Anand Vihar Yoga Institute, Konkan

Anand Vihar Yoga Institute, Konkan This is renowned classical yoga institute nestled in the heart of Konkan with a legacy of 22 years.

15/09/2024

ब्रम्हचर्य सारखा नाजूक आणि उघड चर्चा करण्यासाठी कठीण असलेला विषय आजोबांनी सहज समजाऊन सांगितल्यावर रघुचा उत्साह आणखी दुणावला. आज आणखी काय बरे आजोबा सांगतील हा विचार त्याच्या मनात घोळत होता आजच्या कथेत त्याला सामान्य माणसाची साठवण्याची प्रवृत्ती कशी चुकीची आहे हे कळणार आहे आता पुढे......
___________

पुष्प ७ वे

अपरिग्रह

आज रघूला जरा उशीरच झाला होता. तो आश्रमाशी पोहोचला. त्याला धाप लागली. फाटकाजवळ पोहोचताच उभ्या उभ्याने त्याने मोठा श्वास घेतला व तेवढ्याच वेगाने बाहेर सोडला. असे ४-५ वेळा केल्यावर त्याला बरे वाटले. त्याची धाप थांबली.

आजोबा लांबून त्याची ही गंमत बघत होते. ते हसले. हे हसणे समाधानाचे होते. रघूने योगाचे प्रत्यक्ष आचरण करायला सुरुवात केली होती. चार पावले ते पुढे आले व म्हणाले,

'काय रघूभाऊ वाघबीग पाठी लागला की काय?' समोरच आजोबांना बघून रघू वरमला.

'नाही हो आज थोडा उशीर झाला ना, म्हणून धावत आलो. त्यामुळे दम लागला.' 'का उशीर झाला, घरी सगळी बरी आहेत ना?'

हो, सगळी बरी आहेत. बायकोने माळ्यावरची सगळी अडगळ काढली होती ना माळा साफ करायला; ती आवरता आवरता उशीर झाला.'

'असं असं ! रघू, अशी विचारांची अडगळ होऊ देऊ नको. चटई अंथरत आजच्या विषयाला आजोबांनी नकळत सुरुवात केलीही. रघूला त्यांनी बसण्याची खूण केली. आज काहीतरी नवीन सांगण्याच्या मुडमध्ये आजोबा आहेत, हे रघूच्या लक्षात आले. तो मुकाट्याने चटईवर बसला. आजोबा उकाळा आणण्यासाठी आत गेले. रघू सुखासनात बसला. अलिकडे त्याला शांत बसणे आवडू लागले होते. आजोबाच्या पावलांची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. उठून त्याने आजोबांच्या हातातील उकाळ्याचा कप घेतला. उकाळा त्याला आवडू लागला होता. घरीही त्याने एक-दोनदा बनवला होता. परंतु आजोबांच्या हातची चवच न्यारी !

'का रे रघू, दिवाळी जवळ आली म्हणून का अडगळ काढलीस?' उकाळा पिता पिता आजोबांनी विचारले.

मान हलवून रघूने होकार दिला. 'आजोबा एक विचारु, मघाशी तुम्ही विचारांची अडगळ म्हणालात; ते काही समजले नाही. विचारांची अडगळ मी पहिल्यांदाच ऐकतोय.'

आजोबा हसले आणि म्हणाले, 'मी . पाचव्या यमाबद्दल म्हणालो.'

'पाचवा यम?' चौथा ब्रह्मचर्य त्याला समजला होता. 'किती यम आहेत आजोबा ?' रघूने उत्सुकतेने विचारले.

'पाच, चार यम मी तुला सांगितले आणि ते तू आचरणातही आणू लागलाहेस. मला खूप आनंद होतोय तुझी प्रगती बघून.'

रघूचे अंग शाहारले. कुणी आपले कौतुक केल्यावर मनावर होणारा परिणाम तो पहिल्यांदाच अनुभवित होता. आपण इतरांचेही कौतुक केले पाहिजे हे त्याला लक्षात आले.

'आजोबा ह्या पाचव्या यमाबद्दल सांगाच, दुपारपासून मन पण बघा कसं अडगळीसारख झालंय . रघू उताविळपणे म्हणाला. आजोबा हसले. दोघांचेही कप रिकामे झाले होते. रघूने दोघांचेही कप आत नेले. व धुवून जागेवर ठेवले.

'हं, बोला अगदी लहान मुलासारखा बसत रघू म्हणाला. आजोबांना रघूच्या निरागसतेची गंमत वाटली. रघूच्या वागणुकीत होत चाललेला बदल बघून त्यांना आत्मिक समाधान वाटत होते. रघूला त्यानी आपल्या जवळ बसायला सांगितले व प्रेमाने म्हणाले,

'रघू, मी सांगायच्या आधीच नकळत का होईना तुला अपरिग्रह समजला आहे.'

'मला समजला? तो कसा?'

'आता तू काय म्हणालास, तुझ्या डोक्यात विचारांची अडगळ झाली आहे. हो ना?'

'हो, ती झालीच आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही आता बोलल्यावर ती संपूर्ण नाहीशी होणार आहे.'

'अरे यालाच अपरिग्रह म्हणतात.'

'तुम्ही कोड्यात बोलू नका. मला काही समजत नाही. मला समजेल असे बोला ना!'

'बरं बरं, पहिले मला आधी आपण कोणकोणते यम पाहिले ते सांग बघू. 'बघा हं, पहिला अहिंसा दुसरा सत्य, तिसरा खोटे बोलू नये, आणि चौथ्याचं काय बरं म्हणतात त्याला ब्रह्मचर्य.'
'ब्रह्मचर्य!' हसत आजोबा म्हणाले. 'तेच ते.'

'पाचवा यम आहे अपरिग्रह. म्हणजे जमा न करणे. ज्या वस्तू आपल्या उपयोगाच्या नाहीत किंवा आता लगेच त्यांची गरज नाही त्या साठवून ठेवू नयेत. आपल्याला ज्या विषयांपासून सुख मिळते अशा विषयांचा व ज्या साधनांपासून ते मिळते त्या साधनांचा संग्रह करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. असा संग्रह करणे म्हणजे परिग्रह. आणि न करणे म्हणजे अपरिग्रह. असे पतंजलीचे म्हणणे आहे. आता तू जी दुपारी अडगळ काढलीस त्यात कोणत्या वस्तूंची तुला गरज नाही ते सांगशील?' आजोबांनी विचारले.

'जवळ जवळ सगळ्याच वस्तू बिनकामाच्या होत्या.' हसत रघू म्हणाला.

'तरीही निम्म्याधिक वस्तू कामाच्या नसूनही परत कोंबून ठेवणार आहात की नाही माळ्यावर?'

रघू चपापला. आजोबा पुढे म्हणाले, 'लग्नात मिळालेले हंडे, कळशा, पातेली, गोणपाट, मोठ्या ट्रंका त्यात असतील, हो की नाही.'

