Dr Atul Ghodekar

Dr Atul Ghodekar Dr Atul Dattatray Ghodekar

21/04/2020

Homoeopathic physician

16/01/2020

*संधिवात*

संधिवाताचे दुखणे हा अत्यंत हैराणीचा आजार आहे,कारण संधिवातामुळे हाता पायाला सूज येते, किंवा तो अवयव कामच करत नाही,सूज आल्यामुळे वेदना खूप होतात,यावर आपण अनेक उपाय करतो,परंतु त्यामुळे थोडा वेळ बरे वाटले की,पुन्हा वेदना सुरू होतात, अशावेळी आपल्याला वाटते की, संधिवातावर काहीही उपाय केला तरी तो बराच होत नाही,पण हा आपला गैरसमज असतो,कारण कोणताही आजार असेल तर तो फक्त गोळ्या औषधाने बरा होत नाही, तर त्यासाठी आपल्याला आहारात ही बदल करावे लागतात,आणि संधिवाताला तर आहाराचे खूप महत्त्व आहे.

*संधिवात बरा होण्यासाठी खालील पथ्य पाळा.*.

1)संधिवात असणाऱ्या व्यक्तींनी मासे ,गोड पदार्थ खाणे टाळावे

2)जे पदार्थ पचण्यास जड आहेत ते खाऊ नये.
3)हरभरा, वाटाणा, बटाटा हे वात निर्माण करतात,यामुळे यांचा आहारात समावेश करणे टाळावे. 4)तेलकट, खारट,थंड पदार्थ खाऊ नयेत, थंड पदार्थांनी सांध्यास सूज येते.
5) व्यसन करणेही संधिवातास घातक आहे.
*संधिवात बरा होण्यासाठी ह्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.*.

1)संधिवात बरा होण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा. 2)हिरव्या पालेभाज्या,लसूण,तूप,मनुका या पदार्थांचे सेवन करावे. 3)संधिवात असणाऱ्यांनी आले (अद्रक)खावे,कारण त्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. 4)बीट उकडून खावे, कारण त्यातून कॅल्शियम मिळते . 5)आणि पाणी नेहमी उकळून प्यावे.
वरील पथ्य पाळली तर संधिवात लवकर बरा होण्यासाठी मदत होईल.
*होमिओपॅथिक उपचार*
याबरोबरच विनादुष्परीनाम असणारी होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा लाभ घ्या; आणि संधीवात समस्या पूर्णपणे घालवा.
डॉ अतुल घोडेकर
8975968795

07/01/2020

*कोलेस्ट्रॉल*

कोलेस्ट्रॉल हा घटक शरीराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतो. शरीरात याचे प्रमाण असंतुलित झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात.

*कोलेस्ट्रॉलची गरज का?*
कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात महत्त्वाचे हार्मोन्स बनतात. हे शरीराचे संक्रमणापासून संरक्षण करते. कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात बायल एसिडची निर्मिती होते. आतड्यांतून वसा शोषणासाठी त्याची मदत होते. कोलेस्ट्रॉल हाडांच्या विकासासाठी मदत करणाऱ्या व्हिटॅमिन डीची निर्मिती करण्यात मदत करते.

*कोलेस्ट्रॉल धोकादायक केव्हा असते?*
कोलेस्ट्रॉलचे एक निश्चित प्रमाण शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. पण रक्तातील याचे प्रमाण 250 मिलीग्रॅम प्रती डेसीलीटर किंवा यापेक्षा जास्त होणे धोकादायक होऊ शकते. धमण्यांमध्ये जास्त कोलेस्ट्रॉल जमल्याने रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात व हृदयासंबंधीत आजार उद्भवू लागतात. धमण्यांमध्ये होणार्‍या रक्तप्रवाहात जास्त अडथळे येण्याने ह्रदयविकाराचा धक्का बसू शकतो.
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने पित्ताच्या पिशवीत खडे जास्त प्रमाणात बनतात.

*हे प्रमाण कमी कसे कराल?*
जेवणात प्रोटीन, कार्बोहायड्रेड व वसाचा योग्य प्रमाणात समावेश करा. भाज्या शिजविण्यासाठी शेंगदाणा तेल, सरसाचे तेल, सोयाबीन, तिळाचे तेल यांचा वापर करा.
आहारात मांसाहारी पदार्थ व पनीर कमी करा.
सिगारेट व दारू बंद करा.
आहारात ताजी फळे व हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.
तणावापासून दूर रहा.
नियमित व्यायाम करा.

