Chef Aniruddha Ranade

Chef Aniruddha Ranade Cooking is an Expression Of Who We Are So Cook Your Food With Attitude...

04/07/2025
21/06/2025
Let the hands get dirty 👊🏻😉
28/11/2024

Let the hands get dirty 👊🏻😉

Contemporary Asian Cuisine - Indonesia * Sambal Oelek Chilli Paste *Ingredients:I onion - sliced5 cloves Garlic1 inch fr...
06/07/2024

Contemporary Asian Cuisine - Indonesia

* Sambal Oelek Chilli Paste *

Ingredients:

I onion - sliced

5 cloves Garlic

1 inch fresh ginger, peeled and thinly sliced

12 red finger-length chillies, deseeded

2 tbsp oil

1 teaspoon shaved palm sugar or dark brown sugar

1½ cup (100ml) vinegar

1/4 tsp salt, To taste

Procedure:

Grind the onion, garlic, ginger and chillies in a food processor or mortar to a smooth paste..

② Heat the oil in a trying pan and stir-fry the paste over medium heat until Fragrant, 8-5 minutes. Season with the sugar, vinegar and salt..

③ Remove from the heat and cool, then store refrigerated in a sealed jar for up to 2 months...

Hello, हल्ली वरचेवर भेट होतीये आपली... हल्ली बरेच फॉरवर्ड मेसेज व्हाट्सअप, फेसबुक वर फिरत असतात कधी कधी वाटतं एखाद वेळेस...
11/02/2024

Hello,

हल्ली वरचेवर भेट होतीये आपली... हल्ली बरेच फॉरवर्ड मेसेज व्हाट्सअप, फेसबुक वर फिरत असतात कधी कधी वाटतं एखाद वेळेस तरी असं होईल का, की माझाच Article मला फॉरवर्ड म्हणून आलाय😀😀 त्यादिवशी होईल माझी स्वप्नपूर्ती😍 हाहाहा विनोदी आहे.. पण आहे..

आयुष्यात आणि त्यातही करिअर मध्ये सपोर्ट आणि ॲप्रिसिएशन ची खूप गरज असते... बऱ्याच वेळा लोकांकडे टॅलेंट असतं, काहीतरी करून दाखवायची कुवत असते, पण सपोर्ट नसतो किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि केलेल्या गोष्टीचं कौतुक करणं खूप गरजेचं असतं... तुमच्याही घरी कोणी कधीही अगदी छोटीशी गोष्ट केली तरी आपण तोंडभरून कौतुक करावं त्याने एक Boost मिळतं..

माझे मागचे दोन-तीन लेख फूड आणि डायट यावर लिहिलेले होते.. आपण फास्टफूड बद्दलही पाहिलं.. बऱ्याच लोकांना पटलं काहीना पटलं असेल पण फॉलो कसं करावं?? ते कळत नसेल.. त्याच लेखात मी शेवटी लिहिलं होतं गोष्टी आपल्याला पटतात समजतात, त्या जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र आपण मागे फिरतो नाहीतर आज माझा Cheat Day आहे असं म्हणतो....

Cheat Day, म्हणजे थोडक्यात "कधी तरी चालतं हो" आजचा आपला विषय जरी हा नसला तरी ह्यावर सुद्धा बोलण्याची तितकीच गरज वाटते... कोणा दुसऱ्यापेक्षा आपल्या शरीराला आपणच चांगलं ओळखतो.. आपल्या शरीराला काय खाणं-पिणं सुट होतं ते आपल्याला व्यवस्थित माहिती असतं.. त्यासाठी कोणा डॉक्टर, डायटीशियन, न्यूट्रिशनिस्ट किंवा अगदी माझ्यासारख्या शेफ ची काहीच गरज नसते... ही सगळी मंडळी तुम्हाला एक डायट प्लान करून देऊ शकतात, पण आपणच तो नीट पाळायला हवा... आपल शरीर बरोबर आपल्याला हवे ते पोषक घटक अन्नातून घेत असतात आणि काही कमी वाटलं तर आजार रूपात आपल्याला दाखवून देतात, 'बाबा रे हे कमी खा, हे जरा जास्त खा... हो पण ऐकेल तो माणूस कुठला... नियम मोडणं हिच माणसाची प्रवृत्ती... नाही तर, सगळेच शहाणे असते तर नियम हा शब्दच अस्तित्वात नसता...

आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर येऊया बॅलन्स डाएट पण हेही माझं बरंच सांगून झालय त्यामुळे यावर फार काही बोलणार नाही... हल्ली बरीच जणं कॅलरी - कॅलरी करतात... आता "कॅलरी" म्हणजे नेमकं काय?? कशात किती असते?? वगैरे बेसिक नॉलेज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीन.. बाकी कमेंट बॉक्स आहेच... तुम्हाला माहितीच आहे मी सगळ्यांच्या प्रश्नाचं नेहमीच स्वागत करतो, पण बहुतेक वेळा सगळ्यांना नीट समजतं त्यामुळे कमेंट फक्त कौतुकाने भरलेल्या असतात त्यासाठी तुमचे खूप आभार...❤😇🙏🙏

बॅलन्स डाएट चा विषय निघालाच आहे तर त्याबद्दल थोडं बोलू... बॅलन्स डाएट मध्ये प्रामुख्याने चार रंगाचे पदार्थ येतात आणि त्यानुसार ते खाल्ले ही जावेत... रंगावरून एक गोष्ट आठवली... हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलेल्या नवीन Graduates ना शिकवण, त्यांचे बेसिक्स क्लिअर करणं, त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देणं... ट्रेनिंग सेशन घेणं हा सुद्धा माझ्या कामाचा एक भाग आहे... ही मुलं कधी काय प्रश्न विचारतील याचा काही नेम नसतो त्यामुळे तुम्हाला कायम अपडेटेड राहावं लागत... काहीही Unexpected प्रश्न विचारतात हे, नवीन जॉबला लागलेले किंवा अगदी कॉलेज ट्रेनी सुद्धा.. त्यामुळे प्रॅक्टिकल सोबत आमचं वाचन सुद्धा पक्क असाव लागत... तर असाच एक दिवस पिझ्झा ची ऑर्डर बनवत असताना, त्या मुलाने प्रश्न विचारला...'Chef, ये मार्गारिटा पिझ्झा को.. मार्गारिटा पिझ्झाही क्यों बोलते है'??? आता हा काय ऑर्डर च्यावेळेस विचारण्याचा प्रश्न आहे का??? मुळात हा काय प्रश्न आहे का?? नशिबाने मी बऱ्याच इटालियन Chefs सोबत आधी ही काम केलय आणि इटलीला सुद्धा बऱ्याचदा जाऊन आलोय त्यामुळे त्याचे उत्तर माहीत होतं हो, पण ऐन वेळी असा बॉम्ब टाकला की कधीकधी पंचाईत होते ना...

बरं त्यांच्या अपेक्षाही चूक नसतात हा आपला शेफ आहे.. ह्याच्या अंडर आपण काम करतो त्यामुळे त्याला सगळं माहिती असणार आणि ते असायलाही हवं... तर उत्तर असयं मार्गारिटा नावाची राणी आणि तिचे पर्सनल शेफ यांनी लोकल इन्ग्रेडियंट वापरून म्हणजे.. टोमॅटो, चीज आणि बेसील वापरुन पिझ्झा बनवला आणि तो तिला प्रचंड आवडला... पुढे हा पिझ्झा तिच्याच नावावरून प्रसिद्ध झाला... दुसरी गोष्ट अशी, हा पिझ्झा इटलीच्या फ्लॅग ला रिप्रेझेंट करतो... रेड कलर म्हणजे टोमॅटो सॉस, व्हाईट कलर म्हणजे चीज आणि ग्रीन कलर म्हणजे बेसिल ची पानं म्हणून इटालियन Cuisine चा भाग म्हणून हा पिझ्झा वर्ल्ड फेमस आहे... तर असही काय काय आम्हाला रोज सहन कराव लागतं, पण हीच मुलं मोठे शेफ सुद्धा होतात तरीही आम्हाला विसरत नाहीत हे पाहून खूप आनंद होतो... पुन्हा बॅलन्स डाएट वर येऊया ना😅😅