रघू ऐकतच राहीला. 'आजोबांना कळलच कसं' त्याला आश्चर्य वाटले. त्याने गुपचूप मान डोलावली. मात्र तरीही त्याच्या मनात प्रश्न निर्माण झालाच,

'पण आजोबा, काही गोष्टी आज नाही तरी उद्या, भविष्यात उपयोगी पडतीलच ना? त्यात आम्ही गृहस्थी, ऐनवेळेला काही लागलं तर आणायचं कुठून ? म्हणून ठेवावं लागतं हो! रघूने आपले मत मांडले. 'रघू नीट विचार करुन बघ, ज्या वस्तूंना तू उपयोगी म्हणतोस त्या किती वर्षे माळ्यावर पडून आहेत बरे?'

'हं, हे मात्र खरं आहे तुमचं, बरीच वर्षे त्या पडून आहेत.'

'अशा अडगळीमुळे धूळ साचते, उंदीर घुशींचा वावर सुरु होतो, एखादा बाहेरचा विषारी साप, विंचू आपली वस्ती करतात. त्यामुळे घरातील माणसांना धोका निर्माण होतो. बरोबर की नाही?'

'पण मग अशा बऱ्याच गोष्टी आपण साठवतो. धान्य साठवतो, कपडे साठवतो इतकेच काय पाणीही साठवतो. घर संसार चालवायचा असेल तर हे सर्व करायलाच हवे. मला तर यात काही चुकीचे वाटत नाही.' रघू गोंधळला.

'रघू तुझे म्हणणे एक वेळ खरे मानू. हे सर्व साठवल्याशिवाय आपला संसार चालणार नाही. गरज असेल तर साठा करायलाच हवा. वर्षातून एकदाच धान्य पिकत असेल तर एक वर्षासाठी त्याची बेगमी करायलाच हवी. दोन-तीन दिवसांनी पाणी येत असेल तर तेवढे पाणी साठवून ठेवायलाच हवे. पण तूच प्रामाणिकपणे सांग आपण असे खरेच गरजेपुरतेच साठवतो कारे?'

रघू आणखी गोंधळला. एक वेगळाच विचार त्याच्याही मनात चमकून गेला, मनात खळबळ सुरु झाली. आजोबांचे बोलणे त्याच्या अडगळीत पडलेल्या मनावर प्रकाश टाकीत होते. परंतु आतला अंधार एवढा की ह्या प्रकाशाच्या बारीक लकेरीने स्पष्टता येत नव्हती. नम्रपणे तो म्हणाला, 'आजोबा तुम्ही खरेच म्हणताय,

कपड्यांचेच बघाना घरात ढीगांनी कपडे आहेत. प्रत्येकाचे आठ आठ, दहा दहा जोड; पण तरीही सणासुदीला नवीन कपड्यांचा सगळी हट्ट करतात. देवाने पुरेल इतके धान्य व सोयी दिल्या आहेत. तरीही बायकोला आणखी पैसा हवा. साडीचोळी हवीच त्यावर शोभेल असा दागिनाही हवा. अगदी खरयं! गरजेपेक्षा कितीतरी अधिक माझ्या घरात कोंबलेले आहे हे आज माझ्या लक्षात आले.'

'यालाच म्हणतात परिग्रह!'

'परंतु हा नियम न पाळल्यास नुकसान काय आहे ते मला समजले नाही' रघूने विचारले.

आजोबा हसले. 'कमाल आहे रघू तुझी, आज दिवसभर इतकी दमछाक झाली, धापा टाकीत तू आलास हा काय कमी त्रास झाला का? विचार कर या वस्तूंची त्या वेळीच विल्हेवाट लावली असतीस तर आज ही वेळ आली असती का? अजून एक गंमत सांगतो, चांगलं घर बांधलसं, त्याला मोठा दरवाजा, मोठा कुलूप, आत उंची सामान, दागदागीने, सर्व महागड्या वस्तू घरात ! असे घर बंद करुन एक दिवस तरी तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाऊ शकाल काय? तिथला आनंद घेऊ शकाल काय?' आजोबांनी विचारले

'छे छे! सगळ लक्ष घराकडे लागेल. चोऱ्या किती होतात अलिकडे, घर बंद दिसले की लगेच फोडतात. आमचे चुलते शहरात राहतात. गावाच्या बाहेर जागा घेऊन त्यांनी चांगला मोठा बंगला बांधला. आतून बाहेरुन चांगला सजवला. सर्व चीजवस्तूंनी भरला. आणि मागच्याच महिन्यात कुणी नसतांना चोरट्यांनी तो फोडला आणि सर्व लुटून नेले की हो ! त्याचा धक्का वहिनीला बसला अजूनही सावरली नाही त्यातून. सगळ्या चीजवस्तूत जीव गुंतला होता ना तीचा.'

'म्हणूनच अपरिग्रह हा महत्त्वाचा यम आहे. ईश्वराने आपल्याला गरजेपुरते दिलेले असते. त्याचा नीट उपयोग केला तर आपण आनंदाने जगू शकतो. गरजा ह्या न संपणाऱ्या असतात. त्यांना आवर घालणे हाच मोठा उपाय. समजतयं का?' आजोबांनी शांतपणे विचारले.

'मला घरी जायला हवे, नाहीतर बाहेर काढलेला अडगळीचा ढीगारा परत बायको माळ्यावर ठेवेल, असे म्हणून रघू लगबगीने उठला व आजोबांचा निरोप घेऊन झपझप पावले टाकीत दिसेनासा झालाही. आजोबा कुतुहलाने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहातच राहिले...क्रमशः

18/08/2024

पुष्प ६ वे

चौथा यम
ब्रह्मचर्य

रघूची आसने आज जरा लवकरच आटपली. त्याच्या मनातली अस्वस्थता आजोबांच्या डोळ्यातून सुटली नाही. आसने संपताच नेहमीप्रमाणे रघूने तीन वेळा ओमकार जप केला. चेहऱ्यावर तीन- चार वेळा हात फिरवल्यावर त्याने डोळे उघडले. समोर आजोबा मिस्कीलपणे स्मितहास्य करीत त्याच्याकडे बघत होते. आपल्या मनातील हालचाल आजोबांना समजली वाटतं. ती नेमकी त्यांना कशी समजत असेल बरे? याचा विचार करीत असतानाच आजोबा म्हणाले,

'काय रघू आज लक्ष'

'तुम्हाला कसं कळलं?'

'कळलं म्हणजे तुझे डोळे स्थिर कुठे आहेत ? कधीपासून मिचमिच करताहेत.'

'रघू चांगलाच वरमला. 'नाही आजोबा आज जरा घराकडे लक्ष लागले आहे'

'का बरे?'

'आज आमच्या गावची मिटींग आहे. फार महत्त्वाचा विषय आहे.'

'असं, कोणता तो विषय?'

'तुम्हाला कसं सांगाव ते कळत नाही.'

'असा लाजतोस काय?'

'विषय जरा चावटच हाय, बरं सांगतो; त्याचं काय झालं आमच्या शेजारी तो तुका पाटील हाय ना त्याच्या पोराचं शेजारच्या गावच्या एक पोरीशी झालंय लफडं! बरेच दिवसापासून हे चालू आहे. आता ती पोटाशी आहे; त्यामुळे लयीच गोंधळ झालाय. पोरीकडची माणसं आलेत गावात त्यामुळे सगळा गाव बसणार हाय बघा.'