*होमिओपॅथिक उपचार**
याबरोबरच विनादुष्परीनाम असणारी होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा लाभ घ्या; आणि कोलेस्टेरॉल समस्या पूर्णपणे घालवा.
डॉ अतुल घोडेकर
8975968795

23/12/2019

*सर्दी आणि होमिओपॅथिक उपचार*
नाकातील श्लेष्मकलेच्या तीव्र शोथाला (दाहयुक्त सुजेला) सर्दी अगर पडसे असे म्हणतात. यामुळे नाकातील श्लेष्मकलेला शोफ होतो आणि ग्रंथी वाढून मोठया प्रमाणात स्राव तयार होतो. स्रावाच्या प्रकाराप्रमाणे नाकातून पाणी गळत असल्यास त्याला नाक गळणे, घट्ट चिकट व सहजी बाहेर न पडणारा स्राव असल्यास त्याला नाक दाटणे वा चोंदणे आणि पूयुक्त स्राव असल्यास त्याला पिकलेली सर्दी असे रूढ भाषेत म्हटले जाते.

*कारणे*
संक्रमणजन्य सर्दी व्हायरस किंवा सूक्ष्मजंतूंच्या संक्रमणामुळे नाकातील श्लेष्मकलेचा शोथ झाल्यामुळे होते.
अ‍ॅलर्जीमुळे होणारी सर्दी नाकाच्या श्लेष्मकलेतील प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियेच्या परिणामामुळे उद्भवते.
अनेक विषारी, रासायनिक, वनस्पतिज व प्राणिज कार्बनी पदार्थ नाकावाटे शरीरात शिरताना प्रतिजन म्हणून कार्य करतात आणि त्यांना प्रतिकार करण्यासाठी प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिकिया घडते. या प्रतिक्रियेतून निर्माण होणाऱ्या हिस्टामीन इ. रासायनिक द्रव्यांमुळे सर्दीची लक्षणे उद्भवतात.

*लक्षणे*
सुरूवात एकाएकी होते. नाकात गुदगुल्या झाल्यासारखे वाटून शिंका येतात. नाक व घसा कोरडा पडून दाह किंवा वेदना जाणवते. डोके जड होते व डोळ्यांची जळजळ सुरू होते. नंतर नाकातून पाण्यासारखा स्राव मोठया प्रमाणात वाहू लागतो. याबरोबरच बारीक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, भूक मंदावणे इ. व्हायरस संक्रमणाची इतर लक्षणेही दिसू शकतात.

अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या अधिहर्षताजन्य सर्दीत नाक व डोळ्यांची खाज, शिंका व डोळ्यांतून पाणी गळणे, नाक चोंदणे, डोके जड येणे इ. लक्षणे दिसतात.

*प्रतिबंध*
जीवनसत्त्वयुक्त चौरस आहार व योग्य व्यायामाच्या साहाय्याने शारीरिक आरोग्य राखणे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, श्वसनाचे व्यायाम व प्राणायाम, मोकळी स्वच्छ हवा, अतिदमट किंवा अती कोरडी हवा व कोंदट जागी काम करणे टाळावे, अधिहर्षताजनक पदार्थाचा संपर्क टाळण्याचा प्रयत्न करणे इ. प्रतिबंधक उपचार महत्त्वाचे आहेत; परंतु त्यामुळे सर्दी कायमची बंद करणे शक्य नसते.

*होमिओपॅथिक उपचार*
याबरोबरच विनादुष्परीनाम असणारी होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा लाभ घ्या; आणि सर्दी पूर्णपणे घालवा.
डॉ अतुल घोडेकर
8975968795

18/12/2019
18/12/2019

*तणाव आणि होमिओपॅथिक उपचार*

मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात.

*कारणे*
*बाह्य* उदा. कामाच्या ठिकाणचे व घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, सामाजिक समस्या, प्रकृती अस्वास्थ इ.

*आंतरिक –*

आत्मविश्वासाचा अभाव - आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली, की व्यक्ती

तणावग्रस्त होते.

हळवेपणा - रस्त्यात भेटलेला मित्र बघून हसला नाही म्हणून तणाव.

