Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra

Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra, Doctor, near ram mandir, on congress bhavan road, Sangli.

08/03/2026

आता मी नाही बोलणार...
फक्त पेशंट बोलणार....
*"मी फक्त पवार डॉक्टरांचीच औषधे घेणार...!"*

रक्तामध्ये वाढलेल्या उष्णतेचे रूपांतर कधी नागिनी मध्ये म्हणजेच आयुर्वेदानुसार विसर्प या यादीमध्ये होईल हे सांगता येत नाही.
माझ्या जवळचे नातेवाईक, राजकारणातील एक प्रतिष्ठित व्यक्ती. एका राजकीय कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दगदगीमध्ये आठ दिवस *मोठ्या प्रमाणात चहाचे सेवन व त्या मानाने पाण्याचे प्रमाण कमी* गेल्यामुळे शरीरामध्ये वाढलेल्या उष्णतेचे रूपांतर मांडीवरती लहान पुरळ उठण्याने सुरुवात झाली आणि दोन दिवसात अगदी *भाजल्याप्रमाणे मोठे फोड* उठले. घरातील लोक घाबरले. त्यातून एवढ्या मोठ्या राजकारण्याला सूचना देणाऱ्या लोकांची कमी नव्हती.

पण कोरोना मध्ये अगदी श्वासही नीट घेता येत नसणाऱ्या अवस्थेतून फक्त आणि फक्त आपल्या आयुर्वेदाच्या चिकित्सेच्या जोरावरती पुन्हा पूर्ववत झाल्याचे भान ठेवून, सर्वांचा विरोध झुगारून *"मी फक्त पवार डॉक्टरांची च औषधे घेणार, काय व्हायचे ते होऊ दे "* असे ठणकावून सांगत दहा दिवस पूर्णपणे तिखट, मीठ बंद करून आमच्या आयुर्वेदाची औषधे प्रामाणिकपणे घेऊन पूर्णपणे बरे झालेले हे आमचे अण्णा ... राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व...

डॉ सचिन पवार एमडी आयुर्वेद
डॉ वैशाली पवार आयुर्वेदाचार्य

डॉ पवार आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
राम मंदिर-काँग्रेस भवन रोड, सांगली
संपर्क 9168337771

01/03/2026

*आयुर्वेद...*
*सर्वांना समजेल असा...*
*डॉ.सचिन पवार*
एमडी आयुर्वेद
स्वतःमध्ये, स्वतःच्या जीवनशैली -आहारामध्ये आयुर्वेदाच्या सहाय्याने बदल करून एखाद्या मोठ्या आजारातून कसे बाहेर येऊ शकतो किंवा त्या आजाराला कसे मुळापासून बरे करू शकतो हाच उद्देश ठेवून, प्रत्येक खेड्या-पाड्यापर्यंत आयुर्वेद पोचवायचा ध्येय ठेवून, *गेली पंधरा वर्षे* आम्ही आयुर्वेद क्षेत्रामध्ये काम करत आहोत.*आमचा अनुभव हीच आमची ताकद आहे.* आज दिघंची-आटपाडी पासून ते जत-संखपर्यंत,सोबत अथणी- चिकोडी -गोकाक पर्यंत प्रत्येक छोट्या गावांमध्ये आम्ही रुग्णसेवा दिलेल्या व्यक्ती आहेत. इथून पुढे अगदी विजापूर, बेळगाव पासून सुद्धा रुग्न येत आहेत. या तळागाळापर्यंत आयुर्वेद पोहोचवू शकलो याचे समाधान आहे.
बदलती जीवनशैली, पॅक फूड आणि फास्ट फूड मुळे आलेले नवीन आजार ही सध्या काळाची सर्वात मोठी भीती आहे. जर यातून बाहेर पडायचे असेल तर पुन्हा आयुर्वेदाला आपलेसे करण्याशिवाय पर्याय नाही.
फक्त औषध घेणे म्हणजे आयुर्वेद नसून स्वतःमध्ये बदल करणे, जीवनशैली आणि आहार बदलणे, सोबत आपली मानसिकता बदलून काम करणे म्हणजे आयुर्वेद आहे.
ज्यावेळी तुम्ही अशा गोष्टींची स्वतःमध्ये बदल करू लागता तेव्हा तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि मोठ्या आजारातून तुम्ही उतरणीला लागता.