'अस'

'अहो ! काय सांगावं आजच्या मुलामुलींना! तरुणच ती, मन नाही त्यांच्या ताब्यात. त्यांनी चुका करायच्या आणि आम्ही निस्तरायच्या.'

'रघू तू नव्हतास का तरुण? तू नव्हत्या का चुका केल्यास.'

'छे छे आपण नाही'

'काय सांगतोस, तुझ्या कमलीचं आणि तुझं कसं जमलं ते विसरलास.

'ते काय असचंच.' गणू लाजला. आजोबा पण मोठेच वस्ताद दिसतात, रघू मनात म्हणाला.

'असू दे, असू दे. असल्या चुका काय प्रत्यक्ष करायलाच पाहिजे असे नाही. ह्या चुकांचा उगम मनात होतो. आणि योग काय म्हणते बरे? असा मनात विचार येणे सुद्धा वाईट. हो की नाही?'

'म्हणजे ह्याविषयीही योगशास्त्रात पण काही सांगितलय की काय?'

'नक्कीच ! अरे विश्वामित्रासारखा मुनी देखील कामवासनेवर ताबा न ठेवल्यामुळे योगभ्रष्ट झाला. माहीत आहे ना?'

'कीर्तनात ऐकलयं'

'ऐकलयसं ना, योग शास्त्रात याला ब्रह्मचर्य म्हणतात. हा चौथा यम होय.'

'कमालच आहे! मला वाटलं असल्या चावट गोष्टीपासून योग चार हात दूरच असतो.'

'नक्कीच दूर असतो, परंतु दूर तू केव्हा राहू शकतोस जेव्हा त्याचे स्वरुप तू समजून घेशील तेव्हा ना?'

'हो हो ! हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. आता ह्या पोराच्या हातून जे पाप घडलयं ते त्यांच्या अज्ञानामुळेच ना?'

'वा रघू, तू आता फारच समजदार झालायेस.'

'तुमची कृपा. ह्या बह्मचर्याविषयी जरा आणखी सविस्तर सांगा ना?'

'ऐक ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मासारखे आचरण, म्हणजेच चांगले आचरण, पवित्र आचरण, आपला जन्मच मुळी वासनेतून झाला असल्याने भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र आल्या की त्या एकमेकांकडे आकर्षित होणारच. हा निसर्ग नियम आहे. आणि त्यात वाईट किंवा चूक काहीच नाही. निसर्गाचा पुढे चालण्यासाठी विधात्याने रचलेली ही महामाया आहे. त्यात वाईट किंवा भलतेच असे काही नाही. दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी एकत्र येणे हे निसर्गाला धरुनच आहे. पशुपक्षांना नाही का तू पहात ? परंतु माणसाचे थोडे वेगळे आहे. तो समाजात राहतो. समाज नीट चालावा म्हणून समाजातील काही जाणकार लोकांनी याबाबत काही नियम केलेले असतात. त्या चौकटीत राहून झालेले व्यवहार समाजातील शांती टिकवून ठेवण्यास मदत करतात. तरीही योग समाजापेक्षा व्यक्तीचा विचार अधिक करते. कोणत्याही घटनेत मन जर संतुलित राहीलं तर ते योगाला मान्य होते. मात्र त्यातून मन विचलित करणारी घटना घडणार असेल तर मात्र योगाच्या दृष्टीनेही ती वाईटच. निसर्गात दिसणारी सुंदर नयनरम्य वस्तू बघून आपल्याला आनंद होतो की नाही? तसाच निव्वळ आनंद ह्यातून होणार असेल तर यात वावगे काही नाही. परंतु मन त्याही पुढे जाऊन आगळीक करते. आणि मग गडबड होते.' आजोबांनी समजावले.

'वासनेला आवर घालणे भल्या भल्यांना जमले नाही त्यात आपण तर सामान्य माणसे. कसा जमणार आपल्याला?" रघूला विषयाचे गांभीर्य समजायला लागले.'

'खरे आहे तुझे म्हणणे. म्हणूनच स्त्री- पुरुषाच्या भेटीमध्ये आपल्या संस्कृतीने काही बंधने घातली होती. परंतु आजचा काळ समानतेचा आहे, स्त्री स्वातंत्र्याचा आहे. नियमित होणाऱ्या भिन्नलिंगी दर्शनामुळे मनाला संयमीत ठेवणे कठीणच झाले आहे. तरीही योगाभ्यासूला उपभोगावर ताबा ठेवायलाच हवा. नाहीतर योगाभ्यास करणे कठीण जाईल.'

'पण तो कसा ठेवायचा?'

'अभ्यास आणि वैराग्याने.'

'म्हणजे ?'

'गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला मन ताब्यात ठेवण्यासाठी हा मंत्र दिला होता. तो इथेही फार उपयुक्त आहे.'

'मी समजलो नाही.' डोके खाजवीत गणू म्हणाला.

'ऐक, मनाला संयमित करण्याचा तुला अभ्यास करावा लागेल. त्यासाठी रोज आसने करावी लागतील, सात्विक जेवावे लागेल. चांगल्यांची संगत ठेवावी लागेल. वाणीत चांगले शब्द वापरावे लागतील. नियमित चांगले वाचावे किंवा ऐकावे लागेल. त्याचं मनन, चिंतन करावे लागेल. हा झाला अभ्यास. आणि स्त्रियांचा अनावश्यक सहवास टाळवा लागेल. आवश्यक तेवढाच संपर्क ठेवून इतर वेळी वैराग्य धारण करावे लागेल. मग काय बिशात आहे पाऊल घसरण्याची.' आजोबा म्हणाले.

'कठीण आहे; पण पटतयं. आग समोर आहे पण मेणबत्तीने वितळायचे नाही असा हा प्रकार ! पण मला यातून एक मार्ग दिसतोयच' रघू उत्साहाने म्हणाला. आजोबा कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागले. 'हे बघा दिवसभर मी कामात असतो बायकांकडे लक्ष द्यायला मला वेळच कुठाय?' असे म्हणून तो खो खो हसू लागला. आजोबांनाही हसू आवरले नाही. तेही मनमुराद हसले.

'रघू फार मोठं तत्त्व सांगितलेस. नियमित कामात रत राहणे हे वासनेवर विजय मिळवण्याचे मोठे साधन आहे. परंतु नियमित तर कामात तू व्यस्त राहू शकत नाहींस आता तुमची मिटींग आहे त्यातही बायका येणार हा विषय निघेल. मनात विचार येणार. ऐकायला बराही वाटणार आणि नकळत मनावर संस्कारही होणार. हो की नाही.'

'अरेच्चा हो की, हा माझ्या डोक्यात विचारच आला नाही. मग काय करायचं?'

'काही करायचं नाही, जे आहे ते तटस्थपणे स्वीकारत जायचे. बदल करायचा आपल्या विचारात आपल्या दृष्टीत. तत्कालीन वासनायुक्त सुखाकडे बघण्यापेक्षा मनःशांतीच्या शाश्वत सुखाकडे कायम लक्ष ठेवायचे आणि आलाच विचार तर तो तेथेच सोडून यायचे.'