फुड सायन्स हे पूर्वी साध्या सोप्या भाषेत सांगितलं जायचं जेणेकरून एखाद्या अडाणी माणसाला सुद्धा ते सहज समजू शकेल... रंगांची ओळख आपल्याला लहानपणापासून असते त्यामुळे लिहिता वाचता जरी येत नसलं, तरी हा एक छोटासा उपाय.... आपला चौरस आहार योगायोगाने चौरंगी सुद्धा आहे... तुम्ही अगदीच रंगांच्या शेडमध्ये जाऊ नका.. वेगळे रंग या स्वरूपात बघा.. पांढरा, पिवळा, हिरवा आणि लाल पांढरा रंगाचा.. भात, कांदा-लसूण, अंड, दूध, फ्लॉवर.... पिवळ्या रंगात.. पोळी, वरण, फळं, लिंबू.... हिरव्या रंगात.. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आणि लाल रंगात.. टोमॅटो, गाजर, लाल मिरची आणि मांस अशी साधारण वर्गवारी आपण करू शकतो... हे झालं अगदी सामान्य माणसाचं....

आता उच्चशिक्षित किंवा हाय प्रोफाईल लोक सारखं कॅलरी कॅलरी बडबडत असतात... नेमकं काय आहे हे प्रकरण?? गाडीला पेट्रोल, मोबाईल ला चार्जिंग, तसंच शरीराला सुद्धा ऊर्जेची गरज असते... हीच एनर्जी किंवा ऊर्जा कमी-जास्त होणं म्हणजेच कॅलरी Gain किंवा Burn करणं... एखाद्या पदार्थात किती कॅलरी आहेत हे त्यातल्या मेन न्यूट्रिशनल पार्ट्स मधून ठरवलं जातं... नंतर पदार्थांमध्ये Protein Carbs आणि Fat प्रामुख्याने बघितले जातात... त्या पदार्थात हे 3 idiots किती आहेत ते पाहिलं जातं... Carbs आणि Protein भाऊ-भाऊ... यांच्या एक ग्राम मध्ये साधारण चार कॅलरी असतात आणि Fat म्हणजे जाड माणसं नाहीत हं... स्निग्ध पदार्थ, यांच्या एक ग्राम मध्ये साधारण नऊ कॅलरीज असतात... हे बेसिक प्रमाण घेऊन तुमच्या रोजच्या जेवणात त्याचा किती समावेश आहे, उदाहरण द्यायचं झालं तर ब्रेड च्या एका स्लाईस मध्ये 10 ग्रॅम प्रोटीन 15 ग्रॅम Carbs आणि 05 ग्रॅम Fat असतील... समजा तुम्ही चार स्लाईस खाल्ल्या तर बघा बरं गुणाकार करून.. तुम्हीच करा, मला ते गणित म्हटलं की जाम कंटाळा येतो😅😜 तर अशा मोजायचा असतात कॅलरीज.. आपण जितक्या कॅलरी Intake करतो त्यापेक्षा जवळजवळ दुप्पट कॅलरी Burn करायच्या असतात आणि ते फक्त कष्टाची काम करून किंवा व्यायामाने शक्य आहे म्हणून, जेवणासोबत नियमित व्यायामही करायला हवाच... तर आणि तरच तुमचं वजन Control मधे राहील..

परदेशातून काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत रेसिपी स्टँडर्डायझेशन.... भारतात याची खूप कमतरता जाणवते आणि आपल्या इथे पिझ्झा-बर्गर ला जेवढी मान्यता आणि पोपुलारिटी मिळाली तेवढी आपल्या, एक बटरचिकन सोडलं तर बाकी कोणत्याही डिश ला वर्ल्ड मध्ये मान्यता मिळू शकलेली नाही... कारण आपली कोणतीच रेसिपी स्टँडर्ड नाहीये.. कोणी असं बनवतं, तर कोणी तसं... आपली साधी बटाट्याची भाजी; आहे का काही स्पेसिफिक रेसिपी, नाहीये.. शंभर प्रकारे बनवता येते.. पण आपल्या भारतात फेमस आहे नाही का?? हाच एक Drawback आहे... भारतीय Cuisine जगभरात फेमस असूनही स्टँडर्डायझेशन नसल्याने त्याला काही Value नाहीये..