कोरोना काळानंतर मी आता असे बरेच रुग्ण पाहत आहे ज्यांच्यामध्ये स्थूलता,थायरॉईड , हृदयाचे विकार विस्मरण, ऊर्जा कमी आणि केस गळणे अशा बरेच नवे आजारांनी घर केले आहे. अशा आजारांमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी पंचकर्माचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे आणि आश्चर्य म्हणजे रुग्ण सुद्धा स्व इच्छेने "मला पंचकर्म करायचे आहे" म्हणून आमच्याकडे येत आहेत. अक्षरशः आठवडाभर नंबर लावून वेटिंग मध्ये थांबून लोक पंचकर्म करून घेत आहेत.
आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणे म्हणजे कष्टाला पर्याय नाही. जर अवघड पेशंट बरा करायचा असेल तर वैद्याने स्वतः औषध बनवणे गरजेचे आहे. स्वतः बनवलेल्या औषध चा वापर करून जेव्हा तुम्ही पंचकर्म करता तेव्हा त्याचा रिझल्ट तिसऱ्या माणसाला सहज लक्षात येणे इतपत दिसतो. सुरुवातीपासूनच आमचा स्व निर्मित औषधावर भर असल्यामुळे आम्ही उत्कृष्ट दर्जाची आयुर्वेदिक औषधे बनवू शकतो आणि त्यांचा वापर करून अवघड व्याधी आयुर्वेदाच्या माध्यमातून बरे करण्याचा प्रयत्न आमचा असतो. इथून पुढे असेच दर्जेदार औषधे बनवून रुग्णसेवा देण्याचा मानस राहील.
काळाची आयुर्वेदातील गरज पाहून अजून वृद्धिंगत रुग्णसेवा देता यावी, रुग्णाला ऍडमिट होऊन चिकित्सा घेता यावी

20/02/2026

आता मी नाही बोलणार...
फक्त पेशंट बोलणार...
शरीराचा वाढलेला ओझेपणा, फुगीरपणा ,
हरवत चाललेल्या संवेदना ...
यावरती रामबाण उपाय...
*(कोणतेही पथ्य नसलेले)*
*आयुर्वेदातील बस्ती पंचकर्म*

"आपल्या शरीरामध्ये एकदा जर वात वाढला तर तो काय काय नाटकं करेल याचा अंदाज न केलेलाच बरा."

तासगाव येथील शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य असणाऱ्या आंबवडे मॅडम यांच्या शरीरामध्ये वात वाढल्यामुळे विविध सांध्यामध्ये वेदना हातापायामध्ये मुंग्या येणे,शरीराला फुगीरपणा तसेच कमी होत चाललेल्या संवेदना अशी लक्षणे दिसू लागली. सुरुवातीला या लक्षणांच्याकडे दुर्लक्ष करून नोकरी- घर- संसारात त्या गुरफूटून गेल्या होत्या. पण हळूहळू या सर्व गोष्टी त्यांना त्रास देऊ लागल्या तेव्हा त्यांनी जवळचा डॉक्टर गाठला. औषधाने तात्पुरता फरक पडला पण पुन्हा जैसे थे.असे चार-पाच डॉक्टर बदलून झाले पण फरक तात्पुरताच.
तेव्हा मात्र त्यांना आयुर्वेदाची आठवण झाली. *कारण कोणत्या गोष्टीचा मुळापासून उपचार करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही* आणि त्यांनी आपल्या डॉ. पवार आयुर्वेद,पंचकर्म व रिसर्च सेंटर या ठिकाणी वाताचा रामबाण उपाय म्हणजे बस्ती हे पंचकर्म करून घेतले आणि काय आश्चर्य ...या सगळ्या तक्रारी अशा फटाफट कमी होऊन शरीर हलके झाले.
त्या म्हणाल्या की "मी हे पंचकर्म अगोदर का बरं नाही केले. अशी बस्ती सारखी पंचकर्म चिकित्सा आपण दरवर्षी करून घ्यायला पाहिजे."

