Dr Sachin G Patil Ayurveda Clinic

Dr Sachin G Patil Ayurveda Clinic SHREE VISHAWANKUR AYURVEDA AND PANCHAKARMA CENTER
PUNE @ BANER,
AURANGABAD @ NIRALA BAZAR,SAMARTHA

19/08/2022

दि. 19 ते 21/08/2022 रोजी पुणे Visit
#डाॅ_सचिन_गायकवाड_पाटील
(M.D. Ayurveda)

#विश्वांकुर_आयुर्वेद_व_पंचकर्म_केंद्र
सर्व आजारांवर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध.
✅ आम्लपित्त
✅ स्थूलपणा
✅ सांधेदुखी
✅ मधुमेह
✅ त्वचा विकार
✅ थायरॉईड
✅ Allergic सर्दी
✅ वंध्यत्व
✅ डोकेदुखी
✅ मूळव्याध

डॉ सचिन गायकवाड पाटील
MD आयुर्वेद
✅7 वर्षाचा अनुभव
✅ नाडी परीक्षा तज्ञ
✅ आयुर्वेद तज्ञ
✅ पंचकर्म तज्ञ
✅ रुग्नावस्थेनुसार औषधी योजना
✅ पथ्य अपथ्य आहार मार्गदर्शन
✅ जीवनशैली मार्गदर्शन
✅ मानसिक ताण तणाव मार्गदर्शन

स्थळ- 4th floor, OnePlus,Near Zenistry Appt, Pan Card club road Baner, Pune
https://maps.app.goo.gl/icxeHasoQH9uC5x

संपर्क
मो. 8237523722
7620890670

धन्यवाद🙏

06/07/2022

🛑मधुमेहावर आयुर्वेदीय उपचार🛑
रक्तातील साखर वढणे म्हणजे मधुमेह, सर्वसाधारण वाटणारा आणि सर्वत्र आढळणारा हा आजार आहे. या आजारासाठी वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे अनेक लोक आपल्या आजुबाजूला आढळतात. कोरोना रोगाच्या साथीमूळे या आजाराला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. मधुमेह असणा-या रोग्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमकुवत असते. रक्तामधे साखर असल्यामुळॆ वायरल लोड जास्त वाढतो. यामुळे दुरगामी गंभीर परीणाम होऊ शकतो.

या परिस्थितीला कोमोरबीडीटी (co-morbidity) असे म्हणतात. आधीपासून असणारा जुणाट व गंभीर आजारासह नवीन संसर्ग झाल्याने तो अधिक गंभीर होऊ शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी अधिक काळ लागतो.

कोरोनामूळे होणा-या मृत्युच्या प्रमाणामध्ये कोमोरबीडीटी (co-morbidity) असणा-या रुग्नांची संख्या अधिक आहे. कोरोनाबाधीत मधुमेही रुग्णांमध्ये साधरण ३७.३% मृत्युदर दिसुन येतो.

यामुळे मधुमेह सारख्या दिर्घकालीन आजार मुळासकट नाहीसा करण्याच्या प्रयत्न आवश्यक आहे. मानवी शरीरात झालेल्या मेटाबोलीक म्हणजे पचन संस्थेमध्ये झालेल्य बिघाडामुळे हा आजार उत्पन्न होतो. जीवनशैली बदलामुळे पचनसंस्थे संबधीत मधुमेहासारखे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आयुर्वेदाच्या औषधोपचारच्या साहाय्याने मधुमेहावर प्रभावी उपचार होऊ शकतात. आजार मुळासकट कमी करण्यासाठी आपण आयुर्वेदाचा उपयोग करू शकतो. यासाठी आपल्याला आर्युवेदाची कास धरावी लागेल .

श्री विश्वांकूर आयुर्वेद हे मधुमेही रुग्णासाठी खास नवीन उपक्रम घेवून येत आहे, यामध्ये
✅आयुर्वेदीय औषधी
✅आयुर्वेदीय पंचकर्म
✅ आहार नियोजन
✅व्यायाम नियोजन
✅जीवनशैली नियोजन

👆या पंचसुत्रीच्या साहाय्याने मधुमेहावर यशस्वी नियत्रण करण्यात येते.

या उपक्रमाचा फ़ायदा अनेक रुग्णानी घेतला आहे. आपण या मधुमेह मुक्ती उपक्रमात सहभागी होउन आपल्या आजारा पासुन मुक्ती मिळवावी.

👉आपल्या रीपोर्ट सह आजच संपर्क करा.

🙏🏻धन्यवाद
डॉ_सचिन_गायकवाड_पाटील
ुर्वेद
✅7 वर्षाचा अनुभव
✅ नाडी परीक्षा तज्ञ
✅ आयुर्वेद तज्ञ
✅ पंचकर्म तज्ञ
✅ पथ्य अपथ्य आहार मार्गदर्शन
✅ जीवनशैली मार्गदर्शन
✅ मानसिक ताण तणाव मार्गदर्शन

#अधिक_माहितीसाठी_संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D.आयुर्वेद
श्री विश्वांकुर आयुर्वेद
1️⃣ #औरंगाबाद:- निराला बाजार, औरंगाबाद
📲8237523722
2️⃣ #पुणे:- Pan Card Road, बाणेर, पुणे
📲 #फोन :- 7620890670

https://www.facebook.com/662923337378678/posts/1752667125070955/
15/04/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1752667125070955/

#विश्र्वांकुर_आयुर्वेद
#पंचकर्म_क्लिनिक
#पुणे येथे सेवा उपलब्ध.

#डॉ_सचिन_गायकवाड_पाटील

पुणे येथील रुग्णांसाठी सेवा पुन्हा सुरू करत आहोत. आपले औरंगाबदमधील अनेक रूग्ण व त्याचे पुण्यातील मित्र परिवारासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. अनेक रूग्ण पुण्यात स्थायिक असल्यामुळे त्यांची होणारी गैरसोय यामुळे टळेल.
कोरोना काळात विस्कळीत झालेली रुग्ण सेवा आता नवीन सुसज्ज पंचकर्म क्लिनिक मध्ये लवकरच सुरू करणार आहोत.येथे रुग्ण तपासणी सह पंचकर्म व्यवस्था उपलब्ध आहे.

#विश्र्वांकुर_आयुर्वेद आत्ता औरंगाबाद सह पुण्यामध्ये देखील सेवा उपलब्ध करून देत आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

#वेळ:- सकाळी 10 ते 2,
संध्याकाळी 5 ते 8

#धन्यवाद
डॉ सचिन गायकवाड पाटील
MD Ayurveda
विश्र्वांकुर आयुर्वेद
One Plus society
फार्मर अँड ग्रोसेर स्टोअर जवळ
पॅन कार्ड रोड, बाणेर
पुणे.
फोन न:- 7620890670 /8237523722

https://www.facebook.com/662923337378678/posts/1744861419184859/
07/04/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1744861419184859/

#सुवर्ण_बिंदू_प्राशन_संस्कार
या महिन्यात 10 तारखेला पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपल्या बाळाला हा डोस नक्की द्या ..! 👍🏻☺️

#सुवर्णबिंदू_प्राशन_संस्कार_शिबीर
#कशासाठी?
1) रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी
2) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी
3) एकाग्रता वाढवण्यासाठी
4) बुद्धीच्या विकासासाठी विकास चांगला होण्यासाठी
5) पचन शक्ती सुधारण्यासाठी
6) शारीरिक विकास चांगला होण्यासाठी
7) सुमुकुमार कांती प्राप्त होण्यासाठी
8)प्रदूषणापासून होंणारे श्वसनाचे आजार वेगवेगळ्य अ‍ॅलर्जी पासून संरक्षण मिळण्यासाठी

#कोणी_घ्यावे?
वय वर्ष १६ पर्यंतच्या बालकांसाठी

#कधी_घ्यावे?
प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवसी
दिनांक:-10/03/2022 रोजी

#का_घ्यावे?
आयुर्वदानुसार पुष्य नक्षत्राच्या दिवसी शरीराची पोषण करण्याची शक्ती अधिक असते. त्यामुळे सुवर्ण युक्त किंवा सुवर्ण भावित ही औषधी सुरु केल्यास शरीराचे उत्तम पोषण होण्यास मदत मिळते.

#अधिक_महितीसाठी_संपर्क:
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D.आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
स्वतंत्र सैनिक कॉलनी
औरंगाबाद
Phone No:- 8237523722 / 9420270785

https://www.facebook.com/662923337378678/posts/1747112952293039/
07/04/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1747112952293039/

#जागतीक_आरोग्य_दिनानिमित्त_हार्दिक_शुभेच्छा
परंतु नुसत्या शुभेच्छा देऊन होणार नाही, तर आरोग्य फिट राहण्यासाठी आरोग्यात गुंतवणूक करावी लागेल. काय आहे आरोग्यातील गुंतवणूक. खलील लेखात वाचा.

#आरोग्यातील_गुंतवणुक

गुंतवणुक म्हटले की जास्त परताव्याची आपेक्षा नेहमी असते. त्यासाठी आपण पैश्याची विविध ठिकाणी गुंतवणुक करत असतो. काही ठिकाणी चांगला परतावा मिळतो तर काही ठिकाणी नाही. या सर्व आर्थिक गुंतवणुकिच्या नादात महत्त्वाची अरोग्यातील गुंतवणुक राहुण जाते. तुम्ही म्हणाल हे काय नविन, आमच्या कडे तर आरोग्य विमा आहे, आजारी पडल्यावर, शस्रक्रियेच्या वेळी त्याची आम्हाला मदत होते. ही आमची अरोग्यातील गुंतवणुकच आहे ना? मग आजुन वेगळी कशासठी? तुमचे म्हणणे देखिल रास्त आहे. आपण आजारी पडल्यावर दुसरे कोणी खर्च करणारा असल्यावर आपण कशाला काळजी करावी?

आहो पण शरीर तर तुमचे स्वताचे आहे, त्रास तर तुम्हालाच होणार आहे. दवाखाण्यात (आय. सी.यु) मध्ये दाखल केल्यावर होणारी अवस्था व शस्रक्रियेच्या वेळी होणा-या अश्क्यप्राय: वेदना आठवल्यावर तर अंगावर काटाच येतो. तसेच परीवारातील इतर व्यक्तीची होणारी ताराबंळ तर पाहाण्यासारखी नसतेच. शिवाय तुम्ही कामावर जात नसल्याणे होणारे अर्थिक नुकसाण तर वेगळेच आहे. याचाही विचार करायला हवा की नाही?

तुम्ही म्हणाल यासाठी तर आम्ही आरोग्य विमा घेतो. बरोबर आहे, परंतु काही अशी व्यवस्था होऊ शकते का? ज्यामुळे वरिल प्रसंग टाळता येऊ शकतो. तर याचे उत्तर हो असे आहे. त्यासाठी अरोग्यातील गुंतवणुक आजारी पडण्याच्या अगोदरच, करणे आवश्यक आहे.

या साठी आपल्याला आयुर्वेदाचा उत्तम उपयोग होऊ शकतो. निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवणे व रोगी व्यक्तीला रोगमुक्त करणे, हे आयुर्वेदाचे मुळे उद्देश आहे. निरोगी अवस्थेतच आरोग्य टिकवण्याची यथायोग्य काळजी घेतल्यास, आजारी पडण्याची शक्यता कमी होऊ शकते. तरीही आजारी पडलास तर सहजपणे बरे होऊ शकता, हे महत्त्वाचे.

यासाठी आपल्याला आरोग्या विषयी यथोक्त माहीती असणे गरजेचे आहे. आपली प्रक्रुति, आहार-विहार, दिनचर्या, ऋतुच्रर्या समजुन घेणे महत्वाचे आहे. एखादा छोटासा वाटणारा आजर शरीरात असल्यास त्याचा लवकरात लवकर उपचार करणे, त्यानुसार जीवनशैलीत बदल करणे आवश्याक आहे. त्यामुळे पुढे येणारे मोठे संकट टाळता येऊ शकते.

उदा:- आम्लपित्ता सारखा छोटासा आजर जास्त दिवस शरीरात राहिल्यास (पित्त वाढल्याने) त्याचे ह्रुदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, संधिवात यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. या कडे काळजी पुर्वक व लवकर उपचार घेणे महत्वाचे आहे.

मानसिक ताणतणाव हा आजकालच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. अनेक प्रकारच्या आजारास ताणतणाव कारणी भुत होताणी दिसतोय. त्यासाठी त्यावर वेळीच नियत्रंण करुण अरोग्याचे रक्षण करणे महत्वाचे आहे. आयुर्वेदिय ओषदि जसे:- शतावरी, ब्राम्ही, शंखपुष्पी, जटामांसी ई. व अयुर्वेदिय पंचकर्मा (शिरोधारा, नस्य, अभ्यंग, स्नेहण-स्वेदन मालीश) चा यासठी चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच प्रक्रुतीला माणवेल असा प्राणायाम, योगा, आहार-विहारातील, जीवनशैलीतील योग्य बदल केल्यास यावर वेळीच अंकुश मिळवता येतो.

या आरोग्य दिनानिमित्त आपण आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहणे आणि रोग प्रतिबंधासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा. हेच खरी आरोग्य दिनाची जागरूकता होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
MD Ayurveda
विश्र्वांकुर आयुर्वेद
पुणे - औरंगाबाद
फोन न:- 8237523722/9420270785

31/03/2022

#अध्यशन
ार_घेण्याची_सावयी

डॉक्टर सारखे, सारखे अपचन, अजीर्ण मलाचा का होते? मी तर सर्व काळजी घेतो. हे खात नाही, ते खात नाही, मग मलाचा का अपचनाचा त्रास होतो? असे प्रश्न विचारणारे अनेक रुग्ण भेटतात.

अपचन, अजीर्ण होण्यासाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी "अध्यशन" हे महत्वाचे कारण. तुम्ही म्हणाल अध्यशन म्हणजे काय? भूक लागल्यावर घेतलेला आहार पचण्यापूर्वी परत आहार घेणे म्हणजे अध्यशन.
आहार पचण्यासाठी साधारण ४ ते ६ तास लागतात. आहार जड आहे की पचण्यास हालक यावर हे अवलंबून असते.

आहार घेतल्यावर पोटामध्ये आहाराची पचनक्रिया सुरु होते. पचनाचे तीन टप्पे आहेत. सुरवातीला आहाराचे बारीक मिश्रण तयार होऊन, यामध्ये पाचक पित्त मिसळले जाते, पाचक पित्ताची अन्नावर प्रक्रिया होऊन त्यातून पोषक आहाररस शरीरात शोषला जातो. मलभाग मोठ्या आतड्यामध्ये साचवला जातो. योग्य वेळी हा मलभाग शरीराच्या बाहेर टाकन्याची क्रीया होते.

परंतु आपण काय चूक करतो, हे लक्षात घ्या! एकदा आहार घेतला की तो पचण्याच्या आत परत आहार घेतो, थोड्या वेळाने परत आहार घेतो. असा सतत आहार घेतल्यामुळे पाचक पित्ताची पचन शक्ती व यकृताची कार्यक्षमता कमी होते. आपली पचन प्रक्रिया मंदावते.
पुढे अपचन अजीर्ण होण्याची शक्यता वाढते. हा प्रकार असाच चालू राहिल्यास आम्लपित्त, गॅसेस,मलावरोध, मूळव्याध, मधुमेह(Daibetes) रक्तात चरबी सटाने(Cholestrol) उच्च रक्तदाब ( Blood pressure) यासारखे जीवनशैली जन्य आजार मागे लागण्याची शक्यता वाढते. या सर्वांचा परिणाम हृदयावर देखील होऊन हृदयाची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते.
तुम्ही म्हणाल साध्या अपचानाने येवढे काय होईल? तर अपचन ही साधी घटना नाही. अपचनामुळे अपक्व (अपचीत) असा रस धातू तयार होतो. हा अपक्व रस धातू शरीरात शोषला गेल्यामुळे शरीरातील सर्व घटक प्रदूषित होण्याची शक्यता असते. या प्रदूषित धातू मुळेच वरील आजारांची शक्याता वाढते.

आपली एक छोटीशी चुकीची सवयी आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
हे सर्व टाळण्यासाठी एकच उपाय आहे, भूक लागल्यावर जेवणे म्हणजे अध्यशन टाळणे आणी आपली पचन शक्ती सुधारणे.

#पचनशक्ती_सुधारण्यासाठी_आयुर्वेदीय_औषोपचार_पंचकर्म_उपचारांचा_अतिशय_फायदेशीर_ठरतात.
शरीर शुध्दी पंचकर्मामुळे पचन संस्थेतील दोष पूर्णपणे बाहेर पडून पचन संस्था अधिक मजबूत होते.

तज्ञ आयुर्वेदिय डॉक्टरांच्या सल्ल्याने चुकीच्या आहार पद्धती विषयी जाणून घ्या आणि काळजी पूर्वक त्या टाळा.
पचनासंबंधित काही तक्रारी असेल तर आजचा आयुर्वेदीय डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#अधीक_माहितीसाठी_संपर्क
डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.),आयुर्वेद -पुणे
#विश्वांकुर_आयुर्वेद
पुणे:- Pan Card road, बाणेर

औरंगाबद:- मंजिरी निवास,
हॉटेल लालाजी समोर,
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड
संपर्क:- 8237523722 /
9420270785



#आयुर्वेद #पंचकर्म

18/03/2022

कंबरदुखीसाठी आयुर्वेदीय पंचकर्म उपचार !

सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, सर्वांमध्ये हा त्रास आढळतो कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.

पाठीच्या मणक्यांच्या काही विकृतीमुळे कंबरदुखी होते. स्पॉण्डयलोसिसी(Lumbar Spondylosis / Spondylitis) या आजारामध्ये पाठीच्या मणक्याचे हाड, कार्टिलेज आणि डिस्क वर विपरीत परिणाम होतो. यामध्ये हाडांची झीज होते, गादी सरकते(Disc Bulge),नस दबते(Nerve Compression), सांध्यांना सूज येते(Arthritis). यामुळे कंबरेत हालचाल करतानी देवांना होतात. कडकपणा जाणवतो. या मणक्यांच्या बाजूला असलेली स्नायूबंधने दुखावल्यास देखील तीव्र स्वरूपाची कंबरदुखी निर्माण होते, म्हणून कंबरदुखी अस्थीमधील विकृतीमुळे आहे की, स्नायूंतील विकृतीमुळे आहे हे समजणे आवश्य असते.

सायटिका मज्जातंतूमध्ये ही शरीरातील सर्वात मोठी मज्जातंतू आहे, जी कमरेखालील भागातून सुरू होऊन नितंबाद्वारे तुमच्या टाचांपर्यंत पोहोचते. यामुळेच सायटिका मज्जातंतूमध्ये समस्या निर्माण झाल्यास कमेरखालील संपूर्ण भाग प्रभावित होतो. सुरुवातीला केवळ कमरेमध्ये वेदना जाणवतात. पण यानंतर होणाऱ्या वेदना असह्य ठरू शकतात. कमरेनंतर हळूहळू तुमचे नितंब (Hips) त्यानंतर पायापर्यंत दुखणे वाढत जाते. या समस्यांमुळे कमरेखालील भागात दुखण्याव्यतिरिक्त अशक्तपणा किंवा मुंग्या आल्यासारखं वाटू शकतं.तसंच दोन्ही पायांऐवजी एकाच पायात हा त्रास जाणवू शकतो.

शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून त्यामुळे शरीराची जाडी वाढल्यानेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
स्त्रीवर्गामध्ये या त्रासाचे प्रमाण फार मोठे आहे असे दिसते. गृहिणीला घरकामाचा पडणारा ताण तसेच गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी या कंबरदुखीस कारणीभूत ठरतात. यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे जाणे (ज्यास श्वेतप्रदर म्हटले जाते.) अशा तक्रारी स्त्रियांमध्ये कंबरदुखी निर्माण करतात. अशाप्रकारे यापैकी कोणत्याही एक किंवा अनेक कारणांनी निर्माण झालेली कंबरदुखी मनुष्याला अस्वस्थ करते. बसताना किंवा उठताना कंबरेच्या ठिकाणी तीव्र किवा सौम्य अशा वेदना जाणवतात.

लक्षण
कंबर दुखणे, सकाळी उठताना बसताना त्रास होणे , कंबरेत एक प्रकारचा कडकपणा असणे , जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, कंबर, नितंब आणि पायांमध्ये हलक्या स्वरुपात दुखणे, कमरेच्या तुलनेत पायांमध्ये अधिक वेदना होणे, एकाच पायात तीव्र वेदना जाणवणे, पायांसह पायांचीही बोटेही दुखणे, कंबर आणि पायांमध्ये मुंग्या येणे, पायांमध्ये जीव नसल्याची जाणीव होणे

पाठ-मान-कंबर दुखी हा हाडांशी व पर्यायाने वाताशी सबंधीत आजार आहे, यासाठी वात दोष कमी करणारी बस्ति पंचकर्म, वेदनाशामक कटीबस्ती, रक्तमोक्षण, जलोका, आग्निकर्म, स्नेहन-स्वेदन यांचा प्रभावी उपयोग होतो. त्याचप्रमाणे इतर आयुर्वेदिय ओषधाने या आजारावर प्रभावी व गुणकारी उपचार होऊ शकतात. यासाठी आजाराच्या सुरुवातीच्या आवस्थेत आयुर्वेदिय उपचार व शरीर शुध्दी पंचकर्म केल्यास आजार लवकर आटोक्यात येऊ शकतो

पंचकर्म
बस्ती पंचकर्म:- आयुर्वेदानुसार वाढलेला वात कमी करण्यासाठी बस्ती चिकित्सा लाभदायक ठरते. मोठे आतडे म्हणजे पक्वाशय हे वाताचे स्थान आहे, या भागात तैल काधायुक्त औषधी सोडल्यास वातशमन होते, यामुळे बस्ती चिकित्सा वातदोषासाठी, वाताच्या आजारासाठी, कंबरदुखीसाठी अतिशय गुणकारी ठरते. यात मालीश शेक करुन संडासच्या मार्गात विविध औषधी, तैल काढे सोडले जातात.

कटीबस्ती:- पिठाची पाळ करुन औषधीयुक्त तैल कंबरेच्या ठीकाणी जीरवणे होय. यामुळे वेदना, सुज, हाडाची झीज, कमकुवतपणा कमी होऊन सांध्याना मजबुती मिळते. स्पॉण्डयलोसिसी, हाडांची झीज होते, गादी सरकते, नस दबते, सांध्यांना सूज येते. यासाठी अतिशय फायदेशीर दिसून येते

रक्तमोक्षण:- सांध्याच्या आजारामध्ये वातदोषासह रक्तदोष देखील वेदना व सुज निर्माण करण्यास कारणीभुत असतो. सांध्यातील हा रक्तदोष कमी करुन वेदना शमन करण्यासाठी जलोकावचारण (जळुच्या साहय्याने रक्त काठणे) उपयोगी ठरते. वेदना व सुज कमी करुन सांध्याना मजबुती मिळते.

धन्यवाद
डॉ सचिन गायकवाड - पाटील (M.D.)आयुर्वेद
श्री विश्वांकूर आयुर्वेद
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
८२३७५२३७२२ / ९४२०२७०७८५

08/03/2022

#सुवर्णबिंदू_प्राशन_संस्कार_शिबीर #कशासाठी?1) रोग प्रतिकार श क्ती वाढवण्यासाठी2) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी3) एकाग्रत....

08/03/2022

सुवर्ण बिंदू प्राशन हा एक संस्कार आहे. 14 तारखेला पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपल्या बाळाला हा डोस नक्की द्या ..! 👍🏻☺️

#सुवर्णबिंदू_प्राशन_संस्कार_शिबीर
#कशासाठी?
1) रोग प्रतिकार श क्ती वाढवण्यासाठी
2) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी
3) एकाग्रता वाढवण्यासाठी
4) बुद्धीच्या विकासासाठी विकास चांगला होण्यासाठी
5) पचन शक्ती सुधारण्यासाठी
6) शारीरिक विकास चांगला होण्यासाठी
7) सुमुकुमार कांती प्राप्त होण्यासाठी
😎 प्रदूषणापासून होंणारे श्वसनाचे आजार वेगवेगळ्या अल्लेर्गय पासून संरक्षण मिळण्यासाठी

#कोणी_घ्यावे?
वय वर्ष १६ पर्यंतच्या बालकांसाठी

#कधी_घ्यावे?
प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवसी

#का_घ्यावे?
आयुर्वदानुसार पुष्य नक्षत्राच्या दिवसी शरीराची पोषण करण्याची शक्ती अधिक असते. त्यामुळे सुवर्ण युक्त किंवा सुवर्ण भावित ही औषधी सुरु केल्यास शरीराचे उत्तम पोषण होण्यास मदत मिळते.

#अधिक_महितीसाठी_संपर्क:
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D.आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
स्वतंत्र सैनिक कॉलनी
औरंगाबाद
Phone No:- 8237523722 / 9420270785

https://www.facebook.com/662923337378678/posts/1708339926170342/
12/02/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1708339926170342/

#सावधान
#तुम्ही_जास्त_प्रमाणात_पाणी_पिताय_का?

खरोखरच पाणी पिण्याचे व जेवणाचे काही नियम आहेत का? असे नियम असावेत का? खरे तर खोलवर विचार न करता आपल्या आजूबाजूची माणसे जसे सांगतील त्या पद्धतीने आपले खाण्यापिण्याचे नियम सतत बदलत असतात. असे सतत बदलणारे नियम लगेचच आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे नसले तरी कालांतराने या नियमबदलांचे परिणाम शरीरावर दिसून येतात. उदा. सकाळी तोंड धुतल्यावर तांब्याभर पाणी पिल्याने पोट साफ होते असे ऐकून बरेचजण सकाळी पाणी पित राहतात व कालांतराने सर्दी अथवा बद्धकोष्ठतेचे शिकार होतात. म्हणून प्रत्येक आहार आणि विहाराच्या गोष्टींचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ती गोष्ट करायची की नाही याचा निर्णय घ्यावा.

#पाणी_पिणे_याविषयीही_बरेच_समज_गैरसमज_समाजात_प्रचलित_आहेत.
पाणी केंव्हा प्यावे? किती प्यावे? जेवणाच्या सुरवातीला, जेवणात, जेवणानंतर लगेच की जेवणानंतर अर्ध्या तासाने, असे विचारमंथन माणसामाणसांमध्ये सतत चालू असते. खोलवर विचार केला तर जेवण करत असताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पिणे अत्यंत लाभदायक असते. अन्न जठरामध्ये गेल्यानंतर अन्न घुसळण्याची क्रिया जठरात सुरू होते. थोडे अन्न थोडे पाणी एकाआड एक जठरात आले तर अन्न घुसळण्याची क्रिया अधिक चांगली होवून एकजीव असा अन्नरस तयार होण्यास खूपच मदत होते. जेवणाच्या सुरवातीला पाणी पिल्याने भूक मंदावते व अजीर्ण होण्याची शक्यता असते. जेवण संपल्यानंतर पाणी पिल्याने अन्न व्यवस्थित घुसळले जात नाही व अपचन होण्याची शक्यता वाढते. लगेचच या गोष्टीचा परिणाम जाणवत नाही पण कालांतराने दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पिणे अधिक योग्य आहे.

#पाणी_किती_प्यावे?
एका वेळी साधारणतः शंभर ते दीडशे मिली पाणी प्यावे. यापेक्षा जास्त पाणी पिल्याने मूत्रसंस्थेवर ताण येवू शकतो कारण पाणी शरीरात साठवण्यासाठी कोणतीच नैसर्गिक व्यवस्था मानवी शरीरात नाही. आपण पिलेले व जास्त झालेले पाणी लगेच मूत्रमार्गाने शरीराच्या बाहेर टाकले जाते. पाणी थोड्या वेळाने व थोड्या प्रमाणात सतत प्यावे. पाणी पिण्याचे प्रमाण ऋतूनुसार कमी जास्त होते. आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत की नाही हे ओळखण्यासाठी साधी खूण म्हणजे लघवीचा रंग. लघवीचा रंग जर पिवळसर असेल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे लागेल. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्रत्येक माणसाच्या पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी अधिक असू शकते.

#अधिक_महितीसाठी_संपर्क:
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D.आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
स्वतंत्र सैनिक कॉलनी
औरंगाबाद
Phone No:- 8237523722 / 9420270785

Address

Shree Vishwankur Ayurveda, Shrusti App. Near Magnolia Hotel, Baner Road, Baner
Aurangabad
411045

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 9am
Tuesday 10am - 2pm
5pm - 9am
Wednesday 10am - 2pm
5pm - 9am
Thursday 10am - 2pm
5pm - 9am
Friday 10am - 2pm
5pm - 9am
Saturday 10am - 2pm
5pm - 9am
Sunday 9am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Sachin G Patil Ayurveda Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Sachin G Patil Ayurveda Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category