रेसिपी स्टँडर्डायझेशन होतं म्हणजे नेमकं काय की ठराविक पदार्थात काय काय पडतं, त्याचं प्रमाण फिक्स होतं आणि त्यापासून मिळणाऱ्या कॅलरीज काउंट करणं, ट्रॅक करणं, आणि कंट्रोल ठेवणं सोपं जातं आता तुमचं तुम्हालाच वजन कमी करता येईल... पण आपण सगळेच सढळ हातानी स्वयंपाक करणारी लोकं... जेवण बनवणं खाऊ घालणं प्रेमाचं आणि पुण्याचं काम समजणारे... त्यामुळे भारतात रेसिपी स्टँडर्डायझेशन होणं जरा कठीणच आहे... म्हणूनच डायट करताना आपल्याला परदेशी सॅलडचा वगैरे आधार घ्यावा लागतो... तीथलं घ्यायचं असेल तर भारताने नक्कीच स्वच्छता घ्यायला हवी... परदेशात खाद्यपदार्थ जिथे बनतात तिथली स्वच्छता हेल्दी Atmosphere ह्या गोष्टी असणं आणि त्यासाठीचे नियम खूपच Strict आहेत... भारतात ते तेवढ्या प्रमाणात अनुभवायला मिळत नाहीत, म्हणूनच बहुदा आपली Immunity Power त्यांच्यापेक्षा जास्त असावी...😁😁😁 हाहाहा....

काय मग कसा वाटला लेख होईल ना थोडाफार फायदा?? परत भेटूच लवकर... तोपर्यंत...
हेल्दी खा आणि हेल्दी रहा❤😇

©✍🏻Chef Aniruddha Ranade
The Artisan Chef - Culinary Reinvent

🎉 Facebook recognized me as a top rising creator this week!
07/02/2024

🎉 Facebook recognized me as a top rising creator this week!

 🍒🍒Beautiful Cherry 🍒🍒 Tomatoes🍅🍅.... Turned into Delicious 🍕🍕 Pizza Sauce 🫙🫙Aniruddha Ranade The Artisan Chef - Culinar...
15/01/2024


🍒🍒Beautiful Cherry 🍒🍒 Tomatoes🍅🍅....
Turned into Delicious 🍕🍕 Pizza Sauce 🫙🫙
Aniruddha Ranade
The Artisan Chef - Culinary Reinvent

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
08/12/2023

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

A mind that is stretched by new experiences can never go back to its old dimensions...
04/12/2023

A mind that is stretched by new experiences can never go back to its old dimensions...

Restaurant Reinvent ByThe Artisan Chef
15/10/2023

Restaurant Reinvent ByThe Artisan Chef

THE RAIN STORY!!!🌧️🌧️🌦️🌦️पावसाळा सुरू झाला की माणसाच्या mentality मधे काही बदल होत असावेत... mainly त्याच्या खाण्यापिण्य...
08/07/2023

THE RAIN STORY!!!🌧️🌧️🌦️🌦️

पावसाळा सुरू झाला की माणसाच्या mentality मधे काही बदल होत असावेत... mainly त्याच्या खाण्यापिण्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात! आणि त्या दृष्टिकोनामुळेच त्याच्यी भूक चाळावत असावी. नाहीतर एरव्ही खाण्यापिण्याकडे लक्ष न देणारे या काळात छोट्या मोठ्या गोष्टींत रस घेतात... पावसाळा माणसांना थोडा मृदू बनवतो, काहीसा poetic सुद्धा..‌. कदाचित नेहमीच्या धावपळीत त्याला जी काहीही न करता बसण्याची उसंत मिळत नाही, ती या काळात मुबलक मिळते...