आमच्या सेंटरमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बस्ती हे पंचकर्म करून घेण्यासाठी बहुतांश शिक्षक वर्ग गर्दी करतात. कारण रोजचा प्रवास, धकाधकीतली नोकरी, विद्यार्थ्यांना शिकवायचे, बोर्ड चा वापर शिवाय इतर ताण वेगळाच.
यात फक्त बस्ती आणि शिरोधारा सारखे पंचकर्म चिकित्साच खूप सोप्या पद्धतीने बाहेर काढू शकतात.‌

डॉ सचिन पवार एमडी आयुर्वेद
डॉ वैशाली पवार आयुर्वेदाचार्य

डॉ पवार आयुर्वेद व पंचकर्म सेंटर राम मंदिर-काँग्रेस भवन रोड, सांगली
संपर्क 9168337771

15/02/2026

*मंतरलेले 4 दिवस* 😊.. डॉ. विशाल मोहिते यांच्या कवठेमंकाळ येथील नवीन सेंटरमधील अनुभव

गेली पाच वर्षे फक्त दूध पिऊन दिनचर्या करणारे, तपस्व,योगी, वेद पाठक, आयुर्वेद रत्न, धर्मप्रसारक अशा काशीच्या दंडी महाराजांचा अचानक लाभलेला सहवास आणि आयुर्वेदिक पंचकर्म करण्याचे अहोभाग्य लाभलेले हे चार दिवस... खूपच सुंदर अनुभव होता.

रविवार; दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी
नवीन वास्तूमध्ये गुरुजींनी स्वतः होम घातला. विशेष म्हणजे कोणतेही पूर्व कल्पना आणि पूर्वतयारी नसताना झालेला कालचा होम अतिशय सात्विक, भव्य दिव्य आणि अविश्वसनीय होता.

रविवारी या झालेल्या होमासाठी सांगलीचे सुप्रसिद्ध डॉ पलंगे सर व डॉ केदारी प्रसाद कुलकर्णी सर सहकुटुंब उपस्थित होते. गुरुजींच्या सोबत या आदरणीय गुरूंचा सहवास लाभणे असा अनोखा योगायोग काल अनुभवायला मिळाला.... हा सर्व अनुभव आदरणीय पलंगे सर यांच्यामुळे अनुभवता आला..🤗😊
आदरणीय पलंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्या मागे स्वामीजींची आयुर्वेदाच्या माध्यमातून सेवा करायची संधी मिळाली होती. त्यावेळी स्वामीजींनी आमच्या राम मंदिर चौकातील आयुर्वेदिक केंद्रामध्ये सदिच्छा भेट दिली होती. तेव्हा कवठेमंकाळ या ठिकाणी पूर्णत्वास येऊ घातलेल्या डॉ विशाल मोहिते सरांच्या वास्तू बद्दल त्यांच्याशी चर्चा केली होती तेव्हा स्वामीजी म्हणाले की पुढील वेळी जेव्हा महाराष्ट्राकडे येऊ तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी मुक्कामास येऊ.
आणि आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी महाराष्ट्रात आल्या आल्या आठवणीने निरोप दिला कि ते १ दिवस मुक्कामास येत आहेत... आणि इथले वास्तव्य त्यांना इतके आवडले की त्यांनी चार दिवस मुक्काम करुन स्वतःची पंचकर्मचिकित्सा करून घेतली. नंतर येथोचित होम हवन आदि विधी करून आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले.

यावेळी कवठेमंकाळ मध्ये सुरू होत असलेल्या "विशाल आयुर्वेद पर्व" हॉस्पिटलच्या ऍडमिट पेशंट ची सुरुवात गुरुजींच्या रूपाने होणे यापेक्षा मोठे भाग्य दुसरे नाही.😊

डॉ विशाल व डॉ पल्लवी मोहिते.
डॉ सचिन व डॉ. वैशाली पवार
*"विशाल आयुर्वेद पर्व"*
*•हॉस्पिटल •पंचकर्म •गर्भसंस्कार,*
*•रिसर्च आणि वेलनेस सेंटर,*
*झुरेवाडी रोड(पंढरपूर हायवे),*
*कवठेमहांकाळ.*(जि. सांगली)
Mob: 8999121231

20/01/2026

*डोळ्यांमध्ये दिसणारा रक्तातील संधिवात* ... प्रभावी आणि यशस्वी आयुर्वेद उपचार...

रक्तातील दोष कधी कोठे जाऊन काय दंगा करतील याचा काही नियम नाही 😳
वरील रुग्णांमध्ये रक्तातील संधिवात जेव्हा डोळ्यांमध्ये दिसू लागला तेव्हा डोळ्याला असा रक्तवर्ण आला व डोळ्याला अंधुक दिसू लागले.

असे दिसताच गगनबावडा जवळील ही रुग्णा तातडीने आपल्या दवाखान्यात दाखवण्यास आली.

लगेचच आपल्या आयुर्वेदातील या अवस्थेतील ब्रह्मास्त्र म्हणजे त्या ठिकाणी डोळ्याच्या बाहेर कोनाजवळ जलोका Leech Therapy लावून *रक्त मोक्षन हे पंचकर्म केले.*

सोबत आश्चोतन चिकित्सा( डोळ्यामध्ये औषधी सोडणे) व पोटातून रक्त दुष्टी आणि वात कमी करणारी औषधांची उपायोजना केली.

अवघ्या चार दिवसांमध्ये 50% कमी होऊन *फक्त 10 दिवसांमध्ये 100% डोळ्यातील रक्त वर्ण कमी झाला.*

अनुभवापानुसार स्टेराईड चा हेवी डोस देऊन सुद्धा इतक्या लवकर डोळा नॉर्मल होत नाही.

*हीच किमया...*
गुरमुखातून मिळालेल्या ज्ञानाची...
त्यानुसार निदान करून केलेल्या चिकित्सेची...
आणि आयुर्वेदाची आहे...

टीम डॉ. पवार आयुर्वेद,
पंचकर्म व रिसर्च सेंटर,
राम मंदिर चौक, सांगली
9168337771

10/01/2026

सुगी ओल्या हरभरा वटाणा पावट्याच्या शेंगांची,
आयुर्वेद म्हणतो कमी खा, देऊन फोडणी तुपाची

सहज एक कुतुहल म्हणून या आठवड्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सहज विचारलं .."काल रात्री काय जेवला?" तर आश्चर्य म्हणजे उत्तरा दाखल जवळपास 90% पेक्षा जास्त लोकांनी ओला वाटाणा, हरभरा किंवा पावटा हेच उत्तर दिलं

साहजिक आहे ...आता सीझन आहे आणि सगळीकडे या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत , शेतकरी राजाच्या तर शिवारातच या भरभरून आलेल्या आहेत. आणि या हिरवेगार शेंगा आणि दाणे पाहिले असता त्या खायचा मोह कोणाला बरे होणार नाही???
*पण आयुर्वेद काय सांगतो?*
तर सामान्यपणे हे वाटाणा, हरभरा पावटा हे जे मोठे दाणे आहेत हे
🦚अत्यंत वात वाढवणारे असतात 🦚कडधान्यांमध्ये हे पचायला अत्यंत जड ,पोटात मुक्काम करणारे.
🦚 व्यवस्थित पोट साफ होऊ न देणारे पोटातील गॅस वाढवणारे
🦚 वात वाढवणारे व दुखणे वाढवणारे असतात.

त्यामुळे या पदार्थांचे अतिप्रमाणामध्ये सेवन करणे हे आयुर्वेदाने निषेध सांगितले आहे.

*मग खायचा असेल तर खायचे कसे??*" तर एक तर या यांचे प्रमाण आहार मध्ये कमीच असावे, सलग खाणे टाळावे. कधीतरी खाल्ल्यास चालू शकेल. त्यातून हे दाणे भाजी करण्यापूर्वी हलके चेचून तूप टाकून चांगले भाजून घ्यावेत आणि मग याची भाजी करावी. याची भाजी करत असताना फोडणी तुपामध्ये द्यावी. शिवाय भाजी ताटात वाढून घेतल्यानंतर वरती तूप घालून खावे.

थोडक्यात काय या दाण्यांची भाजी अगदी कमी प्रमाणात कधीतरी चवीपुरती खाऊ शकता पण त्यासाठी त्याच्या जोडीला मुबलक तूप घ्यावे लागेल म्हणजे त्रास होणार नाही.
डॉ.सचिन पवार एमडी आयुर्वेद
डॉ पवार आयुर्वेद
पंचकर्म व रिसर्च सेंटर
राम मंदिर -काँग्रेस भवन रोड,
सांगली 9168337771

20/12/2025

© डॉ.सचिन पवार
एमडी आयुर्वेद सांगली

*थंडी आणि कोरडी त्वचा...*
*आयुर्वेद काय सांगतो????*

वातावरणामध्ये प्रचंड थंडी पडलेली आहे आणि या थंडी सोबतच कोरडेपणा ही भरपूर असल्यामुळे प्रत्येकाची त्वचा ही आता रेषा युक्त कोरडी, आणि त्या कोरडेपणामुळे अंगावरती कोरडी खाज उठणे अशी बनलेली आहे.
थंडीमध्ये जर आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार आम्ही सामान्यपणे 3 उपाय सुचवतो..
*1. अभ्यंग तेल जिरवणे-जास्त कोरडी त्वचा*
*2. शतधौत घृत लावणे- नाजूक व गोरी त्वचा*
*3. कुंकूमादी तेल लावणे - कोरडी व काळवंडलेली त्वचा.*

*🌱1. अभ्यंगस्नान :* ज्यांची त्वचा खूपच कोरडी झाली आहे त्यांनी
सिद्धतेल, अभ्यंग तेल किंवा अगदी घरातील खोबरेल तेल कोमट करून हलके अंगाला जिरवून गरम पाण्याने आंघोळ करणे. अंग धुण्यासाठी दिवाळीतील उटणे,मसूर/ हरभरा डाळीचे पीठ वापरले असता त्वचेला कोरडेपणा येत नाही व वरील अनावश्यक तेलकटपणा निघून जातो.
जसे आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो, तसेच अभ्यंग स्नान पुढील 2 थंडीचे महिने दररोज करणे गरजेचे आहे.

*🌱2. शतधौत घृत:* ज्यांची त्वचा नाजूक व गौरवर्णी आहे आणि त्यामध्ये थोडा कोरडेपणा जाणवत असेल तर त्यांनी शतधौत घृत म्हणजे शंभर वेळा तांब्याच्या ताटामध्ये घासून धुतलेले तूप त्वचेला लावावे. त्यांनी त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व ग्लो पुर्वीप्रमाणे मिळतो. ( ❤️ यामध्ये वडपिंपळउंबराच्या सालींच्या काढ्याने सिद्ध शतधौत घृत सुद्धा केरळच्या कंपन्यांचे उपलब्ध आहे.)

*🌱3. कुंकुमादि लेपम् cream :* ज्यांची त्वचा थंडीने कोरडी पडून काळवंडलेली आहे त्यांनी कुंकूमादी लेपम् याचा आवर्जून वापर करावा. हा लेप( क्रीम) लावत असताना हाताला थोडे खोबरेल तेल लावून त्यावरती कुंकूमादि लेपम् हि क्रिम घेऊन त्वचेवरती हलके जिरवावे. (चेहऱ्याला लावून वाफ घेतली असता विशेष उजळपणा येतो.) याने त्वचेतील कोरडेपणा कमी तर होईलच शिवाय *त्वचा उजळ सुद्धा* होईल.

थोडक्यात थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील थंड व रुक्ष म्हणजे कोरडा गुण वाढल्यामुळे त्वचेचे रक्षण करायचे असल्यास त्वचेला स्नेह अत्यंत गरजेचे आहे मग ते बाहेरून लावणे असू दे किंवा तुपासारखे पदार्थ पोटात घेणे असू दे. सोबतीला मनाचा स्नेह ❤️असेल तर अजून उत्तम.
टीम
डॉ. पवार आयुर्वेद, पंचकर्म व रिसर्च सेंटर राम मंदिर- काँग्रेस भवन रोड, सांगली

02/12/2025

Address

Near Ram Mandir, On Congress Bhavan Road
Sangli
416416

Telephone

+91 91683 37771

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category