'काही समजत नाही तुमचं बोलणं' तुला मी ऐकलेली एक गोष्ट सांगतो.

एक आश्रम होता. त्या आश्रमाच्या गुरुजींनी स्त्रियांबाबत एक नियम केला होता. आपल्या शिष्यांनी विद्येचे अध्ययन करताना स्त्रीविषयी कोणतीही चर्चा अथवा विचार करायचा नाही; असा दंडक केला होता. तसे काही घडल्यास कडक शासन होईल.

एके दिवशी काय झाले, गुरुजींसह सर्व विद्यार्थी जवळच्या नदीवर आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करीत असतानाच एक स्त्री त्या ठिकाणी आली. तिला नदीच्या पलिकडे जायचे होते. परंतु वाहत्या पाण्यात उतरण्याचे तिला धाडस होईना. ती इकडे तिकडे बघू लागली. 'कुणीतरी मला मदत करा' अशी विनवणी ती शिष्यांना करू लागली. शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. मोठेच धर्मसंकट निर्माण झाले. गुरुजींचा आदेश सगळ्यांना माहीत होता. त्यामुळे कुणीही जागचा हलला नाही. थोड्या वेळाने गुरुजी पाण्याच्या बाहेर आले. त्या स्त्रीला त्यांनी खांद्यावर बसायला सांगितले. तशी ती बसताच ते खोल पाण्यात उतरुन छातीभर पाण्यातून चालत पैलतीरी गेले व तिला खाली उतरवले. आभार मानून ती स्त्री निघून गेली. गुरुजी परत आंघोळीसाठी पाण्यात उतरले व काहीच घडले नाही अशा रीतीने त्यांनी आपली आंघोळ आटोपली.

शिष्यांमध्ये मात्र एकच खळबळ माजली. 'स्त्रीचा विचारही करु नका' असे म्हणणाऱ्या गुरुजींनी चक्क बाईला खांद्यावर उचलून घेतले. गुरुजींचे हे वागणे कुणालाच समजले नाही आणि पटलेही नाही.

संध्याकाळी प्रश्नोत्तराच्या तासापर्यंत सर्वच मंडळी अस्वस्थ होती. शेवटी एका शिष्याने धीर करुन गुरुजींना प्रश्न विचारलाच. की त्यांनी अशा पद्धतीने बाईला स्पर्श का केला?

आधी गुरुजींना तो काय विचारतोय तेच कळेना. त्यांना काही आठवेना. प्रयत्न केल्यावर त्यांना सकाळची घटना आठवली. 'ती होय, अरेरे, त्या बाईला मी सकाळीच सोडले पण तुम्ही तिला इथं आश्रमात कशाला आणलेत. अरे, अडलेल्यांना मदत करणे आपला धर्म नाही का? तो मी केला. काम संपल्यावर मी तिथेच सर्व सोडून दिले. तुम्ही मात्र अजून तिचे चिंतन करीत बसलाय. हे फार वाईट झाले.'
शिष्यांना आपली चूक कळली. गुरुजींच्या म्हणण्याचा अर्थ आता त्यांना कळला. त्यांनी गुरुजींची क्षमा मागितली.

'काय कळलं रघू, वासना मनात असते. त्या मनालाच शुद्ध करायचे असते. समजले आता.' आजोबा म्हणाले.

'आता चांगलेच ध्यानात आले बघा. अजूनपर्यंत मी तसाच वागत आलोय, मात्र - आज त्यामागील ज्ञान झाले. ब्रह्मचर्य का महत्त्वाचे ते चांगले समजले.'

'आपल्या गृहस्थाश्रमातही हे तत्त्व - पाळायचे असते. म्हणून पूर्वी नवरा बायकोला रोजच्या रोज भेटण्याची - परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांच्यातले - नाविन्य व आपलेपणा कायम राही. आज तसे होत नाही. उलट आईबाबांना बाहेर काढून पती-पत्नी एकटेच राहतात. त्याचा परिणाम आज बघतो आहेसच. काही दिवसातच परस्परांमधील शारीरिक आकर्षण संपते व निरसपणे संसार सुरु होतो. म्हणूनच म्हटले आहे, 'अति सर्वत्रे वर्जयते. रघू आ वासून आजोबांकडे बघतच राहिला.

'समजले ना, मग चला उठा आता बघू; मिटींगला उशीर होईल. आणि महत्त्वाचा विषय ऐकायचा राहून जाईल.' रघूने आजोबांकडे पाहिले. आजोबांचा टोमणा त्याला लक्षात आला. दोघेही खळखळून हसले. हसतच झपझप पावले टाकीत रघू गावच्या दिशेने निघाला.

11/08/2024

पुष्प ५ वे
सत्य आणि अस्तेय

आज रघू गप्प होता. त्याला थोडे अस्वस्थ वाटत होते.

'का रे रघू, आज बोलत नाहीस. काय झालं?' आजोबांनी विचारले.

'काय बोलणार खऱ्याची दुनिया नाही राहिली आजला. तुम्ही इतके चांगले सांगता इथे, पण बाहेर जाऊन बघा; खोट्याचा कसा बाजार भरलाय.' रघू' आज जरा खूपच निराश दिसत होता.

'बराच वाईट अनुभव आलेला दिसतोय. काय झाले मला तरी कळू दे.' आजोबांनी रघूला उकाळा प्यायला दिला.

'अहो, आमच्या शेजारी तो लक्ष्मण रहातो ना त्याचा मुलगा दीपक. किती खोटा बोलतो म्हणून सांगू! त्याने मारलेल्या दगडाने माझ्या घराचे एक कौल फुटले. दगड मारतांना मी स्वतः पाहिला. विचारले तर म्हणतो मी नाही मारला. त्याचा बापही उलट माझ्याशीच भांडायला निघाला. सका-सकाळी केवढे रामायण. अख्खा दिवस वाया गेला हो.' रघू तावातावाने म्हणाला.

'त्यात दिवस वाया जाण्याचे काय कारण?'

'म्हणजे? आपली चूक नसतांना कुणी बोलले तर 'मनाला लागतेच ना? मला ते भारी लागले. खोटं बोललेलं मला सहनच होत नाही.'

'सहन होत नाही ही चांगली गोष्ट आहे; पण ते मनाला लावून घेतलेस हे चांगले नाही; असे नको व्हायला, योग शिकणाऱ्याने थोडा संयम पाळायला हवा.' आजोबा म्हणाले.

'कठीण आहे हे!'

'हो कठीण आहेच. पण तुमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपेक्षा नक्कीच कठीण नाही. जीवन जगण्यासाठी रोज जे तुम्ही कष्ट करता, त्यासाठी अहोरात्र राबता, तेवढे कष्ट आणि विचार देवासाठी केले असते तर कदाचित आतापर्यंत तोही भेटला असता. खरे ना?'