माणूस आदिमानव म्हणून जगत असताना पावसाळा हा त्याच्यासाठी गुहेत काहीही न करता बसण्याचा काळ होता... काहीतरी करत राहण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्या काळात त्याला चिंतन करण्याचे व्यसन लागले असेल... वादविवाद करण्यासाठी, चित्रं काढण्यासाठी आणि हत्यारं, शिल्पं निर्माण करण्याची प्रेरणा त्याला याच काळात त्यामुळेच मिळाली असेल... आणि त्यातून अनेक काव्य व तत्वज्ञानांचा पाया घातला गेला असेल... अर्थातच त्याचा याच काळात नेहमीचा शिकार आणि फळांचा आहार बाजूला पडून नवीन प्रकारचे खाणे त्याच्या समोर आले असावे.... आताही, इतके पावसाळे पाहिल्यानंतरही प्रत्येक पावसाच्या दिवशी खिडकीत नुसते दोन मिनिटं उभं राहिलं तरी नेमाड्यांच्या भाषेत स्थिती होते.... मग वेगवेगळे वास नाकात यायला लागतात... ते मनातील विविध कोपऱ्यात विखरून पडलेल्या आठवणीतील असतात... पाऊस पाहात खिडकीत उभं राहिलं की पहिला वास डोक्यात येतो तो चहाचा...

बाकीच्या दिवशी गरज असलेला चहा पावसात अचानक ऐश आणि सेलिब्रेशनचा क्षण बनतो.... मला वाटतं याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याला टी टाइम लागत नाही... दुपारचे चार वाजलेत की सहा याला पावसाळ्यात काही अर्थ नसतो... बस पाऊस पडला पाहिजे. पावसात कॉफीचाही आनंद घेतात... पण चहाच्या आनंदाला तोड नाही... बाहेर जोरदार पावसाच्या सरी कोसळत असताना त्याच्या अंगांगात भिनणाऱ्या साउंड इफेक्टच्या पार्श्वभूमीवर चहा बनवणे हा तर आध्यात्मिक अनुभव असतो... चहा उकळायला लागला की त्याच्या उष्णवाफा तुम्हाला तुम्ही स्पेशल असल्याच्या भावना देतात... त्यात मग गवती चहाच्या काड्या पडल्या की आसपासच्या परिस्थितीचा विसर पडलाच म्हणून समजायचा... नाकात शिरणारा तो गंध तुम्हाला प्रवासाला घेऊन जातो... त्या मोजक्या क्षणांत तुम्ही किती रानांची भटकंती करता आणि किती जणांना कुठे भेटता हे सांगणे कठीण आहे..‌. कारण प्रत्येक वेळी हा अनुभव वेगळाच असतो.... मग आपल्या आवडत्या कपात चहा ओतायचा असतो... एरव्ही घाईगडबडीत असताना कोणताही कप चालतो पण पावसाळ्यात नाही... कारण तो कप घेऊन तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागी खिडकीत किंवा त्या लगतच्या आराम खुर्चीवर बसायचं असतं... चहा ओतला जात असतानाच काहीतरी खायची हुक्की येते.... ती भूक नसते तर जीभेची चाळवाचाळव असते... असा विचार मनात येतो न येतो, नाकात भज्यांचे वास अस्वस्थ करून सोडतात... कांदा भजी सगळ्यांची फेव्हरेट... पण त्या जोडीला बटाटा भजी, ढोबळी मिरची, वांगी याची भजीही बहार आणतात...‌ गोव्यात असलात तर तिथली (आणि फक्त तिथेच मिळणारी) खास मिर्ची भजी हवीतच... त्या मिरची भज्यांनी जीभेवर केलेल्या किंचित हलक्या हल्ल्यानंतर चहाचे तप्त वार म्हणजे विचारायलाच नको... एकीने नुकतीच जखम देऊन गेल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी केवळ नजरेने छळ करणारी भेटावी तसा अनुभव....मग गोव्यातच असल्यास तेथे फक्त पावसाळ्यात उगवणारी अळंबी मिळते... गोव्याचा गरम मसाला घालून केली जाणारी ही अळंबीची भाजी तेवढ्या काळात कोंबड्या आणि बकऱ्यांना हरवते.‌.. याच वातावरणात जीभ कणसांसाठी खवळून उठते.... रस्त्यावरच्या कणीस भाजणाऱ्यांकडून विकत घेऊन ते खात खात जाणे ही गम्मत असली तरी प्रत्यक्ष भाजण्यांतही एक वेगळी मजा असते.... आणि कणीस खाल्ल्याची आठवण मागे राहते ती त्यावरच्या मुक्तहस्ते उधळलेल्या तिखटलिंबाच्या ओठांबाहेर टिकून राहणाऱ्या हुळहुळण्याने.‌.. तीच बाब उकडलेल्या शेंगदाण्यांची.... पावसाशिवाय उकडलेल्या शेंगा खाणारा माणूस रखडलेल्या ट्रेनमधला प्रवासीच असू शकतो... पावसात शेंगा उकळायची आपोआप हुक्की येते... थोडीशी हळद आणि मीठ घालून असतील नसतील तितक्या शेंगा डायरेक्ट कुकरला उकडायला ठेवायच्या.... तीही कणसाप्रमाणे हिशोबाने खायची नसतात.... बाजूला टरफलांचा ढीग जमला की अरे बापरे किती खाल्लं आपण असं म्हणून त्यातले चुकून राहिलेले दाणे शोधायचे असतात....
पावसात प्रत्येकाच्या खाण्यापिण्याबद्दलची कल्पकता उफाळून येतेच... एकतर हव्या असलेल्या अनेक गोष्टींची कमतरता असते आणि दुसरं या गोष्टींसाठी माणसाकडे खूप वेळ असतो... एरव्ही न केले जाणारे पदार्थ घरात बनतात... कुळथाचं पिठलं हा त्यापैकीच एक... कुळीथ उकळून त्याचे फक्त पाणी घेऊन बहारदार रस्सा केला जातो... त्याला कट म्हणणे अत्यंत संयुक्तिक आहे... त्या कटात सहभागी झालेले आपल्या उरलेल्या दिवसातील अपॉईंटमेट कट करतात.... मला अशी शंका येते की नेहमी कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या पुरुषांना एखाद दिवस घरी अडकवून ठेवण्यासाठी बायकांनी हा कट केलेला असावा... कट संपवल्यानंतर करण्याजोगी सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे चादर घ्यायची आणि मस्त झोपायच 🥱

हेच दिवस सुक्या मासळीचे... पावसाळ्यात सुक्या मासळीला जो मान आणि भाव मिळतो तो एरव्ही क्वचितच प्राप्त होतो... अपवाद अर्थात सुक्या कोळंबीचा.... पावसात सुक्या मासळीचे रस्से बनतात.... अजून एक प्रकार बनतो तो म्हणजे खोटी कढी... याला खोटी कढी म्हणतात त्याला कारण म्हणजे त्यात काहीच नसतं... म्हणजे ती फिश करी असते पण त्यात कोणताही फिश नसतो.... सुका सुद्धा नसतो... नुसतीच नारळ, मिरची आणि चिंचेच्या वाटणाची कढी असते ती. पावसात काहीच हाताशी नसताना ती भातासोबत खाण्याच्या हेतूने बनवली जाते... या कढीसोबत जेवढा भात खाल्ला जातो त्याची तुलना फक्त वरणासोबत खाल्या जाणाऱ्या भाताशीच होऊ शकते... बाकी कोणीही त्याच्या जवळपासही पोहोचू शकत नाही..काही वेळा दिवे गेलेले असताना आणि वाऱ्याने बंद खिडक्याही वाजत असताना ही कढी जेवणाच्या ताटात तुफान माजवते.... एरव्ही तिच्या वाटेला कोणी जात नाही... आणि अशा तुफानी पावसाच्या रात्री रम मजा आणते. तरुणाईच्या काळात परवडणारी आणि हँगओव्हर न देणारी ओल्ड माँक अशा रात्रीच्या मैफली अधिक संस्मरणीय करते... रिमझिमणाऱ्या पावसात व्हिस्की वगैरे ठीक आहे... पण आषाढातल्या पावसाला सर्वोत्तम प्रत्युत्तर म्हणजे रमच.... रम असली की आपोआप रमाच्या आठवणी त्याच्या वासाप्रमाणे खोलीभर पसरतात... अशा वेळी बाहेरचा थोडा पाऊस डोळ्यांत उतरला तरी कोणालाही काही वाटत नाही... मात्र काही पेगनी रमल्यानंतरची भूक राक्षसी असते... त्याची आधी तरतूद नाही केली की सगळी रात्र खराब होते....

