11/02/2026
"सगळं सोडून कुठेतरी निघून जावं!" संसार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला असं कधी ना कधी वाटत असतं.😠 सगळे आपलेच म्हणले तरी काम करत राहायचा, गृहीत धरलं जाण्याचा, आयुष्य वाया चालल्याचा अशा कितीतरी गोष्टींचा वैताग येऊन असं वाटणारे खूप जण असतील ☹️😅
माझ्या होमिओपॅथिक प्रॅक्टिसच्या दरम्यान अशा कितीतरी स्त्रिया मला भेटत असतात. त्यांना मदत करता करता मी स्वतःचीही मदत करत असते. आपलं सुख आनंद आपल्याच हातात असतो याची जाणीव करून देत असते 😇
योग्य होमिओपॅथिक औषध काय काय करू शकतं ते कौतुकाने, अभिमानाने तर कधी आनंदाने बघत असते, निरीक्षण करत असते.🙂
प्रत्येकाला स्वतःसाठी थोडासा वेळ काढायलाच हवा, पण हे सगळं विसरून आपण सगळे रोजच्या व्यस्त जीवनशैलीत पळतच असतो.🏃🏻♀️ जीवनशैली व्यस्त असणं वाईट नाही पण त्यात " Me Time" नक्की हवा!!
निरजा (नाव बदललेलं आहे) वय 35 वर्ष अतिशय हुशार, टॅलेंटेड व्यक्ती☺️ जिद्द, महत्त्वाकांक्षा इतकी की काय वाटेल ते करू शकेल...
गेल्या काही वर्षात संसारात अशी अडकली की स्वतःच अस्तित्वच विसरून गेली.
बिनधास्त, बेधडक बोलताना कोणाचीही तमा न बाळगणारी, खटकणाऱ्या सगळ्याच गोष्टी चुपचाप सहन करू लागली☹️ मनातच घुसमटत कुढत राहू लागली😢
हे इतकं झालं की ज्यांच्यासाठी हे करत होती त्यांच्याबद्दलची ओढ, प्रेम काहीच उरलं नाही.
"सगळं सोडून निघून जावं वाटते" मला ती म्हणाली. हे वाक्य खूप वेळा ऐकलंय मी, पण तिच्या बोलण्यात राग, तिटकारा,अगतिकता नव्हती खरं तर कोणतीच भावना नव्हती. नीरजा भावनांच्या बाबतीत दगड बनली होती😒 तिला आनंद, दुःख ,वेदना काहीच जाणवत नव्हतं.😔 ज्या मुलांसाठी आई काय वाटेल ते करते त्या लाडक्या मुलांबद्दलही तिला काहीच वाटत नव्हतं. हसरी, खेळकर नीरजा चिडचिडी बनली होती. भक्तीगीत, गाणी सगळी तिला आवडायची त्या सगळ्याचीच तिला चिड यायला लागली होती.😠 तिचं आयुष्य निरर्थक वाटत होतं. या सगळ्याचा शरीरावर परिणाम नाही झाला तरच नवल...🤔
निरजाची पाळी अनियमित झाली होती. महिनोन महिने पाळी न येणं ही पण तिची महत्त्वाची समस्या बनली होती. शारीरिक संबंधांचा तिला तिटकारा वाटत होता. पित्ताचा प्रचंड त्रास होत होता. नीट खाता यायचं नाही, प्रचंड डोकं दुखायचं. थोड्याशा खाण्यातल्या बदलामुळे लूज मोशन व उलट्यांचा त्रास सुरू व्हायचा. उन्हाचा खूप त्रास व्हायचा, खूप पोट दुखायचं; साफ व्हायचं नाही. गॅसेस आणि पोट फुगल्यासारखं वाटायचं. डोळे, दात सुद्धा दुखायचे.😣
नीरजाची सविस्तर केस हिस्टरी घेतल्यावर खालील मुद्दे महत्त्वाचे वाटले.
निरजाला आपल्या मनाविरुद्ध बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या होत्या.
एका स्वतंत्रपणे जगणाऱ्या मुलीला, आपलं बिनधास्त आयुष्य सोडून बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या होत्या. आता या सगळ्या गोष्टींचा तिला वीट आला होता. त्याची परिणीती अशात झाली होती की तिला आयुष्य निरर्थक वाटायला लागलं होतं😐 कुठल्याच गोष्टीत प्रेम, आनंद, दुःख या भावना तिला जाणवत नव्हत्या. सगळ्याच गोष्टींबाबत ती उदासीन बनली होती. याशिवाय तिची सतत होणारी डोकेदुखी ,पित्ताचा त्रास ,पाळीची अनियमितता, व्यवस्थित आणि नीटनेटकं राहण्याबाबत उदासीनता अशा सगळ्यांचा विचार करून तिला योग्य होमिओपॅथिक औषध दिलं.
नियमित होमिओपॅथिक औषधोपचार आणि समुपदेशनाचा निरजाला बराच फायदा झाला.☺️🌿
स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींकडे थोडं लक्ष द्यायला " Me Time" साठी थोडा वेळ काढायला तिला सांगितलं याशिवाय नियमित प्राणायाम, व्यायाम याचेही महत्त्व सांगितलं.
नीरजामध्ये हळूहळू फरक पडत गेला.🙂 तिचं विचार करणं थोडं कमी झालं. मनात कुढण कमी झालं. तिचा संसार सांभाळतच स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी ती करायला लागली. तिच्या सगळ्या भावना परत आल्या. आयुष्याचा आनंद ती घेऊ लागली. तिची पाळी नियमित येऊ लागली. पित्ताचा त्रास बराच आटोक्यात आला. दात दुखणं कमी झालं, डोकेदुखीची तीव्रता कमी झाली. तिच्या मनासारखं थोडं फार तिला खाता येऊ लागलं.
अजूनही नीरजाचे उपचार चालू आहेत पण किरकोळ त्रास सोडले तर ती खूप बरी आहे. आता पण तिची दिनचर्या व्यस्त आहे पण तिचा दिवस तिच्या आवडीच्या गोष्टींमध्ये जातो आहे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा तिच्यावर विशेष परिणाम होत नाही. नीरजाचं राहणीमान आता व्यवस्थित टापटीपीचं आहे. तिच्या बोलण्यातून तिचा आत्मविश्वास, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची तळमळ जाणवते.🥲😇
योग्य होमिओपॅथीक औषधोपचार तुमचा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलायला मदत करतात आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवतात.😇😊
डॉ जुईली कुलकर्णी
श्री होमिओपॅथिक क्लिनिक
रावेत पुणे
97669 02124
9890702341