'हरिनाम सप्त्यात बुवा पण असेच सांगतात. पण तेवढ्यापुरतेच डोक्यात शिरते; मांडवातून बाहेर पडले की त्याची अजिबात आठवण राहात नाही बघा. पण आजोबा मला हे कळत नाही की ही माणसे खोटे बोलतातच का?'

'त्याला काही कारणे आहेत.'

'कारणे? ती कोणती?'

'पहिले कारण, खोटे बोलणारी मुले घडलेल्या घटनेला घाबरतात.'

'घाबरतात?'

'हो! घाबरल्याशिवाय माणसे खोटे बोलणारच नाहीत. ही भीती असते शिक्षेची, नाहीतर अपमानाची. कर नाही त्याला डर कसली? मुलगा खोटे बोलतो तो कशाला तरी घाबरत असावा. अशा मुलाबद्दल आपल्या मनात सहानुभूती निर्माण व्हायला हवी. राग नको.' आजोबा शांतपणे म्हणाले.
'आजोबा, अहो तुमचे सर्वच विपरीत कसे हो? आम्ही जिथे रागवतो तिथे तुम्ही प्रेम करायला सांगता, जिथे जीव लावतो तिथून काढायला सांगता. पण हे किती अवघड आहे. चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता.

आजोबा अगदी मिस्किलपणे हसले व म्हणाले, 'काही अवघड नाही. त्यामागील ज्ञान झाले की सारे जमते.'

'आता दगड मारणाऱ्या पोराला मी कसं समजून घ्यावे म्हणताय? त्याच्यावर काय मी प्रेम करू!'

'ऐक, त्याला तू दगड मारतांना प्रत्यक्ष पाहिलसं असे म्हणतोस. बरोबर ना?'

'हो, ह्या डोळ्यांनी मी पाहिलं.

'आणि तरी तो म्हणतो मी नाही मारला दगड. हो ना? आता मला सांग त्याने दगड मारल्याचे कबूल केले असते तर काय झाले असते ?'

'काय म्हणजे, त्याच्या बापाने चांगले त्याला चोपून काढले असते.'

'हो ना, मग कशाला बोलेल तो खरे ? मार खायला? तो काय खाऊ आहे. बाबाच्या माराला तो घाबरला म्हणून तो खोटे बोलला. आता दुसरे कारण ऐकच..' '

दुसरे कारण! ते कोणते ?'

'त्याच्या बापाची प्रतिष्ठा ! गावात असलेला त्याचा मान !! आपला मुलगा चोर आहे हे कोणताही बाप सहज मानेल काय? म्हणूनच पोरगं नाही म्हणतोय ना, मग त्याने नाहीच दगड मारला हे म्हणणे प्रमाण मानून तो तुझ्याशी भांडला. समजले. पुढे ऐक, ही दोनच कारणे पुरेशी नाहीत. आणखी एके गोष्ट यास कारणीभूत झाली आहे.'

'ती कोणती?'

'त्याच्या भोवतीचे वातावरण.'

'ते कसे?'

'जर त्या मुलाची संगत वाईट असेल, त्याचे मित्र खोटे बोलणारे असतील किंवा खोटे बोलणे फारसे काही वाईट नाही अशी त्याची समज झाली असेल तर तो बिनधास्त खोटे बोलेल.'

'मग अशावेळी त्याला चांगले चोपूनच काढले पाहिजे असे मला ठाम वाटते. पण तुमच्या मते ही हिंसा होईल. पण मला तरी याशिवाय काही मार्ग दिसत नाही बुवा.' आजोबा हसू लागले.

'चला एक वेळ तू सुचवलेला उपाय योग्य मानू, खोटे बोलल्यामुळे त्या मुलाला चांगले चोपून काढले पाहिजे. पण चोपणार कोण?'

'त्याचा बाप...

'पण तो तर तुझ्याशी भांडतो. त्याला माहीत नाही का आपला मुलगा खोटे बोलतोय तो ?'

'माहीत आहे तर चांगलेच माहीत आहे.'

'आता कसा बोललास. म्हणजे हे दुसरे कारण महत्त्वाचे आहे. आपण खोटे बोलूनही आपले बाबा आपल्याला न रागवता रघू काकांनाच रागवतात हा प्रसंग पुढे आणखी खोटे बोलण्यास प्रोत्साहन देणारा नाही काय? समजले. त्यासाठी तुमच्या गावच्या मिटींगमध्ये हा विषय येणे व वातावरण चांगले करण्याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे.'

'पण आमच्या गावच्या मिटींगमध्ये असले विषय होतच नाहीत. तेथे देवासाठी करायच्या उत्सवाची वर्गणी, सणासुदीचे कार्यक्रम ठरवणे, एकमेकांवर दंड बसवणे. हे असले विषय होतात.'

'जेव्हा मुले खोटी बोलतात त्यामागे मोठ्या माणसांचे वागणे कारणीभूत असते. कळत नकळत मुलांसमोर हा खोटेपणा मोठी माणसे करतात. मुलांवर त्याचे खोल संस्कार होतात. त्यातून चुकीचे विचार जन्माला येतात व त्याची परिणिती असल्या आचारांमध्ये होते. खोटे बोलणे आणि चोरी करणे ह्या वाईट सवयी यातूनच जन्माला येतात.'

'पण आता त्या मुलाला लागलेय सवय त्याला काय करायचे ?'

'चांगला प्रश्न विचारलास, अशावेळी त्या मुलाला विश्वासात घ्यावे लागेल. त्याची संगत चांगली राहील याची काळजी घ्यावी. स्वतःचे त्यासंबंधी बरे वाईट अनुभव सांगावेत, त्याचे दुष्परिणाम सांगावेत. उदाहरणे द्यावीत. असे करण्याने कुटुंबात कसा गोंधळ होतो, सर्वांसमोर मोठ्या माणसांना कशी मान खाली घालावी लागते ते समजून सांगावे. यामुळे त्याच्यावर हळूहळू संस्कार होऊ लागतात. त्याचे विचार त्या दिशेने सुरु होतात.'

'खोटे बोलणे आणि चोरी करणे याविषयी योगात काही सांगितले आहे काय?' रघूने उत्सुकतेने विचारले. आजोबांच्या बोलण्याचा रोख त्याने बरोबर ओळखला होता. आता तो बराच शांतही झाला होता.

'जे मी आता बोलतोय ते योगाचेच मत सांगतोय माझे नाही.' हसत हसत आजोबा म्हणाले. 'योगशास्त्रात ह्या दोन्हीही गोष्टींचा समावेश आहे. अहिंसेच्या पुवचे हे दोन ग्रम आहेत. त्यांचा अनुक्रमे सत्य आणि अस्तेय म्हणतात, सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे आणी अस्तेय म्हणजे चोरी कधी करु नये, समजले,'

'हे सर्व लहान मुलांसाठी ठीक आहे हो, मोठयांचे काय?'

'नित्य योगाभ्यासाने मोठा माणूसही हळूहळू बदलतो, आत्ता ह्या महिन्याभरात तुझ्यात किती बरे बदल झाला आहे. झालाय की नाही?' आजोबांनी विचारले.

