख वंदना जोशी, यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.

: Office of Tanajirao Sawant

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radhakishan Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category