लाजणे - अपरिचित व्यक्तीशीी बोलताना तणाव.

न्यूनगंड असणे - आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात तणाव.

*दुष्परिणाम*

शारीरिक - पित्ताचा विकार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत / मूत्रपिंड आदींचे विकार, इ.

मानसिक - लगेच दमणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तीमत्त्व, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता, इ.

*उपचार*

सम्बद्धीकरण

विनोद

सकारात्मक पुनर्मुल्यांकन

परोपकारिता

आत्मपरीक्षण

मानसिक अवरोध / अस्वीकृती तंत्र

मानसिक स्थानांतरण

मनप्रवरुत्ति दडपून टाकणे

हद्दबंदी

युक्तीकरण

होमिओपॅथिक उपचार

याबरोबरच विनादुष्परीनाम असणारी होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा लाभ घ्या; आणि तणावमुक्त व्हा
डॉ अतुल घोडेकर
8975968795

17/12/2019

*अ‍ॅसिडिटी*

*अ‍ॅसिडिटी म्हणजे नेमके काय?*
आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो.
हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.
हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.
हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.

*अ‍ॅसिडिटी का होते?*
पोटात जास्त प्रमाणात व अवेळी हा ‘आम्लयुक्त पाचकरस’ तयार होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे worry, hurry, curry.

Hurry – भराभरा जेवल्याने हवा गिळली जाते. म्हणून पोट फुगते, पोटाला तडस लागते.

Worry – अनावश्यक अतिकाळजी करत राहणे.

Curry – मसालेदार पदार्थ, शीतपेये, कॉफी, चॉकलेट.

*अम्लतासाठी इतर कारणे*
- आपण असल्यास अम्लता विकसित करू शकता

- जास्त वजन किंवा लठ्ठपणा

- नियमित किंवा अगदी निष्क्रिय धुम्रपान करणारा

- आवश्यक मीठ सेवन पेक्षा जास्त खाणे.

- कमी फायबर समृध्द अन्न घेणे

- पुरेसे शारीरिक कार्य आणि व्यायाम करत नाही

- एंटिडप्रेसर्स, सेडेटिव्ह्ज, पेनकेल्लर्स, ब्रॉन्कोडायलेटर्स (दम्यासाठी वापरली जाणारी औषधे) सारख्या काही औषधे घेत आहेत.

- एक मद्यपान करणारा किंवा कॅफीन असलेले भरपूर पेय पदार्थ पिणे.

- झोपायच्या आधी किंवा जेवण करण्यापूर्वी जेवण खाणेx, ते सामान्य पाचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकते आणि अम्लता होऊ शकते.

उपचार
याबरोबरच विनादुष्परीनाम असणारी होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा लाभ घ्या; होमिओपॅथीमध्ये रक्तदाबासाठी पूर्णपणे उपचार आहे, रक्तदाब बरा होऊ शकतो.

16/12/2019

*व्यायाम*

शारिरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही छान राहते.

नियमित व्यायामामध्ये ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो. बैठे व्यायामही करता येत्तात .

==व्यायामाचे प्रकार== (type of yoga) १. ताणण्याचे व्यायाम
उदा. योगासने, सूर्यनमस्कार
२. एरोबिक्स (रक्ताभिसरणाचे) व्यायाम
उदा. चालणे, धावणे, जॉगिंग, नृत्य, पोहोणे, सायकलचालविणे
३. श्वासाचे व्यायाम
उदा. प्राणायाम
४. शक्तिचे व्यायाम
उदा. वजन उचलणे व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.यामुळे माणूस आनंदी राहायला मदत होते. व्यायामामुळे आपली मानसिक शक्ती तसेच शारीरिक शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हि सध्याची गंभीर जागतिक समस्या आहे आणि व्यायामामुळे हि कमी होण्यास मदत झाली आहे.

व्यायामाचे फायदे

वजन नियंत्रित राहण्यास मदत

शारिरीक क्षमते मध्ये वाढ

नैराश्याचे प्रमाण कमी होणे

उत्साह वाढणे

शरिर पिळदार होणे

रोग प्रतिकार क्षमता वाढते

स्नायू मजबूत होतात

15/12/2019

*जीवनसत्त्वे (Vitamins)*

सर्व सजीवांच्या वाढीसाठी कर्बोदके, मेद, प्रथिने आवश्यक असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांची त्रुटी निर्माण झाल्यास सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना काही विकार उद्भवतात. अशा कार्बनी संयुगांना जीवनसत्त्वे म्हणतात.