'हो तर, खुप काही आता समजायला लागले आहे, आता हेच बघा, थोड्या वेळेपूर्वी माझ्या मनाची केवढी गडबड झाली होली, पण तुमच्या ह्या समजावण्याने आता खूप बरे वाटते आहे, लक्ष्मणाविषयी माझ्या मनात आता अजिबात राग नाही.'

'रघु एक लक्षात घे, विनोबा भावे काय म्हणायचे, 'खरे बोलणे किती सोपे, खोटे बोलणे फारच अवघड', एक खोटे बोललो की ते लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते, ते लपवण्यासाठी तिसरे, आणि मग याला अंत उरत नाही. त्यापेक्षा जे खरे असेल ते सांगून टाकावे आणि व्हावे मोकळे, एक घाव दोन तुकडे! योगाभ्यास करणाऱ्याने तर कधीच खोटे बोलू नये. हे दोन यमाच्या पालनाने मन शांत व्हायला खुपच मदत होते.' आजोबा शांतपणे म्हणाले.
पुष्प ५ वे
*सत्य आणि अस्तेय*

आज रघू गप्प होता. त्याला थोडे अस्वस्थ वाटत होते.

'का रे रघू, आज बोलत नाहीस. काय झालं?' आजोबांनी विचारले.

'काय बोलणार खऱ्याची दुनिया नाही राहिली आजला. तुम्ही इतके चांगले सांगता इथे, पण बाहेर जाऊन बघा; खोट्याचा कसा बाजार भरलाय.' रघू' आज जरा खूपच निराश दिसत होता.

'बराच वाईट अनुभव ओलेला दिसतोय. काय झाले मला तरी कळूदे.' आजोबांनी रघूला उकाळा प्यायला दिला.

'अहो, आमच्या शेजारी तो लक्ष्मण रहातो ना त्याचा मुलगा दीपक. किती खोटा बोलतोj म्हणून सांगू! त्याने मारलेल्या दगडाने माझ्या घराचे एक कौल फुटले. दगड मारतांना मी स्वतः पाहिला. विचारले तर म्हणतो मी नाही मारला. त्याचा बापही उलट माझ्याशीच भांडायला निघाला. सका-सकाळी केवढे रामायण. अख्खा दिवस वाया गेला हो.' रघू तावातावाने म्हणाला.

'त्यात दिवस वाया जाण्याचे काय कारण?'

'म्हणजे? आपली चूक नसतांना कुणी बोलले तर 'मनाला लागतेच ना? मला ते भारी लागले. खोटं बोललेलं मला सहनच होत नाही.'

'सहन होत नाही ही चांगली गोष्ट आहे; पण ते मनाला लावून घेतलेस हे चांगले नाही; असे नको व्हायला, योग शिकणाऱ्याने थोडा संयम पाळायला हवा.' आजोबा म्हणाले.

'कठीण आहे हे!'

'हो कठीण आहेच. पण तुमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपेक्षा नक्कीच कठीण नाही. जीवन जगण्यासाठी रोज जे तुम्ही कष्ट करता, त्यासाठी अहोरात्र राबता, तेवढे कष्ट आणि विचार देवासाठी केले असते तर कदाचित आतापर्यंत तोही भेटला असता. खरे ना?'

'हरिनाम सप्त्यात बुवा पण असेच सांगतात. पण तेवढ्यापुरतेच डोक्यात शिरते; मांडवातून बाहेर पडले की त्याची अजिबात आठवण राहात नाही बघा. पण आजोबा मला हे कळत नाही की ही माणसे खोटे बोलतातच का?'

'त्याला काही कारणे आहेत.'

'कारणे? ती कोणती?'

'पहिले कारण, खोटे बोलणारी मुले घडलेल्या घटनेला घाबरतात.'

'घाबरतात?'

'हो! घाबरल्याशिवाय माणसे खोटे बोलणारच नाहीत. ही भीती असते शिक्षेची, नाहीतर अपमानाची. कर नाही त्याला डर कसली? मुलगा खोटे बोलतो तो कशाला तरी घाबरत असावा. अशा मुलाबद्दल आपल्या मनात सहानुभूती निर्माण व्हायला हवी. राग नको.' आजोबा शांतपणे म्हणाले.
'आजोबा, अहो तुमचे सर्वच विपरीत कसे हो? आम्ही जिथे रागवतो तिथे तुम्ही प्रेम करायला सांगता, जिथे जीव लावतो तिथून काढायला सांगता. पण हे किती अवघड आहे. चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता.

आजोबा अगदी मिस्किलपणे हसले व म्हणाले, 'काही अवघड नाही. त्यामागील ज्ञान झाले की सारे जमते.'

'आता दगड मारणाऱ्या पोराला मी कसं समजून घ्यावे म्हणताय? त्याच्यावर काय मी प्रेम करू!'

'ऐक, त्याला तू दगड मारतांना प्रत्यक्ष पाहिलसं असे म्हणतोस. बरोबर ना?'

'हो, ह्या डोळ्यांनी मी पाहिलं.

'आणि तरी तो म्हणतो मी नाही मारला दगड. हो ना? आता मला सांग त्याने दगड मारल्याचे कबूल केले असते तर काय झाले असते ?'

'काय म्हणजे, त्याच्या बापाने चांगले त्याला चोपून काढले असते.'

'हो ना, मग कशाला बोलेल तो खरे ? मार खायला? तो काय खाऊ आहे. बाबाच्या माराला तो घाबरला म्हणून तो खोटे बोलला. आता दुसरे कारण ऐकच..' '

दुसरे कारण! ते कोणते ?'

'त्याच्या बापाची प्रतिष्ठा ! गावात असलेला त्याचा मान !! आपला मुलगा चोर आहे हे कोणताही बाप सहज मानेल काय? म्हणूनच पोरगं नाही म्हणतोय ना, मग त्याने नाहीच दगड मारला हे म्हणणे प्रमाण मानून तो तुझ्याशी भांडला. समजले. पुढे ऐक, ही दोनच कारणे पुरेशी नाहीत. आणखी एके गोष्ट यास कारणीभूत झाली आहे.'

'ती कोणती?'

'त्याच्या भोवतीचे वातावरण.'

'ते कसे?'

'जर त्या मुलाची संगत वाईट असेल, त्याचे मित्र खोटे बोलणारे असतील किंवा खोटे बोलणे फारसे काही वाईट नाही अशी त्याची समज झाली असेल तर तो बिनधास्त खोटे बोलेल.'

'मग अशावेळी त्याला चांगले चोपूनच काढले पाहिजे असे मला ठाम वाटते. पण तुमच्या मते ही हिंसा होईल. पण मला तरी याशिवाय काही मार्ग दिसत नाही बुवा.' आजोबा हसू लागले.

'चला एक वेळ तू सुचवलेला उपाय योग्य मानू, खोटे बोलल्यामुळे त्या मुलाला चांगले चोपून काढले पाहिजे. पण चोपणार कोण?'

'त्याचा बाप...

'पण तो तर तुझ्याशी भांडतो. त्याला माहीत नाही का आपला मुलगा खोटे बोलतोय तो ?'

'माहीत आहे तर चांगलेच माहीत आहे.'