अशा वेळी पावसाच्या दिवसांत अंडी घरात असली की कोणतीही काळजी वाटत नाही... जसे एरव्ही घरात बटाटा असल्यावर वाटतं तसं अंडं हे सर्वकालीक, सर्वतारक खाद्य आहे... उगीच गम्मत म्हणून पासून ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांच्या सोयीपर्यंत आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, उपाशीपोटी, भरल्यापोटी, डॉक्टरांनी सांगितलं म्हणून, डॉक्टरांनी सांगितलं नसलं तरी, डॉक्टरांनी सांगून देखील, भाजून, तळून, परतवून, कच्चं भाज्या टाकून, नुसतं मीठ टाकून .... असंख्य कारणं आणि प्रकार... पावसात खाण्यापिण्याची मजा घेण्यासाठी काहीतरी विलक्षण किंवा वेगळेच पदार्थ हवेत असं नाही... रूटीनमध्येही अशा अनेक संधी येतात, फक्त आपली जीभ आणि डोळे जिवंत ठेवले पाहिजेत... कुठेही गाडीने जात असताना ब्रेक घेण्यासाठी वाटेवर क्वचित दिसणाऱ्या चहाच्या टपरीच्या शोधात असताना काही उसळ आणि मिसळ भेटते... त्यावेळी भूक लागलेली आहे की नाही हा मुद्दा अत्यंत गौण असतो.... पाऊस कानात बँड वाजवत असताना भिजल्या अंगाने टपरीवरील बाकावर टेकल्या टेकल्या केवळ उसळ वा मिसळीच्या उल्लेखानेच जीभ dance चं करायला लागते.... मग वाफाळत्या उसळीत बुचकळ्या मारणाऱ्या पावासोबत दहा मिनिटाच्या ब्रेकचे नियमच ब्रेक होतात.... भजी, उसळ आणि मिसळ ही कोणत्याही भुकेविना केवळ आठवणीच्या आणि पावसाच्या जोरावर न मोजता खायच्या वस्तू आहेत... एरव्हीही भजी, उसळ - मिसळ नेहमीच आकर्षित करतात, पण पावसात त्याकडे दुर्लक्ष करू शकणारा एकतर एलियन असला पाहिजे किंवा भयंकर आजाराने जीभेच्या चवीची क्षमता घालवलेला पेशंट असला पाहिजे....

माणूस हा सतत काही ना काही उपद्व्याप करणारा प्राणी असल्याने पावसाळ्यात त्याचे फार हाल होतात.... त्यामुळे तो वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याच्या अथवा खाण्याच्या उद्योगात स्वतःला गुंतवतो...😅😂 त्यासाठी तो पुरुष असला तर उगीच हे कर आणि ते कर असे छळून बायकांचा जीव खातो.😝 नाहीतर (बायकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे) स्वतःच नाईफ हातात घेऊन स्वयंपाकघरात आपली शूरवीरता दाखवतो आणि स्वतःचा शाहिस्तेखान बनून गुपचूप माघार घेतो... परत बायकोच्या मागे लागण्यापासून गत्यंतर नाही😅

पावसात रश्श्यांची झलक मनमुराद लुटावी... त्यात बटाटा टॉमेटो रस्साही पावांच्या लाद्या संपवतो... त्याआधी तो दोनेक तास एकत्र चुलीवर रटरटून दो जिस्म एक जान व्हायला हवा... किंवा पावसात भिजत पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर कोंबडीचा तिखट रस्सा हाणावा... For that matter अशा रश्श्यासाठी असा पन्नास किलोमीटरचा प्रवास पावसात करावा.... काही वेळा पावसाचा मारा असा झकास असतो की Chicken Pieces बाजूला राहातात आणि नुसता रस्सा ओरपला जातो...

