Mind Vision Solutions

Mind Vision Solutions Enlighten Your Mind to Enhance Your Vision! One of our most successful ventures is PARAS (Passion Aimed Roadmap And Secrets).

The vision of Mind Vision Solutions is to work with people & individuals to create awareness of inner self; facilitate positive transformation, and to analyse needs & channelize a positive thought process. We arrange this workshop for the group of individuals who are looking to discover their passion and willing to live a life that is driven by the same. We have helped people realize the meaning of passion and finding a way to always choose in the favour of their own growth. We not only like to arrange PARAS because it helps people live a passionate life, but also because we learn new things about ourselves with our participants in each session of this workshop. We have also been active in the field of Training, Educational Consultation, Counselling, Informal Education, Certification, Logo Analysis, Colour Analysis, Career Guidance, Rational Behavioral Thinking, Production of Online courses, Therapy, and Research along with related and consequential activities for Personality Enhancement, individually or in a group. We also conduct awareness activities and therapies for various groups based on our expertise in graphology, Reiki, and Flower Remedy.

13/07/2023

*पॅशनची पॅशन 20 🔑🎯*
*आदिवासी विकास आणि शिक्षक- शिक्षण व्यवस्थापन भाग 3*
2018-19 दरम्यान आदिवासी विकास विभागाबरोबर असताना आदिवासी शिक्षकांची नेमणुक प्रक्रिया- आणि प्रारंभिक प्रशिक्षणाच्या अभिनव प्रयोगाच्या नियोजनाचे बारकावे आपण गेल्या दोन भागांत पहिले. *आव्हान घेतले होते -सुमारे नऊशे नवीन नेमणूक झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे- एकाच छताखाली.. तज्ञांचे व्हिडीओ शूट केले होते आणि विभागातील अनुभवी शिक्षक- मुख्याध्यापक बनणार होते संवादक...* *पहिला टप्पा होता संवादकांचे प्रशिक्षण आणि दुसऱ्या टप्प्यात ते शिकवणार होते शिक्षकांना.. व्हिडीओच्या मदतीने...* कोणती आव्हाने आली आणि कोणते *रूपांतरण* घडले, ते पाहूया या भागात.. थोडं सविस्तर...

*नियोजन* केले होते बारकाईने, प्रत्येक *लहान- मोठ्या व्यवस्थापनाचे, प्रशासकीय बाबींचे, त्याचबरोबरीने प्रशिक्षणाचे- योगासनांच्या वेळेचे.., प्रशिक्षणार्थींनी 24 तास विषयात राहावे याचे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी वेळेत पोहोचावे याचे आणि संपूर्ण परिसर शिक्षणाविषयी बोलावा याचेही...* सोबत होते मुंबईच्या क्वेस्टचे श्रीकांत आणि त्यांचे सहकारी.. प्रवेशद्वारापासूनच सजले अनेक कॉर्नर... *अब्राहम लिंकनचे शिक्षकांना पत्र, शैक्षणिक पुस्तके- खेळघरचे मॅन्यूअल, अकरा आदिवासी भाषांमधे भाषांतरित केलेली पाहिली ते चौथीची पाठ्यपुस्तके.. भरपूर वाचनसाहित्य...,* जवळच उभे केले एक मोठे *अपेक्षांचे झाड* , स्टिकी नोटस् सह.. *शिक्षकांच्या आदर्श शिक्षणाबद्दलच्या अपेक्षांनी सजणार होते ते झाड...*
पहिल्याच सत्रात आव्हान उभं राहिलं.. प्रशिक्षकांच्या भूमिका ठरवण्याच्या सत्रात.. ‘मॅडम, का या भानगडीत पडताय? आश्रमशाळांचेच विद्यार्थी आहेत हे, स्वत:च्याच संकल्पना स्पष्ट नसताना हे विद्यार्थ्यांना कसे शिकवणार?’,
‘यांनी बदलायचे ठरवले तरी ते घराजवळच राहणार, नातेवाईक, परिसर तोच असेल तर त्यांच्या सवयी डोकं वर काढतील’,
‘शिक्षकांना शिकवण्यापेक्षा आम्हीच मुलांना शिकवतो, त्याचा आनंद जास्त आहे,’,
‘या प्रशिक्षणापेक्षा आम्ही केलेले प्रयोग दाखवा त्यांना.. ते बघून शिकावं त्यांनी!’
*आव्हान होतं- ही नकारात्त्मकता कमी करण्याचं, येणारी पिढी आणि जुन्या पिढीतल्या द्वंदाचं, अनेक वर्ष यशस्वी शिक्षक/ मुख्याध्यापक असतानाही नव्या पद्धती, नवीन भूमिका शिकण्याचं, ती स्वीकारण्याचं..* आणखी एक आव्हान आलं भूमिकेचं.. *प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शिकवायचे नव्हते, तर त्यांना संवादकाची (facilitator) भूमिका स्वीकारायची होती,* हे होते त्यांच्यासाठी आव्हान... पण अखेरीस *ते होते खरे प्रयोगशील शिक्षक.. तयार झाले या प्रयोगालाही..* *रुपांतरणाला सुरुवात झाली आदिवासी संस्कृतीच्या सत्रात... समजले- स्वीकारले नवीन संदर्भ... नवीन भूमिका.....*
*विचार हलले ते धारणांच्या खेळात* - ‘आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाने सर्व गोष्टी दिल्याने ते स्वत: प्रयत्न करायला तयार नसतात..’,
‘शाळांमध्ये आदिवासी भाषांना स्थान नसावे’,
‘छडीशिवाय शिस्त येणारच नाही’... अशा कितीतरी धारणा... घडल्या मनमोकळ्या गरमागरम चर्चा... मतं मांडण्याऱ्या आणि हो.. स्वीकारणाऱ्याही... काय काय झाले बदल? ‘ *शक्यच नाही काही घडणे’ च्या जागी आलं ‘करून तर बघू...’*
*‘ते शिक्षक आदिवासी असल्यामुळे....’ च्या जागी आले-‘अनुभव घेऊन मत बनवूया..’* स्वीकारलेही काही बदल *‘आदिवासी शिक्षणाबरोबरच आरोग्य, विचार, बाहेरच्या जगाची आव्हाने असा आश्रमशाळांमधील आव्हानांचा मेरुपर्वत उचलताना ‘हे काम कोणाचे?’ असा शहरी प्रश्न विचारून चालणारा नाही.. प्रत्येकाने आपला सहभाग द्यावाच लागेल...’,* ‘ *विद्यार्थ्यांना शिकावेसे वाटण्यासाठी वातावरण, संदर्भ तयार करणे ही शिक्षकांची जबाबदारी असते.’..* कितीतरी विचार स्वीकारले गेले- स्पष्टपणे...
सुरुवात तर चांगलीच झाली होती... ठरले... रोज संध्याकाळी भेटून आढावा घेण्याचे आणि दुसऱ्या दिवसाच्या भूमिकेची दिशा ठरवण्याचेही..
आव्हानं आलीच.. प्रशिक्षणार्थी वेळेत न येणे हे तर घडणारच होते.. मजलदरमजल करत कानाकोपऱ्यातून आले.. अगदी नऊ महिन्यांची प्रेग्नंट सुद्धा.. काही लहान बाळांच्या आया आल्या.. आपले कुटुंब घेऊन... नियम तर होतेच.. *रुपांतरण केले... प्रक्षोभाकडे जाणाऱ्या परिस्थितीचे- नियमांना धरून घडायला हव्या अशा घटनांमध्ये..*
समांतर चक्र फिरत होते - अधिकाऱ्यांचे.. *तत्कालीन सचिव मा मनीषा वर्मा, आयुक्त मा डॉ किरण कुलकर्णी आणि अनेक अधिकारी आले भेट द्यायला.* . तिथेही *रुपांतरण... सत्कार, हार, भेटी यांचे- निरीक्षण, चर्चा, मार्गदर्शन यामध्ये...* त्यांच्याबरोबर होते अनेक तज्ञ .. आदिवासी शिक्षणात काम करण्याचा अनुभव असणारे तज्ञ.. *रात्र रात्र चर्चा रंगल्या.. अनेक नव्या भूमिका, धोरणे आणि उपक्रमांबाबत निर्णय घेतले गेले.* *एरवी ठाम, स्पष्ट असणारे वरिष्ठ- अधिकारी झाले आश्वासक, विश्वासक...*
*रूपांतरण दिसू लागले पहिल्याच दिवसापासून.. प्रशिक्षकांच्या प्रतिक्रियांमधून* .. ‘ *मॅडम, मुलं चांगली आहेत, यांना मदत करूया...’,*
‘ *आजपर्यंत कधी आशा वाटली नव्हती पण काहीतरी घडवण्याचा उत्साह, विश्वास वाटायला लागला आहे..’* प्रक्रिया चालूच होती.. समारोपाच्या वेळी पाऊस असूनही *खडया आवाजात ऐकू आली शिक्षकांनी घेतलेल्या प्रतीज्ञेतून...* *दिसून आला आदिवासी शिक्षणाच्या विकासासाठीचा आत्मविश्वास, ठामपणा आणि स्पष्टता...*
*भविष्यातील प्रक्रिया तर मोठी योजली होती.. द्रष्टेपणाने.. प्रत्यक्षात कशी येईल माहित नाही... प्रारंभासाठी योगदान देता आले याचे समाधान आहे.. नक्कीच!*

*माधुरी यादवाडकर*
*संचालिका, माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*9923032771*

11/07/2023

*पॅशनची पॅशन 19 🔑🎯*
*आदिवासी विकास आणि शिक्षक- शिक्षण व्यवस्थापन भाग 2*

2018-19 दरम्यान आदिवासी विकास विभागाबरोबर असताना आदिवासी शिक्षकांची नेमणुक प्रक्रिया- अडथळे आणि नियोजनाबद्दल आपण मागच्या भागात पहिले. या भागात पाहूया पुढचा टप्पा.. या प्रक्रीयेदरम्यान समोर आले होते शिक्षकांबद्दल अनेक आक्षेप आणि अडचणी.... तोडगा तेव्हढाच प्रबळ तरीही कल्पक ठरवला. न भूतो न भविष्यति असं नेमकं काय घडलं..? सांगते- थोडं सविस्तर...

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, अधीक्षक, ग्रंथपाल आणि गृहपाल निवडले होते, अंदाजे 950.. हे सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खरं सांगायचं तर दुर्गम भागात काम करणार होते. मात्र *अनुभव नव्हता, शिकण्या- शिकवण्यामागची भूमिका स्पष्ट नव्हती.. संभ्रम होता, आपल्या आदिवासी असण्याबद्दल अभिमान बाळगायचा की न्यूनगंड याबद्दलही... मूलभूत प्रशिक्षण आवश्यकच होते* .
प्रश्न समोर आले व्यवस्थापनाचे.. वारुळातल्या मुंग्यांसारखे... यांना प्रशिक्षणासाठी प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी बोलावणे, प्रत्येक (एकूण 29) प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी जागा, भोजन आणि इतर सर्व व्यवस्था, तज्ञ प्रशिक्षकांच्या त्या ठिकाणी येण्या-जाण्याची व्यवस्था, वेळा ठरवणे... सर्वच अत्यंत कठीण .. नव्हे अशक्यच... पुढचे आव्हान वेगळेच... जास्त मोठे.. नोकरीवर रुजू झाल्यानंतर *शक्यता होती, शिक्षकांच्या प्रवाहपतित होण्याची.. न करण्याची कारणे पुढे करण्याची..* तो बनचुकेपणा यायच्या आत त्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण (orientation) घेणे गरजेचे होते. आव्हान स्वीकारले.. थोडे मोठ्ठे...
मिटींग्ज बोलावल्या...संपूर्ण महाराष्ट्रात *आदिवासी शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रयोगशील प्रकल्प अधिकारी, शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या... मागवल्या प्रशिक्षणासाठीच्या सूचना आणि संभाव्य अडचणी..* *संकल्पना आणि हेतूबद्दलच्या अडचणी* . जबाबदारी घेतली संपूर्ण महाराष्ट्राच्या टीमसोबत नियोजन आणि आयोजनाचीही......
दोन आव्हानं होती - सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या व्यवस्थापनाचे.. *सर्वांचे प्रशिक्षण - एकाच वेळी, एकाच ठिकाणी करण्याचे..* आणि दुसरे आव्हान होते नियोजन- आयोजनाचे.. *नियोजन- आवश्यक विषयांचे, तेव्हढ्याच दर्जेदार प्रशिक्षकांच्या निवडीचे आणि त्यांच्या सर्व प्रशिक्षणार्थींसाठीच्या उपलब्धीचे...* ठरवायच्या होत्या *शिकवण्याच्या योग्य पद्धती, माध्यमं... द्यायचे होते प्राधान्य भूमिका ठरवण्याला.. भूमिका- शिक्षणाप्रती, विद्यार्थ्यांप्रती, विषयाप्रती.. आणि आदिवासींप्रतीही...*
तज्ञ मार्गदर्शक निवडले.. ISSER चे विभागप्रमुख श्री भास बापट मांडणार होते विज्ञान शिकवण्याच्या पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, ‘आभा’चे संस्थापक डॉ मोहन देशपांडे मांडणार होते आरोग्याच्या समस्या आणि उपायांबद्दल, पालकनीती खेळघरचे तज्ञ प्रशिक्षक मांडणार होते कला, भाषा आणि गणित शिक्षणाचे रचनात्त्मक मार्ग, आदिवासींबरोबर अनेक वर्ष काम केलेल्या सिराज मॅडम सांगणार होत्या आदिवासी संस्कृतीचे महत्त्व. मी जबाबदारी घेतली विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धती, शिकण्या- शिकवण्याची मानसिकता, भूमिकेचा स्वीकार, रचनात्मक शिस्त आणि वाचन संस्कृती वाढवण्याचे कल्पक मार्ग असे विषय मांडण्याची... धारणा तपासण्याचे अवघड आव्हान स्वीकारले पपेट शो तज्ञ मृदुला केळकर यांनी! याशिवायही अनेक विषय होतेच..
*सोपं नव्हतं- एकाच वेळी तज्ञ प्रशिक्षकांना 24 वर्गांमध्ये फिरवणं आणि तेव्हढीच उर्जा आणि दर्जा टिकवणं.* हे एकत्र साधणारा कल्पक मार्ग सुचवला स्वेच्छा-निवृत्त अधिकारी किशोरी गद्रे यांनी... या सर्व तज्ञांची सत्र व्हिडीओच्या माध्यमातून शूट होणार होती आणि त्यासह सत्र घेण्यासाठी सज्ज करायची होती विभागातल्याच अनुभवी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची टीम... तीन दिवस प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि लगेचच चार दिवस प्रत्यक्ष प्रशिक्षण असे साधारण आठवडाभर चालणारे प्रशिक्षण ठरले. लोणावळ्याचे अनेक प्रशिक्षण कक्षांनी सज्ज असलेले हॉटेल आरक्षित झाले.
*निकष ठरवले सत्र कसे असावे आणि नसावे याचे, प्रात्यक्षिकांचे, संपूर्ण परिसर शिक्षणाबद्दल दृश्य- अदृश्यपणे बोलत राहील याचेही* .. कामाचे टप्पे आणि दर्जाच्या निकषांसह चार्ट्स तयार झाले. पाठपुरावा तर करायचा होताच पण *दर्जाही तपासायचा होता- व्हिडीओजचा, प्रशिक्षण साहित्याचा, आणि घडावे-घडू नये अशा बारकाव्यांचाही...‘* रूपांतरण..’ असं म्हणून जादू तर घडणार नव्हती पण *सहभागींच्या किमान काही धारणा तर बदलायच्याच होत्या.* ‘लोणावळ्याला प्रशासनाचे प्रशिक्षण म्हणजे वर्षा-सहलीची संधी..’, ‘प्रशिक्षण दहा ते पाच म्हणजे म्हणजे आपल्यासाठी 11 पर्यंत आणि पाचनंतर वेळ रिकामा’, ‘शासकीय प्रशिक्षण म्हणजे लेक्चर्स.. फारफारतर एखादा खेळ..’, ‘शिकवण्यामध्ये काय शिकणार? त्याऐवजी अधिकाऱ्यांसमोर आपल्या प्रशासकीय समस्या मांडण्याची संधी घ्यावी.’... अशा अनेक धारणा.. वर्षानुवर्षे ‘ *असंच असतं’ असे स्क्रिप्ट लिहून दिल्यासारख्या..*
*या अनलर्निंग बरोबर घडायला हवे होते कृतियुक्त शिक्षण* , *‘अनुभव घ्या- प्रात्यक्षिक दाखवा’ टाईप ‘सूर्य-जयद्रथाचे’ लगेचपण...* *पडायला हव्या होत्या शंका आणि शोधासाठी उपलब्ध हवे होते स्रोतही.. पुस्तकं, अनुभवी तज्ञ आणि माध्यमांचेही स्त्रोत...* *निर्माण व्हायला हवा होता विश्वास- व्यापक पातळीवरही हे बदल घडवता येतील याचा,* *यायला हवे होते झपाटलेपण शिक्षणाच्या उत्तमतेकडे जाण्याचे मार्ग शोधण्याचे...* *प्रशिक्षणकेंद्रातही... आणि बाहेरून पाहणाऱ्या यंत्रणेतही..*
यापैकी किती घडले? कसे घडले? अपेक्षित- अनपेक्षित अडचणींचे रुपांतरण कशात झाले? ... जाणून घ्यायला आवडेल? पाहूया पुढच्या भागात...
*माधुरी यादवाडकर*
*संचालिका, माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*9923032771*

06/07/2023

गोपनीय पद्धतीचे नियोजन तर झाले.. आंदोलकांचा विरोधही वाढत चालला.. आव्हानंही... *एका परीक्षा केंद्रावर आंदोलकांनी घेराव घातला, परीक्षार्थींना प्रवेश करायला अटकाव केला.. पुन्हा पेपर काढले, पुन्हा प्रक्रिया झाल्या, पुन्हा परीक्षा घेतली* .. त्या केंद्रासाठी... निवडही झाली.. *विना आक्षेप.. प्रथमच* ...
*काय काय घडले प्रथमच?* *आदिवासी आश्रमशाळांसाठी केवळ आदिवासी शिक्षकांची निवड...* *online पद्धतीने.. त्यांच्याच भाषेत परीक्षा देण्याची मुभा.. विना आक्षेप निवड... आक्षेप ना पेपर फुटीचे, ना चुकीच्या प्रश्नांचे.. ना नेमणुकीसाठी गैरव्यवहार घडण्याचे...*
अजूनही दर्जेदार.. महत्त्वाच्या प्रक्रिया घडणार होत्या.. काय घडले ते जाणून घ्यायला आवडेल? पाहूया पुढच्या लेखात...
*माधुरी यादवाडकर*
*संचालिका, माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*9923032771*

21/06/2023

*Teens बरोबर MUST-I - 16 🎳🎨🎯*
*आदिवासी आश्रमशाळा आणि भयमुक्त शिक्षण- भाग 3*
2018-19 दरम्यान आश्रमशाळांसाठी केलेल्या पायाभूत कामाबद्दल मांडते आहे... थोडे सविस्तर...
आश्रमशाळांमधील मुले-मुली बोलत नाहीत, अडचणीत असली तरी, आणि आनंदात असली तरी...
सोपी जीवनशैली ठरवली गेली होती... *घडणाऱ्या घटनांना मोठ्यांच्या अपेक्षांप्रमाणे प्रतिसाद देणे* एव्हढेच त्यांचे उद्दिष्ट.. पर्यावसान शक्यता एकच - *लहानपणी शोषण- शारीरिक आणि मानसिक ..., मोठेपणी प्रभाव - अहितकारी गट, संगत-सवयी यांचा...*
*हे कुठेतरी बदलवायचे तर मुळापासून काम करायला हवे होते. भीतीच्या जागी यायला हवा होता विश्वास.. सवय लागायला हवी होती विचार करण्याची, स्वत:चे विचार व्यक्त करण्याची, भावना समजून घेण्याची- इतरांच्या आणि स्वत:च्याही...* त्याचबरोबर *दृढ व्हायला हवा होता स्वत:वरचा विश्वास- शिकण्यातून, समजण्यातून, अभिव्यक्तीतून आणि आदर देण्यातून आणि घेण्यातून निर्माण होणारा विश्वास...* आव्हान स्वीकारले... हे सर्व घडू शकेल असे *वातावरण- संधी निर्माण करण्याचे* . जबाबदारी दिली *अ-भय अभियानाच्या गौरीताई, कल्याणीताई, संगीताताई, मिलिंददादा आणि संपूर्ण टीमकडे* . पायलट प्रयोगासाठी निवडली पुण्याजवळील *कोहिंड्याची आश्रमशाळा* - *मुख्याध्यापक सक्रीय..सपोर्टिंग* , आणि खूप लांब असली तरी त्यातल्या त्यात जवळ असलेली शाळा... उद्दिष्ट, साध्य स्पष्ट होतेच, *अपेक्षित वृत्तीबदल, वर्तनबदल याचे निकष ठरवले- विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षक- अधिक्षकांसाठीही...* तीन वर्षांच्या कार्यक्रमाची आखणी केली.

प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार होती. पहिल्या टप्प्यात होणार होती शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा- विधायक शिस्तीची संकल्पना- मूलतत्वे आणि अपेक्षित सहकार्य याविषयीची कार्यशाळा, इयत्ता पाचवीच्या वर्गावर आठवड्यातून एकदा असे वर्षभर प्रयोग हा दुसरा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या विषयशिक्षणामध्ये अडथळे दिसल्यास आवश्यकतेनुसार शिक्षकांचे प्रशिक्षण हा होता तिसरा टप्पा!
दोन दिवसीय कार्यशाळेत अपेक्षित ते घडले. शिक्षक, मुख्याध्यापक, शिपाई सगळेच अधूनमधून महत्त्वाच्या कामांसाठी आत बाहेर करत होते. मात्र संकल्पना समजून घेण्यामध्ये पुढाकार घेतला अधीक्षिका आणि काही निवडक इच्छुक शिक्षकांनी.... आणि सुरु झाला पायलट प्रयोग. वर्ग निवडला पाचवीचा आणि माध्यम निवडले वर्गसभा!
वर्गसभेसाठी वर्गातले सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मार्गदर्शक गोलात बसणार होते, जमिनीवर... *उतरंड सोडण्याचा पहिला टप्पा* .. वातावरण थोडे सैल व्हावे, मुलांना विषयात शिरता यावे यासाठी सुरुवात केली चित्रांनी ... गोष्टी ऐकल्यावर, गाणी म्हणल्यावर, नवीन माहिती घेतल्यावर मुलांनी चित्रांच्या माध्यमातून ते व्यक्त केले, चित्रकला येत असली तरी, येत नसली तरी... नंतरच्या गप्पांमध्ये मुले बोलली.. आपल्या चित्रांबद्दल... खरंतर *तोंडपाठ केलेल्या- ‘म्हणून दाखव रे ते भाषण’, ‘म्हण ग ती कविता’.. अशा ठराविक मुलांनी करायच्या गोष्टी सोडून ‘मनातले काहीतरी बोलणे’ प्रथमच घडत होते.* सुरुवात तर झाली...
गोष्ट ऐकून बोलणे थोडे जमू लागले पण स्वरूप मात्र ‘थोडक्यात सांगणे’ असेच होते. सर्वांच्याच वाचन- लेखन क्षमता पहिल्या- दुसऱ्या पातळीवर होत्या त्यामुळे पुस्तक वाचन, मनातले लिहिणे हे पर्याय तर बाद होते.. मुळात स्वयंप्रेरित, त्यात TRTI चेही प्रशिक्षण घेतलेल्या त्या अधीक्षिका मात्र चांगल्या तयार झाल्या. दोन दिवसीय कार्यशाळेनंतर त्यांनी रोज संध्याकाळी काही ना काही उपक्रम घ्यायला सुरुवात केली. अधीक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे मुलगे मात्र त्यापासूनही वंचितच राहिले.
उपक्रम आणि प्रशिक्षणापेक्षाही इथे जास्त होती अडथळ्यांची शर्यत... अनेक प्रकारचे अडथळे - खूपच लांबचा प्रवास, खराब रस्ते, शिक्षक वेळेत उपलब्ध नसणे.. शाळेच्या परीक्षा, सुट्ट्या, पाऊस- रस्ते बंद असणे, अडचणीच अडचणी.. आणि एक अंतर्गत, अदृश्य अडथळा सांगू? आदिवासी विद्यार्थ्यांचा, त्यांच्या शिक्षणाचा प्रामाणिक कळवळा असणाऱ्या काही जुन्या अधिकाऱ्यांच्या शिस्तीविषयी काही धारणा होत्या. *छडी- लागट बोलणे, शिक्षा आणि त्या माध्यमातून अपेक्षित शिस्त यावर विश्वास असणाऱ्या अधिकाऱ्यांचा* विरोध, अंहं, *गैर-विश्वास* होता *‘प्रेमाने- आदराने मुले बिघडतात’, यावर..., ‘हे प्रयोग... नव्हे ‘थेरं’ आत्तापर्यंत निर्माण केलेल्या धाकाचा डोलारा कोसळवतील’ यावर..* त्यांचा दृश्य, अदृश्य, प्रामाणिक विरोध आणि या प्रॅक्टिकल अडचणी या सगळ्या पाठशिवणीच्या खेळातून ठरल्यापैकी काही वर्ग झाले.. परिणामही दिसू लागले. आणि हो, काही वेगळेच unplanned बदलही घडले.. प्रकल्पाच्या सुरुवातीलाच शाळेत पाणी आले, नियमितपणे स्वच्छता होऊ लागली, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन दुरुस्ती करून गेले, कचरा व्यवस्थापन यंत्रणा नियमित झाली, शाळेत यापूर्वीच मोठा TV, चांगले PC लागले होतेच, मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने आधुनिक जिम तयार झाले होते, ग्रंथालयात पुस्तके येऊ लागली होती. उपक्रम सुरु झाल्यानंतर महिन्याभरातच नॅपकिन डीस्पोझल मशीन लागले... मुलांसाठी रोज दूध, केळी आणि अंडी येऊ लागली, रोज पोळ्या होऊ लागल्या... शासनाने लागू केलेल्या सर्व सोयी.. आणि गरजेच्या बाबींची पूर्तता होऊ लागली. यात कोणताही गैरकाम नसावे कदाचित *परंतु ज्या काही अडचणी होत्या त्या प्राधान्याने सोडवल्या गेल्या.. विद्यार्थी आणि त्यांच्या समस्या प्राधान्यक्रमावर आल्या.. हेही नसे थोडके*!
हवे होते *सातत्य. उपक्रमांचे आणि पुढाकार घेण्याचे* - *समस्या शोधण्यासाठी- समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सातत्य...*
*मुख्याध्यापकांची प्रशिक्षणे पूर्ण झाली असती तर..? शाळेतले प्रयोग तीन वर्ष सातत्याने केले गेले असते तर..?*
*मा आयुक्त सरांबरोबर इतर अधिकाऱ्यांनाही या प्रयोगांची मूल्यं- तत्वं समजून घ्यावीशी वाटली असती तर...?*
*जुन्या अधिकाऱ्यांनी ‘थेरं’ या सरसकट नावाखाली ‘तुमचे- आमचे’ हा वर्णवादाच्या पॅकिंगमध्ये लपलेल्या ‘हार-जिती’ला इरेस नेले नसते तर...?*
*विद्यार्थ्यांच्या भय-मुक्त शिकण्यासाठी-जगण्यासाठी विधायक शिस्तीचा वापर-* *दृश्य परिणाम कधी दिसतील याची खात्री नसताना* *विश्वास आणि विचारांच्या बळावर मूलगामी प्रयोगांना सुरुवात करणे, त्याचा पाठपुरावा करणे सगळ्यांना जमेल..?*
*एका बाजूला अनुभवी विचारवंतांची टीम आहे.. दुसऱ्या बाजूला नितांत गरज आहे* .. आणि आहे विश्वास - कधीतरी यांचा मेळ घातला जाईल... सर्वांचा त्यावरचा विश्वास दृढावेल आणि मुख्य म्हणजे *मुलांना भयमुक्त जगण्याच्या संधी मिळू लागतील.. हेच ध्येय आहे.. हीच आहे अपेक्षा!*
*माधुरी यादवाडकर*
*संचालक*
*माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*९९२३०३२७७१*

17/06/2023

*Teens बरोबर MUST-I - 15 🎳🎨🎯*
*आदिवासी आश्रमशाळा आणि भयमुक्त शिक्षण- भाग 2*
2018-19 दरम्यान आश्रमशाळांसाठी केलेल्या पायाभूत कामाबद्दल मांडते आहे... थोडे सविस्तर... आश्रमशाळांमधील वातावरण- नेमकं सांगायचं तर *शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती भूमिका बदलण्यासाठी काही प्रयोग करायचे ठरले* . वृत्तीबद्दल ही मुळातच संथपणे चालणारी प्रक्रिया.. काही परिणाम लगेच दिसू शकतात पण ते अंगवळणी पडणे, मुळातून बदल होणे आणि ते प्रत्यक्ष दिसणे हे मात्र वेळ घेणारे काम... इथे तर *संपूर्ण 1800 बदलांचा त्यांना स्वीकार करायचा होता, जुन्या, सोयीच्या सवयी सोडण्यासाठी तयार व्हायला लागणार होते...*
‘ *ई बिडा उठाए की नाही?...’* शंकां तर होतीच पण त्याचबरोबर होता *निर्धार, सामील व्हायचे नव्हते फक्त नावे ठेवणाऱ्यांच्या गटात, तर भाग व्हायचे होते पायाभूत बदल करणाऱ्यांचा...* तेही *अडचणी उल्लंघून यश कधी मिळेल याबद्दल कोणतीही खात्री नसताना...*
प्रयोगाचा आराखडा तयार केला. .त्यावेळचे अभ्यासू आणि विचारवंत *आयुक्त मा डॉ किरण कुलकर्णी* सर यांच्यासमोर मांडला... कारणही तितकेच प्रखर होते. त्या काळात विद्यार्थिनींच्या शोषणाच्या काही केसेस प्रकर्षाने समोर आल्या होत्या... अनेक महिने त्या याबद्दल बोलल्याच नव्हत्या आणि इतके होऊनही त्या विद्यार्थिनींना बोलते करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले होते. शाळेतल्या शैक्षणिक आणि इतर अडचणींबद्दलही विद्यार्थी बोलत नव्हते...कारणं होती *भीती.. विचार करण्याची सवय नसणे.. आपण असेच आहोत या धारणेचा प्रभाव... कितीतरी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कारणं..* कुलकर्णी सरांना याची जाणीवही होती आणि दूरगामी परिणामांबद्दलची दूरदृष्टीही... त्यांचे पाठबळ मिळाले.. विश्वास दृढावला..
सहभागी केले ‘ *अ-भय *अभियान’च्या** प्रतिनिधींना.. मुलांच्या भयमुक्त जगण्यासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या *गौरीताई देशमुख* आणि त्यांच्या टीमला.. टीम होती *अनुभवी, अभ्यासू, तज्ञ आणि समजपूर्वक बदलाभिमुख...*
फक्त विद्यार्थ्यांबरोबर किंवा फक्त शिक्षक असं काम करून चालणारच नव्हतं. अधीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांबरोबरच काम करण्याचे नियोजन केले.. दोन टप्प्यांमध्ये काम करायचे ठरवले. एका आश्रमशाळेतला एक वर्ग- संबंधित शिक्षक आणि अधीक्षक यांच्याबरोबर *विधायक शिस्त- वर्गसभा आणि पुरक उपक्रम- याबद्दलचा पायलट प्रकल्प-* हा होता एक टप्पा, आणि त्याच वेळी *दुसऱ्या टप्प्यावर TRTI मध्ये सलग प्रशिक्षणं आयोजित केली* , *सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक/ अधीक्षिका आणि शिक्षक प्रतिनिधी* यांच्यासाठी... या प्रशिक्षणांसाठी विषय निवडले माहिती देणारे- *मुला-मुलींच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढीच्या टप्प्यांची आणि प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण- मदत करण्यासाठीची माहिती* ... विषय विचार बदलवणारे- मुलांना आदराने- हो, *मुलांना आदर, प्रेमाने आणि विश्वासाने वागवायचे म्हणजे काय करायचे* याबद्दल विचार करायला लावणारे विषय, आणि सत्र *शिक्षा किंवा बक्षीस- लालूच यांचे परिणाम सांगणारे* - short term आणि long term परिणाम... सत्र भूमिका ठरवणारे- *मुलांना अभ्यासाच्या, स्वत;च्या भल्याच्या प्रत्येक वळणावर योग्य पर्याय निवडता यावेत* यासाठी... आणि हो, भूमिका ठरवायची होती - *मुलांच्या गैरवर्तनाच्या वेळीचीही* ... आणि सत्र होते *डोळसपणे बघायला लावणारे- स्वत:च्याही वर्तन- सवयींकडे...* अर्थात कोणालाही *ब्लेम किंवा गिल्टच्या फेऱ्यामध्ये न अडकवता स्वीकार आणि सुधारणेकडे नेणारे...* *विधायक शिस्तीच्या पद्धतीचा वस्तुपाठच होता तो!*
सर्व सत्र *कृती आणि उपक्रमांवर आधारितच* योजली... शारीरिक बदल, समाजाची मानसिकता घडण्यामागचा इतिहास अशा माहितीच्या सत्रांमध्ये होता आनंद, उत्साह... खरी कसोटी होती मुलांच्या मानसिकतेबद्दलचे विचार आणि शिस्तीमागची भूमिका निवडण्याच्या सत्रात... कसोटी सहभागींची, आणि प्रशिक्षकांचीही.. सत्रांमध्ये गरमागरम चर्चा- वाद रंगत होते... माध्यम निवडले होते रोल प्लेचे- त्यामुळे त्यांना *परिस्थिती पेचाची आहे याचा स्वीकार तर करता आला* , *गतानुगतिक पद्धतींचे अपयशही आधीच मान्य केले होते* त्यामुळे आता नव्या पद्धती समजून घेण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. मग आरोपांची जागा घेतली शंकांनी... ‘ *अहो मुलांना शिक्षा केली नाही तर ती डोक्यावर बसतील ना?’, ‘तुम्ही विश्वास टाका म्हणता, पण चोरून व्यसन करताना (मोबाईल वापरताना/ खोटं बोलताना/ शिव्या देताना/ लहान मुलांना त्रास देताना... यादी मोठी होती..) सापडले तर? नव्या पद्धतीत आम्ही नक्की कसं वागायचं?’ ‘मुलांवर प्रेम तर खूप करायचं असतं आम्हाला पण गैरवर्तन घडलं की पुढचे अनेक दिवस राग, धाक, कडक शिस्त याचा मुखवटा पांघरावाच लागतो.. अशा वेळी काय करावे..?’ ‘प्रेमळपणा म्हणजे मुलं म्हणतील तसं वागायचं नाही आणि धाकाच्या जागी ठामपणाचं रोपण करायचं हे बुद्धीला तर पटतंय पण कृतीमध्ये आणण्यासाठी स्वत:चा कायापालटच करावा लागेल..’* शंका संपतच नव्हत्या... वारुळातून येणाऱ्या मुंग्यांसारख्या... शिकलेल्या मूल्यांचा आधार घेतला... उपाय निवडले...
विषयांच्या ओघात काही कळीच्या मुद्द्यांनाही हात घातला गेला. जे *वास्तव समोर आले त्याने आम्हालाही क्षणभर अवाक केले* -एक मुख्याध्यापक उघडपणे- ठामपणे सांगत होते, ‘काही गरज नाही आत्मविश्वास, शिक्षण यावर इतके खोलवर कष्ट घेण्याची.. मी पाठांतरची आणि मार्क मिळवण्याची पद्धत शोधली आहे... ती द्या सगळ्यांना.. रिझल्ट आला की झालं..’, ‘आदिवासी भाषांमध्ये बोलायची परवानगी कशाला देता? आपल्याला त्यांना मराठीच नाही तर इंग्रजी माध्यमाकडे न्यायचे आहे...’ याला *ठामपणे तरीही शांतपणे उत्तर देणे* ही आमची जबाबदारी होती.
हिंसा- व्यसन या विषयांवरील सत्रात समोर आले काही सत्य... अनेक सहभागींसाठी रोजचे व्यसन अपरिहार्ह्य होते. अनेक पुरुष घरात शारीरिक हिंसा करत होते.. बायको- मुलांना मारणे हा शिरस्ता होता. त्यांचे सहकारी त्यांच्यासमोरच त्याबद्दल सांगत होते. (डोळ्यासमोर ‘बाई हा चोरून सिगारेट ओढतो-‘ असं सांगणारा वर्गच उभा राहिला) *लाज वाटली (किंवा नाही वाटली), माना खाली घातल्या तरी लगेच बदल होणार नव्हते हे दिसत होते..* अगदी स्पष्ट सांगू? कसोटीची वेळ आमच्यावर आली... ‘असे करू नका.. परिणाम किती वाईट होतो..’ असे *गुळगुळीत झालेले शब्द वापरून, टाकणं टाकता येणार नव्हतं* ... *दोन दिवसांच्या सत्राच्या मर्यादा होत्या , त्यांच्यातल्या बदलाला स्वत:पासून सुरुवात व्हावी ही आमची आंतरिक तळमळही होती* . विधायक शिस्तीच्या मूलतत्वांच्या आधारावर बोलणे पुढे नेले, *का आणि काय करायचे याच्याच बरोबर समज असलेल्या सहकाऱ्यांचे टीमवर्क आणि किमान बदलांचे निकष ठरवून उपायादाखल कृतीचे नियोजन केले.*
शेवटी निघताना सर्वांच्या चेहऱ्यावर होते *समाधान - माहिती आणि सकारात्मक मार्ग मिळाल्याचे* ... पण त्याच वेळी होती *साशंकता- आपल्यात मुरलेल्या जुन्या सवयींबद्दल, वरिष्ठांची भूमिका (किंवा आडमुठेपणा), इतर सहकाऱ्यांचे सहकार्य (किंवा असहकार्य) अशा अनेक गोष्टींबद्दल* .. ठळकपणे दिसत असे विचारांची सरमिसळ. पण त्याचबरोबर *रुजली होती जाणीव आणि समजेत झालेले बदल* ..’मला लक्षातच आलं नव्हतं *हाताने दिलेल्या मारापेक्षा तिरकस बोलण्याच्या जखमा जास्त टिकतात* ... आता बोलताना खूप विचार करावा लागेल.‘, ‘ही पद्धत फक्त *शाळेतच नाही तरी घरी पण वापरता येईल..* त्यामुळे *माझे आणि वयात येणाऱ्या मुलांचे नाते सुधारेल* आशी आशा वाटायला लागली आहे.’ , दबक्या आवाजात असाही मुद्दा आला- ‘ *आमचे वरिष्ठ पण आम्हाला अशा सन्मानाने वागवू शकले तर?* *उतरंड, हार-जीत यांची गरजच उरणार नाही.’ विचार होते बदलांचे... समजेतून आलेल्या विचारांचे...*

काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण करता आले का? शाळेतल्या पायलट प्रकल्पाचे काय झाले? पाहूया पुढच्या लेखात...

*माधुरी यादवाडकर*
*संचालक*
*माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*९९२३०३२७७१*

11/06/2023

*Teens बरोबर MUST-I - 14 🎳🎨🎯*

2018-19 दरम्यान आदिवासी विकास विभागाबरोबर काम करत होते, आदिवासी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षण यावर अनेकदा चर्चा होत होत्या. विद्यार्थ्यांच्या आर्थिक, भौतिक, शैक्षणिक गरजा हा एक महत्त्वाचा भाग होताच पण *सक्षम विद्यार्थी बनण्यासाठी फक्त तेव्हढेच पुरेसे ठरत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे* . *विद्यार्थ्यांचा पुढाकार, समजेत बदल, अनुभवविश्वाशी निगडीत संदर्भ, कृती आणि अनुभूती, जाणिवांची जागृती* अशा अनेक घटकांवर स्वतंत्र काम करणे गरजेचे आहे...

अर्थात मानसिकता बदलण्याआधी ती समजून घ्यायला हवी होती. ‘ *ती* *मुलं अबोल असतात’, असं म्हणून त्यांचे अव्यक्त संवाद सोडून देऊन चालणार नव्हते.* ‘त्यांची भाषा वेगळी असतेना... मग त्यांना बोलायची लाज वाटते...’, ‘...आपली भाषा, आपले शब्द, आपले संदर्भच वेगळे, त्यांना का शिकावेसे वाटेल?‘ अशी *कारणं पुढे येत होती... आदिवासी शिक्षणाविषयी तळमळ असणाऱ्यांची आणि काहीही करू नये असे वाटणाऱ्यांचीही ...*

आश्रमशाळेत प्रत्यक्ष जाऊन पाहायचे ठरवले. बरोबर होते ‘ *अ-भय अभियान- मुला-मुलींच्या भयमुक्त जगण्यासाठी पायाभूत काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते* आणि पुण्याच्या ‘ *अक्षरनंदन’ शाळेच्या एक संस्थापिका ‘गौरीताई देशमुख’ ...*

*शाळा शहरांपासून, वस्तीपासून अत्यंत दूर, त्यामुळे वीज, पाणी यासाठी गावावर अवलंबित्व आणि त्यामुळे कायमच अडचणींमध्ये अडकलेल्या..* त्यामुळे स्वच्छता -शांततेच्या बाळकडूवर मोठ्या होणाऱ्या मुलांसाठी- आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, अगदी संडास-बाथरूमसाठीही अनेक दिवस पाणी नसणे, दिवसातला बराच काळ लाईट्स नसणे, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन दिवसोंदिवस उपलब्ध न होणे आणि पर्यायाने विद्यार्थी- शिक्षकांनी आहे त्या स्थितीशी जुळवून घेणे ... आव्हानं अनेक होती.
*वस्तीपासून दूर, निसर्गाच्या जवळ, घरासारखे वाटावे असा परिसर तर होता* पण *स्वच्छतेचा अभाव, अचानक समोर आलेले नियम आणि बंधनं, सूचना आणि तेही न समजणाऱ्या शहरी भाषेत..* गरज होती आपलेपणा वाटण्याची पण परिणाम होता *परकेपणा, भीती, अबोल, अव्यक्त तरीही कष्टाळू, जुळवून घेण्याचे प्रयत्न करणारी मुलं...*
शाळांचे *मुख्याध्यापक, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी अनेकांचे मत.. नव्हे तळमळ होती* विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणायची म्हणजे शहरी मुलांसारखे बनवण्याची आणि त्यांच्यासारख्या सर्व सोयी-सुविधा पुरवण्याची... *हे सर्व करूनही विद्यार्थ्यांमध्ये चमत्कार घडत नव्हते..* आणि मत येऊन पोहोचत होतं, ‘ *एव्हढं करूनही काही घडत नाही म्हणजे मुलांची बौद्धिक क्षमताच तेव्हढी असणार...’*

मुलांना, शिक्षकांना, अधीक्षकांना भेटल्यावर, त्यांचे निरीक्षण केल्यावर लक्षात आले काही सुटलेले मुद्दे.. *महत्त्वाच्या मुलभूत सोयी –सुविधा पुरवल्या जाण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते प्रशासनाने* , आणि *विद्यार्थ्यांना शाळा- शिक्षण आपलेसे वाटावे यासाठी बदलायला हवी होती मानसिकता.. शिक्षकांची, मुख्याध्यापक, अधीक्षक आणि सर्वच कर्मचाऱ्यांची..* विद्यार्थ्यांना मिळायला हवे होते *अनुभव- मनातले सांगण्याचे, बोलण्याचे- समजलेल्या विषयांबद्दल आणि न समजलेल्याही...* अनुभव हवे होते *ऐकण्याचे आणि समजण्याचे, विचारण्याचे आणि सांगण्याचे... परिणामी वृद्धी आणि विकासाचे.. बौद्धिक, मानसिक, शिक्षणिक विकासाचे, आत्मविश्वास वृद्धीचे...*
निर्णय थोडा धाडसाचाच होता.. मानसिकता बदलासाठी असे मूलगामी प्रयत्न करण्याचा विचारही शिवला नसल्याच्या पार्श्वभूमीवर *tangent भूमिका होती* ...‘आम्ही रोज सांगतोच की त्यांना- ‘लाजू नका, मनातले बोला म्हणून..’ या भूमिकेतून *जीवनकौशल्य विकासाच्या पूर्णपणे नव्या भूमिकेत जायचे होते* .. वर्षानुवर्षे चालवलेल्या ‘ *सांगा-ऐका’ पद्धतीतून बाहेर पडून , जायचे होते ‘संधी निर्माण करण्याकडे* ...’ संधी *अनुभवातून शिकण्याच्या, मुलांना ‘ऐकावे-बोलावेसे वाटावे’ असे वातावरण निर्माण करण्याच्या..* वातावरण *विश्वासाचे- प्रेमाचे- परस्पर आदराचे...* ‘ *आम्ही सांगतो तुम्ही बदला’ या भूमिकेतून ‘बदलासाठी स्वत: पुढाकार घेण्याच्या’ भूमिकेत यायचे हे स्वीकारणे हेच मोठे आव्हान होते...* *विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठीही..*

काय केले या बदलांसाठी? काय घडले? समजून घ्यायला आवडेल? पाहूया पुढच्या लेखात..

*माधुरी यादवाडकर*
*संचालक*
*माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*९९२३०३२७७१*

22/04/2023

*Teens बरोबर MUST-I-13 🎳🎨🎯*
*आदिवासी वसतिगृहातील काम- भाग 3*
2018-19 मध्ये आदिवासी विकास विभागाबरोबर काम करत होते तेव्हाच्या आदिवासी शासकीय वसतिगृहातील समस्या आणि काही उपाय आपण मागील दोन भागात पाहिले, *प्रेरणा क्लब* अंतर्गत काय घडले पाहूया - थोडे सविस्तर...

विद्यार्थ्यांचे आंदोलन हे निमित्त ठरले - *आत्मपरीक्षण* करण्याचे, *दूरगामी परिणामांसाठी* नियोजन करण्याचे, *वसतिगृह हे उर्जाकेंद्र बनवण्यासाठी मुळापासून प्रयत्न करण्याचे* ..

*प्रेरणा क्लबचे* मोड्यूल ठरवताना आत्तापर्यंतच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा आधार होताच... *उपक्रम* ठरवले- *कृतीवर आधारित* , मुला-मुलींना *बोलायला लावणारे* , *निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवायला लावणारे, प्रश्न विचारायला लावणारे- इतरांना- आणि स्वत:लाही..*
घ्यायची होती *माहिती -परिसर, शिक्षण, सामाजिक सेवा-सुविधा, करिअर अशा अनेक गोष्टींची* आणि ती माहिती उपयोगातही आणायला लागणार होती...
उपक्रम होते *वसतिगृह आपलेसे वाटायला लावणारे,* आणि *जबाबदारीमध्ये सहभाग* घ्यायला लावणारे- *स्वच्छतेपासून नियमनापर्यंत* सहभाग... *नियमन* करायचे होते *वेळेचे, अभ्यासाचे, कामाचे, पैशांचे, आरोग्याचे, मैत्री-प्रेमाचे, माध्यमांचे आणि स्वत:च्या भावभावनांचेही...* त्यासाठी *माध्यमं निवडली कला- खेळ-व्यायाम-फिल्म-मोबाईल-चर्चा- वादविवाद* ... आणि कितीतरी व्यक्त करायला लावणारी माध्यमं...
त्यांनी *स्वीकारायची होती चॅलेंजेस, स्वत:साठी आणि गटासाठीही... त्याच्या नोंदीही ठेवायच्या होत्या* आणि त्यावरून *पुढचे नियोजन* करायचे होते. साधन व्यक्ती आणि गृह्पालांबरोबरच मदत करणार होता *सपोर्ट गृप आणि त्यांनीच निवडलेले प्रेरक आणि प्रेरिका...*

माझ्यासमोर वेगळंच चॅलेंज होतं- आता स्वत: सत्र न घेता बदल घडवून आणायचे होते, इतरांच्या माध्यमातून..तेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सात ठिकाणी. पुढाकार घेण्यासाठी तयार असलेले गृहपाल हा ठरला वसतिगृहाच्या निवडीचा निकष. उत्सुक आणि अनुभवी साधन व्यक्ती निवडल्या गेल्या. कार्यपुस्तिका बनवली- *का, केव्हा, काय, कसे घ्यायचे इथपासून ते अपेक्षित परिणामांपर्यंत सर्व बाबींची नोंद असलेली मार्गदर्शिका ...*
गृहपाल आणि साधन व्यक्ती यांची एकत्रच कार्यशाळा घेतली. *त्यांनी सुरुवातीलाच काही मूल्य, तत्व स्वीकारणे, नव्या पद्धती शिकणे गरजेचे होते.* विघातक प्रभावाखाली असलेले विद्यार्थी संख्येने कमी पण लाऊड असतात, *सब घोडे बारा टक्के या भूमिकेमुळे इतर बहुसंख्य विद्यार्थी कोणाच्या गटात जातील,* यावर विचार करायला हवा होता. *विघातक नसलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा ठामपणा आणि विधायक वृत्ती वाढवण्यासाठी शिकायला हवे होते विश्वास ठेवणे, त्यांच्या विवेक बुद्धीवर...* *नकारात्मक सवयी सोडतानाच विधायक सवयींचे रोपण आणि त्या सवयी पक्क्या होईपर्यंत पाठपुरावा* करायला हवा होता,,
आवाका मोठा ठरवला होता- चार टप्पे केले. प्रत्येक टप्प्यावर भेटायचे ठरले. *हे फक्त उपक्रम नसून हे वृत्तीबदलाचे माध्यम* होते, त्यामुळे ते *बदल तपासण्याचे निकषही ठरवले* .
पहिल्या टप्प्यावरील काम सुरु झाले.. सगळीकडेच... फोटो, रेकॉर्डिंग यायला लागले. *माझे वसतिगृह कसे असावे यावर चर्चा* झाल्या होत्या, *काय करावे-काय टाळावे* याचे संपूर्ण वसतिगृहात *फलक लागले* होते, सुटीच्या दिवशी *संपूर्ण वसतिगृह घासून पुसून स्वच्छ केले, सजवले होते- मुलींनी.. आणि मुलांनीही...* काय घडावे – काय टाळावे याचे *नियम ठरले.. आणि तसे न झाल्यास काय करावे हेही ठरले* . *गुंफण बैठकीचे* प्रशिक्षण आणि नियोजन झाले- झालेल्या- आठवड्यातील *समस्यांचे लोकशाही पद्धतीने निवारण करण्यासाठी* आणि *विधायक बाबींचे नियोजन करण्यासाठीही* ... *सूर्यनमस्कार* घातले जाऊ लागले.. नियोजन झाले - *वेळेचे, अभ्यासाचे आणि आहार, आचरणाचेही...* *कधीही न बोलणारी मुले-मुली समोर येऊ लागली, नोंदी ठेवू लागली, पूर्वतयारी करून व्यावसायिकांच्या मुलाखती घेतल्या..* *प्रतिक्रिया* येऊ लागल्या तोंडी, लेखी, कविता, नाटक अशा *कल्पक माध्यमातून.. न मागता..*
दुसऱ्या टप्प्यात वेग वाढला- नगरच्या मुलींनी *वंचित मुलींच्या शाळेत सत्र घेतली- आपल्याला समजलेल्या विषयांची* , *S T stand, बॅंक, महिलाश्रम, पोलीस स्टेशन भेटीचे नियोजनही प्रेरीकांनीच केले.* स्वत:हून *अनेक प्रश्न विचारले* . आता ते या संस्थांशी अनभिज्ञ नव्हते. वाढला होता, *ठामपणा आणि आत्मविश्वासही..* नगरच्या विद्यार्थिनींनी तर साधन व्यक्ती आणि गृह्पालांच्या मदतीने कमालच केली. *त्यांच्या भाषेतील वेगवेगळ्या प्रसंगी म्हणल्या जाणाऱ्या गाण्यांचे नगर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारण केले...*
प्रत्येक ठिकाणी एकेक पाऊल पुढे पडत होते.. प्रगतीच्याच दिशेने.. *उपक्रम, अनुभव, बदल.. एक नव्हे अनेक...*
*तरीही हे उपक्रम नव्हते. हे होते बदल- व्यक्तीमत्वात, स्वभावात आणि परिणामांतही...* काही ठिकाणी एक टप्पा पूर्ण झाला, काही ठिकाणी दोन, तर काही ठिकाणी पुढच्या टप्प्यावरील व्यवसाय प्रशिक्षणाची तयारीही झाली होती.. *बदल ठळक होते- चमत्कार वाटावा असे-* *गृहपाल आणि विद्यार्थी/ विद्यार्थिनी एक टीम झाले होते,* *ध्येयापासून भरकटलेले काही जण विधायक गटात आले होते..* *शिक्षा- धाक- दोषारोप ही टूल्स न वापरता..* *केवळ सहा ते आठ महिन्यांमधले हे बदल सोपे नव्हते.* याची पावती दिली जुन्या अनुभवी गृह्पालांनी...
अर्ध्यावर सोडलेले हे काम... नव्हे *स्वप्न पुन्हा रुजावे, तरुणाईला विचारक्षम विकासाच्या दिशेने नेणारे उर्जाकेंद्र ठरावे* एव्हढीच सदिच्छा...
*माधुरी यादवाडकर*
*संचालक*
*माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*९९२३०३२७७१*

Address

Pune
411021

Telephone

+919923032771

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mind Vision Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mind Vision Solutions:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Our Story

‘Enlighten your Mind to enhance the vision…’

The ultimate vision of Mind Vision Solutions is to create awareness about inner self, and ability, and to facilitate positive transformation. MVS is committed towards helping individuals to channelize their thought process towards identify their needs through self analysis, and enlighten themselves with the help of rational thinking and many more activities like this.

One of our most successful ventures is PARAS (Passion Aimed Roadmap And Secrets). We arrange this workshop for the group of individuals who are looking to discover their passion and willing to live a life that is driven by the same. We have helped people realize the meaning of passion and finding a way to always choose in the favour of their own growth. We not only like to arrange PARAS because it helps people live a passionate life, but also because we learn new things about ourselves with our participants in each session of this workshop.

We have also been active in the field of Training, Educational Consultation, Counselling, Informal Education, Certification, Logo Analysis, Colour Analysis, Career Guidance, Rational Behavioral Thinking, Production of Online courses, Therapy, and Research along with related and consequential activities for Personality Enhancement, individually or in a group. We also conduct awareness activities and therapies for various groups based on our expertise in graphology, Reiki, and Flower Remedy.