'आता कसा बोललास. म्हणजे हे दुसरे कारण महत्त्वाचे आहे. आपण खोटे बोलूनही आपले बाबा आपल्याला न रागवता रघू काकांनाच रागवतात हा प्रसंग पुढे आणखी खोटे बोलण्यास प्रोत्साहन देणारा नाही काय? समजले. त्यासाठी तुमच्या गावच्या मिटींगमध्ये हा विषय येणे व वातावरण चांगले करण्याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे.'

'पण आमच्या गावच्या मिटींगमध्ये असले विषय होतच नाहीत. तेथे देवासाठी करायच्या उत्सवाची वर्गणी, सणासुदीचे कार्यक्रम ठरवणे, एकमेकांवर दंड बसवणे. हे असले विषय होतात.'

'जेव्हा मुले खोटी बोलतात त्यामागे मोठ्या माणसांचे वागणे कारणीभूत असते. कळत नकळत मुलांसमोर हा खोटेपणा मोठी माणसे करतात. मुलांवर त्याचे खोल संस्कार होतात. त्यातून चुकीचे विचार जन्माला येतात व त्याची परिणिती असल्या आचारांमध्ये होते. खोटे बोलणे आणि चोरी करणे ह्या वाईट सवयी यातूनच जन्माला येतात.'

'पण आता त्या मुलाला लागलेय सवय त्याला काय करायचे ?'

'चांगला प्रश्न विचारलास, अशावेळी त्या मुलाला विश्वासात घ्यावे लागेल. त्याची संगत चांगली राहील याची काळजी घ्यावी. स्वतःचे त्यासंबंधी बरे वाईट अनुभव सांगावेत, त्याचे दुष्परिणाम सांगावेत. उदाहरणे द्यावीत. असे करण्याने कुटुंबात कसा गोंधळ होतो, सर्वांसमोर मोठ्या माणसांना कशी मान खाली घालावी लागते ते समजून सांगावे. यामुळे त्याच्यावर हळूहळू संस्कार होऊ लागतात. त्याचे विचार त्या दिशेने सुरु होतात.'

'खोटे बोलणे आणि चोरी करणे याविषयी योगात काही सांगितले आहे काय?' रघूने उत्सुकतेने विचारले. आजोबांच्या बोलण्याचा रोख त्याने बरोबर ओळखला होता. आता तो बराच शांतही झाला होता.

'जे मी आता बोलतोय ते योगाचेच मत सांगतोय माझे नाही.' हसत हसत आजोबा म्हणाले. 'योगशास्त्रात ह्या दोन्हीही गोष्टींचा समावेश आहे. अहिंसेच्या पुवचे हे दोन ग्रम आहेत. त्यांचा अनुक्रमे सत्य आणि अस्तेय म्हणतात, सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे आणी अस्तेय म्हणजे चोरी कधी करु नये, समजले,'

'हे सर्व लहान मुलांसाठी ठीक आहे हो, मोठयांचे काय?'

'नित्य योगाभ्यासाने मोठा माणूसही हळूहळू बदलतो, आत्ता ह्या महिन्याभरात तुझ्यात किती बरे बदल झाला आहे. झालाय की नाही?' आजोबांनी विचारले.

'हो तर, खुप काही आता समजायला लागले आहे, आता हेच बघा, थोड्या वेळेपूर्वी माझ्या मनाची केवढी गडबड झाली होली, पण तुमच्या ह्या समजावण्याने आता खूप बरे वाटते आहे, लक्ष्मणाविषयी माझ्या मनात आता अजिबात राग नाही.'

'रघु एक लक्षात घे, विनोबा भावे काय म्हणायचे, 'खरे बोलणे किती सोपे, खोटे बोलणे फारच अवघड', एक खोटे बोललो की ते लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते, ते लपवण्यासाठी तिसरे, आणि मग याला अंत उरत नाही. त्यापेक्षा जे खरे असेल ते सांगून टाकावे आणि व्हावे मोकळे, एक घाव दोन तुकडे! योगाभ्यास करणाऱ्याने तर कधीच खोटे बोलू नये. हे दोन यमाच्या पालनाने मन शांत व्हायला खुपच मदत होते.' आजोबा शांतपणे म्हणाले.

30/07/2024

श्रावणात आनंद विहार योगाश्रम आयोजित करीत आहे
आरोग्य सप्ताह

शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट निवासी योग वर्गाचे आयोजन होणार आहे. ह्या शिबिरात...

• योगासने व प्राणायाम चा नित्य सराव
• ध्यान करण्याची पद्धत
• योगाची इतर अंगांची ओळख
• Relaxation
• योगिक खेळातून मनोरंजन
• कर्मयोग

याशिवाय
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तळेघर गावाचे दर्शन,
खळखळत्या ओढ्यातून सफर
धबधब्याखाली आंघोळ
शारिरीक आणि मानसिक आरोग्य बहाल करणारे आनंद विहार आश्रमाचे हे विशेष शिबिर आहे.

प्रवेश मर्यादित आहे. त्यामुळे आपली नोंदणी त्वरित करा.

Contact : 9420167413

जसजसा रघु अंतर्मुख होऊ लागला तसतसा त्यास अनेक गोष्टींचा उलगडा हळूहळू होऊ लागला. अध्यात्मासारख्या गोष्टीला तो अगदी सहजपणे...
28/07/2024

जसजसा रघु अंतर्मुख होऊ लागला तसतसा त्यास अनेक गोष्टींचा उलगडा हळूहळू होऊ लागला. अध्यात्मासारख्या गोष्टीला तो अगदी सहजपणे घेत होता, परंतु एक मिनिट देखील शांत बसणे किती अवघड आहे हे जेव्हा त्यास कळले त्यावेळी त्यातले गांभीर्य त्याच्या लक्षात आले. रघुची अशाप्रकारे उत्सुकता दिवसागणीक वाढत होती. आता पुढे.......

पुष्प ४ थे
जलनेती

सुखासन आणि पर्वतासन रघूला चांगले जमू लागले होते. पर्वतासनामुळे त्याच्या कुशीचे स्नायू खूपच सैल झाले होते. महिन्यातून दोन तीन वेळा तरी त्याच्या कुशीत दुखायचे किंवा चमकल्यासारखे व्हायचे, ते सर्व दुखायचे थांबले होते. त्यामुळे त्याला मोठाच हुरुप आला होता. श्वासही खूप मोकळा झाला होता. आंघोळीची वेळ वाढली होती. दोन मिनिटात आटोपणारी आंघोळ १० मिनिटावर पोहोचली होती. स्वच्छतेचे महत्त्व हळूहळू त्याच्या लक्षात येत होते. त्याचा रांगडेपणा हळूहळू कमी होत होता. जेवणाच्या ताटातील भाजीची चवही समजू लागली होती. कोणतेही काम सावकाश करण्याची तो स्वतःहून सवय लावत होता. त्यामुळे त्याचा धुसमुसळेपणाही कमी झाला होता. आजोबांच्या सहवासाने त्याच्यात खूपच फरक पडत चालला होता. आज जरा लवकरच तो आश्रमात आला. आजोबांची एक वेगळीच धडपड त्याला दिसली. त्यांच्या हातात पाण्याचा तांब्या होता. रघूला पाहताच ते म्हणाले,

'ये ये रघूभाऊ, इकडे ये.' रघू लगबगीने त्यांच्याजवळ गेला. त्यांनी पुढे केलेला तांब्या हातात घेतला. तांब्या गरम होता. त्यात बहुतेक गरम पाणी असावे. काय बरे करणार असावेत ते? त्याच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले.