पावसाळ्यात खाण्यापिण्यातील एक वेगळी गम्मत असते ती रानभाज्यांची.... डोंगरकपारीत राहणारे आदिवासी किंवा चार पैसे कमवण्याच्या हेतूने नेहमी तयार असलेले गावकरी रानाडोंगरात फिरून या भाज्या गोळा करतात आणि नजिकच्या शहरात किंवा बाजाराच्या ठिकाणी विकायला घेऊन येतात... पूर्वी आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक स्रोतांचा अधिकाधिक उपयोग खाद्यात परिवर्तीत करण्याच्याहेतूने रानभाज्यांचा सर्रास वापर सगळ्या घरांत व्हायचा... घरातील स्त्रीलाही त्याची चांगली माहिती असायची... एखादीला नसली की आसपासच्या बायका तिला सोबतीला घेऊन ती बनवायच्या आणि एक्सपर्ट करूनच सोडायच्या... आता सगळीकडे शिक्षणाने सुधारणा झाल्या, विशेषत्वाने मध्यमवर्ग सुशिक्षित बनला... म्हणून या रानभाज्या वगैरे गावठी आणि गरीबांचा प्रकार बनला आणि त्याबद्दलचे अज्ञान या रानभाज्यांच्या आवकीच्या व्यस्त प्रमाणात वाढले... असो. तरीही रानभाज्यांची चव पावसाळ्यात मजा आणते... कारण एरव्ही त्याच्या वाटेला कोणी जात नाही, कारण त्या उपलब्धच होत नाहीत... दुसरं असं की त्या अत्यंत सोप्या पद्धतीने केल्या जातात... त्यात आधुनिक शेफ्स ना हवे असलेले प्रयोग आणि ग्लॅमर त्यांना नसते.... कुलुची भाजी, आंबट वेल, देठ, किल्ल अशी काही त्यांची नावे असतात.... त्यात नुसती लसणाची फोडणी, कधी आमसुलं टाकून तर कधी नारळ किंवा सुकी कोळंबी टाकून ती बनवली जाते.... प्रत्येक प्रदेशात त्याच्या आपापल्या जाती आणि प्रकार असतात... पंधरा दिवस ते महिनाभराच्या काळापुरतेच त्यांचे अस्तित्व असते... ते आपल्या आयुष्यात नोंदले जायला पाहिजे... टाकळा तर सगळ्यांनाच माहिती आहे... तो पावसाळा संपेपर्यंत वाढतो आणि नंतरही काही काळ असतो... पण त्याची भाजी खायची ती फक्त पहिल्या पंधरा दिवसात, त्याच्या पहिल्या पिकाची... तेर किंवा अळुची पानेही या काळात उगवतात... ती आता काही रानभाजी नव्हे, ती राजरोस सगळीकडे असते आणि दिसते...या रानभाज्यांचे पावसाळ्यांतच आढळणारे अस्तित्व पावसाळ्यापुरतंच राहू द्यावं... त्यांना बारमाही भाजी बनवू नये... आता काहीही कधीहीचा जमाना असल्याने सगळ्या भाज्याफळांतील रसच निघून गेलाय... हल्ली पावसाळ्यात कलिंगडंही दिसतात...

पावसाळ्याने मात्र नित्य यावे... तो नेहमीच्या साध्या गोष्टीत विशेष भाव निर्माण करतो... साधेपणातील गोडी म्हणजे काय ते पाऊस जितका सांगतो, तितकं अजून कोणी सांगू शकतं नाही... पाऊस एकंदर आयुष्याचे ओझे कमी करतो... माणसाला सततच्या विचार, चिंतांनी भंडावलं जाणारं त्याचं डोकं शांत करतो... एखाद्या Machine सारखं चालणारं शरीर माणसाळवतो आणि आपलं खरं प्रेम केवळ खाद्यपदार्थांवर आहे ही भावना सिद्ध करतो... समोरचा उकळता रस्सा, कांदा भजी, चहा तेवढा खरा बाकी सगळं मिथ्या आहे😁😁😁

इति पाऊस पूराण संपूर्णंम्🌧️🌦️

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chef Aniruddha Ranade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chef Aniruddha Ranade:

Share