*प्रकार*
जीवनसत्त्वांचे स्निग्ध पदार्थात विरघळणारी मेदविद्राव्य व पाण्यात विरघळणारी जलविद्राव्य असे गट केले जाते. अ, ड, ई, के ही मेदविद्राव्य आणि ब, क ही जलविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत.
मेदविद्राव्य जीवनसत्त्वाच्या गटात अ, ड, ई आणि के या जीवनसत्त्वांचा समावेश होतो.

*जीवनसत्त्व अ :*
दूध व दुधापासून मिळविलेली साय, लोणी व तूप तसेच पालक, कोथिंबीर, मका, सुरण, रताळी, टोमॅटो, गाजर, लाल भोपळा, पपई व आंबा यांत ते भरपूर प्रमाणात असते.
अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्पष्ट दिसत नाही व रातांधळेपणा येतो.

*जीवनसत्त्व ड :*
जीवनसत्त्वात ‘ड२’ आणि ‘ड३’ असे प्रकार आहेत. ‘ड२’ जीवनसत्त्वाची रासायनिक नावे अरगोकॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, व्हायोस्टेरॉल अशी आहेत.

सर्व प्राण्यांत ते अल्प प्रमाणात असून जठर आणि यकृतात असते.
त्याचे कार्य आणि परावटू ग्रंथीतील पॅराथॉर्मोन संप्रेरकाचे कार्य एकमेकांस पूरक असते. कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या चयापचयावर ड जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते. शरीरातील हाडे आणि दात यांच्या जडणघडणीवर डजीवनसत्त्वाचा परिणाम होतो.
ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगडया, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात. शरीरातील लांब हाडांच्या टोकाशी कूर्चा तयार होते, हाडे वाकल्यामुळे बरगडया व पायांना बाक येतो, कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात. या लक्षणांना मुडदूस विकार म्हणतात.
ड जीवनसत्त्वाच्या अभावे प्रौढांना अस्थिमार्दव विकार होतो. त्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. ड जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने विषाक्तता होते. रक्तातील कॅल्शियम व फॉस्फरसची पातळी वाढते, वृक्क व रक्तवाहिन्यांत कॅल्सीभवन होते आणि डोकेदुखी, थकवा व पोटदुखी उद्भवते.

*जीवनसत्त्व ई :*
याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे.
करडई, शेंगदाणा, मका व सरकी यांच्या तेलात, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्यांमध्ये ई जीवनसत्त्व असते.
जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे स्नायूंची वाढ खुंटते. उंदरांवरील प्रयोगात मादीतील वंध्यत्व व नरात वृषण अपकर्ष यावर ईजीवनसत्त्व उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे. ते प्रजननासाठी आवश्यक असून वंध्यत्व, गर्भपात इ. विकृतींकरिता वापरतात. या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने विषाक्तता होत नाही.
ई जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लिपिड पेरॉक्साइडे रक्तपेशीत साठविली जातात आणि पेशीपटलात विकृती निर्माण होऊन त्या पेशी लवकर नाश पावतात. केशवाहिन्यांमधील रक्ताच्या पारगम्यतेवर विपरित परिणाम होऊन द्रवयुक्त सूज येते आणि पांडुरोग होतो.

*जीवनसत्त्व के :*
के जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्यांत, विशेषत: पालक या भाजीत भरपूर प्रमाणात असते. कोबी, फुलकोबी, टोमॅटो, सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक व माशांचे चूर्ण यांतही ते असते. लहान आतड्यातील जीवाणू अन्नपदार्थातील पूर्वगामी घटकांपासून हे जीवनसत्त्व तयार करतात.
या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठायला वेळ लागतो. अतिरक्तस्राव टाळण्याचे कार्य के जीवनसत्त्व करते. अतिरक्तस्रावाची शक्यता असल्यास गर्भवती मातांना प्रसूती आधी आणि नुकत्याच जन्मलेल्या बालकांना के जीवनसत्त्व देतात.

*ब – समूह जीवनसत्त्वे :*
*जीवनसत्त्व ब१:*
हातसडीचे तांदूळ, कोंड्यासह असलेला गहू, बाजरी, ज्वारी, गव्हांकुर, भाज्या, अंडी, मांस आणि सागरी मासे यांत मोठया प्रमाणावर थायामिन असते.

त्यांच्या त्रुटीमुळे भूक कमी होणे, वजन घटणे, पावले वाकडी होणे, हृदयाची गती कमी होणे, मेंदूवर परिणाम होणे व तोल जाणे ही लक्षणे दिसून येतात. या लक्षणांना पॉलिन्यूरायटिस अथवा बेरीबेरी म्हणतात.
*जीवनसत्त्व ब२ :*
तृणधान्ये, डाळी, मांस, दूध इत्यादींमध्ये हे जीवनसत्त्व मुबलक असते.

त्याच्या त्रुटीमुळे तोंडाच्या कडांना चिरा पडणे, जीभ लाल होऊन दाह होणे, नाक, डोळे व कान यांच्या कडांभोवतीच्या त्वचेवर सूज येणे अशी लक्षणे दिसतात.

*जीवनसत्त्व ब३ :*
ब३ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वल्कचर्म (पेलाग्रा) हा त्वचेचा विकार उदभवतो. या विकारात त्वचा सुजून लाल आणि नंतर काळी होऊन खरखरीत होते, जीभ काळी पडून खरखरीत होते. बालकांची वाढ खुंटते.

*फॉलिक आम्ल :*
तृणधान्ये,हिरव्या भाज्या,केळी व पालक यांत फॉलिक आम्ल अधिक असते.
याच्या त्रुटीमुळे अतिसार,हिरडया सुजणे,अस्थिमज्जेची अभिवृद्धी,रक्तक्षय व पांडुरोग अशी लक्षणे दिसतात.गर्भावस्थेत कमतरता असल्यास मातेला पांडुरोग होतो व गर्भदोष निर्माण होऊ शकतो.

*जीवनसत्त्व ब१२ :*
ब१२जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मारक पांडुरोग होतो. त्यामुळे पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होते, अंत:स्रावी ग्रंथीच्या कार्यात बिघाड होतो आणि मेरुरज्जूचा ऱ्हास होतो. गर्भावस्थेत मातेला योग्य प्रमाणात फॉलिक आम्लाचे अंत:क्षेपण केले जाते.

*जीवनसत्त्व क :*
याचे रासायनिक नाव ॲस्कॉर्बिक आम्ल आहे. लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, ओला वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, कोबी, बीट व गाजर यांत क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
क जीवनसत्त्व त्रुटीमुळे होणाऱ्या विकारास स्कव्र्ही म्हणतात. या विकारात मनुष्याचे वजन घटते, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ होतात व स्नायू कमजोर होतात, हिरड्या सुजतात, रक्तस्राव होतो आणि सौम्य स्पर्शानेही हिरड्यांमधून रक्त येते. परिणामी दात सैल होतात. या जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

14/12/2019

होमिओपॅथी

होमिओपॅथी सुरुवात, १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन वैद्याने केली. "समानाला समान बरे करते" (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते.

*स्वरूप*
होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते अशी समजूत आहे. त्यामुळे होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्व, रूपरंग व स्वभाव आहे आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते हे होमिओपॅथीचे मूळ सूत्र आहे. अर्थात, एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना दोन तऱ्हेची वेगळी औषधे दिली जाऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी मानसिक आरोग्य दुरुस्त करून मग शरीरावर काम करते असे मानले जाते. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्या औषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते असे समजले जाते. एका रोग्यासाठी निवडावयाचे औषधरोगाच्या नावावर अवलंबून नसते तर ते रोग्याच्या संपूर्ण शरीरात होणार्‍या बदलांवर अवलंबून असते; यासच सारखेपणाचा कायदा असे म्हणतात.

*तत्त्वे*
काट्याने काटा काढणे या तत्त्वाप्रमाणे रुग्णाला ज्या प्रकारचा त्रास होतो आहे त्याच आजारांचे अंश थोड्या प्रमाणात रोग्याच्या शरीरात सोडून त्याची प्रतिकारशक्ती वाढवता येते आणि यामुळे रोगाशी प्रतिकार करण्याची क्षमता येते.
सूक्ष्म औषध देऊन जास्त परिणाम साधला जातो.

14/12/2019

After long time I am forwarding post about health and diseases.
Hope that you have understood it.
Thank you

12/08/2019

*जीवनसत्त्वे थोडक्यात*

उदा. अ, ब, क, ड
आपल्या शरीराला चार प्रकारचे जीवन सत्त्वे आवश्यक आहे. उदा. अ, ब, क, ड

*जीवनसत्त्व “अ” चे कार्य*

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. ज्या बाळामध्ये जीवनसत्त्व ‘अ’ ची कमतरता आहे, त्यांनी पुढील गोष्टींचा आहारात समावेश करावा –
भोपळा, गाजर, पिकलेला आंबा, हिरव्या भाज्या जसे कि पालक, मेथी, हरबरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य इ. गोष्टींचे सेवन करावे.

*जीवनसत्त्व अ ची कमतरता*

जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा आजार होतो.

*जीवनसत्त्व “ब”*

जीभ व तोंडाच्या आतील त्वचा ओली व नरम ठेवणे.
* रक्तातील आवश्यक घटक निर्माण करणे.

*जीवनसत्त्व ब ची कमतरता*

बेराबेरी हा आजार जीवनसत्त्व ब च्या कमतरतेमुळे होतो.

*बेराबेरी ची चिन्हे/ लक्षणे-*

तोंडात फोड येणे.रक्त फिके पडणे.ओठ, कण, नाकाचे कोपरे कापणेपाय दुखणे व पायाची आग होणेज्या भागावर सुर्यप्रकाश पडेल तो भाग फाटणे

*घ्यावयाची काळजी –*

हिरव्या भाज्यात जीवनसत्त्व ‘ब’ खुप प्रमाणात असते. म्हणून दररोजच्या जेवणात यांचा समावेश असावा.हिरव्या भाज्याबटाटा, सफरचंद, चिकू इ. फळांच्या साली तसेच डाळींचे टरफल, हातसडीच्या तांदूळाच्या वरील भागावर जीवनसत्त्व ब जास्त असते. कुठलीही भाजी आणि अन्नातही ते जास्त प्रमाणात असते.तांदुळ, डाळींना घासुन घासून धुवू नये किंवा त्यांचे पाणीही काढू नये. साली सहित डाळी उपयोगात आणाव्या.

*जीवनसत्त्व "क" चे कार्य –*

कुठलीही जखम लवकरात लवकर भरण्यास मदत होते.
* जेवणातील जास्तीत जास्त लोह शोषून घेते.
* रक्तातील केश वाहिन्यांची कार्यक्षमता वाढवितो.

*जीवनसत्त्व क ची कमतरता –*

हिरड्या सुजणेहिरड्यांतून रक्त येणेसंधिवाताचा त्रास होणेदात पडणे ( कमी वयात)केस गळणे.

*घ्यावयाची काळजी –*

दररोजच्या जेवणात पुढील गोष्टींचा समावेश करणे

आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच, मोच्द आलेल्या धान्यात विटामिन सी जास्त प्रमाणत असते.भिजवलेले पदार्थ उदा. ढोकळा, इडली इ.मध्ये विटामिन सी जास्त असते.

*जीवनसत्त्व "ड" व कॅल्शियमचे कार्य*

हाडे मजबूत करणेहाडे व दाताचा विकास करून मजबूत करणेजखम झाल्यानंतर रक्त लवकर थांबणे (जमा होणे)

*जीवनसत्त्व "ड" व कॅल्शियमची कमी*

छोटया मुलांचे हात पाय ढिले पडणे किंवा वाकणेगरोदर मातेला प्रसूतीची बाधा आणणेहात पायाच्या सांध्यामध्ये सुज होणे.बालकाच्या छातीची हाडे दिसणेमुलांच्या हाडात गाठी होणेमुडदूस हा ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो.

*घ्यावयाची काळजी*

सूर्यप्रकाशामुळे ‘ड’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणत मिळते. छोटया बालकांना सकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवणे. तेलयुक्त आहर घेतल्यास ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकते. उदा. शेंगदाणा तेल, जवस तेल, सरकी तेल इ. केळ, दुध, ताक, दही यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

Address

A/P Kesapur ; Tal Rahuri ; Dist Anagar
Shrirampur
413715

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+918788720209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Atul Ghodekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Atul Ghodekar:

Share

Category