'ये इकडे ये; आज तुला नाक कसे धुवायचे ते शिकवतो.' आजोबा अगदी सहज बोलून गेले.

'काय ? नाक धुवायचे?'

'हो, त्यात एवढ काय झालं दचकायला आपण रोज तोंड नाही का धूत.'

'अहो, पण नाकात कसे पाणी ओतायचे?'

'तेच तर शिकवतोय, इकडे ये. अधिक बडबड करु नको.'

आजोबांनी प्रथम स्वतः नाक धुऊन दाखवले. म्हणजे काय केले? हाताच्या ओंजळीत त्यांनी पाणी घेतले. दुसऱ्या हाताच्या बोटाने एक नाकपुडी बंद केली. ओंजळीतील पाणी दुसऱ्या नाकपुडीतून आत खेचले व तोंडातून ते बाहेर ओकून टाकले. रघू ला ते पाहून भारी आश्चर्य वाटले. अंगावर शाहाराही आला. तशीच क्रिया त्यांनी दुसऱ्या नाकपुडीतूनही केली. '

'समजले; चल आता तू कर बघू.'

'काय मी! नको रे बाबा. मला भीती वाटते.' रघू मागे सरकला. मात्र आजोबांनी आवाज चढवताच नाईलाजाने घाबरतच त्याने आपला एक हात पुढे केला. आजोबांनी त्याच्या ओंजळीत पाणी दिले. रघूने घाईघाईने ते एका नाकपुडीतून भसऽऽकन आत ओढले. आत ओढताच त्याला जोराचा ठसका लागला व तो खोकू लागला. नाकातून नाही पण डोळ्यातून पाणी आले.

'अरे सावकाश खेच. एवढी घाई करू नको. मी कसे केले तसे कर. इकडे ये, उजव्या हातात पाणी घे.' असे म्हणून जराही वेळ न घालवता त्यांनी पाणी त्याच्या हातात ओतलेही. आता मात्र रघूने सावकाश पाणी आत खेचले. गळ्यापर्यंत पाणी जाताच त्याने तोंड उघडले. तोंडातून अगदी सहजपणे पाणी बाहेर आले. रघूचा आत्मविश्वास वाढला. आणखी दोन वेळा त्याने ही क्रिया केली. त्याला गंमत वाटली. आजोबांनी त्याला नाक कसे शिंकरायचे ते दाखवले. हात व नाक पुशीत रघू चटईवर येऊन बसला. डोके बरेचसे हलके झाले होते. आजोबांनी त्याला दोन्ही पाय गुडघ्यात मोडून पायावर (वज्रासनात) बसायला सांगितले. त्याच्यासाठी जरा अवघडच होते ते ! अशा पद्धतीने कधी बसला नव्हता. आजोबांनी त्याला चेहऱ्याचा मसाज करायला शिकवले. कपाळ, नाकाचा भाग, कानाच्या कडेचा भाग व गळा घासून कसा गरम होतो ते दाखवले. कानात करंगळ्या टाकून फिरवल्या की कानाला चांगला व्यायाम मिळून कान स्वच्छ करायला शिकवले. इतके करेपर्यंत त्याच्या पायाला कळा यायला लागल्या. तो चुळबुळ करु लागला. आजोबांनी त्याला सुखासनात बसायला सांगितले. पाठीचा कणा सरळ ठेवून वेगाने मधेच न थांबता श्वास घ्यायला व सोडायला सांगितले. रघू सांगितल्याप्रमाणे करु लागला. परंतु चार- पाच श्वासातच त्याची दमछाक झाली. आजोबांनी त्याला थांबवले.

'असे नाही रघू, शरीर हलवू नको. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित कर व मी दाखवतो त्याप्रमाणे कर.' असे म्हणून त्यांनी एक - दीर्घ श्वास घेतला जराही शरीर किंवा पाठीचा कणा न हलवता श्वास एका लयीत आत-बाहेर करायला सुरुवात केली. - हळूहळू गती वाढवत नेली. रघू बघतच - राहिला. ह्या वयात सर्वसाधारण म्हाताऱ्या माणसांना निव्वळ चालण्याने धाप लागते, तिथे आजोबा मात्र पंधरा सोळा वर्षे वयाच्या तरुणाला लाजवील अशा पद्धतीने - वेगाने श्वास घेत होते होते व सोडीत होते. - छाती आहे की लोहाराचा भाता ! तो बघतच राहिला. साधारण अर्धा मिनिटभर ही क्रिया - केल्यावर ते थांबले व म्हणाले,

'समजले, कर तू.'

रघूने डोळे बंद केले. शरीर स्थिर ठेवत श्वासावर लक्ष एकाग्र केले व श्वास आत-बाहेर करू लागला. चांगले जमले पण १५ सेकंदातच तो दमला. आणखी ३ वेळा आजोबांनी ही क्रिया करवली. त्यामुळे त्याला थोडे वेगळेच वाटू लागले.

'कसे वाटते रघू?'

'फार हलके वाटते. मघाशी डोके थोडे जड होते. आता हलके वाटते. नाक पण कसे मोकळे वाटते. एकदम मस्त वाटते आता.' सर्दी झाल्यावर मानेच्या वर असलेले डोके म्हणजे एक अवजड धुडच असे त्याला वाटायचे पण आता कसे अगदी हलके फुलके कापसासारखे त्याला वाटू लागले. रघू खूष झाला.

'मग धुशील ना रोज नाक?'
हसत आजोबांनी विचारले.

'रोज धुवायचे?'
'हो रोज धुवायचे; शेतावर जाऊन काम केलेस तर संध्याकाळी घरी आल्यावरही ही क्रिया करायची. म्हणजे दिवसातून दोनदा करायची समजले?'

'हो समजले, काय म्हणायचे ह्याला?'

' याला जलनेती म्हणतात. आपण आता जो चेहऱ्याचा मसाज केला त्याला कपालरंध्र धौती म्हणतात. कानात बोटे घालून कान स्वच्छ केले त्याला कर्णरंध्र धौती म्हणतात आणि शेवटी वेगाने श्वासोच्छ्वास केलास त्याला कपालभाती म्हणायचे.'

'फार कठीण नावे आहेत'

'जाऊ दे, नावे लक्षात ठेवायची गरज नाही. ह्या क्रिया नियमित करायला जमतील का?'

'जमतील म्हणजे काय, करणारच.' रघूने आपल्या उपरण्यात परत एकदा जोरात नाक शिंकरले.

आजोबा हसले. ते का हसले हे मात्र रघूला कळले नाही.
क्रमशः

Address

Taleghar, Mandangad
Ratnagiri
415202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand Vihar Yoga Institute, Konkan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram